लेखकधोंडोपंतयांनी रविवार, 09/11/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो,
मिपावरील आमच्या छंदशास्त्रीय लेखनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम सर्व मिपावरील काव्यप्रेमींना धन्यवाद. भारावून टाकणारा हा प्रतिसाद आहे.
असा प्रतिसाद कोणत्याही मराठी संकेतस्थळावर आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही. मिपाला उथळ वगैरे म्हणणार्यांनी हे सदर पहावे.
या प्रतिसादावरून एक गोष्ट सिद्ध झाली की अनेक जण उत्कृष्ट काव्यलेखनाची क्षमता बाळगून आहेत. फक्त त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि वाव मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने "मिसळपाव काव्यकट्टा" आजपासून सुरू होत आहे.
मिसळपाव काव्यकट्टा हे मिसळपाववरील कवींसाठी काव्यसंमेलन आहे.
लेखकधोंडोपंतयांनी शनिवार, 08/11/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो,
वृत्तबद्ध काव्य ज्यांना लिहायचे आहे त्यांनी एक एक वृत्तावर प्रभुत्व मिळवावे. एकदम भाराभर वृत्ते समोर घेऊन बसू नये. त्यातही तीन पायर्या आहेत.
सर्वप्रथम
१) छंदांवर प्रभुत्व मिळवावे.
त्यानंतर
२) छंदात लिहिणे जमू लागले की जातींमध्ये लिहायला सुरूवात करावी.
आणि शेवटी
३) जातींमध्ये लिहिता यायला लागले की मग अक्षरगणवृत्तात लिहिण्याच्या पायरीवर जावे.
एकदम सुरूवातच मालिनी किंवा शार्दूलविक्रीडित सारख्या वृत्तांची निवड केल्यास जमणार काहीही नाही आणि त्यातून फ्रस्ट्रेशनमात्र भरपूर येईल. एवढं येईल की ते आयुष्यभर पुरेल.
लेखकभास्कर केन्डेयांनी गुरुवार, 06/11/2008 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
रुतलेल्या सहस्त्र जखमा
मी सांभाळतो उराशी
रुदनाचे सोयर तुटले
मज खंत ना जराशी
आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी
गाऊ नको वॄथा तू
माझी मलाच गाणी
वांझोट्या स्वप्नांनीही
मानले रिक्त हे पाणी
जा सोड इथेच आता
चल मोह पाश तोडू
झेपेना स्पर्ष हताचा
खपली नकोस काढू
लेखकराघवयांनी बुधवार, 05/11/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की!
तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही?
लेखकअरुण मनोहरयांनी बुधवार, 05/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
कळीने कधी विचारला
अर्थ उमलण्याचा?
फ़ुलाने कधी दाखवला
स्वार्थ जपणुकीचा?
उषा पुन्हा निघून गेली
पुसून लाली रंगांची
नाही क्षणही थबकली
वाट पहात टाळ्यांची
निर्झरांना कधी मिळाला
आस्वाद मधु जलाचा?
पाखरांना कधी समजला
आवेग तृप्त करण्याचा?
आईने कधी का केला
कंटाळा भरवण्याचा?
अर्थ कधी ना पुसला
बाळाच्या लाथांचा.
लेखकचतुरंगयांनी मंगळवार, 04/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;)
होता खमंग, होता चकणाहि खास बाकी
सारेच टुन्न होती पण आसपास बाकी
जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी
मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही
हातात फक्त काजू करणे खलास बाकी!
फुटलेत पेग सारे अन् फोडलेत काही
उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी
धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा
अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी
ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा
सांगू तिला कसे मी?