Skip to main content

प्रकटन

नवी दिशा...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 21/01/2011 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
`येस... आय अ‍ॅम लुकिंग फॊर अ जॉब चेंज'... ट्रेनमध्ये समोरच्या बाकड्यावर बसलेला तो, एव्हढ्या जोरात ओरडला, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं... एका कंपनीचा लोगो शर्टच्या खिशावर मिरवणारे ते दोघं बाकड्यावर बसल्यापासून एकमेकांशी मस्त गप्पा मारत होते. सहकारी असावेत. कंपनीतल्या कामाला बहुधा दोघंही कंटाळले असावेत. म्हणूनच, अचानक त्याचं हे वाक्य ऐकून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तेवढ्यात फोन आला होता. अलीकडे, प्लेसमेंट कंपन्यांमध्ये नाव नोंदवणार्‍यांच्या मागे नोकर्‍या धावून येत नसल्या, तरी कंपनीचून येणारा फोन कॊल्सचा ससेमिरा मात्र मागे लागलेला असतो.

लेखनसीमा

लेखक निशदे यांनी गुरुवार, 20/01/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच " या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ? " दिसामाजी काहीतरी.....

गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 20/01/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीतल्या एका संस्थेतर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने एक उपक्रम चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीत ९४%च्यावर गुण मिळतील तसेच त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,८०,०००/- पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील ११वी आणि १२वी साठी आर्थिक मदत केली जाईल. जर का विद्यार्थ्याने १२वीत परफॉर्मन्स मेंटेन केला तर वैद्यकिय अथवा अभियांत्रिकीच्या (फक्त शासकिय महाविद्यालायतील) शिक्षणासाठी देखिल मदत केली जाऊ शकते. आपणा सर्वांना नम्र आवाहन...

सावलीतला कोलाहल

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 20/01/2011 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज संध्याकाळी फ़िरून परत येण्याच्या वाटेवरच शॉप अ‍ॅन्ड सेव्ह सुपरमार्केट आहे. त्यामुळे अचानक लागलेले किंवा अचानक आठवलेले वाणसामान तिथून आणण्याची सोय आहे. एकदम मोठी यादी वगैरे बनवून दोन तीन आठवड्यांचे सामान जरा दुरच्या मार्केटमधून आणून टाकलेले असतेच. तरीही वाटेवर हे जास्त वर्दळ नसलेले दुकान दिसले, की पाउले तिकडे उगाचच वळतात. मग आलोच आहोत तर माझे उगाच अबरचबर खादाडीचे जिन्नस टोपलीत टाकणे, त्यावर चित्राचे ठरलेले भाष्य ऐकणे वगैरे प्रसंग नेहमीचेच. आज देखील हा मराठीतला प्रेमळ संवाद ऐकून तिथे नेहमी दिसणारी चायनीज म्हातारी मंदसे हसली.

मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 19/01/2011 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती. भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने हे काय चालले आहे! न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत. जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच.

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/01/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.

कलियुग

लेखक मुक्त यांनी मंगळवार, 18/01/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
"कधी आल्या आत्याबाई ममईवरुन?" "रातीच आले" "बर्‍या खुशाल का?" "हां... तुम्ही खुशाल तं आम्हीबी खुशाल" "सकाळपसुन बसल्यात इथं वट्ट्यावर... उन्हाला.." "हां..मोकार कळांगान सुटलय रातपसुन. पार रक्त गोठलय" "हां ना. पावसाळ्यात ऊन आन हिवाळ्यात पाऊस. कलियुग.. दुसरं काय?" "ह्म्म्म... " "ममैला कोनकोने मंग?" "डाक्तर नवरा बायकु. आन एक पोरगी" " पोरगी येकुलती येके का?" "नाही. एक पोरगा हायेना. पुण्यालाय कालेजात" "पोरगी लहाने का?" "नाही. मोठीये. लग्न झाल् त तीच" "मंग?" "आली परत माहेरी" "कम्हुन" "तीचा नवरा गेला. पळुन...." "अरे पांडुरंगा....दुसरी केली का?" "नाही.

वनराणी..२

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 18/01/2011 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी १ आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग? ********************** पुढे.. मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज..

व्यंगचित्र ( ३ इडिएट)

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 17/01/2011 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
राज साहेबांच्या कल्पकतेचा एक उत्तन नमुना. राज साहेब एक राजकारणी आहेत पण उत्तम व्यंगचित्रकार आहेत हेच यातून दिसून येते.

देवा, येऊ देत आता अजून एक विमान...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/01/2011 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
देवा परमेश्वरा, आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..! देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..! ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत. माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत.. आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..! याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा..! त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!