Skip to main content

समीक्षा

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संग - भाग 5

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 28/02/2015 21:04 या दिवशी प्रकाशित केले.

भाग 5

फुकट फजिती!

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती. मोकळ्या हवेत ठोकलेल्या माझ्या या तंबूला चांदण्यानी सजलेलं छतही होतं मेघांची तलम झालरही होती.

जा जरा पूर्वेकडे (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 27/02/2015 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
संघर्ष हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जवळजवळ ३५०० वर्षांच्या लिखित इतिहासात अजिबात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नसलेली वर्षे जेमतेम २०० असतील. जसजशी माणसाने भौतिक प्रगती केली, तसतशी प्रगती संघर्षांमध्येही होत गेलेली आहे. विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांनी तर हे सिद्ध केलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा माणसांना मारण्यासाठी फार प्रभावीपणे वापर करता येतो. इतर प्राणी गरज असेल तरच दुस-या प्राण्यांची शिकार करतात.

शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका

लेखक ए ए वाघमारे यांनी गुरुवार, 19/02/2015 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका shamitabh अमिताभ बच्चन आणि देव आनंद यांच्यात साम्य काय असं कोणी मला विचारलं तर मी म्हणेन दोघांमध्ये भलेही जमीनअस्मानचा फरक असेल पण एक साम्य आहे ते म्हणजे अमिताभही देव आनंदसारखा म्हातारपणी दिवसेंदिवस तरूण होत चालला आहे. निदान ताजाताजा ‘शमिताभ’ पाहून मला तरी असंच वाटलं.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 18/02/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे.. .भाग 4 जम्मू श्रीनगर बस प्रवास

1979-80 सुमारास हा प्रदीर्घ प्रवास माझ्याप्रमाणे अनेकांनी अनेकदा केला असेल. पण अरूणच्या शब्दांकनाची हातोटी विलक्षण आहे. त्याचा मासला अनुभवा... ‘सार्वजनिक संडास ही राष्ट्राच्या संकृतीची कसोटी आहे!.’ ... हे पु लंचं चपखल वाक्य नेमकं आठवत उरातील सल पोटाकडे कळ बनून सरकते... लाईन लांब व्हायच्या आत तिथे टॅक्स भरून मोकळा झालो!... तिथला ‘एकांत-वास’ सुद्धा...

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग ३ ओरिजनल प्रेम पत्र ...

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/02/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत पंजाबातून जातात तेंव्हाच्या कथा भागातील मजेदार प्रसंग सादर... पठाणकोट डमताल ..

१८५००

ओरिजिनल प्रेम पत्र!

पान२२५ ...आता नुसतचं बसून काय करायचं म्हणून म्हटले झाडावर चढता येते का पाहू... प्रचंड'सालढोम' इतर वृक्षांच्या गर्दीत पांढराफटक वेगळा वाटत होता. सगळ्या अंगाला त्याच्या गुळगुळीत बुंध्याचा पांढरा भुस्सा लागू लागला. वर जायला ही फारसा आधार नव्हता. म्हणून नाद सोडला. तेवढ्यात बुंध्याच्या चुंबळीसारख्या खोलगट गाठीत हाताला एक खोचून ठेवलेला कागद लागला.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/02/2015 00:08 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर सायकलनामा - भाग 2

भाग 2 इंदूर – देवास - सारंगपूर

अरूण वेढीकर सायकलवरून मजल दर मजल करत मध्य प्रदेशात येतात तेंव्हाच्या कथा भागातील मजा मजा सादर...

पान 60 इंदूर ... मध्य प्रदेशाची राजधानी होती. इंदूरवर अस्सल मराठी छाप दिसते. भाषेचा गोडवा कानात साठवावा असा. मराठीला उर्दू-हिन्दी शब्दांची खमंग फोडणी... ‘अरे यार माजरा काय आहे? खमखा चिल्लावून राहिलाय ? इतका शोर मचून का राहिलाय?... ... इंद्रेश्वर मंदिरामुळे याला इंद्रपूर म्हणत. पुढे इंदूर - इंदौर असा अपभ्रंश झाला...राजवाड्या पुढच्या गोयल मंदिरा शेवटी खास मिठाईची गल्ली आहे.

नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 12/02/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाकूडतोड्याची गोष्ट या संजीव खांडेकर यांच्या दीर्घ कवितेचा संक्षेप एका संध्याकाळी एक लाकूडतोड्याटाईप गरीब इसम एका नदीकिनारी आपले कपडे धूत होता. ....... तर घाईमुळे धुता धुता अचानक त्याच्या हातून त्याची 'स्किन' निसटली आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात लांबवर वाहून जाऊ लागली. पोहता न आल्याने व एकुलती एक 'स्किन' वाहून गेल्याने आता आपल्याला नागडेच राहावे लागणार नागडेच शहराकडे परतावे लागणार या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला ..... तू कशाला काळजी करतोस?" एवढे म्हणून भगवान स्वतःच नदीच्या पाण्यात उतरले. एका डुबकीतच त्यांनी निळ्या रंगाची, नवीकोरी, लेबलसहित असल

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे..

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 12/02/2015 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...

1

मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.

“... प्रवास असे दुचाकीचा । रम्य तरीही धकाधकीचा। अशात बादशाही थाटाचा । बडेजाव कशाला? ।। या विचारानुसार निवडलेली आडवाटेवरची देवळं, छोटे खानी हॉटेलं, डेरेदार वृक्ष, शेतातील माच, भटक्या जमातींचे तंबू हीच माझी विश्रांती अन् निवाऱ्याची ठिकाणं होती. अकस्मात घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म थरार होता. साहसाची अशी ही एक भावना होती की जिला उघड्यावरच्या रात्रींची ओढ होती.

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

कलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 06/02/2015 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्टार प्लस वरील महाभारताची आपली चर्चा चांगली रंगली होती. महाभारत चा शेवटचा एपिसोड संपेपर्यंत चर्चा सुरु राहिली होती. आता नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. चक्क ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत. पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय.