Skip to main content

चिठ्ठी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 17/12/2015 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
" चहा हवा असेल तर साखर घेऊन या राजे " आईने ने आज्ञा सोडली . तसा मी लगेच निघालो हि , चहा साठी काय पण . गल्लीच्या कोपऱ्यावर दुकान. नेहमीप्रमाणे गर्दी होतीच . कशाला उगाच गर्दीत शिरा.गर्दी जरा कमी झाली कि दुकानदार आपणच सांगेल . त्याला किलोभर साखर बांधायला सांगितली . आणि बाजूच्या कट्ट्यावर उभा राहिलो . तसा हि वेळच काढायचा होता . हे दुकान म्हणजे रोजच्या गावभारातल्या बातम्या मिळवण्याचं सर्वोत्तम ठिकाण. नेहमीची मंडळी होतीच आजूबाजूच्या गल्लीतली . मला बघितल्या बघितल्या बाळ्या हसला . "काय नाना , लई दिस खटे दिसला नैसाय ! " व्हय. कामाची वेळ ठरलेली नसते गा . कदी ६लाच येताव , कदी १२ वाजत्यात - मी पैश्यासाटनं करूस पैजेच कि गा . पगार देत्यात न्हवं टाइमवर ? - बाळ्या देत्यात कधी . कधी ३-४ दिवस हिक्डी तिकडी होताय . पैसा मिळतंय खरं . - मी "तेच म्हत्वाचं देवा . पैसा पैजेच बग नाना . " एवढं बोलून खाली मान घालून गप्प बसून राहिला . मला नाना म्हणायचं कारण म्हणजे . माझे आजोबा, गावाभरातल्या सगळ्यांसाठी सगळं केलं . कोणाचं रेशन कार्ड मिळवून दे , कि गावच्या टोकापर्यंत बस येउदे म्हणून सगळ्यांना गोळा करून KSRTC ऑफिस वर मोर्चा काढून बस चालू कर . लोकांना रॉकेल मिळेना म्हणून कुठून तरी आपल्या पैश्याने शे दीडशे लिटर विकत आणून ते गरिबांना फुकट वाट . विनोबा , गांधी आणि संघ . अश्या सगळ्या विचित्र मिश्रणातून तयार झालेली हि पिढी . स्वतःचं घर गहाण जाई पर्यंत आणि त्यानंतर हि फक्त मदत करत राहायचं . हेच याचं आयुष्याचं ध्येय . या अश्या नानांबरोबर मी कायम हिंडायचो . मी हिंडायचो म्हणण्या पेक्षा ते घेऊन जायचे . वाड्याच्या कुठल्याही टोकाकडून "आदित्य , चल जरा बाहेर जाऊन येऊ" असा त्यांचा पक्का खर्ज्याताला आवाज घुमला, कि आदित्य तयार . मग जसं ते मागे हात बांधून चालतील तसं आपणही चालायचं . त्यामुळे ते असताना सगळी मंडळी मला छोटा पर्बकार म्हणणार किंवा नाना . आणि ते गेल्यावर मग मलाच नाना . तर असो . विषय बाळ्याचा होता . नाना आठवले . राहवलं नाही . बोटं मोडून घेईन तेवढ्या श्रीखंडाच्या गोळ्या , असा हिशोब करणारे नाना . तर , असोच . विषय ,बाळ्याचा होता . तो गप्प बसलेला बघून मीच म्हणालो . . " अण्णा , राजा फास लावला म्हणे . काय झालं हो? गाडी घेऊन दिलेला नवे? खुश दिसत होता परवा तर ! " बाळ्या - व्हय . माझंच नशीब गांडू . मोट्टा मुलगा म्हणून लाड केलो , डोक्यावरून चढून बसला होता भूस्नाल्या, तेला कोणती गोष्ट नाही म्हणालो नाही . तीच चूक केली बग जीण्यात . ल्हान होता तवाच जरा नकार ऐकायची सवय लाव्लो असतो . आज असं झालं नसतं . . " मी - जे व्हायचं ते होऊन गेलं अण्णा , त्रास होतंय खरं . अजून लहान मुलगा आहे . आपल्या त्रासात त्याच्यावर दुर्लक्ष नको करू . तो सांभाळेल सगळं नीट . हुशार पण आहे , पण एकदम फास का लाऊन घेतला ? " बाळ्या - हे पैल्यांदा न्हाई . तुज माहिती हैच कि सगळं . मोबाईल पैजे म्हणून हात कापून घेत्लन . मग त्याच कॉलेज मध्ये पाहिजे नाहीतर परत हात कापतो म्हनला . कर्ज काढून डोनेशन भरलो . आता गाडी पीजे म्हणून एकदा फासाचा पर्योग झाला . मिया जीवाला घाबरून गाडी घेऊन बी दिली . पर एक रेष पार झाली नाना तेव्हा . गाडी दिली . पण देताना संगीत्लो . आता जे काही पाहिजे ते स्वतः कमवून घे . शिकव्लाव पाहिजे तेवढं . ह्येची आई खंगली गा हे असलं बघून . परवा लाख रुपेय दे म्हणाला . कशा साटनं ते बी संगीना. बाई बी म्हाएरी गेली व्हती . ऐकेचना पोर . माज्या समोरच फास लावला गा . गळ्यात दोर अडकून म्हणाला . पैसे दे न्हाई तर खुर्ची लाथाडतो . माजं बी डोस्क फिरलं . मीच काढली खुर्ची . अन हातात ठेवली चिट्टी लिवून . " आजपर्यंत आयुष्यात आई बापाला त्रास देण्याशिवाय काही करू शकलो नाही . यापुढे हि काही करू शकणार नाही , जगण्यास काहीच अर्थ नाही , त्यामुळे फाशी लाऊन घेतोय . कोणासही जबाबदार धरू नये " हि असली गांडू औलाद असण्यापेक्षा नसलेली बरी . जे मागेल ते सगळं हातात देऊन पण काही करू न शकणारा मुलगा असेल तर काहीच अर्थ नाही रे नाना . तू म्हणलास ते बरोबर . छोटा लई हुशार आहे . एक गोष्ट स्वतःहून मागत नाही . आम्ही जे दिल त्यात सुख मानताय . बारावीला फस्क्लास काढतो म्हणतोय . आता चैत्रात परीक्षा झाली . कि सगळं तेच्या नावावर टाक्तु . आणि पोलिसात जातु . ह्यो मोठा , ज्याने जीव भरला त्यालाच धमकी देत हुता सुळ्या लेकाचा . तेवढ्यात दुकानदार ओरडला . "मालक . साखर बांधलिया . तीस रुपये देवा . "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8122
प्रतिक्रिया 54

प्रतिक्रिया

आइशप्पथ अद्द्या, खतर्नाक लिहिलायस बे. कॅरेक्टर कसले खंग्री त्यात बेळगावी निप्पाणी हेल.
ज्याने जीव भरला त्यालाच धमकी देत हुता सुळ्या लेकाचा .
लै जवळची भाषा हाय ही. भावा जिकलस तू.

काय बोलावे कथेच्या शेवटावर.... लेखनशैली नेहमीप्रमाणेच परिणामकारक.

:(

लय खतरनाक चिठ्ठी. "साखर बांधलिया . तीस रुपये देवा . " . . उगाचच शतशब्दांत आवळली न्हाइस ते बरं केलंस.

खूप सुंदर कथा, एकदम आवडली. बोली भाषेचा ठसका देखील आवडला. प्रतिसादांवरून कळले की ही बेळगाव-निपाणी भागातली बोलीभाषा आहे. थोडं अवांतर - बोलीभाषेत इतकं सुंदर व्यक्त होता आलं त्यामुळे भाषेला, बोलीभाषा म्हणा की प्रमाण भाषा, त्याने काहीही फरक पडत नाही.

काय लिहिलय्सं काटा ढील्ला केला की रे !!! तुझ्या कथांचं पुस्ताक निघाय पायजेल.. काय म्हंतो अभ्य्या प्रतीसाद मात्र नाखु

In reply to by नाखु

१०१% अनुमोदन पहिली कॉपी माझी राखीव

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे धन्यवाद :) सिनेमात किंवा पु लं नि सुद्धा दाखवलेली कानडी हेल असलेली भाषा हि बेळगावी भाषा नाही . आयुष्यभर कानडी (किंवा कुठलीही दक्षिण भारतीय भाषा ) बोललेला माणूस जेव्हा दुसरी कुठलीही भाषा बोलेल तेव्हा थोडा तसा हेल निघतोच . कथेत मी ती खरी बेळगावी भाषा आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे . पण कुठे तरी पुस्तकी भाषेची भेसळ झाले माझ्या डोक्यात हि . पुन्हा एकदा . धन्यवाद :)

लेखन आवडले. हे असं काही घरात दिसतं खरं!! काही तपशिलांचा फरक इतकंच!!! :( बेळगावी धाटणीतल्या मराठीतले संवाद वाचताना ऐकू येत होते. :) मी बराच काळ दक्षिण महाराष्ट्रात वास्तव्य केले असल्याने संवाद ऐकताना अगदी ओळखीचे काहीतरी भेटल्यासारखे वाटले. वर प्रतिसादात केल्या गेलेल्या कथांचं पुस्तक निघायला पाहिजे ह्या सूचनेला अनुमोदन.

अद्द्या भाऊ, आप डुड हो __/\__ , ग्रामीण बोली भाषा म्हणजे आपला वीकपॉइंट! तूफ़ान आवडली ही लघुकथा , अजुन लिहा भरपुर पोटभर लिहा आमचे मन कधीच भरणार नाही :)

झकास प्रकटन. भाषा जरा विचित्र वाटली. बेळगावी नव्हेच ही.

In reply to by सस्नेह

आपल्या मताचा आदर आहेच काय चुकलंय ते लक्षण आणून दिल्यास पुढल्या वेळी तसे बदल करेन . मी जी भाषा इथे रोज बघतो ऐकतो ती अशीच आहे . तरीही सुधारणा करण्यासारखी असेल तर नक्कीच करेन :)

In reply to by सस्नेह

त्या टंकन चुका , आणि रात्री १ वाजता विन च्या प्रभावाखाली झालेल्या चुका =]] लक्षात ठेवेन पण हे.. :) धन्यवाद

मस्त जमलीय कथा. चित्र डॉल्यासमोर आल अगदी ब्येळगावी हेलासकट्ट. आजुबाजुला बेळगावचे बरेच लोक राहतात, त्यामुळे त्या हेलांशी परिचित

फक्त प्रत्यक्षात असा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य किती पालक दाखवतील ?

खतरनाक लिहीलंय, भारीच.

:( लिखाण नेहमीप्रमाणे सरस!

मस्त लिहिली आहेस रे ! अशा कथा वाईन पिउन येणार असतील तर उद्या पिंप पोचतो करतो ;)

In reply to by कपिलमुनी

=]] कथा टंकली वाइन च्या प्रभावात फक्त

लै भेष्ट लिव्लै. मज्या आली. अजून बी येऊ द्या.

लै भेष्ट लिव्लै. मज्या आली. अजून बी येऊ द्या.

कथा छान आहे, पण मला शहरी भाषेत अधिक आवडली असती. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत (सदर बोलीशी कधी संबंध न आल्यामुळे असेल कदाचित) आहे, भाषेशी जवळचा संबंध नसला की काही शब्द समजणे कठीण जाते. कुतुहल म्हणून एक विचारतो : तुमच्या मते तुमच्या या कथेचा कणा (usp म्हणता येईल का ?) तिच्या कथानकात आहे की भाषेत ? असो, टीका करण्याचा मानस नाही, कथानकातले वेगळेपण जबरदस्त !!

In reply to by मराठी कथालेखक

"भाषेशी जवळचा संबंध नसला की काही शब्द समजणे कठीण जाते" >> याबद्दल दुमत नाहीच . पण तरी न समजण्यासारखा कोणता शब्द नाहीये तिथे. तुमच्या मते तुमच्या या कथेचा कणा (usp म्हणता येईल का ?) तिच्या कथानकात आहे की भाषेत >> दोन्ही . . थोडीफार सत्यघटना , आणि खरोखरची माणसे बघून ऐकून जे असेल ते लिहितो . (ते चांगलंच असेल याची शाश्वती मलाही नसते ) , मग ती खरोखरची माणसे जशी बोलत असतील तशीच इथे उतरवायचा प्रयत्न केला . बाकी शहरी भाषाच हीच प्रमाण भाषा असं मत असेल तर पुढे काहीच बोलू शकत नाही मी :) वेगळेपण बघितल्या बद्दल धन्यवाद :)

बाळू आणि त्याचे वडिल दोघांबद्दल वेग्वेगळ्या कारणांमुळे वाईट वाटले.

छानच्

लिखाण चान्गलं आहे. कथा पण छान. फ्क्त एक विनंती आहे, जरा शुद्धलेखन करता आलं तर बरं...!