मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेख

घरटे ३!!! सत्यकथेवर आधारित

चेतन१२३प ·
...... श्रावण महिन्यातली ती एक साधारण सायंकाळ होती. सूर्य अस्ताला जाण्यास अवकाश होता. कदाचित काही कारणास्तव तो थांबला होता. एक्सप्रेस वे वरून गाडी एकशे साठ ते एकशे एंशीच्या वायुवेगाने समोर जात होती. सहालेनच्या त्या चिकण्या रस्त्यावर मावळत्या सूर्याचे लालसर प्रतिबिंब काळ्या शस्त्राने चिरत गाड्या चिं.... चिं... आवाज करत पुढे सरकत होत्या. डिव्हायडरच्या अगदी जवळच्या लेनला नचिकेतची गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत पुढे जात होती. टोल नाक्यावर गाडी थांबली. ड्रायविंग सीटच्या बाजूला नचिकेतची आयुष्याची सोबतीनं आपल्या इवल्याश्या नेत्रांनी, अनभिज्ञ मनाने सभोवार बघणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाला घेऊन बसली होती.

पायी प्रवासातली मजा.

श्रीकृष्ण सामंत ·
"मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं " श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं. केळकर म्हणाले, "इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे

इच्छेच्या पाऊलवाटा

श्रीकृष्ण सामंत ·
माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर,विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्‍या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला. मी तिला विचारलं, "सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?" सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात

गाभ्रीचा पाऊस हा मराठी चित्रपट साता समुद्रा पलीकडे चालला

शनआत्तार ·
दिनांक ४ जानेवारी २००९ च्या टाईम्स ऒफ इंडीया या पेपर च्या पुणे पेपर मध्ये प्रकाशित झालेली बातमी आपणा सर्वांच्या महीती साठी देत आहे. हा मराठी चा अभिमान आहे Marathi film makes it to Rotterdam fest 5 Jan 2009, 0621 hrs IST, Rahul Chandawarkar, TNN PUNE: Satish Manwar is smiling from ear to ear. And with good reason. The young writer-director's very first Marathi feature film Gabhricha Paus (The damned rain) has been selected for the prestigious Rotterdam Film Festival and also the Pune International Film Festival (Piff).

नाताळी बाजार

शाल्मली ·
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली.

"मम मरण पाहिले मी, म्यां डोळा"

श्रीकृष्ण सामंत ·
सूर्यकांत सुखटणकर माझा शाळकरी दोस्त.मी त्याला सूर्याच म्हणायचो.तो शेवटी वकील झाला आणि मी इंजिनीयर.एरव्ही आमची दोस्ती कायम राहिली नसती पण आम्हा दोघानाही पहिल्यापासून मराठी नाटकं बघण्याचा नाद असल्याने कुठे ना कुठे नाटकाच्या थिएटरमधे आमची भेट व्हायचीच. सूर्याची वकीली नीट नाही चायलायची.बिचारा दिवसभर कोर्टात राबून दिवसाची जेमतेम कमाई करायचा.मला वाटतं,एका एका व्ययसायाला ज्याचा त्याचा स्वभाव-धर्मगूण हा ही काही प्रमाणात मदत करीत असतो.तसं पाहिलं तर सूर्या अगदी साध्या स्वभावाचा. छ्क्के-पंजे त्याला माहित नव्हते.ते ह्या वकीली व्यवसायाला प्रकर्षाने जरूरीचे असतात.खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं करायला चलाखी

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

बिपिन कार्यकर्ते ·
माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो.

आपण गाणी का म्हणतो?

चित्रा ·
इकॉनॉमिस्टच्या या महिन्याच्या अंकात एक " व्हाय म्युझिक" म्हणून एक लेख होता, त्याने लक्ष वेधले. लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे, म्हणून इथे दुवा देते. पण थोडक्यात लेखाच्या विषयाबद्दल सांगायचे तर आपल्या (माणसांच्या) आयुष्यात गायन/वादन यांचे एवढे महत्त्व का असावे यावरून मांडलेल्या विचारधारांचा हा एक मनोरंजक माहिती असलेला लेख आहे.

ऍसिड हल्ला आणि तरुण, तरुणी

अन्वय ·
आंध्र प्रदेशमधील वरंगळ जिल्ह्यात दोन तरुणींवर ऍसिड हल्ला केला गेला. हल्ला करणारे तीन तरुण सुशिक्षित होते. त्यांनी इतक्‍या टोकाची भूमिका का घेतली? ज्या तरुणींवर हल्ला झाला, त्यांचा दोष काय, यांसारखे अनेक प्रश्‍न या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहेत. स्वप्निका आणि प्रणिता या विद्यार्थिनी वरंगळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दहा डिसेंबर रोजी दुचाकीवरून घरी परतत असताना, त्यांना श्रीनिवास (23), संजय (22) व हरिकृष्ण (23) या तरुणांनी गाठले आणि काही लक्षात यायच्या आत त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या.