Skip to main content

लेख

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 04/01/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ________________________________________________________________________________________ ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.

ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार

लेखक सुधीर वैद्य यांनी सोमवार, 04/01/2016 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ठष्ट (ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट) / लेखक - दिग्दर्शक : संजय पवार ठष्ट हे ज्वलंत नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: नाटकाचा विषय चाकोरीबाहेरचा आहे. हा विषय खरेतर समाजाला नवीन नाही. पण उघडपणे बोलण्यावर अलिखित बंदी आहे, ह्या अर्थाने हा विषय चाकोरीबाहेरचा आहे. प्रत्येक माणसासाठी लग्न हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. स्त्री साठी हा टप्पा जरा जास्तच महत्वाचा असतो. लग्न न झालेल्या मुलींची बाजू कोणी विचारात घेतच नाही.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 03/01/2016 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जी ए कुलकर्णी काढलेत पुन्हा वाचायला. आज पिंगळावेळ काढलं होतं.ऑर्फिअस, स्वामी आणि यात्रिक या त्यातल्या माझ्या आवडत्या कथा. ऑर्फिअस तर नेहमी हलवून सोडते. ऑर्फिअसची माझी ओळख झाली ती सातवी की आठवी मधल्या इंग्रजीच्या धड्यामुळे. Orpheus and Euridice. बर्वे बाई होत्या शाळेत इंग्रजीला आणि क्लासला ऐनापुरे बाई. छान शिकवायच्या दोघी. हा धडा काही फारसा आवडला नव्हता, पण त्यातल्या ऑर्फिअसची देवाने केलेली कोंडी मनात कुठेतरी बोचली होती. ग्रीक शोकांतिकेची पहिलीच भेट आणि तितकीशी न आवडलेली. ही कथा म्हटलं तर प्रेमाची. म्हटलं तर असफल प्रेमाची. म्हटलं तर न होऊ शकलेल्या संसाराची.

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

लेखक सुधीर वैद्य यांनी रविवार, 03/01/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता बोलता त्या स्वत:चे आयुष्य share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही.

कळसूत्र आणि Life of Brian

लेखक Anand More यांनी गुरुवार, 31/12/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
काजळमाया हे जी ए कुलकर्णींचे एक पुस्तक. लहानपणी वाचलेले. नंतर विसरलेलो. पुन्हा वाचायला घेतले. काल त्यातली कळसूत्र ही कथा वाचत होतो. दूर डोंगरात राहणारी, आदिमानवाच्या आस्था बाळगणारी आणि निसर्गावर अंधविश्वास ठेवणारी एक टोळी. त्यांचा प्रमुख म्हणजे लाल गरुडाचं चिन्ह अंगावर रंगवलेला माणूस.

लकी

लेखक मीन यांनी गुरुवार, 31/12/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आई गंऽऽ! खूप कंटाळा आलाय आज. खूप दिवस काही काम केलं नाही. कुठे बाहेर फिरायलाही गेले नाही. अश्शी एका जागी बसून आहे. मी मुळात आळशी नाही बरं का! खूप कामसू आहे. लोकांना मदत करायला खूप आवडतं मला. कुठे काही वाईट घडलं की जशी काही मला सूचनाच मिळते. डोळ्यांसमोर लाल वर्तुळं दिसतात. कानात भोंगे वाजू लागतात. एक प्रकारचा सिक्स्थ सेन्सच म्हणा ना. मग मी अगदी धावपळ करुन लोकांच्या मदतीला जाते. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगू? मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना मदत केलीये, त्या सर्वांवरील संकट टळून ते अगदी सुखरुप बचावले आहेत. म्हणूनच माझे मित्र, नातेवाईक सगळेजण मला ‘लकी’ म्हणतात. माझे खूप लाड करतात.

छंदाच्या पलीकडे

लेखक केतन बारापात्रे यांनी गुरुवार, 31/12/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक भेटी पूर्ण झालेल्या किंवा न झालेल्या, अनेक संवाद झालेले किंवा न झालेले त्यांच्याशी अतुटपणे जोडल्या गेले असतात समाधान आणि असामाधान दोन्ही एकाच रथावर जुंपल्यासारखे त्यांच्यासोबत चालत राहतात, समाधान आणि असमाधान एकसोबत जुंपलेले असूनही त्यांच्या सुरात तालात कमालीची शांतता आणि धीर असतो आणि ते फक्त आणि फक्त अनुभवायच असत. गझल किंवा ठुमरी यांचं माझ्यासोबतच वेगळच नात आहे खरंतर त्यांच्याशी नात जुळायला वेळ लागत नाही हे अत्यंत हळवं आणि तितकच जिव्हाळ्याच असत, विशेष म्हणजे याला कसलीच बांधिलकी नसते,कुठले करार नाही,कुठलीच मागणी नाही हे नात फक्त देण्यासाठी असत.

शोध राजीव हत्येचा भाग १

लेखक गुल्लू दादा यांनी बुधवार, 30/12/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली .

शेवटची ट्रेन

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 30/12/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची ट्रेन शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला...

हॅपी न्यू इयर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 30/12/2015 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सुधीर रा. देवरे (31 डिसेंबर 1999 साली अहिराणी भाषेत लिहिलेला हा ललित लेख ‘अहिराणी वट्टा’ या माझ्या पुस्तकात- पद्मगंधा प्रकाशन पुणे- समाविष्ट झाला आहे. कोणतेही संपादन न करता ब्लॉग म्हणून देतोय.) दरवरीसले डिसेंबर महिना लागा का सगळास्ले ३१ डिसेंबरना यम लागी जातंस. येकतीस डिसेंबर हाऊ याळ आपू कशा साजरा कराना हाऊ सोबतीस्मा भयान मोठा प्रश्ननागत चावळाना इशय व्हयी जास. मंग उघरानी किती काढनी, पार्टी कुठे करनी, चोखी करनी का तिखी करनी हायी ठरंस. काही सोबतीस्ना घोळकामा पार्टी वल्ली करानी का कोयडी हायीबी ठरंस.