Skip to main content

लेख

जोशीबाई

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 11/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात वरच्या मजल्यावरच्या कोपर्‍यातल्या आठवीच्या वर्गात आम्ही वाट पाहत होतो, आता कोण येणार तासाला? जोशीबाई जिना चढताना दिसल्यावरच एकच गलका सुरु झाला, " बाई.. गोष्ट, बाई गोष्ट.." " अरे, अरे मला वर्गात तरी येऊ द्याल की नाही?" "परवाच्या ऑफ तासाला अर्धवट राहिलेली कार्व्हरची गोष्ट आधी पूर्ण करा, मग अभ्यास..." बाई हसतच बरं म्हणाल्या आणि धडा शिकवायचे बाजूला ठेवून कार्व्हरचा अनोखा जीवन झगडा विलक्षण प्रभावीपणे सांगू लागल्या ... साधारण सव्वापाच फुटाच्या आसपास उंची, शेलाटा बांधा आणि शांत,सात्विक चेहरा! बाईंना आवाज चढवून बोलताना कधी पाहिले नव्हते, तशी त्यांना गरजही लागत नसावी.

एक दिवस भटकंतीचा: स्मरणरंजन

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 06/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मी, मनोज आणि त्याची पत्नी मधु अश्या तिघांनी भटकायला जायचे ठरवले (अर्थातच बाकीच्या मित्रांना वेळ नव्ह्ता). ताम्हिणी घाटात जायचा बेत ठरला.३ ऑक्टोबर ०९ ला आम्ही तिघांनीही सकाळी १०.३० वाजता पुणे सोडले तेही अर्थातच मनोजच्या स्विफ्ट गाडीने. आकाश अंशत: ढगाळ होते. पिरंगुट, पौड मागे टाकून आम्ही दीड तासात मुळशी ला पोहोचलो.सर्व परिसर तेरड्याच्या जांभळ्या आणि सोनकीच्या पिवळ्या सोनेरी फुलांनी भरून गेला होता. पळसे, वारक, ताम्हिणी, दावडी, निवे अशी गावे पार करत आम्ही ताम्हिणी घाटाच्या तोंडावर जाऊन पोहोचलो.

नागाव, कोरलई: एक भटकंती

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 05/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.

हा माझा मिसळपाव वरचा पहिलाच लेख तरी जुन्याजाणत्या मिपाकरांनी संभाळून घ्यावे. नुकताच २३/२४ ला नागाव, कोरलई ला जायचा योग आला. २३ ल पहाटे ५ वाजता पिंपरी वरुन निघालो ते ८.१५ ला नागाव ल पोहोचलो. कर्पेवाडी येथे अगोदरच बुकिंग करुन ठेवले होते. ९.३० ला न्याहारी करुन चौल, रेवदंडा मार्गे कोरलई किल्ल्यावर गेलो.

हक्क

लेखक नीलांबरी यांनी मंगळवार, 02/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.

रांगोळी

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीचा दिवस. माझं देवघर अगदी छान सजलेलं. देवासमोर बसून नवरा साग्रसंगीत पूजा करतोय. त्याच्या मागे छोट्याछोट्या आसनांवर मुलं बसली आहेत...किंवा शांत बसून रहायचा प्रयत्न करताहेत. मुलीचं लक्ष तिच्या चमचमत्या घागर्‍याकडे अन हातातल्या हैद्राबादी बांगड्यांकडे आहे तर मुलगा त्याच्या चुडीदार कुर्त्यावरची... म्हणजे त्याच्या भाषेत 'शाहरूख खान ड्रेसवरची' नक्षी निरखून बघतोय. नाकातली नथ नि अंगावरची पैठणी सावरत माझीही लगबग सुरू आहे. पूजा आटोपली तशी नवर्‍यानं प्रसादाचं ताट आणायची खूण केली.

माझं गाडीपुराण

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षांपूर्वी, नवर्‍याचं अमेरिकेला 'सह' यायचं नक्की झालं नि तर्‍हेतर्‍हेच्या शेर्‍यांना, सल्ल्यांना जणू ऊत आला. 'नशीब काढलं हो पोरीनं...' ( म्हणजे? भारतात संसार करणारे सगळे फुटक्या नशिबाचे की काय?) 'आता काय, मज्जाच मज्जा तुमची...तिथे सारी कामं रोबोट करतात म्हणे.( हा रोबोट म्हणजे मीच हे इथे आल्यावरच कळलं.) 'पोरीचा पायगुण चांगलाय हो. घरात आल्याआल्या नवर्‍याचं नशीब उघडलं.' (इति मायकेवाले) 'अहो, पायगुण वगैरे काही नसतो हं बायकोचा. उलट त्याच्या नशिबानं हिला सुख मिळतंय.' (हे वाक्य कोणाचं हे सांगायलाच हवं का?) 'हं... तशीही तिला नटायमुरडायची आवड... आता काय..

मी भटकंती का करतो?

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी बुधवार, 13/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!! हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-) ] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून.

श्रवण कौशल्य

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा आपल्या जीवनातला घडलेला प्रसंग घ्या. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगते व आपण ते काम जसे सांगितले अगदी त्याबरहुकूम करतोच असे नाही. असेच आपण एखाद्याला सांगितलेल्या कामाच्याबाबतीतही घडते. विद्यार्थीदशेत असल्याप्रसंगी शिक्षकाने शिकविलेले आपल्या जसेच्या तसेच लक्षात राहत नसण्याची शक्यता फारच असण्याची शक्यता असते. आपण टिव्ही, रेडिओ, चित्रपटात अनेक संवाद ऐकतो. हे संवाद आपल्याला जसेच्या तसेच लक्षात काही राहत नाहीत. अर्थात, ते लक्षात ठेवणे एवढे गरजेचेही नसते म्हणा. तरीही, एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी, वाक्यन वाक्य लक्षात ठेवू शकत नाही.

नववर्ष

लेखक सुबक ठेंगणी यांनी गुरुवार, 07/01/2010 या दिवशी प्रकाशित केले.
धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात.