नमस्कार मिपाकरांनो, गेल्या महिन्याच्या १३ तारखेला सज्जनगड येथे गेलो होतो. तेथील काही माहिती व प्रकाशचित्रे इथे टाकत आहे.
सातार्यापासून साधारण १८-२० किमी अंतरावर सज्जनगड आहे. सज्जनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून जिंकला. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी या गडावर वास्तव्याला आल्यानंतर 'सज्जनगड' हे नाव दिले. समर्थांनी समाधी घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी त्या ठिकाणी समाधी मंदीर व त्यावर श्रीराम मंदीर बांधले. श्रीराम मंदीरातील श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुतींच्या मूर्ती या पंचधातूच्या असून त्या तंजावर (तमिळनाडू) येथुन आणल्या आहेत.