गदर संस्थापकाची १२४ वी जयंती
आज गदर संघटनेचे संस्थापक डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे याम्ची १२४ वी जयंती - हे वर्ष या महान देशभक्ताचे शतकोत्तर जयंतीवर्ष!
डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले. अमेरिकेतील ओरेगन येथील पोर्टलॅंड येथे दाखल होणाऱ्या पहिल्या तीन भारतियांपैकी ते एक, व प्रथम मराठी.
परदेशात राहुनही देशाला स्वातंत्र्य कसे मिळविता येइल असा ध्यास घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनी युरोपातही भ्रमण केले व अनेक क्रांतिकारी विचाराच्या भारतियांशी संधान बांधले. १९०८ मध्ये डॉ. खानखोजे यांनी अमेरिकेत असताना विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य संग्रामासाठी ’भारतिय स्वातंत्र्य संघाची’ स्थापना केली. १९१३ साली डॉ. खानखोजे व लाला हरदयाळ यांच्या पुढाकाराने ’सशस्त्र लढ्यासाठी’गदर’ संघटना स्थापन केली. गदरचे पहिले अध्यक्ष होते सरदार सोहनसिंग भकना. सॅन फ्रान्सिस्को येथुन १९१३ साली ’दी गदर’ या गदर पक्षाच्या पहिल्या मुखपत्राची सुरुवात झाली. पुढे ’गदर’मोठे व्यापक स्वरुप धारण केले. गदर उत्थान हे १८५७ नंतरचे सर्वात पहिले मोठे समर म्हटले तर वावगे ठरु नये.

पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा पुरेपुर उठवत गदर कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाची योजना आखली. या काळात अनेकदा नाव व वेष बदलुन डॉ. खानखोजे युरोप मधिल अनेक देशात प्रवास केला. याच काळात अनेक तरुण विद्यार्थी-क्रांतिकारक जर्मनीत दाखल झाले. जर्मन परराष्ट्र खाते या चळवळ्या लोकांना अनुकुल होते. डॉ. खानखोजे हेसुद्धा जर्मनीत दाखल झाले. जर्मनीतील भारतिय विद्यार्थ्यांनी बर्लिन समिती स्थापन केली. यांत विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चंपकरमण पिल्ले व अबिनाश भट्टाचार्य याचा समावेश होता. पुढे तिचे रुपांतर ’भारतिय स्वातंत्र्य समितीत’ झाले. जर्मनांच्या सहाय्याने थेट हिंदुस्थानची सीमा गाठयची व एका रेषेत पूर्वेला सिंगापूर पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा उभारायचा व यात जर्मन सरकारने आर्थिक तसेच लष्करी सहाय्या करायचे अशी योजना घाटत होती. या सर्व योजनेला ’हिंदु-जर्मन कट’ या नावाने ओळखले जाते. या गदरचा उल्लेख इंग्रजांनी जरी ’राजकिय दहशतवादी’ असा केल तरी हिंदुस्थानी नागरिकांसाठी ते क्रांतिकारकच होते.
गदर संघटनेला हिंदुस्थानातु पंजाबातुन अनेक सदस्य लाभले. युद्ध संपले व राजकिय समीकरणे बदलली तेव्हा अनेक गदर कार्यकर्त्यांना अमेरिकेत निघुन जावे लागले. डॉ. खानखोजे यांच्यावर ईंग्रजांचे बारीक लक्ष होते. त्यांच्यावर हिंदुस्थानात येण्याविरुद्ध मनाई हुकुम बजावला गेला. मात्र युद्धकाळात गदर उत्थान हे अत्यंत मह्त्वाचे पर्व मानावे लागेल. या संघटनेचे क्रांतिरत्न हुतामा विष्णु गणेश पिंगळे, हुतामा कर्तारसिंग सराबा, सोहनसिंग भकना, सरदार पृथ्विसिंग असे अनेक धाडसी कार्यकर्ते युद्धकाळात हिंदुस्थानात कार्यरत होते जे पुढे पकडले गेले व हुतात्मा झाले.
पुढील काळात डॉ. खानखोजे परत अमेरिकेस निघुन गेले. तिथे त्यांचे प्रयत्न चालुच होते. पुढे डॉ. खानखोजे यांनी जीन अलेक्ज़ांड्रियन सिंडिक या बेल्जियन महिलेशी १९३६ साली विवाह केला. बदलत्या राजकिय परिस्थितीनुसार ते मेक्सिकोमध्ये स्थलांतरीत झाले. तेथे शेतकी शिक्षण घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनीए मेक्सिको येथे संकरीत मक्यावर शेतकी प्रयोग केले. ते मेक्सिकोच्या शेतकी विभागाचे संचालक होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना आपल्या मातृभूमिची ओढ लागली. मात्र सरकारने त्यांना प्रवेशबंदी असल्यमुळे विसा नाकरला! पुढे आपला मूर्खपणा लक्षात येताच त्यांना देशात प्रवेश देण्यात आला तेव्हा १९५६ साल उजाडले.
मात्र इथे अल्यावर त्यांना जी उपेक्षा सहन करावी लागली त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन ’गोरे गेले काळे आले’ असे उदगार काढले. हा महान देशभक्त २८ जानेवारी १९६७ रोजी निवर्तला. आज त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
डॉ. खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे ७ नोव्हेंबर १८८४ रोजी झाला. बालपण व शालेय शिक्षण वर्ध्यात पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपुरात आले. विद्यर्थी दशेत त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा विलक्षण प्रभाव पडला व त्यांची देशभावना जागृत झाली. आपले शिक्षण संपवून उच्च शिक्षणासाठी डॉ. खानखोजे अमेरिकेस गेले. अमेरिकेतील ओरेगन येथील पोर्टलॅंड येथे दाखल होणाऱ्या पहिल्या तीन भारतियांपैकी ते एक, व प्रथम मराठी.
परदेशात राहुनही देशाला स्वातंत्र्य कसे मिळविता येइल असा ध्यास घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनी युरोपातही भ्रमण केले व अनेक क्रांतिकारी विचाराच्या भारतियांशी संधान बांधले. १९०८ मध्ये डॉ. खानखोजे यांनी अमेरिकेत असताना विद्यार्थी दशेत स्वातंत्र्य संग्रामासाठी ’भारतिय स्वातंत्र्य संघाची’ स्थापना केली. १९१३ साली डॉ. खानखोजे व लाला हरदयाळ यांच्या पुढाकाराने ’सशस्त्र लढ्यासाठी’गदर’ संघटना स्थापन केली. गदरचे पहिले अध्यक्ष होते सरदार सोहनसिंग भकना. सॅन फ्रान्सिस्को येथुन १९१३ साली ’दी गदर’ या गदर पक्षाच्या पहिल्या मुखपत्राची सुरुवात झाली. पुढे ’गदर’मोठे व्यापक स्वरुप धारण केले. गदर उत्थान हे १८५७ नंतरचे सर्वात पहिले मोठे समर म्हटले तर वावगे ठरु नये.

पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा पुरेपुर उठवत गदर कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाची योजना आखली. या काळात अनेकदा नाव व वेष बदलुन डॉ. खानखोजे युरोप मधिल अनेक देशात प्रवास केला. याच काळात अनेक तरुण विद्यार्थी-क्रांतिकारक जर्मनीत दाखल झाले. जर्मन परराष्ट्र खाते या चळवळ्या लोकांना अनुकुल होते. डॉ. खानखोजे हेसुद्धा जर्मनीत दाखल झाले. जर्मनीतील भारतिय विद्यार्थ्यांनी बर्लिन समिती स्थापन केली. यांत विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चंपकरमण पिल्ले व अबिनाश भट्टाचार्य याचा समावेश होता. पुढे तिचे रुपांतर ’भारतिय स्वातंत्र्य समितीत’ झाले. जर्मनांच्या सहाय्याने थेट हिंदुस्थानची सीमा गाठयची व एका रेषेत पूर्वेला सिंगापूर पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा उभारायचा व यात जर्मन सरकारने आर्थिक तसेच लष्करी सहाय्या करायचे अशी योजना घाटत होती. या सर्व योजनेला ’हिंदु-जर्मन कट’ या नावाने ओळखले जाते. या गदरचा उल्लेख इंग्रजांनी जरी ’राजकिय दहशतवादी’ असा केल तरी हिंदुस्थानी नागरिकांसाठी ते क्रांतिकारकच होते.
गदर संघटनेला हिंदुस्थानातु पंजाबातुन अनेक सदस्य लाभले. युद्ध संपले व राजकिय समीकरणे बदलली तेव्हा अनेक गदर कार्यकर्त्यांना अमेरिकेत निघुन जावे लागले. डॉ. खानखोजे यांच्यावर ईंग्रजांचे बारीक लक्ष होते. त्यांच्यावर हिंदुस्थानात येण्याविरुद्ध मनाई हुकुम बजावला गेला. मात्र युद्धकाळात गदर उत्थान हे अत्यंत मह्त्वाचे पर्व मानावे लागेल. या संघटनेचे क्रांतिरत्न हुतामा विष्णु गणेश पिंगळे, हुतामा कर्तारसिंग सराबा, सोहनसिंग भकना, सरदार पृथ्विसिंग असे अनेक धाडसी कार्यकर्ते युद्धकाळात हिंदुस्थानात कार्यरत होते जे पुढे पकडले गेले व हुतात्मा झाले.
पुढील काळात डॉ. खानखोजे परत अमेरिकेस निघुन गेले. तिथे त्यांचे प्रयत्न चालुच होते. पुढे डॉ. खानखोजे यांनी जीन अलेक्ज़ांड्रियन सिंडिक या बेल्जियन महिलेशी १९३६ साली विवाह केला. बदलत्या राजकिय परिस्थितीनुसार ते मेक्सिकोमध्ये स्थलांतरीत झाले. तेथे शेतकी शिक्षण घेतलेल्या डॉ. खानखोजे यांनीए मेक्सिको येथे संकरीत मक्यावर शेतकी प्रयोग केले. ते मेक्सिकोच्या शेतकी विभागाचे संचालक होते. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांना आपल्या मातृभूमिची ओढ लागली. मात्र सरकारने त्यांना प्रवेशबंदी असल्यमुळे विसा नाकरला! पुढे आपला मूर्खपणा लक्षात येताच त्यांना देशात प्रवेश देण्यात आला तेव्हा १९५६ साल उजाडले.
मात्र इथे अल्यावर त्यांना जी उपेक्षा सहन करावी लागली त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन ’गोरे गेले काळे आले’ असे उदगार काढले. हा महान देशभक्त २८ जानेवारी १९६७ रोजी निवर्तला. आज त्यांच्या १२४ व्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
वाचने
4992
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
थोडक्यात पण छान माहिती.
आदरांजली
हा महान
माझेहि
कॉग्रेसने खुप देशभक्ताना भारतियां पासुन परके केले आहे.
हा इतिहास
सुरेख
अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत
माहिती..
डॉ.
'नाही चिरा
प्रणाम आणि आदरांजली