Skip to main content

लेख

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट
गुरुवार, 12/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.

गुंतवणूक आणि गुंतागुंत

लेखक ज्ञानव
गुरुवार, 12/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्यापैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला, पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंतागुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत.

अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

लेखक Atul Thakur
सोमवार, 09/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा.

श्री - भाग १

लेखक मीता
रविवार, 08/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
"श्री आपण नाही भेटू शकत आता कधीच" "पण का ? मला बोलायचं आहे खूप तुझ्याशी." "तुझ्या बायकोशी खोटं बोलून येणार आहेस न तू ..मला तेच नकोय.तिला खूप वाईट वाटेल रे. आपण नाही भेटायचं कधीच ..जे काही सुंदर क्षण होते ते तसेच ठेवू या.काय झालं,कसं झालं हे सगळ्या प्रश्नांना आता काही उत्तर नाही . तू सुखात आहेस ,माझ्यासाठी तेच खूप आहे . " "मीतू तुला एक सांगू ? " "सांग ना." "तू तशीच आहे माझ्यासाठी जशी भेटली होतीस पहिल्यांदा .काहीच नाही बदललं. सोडून गेलीस तेव्हा खूप राग आला तुझा. खुप तिरस्कार केला .पण तुझ्या वर प्रेम करणं नाही थांबवू शकलो." "आपण या विषयावर नको बोलूया आता ." "मीतू नीट राहशील ना ?

डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

लेखक Atul Thakur
शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे.

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

लेखक सचीन
शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारताच्या रत्नास त्रिवार अभिवादन.भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे.