मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४

स्वाती दिनेश ·

बेसनलाडू 15/10/2007 - 07:35
नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू

प्रमोद देव 15/10/2007 - 07:51
मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता. कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.

In reply to by प्रमोद देव

कोलबेर 15/10/2007 - 08:59
>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते. >>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?

In reply to by कोलबेर

प्रमोद देव 15/10/2007 - 09:21
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का? अशा तर्‍हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल. मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्‍हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी. तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे. बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.

सहज 15/10/2007 - 08:33
पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का. अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते. आवडला. ------------------------------------------------------------------------------------------ अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)

विसोबा खेचर 15/10/2007 - 08:46
स्वाती, हाही भाग सुरेख झाला आहे.. विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे... साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले.. तात्या.

नंदन 15/10/2007 - 11:39
हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू 15/10/2007 - 07:35
नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू

प्रमोद देव 15/10/2007 - 07:51
मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता. कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.

In reply to by प्रमोद देव

कोलबेर 15/10/2007 - 08:59
>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते. >>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?

In reply to by कोलबेर

प्रमोद देव 15/10/2007 - 09:21
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का? अशा तर्‍हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल. मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्‍हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी. तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे. बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.

सहज 15/10/2007 - 08:33
पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का. अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते. आवडला. ------------------------------------------------------------------------------------------ अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)

विसोबा खेचर 15/10/2007 - 08:46
स्वाती, हाही भाग सुरेख झाला आहे.. विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे... साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले.. तात्या.

नंदन 15/10/2007 - 11:39
हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

गांधी जी

विकास ·

सर्किट 02/10/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज 02/10/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास 02/10/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट 03/10/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 02/10/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास 02/10/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट 02/10/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु 02/10/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट 03/10/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या 03/10/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 03/10/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 03/10/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका 02/10/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो 03/10/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे 02/10/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास 03/10/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ 03/10/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास 03/10/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे 03/10/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट 03/10/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव 03/10/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट 03/10/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे 03/10/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

राजे 04/10/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा 03/10/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली 03/10/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज 03/10/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या 03/10/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 03/10/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण 03/10/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 03/10/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन 03/10/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज 03/10/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 03/10/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा 04/10/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव 11/09/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे 04/10/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सर्किट 02/10/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज 02/10/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास 02/10/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट 03/10/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 02/10/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास 02/10/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट 02/10/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु 02/10/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट 03/10/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या 03/10/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 03/10/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास 03/10/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका 02/10/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो 03/10/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे 02/10/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास 03/10/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ 03/10/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास 03/10/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे 03/10/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट 03/10/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव 03/10/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट 03/10/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे 03/10/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 04/10/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

राजे 04/10/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा 03/10/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली 03/10/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज 03/10/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या 03/10/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 03/10/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट 03/10/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

तो 03/10/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण 03/10/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना 03/10/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन 03/10/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण 03/10/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट 03/10/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 03/10/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट 03/10/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज 03/10/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास 03/10/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा 04/10/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव 11/09/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे 04/10/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
लेखनप्रकार
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?

उगवला...चंद्र सुगीचा

नंदन ·

विसोबा खेचर 27/09/2007 - 15:08
त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.) क्या बात है नंदनशेठ! तुझ्यासारख्या बहुश्रुत आणि चोखंदळ व्यक्तिने इथे स्वतःहून एक लेख लिहिला याचा खूप आनंद वाटला! लेख छान आहे, चांदोबाचं चित्रही छान आहे. आणि हो, इथे नेहमी लिहीत जा रे! नाहीतर च्यामारी तुझे लेखही 'वन्स इन द ब्ल्यू मून' यायचे! :) आपला, (भास्करप्रेमी) तात्या.

सहज 27/09/2007 - 15:18
सुरेख सचित्र माहिती. असे काहीतरी वरचेवर तुमच्याकडून वाचायला मिळो. मस्त! ----------------------------------------------------------------------------------------------- कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा

प्रमोद देव 27/09/2007 - 15:36
नंदन खूपच छान लेख लिहिला आहेस! पण फार वाट पाहायला लावतोस! कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा हा!हा!हा! असू द्या हो सहजराव! मित्रांना परवानगी आहे!

बेसनलाडू 27/09/2007 - 15:54
चायनीज लोकांचा हा उत्सव आहे, असे कालच कळले. म्हणजे चायनीज क्यालेन्डरप्रमाणे वर्षात जितके वेळा पूर्ण चंद्र दिसतो, त्यातला सगळ्यात मोठा (म्हणजे नक्की काय ते नीटसे कळले नाही :))) कालच्या/आजच्या दिवशी दिसतो, अशी माहिती हापिसातील चिनी सहकार्‍याकडून कळली. त्याचबरोबर सन्त्रे, खोबरे, अन्डी वगैरे घालून केलेला डिट्टो आपल्या 'खान्डवी' च्या चवीचा 'मूनकेक' हादडायला मिळाला. (चविष्ट)बेसनलाडू लेख छान, आटोपशीर आणि सहज. छायाचित्रही सुंदर. आणखी लिहा, दमाने वेळ काढून लिहा. म्हणजे गुंडाळल्यासारखे वाटायचे नाही. चित्र बघून खाली वाचायलाघेतले तोच संपले, अशी अतृप्त भावना येऊ नये, असे एक वाचक म्हणून वाटले. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सहज 27/09/2007 - 16:06
ह्याला मीड्-ऑट्म फेस्टिवल असे म्हणतात. मोठा सण असतो. ह्याच्या अगोदर त्यांचा महीनाभर सेवन्थ मन्थ (पितृ पंधरवड्यासारखा महीना) असतो. तेव्हा म्हणे गेलेली मंडळी पृथ्वीवर येतात तर त्यांची शांत करायला काय काय करत असतात.

धनंजय 27/09/2007 - 16:49
खूपच माहितीपूर्ण लेख हा भाग नीट समजला नाही : > जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला, > तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून > १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या > सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो. कुठल्याही महिन्यात पूर्णिमेचा चंद्र संध्याकाळी ६ वाजता उगवेल, आणि अमावास्येला सकाळी ६ वाजता उगवेल. म्हणजे १४ दिवसांत १२ तास उशीरा = दररोज साधारण ५० मिनिटे उशीरा (लेखात सांगितलेली सरासरी). पण जानेवारीतली सरासरी ७० मिनिटे अशी असेल तर जानेवारीत अमावास्या पूर्णिमेनंतर ८-९ दिवसांतच येईल... ही गोष्ट कदाचीत यावर अवलंबून असेल की चंद्राचे "ऑर्बिटल प्लेन" हे पृथ्वीच्या "ऍक्सिस"शी ९० अंशाच्या कोनात नाही. म्हणजे चंद्राची आकाश-मध्य वेळ कुठल्याही महिन्यात ~५० मिनिटे इतकीच लांबणार (दोन मध्यान्हवेळा वर्षभर २४ तासच असतात, त्याप्रमाणे), पण चंद्रोदय-काळ कमी जास्त होऊ शकेल... हंऽऽऽ (हम्म चा प्रतिशब्द) ... नंदन, आणखी थोडे समजावून द्या. सूर्यास्त वर्षातून मागेपुढे होत असल्यामुळे सूर्यास्त-पूर्णचंद्रोदय मधील काळ कमीजास्त होतो हे कळले. पण तो सर्वात कमी २४ जूनच्या जवळच्या पूर्णिमेला होणार, कारण तेव्हा सूर्यास्त उत्तर गोलार्धात सर्वात उशीरा होणार...

In reply to by धनंजय

नंदन 28/09/2007 - 01:37
शोधतो आहे. दरम्यान, कुठल्याही शहरातून वर्षभरात सूर्योदय/सूर्यास्त किंवा चंद्रोदय/चंद्रास्त कधी होतो, हे या दुव्यावरुन (http://aa.usno.navy.mil/data/docs/RS_OneYear.ph) पाहता येईल. चंद्रोदयाचा तक्ता पाहिला तर वरील विधानांचा पडताळा येतो खरा, पण त्यामागची कारणीमीमांसा आणि तक्त्यात मोकळ्या असणार्‍या जागांबद्दल खुलासा याची कारणे शोधायला हवीत. धोंडोपंत/घाटपांडे साहेब, याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

धनंजय 28/09/2007 - 03:29
चंद्राचे स्थिर-पृथ्वीभोवती भ्रमण २४ तास आणि ~५० मिनिटांचे असते. त्यामुळे काही २४ तासांच्या सौर दिवसात कधीकधी त्याचे उगवणे आणि मावळणे असे दोन्ही होत नाही. ज्या सौर तारखेला तसे आहे तिथे तक्त्यात मोकळ्या जागा आहेत. आता हा तक्ता बघा. अक्षांश ०, रेखांश ०, चंद्रोदय/चंद्रास्त निवडा. बटणावर टिचकी मारल्यासरशी २००७ सालचा तक्ता दिसेल. उदाहरणार्थ सप्टेंबर १८ ही शुक्ल सप्तमी-अष्टमीची रात्र घेऊ या. १८ सप्टे २३:१३ ला समजा चंद्र मावळला, तो १९ सप्टेच्या ~११:४० ला उगवला. आता तो पुन्हा मावळायला मागच्या मावळण्यापासून ~२४ तास आणि ५२ मिनिटे लागतील, पण तोवर सौर तारीख २० सप्टे चे ००:०६ झाले! म्हणजे १९ सप्टे ही सौर तारीख असताना चंद्र एकदाही मावळला नाही. मग १९ सप्टे तारखेला तक्त्यात चंद्र मावळण्याच्या ठिकाणी मोकळी जागा आहे.

जुना अभिजित 27/09/2007 - 16:50
मागच्या वर्षी कोजागिरीला क्षितिजाजवळ मोठा दिसणार्‍या चंद्राचे फोटो काढले होते. पण उगवल्यानंतर मात्र झपाट्याने वर येतो बुवा. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

लेख आवडला,छान लिहिला आहे. जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत. थोडे विषयांतर : असेच आपल्या क्यालेंडरातही प्रत्येक पौर्णिमेचे काही वैशिष्ट्य आहे ना! चैत्र- हनुमान जयंती, वैशाख-बुध्दपौर्णिमा,जेष्ठ- वट्पौर्णिमा,आषाढ- गुरुपौर्णिमा,श्रावण- नारळीपौर्णिमा/राखीपौर्णिमा भाद्रपद-? , अश्विन-कोजागरी पौर्णिमा,कार्तिक-त्रिपुरी पौर्णिमा,मार्गशीर्ष- दत्तजयंती,पौष- शाकंभरी पौर्णिमा,माघ- ? फाल्गुन-होळीपौर्णिमा. भाद्रपद व माघ पौर्णिमेचे वैशिष्ट्य कोणाला माहित असल्यास सांगावे ही विनंती. स्वाती

उगवला...चंद्र सुगीचा, माहिती आवडली ! सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो. क्या बात है ! चित्र आणि दुव्यासहीतची माहिती आवडली ! येऊ दे आणखी असेच लेख.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 27/09/2007 - 20:18
वेगवेगळी चांद्र नावे वाचून मजा आली. नव्यानेच हे समजले. आपल्याकडे सुद्ध असे काही आहे हे स्वातीताईंच्या प्रतिसादाने आताच जाणवले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट 27/09/2007 - 22:32
मिसळपावावर माहितीपूर्ण लेखनालाही परवानगी आहे तर ! नंदन छोटेखानी लेख आवडला. पौर्णिमेची रात्र असतेच सुंदर. वरती स्वाती ताईंनी हिंदुंच्या पौर्णिमा दिल्या आहेतच. पूर्ण चंद्राचा डोक्यावर परिणाम होतो, हे सहजरावांच्या प्रतिसादातही दिसतेच. आणखी अशीच माहिती येऊ देत. - (चांद्रसेनी) सर्किट

नंदन 28/09/2007 - 01:38
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर 27/09/2007 - 15:08
त्याआधी जूनमध्ये ब्ल्यू मून होता (एकाच महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, तेव्हा त्या दुसऱ्या पूर्णचंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणतात. 'वन्स इन द ब्ल्यू मून' या वाक्प्रचाराचा स्रोत.) क्या बात है नंदनशेठ! तुझ्यासारख्या बहुश्रुत आणि चोखंदळ व्यक्तिने इथे स्वतःहून एक लेख लिहिला याचा खूप आनंद वाटला! लेख छान आहे, चांदोबाचं चित्रही छान आहे. आणि हो, इथे नेहमी लिहीत जा रे! नाहीतर च्यामारी तुझे लेखही 'वन्स इन द ब्ल्यू मून' यायचे! :) आपला, (भास्करप्रेमी) तात्या.

सहज 27/09/2007 - 15:18
सुरेख सचित्र माहिती. असे काहीतरी वरचेवर तुमच्याकडून वाचायला मिळो. मस्त! ----------------------------------------------------------------------------------------------- कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा

प्रमोद देव 27/09/2007 - 15:36
नंदन खूपच छान लेख लिहिला आहेस! पण फार वाट पाहायला लावतोस! कळल का प्रमोदराव आज ते तुमच्याशी तावातावान कसे वाजत होते. निसर्गनियम हो, चंद्राचा प्रभाव जास्त होता! दोष ना कुणाचा हा!हा!हा! असू द्या हो सहजराव! मित्रांना परवानगी आहे!

बेसनलाडू 27/09/2007 - 15:54
चायनीज लोकांचा हा उत्सव आहे, असे कालच कळले. म्हणजे चायनीज क्यालेन्डरप्रमाणे वर्षात जितके वेळा पूर्ण चंद्र दिसतो, त्यातला सगळ्यात मोठा (म्हणजे नक्की काय ते नीटसे कळले नाही :))) कालच्या/आजच्या दिवशी दिसतो, अशी माहिती हापिसातील चिनी सहकार्‍याकडून कळली. त्याचबरोबर सन्त्रे, खोबरे, अन्डी वगैरे घालून केलेला डिट्टो आपल्या 'खान्डवी' च्या चवीचा 'मूनकेक' हादडायला मिळाला. (चविष्ट)बेसनलाडू लेख छान, आटोपशीर आणि सहज. छायाचित्रही सुंदर. आणखी लिहा, दमाने वेळ काढून लिहा. म्हणजे गुंडाळल्यासारखे वाटायचे नाही. चित्र बघून खाली वाचायलाघेतले तोच संपले, अशी अतृप्त भावना येऊ नये, असे एक वाचक म्हणून वाटले. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सहज 27/09/2007 - 16:06
ह्याला मीड्-ऑट्म फेस्टिवल असे म्हणतात. मोठा सण असतो. ह्याच्या अगोदर त्यांचा महीनाभर सेवन्थ मन्थ (पितृ पंधरवड्यासारखा महीना) असतो. तेव्हा म्हणे गेलेली मंडळी पृथ्वीवर येतात तर त्यांची शांत करायला काय काय करत असतात.

धनंजय 27/09/2007 - 16:49
खूपच माहितीपूर्ण लेख हा भाग नीट समजला नाही : > जानेवारीतील पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी ६ वाजता झाला, > तर दुसऱ्या दिवशीचा चंद्र ७० मिनिटे उशीरा म्हणजे ७ वाजून > १० मिनिटांनी उगवेल. हार्वेस्ट मूनचे वैशिष्ट्य हे की, या > सुमाराला हा फरक किमान म्हणजे फक्त ३० मिनिटांचा असतो. कुठल्याही महिन्यात पूर्णिमेचा चंद्र संध्याकाळी ६ वाजता उगवेल, आणि अमावास्येला सकाळी ६ वाजता उगवेल. म्हणजे १४ दिवसांत १२ तास उशीरा = दररोज साधारण ५० मिनिटे उशीरा (लेखात सांगितलेली सरासरी). पण जानेवारीतली सरासरी ७० मिनिटे अशी असेल तर जानेवारीत अमावास्या पूर्णिमेनंतर ८-९ दिवसांतच येईल... ही गोष्ट कदाचीत यावर अवलंबून असेल की चंद्राचे "ऑर्बिटल प्लेन" हे पृथ्वीच्या "ऍक्सिस"शी ९० अंशाच्या कोनात नाही. म्हणजे चंद्राची आकाश-मध्य वेळ कुठल्याही महिन्यात ~५० मिनिटे इतकीच लांबणार (दोन मध्यान्हवेळा वर्षभर २४ तासच असतात, त्याप्रमाणे), पण चंद्रोदय-काळ कमी जास्त होऊ शकेल... हंऽऽऽ (हम्म चा प्रतिशब्द) ... नंदन, आणखी थोडे समजावून द्या. सूर्यास्त वर्षातून मागेपुढे होत असल्यामुळे सूर्यास्त-पूर्णचंद्रोदय मधील काळ कमीजास्त होतो हे कळले. पण तो सर्वात कमी २४ जूनच्या जवळच्या पूर्णिमेला होणार, कारण तेव्हा सूर्यास्त उत्तर गोलार्धात सर्वात उशीरा होणार...

In reply to by धनंजय

नंदन 28/09/2007 - 01:37
शोधतो आहे. दरम्यान, कुठल्याही शहरातून वर्षभरात सूर्योदय/सूर्यास्त किंवा चंद्रोदय/चंद्रास्त कधी होतो, हे या दुव्यावरुन (http://aa.usno.navy.mil/data/docs/RS_OneYear.ph) पाहता येईल. चंद्रोदयाचा तक्ता पाहिला तर वरील विधानांचा पडताळा येतो खरा, पण त्यामागची कारणीमीमांसा आणि तक्त्यात मोकळ्या असणार्‍या जागांबद्दल खुलासा याची कारणे शोधायला हवीत. धोंडोपंत/घाटपांडे साहेब, याबद्दल अधिक माहिती देऊ शकाल का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

धनंजय 28/09/2007 - 03:29
चंद्राचे स्थिर-पृथ्वीभोवती भ्रमण २४ तास आणि ~५० मिनिटांचे असते. त्यामुळे काही २४ तासांच्या सौर दिवसात कधीकधी त्याचे उगवणे आणि मावळणे असे दोन्ही होत नाही. ज्या सौर तारखेला तसे आहे तिथे तक्त्यात मोकळ्या जागा आहेत. आता हा तक्ता बघा. अक्षांश ०, रेखांश ०, चंद्रोदय/चंद्रास्त निवडा. बटणावर टिचकी मारल्यासरशी २००७ सालचा तक्ता दिसेल. उदाहरणार्थ सप्टेंबर १८ ही शुक्ल सप्तमी-अष्टमीची रात्र घेऊ या. १८ सप्टे २३:१३ ला समजा चंद्र मावळला, तो १९ सप्टेच्या ~११:४० ला उगवला. आता तो पुन्हा मावळायला मागच्या मावळण्यापासून ~२४ तास आणि ५२ मिनिटे लागतील, पण तोवर सौर तारीख २० सप्टे चे ००:०६ झाले! म्हणजे १९ सप्टे ही सौर तारीख असताना चंद्र एकदाही मावळला नाही. मग १९ सप्टे तारखेला तक्त्यात चंद्र मावळण्याच्या ठिकाणी मोकळी जागा आहे.

जुना अभिजित 27/09/2007 - 16:50
मागच्या वर्षी कोजागिरीला क्षितिजाजवळ मोठा दिसणार्‍या चंद्राचे फोटो काढले होते. पण उगवल्यानंतर मात्र झपाट्याने वर येतो बुवा. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

लेख आवडला,छान लिहिला आहे. जानेवारीत येणारा 'वूल्फ मून' ते डिसेंबरमध्ये येणारा 'कोल्ड मून' अशी प्रत्येक 'मुनाला' वेगवेगळी नावे आहेत. थोडे विषयांतर : असेच आपल्या क्यालेंडरातही प्रत्येक पौर्णिमेचे काही वैशिष्ट्य आहे ना! चैत्र- हनुमान जयंती, वैशाख-बुध्दपौर्णिमा,जेष्ठ- वट्पौर्णिमा,आषाढ- गुरुपौर्णिमा,श्रावण- नारळीपौर्णिमा/राखीपौर्णिमा भाद्रपद-? , अश्विन-कोजागरी पौर्णिमा,कार्तिक-त्रिपुरी पौर्णिमा,मार्गशीर्ष- दत्तजयंती,पौष- शाकंभरी पौर्णिमा,माघ- ? फाल्गुन-होळीपौर्णिमा. भाद्रपद व माघ पौर्णिमेचे वैशिष्ट्य कोणाला माहित असल्यास सांगावे ही विनंती. स्वाती

उगवला...चंद्र सुगीचा, माहिती आवडली ! सूर्यास्त आणि चंद्रोदय यांच्यातला कालावधी या महिन्याभरात सर्वात कमी असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात जेव्हा या सुमाराला सुगी जवळ येते, तेव्हा शेतकऱ्यांना काम करायला सूर्यास्तानंतरही थोडा अधिक वेळ मिळतो. क्या बात है ! चित्र आणि दुव्यासहीतची माहिती आवडली ! येऊ दे आणखी असेच लेख.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ 27/09/2007 - 20:18
वेगवेगळी चांद्र नावे वाचून मजा आली. नव्यानेच हे समजले. आपल्याकडे सुद्ध असे काही आहे हे स्वातीताईंच्या प्रतिसादाने आताच जाणवले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट 27/09/2007 - 22:32
मिसळपावावर माहितीपूर्ण लेखनालाही परवानगी आहे तर ! नंदन छोटेखानी लेख आवडला. पौर्णिमेची रात्र असतेच सुंदर. वरती स्वाती ताईंनी हिंदुंच्या पौर्णिमा दिल्या आहेतच. पूर्ण चंद्राचा डोक्यावर परिणाम होतो, हे सहजरावांच्या प्रतिसादातही दिसतेच. आणखी अशीच माहिती येऊ देत. - (चांद्रसेनी) सर्किट

नंदन 28/09/2007 - 01:38
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
Harvest Moon [आजच्या पूर्णचंद्राचे छायाचित्र.] आज भाद्रपद पौर्णिमा. पाश्चात्य परिभाषेत 'हार्वेस्ट मून'. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात साधारण २३ सप्टेंबरच्या सुमाराला ऑटम्नल इक्विनॉक्स असतो. (याला मराठीत शरद-संपात किंवा शारदीय विषुवदिन म्हणता येईल.

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २

स्वाती दिनेश ·

गुंडोपंत 26/09/2007 - 05:20
वा! मजा येते आहे. अजून मोठा चालेले लेख. शिवाय प्रकाश्चित्रे द्या ना? आवडतील! शिवाय रुपया/येन विनिमय दर वगैरे गोष्टीही चालतील ;) हे चलन कसे दिसते याची पण चित्रे द्या. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

लिखाळ 27/09/2007 - 20:21
गुंडोपंतांशी सहमत, प्रकाशचित्रे, येन चे चित्रं वगैरे सुद्धा द्या . --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सहज 26/09/2007 - 07:22
पण जरा विस्तार करून, म्हणजे ते छोटे घर पाहून कसे वाटले...घर स्वतंत्र हवे की शेअर करून.... छायाचित्र (ते काम आता माझ्यावर तर नाही ना :-)) असती तर अजून मजा. 'योदोबाशी' उमेडा कि आकीबा कळ्ले नाही म्हणून लावले नाही. ;-) सरकता जिना अर्थात एस्केलेटरचा सराव व्हायला लागलेले २ दिवस. किंवा मॉलमधे दिसणारे इतर भारतीय, त्यातील कोणा जेष्ठ महीलेची साडी, पर्स, पिशवी एका हातात किंवा काखोटिला धरून व दुसर्‍या हातने सरकत्या जिन्याच्या कठड्याचा आधार घेत पार केलाला प्रवास व शेवटच्या टोकाला पोहचल्यावर "हुश्य केला बाई गड सर"सुटलेला हासरा चेहरा... >>बाहेर असलेले मोठ्ठे आइस्क्रीम पार्लर( आता आम्हाला अशाच खुणा लक्षात राहतात!), आवडले :-)

बेसनलाडू 26/09/2007 - 08:47
दोन्ही भाग वाचले. छोटेखानी, परंतु सहज आणि ओघवते वर्णन केले असल्याने खूप आवडले. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे. (वाचक)बेसनलाडू

अत्यानंद,गुंडोपंत,लिखाळ,सहज,बेसनलाडू सर्वांना मनापासून धन्यवाद, लेख लहान झाला आहे याची जाणीव आहे,किंबहुना भाग १ व २ एकत्र केले असते तरी चालले असते असे वाटते.(पण एका वेळी टंकायचा कंटाळा आणि इथे मनोगतासारखी थोडे थोडे टंकून नंतर प्रकाशित करायची सोय नाही असे वाटते.म्हणजे दुसरीकडे कुठेतरी टंकून नंतर कॉपी/पेस्ट करावे लागेल! त्याचाही आळस!) चित्रे देणार आहे( सहज राव, तुम्ही दिलीत तरी चालेल हो:)) फक्त जपान वारीला अनेक वर्षे (सुमारे ५) लोटल्याने आणि मध्यंतरी संगणक बदलल्याने चित्रे जरा शोधावी लागतील(तेच करतेय!).येन ची सुध्दा तीच स्थिती आहे,येन मी बरोबर आणले आहेत आणि 'अत्यंत व्यवस्थित' ठेवले आहेत त्यामुळे त्यांच्याही शोधात आहे. जपानी चलन फक्त येन च आहे.म्हणजे रु/पैसे, डॉलर्/सेंट, युरो/सेंट असे काही नाही. १,२ ,५,१०,२०,२५,५०,१००,२०० येनची नाणी असतात आणि ५००,१०००,१०००० येनच्या नोटा असतात. १०० येन= ४० रु. हा विनिमय दर तेव्हा होता,आताही त्याच्याच आसपास असावा. स्वाती

विसोबा खेचर 29/09/2007 - 10:09
लेख छोटेखानी, परंतु छान झाला आहे. चित्रेही टाक.. पुढचा लेख येऊ दे... दिनेशला नमस्कार सांग. म्हणावं, 'तात्या आठवण काढत होता!' :) तात्या.

तात्या, सांगितले हो दिनेशला तू आठवण काढत होतास ते,त्याने तुला पोस्टकार्ड धाडले आहे म्हणे, चित्रे ही टाकणार आहे,पुढचा लेख लवकरच टाकते. स्वाती

गुंडोपंत 26/09/2007 - 05:20
वा! मजा येते आहे. अजून मोठा चालेले लेख. शिवाय प्रकाश्चित्रे द्या ना? आवडतील! शिवाय रुपया/येन विनिमय दर वगैरे गोष्टीही चालतील ;) हे चलन कसे दिसते याची पण चित्रे द्या. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

लिखाळ 27/09/2007 - 20:21
गुंडोपंतांशी सहमत, प्रकाशचित्रे, येन चे चित्रं वगैरे सुद्धा द्या . --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सहज 26/09/2007 - 07:22
पण जरा विस्तार करून, म्हणजे ते छोटे घर पाहून कसे वाटले...घर स्वतंत्र हवे की शेअर करून.... छायाचित्र (ते काम आता माझ्यावर तर नाही ना :-)) असती तर अजून मजा. 'योदोबाशी' उमेडा कि आकीबा कळ्ले नाही म्हणून लावले नाही. ;-) सरकता जिना अर्थात एस्केलेटरचा सराव व्हायला लागलेले २ दिवस. किंवा मॉलमधे दिसणारे इतर भारतीय, त्यातील कोणा जेष्ठ महीलेची साडी, पर्स, पिशवी एका हातात किंवा काखोटिला धरून व दुसर्‍या हातने सरकत्या जिन्याच्या कठड्याचा आधार घेत पार केलाला प्रवास व शेवटच्या टोकाला पोहचल्यावर "हुश्य केला बाई गड सर"सुटलेला हासरा चेहरा... >>बाहेर असलेले मोठ्ठे आइस्क्रीम पार्लर( आता आम्हाला अशाच खुणा लक्षात राहतात!), आवडले :-)

बेसनलाडू 26/09/2007 - 08:47
दोन्ही भाग वाचले. छोटेखानी, परंतु सहज आणि ओघवते वर्णन केले असल्याने खूप आवडले. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे. (वाचक)बेसनलाडू

अत्यानंद,गुंडोपंत,लिखाळ,सहज,बेसनलाडू सर्वांना मनापासून धन्यवाद, लेख लहान झाला आहे याची जाणीव आहे,किंबहुना भाग १ व २ एकत्र केले असते तरी चालले असते असे वाटते.(पण एका वेळी टंकायचा कंटाळा आणि इथे मनोगतासारखी थोडे थोडे टंकून नंतर प्रकाशित करायची सोय नाही असे वाटते.म्हणजे दुसरीकडे कुठेतरी टंकून नंतर कॉपी/पेस्ट करावे लागेल! त्याचाही आळस!) चित्रे देणार आहे( सहज राव, तुम्ही दिलीत तरी चालेल हो:)) फक्त जपान वारीला अनेक वर्षे (सुमारे ५) लोटल्याने आणि मध्यंतरी संगणक बदलल्याने चित्रे जरा शोधावी लागतील(तेच करतेय!).येन ची सुध्दा तीच स्थिती आहे,येन मी बरोबर आणले आहेत आणि 'अत्यंत व्यवस्थित' ठेवले आहेत त्यामुळे त्यांच्याही शोधात आहे. जपानी चलन फक्त येन च आहे.म्हणजे रु/पैसे, डॉलर्/सेंट, युरो/सेंट असे काही नाही. १,२ ,५,१०,२०,२५,५०,१००,२०० येनची नाणी असतात आणि ५००,१०००,१०००० येनच्या नोटा असतात. १०० येन= ४० रु. हा विनिमय दर तेव्हा होता,आताही त्याच्याच आसपास असावा. स्वाती

विसोबा खेचर 29/09/2007 - 10:09
लेख छोटेखानी, परंतु छान झाला आहे. चित्रेही टाक.. पुढचा लेख येऊ दे... दिनेशला नमस्कार सांग. म्हणावं, 'तात्या आठवण काढत होता!' :) तात्या.

तात्या, सांगितले हो दिनेशला तू आठवण काढत होतास ते,त्याने तुला पोस्टकार्ड धाडले आहे म्हणे, चित्रे ही टाकणार आहे,पुढचा लेख लवकरच टाकते. स्वाती
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

स्वगत

प्रकाश घाटपांडे ·

विसोबा खेचर 25/09/2007 - 08:45
>>माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात. >>बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य. >>काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मग कुणी भूतकाळात रममाण होतं तर कुणी भविष्यकाळातल्या स्वप्नरंजनात. येणारा प्रत्येक क्षण वर्तमान म्हणता म्हणता भूतकाळात जमा होत असतो. घाटपांडेसाहेब, अतिशय प्रांजळ स्वगत! मनापासून आवडले. काही संकेतस्थळं वयात यायला फार वेळ लावतात बुवा! पण मिसळपावने वयात आल्यावरच जन्म घेतला याची साक्ष देणारा लेख! :) घाटपांडे साहेब, आपल्याकडून अश्याच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे.. आपला, (स्खलनशील प्राणिमात्र!) तात्या.

सहज 25/09/2007 - 09:07
चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे. दोन शब्द लैंगिकता :- स्त्री-पुरुष समानतेच्या वार्‍यात, ही लैंगिकता पण समाजमान्यतेत लवकरच समान विभागली जाईल. आजवर "लैंगिकता व त्यावर मोकळे भाष्य" (व त्या द्वारे इतर लोकांवर वर्चस्व / वरचढ) ही "पुरूषी मक्तेदारी" एकदा ढासळली की बघा "लज्जा पांघरूण" कसे सगळेजण पांघरू लागतील. काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.

In reply to by सहज

काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.>> म्हणुनच आपली सामाजिक भाकिते आम्हाला आवडतात. चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे.>> मंग आयडिया करायची घाईमंदी आवरुन घ्यायचा आन जरा निवांत झालं कि पसरुन वाचायचा. म्हंजे सर्कीट इष्टाईल. प्रकाश घाटपांडे

In reply to by सहज

सहज 25/09/2007 - 10:17
घाटपांडे साहेब तुम्ही खरे तर "स्वगत" असे सदर करा बघा. दर आठवड्याला / महीन्याला तुम्हाला जे वाटते असे एक सदर. तुमचे विचार , लेखन आम्हाला आवडते.

In reply to by सहज

सर्किट 25/09/2007 - 11:34
म्हणजेच, अत्यंत सहमत आहे. आम्हा ओपन सोर्स वाल्या लोकांना एखादी सूचना आवडली, एखादा पॅच आवडला, की तिला आपले पॉझिटिव्ह मत देताना आम्ही +१ लिहीत असतो. प्रकाशकाकांनी आपले स्वगत असेच लिहित रहावे, ह्यासाठी हे +१. - सर्किट

सर्किट 25/09/2007 - 09:00
प्रकाशकाका.. अद्याप पूर्ण लेख वाचायचा आहे. पण माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात. हे वाक्य वाचून मी हरखलो. पूर्ण वाचून सविस्तर प्रतिसाद लिहीनच. पण, आपण आमच्या ओळखीचे आहात, ह्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, हे सांगण्यासाठी हा प्रिमॅच्युअर प्रतिसाद. - (प्रकाश घाटपांडेंचा मानलेला पुतण्या) सर्किट

सर्किट 25/09/2007 - 11:16
प्रकाशकाका, आता कुटुंबाची झोप सुरू झाल्यावर निश्चिंतपणे आपला पूर्ण लेख वाचला (नव्हे दोन-तीनदा वाचला.) आपली किती तारीफ करावी तितकी कमीच आहे. वैचारिक लेखन कशाला म्हणावे, हे ह्या लेखावरून जोखावे. अर्थात हे लेखन आम्हाला वैचारिक वाटते, काहींनी अश्लील अश्लील म्हणून आपल्या संकेतस्थळाच्या तथाकथीत स्त्री सदस्यांपुढे असे लेखन "कसे प्रकाशित करायचे बाई?" असे म्हणून प्रशासकीय फटकार्‍यात रद्द केले असते, असे आमचा अनुभव सांगतो. साध्या "बलात्कार" ह्या शब्दाविषयीच्या "जुने सूर अन जुने तराणे" गायकांच्या ताना आपण ऐकल्या असतीलच. ह्या युगातल्या "ग्रो अप गाईज" म्हणणार्‍या स्त्रिया त्यांना बहुतेक संकेतस्थळ सदस्यांव्यतिरीक्त भेटत नसाव्यात. असो. पुन्हा एकदा, आपला लेख आवडला. जरा परिच्छेदांत नीट विभागला असतात, तर इतर कॅज्युअल वाचकांनादेखील समजला असता, एवढीच सूचना द्यावीशी वाटते. सीरीयस वाचकांसाठी परफेक्ट. - (आपला मानलेला पुतण्या) सर्किट

नंदन 25/09/2007 - 13:06
लेख आवडला. खासकरुन हे निरीक्षण -- "शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो." नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

राजे 25/09/2007 - 13:32
क्या बात है ! मस्तच. वाचनिय तर आहेच पण जपून ठेवण्यासारखे लेखन. बाकी अनूभव हा मानवी जिवनातील महत्वाचा ठेवा ह्या माझ्या मताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली. राजे (*हेच राज जैन आहेत)

प्रमोद देव 25/09/2007 - 17:31
कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का? आपण नेमके मर्म सांगितलेत.

प्रियाली 25/09/2007 - 18:16
लेख अतिशय आवडला. अशी स्वगते वाचायला आवडतील. >>अशाप्रकारचे खुले मंच इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. इथे अभिव्यक्तिला मर्यादाच नसतात.सर्जनशील प्रतिभा इथही बघायला मिळते. सामाजिक बंधन, रुढी परंपरा, संस्कार यात जखडलेल्या विचारांना उसंत घेण्यासाठी खुला मंच दुसरीकडे कुठे मिळणार? त्यात तुम्ही घुसमटल्यावर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला इथंच येणार. समाजात हे बुरखे काढून तुम्ही जगायला लागलात तर समाज तुम्हाला वाळीत टाकील. दुर्जन, समाजद्रोही, कलंकित ठरवेल. तुमची इच्छा असो वा नसो समाजात तुम्हाला हे बुरखे पांघरावेच लागतात. हा एक भाग झाला. इंटरनेटचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतरांना आपल्यापासून किती दूर ठेवायचे हे आपल्या हातात असते. एखाद्यावर (दिसण्यावर/ वागण्यावर/ विचारांवर) फिदा होऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, तशी जवळीक साधता आली नाही तर त्या बाईला (किंवा पुरुषाला) बदनाम करून आपली लैंगिक अतृप्तता/ असंतोष पूर्ण करण्याचा (विकृत) मार्ग चोखाळणारे महाभाग प्रत्यक्ष जीवनात पाहिलेले आहेत. अशांचा त्रास इंटरनेटावरही दिसतो परंतु बुरखे पांघरून अशांना नेटावर एका मर्यादेनंतर सहज दूर ठेवता येते.

चित्रा 25/09/2007 - 20:57
स्वगत मनापासून आवडले. "कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो." यावर माझेही एक (अर्धवट) स्वगतः कोण चूक कोण बरोबर काळच ठरवेल म्हणताना स्वत:चे बरे वाईट विचार त्या त्या वेळेपुरते आणि स्वतःपुरते करू शकणे आणि नंतर त्याचे जे परिणाम होतील त्यांना सामोरे जाणे हे महत्त्वाचे. बदलत्या परिस्थितींत कोण बरोबर कोण चूक असा गोंधळ होणे साहजिकच आहे. पण फारच गोंधळ उडायला लागला तर समजावे आपल्याला धरलेली वाट / केलेला विचार झेपत नाही आहे. काही लोकांना स्वतःची वाट ( लगेच ) लख्ख दिसते आणि ते कोणाची पर्वा न करता ते ती अनुसरतात तर काहींना (खरी) ती वाट मिळायला वेळ लागतो, तर अजून काही स्वत:च केलेल्या गुंत्यात अडकतात आणि आहेत तेथेच गुरफटून फिरतात. यातले आपण कोण ते आपण ठरवायचे.

आजानुकर्ण 25/09/2007 - 21:14
अतिशय सुरेख लेख. वाचायला खूप वेळ लागला. प्रत्येक शब्द न शब्द ज्या लेखाचा वाचावा वाटतो असे लेख वाचायला वेळच लागतो. :) शिवाय हा लेख लगेच पुन्हा एकदा वाचला. घाटपांडे साहेब आम्ही तुमच्या गावचे आहोत हे सांगायला खूप अभिमान वाटतो. ;) - आजानुकर्ण मंचरकर

धनंजय 25/09/2007 - 21:16
तरी असेच येऊ द्या. मी दुसरीकडे चिकटवून स्वतः परिच्छेद पाडून घेईन. > पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते. > 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`. एकदम पटले. शिवराळ भाषा असून रावसाहेब (आणि तुमच्या उदाहरणातले हवालदार) मुद्द्याचे ही बोलतात, हे महत्त्वाचे. कारण केवळ भावनिक आशय असलेले तेवढेच शब्द बोलले, तर समोरच्याला उत्तर देण्याइतपत अर्थ समजेलच असे सांगता येत नाही. "साहेब पेटलाय्" हे उत्तम कळले, पण काय नेमके चुकले आणि काय नेमके बदलायचे ते कळले नाही तर आली पंचाईत. तुमचा हा पूर्वप्रसिद्ध लेख आहे. पण खरे म्हणजे दोन किंवा तीन लेखांना पुरेल इतका मालमसाला याच्यात भरला आहे.

प्राजु 25/09/2007 - 21:32
प्रकाशकाका, छान आहे लेख. विशेष करून.. एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. आवडले. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. असेच येऊ दे आणखिही.. - प्राजु.

कोलबेर 26/09/2007 - 05:48
इथल्या प्रतिक्रिय वाचल्यावर हा लेख जरा निवांत वेळ काढूनच वाचला.. जबरदस्त स्वगत आहे.

अभिज्ञ 16/08/2008 - 03:03
प्रकाश घाटपांडे जी, मिसळपाव वरील अत्युत्तम अशा लेखांपैकी हा एक लेख वाचनात आला. फारच प्रांजळ असा लिहिला आहे. शेवटचा परिच्छेद अतिशय प्रभावी झालाय. विशेषतः एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत. काळ हा त्याचं दु:ख हलकं करतो. आशेच्या वारुवर स्वार झाले की काळ किती गेला हे समजतच नाही. कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का? हे तर फारच आवडले. अभिनंदन अभिज्ञ.

मदनबाण 16/08/2008 - 04:33
लेख फार आवडला.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल. काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल. काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

अर्धवटराव 12/09/2012 - 01:06
पोलीस खात्यासम रांगड्या यंत्रणेतील ट्रांझीशन्स व कर्मठता, भावना रेचनाचे मानसशास्त्र, भाषेतले वेगवेगळे प्रवाह, स्त्रीत्वाच्या अचाट शक्तीचे तेव्हढेच विराट पण भावुक प्रदर्शन, अभिव्यक्तीच्या नवनवीन हुंकारांचे समाजाने केलेले स्वागत, निसर्गाच्या "बदल" या एकमेव नियमाचे स्पष्टीकरण आणि त्याची अपराजीत शक्ती, नैतिकतेची अपरिहार्य स्थलकालसापेक्षता, मानव्याची राजीखुषीने वा रेट्याने काळाप्रती शरणागती... उफ्फ्फ्फ... एव्हढं सगळं एकाच लेखात ???... भाईकाकांचा पानवाला आठवला. आपल्या प्रतिभेला सलाम. अर्धवटराव

दादा कोंडके 12/09/2012 - 16:27
काही नोकर्‍यांमध्ये स्त्रियांची कुचंबणा होते आणि त्यामुळे पुरुषांची सुद्धा गोची होते. ह्यावरूनच आठवलं. कॉलेजात असताना एक लमाणतांड्यावर मुकादम म्हणून काम करत असलेल्या माणसाच्या घरात काही कामा निमित्त गेलो होतो. एरवी सुशिक्षीत (सुसंस्कृत?) दिसणारा माणूस स्वतःच्या बायका पोरांसमोरच मला 'अवचित उठलं आणि XXत घुसलं' असं करू नकोस असं म्हणाला होता. त्या धक्क्यातून दोन दिवस बाहेर आलो नव्हतो. :)

हा लेख वर काढणाऱ्या मनोबाला धन्यवाद. मिपाच्या खजिन्यातलं एक माणिकच बाहेर काढलं आहे. लेखाला नावाप्रमाणेच एक स्वतःशी बोलण्याचा टोन आहे. पोलिस खात्यातले किस्से अस्सल रांगड्या भाषेमुळे रंगलेले आहेत. घाटपांडेसाहेब, अजून लेखन करा की.

In reply to by तर्राट जोकर

अर्धवटराव 30/03/2016 - 05:43
साबरमतीचं महात्म्य छान 'गांधीगिरी' करुन सांगितलं तर लवकर उमगतं. मनमोकळेपणाची, व्यक्तीस्वातंत्र्याची गरज किती सहजपणे सांगितली घाटपांडे सर. एकमद मस्त.

विसोबा खेचर 25/09/2007 - 08:45
>>माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात. >>बोंबलाच्या वासाने शाकाहारी माणसाची असलेली भूक नाहीशी होणं, मळमळ वाटणे ही देखील प्रकृती आणि त्याच वासाने बोंबील आवडणाऱ्या मांसाहारी व्यक्तीत लाळ गळे पर्यंत भूक निर्माण होणे ही देखील प्रकृतीच. वासं एकचं आहे पण प्रतिसाद भिन्न आहेत. एकासाठी आनंद तर दुसऱ्यासाठी दु:ख. एकाचं अन्न हे दुसऱ्याचं विष असेल तर सहजीवन अशक्य. >>काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मग कुणी भूतकाळात रममाण होतं तर कुणी भविष्यकाळातल्या स्वप्नरंजनात. येणारा प्रत्येक क्षण वर्तमान म्हणता म्हणता भूतकाळात जमा होत असतो. घाटपांडेसाहेब, अतिशय प्रांजळ स्वगत! मनापासून आवडले. काही संकेतस्थळं वयात यायला फार वेळ लावतात बुवा! पण मिसळपावने वयात आल्यावरच जन्म घेतला याची साक्ष देणारा लेख! :) घाटपांडे साहेब, आपल्याकडून अश्याच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे.. आपला, (स्खलनशील प्राणिमात्र!) तात्या.

सहज 25/09/2007 - 09:07
चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे. दोन शब्द लैंगिकता :- स्त्री-पुरुष समानतेच्या वार्‍यात, ही लैंगिकता पण समाजमान्यतेत लवकरच समान विभागली जाईल. आजवर "लैंगिकता व त्यावर मोकळे भाष्य" (व त्या द्वारे इतर लोकांवर वर्चस्व / वरचढ) ही "पुरूषी मक्तेदारी" एकदा ढासळली की बघा "लज्जा पांघरूण" कसे सगळेजण पांघरू लागतील. काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.

In reply to by सहज

काय जाणो भविष्यात बराच कालपर्यंत अगदी ओपनली "स्त्री मक्तेदारी" होइल. पुरुष्यस्य अष्टगुणे स्त्रियांसी इश्वरी देणे.>> म्हणुनच आपली सामाजिक भाकिते आम्हाला आवडतात. चांगला लिहलाय किंचीत जरा पसरल्या सारखा वाटतो पण ओव्हरऑल नक्कीच चांगला (फक्कड) आहे.>> मंग आयडिया करायची घाईमंदी आवरुन घ्यायचा आन जरा निवांत झालं कि पसरुन वाचायचा. म्हंजे सर्कीट इष्टाईल. प्रकाश घाटपांडे

In reply to by सहज

सहज 25/09/2007 - 10:17
घाटपांडे साहेब तुम्ही खरे तर "स्वगत" असे सदर करा बघा. दर आठवड्याला / महीन्याला तुम्हाला जे वाटते असे एक सदर. तुमचे विचार , लेखन आम्हाला आवडते.

In reply to by सहज

सर्किट 25/09/2007 - 11:34
म्हणजेच, अत्यंत सहमत आहे. आम्हा ओपन सोर्स वाल्या लोकांना एखादी सूचना आवडली, एखादा पॅच आवडला, की तिला आपले पॉझिटिव्ह मत देताना आम्ही +१ लिहीत असतो. प्रकाशकाकांनी आपले स्वगत असेच लिहित रहावे, ह्यासाठी हे +१. - सर्किट

सर्किट 25/09/2007 - 09:00
प्रकाशकाका.. अद्याप पूर्ण लेख वाचायचा आहे. पण माणसातला पुरुष झोपवून टाकायचा आणि पुरुषातलं माणूस पण जागं करायचं काम फारच थोडया स्त्रियांना जमतं. पण ज्यांना हे जमतं त्यांच्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे माणसं ही पुरुषचं. बाईचं बाईपण चघळणारी माणसं ही बाईच्या माणूसपणात कधी कधी विरघळून जाणारी देखील असतात. हे वाक्य वाचून मी हरखलो. पूर्ण वाचून सविस्तर प्रतिसाद लिहीनच. पण, आपण आमच्या ओळखीचे आहात, ह्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, हे सांगण्यासाठी हा प्रिमॅच्युअर प्रतिसाद. - (प्रकाश घाटपांडेंचा मानलेला पुतण्या) सर्किट

सर्किट 25/09/2007 - 11:16
प्रकाशकाका, आता कुटुंबाची झोप सुरू झाल्यावर निश्चिंतपणे आपला पूर्ण लेख वाचला (नव्हे दोन-तीनदा वाचला.) आपली किती तारीफ करावी तितकी कमीच आहे. वैचारिक लेखन कशाला म्हणावे, हे ह्या लेखावरून जोखावे. अर्थात हे लेखन आम्हाला वैचारिक वाटते, काहींनी अश्लील अश्लील म्हणून आपल्या संकेतस्थळाच्या तथाकथीत स्त्री सदस्यांपुढे असे लेखन "कसे प्रकाशित करायचे बाई?" असे म्हणून प्रशासकीय फटकार्‍यात रद्द केले असते, असे आमचा अनुभव सांगतो. साध्या "बलात्कार" ह्या शब्दाविषयीच्या "जुने सूर अन जुने तराणे" गायकांच्या ताना आपण ऐकल्या असतीलच. ह्या युगातल्या "ग्रो अप गाईज" म्हणणार्‍या स्त्रिया त्यांना बहुतेक संकेतस्थळ सदस्यांव्यतिरीक्त भेटत नसाव्यात. असो. पुन्हा एकदा, आपला लेख आवडला. जरा परिच्छेदांत नीट विभागला असतात, तर इतर कॅज्युअल वाचकांनादेखील समजला असता, एवढीच सूचना द्यावीशी वाटते. सीरीयस वाचकांसाठी परफेक्ट. - (आपला मानलेला पुतण्या) सर्किट

नंदन 25/09/2007 - 13:06
लेख आवडला. खासकरुन हे निरीक्षण -- "शिवी म्हणजे लैंगिकतेची ओवीच. रोष, नाराजी, राग, अगतिकता व्यक्त करण्यासाठी या ओव्यांचा वापर करण्याची परंपरा खूप जुनी आहे. सहनही होत नाही व सांगताही येत नाही या अवस्थेतून बेडा पार करण्यासाठी या ओव्यांचा आधार घ्यावा लागतो." नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

राजे 25/09/2007 - 13:32
क्या बात है ! मस्तच. वाचनिय तर आहेच पण जपून ठेवण्यासारखे लेखन. बाकी अनूभव हा मानवी जिवनातील महत्वाचा ठेवा ह्या माझ्या मताला पुन्हा एकदा बळकटी मिळाली. राजे (*हेच राज जैन आहेत)

प्रमोद देव 25/09/2007 - 17:31
कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का? आपण नेमके मर्म सांगितलेत.

प्रियाली 25/09/2007 - 18:16
लेख अतिशय आवडला. अशी स्वगते वाचायला आवडतील. >>अशाप्रकारचे खुले मंच इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. इथे अभिव्यक्तिला मर्यादाच नसतात.सर्जनशील प्रतिभा इथही बघायला मिळते. सामाजिक बंधन, रुढी परंपरा, संस्कार यात जखडलेल्या विचारांना उसंत घेण्यासाठी खुला मंच दुसरीकडे कुठे मिळणार? त्यात तुम्ही घुसमटल्यावर तुम्हाला मोकळा श्वास घ्यायला इथंच येणार. समाजात हे बुरखे काढून तुम्ही जगायला लागलात तर समाज तुम्हाला वाळीत टाकील. दुर्जन, समाजद्रोही, कलंकित ठरवेल. तुमची इच्छा असो वा नसो समाजात तुम्हाला हे बुरखे पांघरावेच लागतात. हा एक भाग झाला. इंटरनेटचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतरांना आपल्यापासून किती दूर ठेवायचे हे आपल्या हातात असते. एखाद्यावर (दिसण्यावर/ वागण्यावर/ विचारांवर) फिदा होऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, तशी जवळीक साधता आली नाही तर त्या बाईला (किंवा पुरुषाला) बदनाम करून आपली लैंगिक अतृप्तता/ असंतोष पूर्ण करण्याचा (विकृत) मार्ग चोखाळणारे महाभाग प्रत्यक्ष जीवनात पाहिलेले आहेत. अशांचा त्रास इंटरनेटावरही दिसतो परंतु बुरखे पांघरून अशांना नेटावर एका मर्यादेनंतर सहज दूर ठेवता येते.

चित्रा 25/09/2007 - 20:57
स्वगत मनापासून आवडले. "कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो." यावर माझेही एक (अर्धवट) स्वगतः कोण चूक कोण बरोबर काळच ठरवेल म्हणताना स्वत:चे बरे वाईट विचार त्या त्या वेळेपुरते आणि स्वतःपुरते करू शकणे आणि नंतर त्याचे जे परिणाम होतील त्यांना सामोरे जाणे हे महत्त्वाचे. बदलत्या परिस्थितींत कोण बरोबर कोण चूक असा गोंधळ होणे साहजिकच आहे. पण फारच गोंधळ उडायला लागला तर समजावे आपल्याला धरलेली वाट / केलेला विचार झेपत नाही आहे. काही लोकांना स्वतःची वाट ( लगेच ) लख्ख दिसते आणि ते कोणाची पर्वा न करता ते ती अनुसरतात तर काहींना (खरी) ती वाट मिळायला वेळ लागतो, तर अजून काही स्वत:च केलेल्या गुंत्यात अडकतात आणि आहेत तेथेच गुरफटून फिरतात. यातले आपण कोण ते आपण ठरवायचे.

आजानुकर्ण 25/09/2007 - 21:14
अतिशय सुरेख लेख. वाचायला खूप वेळ लागला. प्रत्येक शब्द न शब्द ज्या लेखाचा वाचावा वाटतो असे लेख वाचायला वेळच लागतो. :) शिवाय हा लेख लगेच पुन्हा एकदा वाचला. घाटपांडे साहेब आम्ही तुमच्या गावचे आहोत हे सांगायला खूप अभिमान वाटतो. ;) - आजानुकर्ण मंचरकर

धनंजय 25/09/2007 - 21:16
तरी असेच येऊ द्या. मी दुसरीकडे चिकटवून स्वतः परिच्छेद पाडून घेईन. > पर्यायी शब्द वापरले तर आशयहानी होते. > 'पोटाला नाही आटा अन म्हनं चोटाला उटण वाटा`. एकदम पटले. शिवराळ भाषा असून रावसाहेब (आणि तुमच्या उदाहरणातले हवालदार) मुद्द्याचे ही बोलतात, हे महत्त्वाचे. कारण केवळ भावनिक आशय असलेले तेवढेच शब्द बोलले, तर समोरच्याला उत्तर देण्याइतपत अर्थ समजेलच असे सांगता येत नाही. "साहेब पेटलाय्" हे उत्तम कळले, पण काय नेमके चुकले आणि काय नेमके बदलायचे ते कळले नाही तर आली पंचाईत. तुमचा हा पूर्वप्रसिद्ध लेख आहे. पण खरे म्हणजे दोन किंवा तीन लेखांना पुरेल इतका मालमसाला याच्यात भरला आहे.

प्राजु 25/09/2007 - 21:32
प्रकाशकाका, छान आहे लेख. विशेष करून.. एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. आवडले. खूप विचार करायला लावणारा लेख आहे. असेच येऊ दे आणखिही.. - प्राजु.

कोलबेर 26/09/2007 - 05:48
इथल्या प्रतिक्रिय वाचल्यावर हा लेख जरा निवांत वेळ काढूनच वाचला.. जबरदस्त स्वगत आहे.

अभिज्ञ 16/08/2008 - 03:03
प्रकाश घाटपांडे जी, मिसळपाव वरील अत्युत्तम अशा लेखांपैकी हा एक लेख वाचनात आला. फारच प्रांजळ असा लिहिला आहे. शेवटचा परिच्छेद अतिशय प्रभावी झालाय. विशेषतः एकेकाळची विकृृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत. काळ हा त्याचं दु:ख हलकं करतो. आशेच्या वारुवर स्वार झाले की काळ किती गेला हे समजतच नाही. कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड गेलं की आपण काळावर सोपवून मोकळे होतो. काळाच्या अनंताकडील प्रवासातले आपण सगळे क्षणभंगुर सहप्रवासीच नाही का? हे तर फारच आवडले. अभिनंदन अभिज्ञ.

मदनबाण 16/08/2008 - 04:33
लेख फार आवडला.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल. काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

मस्तच, धन्यवाद काका. ह्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल. काळानुरुप सगळ्या व्यख्या बदलत राहतात. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.

अर्धवटराव 12/09/2012 - 01:06
पोलीस खात्यासम रांगड्या यंत्रणेतील ट्रांझीशन्स व कर्मठता, भावना रेचनाचे मानसशास्त्र, भाषेतले वेगवेगळे प्रवाह, स्त्रीत्वाच्या अचाट शक्तीचे तेव्हढेच विराट पण भावुक प्रदर्शन, अभिव्यक्तीच्या नवनवीन हुंकारांचे समाजाने केलेले स्वागत, निसर्गाच्या "बदल" या एकमेव नियमाचे स्पष्टीकरण आणि त्याची अपराजीत शक्ती, नैतिकतेची अपरिहार्य स्थलकालसापेक्षता, मानव्याची राजीखुषीने वा रेट्याने काळाप्रती शरणागती... उफ्फ्फ्फ... एव्हढं सगळं एकाच लेखात ???... भाईकाकांचा पानवाला आठवला. आपल्या प्रतिभेला सलाम. अर्धवटराव

दादा कोंडके 12/09/2012 - 16:27
काही नोकर्‍यांमध्ये स्त्रियांची कुचंबणा होते आणि त्यामुळे पुरुषांची सुद्धा गोची होते. ह्यावरूनच आठवलं. कॉलेजात असताना एक लमाणतांड्यावर मुकादम म्हणून काम करत असलेल्या माणसाच्या घरात काही कामा निमित्त गेलो होतो. एरवी सुशिक्षीत (सुसंस्कृत?) दिसणारा माणूस स्वतःच्या बायका पोरांसमोरच मला 'अवचित उठलं आणि XXत घुसलं' असं करू नकोस असं म्हणाला होता. त्या धक्क्यातून दोन दिवस बाहेर आलो नव्हतो. :)

हा लेख वर काढणाऱ्या मनोबाला धन्यवाद. मिपाच्या खजिन्यातलं एक माणिकच बाहेर काढलं आहे. लेखाला नावाप्रमाणेच एक स्वतःशी बोलण्याचा टोन आहे. पोलिस खात्यातले किस्से अस्सल रांगड्या भाषेमुळे रंगलेले आहेत. घाटपांडेसाहेब, अजून लेखन करा की.

In reply to by तर्राट जोकर

अर्धवटराव 30/03/2016 - 05:43
साबरमतीचं महात्म्य छान 'गांधीगिरी' करुन सांगितलं तर लवकर उमगतं. मनमोकळेपणाची, व्यक्तीस्वातंत्र्याची गरज किती सहजपणे सांगितली घाटपांडे सर. एकमद मस्त.
लेखनविषय:
लेखनप्रकार
''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन. शिव्यांना ओव्या समजणाऱ्या संस्कृतीत स्त्रिया कशा रुजणार? अशी चिंता काही वर्गाला पडली होती.

चकाट्या

ॐकार ·

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट
3

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. १

स्वाती दिनेश ·

गुंडोपंत 21/09/2007 - 07:22
"परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं." वा! अगदी छान! "विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते." हे पण मस्तच! "छोटीशी शटल ट्रेन घेऊन " म्हणजे विमानतळावरच रेल्वे? अच्छा मोठाच असणार हा विमान तळ!""सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन " म्हणजे काय असते बॉ? "तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली " वा मजा आहे! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सहज 21/09/2007 - 07:58
>>ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते. अगदी. मधे डीस्कव्हरी का नॅ.जिओ. वर ह्या विमानतळाच्या बांधकामाची सूंदर फिल्म पाहीली होती. एक झलक म्हणजे पंतांना विमानतळावर ट्रेनचा अंदाज येईल. बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही. बाय द वे स्वातीताई हे जपान नवीन घडामोडी का जर्मनीच्या आधीची गोष्ट? बाकी बघीतले पाहीजे सुभाषबाबूंनंतर जपान, जर्मनीमधे कार्य तुमचेच कि काय? :-)

In reply to by सहज

गुंडोपंत 21/09/2007 - 08:12
मस्त चित्र आहे हे सहजराव. सहजराव! नीटच कळलं आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते! वा! काय विमानतळ आहे! चक्क एक बेटच बांधून काढलंय म्हणाकी! कसं काय केलं असेल या लोकांनी... अचंबाच वाटतोय मला! जपानी मोठे कल्पक आहेत यात शंका नाही. शिवाय प्रामाणिक लोकं... म्हणजे तात्याने जपानी मिसळपाव (बिंतो बिंतो पाव डॉट कॉम? ;)) ) काढले, तर "कुणीही कोणतेही आयडी घेऊन, कुणाचेतरी लेखन त्यावर टाकणार नाही, म्हणता? वा वा! हे चित्र कुठे मिळालं? जरा जवळून काढलेले आहे का हो? आपला यष्टीष्टँडवाला गुंडोपंत

स्वातीताई, छोटेखानी लेख उत्तम झाला आहे. मला एक विचारायचे होते. पुण्यातल्या बादशाही बोर्डिंगची टोक्योत शाखा आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. खरे का? दुसरे, जपानमध्ये 'मी तुला पार्टी देतो' असे कुणी म्हटले म्हणजे 'तू तुझे पैसे भर, मी माझे भरीन' असे त्याला म्हणायचे असते म्हणे. त्यामुळे जपानमध्ये कुणी पार्टी देतो म्हटले की कुणी खुश होऊ नये. पैसे काढण्याची तयारी ठेवावी. खरे का?

विसोबा खेचर 21/09/2007 - 11:43
खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं वा स्वाती, छान लिहिलं आहेस.. औरभी लिख्खो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बाबुराव 21/09/2007 - 13:52
आजून लिव्हा ,बाबूरावला आवड्ला जपानाचं वर्णन. जापानमधी जेवा खावाचं बरं हाये नव्हं. म्हंजी भाकर बाजरीची,ज्येवारीची,चपाती तेच्याबद्दल बी लिव्हा भायेर लयी हाल होते म्हणते नीट जेवाला नसलं म्हंजी.

प्रमोद देव 21/09/2007 - 14:00
जर्मनी काय! जपान काय! मजा आहे बुवा तुमची. पण एक गोष्ट आवडली तुमची की निदान तुम्ही आम्हाला तुमच्या अनुभवात तरी सामावून घेताय! नाहीतर आम्ही हे सगळे नकाशावरच बघणार! लेख आवडला.पुढचा लेख लवकर टाका.

In reply to by टीकाकार-१

भारतात पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांवर 'एक लेख'?एकच लेख कसा हो पुरेल? टीकाकार, टीकाही करा पण जरा जपून.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:32
माफ करा हं ... 'किमानं एक' लिहा असं मला म्हणायच होतं. बरं... मी केलेली सुचना तुम्हाला टीका का बरे वाटली ते सन्गालं का जरा.. वा..वा... सुंदर.. वगैरे शब्द नव्हते म्हणुन?..

In reply to by आजानुकर्ण

जुना अभिजित 21/09/2007 - 17:41
टीकाकारांच्या प्रतिभेला आमचा सलाम. अगदी शक्य नाही अशा ठिकाणीसुद्धा पिंक टाकतात. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:48
"मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित " ही ओळ वाचुन तुम्ही बालवाडीत आहात असे वटते. :)

In reply to by टीकाकार-१

गुंडोपंत 22/09/2007 - 04:57
अहो अभिजितच काय, आम्ही सगळेच बालवाडीत आहोत! तुम्ही मोठे झालात की तुम्हालापण येता येईल हं आमच्या वर्गात! आपला गुंडोपंत बालवाडी मिसळपाव बुद्रुक

कारण 'या' लेखाविषयी बरी वाईट कोणतीच प्रतिक्रिया न देता,तुम्ही मला मी भारतातली कोणती प्रेक्षणीय स्थळे पाहिली ? हे विचारलेत म्हणून मला तसे वाटले.तसे नसेल तर उत्तमच आहे. स्वाती

जुना अभिजित 21/09/2007 - 17:44
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

राज जैन 21/09/2007 - 17:53
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे.. जाणे शक्य नाही आहे मला तरी पण एक ईच्छा आहे जर साध्या झालेच तर एक छायाचित्र जरुर येथे चिटकवावे ! ही मनपुर्वक विनंती. राज जैन (ज्या महामानवा विषयी वाचले आहे त्याला पाहण्याची जबरदस्त ईच्छा मनात आहे)

विकास 21/09/2007 - 18:34
स्वाती, जपानवर्णनाची सुरवात आवाडलीे. पण अजून पुढे ऐकायची उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत! असे ऐकून आहे की भारतीयांचे बर्‍यापैकी हाल होऊ शकतात... सुशी खाल्ल्यावर कसे वाटले? अजून पण काही प्रश्न विचारीन, विशेष करून तिथल्या माणसांचे अनुभव वगैरे... पण दुसरा लेख येऊदेत!

सर्किट 21/09/2007 - 23:50
पुढच्या भागांची उत्सुकता आहे. - सर्किट

चित्रा 22/09/2007 - 00:59
जपानमधल्या जुन्या डायर्‍या बाहेर काढलेल्या दिसतायत! प्रवासाचे वर्णन आवडले. अजून लिही. चित्रा अवांतर - मगाशी वर कुठेतरी "चित्तर" लिहीलेले पाहिले - चुकून चित्रा वाचले :-)

लिखाळ 22/09/2007 - 19:56
स्वातीताई, छोटेखानी लेख मस्त आहे. पुढचे भाग वाचायची उत्सूकता आहे. -- लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

वर्षा 23/09/2007 - 05:10
मस्तं लिहिलंय. जपानविषयी वाचायला खूप आवडतं. ( मी तिथे काही काळ घालवल्याने जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे!!) पुढील भाग लवकर येऊ दे. -वर्षा

मंडळी, सर्वांच्या प्रतिसादांबद्द्ल मनापासून धन्यवाद. सहज, कानसाईचे चित्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद्,त्यामुळे पंतच नव्हे तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला. प्रमोदकाका, अहो,आमची काय गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा,त्या यात्रेत तुम्हा सर्वांना सामील करुन घेता येत आहे,त्याचा मलाही आनंदच आहे. चित्रा, हो ग्,जपानच्या डायर्‍या आवराआवरीत सापडल्या,म्हटलं,चला आता इथे त्यातले वर्णन लिहू या. विकास, सुशी आणि इतरही कितीतरी अनुभव आहेत्,लिहिणार आहे या मालिकेत. बाबूराव, जपानची भाकर लई वेगळी आस्ते हो,लिवते हाये त्याबद्दल फुडे.. अभिजित,राज कोबे मध्ये सुभाष बाबूंचे खूप मोठे असे स्मारक काही मला आढळले नाही.त्यामुळे थोडी निराशाच झाली.सुभाषबाबूंच्या अस्थी रेंकोजी टेंपल्-टोकियो येथे आहेत. पुढचा भाग लवकरच टाकते, तात्या,लिखाळ,गुंडोपंत,सर्किट,चित्तर,कर्ण,वर्षा ,टीकाकार सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मी जपान ला जाऊन जवळ जवळ १२ वर्ष झाली. पुन्हा एकदा जाऊन आल्यासारख वाटल. खूपच छान केल आहे वर्णन. मी जपान च्या नरीटा विमानतळावर उतरले होते. टोक्यो आणि योकोहामा फिरले. पण ओसाका ला जाण्याची सन्धी मिलाली नाही. :)

शुचि 31/03/2010 - 20:55
>>समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे>> मस्तच!!! मजाच मग तर. लेख आवडला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

गुंडोपंत 21/09/2007 - 07:22
"परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं." वा! अगदी छान! "विमानाची चाकं जमिनीला लागली तरी अस्मादिक आकाशातच तरंगत होते." हे पण मस्तच! "छोटीशी शटल ट्रेन घेऊन " म्हणजे विमानतळावरच रेल्वे? अच्छा मोठाच असणार हा विमान तळ!""सर्टिफिकेट ऑफ एलिजिबिलिटी देऊन पासपोर्टावर शिक्का मारुन " म्हणजे काय असते बॉ? "तिथे असलेल्या अटेंडटनेच माझी बॅग र्ट्रॉलीवर घालून दिली " वा मजा आहे! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सहज 21/09/2007 - 07:58
>>ओसाका कानसाई विमानतळाचे विहंगम दॄश्य फार सुंदर दिसते. अगदी. मधे डीस्कव्हरी का नॅ.जिओ. वर ह्या विमानतळाच्या बांधकामाची सूंदर फिल्म पाहीली होती. एक झलक म्हणजे पंतांना विमानतळावर ट्रेनचा अंदाज येईल. बाकी जपान ह्या देशाचे मला नेहमीच कूतूहलमिश्रीत आर्श्चय वाटत आले आहे. तेथेपण मंत्रीमहोदयांच्या भ्रष्टाचाराच्या, भानगडींच्या बातम्या येते असतात पण समाजात काय स्वच्छता,शिस्त व प्रामाणीकपणा आहे. तुमची लॅपटॉप, मोबाइल असलेली बॅग जरी विसरली तरी ति कोणी घेणार नाही, ज्या जागी विसरलात तिथेच लगेच गेलात तर सापडेल किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात. तुमचे हेल्मेट गाडीवर ठेवून बिनधास्त जा, कोणी घेणार नाही. बाय द वे स्वातीताई हे जपान नवीन घडामोडी का जर्मनीच्या आधीची गोष्ट? बाकी बघीतले पाहीजे सुभाषबाबूंनंतर जपान, जर्मनीमधे कार्य तुमचेच कि काय? :-)

In reply to by सहज

गुंडोपंत 21/09/2007 - 08:12
मस्त चित्र आहे हे सहजराव. सहजराव! नीटच कळलं आता तुम्हाला काय म्हणायचे आहे ते! वा! काय विमानतळ आहे! चक्क एक बेटच बांधून काढलंय म्हणाकी! कसं काय केलं असेल या लोकांनी... अचंबाच वाटतोय मला! जपानी मोठे कल्पक आहेत यात शंका नाही. शिवाय प्रामाणिक लोकं... म्हणजे तात्याने जपानी मिसळपाव (बिंतो बिंतो पाव डॉट कॉम? ;)) ) काढले, तर "कुणीही कोणतेही आयडी घेऊन, कुणाचेतरी लेखन त्यावर टाकणार नाही, म्हणता? वा वा! हे चित्र कुठे मिळालं? जरा जवळून काढलेले आहे का हो? आपला यष्टीष्टँडवाला गुंडोपंत

स्वातीताई, छोटेखानी लेख उत्तम झाला आहे. मला एक विचारायचे होते. पुण्यातल्या बादशाही बोर्डिंगची टोक्योत शाखा आहे, असे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. खरे का? दुसरे, जपानमध्ये 'मी तुला पार्टी देतो' असे कुणी म्हटले म्हणजे 'तू तुझे पैसे भर, मी माझे भरीन' असे त्याला म्हणायचे असते म्हणे. त्यामुळे जपानमध्ये कुणी पार्टी देतो म्हटले की कुणी खुश होऊ नये. पैसे काढण्याची तयारी ठेवावी. खरे का?

विसोबा खेचर 21/09/2007 - 11:43
खिडकीतून बाहेर डोकावले. एकीकडे प्रशांत निळासागर आणि डोंगरातून विमान खाली झेपावत होते,सागराच्या लाटा खुणावत होत्या.समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे.परीने ढगांतून अलगद खाली यावं ना,तसं आमचं विमान हाँगकाँगला उतरलं वा स्वाती, छान लिहिलं आहेस.. औरभी लिख्खो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बाबुराव 21/09/2007 - 13:52
आजून लिव्हा ,बाबूरावला आवड्ला जपानाचं वर्णन. जापानमधी जेवा खावाचं बरं हाये नव्हं. म्हंजी भाकर बाजरीची,ज्येवारीची,चपाती तेच्याबद्दल बी लिव्हा भायेर लयी हाल होते म्हणते नीट जेवाला नसलं म्हंजी.

प्रमोद देव 21/09/2007 - 14:00
जर्मनी काय! जपान काय! मजा आहे बुवा तुमची. पण एक गोष्ट आवडली तुमची की निदान तुम्ही आम्हाला तुमच्या अनुभवात तरी सामावून घेताय! नाहीतर आम्ही हे सगळे नकाशावरच बघणार! लेख आवडला.पुढचा लेख लवकर टाका.

In reply to by टीकाकार-१

भारतात पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांवर 'एक लेख'?एकच लेख कसा हो पुरेल? टीकाकार, टीकाही करा पण जरा जपून.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:32
माफ करा हं ... 'किमानं एक' लिहा असं मला म्हणायच होतं. बरं... मी केलेली सुचना तुम्हाला टीका का बरे वाटली ते सन्गालं का जरा.. वा..वा... सुंदर.. वगैरे शब्द नव्हते म्हणुन?..

In reply to by आजानुकर्ण

जुना अभिजित 21/09/2007 - 17:41
टीकाकारांच्या प्रतिभेला आमचा सलाम. अगदी शक्य नाही अशा ठिकाणीसुद्धा पिंक टाकतात. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

टीकाकार-१ 21/09/2007 - 17:48
"मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित " ही ओळ वाचुन तुम्ही बालवाडीत आहात असे वटते. :)

In reply to by टीकाकार-१

गुंडोपंत 22/09/2007 - 04:57
अहो अभिजितच काय, आम्ही सगळेच बालवाडीत आहोत! तुम्ही मोठे झालात की तुम्हालापण येता येईल हं आमच्या वर्गात! आपला गुंडोपंत बालवाडी मिसळपाव बुद्रुक

कारण 'या' लेखाविषयी बरी वाईट कोणतीच प्रतिक्रिया न देता,तुम्ही मला मी भारतातली कोणती प्रेक्षणीय स्थळे पाहिली ? हे विचारलेत म्हणून मला तसे वाटले.तसे नसेल तर उत्तमच आहे. स्वाती

जुना अभिजित 21/09/2007 - 17:44
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

राज जैन 21/09/2007 - 17:53
जपानला कोबे शहरात(?) नेताजींच्या रक्षा ठेवल्या आहेत.. त्यांच दर्शन घ्यायची मनापासून इच्छा आहे.. जाणे शक्य नाही आहे मला तरी पण एक ईच्छा आहे जर साध्या झालेच तर एक छायाचित्र जरुर येथे चिटकवावे ! ही मनपुर्वक विनंती. राज जैन (ज्या महामानवा विषयी वाचले आहे त्याला पाहण्याची जबरदस्त ईच्छा मनात आहे)

विकास 21/09/2007 - 18:34
स्वाती, जपानवर्णनाची सुरवात आवाडलीे. पण अजून पुढे ऐकायची उत्सुकता आहे. मुख्य म्हणजे खाण्याच्या बाबतीत! असे ऐकून आहे की भारतीयांचे बर्‍यापैकी हाल होऊ शकतात... सुशी खाल्ल्यावर कसे वाटले? अजून पण काही प्रश्न विचारीन, विशेष करून तिथल्या माणसांचे अनुभव वगैरे... पण दुसरा लेख येऊदेत!

सर्किट 21/09/2007 - 23:50
पुढच्या भागांची उत्सुकता आहे. - सर्किट

चित्रा 22/09/2007 - 00:59
जपानमधल्या जुन्या डायर्‍या बाहेर काढलेल्या दिसतायत! प्रवासाचे वर्णन आवडले. अजून लिही. चित्रा अवांतर - मगाशी वर कुठेतरी "चित्तर" लिहीलेले पाहिले - चुकून चित्रा वाचले :-)

लिखाळ 22/09/2007 - 19:56
स्वातीताई, छोटेखानी लेख मस्त आहे. पुढचे भाग वाचायची उत्सूकता आहे. -- लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

वर्षा 23/09/2007 - 05:10
मस्तं लिहिलंय. जपानविषयी वाचायला खूप आवडतं. ( मी तिथे काही काळ घालवल्याने जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे!!) पुढील भाग लवकर येऊ दे. -वर्षा

मंडळी, सर्वांच्या प्रतिसादांबद्द्ल मनापासून धन्यवाद. सहज, कानसाईचे चित्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद्,त्यामुळे पंतच नव्हे तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला. प्रमोदकाका, अहो,आमची काय गाड्यांबरोबर नळ्यांची यात्रा,त्या यात्रेत तुम्हा सर्वांना सामील करुन घेता येत आहे,त्याचा मलाही आनंदच आहे. चित्रा, हो ग्,जपानच्या डायर्‍या आवराआवरीत सापडल्या,म्हटलं,चला आता इथे त्यातले वर्णन लिहू या. विकास, सुशी आणि इतरही कितीतरी अनुभव आहेत्,लिहिणार आहे या मालिकेत. बाबूराव, जपानची भाकर लई वेगळी आस्ते हो,लिवते हाये त्याबद्दल फुडे.. अभिजित,राज कोबे मध्ये सुभाष बाबूंचे खूप मोठे असे स्मारक काही मला आढळले नाही.त्यामुळे थोडी निराशाच झाली.सुभाषबाबूंच्या अस्थी रेंकोजी टेंपल्-टोकियो येथे आहेत. पुढचा भाग लवकरच टाकते, तात्या,लिखाळ,गुंडोपंत,सर्किट,चित्तर,कर्ण,वर्षा ,टीकाकार सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

मी जपान ला जाऊन जवळ जवळ १२ वर्ष झाली. पुन्हा एकदा जाऊन आल्यासारख वाटल. खूपच छान केल आहे वर्णन. मी जपान च्या नरीटा विमानतळावर उतरले होते. टोक्यो आणि योकोहामा फिरले. पण ओसाका ला जाण्याची सन्धी मिलाली नाही. :)

शुचि 31/03/2010 - 20:55
>>समुद्राला लगटूनच हा विमानतळ आहे>> मस्तच!!! मजाच मग तर. लेख आवडला. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

आजानुकर्ण ·

सर्किट 19/09/2007 - 22:07
संपादकीय अग्रलेखाने मिसळपावाचे चीज झाले, ह्याची खात्री पटली. सुमार केतकरांची शैली आपल्याला अचूक साधली आहे. लोकसत्तावाल्यांना फरक कसा कळला, कोण जाणे. अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 19/09/2007 - 22:09
अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-) हे बाकी सही! लेख आवडला. "शैली"ला बरोब्बर उचलले. ;-)

बेसनलाडू 19/09/2007 - 22:10
आपल्या संपादकीय कारकिर्दीची अशी जोमदार सुरुवात निश्चितच स्तुत्य आणि सुखावह वाटते आहे. बाकी येथे 'लोकमानस', 'बहुतांची अंतरे' ष्टाइल काहीतरी असेल, तर त्याची जबाबदारी आमच्यासारख्यांवर राहिली(च)! ;) :)

तुम्हाला शैली मस्त साधली आहे आणि तुमचे शुद्धलेखनही चांगले आहे;) यापेक्षा जास्त भाव तुम्हाला मी देणे माझ्या करियरसाठी घातक आहे. ;) उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो. सुरेखा पुणेकरांनी तुमच्या खरडवहीत आरोप केला आहे.:) तो वाचला. सुरेखाताईंना तुम्ही कसे ओळखता? आमचीही करून द्या ना ओळख.

आजानुकर्ण 19/09/2007 - 22:28
सुरेखाताईंनी या प्रतिसादात त्यांची बैठकीची लावणी मिसळपावावर ठेवता येईल का अशी विचारणा केली होती त्यामुळे संपादकीय अधिकारात त्यांची तारीख मिळते का यासाठी आम्ही चौकशी केली. गैरसमज नसावा. ;) अवांतरः येथे दुवा देता येत नसल्याने दुवा देण्यासाठी आम्ही केशवसुमारांच्या खरडवहीचा वापर केला तर तिथेही हाच प्रतिसाद गेला. क्षमस्व.

In reply to by आजानुकर्ण

ह्यो आजानुकरनं खोटं बोलतूया. त्या परतिसादाअदूगर बगा काय लिव्हलया. आजानुकर्ण मंगळ, 09/18/2007 - 10:45 अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा? » काढून टाका | प्रतिक्रिया संपादन तुमा सर्वांचा लाडकी, आनि आजानुकरना नाव बदल की रं. लय तर्रास होत बग.. आजानूकरनं.. आ जानू करनं. आसं कटिन नाव कस घ्यायचं.. सुरेखा पुनेकर ........ नका जाऊ पावनं जरा थांबा

In reply to by सुरेखा पुणेकर

आजानुकर्ण 20/09/2007 - 11:45
सुरेखाताई -->अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा? या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला. आणि आमचे नाव आमच्या मातापित्यांनी असे ठेवले त्याला आम्ही काय करणार :(

In reply to by आजानुकर्ण

या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला. .कसा ह्यो आजानूकरनं. .. . आसं शुद्द आवतान..... नाना फडनिसच हायस..... बामनहरी.. बामनहरी ..बावनखनी... आमच्या पुन्याची बावनखनी.

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव 20/09/2007 - 12:00
लावणी बैठकीचीच ठेवा. कारण बाई(?) नाचायला लागली तर हाटेल हादरेल,टेबलं थरथरतील आणि ग्लासातलं(जे काही असेल ते) सांडेल. त्यापेक्षा त्या लावणीत कोणता राग आहे आणि शब्दाशब्दांत कसे सूर (गंधार,मध्यम वगैरे)लपलेत ह्यावर निरूपण ठेवा.ते आवडेल आपल्याला.जमल्यास त्याच विडिओ चढवा इथेच.(दूरदर्शन!)

विसोबा खेचर 19/09/2007 - 23:21
जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर आम्हाला फक्त केशवसुमार माहीत होते! सुमार केतकर हे नांव आम्ही प्रथमच ऐकतो आहोत! :) विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. अपार्ट फ्रॉम मस्करी, वरील संपूर्ण लेखातील वरील वाक्याला आम्ही सर्वाधिक दाद देतो.. वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे. हम्म! पुढील वेळेस प्रमाण योग्य आहे ना, एवढे मात्र पाहा.. असो! सदर लेखाबद्दल, सहजसोपे चिमटे काढत अतिशय चांगल्या रितीने राजकीय सद्यस्थितीचे विवेचन केले आहे असे म्हणून आम्ही या लेखास आमची मनमोकळी दाद रुजू करतो... तात्या.

नंदन 20/09/2007 - 05:41
छान लिहिलं आहेस, योगेश. शैली उत्तम वठली आहे. पुन्हा पाठवणार असशील तर आणीबाणीचे समर्थन करायला विसरु नकोस :). अग्रलेख स्वीकारला जाण्याचे चान्सेस वाढतील. शिवाय जमलंच तर प्रशासकीय अनुमती आणि आणीबाणी, तसेच किचन कॅबिनेट आणि संपादक मंडळ यांच्यातील साम्य या विषयावर एखादा परिच्छेद टाकता आला, तर उत्तमच. [ह. घ्या.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सहज 20/09/2007 - 06:27
चांगलीच प्रेरणा घेऊन लिहीले आहेस. मला आवड्लेले शब्द म्हणजे "असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या " सॉलीड!! ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-)

In reply to by सहज

विकास 20/09/2007 - 08:36
>>>ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-) आवडले! अहो पण आम्ही फकस्त म.टा. मधेच लिहीले आहे. तुम्हाला काय वाटते "सुमार जी" आमचे विचार छापतील की काय? ;) आमचे विचार छापून त्यांना थोडेच राज्यसभेचे सभासद मिळेल ...?

सन्जोप राव 20/09/2007 - 07:15
आजानुकर्णाने आमच्याकडून कधी गंडा बांधून घेतला की नाही ते आठवत नाही, पण खाजगीत तो आमचा उल्लेख 'सन्जोप सर' असा करतो असे ऐकून आहे. त्या न्यायाने आमच्या या शिष्योत्तमाने हा जबरदस्त लेख लिहून आम्हाला गुरुदक्षिणा पोचवली आहे असे गेल्या महिन्यांत झालेल्या गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाला स्मरुन म्हणावेसे वाटते. जबरदस्त लेखन! (दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो) सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 20/09/2007 - 08:53
(दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो) हम्म्म! याला म्हणतात 'बेरजेचं राजकारण'!! चालू द्या...:) आपला, (नवा पक्ष काढणारा) राष्ट्रवादी तात्या पवार!

कर्णा--- "मिसळ आणि भेसळ" हा अग्रलेख आवडला.सुमार केतकरांचा ष्टाईल आवडली. आणि किती शुद्ध लिहितोस यामुळे आमच्या अशुद्धलेखन संप्रदायाच्या वारक-यांवर परिणाम होण्याची शक्यता वाटते :) अग्रलेख लोकसत्ताकडे पुन्हा पाठवावा आणि हे संकेतस्थळ 'तात्या अभ्यंकराने' काढलेले नाही अशी तळटीप दे. लेख नाही छापून आला तर नावाचा 'प्रा.डॉ.... नाही . :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 20/09/2007 - 08:39
'सुमार केतकरां'च्या लोकसत्तेचे माहित नाही.. पण 'कुमार अभ्यंकरां'च्या लोकशाही सत्तेत मात्र हा अग्रलेख आला़की छापून!

वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे. ते भोवल्यामुळेच आम्हा वाचकांचे फावले प्रकाश घाटपांडे

विसुनाना 20/09/2007 - 10:59
विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. ही वाक्ये (केक्युलेच्या बेन्झिन रिंगसारखी ) आमच्या दिवास्वप्नातल्या (मिसळीच्या) कटात आम्हाला तरंगताना दिसली होती. पण आम्ही ती इथल्या मिसळीत टाकण्याआधीच मेहरबान अजानुकर्ण साहेबांनी जशीच्या तशी पकडून त्यांच्या फरसाणावर ओतली आहेत. ती वाक्ये आमचीच असल्याने ती अत्युत्कृष्ट आहेतच. शिवाय त्यांच्याखालची अजानुकर्णाची मिसळही चवीला बरी आहे. :):):) :) - हा पंचवीस वर्षांचा झाला म्हणे!

टीकाकार-१ 20/09/2007 - 11:04
"माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. " का?..

प्रमोद देव 20/09/2007 - 12:18
योगेशचा हा अग्रलेख वाचून खूपच आनंद झाला. महाजालावरील ’अग्रलेखांचा बादशाह ’ असे आजपासून त्याचे नवीन नामकरण मी करत आहे.तेव्हा समस्तांनी ’ साधू! साधू(अरूण नाही हो) म्हणावे ही अपेक्षा!

ॐकार 20/09/2007 - 17:54
लेख मस्तच आहे. काही वेळ लोकसत्ताच वाचत आहे असे वाटले! केतकरांची उचलबांगडी होणार असे दिसते ;) मार्मिक लिखाण आवडले. दिवाळी अंकाकरता पाठवून पहा. :)

लिखाळ 20/09/2007 - 18:28
सुंदर लेख. मजा आली. (केतकरांचे लेखन फारसे वाचले नसल्याने बाकी टिप्पणी करु शकत नाही :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आम्ही केतकरांची कुंडली मांडली. त्यांची भाषणे ऐकली. एकदा पत्रकारभवनात मार्क्सवादावर त्यांचे भाषण ऐकले आणि तात्काळ भाकीत आमच्या पत्रकार मित्रांना ऐकवले.' ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे.( आमचे भाकित बरोबरच असते, लवकर म्हणजे कधी ते आम्ही कधीच सांगत नाही आणि आम्हालाही कुणि विचारत नाही) ज्योतिषाचारी प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

@ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे. ते नाही गेले पण त्यांचा बगलबच्चा आणि मटा नव्हे सोटा चा (सोन्याआई टाईम्स चा) आजी संपादक रडत राऊत मात्र नक्की राज्यसभेवर जाणार बुवा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

नीलकांत 20/09/2007 - 20:19
अजानुकर्णा, आमच्या आवडत्या सुमार केतकरांची जशीच्या तशी इस्टाईल घेतलीस बघ. हा ते आणिबाणीचं आणि संजय गांधीच राहीलं बघ. ;) लेख खुप आवडला. नीलकांत

धर्म ही खरच अफुची गोळी आहे. ह्याबाबत सहम्त ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सर्किट 19/09/2007 - 22:07
संपादकीय अग्रलेखाने मिसळपावाचे चीज झाले, ह्याची खात्री पटली. सुमार केतकरांची शैली आपल्याला अचूक साधली आहे. लोकसत्तावाल्यांना फरक कसा कळला, कोण जाणे. अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली 19/09/2007 - 22:09
अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-) हे बाकी सही! लेख आवडला. "शैली"ला बरोब्बर उचलले. ;-)

बेसनलाडू 19/09/2007 - 22:10
आपल्या संपादकीय कारकिर्दीची अशी जोमदार सुरुवात निश्चितच स्तुत्य आणि सुखावह वाटते आहे. बाकी येथे 'लोकमानस', 'बहुतांची अंतरे' ष्टाइल काहीतरी असेल, तर त्याची जबाबदारी आमच्यासारख्यांवर राहिली(च)! ;) :)

तुम्हाला शैली मस्त साधली आहे आणि तुमचे शुद्धलेखनही चांगले आहे;) यापेक्षा जास्त भाव तुम्हाला मी देणे माझ्या करियरसाठी घातक आहे. ;) उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो. सुरेखा पुणेकरांनी तुमच्या खरडवहीत आरोप केला आहे.:) तो वाचला. सुरेखाताईंना तुम्ही कसे ओळखता? आमचीही करून द्या ना ओळख.

आजानुकर्ण 19/09/2007 - 22:28
सुरेखाताईंनी या प्रतिसादात त्यांची बैठकीची लावणी मिसळपावावर ठेवता येईल का अशी विचारणा केली होती त्यामुळे संपादकीय अधिकारात त्यांची तारीख मिळते का यासाठी आम्ही चौकशी केली. गैरसमज नसावा. ;) अवांतरः येथे दुवा देता येत नसल्याने दुवा देण्यासाठी आम्ही केशवसुमारांच्या खरडवहीचा वापर केला तर तिथेही हाच प्रतिसाद गेला. क्षमस्व.

In reply to by आजानुकर्ण

ह्यो आजानुकरनं खोटं बोलतूया. त्या परतिसादाअदूगर बगा काय लिव्हलया. आजानुकर्ण मंगळ, 09/18/2007 - 10:45 अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा? » काढून टाका | प्रतिक्रिया संपादन तुमा सर्वांचा लाडकी, आनि आजानुकरना नाव बदल की रं. लय तर्रास होत बग.. आजानूकरनं.. आ जानू करनं. आसं कटिन नाव कस घ्यायचं.. सुरेखा पुनेकर ........ नका जाऊ पावनं जरा थांबा

In reply to by सुरेखा पुणेकर

आजानुकर्ण 20/09/2007 - 11:45
सुरेखाताई -->अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा? या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला. आणि आमचे नाव आमच्या मातापित्यांनी असे ठेवले त्याला आम्ही काय करणार :(

In reply to by आजानुकर्ण

या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला. .कसा ह्यो आजानूकरनं. .. . आसं शुद्द आवतान..... नाना फडनिसच हायस..... बामनहरी.. बामनहरी ..बावनखनी... आमच्या पुन्याची बावनखनी.

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव 20/09/2007 - 12:00
लावणी बैठकीचीच ठेवा. कारण बाई(?) नाचायला लागली तर हाटेल हादरेल,टेबलं थरथरतील आणि ग्लासातलं(जे काही असेल ते) सांडेल. त्यापेक्षा त्या लावणीत कोणता राग आहे आणि शब्दाशब्दांत कसे सूर (गंधार,मध्यम वगैरे)लपलेत ह्यावर निरूपण ठेवा.ते आवडेल आपल्याला.जमल्यास त्याच विडिओ चढवा इथेच.(दूरदर्शन!)

विसोबा खेचर 19/09/2007 - 23:21
जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर आम्हाला फक्त केशवसुमार माहीत होते! सुमार केतकर हे नांव आम्ही प्रथमच ऐकतो आहोत! :) विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. अपार्ट फ्रॉम मस्करी, वरील संपूर्ण लेखातील वरील वाक्याला आम्ही सर्वाधिक दाद देतो.. वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे. हम्म! पुढील वेळेस प्रमाण योग्य आहे ना, एवढे मात्र पाहा.. असो! सदर लेखाबद्दल, सहजसोपे चिमटे काढत अतिशय चांगल्या रितीने राजकीय सद्यस्थितीचे विवेचन केले आहे असे म्हणून आम्ही या लेखास आमची मनमोकळी दाद रुजू करतो... तात्या.

नंदन 20/09/2007 - 05:41
छान लिहिलं आहेस, योगेश. शैली उत्तम वठली आहे. पुन्हा पाठवणार असशील तर आणीबाणीचे समर्थन करायला विसरु नकोस :). अग्रलेख स्वीकारला जाण्याचे चान्सेस वाढतील. शिवाय जमलंच तर प्रशासकीय अनुमती आणि आणीबाणी, तसेच किचन कॅबिनेट आणि संपादक मंडळ यांच्यातील साम्य या विषयावर एखादा परिच्छेद टाकता आला, तर उत्तमच. [ह. घ्या.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सहज 20/09/2007 - 06:27
चांगलीच प्रेरणा घेऊन लिहीले आहेस. मला आवड्लेले शब्द म्हणजे "असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या " सॉलीड!! ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-)

In reply to by सहज

विकास 20/09/2007 - 08:36
>>>ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-) आवडले! अहो पण आम्ही फकस्त म.टा. मधेच लिहीले आहे. तुम्हाला काय वाटते "सुमार जी" आमचे विचार छापतील की काय? ;) आमचे विचार छापून त्यांना थोडेच राज्यसभेचे सभासद मिळेल ...?

सन्जोप राव 20/09/2007 - 07:15
आजानुकर्णाने आमच्याकडून कधी गंडा बांधून घेतला की नाही ते आठवत नाही, पण खाजगीत तो आमचा उल्लेख 'सन्जोप सर' असा करतो असे ऐकून आहे. त्या न्यायाने आमच्या या शिष्योत्तमाने हा जबरदस्त लेख लिहून आम्हाला गुरुदक्षिणा पोचवली आहे असे गेल्या महिन्यांत झालेल्या गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाला स्मरुन म्हणावेसे वाटते. जबरदस्त लेखन! (दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो) सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 20/09/2007 - 08:53
(दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो) हम्म्म! याला म्हणतात 'बेरजेचं राजकारण'!! चालू द्या...:) आपला, (नवा पक्ष काढणारा) राष्ट्रवादी तात्या पवार!

कर्णा--- "मिसळ आणि भेसळ" हा अग्रलेख आवडला.सुमार केतकरांचा ष्टाईल आवडली. आणि किती शुद्ध लिहितोस यामुळे आमच्या अशुद्धलेखन संप्रदायाच्या वारक-यांवर परिणाम होण्याची शक्यता वाटते :) अग्रलेख लोकसत्ताकडे पुन्हा पाठवावा आणि हे संकेतस्थळ 'तात्या अभ्यंकराने' काढलेले नाही अशी तळटीप दे. लेख नाही छापून आला तर नावाचा 'प्रा.डॉ.... नाही . :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 20/09/2007 - 08:39
'सुमार केतकरां'च्या लोकसत्तेचे माहित नाही.. पण 'कुमार अभ्यंकरां'च्या लोकशाही सत्तेत मात्र हा अग्रलेख आला़की छापून!

वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे. ते भोवल्यामुळेच आम्हा वाचकांचे फावले प्रकाश घाटपांडे

विसुनाना 20/09/2007 - 10:59
विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. ही वाक्ये (केक्युलेच्या बेन्झिन रिंगसारखी ) आमच्या दिवास्वप्नातल्या (मिसळीच्या) कटात आम्हाला तरंगताना दिसली होती. पण आम्ही ती इथल्या मिसळीत टाकण्याआधीच मेहरबान अजानुकर्ण साहेबांनी जशीच्या तशी पकडून त्यांच्या फरसाणावर ओतली आहेत. ती वाक्ये आमचीच असल्याने ती अत्युत्कृष्ट आहेतच. शिवाय त्यांच्याखालची अजानुकर्णाची मिसळही चवीला बरी आहे. :):):) :) - हा पंचवीस वर्षांचा झाला म्हणे!

टीकाकार-१ 20/09/2007 - 11:04
"माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. " का?..

प्रमोद देव 20/09/2007 - 12:18
योगेशचा हा अग्रलेख वाचून खूपच आनंद झाला. महाजालावरील ’अग्रलेखांचा बादशाह ’ असे आजपासून त्याचे नवीन नामकरण मी करत आहे.तेव्हा समस्तांनी ’ साधू! साधू(अरूण नाही हो) म्हणावे ही अपेक्षा!

ॐकार 20/09/2007 - 17:54
लेख मस्तच आहे. काही वेळ लोकसत्ताच वाचत आहे असे वाटले! केतकरांची उचलबांगडी होणार असे दिसते ;) मार्मिक लिखाण आवडले. दिवाळी अंकाकरता पाठवून पहा. :)

लिखाळ 20/09/2007 - 18:28
सुंदर लेख. मजा आली. (केतकरांचे लेखन फारसे वाचले नसल्याने बाकी टिप्पणी करु शकत नाही :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आम्ही केतकरांची कुंडली मांडली. त्यांची भाषणे ऐकली. एकदा पत्रकारभवनात मार्क्सवादावर त्यांचे भाषण ऐकले आणि तात्काळ भाकीत आमच्या पत्रकार मित्रांना ऐकवले.' ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे.( आमचे भाकित बरोबरच असते, लवकर म्हणजे कधी ते आम्ही कधीच सांगत नाही आणि आम्हालाही कुणि विचारत नाही) ज्योतिषाचारी प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

@ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे. ते नाही गेले पण त्यांचा बगलबच्चा आणि मटा नव्हे सोटा चा (सोन्याआई टाईम्स चा) आजी संपादक रडत राऊत मात्र नक्की राज्यसभेवर जाणार बुवा... > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

नीलकांत 20/09/2007 - 20:19
अजानुकर्णा, आमच्या आवडत्या सुमार केतकरांची जशीच्या तशी इस्टाईल घेतलीस बघ. हा ते आणिबाणीचं आणि संजय गांधीच राहीलं बघ. ;) लेख खुप आवडला. नीलकांत

धर्म ही खरच अफुची गोळी आहे. ह्याबाबत सहम्त ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.) संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले. या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते.

विकास आराखडा

प्रकाश घाटपांडे ·

गुंडोपंत 16/09/2007 - 14:44
प्रकाशराव, अभिनंदन! किती अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे आपण. आवडला आपला गुंडोपंत

टंकन करायचा कंटाळा येतो. लोकसत्तेच्या विदागारात १४ फेब्रुवारी२००५ चा विदा नाही. फ्लिकर ची लिंक सर्वांना दिसेलच असे नाही. फ्लिकरला ब्लॉक केले असेल तर ही लेख दिसणार नाही. काही प्रतिक्रिया वा मते हे लेख वाचल्याचे द्योतक समजले जाते. टंकनाव्यतिरिक्त चांगले लेख आपल्या मित्रमंडळींना दाखवायचे असतील तर इतर ही मार्ग सुचवावेत. प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर 16/09/2007 - 14:57
घाटपांडेशेठ, आपल्यातील सामाजिक जाणीवेला सलाम! विकास आराखड्याचा एक तर आखाडा तरी होतो किंवा बट्ट्याबोळ तरी होतो! तात्या.

लेख आवडला, आपल्या ठिकाणी असलेल्या समाज विकासाची भावना आणि त्यासाठीचे शासनाने कोणते प्रयत्न करावे याबाबतचे विचार आवडले. अवांतर ;) पोलीस इतका उमदा विचार करणाराही असतो,यावर विश्वासच बसत नाही हो ! (ह.घ्या)

चित्रा 17/09/2007 - 05:01
घाटपांडेसाहेब, तुमचा लेख खरोखरच विचार करायला लावणारा आहे - माझ्या मागच्या लेखावेळी घाईत वाचला होता, आत्ता नीट वाचला. त्यावर आत्ता दोन प्रश्न विचारावेसे वाटतायत. एक म्हणजे, लोकांनी विकास आराखड्याबाबतीत शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे याची तुमची काय कल्पना आहे? दुसरे म्हणजे अल्पसंख्यांक / बहुसंख्य नक्की कोण हे मला नीट कळाले नाही. तरीपण तुमच्या लेखावरून मी असा अंदाज बांधला (चुकीचाही असू शकतो) की अल्पसंख्यांक म्हणजे समजा झोपडपट्टीवाले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले उच्चभ्रू. तर बहुसंख्य म्हणजे इतर अनेक जण जे अशा ठिकाणी कामासाठी येतात जातात आणि वाहतुकीत त्यांना अशामुळे त्रास होतो. आता आपल्याकडे एकमेकांचे पाय एवढे एकमेकांत अडकलेले आहेत की पुढे जायला सगळेच एकमेकांवर अवलंबून आणि दुसरीकडे प्रत्येकजण यातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायलाही धडपडणार. तेव्हा हे मुटकुळे सोडवायचे असले तर एकतर प्रत्येक ठिकाणी वेगळा उपाय करणे आवश्यक आहे. अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते. अजून बरेच लिहीता येईल, पण आत्ता विचार (भुकेमुळे) भरकटत आहेत (मिसळपाव समोर असतानाही खाता येत नाही आहे:-;) तेव्हा नंतर लिहीन. चित्रा

व्याकरणाचा आधार घेउन बोलायचे झाले तर हा बहुव्रीही समास ' ज्यांची संख्या अल्प आहे असे ते....." पुढील चित्र कल्पनाशक्तीवर सोडायचे. मी एकाला विचारले "काय रे ,अल्पसंख्यांक म्हणजे कोण? " तो म्हणला कि 'मुस्लिम' . ( वर्तमान पत्रातील अल्पसंख्यांक, प्रार्थनास्थळ इ. शब्दांवरुन त्याचा तसा समज झाला होता. हे चर्चेतून मला समजले.) दुसर्‍या मराठमोळ्या मुस्लिम मित्राला तोच प्रश्न विचारला. तो म्हणला 'ब्राह्मण'. कसं काय? "कारण ते साडेतीन टक्के आहेत, आम्ही तरी सतरा आठरा टक्के आहोत." कै. सत्यरंजन साठे आय एलएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व पुण्यातील विचारवंत, एका भाषणात हिंदुत्ववाद्यांच्या आक्षेपाचे खंडन करत होते. कुटुंबनियोजन इस्लामला मंजुर नसल्याने मुस्लिम बहुल होतील या भीतीचे निराकरण करताना म्हणाले," अशी भिती बाळगण्याचे कारण नाही. कारण आजही भारतात हिंदु ८० टक्के आहेत व मुस्लिम १८ टक्के. बहुसंख्यांनी अल्पसंख्यांचे भय बाळगण्याचे काय कारण?" मी व्याख्यान झालेवर त्यांना भेटलो . त्यांना म्हटले," मी आपल्याशी अंशत: असहमत आहे. समाजात समाजकंटक म्हणता येतील असे फार फार तर २% लोक असतील, पण त्यांचे उपद्रव मुल्य हे उरलेल्या ९८% लोकांना वेठीस धरण्याएवढे असते, म्हणुनच पोलिस खात्याची निर्मिती झाली. एखादा माणुस राष्ट्र सुद्धा वेठीस धरु शकतो. त्यामुळे संख्याबळाचा मुद्दा इथे गैरलागु आहे असे मला वाटते." त्यांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले "खरं आहे". अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते>> यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 18/09/2007 - 02:16
यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!).

In reply to by चित्रा

हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. नाही ते फक्त मुखपृष्ठ आहे . केवळ दृष्टोत्पत्तीस पडावे म्हणून, सुधारक नावाचे मासिक प्रकाशित होते हे बहुसंख्य लोकांना माहीती नसणार याची खात्री वाटते म्हणून. चित्रलेख टाकतो आहे. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. यातील अल्पसंख्यांच्या बाबतीत मी लिहिले आहे , राहिला मुद्दा शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे? हा खरच अवघड प्रश्न आहे. याच्या उत्तराला चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? नाही. तीन वर्षात फरक पडाव अशी इथली सामाजिक परिस्थिती नाही असे मला वाटते. आगरकरांचे विचार जर पाहिले तर २००७ मध्ये देखील काळाच्या पुढेच वाटावेत अशी इथली सामाजिक परिस्थिती आहे. (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!). वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 18/09/2007 - 18:30
आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. माहितीबद्दल आभार! ऍकॅडमिस्ट वगैरे नका म्हणू हो. त्यांचा पत्ता हाच ना? आजचा सुधारक : मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर- ४०००१०. वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! :-) तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण ८०-९० च्या दशकात एकाहून एक खोचक आणि भोचक पत्रकार दूरदर्शनच्या एकुलत्या एक वाहिनीवर मुलाखती घ्यायचे, त्यांचा खवटपणा आम्ही मुले त्यांच्याहून जास्त भोचकपणे बघत बसायचो ते आठवले.

टिकाकार 17/09/2007 - 16:29
आता जुने स्कन केलेले लेख नेट वर वाचायला मिळणार वाटत, नविन वेबसाईट च्या नावाखाली. आयडिआ चन्गलि आहे. टिकाकार

सहज 18/09/2007 - 07:50
विकास आराखडा यावर प्रत्येक व्यक्तिचे काही ना काही मत आहे. मग सद्यपरीस्थीती काय आहे? मला वाटते जो तो आपले "आर्थीक, राजकीय वजन/ वरपर्यंतचे संबध" वापरुन ज्या त्या सरकारी खात्याकडून आपला विकास आराखडा मंजूर करुन प्रगती करत आहे. व यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? कधि बदलणार हे? मला वाटते की वरून म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद ह्या पातळीवरून कधीतरी म्हणजे जेव्हा सर्व राजकारण्यांना रस्त्याने कूठे जाणे अत्यंत जिकीरिचे होइल, सर्व मोक्याच्या ठिकाणी बांधकाम पुर्ण होइल व परत एकदा त्या जागा बळकवायची वेळ येइल, तेव्हा आता जरा काही तरी केले पाहीजे ह्या गरजेतून काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील का? कधीतरी हे अती होउन, वरून आदेश निघेल की अमुक तमूक निकष ह्या पूढे लागू सरसकट भारतभर किंवा काही ठरावीक शहरांसाठी..... जे जे होतय ते बघत रहायचे, आपल्याला जे हवे ते जमेत तसे करत रहायचे. बघा अब्जावधी मेंढरे हाकायची म्हणजे.....जाऊ दे वेगळे कूरण शोधलेले बरे. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल.

यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? वा ! सामाजिक भाकित म्हणतात ते हेच. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल. सर्वसमावेशक विकास ही कल्पना 'चांगली 'असली तरी 'भाबडी' आहे. मध्यममार्ग व्यवहार्य. जागतिकीकरणातुन होणारी सोय ही 'इंडिया' सोबत 'भारता'ची पण झाली तर विकास होईल. अन्यथा विकासाची बेट तयार होतील. प्रकाश घाटपांडे

नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
सोकाजीरावांनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणुन आम्हाला हा धागा वरती आणावासा वाटला. राज ठाकरेंनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा पुण्यातील वसंतव्याखानमालेत २००७ मध्ये मांडला होता. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वि_जय 23/11/2009 - 11:50
अभ्यासपुर्ण लेख. पक्षभेद, मतभेद विसरुन अशा चर्चाही मिपावर रंगायला हव्यात. तात्या काय वाटत तुम्हाला?

सूहास 23/11/2009 - 18:37
धावता आढावा आवडला ... जरा अभ्यास केल्यावर टंकतोच !! सू हा स...

गुंडोपंत 16/09/2007 - 14:44
प्रकाशराव, अभिनंदन! किती अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे आपण. आवडला आपला गुंडोपंत

टंकन करायचा कंटाळा येतो. लोकसत्तेच्या विदागारात १४ फेब्रुवारी२००५ चा विदा नाही. फ्लिकर ची लिंक सर्वांना दिसेलच असे नाही. फ्लिकरला ब्लॉक केले असेल तर ही लेख दिसणार नाही. काही प्रतिक्रिया वा मते हे लेख वाचल्याचे द्योतक समजले जाते. टंकनाव्यतिरिक्त चांगले लेख आपल्या मित्रमंडळींना दाखवायचे असतील तर इतर ही मार्ग सुचवावेत. प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर 16/09/2007 - 14:57
घाटपांडेशेठ, आपल्यातील सामाजिक जाणीवेला सलाम! विकास आराखड्याचा एक तर आखाडा तरी होतो किंवा बट्ट्याबोळ तरी होतो! तात्या.

लेख आवडला, आपल्या ठिकाणी असलेल्या समाज विकासाची भावना आणि त्यासाठीचे शासनाने कोणते प्रयत्न करावे याबाबतचे विचार आवडले. अवांतर ;) पोलीस इतका उमदा विचार करणाराही असतो,यावर विश्वासच बसत नाही हो ! (ह.घ्या)

चित्रा 17/09/2007 - 05:01
घाटपांडेसाहेब, तुमचा लेख खरोखरच विचार करायला लावणारा आहे - माझ्या मागच्या लेखावेळी घाईत वाचला होता, आत्ता नीट वाचला. त्यावर आत्ता दोन प्रश्न विचारावेसे वाटतायत. एक म्हणजे, लोकांनी विकास आराखड्याबाबतीत शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे याची तुमची काय कल्पना आहे? दुसरे म्हणजे अल्पसंख्यांक / बहुसंख्य नक्की कोण हे मला नीट कळाले नाही. तरीपण तुमच्या लेखावरून मी असा अंदाज बांधला (चुकीचाही असू शकतो) की अल्पसंख्यांक म्हणजे समजा झोपडपट्टीवाले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले उच्चभ्रू. तर बहुसंख्य म्हणजे इतर अनेक जण जे अशा ठिकाणी कामासाठी येतात जातात आणि वाहतुकीत त्यांना अशामुळे त्रास होतो. आता आपल्याकडे एकमेकांचे पाय एवढे एकमेकांत अडकलेले आहेत की पुढे जायला सगळेच एकमेकांवर अवलंबून आणि दुसरीकडे प्रत्येकजण यातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायलाही धडपडणार. तेव्हा हे मुटकुळे सोडवायचे असले तर एकतर प्रत्येक ठिकाणी वेगळा उपाय करणे आवश्यक आहे. अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते. अजून बरेच लिहीता येईल, पण आत्ता विचार (भुकेमुळे) भरकटत आहेत (मिसळपाव समोर असतानाही खाता येत नाही आहे:-;) तेव्हा नंतर लिहीन. चित्रा

व्याकरणाचा आधार घेउन बोलायचे झाले तर हा बहुव्रीही समास ' ज्यांची संख्या अल्प आहे असे ते....." पुढील चित्र कल्पनाशक्तीवर सोडायचे. मी एकाला विचारले "काय रे ,अल्पसंख्यांक म्हणजे कोण? " तो म्हणला कि 'मुस्लिम' . ( वर्तमान पत्रातील अल्पसंख्यांक, प्रार्थनास्थळ इ. शब्दांवरुन त्याचा तसा समज झाला होता. हे चर्चेतून मला समजले.) दुसर्‍या मराठमोळ्या मुस्लिम मित्राला तोच प्रश्न विचारला. तो म्हणला 'ब्राह्मण'. कसं काय? "कारण ते साडेतीन टक्के आहेत, आम्ही तरी सतरा आठरा टक्के आहोत." कै. सत्यरंजन साठे आय एलएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व पुण्यातील विचारवंत, एका भाषणात हिंदुत्ववाद्यांच्या आक्षेपाचे खंडन करत होते. कुटुंबनियोजन इस्लामला मंजुर नसल्याने मुस्लिम बहुल होतील या भीतीचे निराकरण करताना म्हणाले," अशी भिती बाळगण्याचे कारण नाही. कारण आजही भारतात हिंदु ८० टक्के आहेत व मुस्लिम १८ टक्के. बहुसंख्यांनी अल्पसंख्यांचे भय बाळगण्याचे काय कारण?" मी व्याख्यान झालेवर त्यांना भेटलो . त्यांना म्हटले," मी आपल्याशी अंशत: असहमत आहे. समाजात समाजकंटक म्हणता येतील असे फार फार तर २% लोक असतील, पण त्यांचे उपद्रव मुल्य हे उरलेल्या ९८% लोकांना वेठीस धरण्याएवढे असते, म्हणुनच पोलिस खात्याची निर्मिती झाली. एखादा माणुस राष्ट्र सुद्धा वेठीस धरु शकतो. त्यामुळे संख्याबळाचा मुद्दा इथे गैरलागु आहे असे मला वाटते." त्यांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले "खरं आहे". अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते>> यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 18/09/2007 - 02:16
यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!).

In reply to by चित्रा

हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. नाही ते फक्त मुखपृष्ठ आहे . केवळ दृष्टोत्पत्तीस पडावे म्हणून, सुधारक नावाचे मासिक प्रकाशित होते हे बहुसंख्य लोकांना माहीती नसणार याची खात्री वाटते म्हणून. चित्रलेख टाकतो आहे. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. यातील अल्पसंख्यांच्या बाबतीत मी लिहिले आहे , राहिला मुद्दा शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे? हा खरच अवघड प्रश्न आहे. याच्या उत्तराला चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? नाही. तीन वर्षात फरक पडाव अशी इथली सामाजिक परिस्थिती नाही असे मला वाटते. आगरकरांचे विचार जर पाहिले तर २००७ मध्ये देखील काळाच्या पुढेच वाटावेत अशी इथली सामाजिक परिस्थिती आहे. (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!). वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा 18/09/2007 - 18:30
आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. माहितीबद्दल आभार! ऍकॅडमिस्ट वगैरे नका म्हणू हो. त्यांचा पत्ता हाच ना? आजचा सुधारक : मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर- ४०००१०. वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! :-) तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण ८०-९० च्या दशकात एकाहून एक खोचक आणि भोचक पत्रकार दूरदर्शनच्या एकुलत्या एक वाहिनीवर मुलाखती घ्यायचे, त्यांचा खवटपणा आम्ही मुले त्यांच्याहून जास्त भोचकपणे बघत बसायचो ते आठवले.

टिकाकार 17/09/2007 - 16:29
आता जुने स्कन केलेले लेख नेट वर वाचायला मिळणार वाटत, नविन वेबसाईट च्या नावाखाली. आयडिआ चन्गलि आहे. टिकाकार

सहज 18/09/2007 - 07:50
विकास आराखडा यावर प्रत्येक व्यक्तिचे काही ना काही मत आहे. मग सद्यपरीस्थीती काय आहे? मला वाटते जो तो आपले "आर्थीक, राजकीय वजन/ वरपर्यंतचे संबध" वापरुन ज्या त्या सरकारी खात्याकडून आपला विकास आराखडा मंजूर करुन प्रगती करत आहे. व यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? कधि बदलणार हे? मला वाटते की वरून म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद ह्या पातळीवरून कधीतरी म्हणजे जेव्हा सर्व राजकारण्यांना रस्त्याने कूठे जाणे अत्यंत जिकीरिचे होइल, सर्व मोक्याच्या ठिकाणी बांधकाम पुर्ण होइल व परत एकदा त्या जागा बळकवायची वेळ येइल, तेव्हा आता जरा काही तरी केले पाहीजे ह्या गरजेतून काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील का? कधीतरी हे अती होउन, वरून आदेश निघेल की अमुक तमूक निकष ह्या पूढे लागू सरसकट भारतभर किंवा काही ठरावीक शहरांसाठी..... जे जे होतय ते बघत रहायचे, आपल्याला जे हवे ते जमेत तसे करत रहायचे. बघा अब्जावधी मेंढरे हाकायची म्हणजे.....जाऊ दे वेगळे कूरण शोधलेले बरे. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल.

यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? वा ! सामाजिक भाकित म्हणतात ते हेच. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल. सर्वसमावेशक विकास ही कल्पना 'चांगली 'असली तरी 'भाबडी' आहे. मध्यममार्ग व्यवहार्य. जागतिकीकरणातुन होणारी सोय ही 'इंडिया' सोबत 'भारता'ची पण झाली तर विकास होईल. अन्यथा विकासाची बेट तयार होतील. प्रकाश घाटपांडे

नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
सोकाजीरावांनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणुन आम्हाला हा धागा वरती आणावासा वाटला. राज ठाकरेंनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा पुण्यातील वसंतव्याखानमालेत २००७ मध्ये मांडला होता. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वि_जय 23/11/2009 - 11:50
अभ्यासपुर्ण लेख. पक्षभेद, मतभेद विसरुन अशा चर्चाही मिपावर रंगायला हव्यात. तात्या काय वाटत तुम्हाला?

सूहास 23/11/2009 - 18:37
धावता आढावा आवडला ... जरा अभ्यास केल्यावर टंकतोच !! सू हा स...
लेखनविषय:
लेखनप्रकार
विकास आराखडा की आखाडा
कुठलाही आराखडा म्हटला की त्याला नियोजन लागते. नियोजनासाठी काहीतरी प्रयोजन लागते. पुण्याचा विकास आराखडा १९८७ पासून कागदावर आहे. लोकशाही मूल्यांच्या चौकटीत राहून शहराचा विकास करायाचा हे खूप कठीण काम आहे. खरं तर तो कठीण वसा आहे. बरं विकास तरी कशाला म्हणायचं? विकासाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळया आहेत. समजा संकल्पनाविषयी एकमत झाले तरी प्राधान्यक्रम वेगळे आहेत. शहरासमोर आज अनेक प्रश्न आहेत.