कडेमनी कंपाऊंड
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस.....
कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा.
अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या,
कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले.
पुस्तके मनाचा आरसा असतात,
कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते!
पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा
कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा.
‘रमलखुणा’ म्हटलं कि,
आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय,
त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात,
असं वाटतं.
‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’
आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.
मिसळपाव