१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...

लेखनविषय:
लेखनप्रकार
ऐतिहासिक पेरणेफाटा... पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

"इजय असो"

लेखनविषय:
रामराम लेको, (म्हंजे शेरी लोकं म्हंत्यात तसं 'नमस्कार मंडळी' असं म्हनायचं असतया न्हवं?) गेला म्हैनाभर आपल्याला काय बोलायला टाईम गावला न्हाय. कसा गावंल? दिवाळी चाल्ली होती ना आमची. काय म्हनला? दिवाळी झाल्याला लै दिसं झाली? नाय वो, आमची दिवाळी तर परवाच्याला सपली. कसं काय सांगा बगू? जाऊंदे. तुमाला नाय समजायचं. अवो, गेला म्हैनाभर आमी म्हंजी आमच्या घरातल्या समद्यांनी लै ऐश केली. म्यातर दर्रोज रातीला मटान आनि कॉट्टर हानत होतो. त्येबी रोच्च्याला दोनशे रुपय घिऊन. वरनं बायकुलापन दर्रोज दोनशे रुपये आनि जेवान गावत होतं. घरातली चूल आनि बाहेरची धुनीभांडी सम्दं बंदच केल्तं तिनं.

१९७१ चे युद्ध - पाकवरील विजयाचा ४० वा स्मृतिदिन

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १६ डिसेंब्रर २०११. आज १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील भारतिय विजयाला चार दशके झाली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाक सरकारने युद्धाला सुरुवात केली. पाकी हवाईदलाच्या विमानांनी आपल्या ११ हवाई तळांवर आणि रडार केंद्रांवर हल्ले चढविले आणि पाठोपाठ भारताला युद्ध घोषीत करावे लागले आणि या युद्धाला सुरुवात झाली. १३ दिवस चाललेल्या युद्धात पाकला नामुष्की पत्करावी लागली, बांगला देश हे नवे राष्ट्र जन्माला आले. मोठ्या वल्गना करणार्‍या कुरापती पाकला अवघ्या १३ दिवसात दाती तृण धरुन शरण यावे लागले. ले. ज. ए.ए.के.

सदाबहार देवानंद ..!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
देवानंद म्हटले की मला माझे बालपन आठवून जाते. अगदी लहानपणी होतो तेव्हा कालापाणी बघितला. होता. खोया खोया चाँद गाने म्हणत सायकल शिकलो होतो . देवानंद सारखे दिसायचे देवानंद सारखे बोलायचे त्याच्या स्टाईलने चालायचे असा हा माझा ,तुमचा आवडता हीरो. गाईड बघितला. फली मिस्त्रिची अप्रतिम फोटोग्राफी नि देवानंदचा अभिनय सिनेमाची स्टोरी काळजात कायमची घर करून गेली देवानंद म्हटले की मला माझे बालपन ,तारुण्य आठवू लागते. आणि माझ्या शरीरात तारुण्याचा झरा अवखळपणे वाहू लागतो. देवानंद म्हणजे मला अगदी घरातला जिवाभावाचा मित्र वाटत होता. हल्ली हल्ली मी देवानंद बघतच नव्हतो.

सिंदबाद...

लेखनविषय:
सिंदबाद... एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची. अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं. हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया. वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव.

दोन 'नमुन्यांचे' निबंध

लेखनप्रकार
महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता. निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे. नमूना क्रं. एक- प्र.

पु.ल एक आठवण!

नमस्कार मंडळी, आज ८ नोव्हेंबर! उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे उर्फ भाईकाका यांचा ९१वा जन्मदिवस. आपल्या विनोदी साहित्याने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा हा अवलिया!! चि.वि.जोशी, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज विनोदी साहित्यीकांच्या साक्षीने आपल्या विनोदी लिखानाची सुरूवात केलेल्या पुलंची साहित्य संपदा उत्तरोत्तर आणखीनच बहरत गेली. हरितात्या, नारायण, सखाराम गटणे, बोलट, अंतू बर्वा त्यांनी रेखाटलेल्या या व्यक्तीरेखा मराठी साहित्य विश्वात अजरामर झाल्या.
Subscribe to सद्भावना