"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!!
हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-) ] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून. बऱ्याच उत्तरांमध्ये खाज, माज, मस्ती, रग आणि तत्सम शब्दही ऐकू आले :-) आणि ते नाही आले तरच नवल... कारण त्याशिवाय काही माणूस पहाटे साडेतीनला उठून गाडी दामटवत सह्याद्रीच्या ऊन-वाऱ्यात झोकून द्यायचा नाही.
मला आठवतंय जेव्हा मी पहिला ट्रेक (?) केला... चौथीतच होतो. शेंबूड पुसायची पण अक्कल नव्हती. शेजारच्या काही मंडळींबरोबर मी आणि पप्पा डबे घेउन सिंहगडावर निघालो होतो. त्या वेळी सिंहगड म्हणजे "अबब... किती दूर आहे" अशी अवस्था होती. स्कूटरमधे (Bajaj Cub - 1987 model) कँपात सिल्व्हर ज्युबिलीच्या पंपावर पेट्रोल टाकले आणि आम्ही स्वारगेटवरुन व्हाया सिंहगड रोड खानापूरला पोचलो. तिकडे पप्पांनी सांगून टाकले की मी गाडीवर वरती येणार आणि तुम्हांला चालत यायचे तर या. आजच्या एवढीच खाज होती त्यावेळी ना... मग आम्ही चालत वर गेलो होतो. येही सरळ रस्त्याने न जाता शॉर्टकट मारत मारत. वरती पोचता पोचता पप्पा रुमाल हलवून आम्हांला प्रोत्साहन देत होते. आजही मला वाटचाल करताना ते आज नसले तरी त्यांचीच मूर्ती समोर दिसते, प्रोत्साहन देणारी. हा माझा पहिला धडा. त्यानंतर चौथीला प्रतापगड पाहिला. सहावीला असताना शाळेत असताना बाईंनी विचारले होते सहलीला कुठे जायचे तर माझे उत्तर सिंहगड होते. आणि माझ्या सांगण्यावरुन गेलोही तिकडे. सगळ्यात आधी मीच.. वर चढण्यात, सगळी ठिकाणे दाखवण्यात आणि खाली उतरण्यात पण (कारटं पहिल्यापासूनच आगाऊ आहे).
खरा ट्रेक केला तो लोहगड... सन-२००० च्या पावसाळ्यात. पहिलटकरणीसारखी अवस्था होती. ट्रेक म्हणजे नक्की काय करायचे असते ते माहीतही नव्हते. पण वरती पोचल्यावर जे काही अनुभवले ते अविस्मरणीय होते. आम्ही जात असतानाच लोहगडवाडीतून परत येणारा ग्रुप दिसला आणि त्यात एक अंध मुलगा...
लोहगडावर मुक्कामी ट्रेक करुन ते परत निघाले होते. तेव्हाच वाटले हे की बास इथून पुढे कधीच थकायचं नाय, दमायचं नाय. आजवर जे काही ट्रेक केलेत, किल्ले पाहिलेत त्यात प्रत्येक वेळी तो अनामिक मुलगा माझे स्फूर्तिस्थान राहिला. असाच अनुभव मला गेल्या वर्षी पुरंदर-वज्रगडाच्या ट्रेकमधे आला. पायाने अधू असणारा एक अनामिक ट्रेकर गड चढून वर आलेला मी पाहिला. या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो." आता सांगा हे असे शिक्षण कुठल्या विद्यापीठात आणि किती पैसे फेकून मिळेल?
लोहगडानंतर आपसूकच समोरच्या विसापूरने साद घातली आम्ही देखील त्याला ओ देत कित्येकदा त्याची माती भाळी लावली. त्यावेळी सह्याद्रीचा रांगडेपणा अनुभवला आणि तोच मनाला भावला. जो काही कस काढणे म्हणतात (मी नवीन असल्याकराणाने) तिथे दिसला. वाळलेले गवत, निसरडी माती आणि वरुन तापते ऊन अशा विरुद्ध परिस्थितीत मार्ग काढताना नकळत एक जीवनाचे भान येत गेले, एक तत्त्वज्ञान समजत गेले. ते मला एरव्ही कुणी पन्नास पुस्तके कोळून दिली असती तरी आले नसते.
शहरी गलबलाटात माझे मन कधीच रमले नाही आणि रमणारही नाही. पाच दिवस जगरहाटीत घालवले की एक दिवस तरी मला माझ्यासाठी हवा असतो. शहराच्या गल्ली-बोळांतून आणि हॉर्नच्या कोलाहलातूनच मला सह्याद्रीची आव्हानात्मक हाक ऐकू येते "गड्या कधी येतोस? आख्खे पाच सात दिवस झाले भेटून!" काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. मग तो पदाचा, प्रतिष्ठेचा, आपण करत असणाऱ्या कामाचा, मिळणाऱ्या ’पॅकेज’चा किंवा अन्या काही भौतिक गोष्टींचा असू शकतो. मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत. शिखरावर-बालेकिल्ल्यावर पोचल्यावर एकदा
भव्य सह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजा. जकुझी आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याला KFCची सर नाही.
या सह्याद्रीच्या कुशीतल्या जीवनात जे काही शिकलो ते क्वचितच मला इतरत्र कुठे शिकता आले असते. पहिला कांदा कापला तो नाणेघाटाच्या गुहेत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. नंतर पाणी न येता कापायचे तंत्र पण जमले. खिचडी करण्यात तर आपला हातखंडा आहे. ती पण मी अशाच कुठल्या तरी ट्रेकमध्ये शिकलो. आहे त्या सामानात भागवायचे (resource management), आपले काम आपणच करायचे (self sufficiency), इतरांना मदत करत करतच टीमवर्कचे धडे गिरवायचे. आपल्या बरोबरीने असणाऱ्या ट्रेकरचा उत्साह वाढवायचा (encouragement), कसेही करुन डेडलाईन पाळायच्या (timelines) हे आम्हांला कॉर्पोरेट जीवनात पण उपयोगी पडतेच की.
सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.
आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!
.
.
.
.
-Pankaj भटकंती Unlimited
http://www.pankajz.com/
लोहगडानंतर आपसूकच समोरच्या विसापूरने साद घातली आम्ही देखील त्याला ओ देत कित्येकदा त्याची माती भाळी लावली. त्यावेळी सह्याद्रीचा रांगडेपणा अनुभवला आणि तोच मनाला भावला. जो काही कस काढणे म्हणतात (मी नवीन असल्याकराणाने) तिथे दिसला. वाळलेले गवत, निसरडी माती आणि वरुन तापते ऊन अशा विरुद्ध परिस्थितीत मार्ग काढताना नकळत एक जीवनाचे भान येत गेले, एक तत्त्वज्ञान समजत गेले. ते मला एरव्ही कुणी पन्नास पुस्तके कोळून दिली असती तरी आले नसते.
शहरी गलबलाटात माझे मन कधीच रमले नाही आणि रमणारही नाही. पाच दिवस जगरहाटीत घालवले की एक दिवस तरी मला माझ्यासाठी हवा असतो. शहराच्या गल्ली-बोळांतून आणि हॉर्नच्या कोलाहलातूनच मला सह्याद्रीची आव्हानात्मक हाक ऐकू येते "गड्या कधी येतोस? आख्खे पाच सात दिवस झाले भेटून!" काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. मग तो पदाचा, प्रतिष्ठेचा, आपण करत असणाऱ्या कामाचा, मिळणाऱ्या ’पॅकेज’चा किंवा अन्या काही भौतिक गोष्टींचा असू शकतो. मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत. शिखरावर-बालेकिल्ल्यावर पोचल्यावर एकदा
भव्य सह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजा. जकुझी आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याला KFCची सर नाही.
या सह्याद्रीच्या कुशीतल्या जीवनात जे काही शिकलो ते क्वचितच मला इतरत्र कुठे शिकता आले असते. पहिला कांदा कापला तो नाणेघाटाच्या गुहेत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. नंतर पाणी न येता कापायचे तंत्र पण जमले. खिचडी करण्यात तर आपला हातखंडा आहे. ती पण मी अशाच कुठल्या तरी ट्रेकमध्ये शिकलो. आहे त्या सामानात भागवायचे (resource management), आपले काम आपणच करायचे (self sufficiency), इतरांना मदत करत करतच टीमवर्कचे धडे गिरवायचे. आपल्या बरोबरीने असणाऱ्या ट्रेकरचा उत्साह वाढवायचा (encouragement), कसेही करुन डेडलाईन पाळायच्या (timelines) हे आम्हांला कॉर्पोरेट जीवनात पण उपयोगी पडतेच की.
सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.
गोनीदा सांगतात ना...
हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"
आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!
.
.
.
.
-Pankaj भटकंती Unlimited
http://www.pankajz.com/
वाचने
8298
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुंदर लिखाण
फोटो
आता कसं
जबराट
In reply to आता कसं by प्रभो
+१
In reply to जबराट by टारझन
मी पण असचं म्हणतो...
In reply to जबराट by टारझन
फारच छान!!
१ नंबर मर्दा..
छान लिहीले आहे.
छान
उत्तम
जबरदस्त
वा मस्त
मस्त....
मी भटकंती
मी भटकंती
In reply to मी भटकंती by विमुक्त
पंकज, फार
मस्त वर्णन
सुंदर !
सुरेख!
पंकज मस्त
प्रांजळ प्रकटन
प्रकटन आवडले
सुरेख
एकदम जबरा
तुमचे
!!!
मस्त रे !
मस्तच !
पंकजभाऊ..
लेख सुरेख
नितांत सुंदर
मस्त लिखाण!
आवडले
केवळ अप्रतिम!!
अप्रतिम