शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण

लेखनविषय:
लेखनप्रकार
गोचर शनीचे सायन तूळ राशीतील भ्रमण दिनांक २९ ऒक्टोबर २००९ रोजी सुरु होत असून दिनांक ६ ऑक्टोबर २०१२ पर्यंत शनी सायन तूळ राशीत वास्तव्य करणार आहे. थोडक्यात सायन तूळ राशीच्या लोकांना साडेसातीला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ज्यांचा चंद्र सायन तूळ राशीत आहे त्यांनाच केवळ साडेसाती असते असे नाही, तर ज्यांच्या पत्रिकेत रवि, लग्न, ख-मध्य आदि सायन तूळ राशीत आहेत त्यांना पण त्यांना पण कमी अधिक प्रमाणात साडेसाती सारखीच फळे मिळू शकतील.

माझे 125 वर्षाचे आजोबा.

लेखनविषय:
लेखनप्रकार
"कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही." आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं. माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर होतं.माझे गोरेपान आजोबा स्वच्छ जांभळ्या रंगाचं सोवळं नेसून,वरून उघडे आणि खांद्यावरून कमरेकडे लोंबणारं त्यांचं जानवं, हातात ताम्हाण घेऊन गायत्री मंत्र मनातल्या मनात पुटपुटत संपलेल्या पुजेचं आचमन करून झालेलं ताम्हाणातल

"सखी शेजारणी तू हंसत रहा"

लेखनविषय:
लेखनप्रकार
शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत.त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्‍या मजल्यावर राहत असल्याने आणि हे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं.ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायलामिळायचे.बरं वाटायचं.ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं. गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्‍या टोकाची व्यक्ती होती. सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती.

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

लेखनविषय:
लेखनप्रकार
"फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला." मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे. तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.

माहितीचा अधिकार चार वर्षे वयाचा होतोय

लेखनविषय:
लेखनप्रकार
येत्या १२ ऑक्टोबरला माहितीच्या अधिकाराबाबतच्या कायद्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. भारतातील जनसामान्यांना हवी असलेली आवश्यक ती माहीती सहजपणे मिळण्याच्या अधिकार असावा व त्यायोगे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी अण्णा हजारे व अन्य काही समाजसेवक, नेते, विचारवंत, पत्रकार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून हा क्रांतिकारक कायदा २००५ साली अस्तित्वात आला.

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली. मी वैद्यांना म्हणालो, "प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं स्वतःला खास समजतात.ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?" माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले, "कोणी काही खास नसतो.उदाहरण म्हणून, रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.एखादा स्वतःला अगदी आदर्श समजणारा सुद्धा काही खास नसतो.पण कृपाकरून माझ्या
Subscribe to लेख