Skip to main content

लेख

प्रचाराची रणधुमाळी

लेखक सचीन
शनिवार, 18/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुका आता ४ महिन्यांवर आल्यात. सर्व पक्षात प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. प्रचाराचे पारडे सारखे खाली वर होत आहे. ह्या निवडणुकींचा निकाल काय लागेल ह्याबाबत साऱ्या देशात उत्सुकता आहे.कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल का? आप ह्या निवडणुकीत काय चमत्कार घडवेल? तिसरी आघाडी सत्तेवर येईल का?

वाफाळलेली कटींग चहा .. !!

रविवार, 12/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते.

एकच व्यायाम सर्वांगाचं काम - बर्पी

रविवार, 12/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :) तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट. या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे.

अमिताभ बच्चन आणि “दिवार” (१९७५) चित्रपटातील संतप्त अंगार

लेखक Atul Thakur
बुधवार, 08/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
bachchan सर्वसाधारणपणे लोकांमध्ये असा समज आहे कि अमिताभचा “अँग्री यंग मॅन” हा “जंजीर” या सुपरहिट चित्रपटातुन जन्मला. या समजात तथ्य आहे. मात्र याचा अर्थ असा नाही कि “जंजीर” पूर्वी अमिताभने त्याच्यातली आग पडद्यावर दाखवलीच नाही. “जंजीर” पूर्वी फार अगोदर अमिताभने “परवाना” चित्रपटात खलनायक साकारला होता. मदनमोहनचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात “सिमटी सी शरमायी सी” हे किशोरचं आणि “यू ना शरमा फैलादे अपनी गोरी गोरी बाहें” हे रफी-किशोरचं द्वंद्व गीत होतं.

स्थिर अफगाणिस्तान भारताच्या हिताचा

लेखक आतिवास
सोमवार, 06/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या प्रसारमाध्यमांत एक विषय चर्चेला असतो – तो म्हणजे ‘अफगाणिस्तानमध्ये काय होणार पुढच्या वर्षी?” यात अनेक उपविषय आहेत. अमेरिकन सैन्य माघारी जाणार का? तालिबानशी शांतता बोलणी होणार का? सत्तेवर कोण येणार? अमेरिका माघारी गेल्यावर जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार? भारत काय करणार? भारत अफगाणिस्तानला मदत करत राहणार का? अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा भारताची कुरापत काढणार का? अफगाणिस्तानमध्ये जे काही घडतं आहे किंवा घडणार आहे, त्याला भारताच्या दृष्टीने खरंच काही महत्त्व आहे का? मी अर्थातच अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालिबान, भारताचं परराष्ट्रीय धोरण या विषयांची अभ्यासक नाही.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - अंतिम

लेखक Atul Thakur
रविवार, 05/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat तिसरी घटना भीम दुर्योधन गदायुद्धाची आहे. यात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याची जणु स्पर्धाच लागल्यासारखी दिसते. परंपरेने सांगितलेल्या कथा लक्षात घेतल्या तर असं दिसुन येतं कि दुर्योधनाला कुठेतरी ही जाणीव होती कि शेवटी आपला सामना भीमाशी होणारच आहे. त्यामुळे त्याने अनेक वर्षे लोखंडी पुतळ्यावर गदायुद्धाचा सराव केला होता. गदायुद्धाचं शिक्षण प्रत्यक्ष बलरामाकडुन मिळवलं होतं. गदायुद्धात भीम वगळता दुर्योधनाच्या तोडीचा वीर त्याकाळी जवळपास नव्हताच म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.

हिंदी चित्रपटांचा "जॉय"

रविवार, 05/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे. ----------------------------------------------------------------------------------- जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला.

हार्दीक शुभेच्छा . . .

लेखक अनंतसुत
गुरुवार, 02/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आदरनीय व्यासपीठ ( फ़ बी ची टाईमलाईन ), कार्यक्रमास उपस्थीत प्रमुख पाहुणे (अपेक्षीत न्यु यीअर पार्टीचा पास कींवा पार्टनर न मिळाल्या मुळे नाईलाजास्तव घरी असणारी मंडळी) आणि माझ्या बंधु आणि भगिणीनो आज आपण इथे नेमके कशासाठी जमलो आहोत ह्याची तुम्हाला कल्पना आहेच (व्हॉट्स-ऍप, आणि एस एम एस ह्यांनी काल रात्रीपासुनच तसा धुमाकुळ घातलेला असेलच). तर आज ३१ डिसेंबर, म्हणजे आज नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा देण्याचा दिवस (खरं पाहिलंतर रात्र).

आंध्रप्रदेशातील मंदिर

लेखक सचीन
बुधवार, 01/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आंध्र प्रदेशात सोनिया गांधी ह्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे त्यात सोनियाजींचा फोटो लावून दररोज नियमित पूजा केली जाते. सोनियाजींमुळेच तेलंगाना राज्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे तेलंगणातील जनतेला त्यांच्या बद्दल खूपच आदर वाटतो व ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात. तर अखंड आंध्रच्या समर्थकांनी स्व इंदिराजींचे स्मारक उभारले आहे. या मंदिराचे करीम नगर येथील तेलंगाना चौकात उद्घाटन झाले .या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे.. एखाद्या व्यक्तीचे मंदिर बांधणे हि तसे पाहिले विचित्रच गोष्ट आहे.

महाभारतातील “चलाख” महापुरुष - भाग २

लेखक Atul Thakur
बुधवार, 01/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
mahabharat दुसरी घटना इरावती कर्वेंनी “युगान्त” मध्ये सांगितली आहे. मात्र या घटनेकडे लोकांनी द्यावं तसं लक्ष दिलेलं दिसत नाही. “परधर्मो भयावहः” या लेखात त्यांनी द्रोणवधाचा प्रसंग वर्णिताना द्रोण आपला पुत्र अश्वत्थामा मेला हे ऐकुन देखिल शस्त्र खाली ठेवीत नाही हे मुद्दाम नमुद केलं आहे. मात्र जेव्हा भीम त्वेषाने त्याला ही जाणीव करुन देतो कि तो ब्राह्मण असुन लढणे हा त्याचा धर्म नाही. तेव्हा त्याचे धैर्य गळते. या घटनेचा थोड्या तपशीलाने विचार आवश्यक आहे.