Skip to main content

माहिती

'शिरगाव च्या आत्तार सरांना 'क्रुती भक्ती ' पुरस्कार ' प्रदान

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 13/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
शिरगाव च्या आत्तार सरांना " क्रुती भक्ती" पुरस्कार प्रदान राजेंद्र चव्हाण शिरगाव श्री. शमशुद्दिन नसिरुद्दिन आत्तार म्हणजेच शिर्गाव हायस्कूल चे आत्तार सर हे या वर्षीच्या नारायण आश्रमच्या 'क्रुती भक्ती ' पुरस्काराचे मानकरी आहेत. पणती होऊन तेवत राहणा-या , कार्यरत व्यक्तिंच्या साठी हा पुरस्कार आश्रमाच्या वार्षीक स्नेह मेळ्याव्यात प्रतीवर्षी दिला जातो. रविवार दिनांक १६/११/२००८ रोजी दुपारी २.३० वाजता हा कार्यक्रम नारायण आश्रम कोळोशी येथे होईल.

अनुष्टुभ छंद - विस्तारीत अष्टाक्षर बांधणी

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 11/11/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या छंदशास्त्रावरील स्तुत्य उपक्रमात माझ्या वतीने ही छोटीशी समिधा समस्त मिसळपावकरी आणि कविवर्य धोंडोपंत यांना सादर अर्पण. देवद्वार, पादाकुलक, अनुष्टुभ, गायत्री, जगती, बृहत असे अनेक छंद आज परिचयाचे आहेत. अनेक श्लोक, स्तोत्रे, वेदांमधील ऋचा, काव्ये, सर्वपरिचित सुभाषिते इ. छंदबद्ध असतातच; फक्त ती गाताना आपल्याला ती अमुक एका छंदात आहेत, याची जाणीव तेव्हढी होत नाही. मात्र छंदशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण छंदांची लक्षणे अभ्यासू लागतो नि परिचित उदाहरणे वाचून ती या लक्षणांशी किती जवळीक साधतात, हे पाहू लागतो, तेव्हा हे विविध छंद अधिक जवळचे वाटू लागतात.
Taxonomy upgrade extras

सफर --मुरुड-जंजिरा किल्ला

लेखक वल्लरी यांनी रविवार, 09/11/2008 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
सफर --मुरुड-जंजिरा किल्ला ठिकाणः-मुरुड जिल्हा-रायगड महाराष्ट्र व्याप्ती:-सुमारे २२ एकर शेत्र किल्ल्याने व्यापले आहे वास्तुशास्त्रः-मुघल आणि पोर्तुगीज वास्तुशास्त्राचा प्रभाव .... आम्ही अलीबाग हुन मुरुड-जंजिरा ला गेलो होतो अलीबाग - मुरुड-जंजिरा अंतर-५२ कि.मि.आहे. काही फोटो .... बोटीतुन किल्ल्याकडे जाताना... किल्ल्याचे प्रवेश दार.. किल्ल्याची समोरुन

जाणिजे यज्ञकर्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 09/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले एक मिपाकर मित्र प्रभाकर पेठकर यांचे आजपासून पुण्यात 'यज्ञकर्म' हे हॉटेल नव्यानेच सुरू झाले आहे.. आपल्या सर्व मिपा परिवारातर्फे मी पेठकरशेठना आणि त्यान्च्या 'यज्ञकर्म' ला मनापासून शुभेच्छा देतो. यज्ञकर्मची खूप भरभराट व्हावी हीच शुभेच्छा... एक मराठी माणूस या नात्याने मिपा या मराठी संकेतस्थळाला पेठकरांचा खूप अभिमान वाटतो..! पेठकरशेठ, आपल्या यज्ञकर्मकरता हे एक लहानसं शुभेच्छापत्र - :) तात्या.

गदर संस्थापकाची १२४ वी जयंती

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 07/11/2008 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे याम्ची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष! डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले.

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

लेखक संताजी धनाजी यांनी बुधवार, 05/11/2008 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला! आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात. म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.

मिपा ओळख २

लेखक चेतन यांनी सोमवार, 03/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

पुस्तक परिचय : कोसळेपर्यंत

लेखक निमीत्त मात्र यांनी रविवार, 02/11/2008 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्याचे चटके चित्रित करणाऱ्या कवितांची दाटीवाटी असलेला प्रा. राजेंद्र दास यांचा "कोसळेपर्यंत' हा कवितासंग्रह, एका विशिष्ट लयीत सामाजिक आशयाचे भान ठेवून बापूजी (म. गांधी), ज्योतिबा फुले, येशू ख्रिस्त यांच्या दुःखालाही गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कविता वाचकाला विचारमग्न करतात. "दुष्काळ' ही अभंग छंदातील कविता अतिशय मर्मभेदक आहे. कोरडी नक्षत्रे। मातीला मरण।। पेटले सरण। जितेपणी।। ही त्यांनी व्यक्त केलेली भुईची भावना अतिशय वेधक आहे.