पूर्व दिशेला अरूण पथावर..

लेखनविषय:
आज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण पथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच.

'सामना'चे आभार...

लेखनविषय:
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.. (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?

लेखनविषय:
लेखनप्रकार
अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या? हा PDF format मिपाचे एक सभासद श्री. अक्षय पुर्णपात्रे यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून पुनर्टंकित केला याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार. हा लेख मी सहा महिन्यापूर्वी लिहिला होता उत्तम कथा या मासिकाच्या निबंधस्पर्धेसाठी. पण मला १००० शब्दांच्या शब्दसंख्येबद्दलची मर्यादा सांगायला तिथले कर्मचसरी विसरले. माझा लेख ३००० शब्दांचा झाला पण संपादिकाबाईंना तो आवडला व तो त्यांनी थोडासा संक्षिप्त करून प्रसिद्धही केला.

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

लेखनविषय:
लेखनप्रकार
`वादळ' आणि `वादळग्रस्त'... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले.

उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.
Subscribe to लेख