एकच अमोघ उपाय: मराठी एकजूट

लेखनविषय:
लेखनप्रकार
दोस्तहो, सध्या लोकसत्तेच्या ’लोकमुद्रा’ पुरवणीत सलील कुलकर्णी यांची मराठी भाषेविषयक लेखमालिका सुरू आहे. त्या मालिकेतल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखातील काही अंश इथे प्रकाशित करतो, आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करतो. ."...संपूर्ण जगात भाषकसंख्येनुसार मराठी ही पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे आणि भारतात हिंदी, बंगाली व तेलुगू भाषांच्या नंतर चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. महाराष्ट्रात सुमारे दहा कोटी मराठी भाषिक आहेत.

......आणि मग

लेखनविषय:
......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी. तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री. जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास. येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी ..... लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल. दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल . चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील.

मेमांडू--एक अनुभव.

लेखनविषय:
लेखनप्रकार
येथे मलेशियात 'मेमांडू' म्हणजे ड्रायव्हिंग,मोटारचालकत्व.भारतात असताना आपण गाडी चालवावी,त्याचा निदान परवाना तरी आपल्याकडे असावा असे मला मनापासून कधीच वाटले नव्हते.उलट नवर्‍याने गाडी चालवावी आणि आपण शेजारच्या सीटवर बसून खुशाल त्याच्या ड्रायव्हिंगवर ताशेरे ओढावेत्,जमल्यास एखादी डुलकी काढावी एवढाच काय तो प्रवासात माझा सहभाग असे.पण इथे मलेशियात आल्यावर मात्र माझी पंचाईतच झाली.पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्रास नसल्यामुळे सारखेच गाडीसाठी दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागे आणि दुसरे म्हणजे माझ्याहून वयाने लहान स्त्रिया मोठ्मोठ्या गाड्या सहजपणे चालवितात हे पाहून मला एक प्रकारचा न्यूनगंड येऊ लागला.आता आपणही कांहीत

कल्पवृक्ष कन्येसाठी ....

लेखनविषय:
लेखनप्रकार
नोव्हेंबर डिसेंबर महिने जवळ आले की दत्तजयंतीचे वेध लागत, घरात बाबांचे गुरुचरित्राचे पारायण सुरु होत असे. घरात छान भक्तिमय वातावरण असे. तसेही ते वर्षाचे ३६५ दिवस असे कारण स्वामींचा जप करणे, जप लिहिणे, लघुरुद्र, सत्यनारायण, मेहुण, सवाष्ण काही ना काही घरात सुरुच असे. बाबा खुप भाविक होते. त्यांनी गुरुचरित्र सुध्दा हाताने लिहुन काढले होते. त्यांना गाण्याची सुद्धा आवड होती. ते उत्तम पेटी वाजवत असत. त्यामुळे अधेमधे घरी गाण्याचे कार्यक्रम होत असत. लहानपणापासुन संगीत कानावरुन गेल्यामुळे का कोण जाणे पण मी गाणे शिकले नसले तरी कोण बरोबर की चुकीचे गातेय हे नक्किच कळते.

बहिणाबाई- एक महान कवियत्री

लेखनविषय:
लेखनप्रकार
बहिणाबाई- एक महान कवियत्री मन वढाय वढाय....असं म्हणत मानवी मनाचा गुंता जिने आपल्या कवितेत रेखाटला,कशाला काय म्हणू नये हे जिने जाणलं , संसाराची व्याख्या जिला पुर्णपणे कळली ,माणूस.माणूस कधी होईल याचा जिला ध्यास लागला ,वाट्च्या वाटसरुलाही जिने मार्ग दाखविला अशी महान कवियत्री बहिणाबाई’,,,, जांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द काव्य होऊन बाहेर पडायचा.बहिणाबाईंना जाऊन ५७ वर्ष पूर्ण झाली परंतु त्यांच्या कविता आजच्या काळातही चपलख लागु होतात. घरापासून मळ्यापर्यंत हा बहिणाबाईंचा रोजचा प्रवास होता, कागद पेन दूरच पण अक्षरांची साधी ओळखही जांना नव्हती त्यांची गाणी.कविता ओव्या आजच्या काळाही मार्गदर्श

सेहवागचं काय करायच?

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सका़ळी मॉर्गनचा हा लेख वाचून आठवलं की आपण मागे एकदा सेहवागबद्दल एक लेख लिहिला होता पण तो मिपावर दिलाच नाहीये ! मी लिहिलेला लेख जुना आहे आणि तपशील त्यावेळच्या सामन्याबद्दल आहेत पण सेहवागचं 'तोडणं' हे स्थळ/काळाच्या पल्याड पोचलंय :) कालच क्रिकइन्फोवरही सेहवागबद्दल एक छान लेख वाचला.
Subscribe to लेख