मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

आठवणीतील दिवाळी !

kvponkshe ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आठवणीतील दिवाळी ! दिवाळी म्हणजे सणांचा राजा ! २१ दिवस सुट्टी, फराळ , फटाके , भरपूर क्रिकेट ... आम्हा बाळ गोपाळांसाठी पर्वणीच ! पण या दिवाळीचा आनंद असा सहजासहजी मिळत नसे. त्या आधी सहामाही परीक्षेचे अग्निदिव्य पार पडावे लागे. दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई. आणि बहुदा पहिला पेपर गणित किंवा इंग्रजीचा असे. म्हणजे दसऱ्याला मजा करायची सोडून आम्ही मान मोडून अभ्यास करावा अशी शाळेची अपेक्षा असे. (आम्ही शाळेच्या अपेक्षा कधीच पुऱ्या केल्या नाहीत हा भाग अलहिदा ! ). सहामाही चा शेवटला पेपर बरेचदा चित्रकलेचा असे. आणि त्याआधी भूगोलाचा.

हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं

हस्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा खोचा असतात ह्या चित्रपटात तर दरोडेखोर सरळ सांगतो कि उत्त

अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

राजेंद्र मेहेंदळे ·

तिसरी घंटा

जे.पी.मॉर्गन ·
आपण रोजचं वर्तमानपत्र वाचायला शेवटच्या पानापासून सुरुवात करणारी लोकं. आजकाल पहिल्या पानावर असतात त्या माणसाला मनुष्य "प्राणी" का म्हणतात याचा प्रत्यय देणार्‍या बातम्या. पण शेवटच्या पानावर असतात त्या माणसाच्या विजिगीषु वृत्तीच्या, अपार कष्टांच्या, लढवय्या बाण्याच्या गोष्टी. आणि त्यानंतरचं - शेवटून दुसरं किंवा तिसरं पान म्हणजे समाजाच्या सृजनाचं, कलात्मकतेचं, संवेदनशीलतेचं दर्पण - नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचं पान. कितीतरी महिन्यांनी - जवळपास पावणेदोन वर्षांनंतर ते पान पुन्हा रंगीबेरंगी जाहिरातींनी भरायला लागलं आहे.

रुक्मिणी-अनय संवाद

मिडास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग १ कोजागिरीच्या मध्यरात्री वृन्दावनातल्या सळसळत्या पिंपळ वृक्षाखाली रुक्मिणी वाट बघत होती. काही अंतरावर कालिंदी आपल्याच नादात वाहत होती. त्या मंजुळ नादात रुक्मिणी काही वेळ रमली सुद्धा असेल. पण हे मान्य करायची तिची तयारी मात्र नव्हती. लोक म्हणत हिमासारखी शुभ्र अशी ती नदी कृष्णाच्या सावळ्या रंगात रंगून कालिंदी झाली. आज पौर्णिमेच्या मध्यान्हाला चंद्र कालिंदीवर चांदणं शिंपडून तिला पूर्वीच्या रूपाची आठवण करून देत होता. पण तिचं ते रुपडं बघायला रुक्मिणीशिवाय तिथे कुणीच नव्हतं. जिथे पाहावं तिथे रुक्मिणीला कृष्णाच्या नाना लीळांच्या खुणा जाणवत होत्या.

अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा अवघाचि संसार - कल्याण जांभूळपाड्यात राहण्यात आता काहीच अर्थ राहिला नव्हता कारण मुळात गावाचा आणि गावकऱ्यांचाच पत्ता नव्हता तर राहणार कुठे आणि करणार काय?

अवघाचि संसार - कल्याण

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ अवघाचि संसार- जांभुळपाडा रामचा निरोप घेऊन मजल दरमजल करीत हरभट हिंदळ्यात पावते झाले तेव्हा एक नवीनच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली होती. त्यांच्या अपरोक्ष गोंद्याने जोर करून त्यांच्या अर्ध्या बागेचा ताबा घेतला होता. तात्पुरते कुंपण वगैरे घातले होते.

कंटाळा

पाटिल ·
लेखनप्रकार
एके दुपारी आम्ही कार्यालयात टंगळमंगळ टोलवाटोलवी इत्यादी महत्वाची कामं करत बसलो असतानाच शेजारचे रावसाहेब नामक समवयस्क सहकारी मित्र बोलले की, "पाटील, आज जरा कंटाळाच आलाय बुवा." यावर आम्ही बोललो की, "रावसाहेब, तुम्हाला कंटाळा आलाय ही उत्तमच गोष्ट झाली. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सतत सिद्ध करत राहणं, स्वतःला सतत वागवत राहणं, ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे मनुष्याला अधूनमधून कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. उदाहरणार्थ कामाचा, राहत्या जागेचा, शहराचा, गोंगाटाचा, माणसांचा वगैरे कंटाळा येणं हे नैसर्गिकच आहे.

अवघाचि संसार- जांभुळपाडा

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधीचे भाग अवघाचि संसार-हिंदळे अवघाचि संसार- हिंदळे-२ हरभटांनी अलिबागला जायला बोट पकडली. इतक्या दिवसांनी मुलाला भेटायला जाणार म्हणून भागीरथीबाईंनी त्यांच्या सामानात काय काय जिन्नस भरून दिले होते. खरेतर हरभटांच्या कपड्याची एकच पडशी होती आणि बाकीचे सामान सगळे रामसाठी दिलेल्या वस्तूंनीच भरून गेले होते. खरेतर भागीरथीबाईंना स्वतः च रामला भेटायची फार इच्छा होती, पण घराच्या सगळ्या रागाड्यातून त्यांचा पाय कुठे निघायला ?