Skip to main content

लेख

राजाराम सीताराम एक .................. आस्थेचे बंध...................भाग १६

लेखक रणजित चितळे यांनी शनिवार, 02/04/2016 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

भालचंद्र नेमाडे यांच्याशी एक अविस्मरणीय भेट.

लेखक अमृता_जोशी यांनी शनिवार, 02/04/2016 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीला असताना कोसला पहिल्यांदा वाचली, आणी त्या कथेच्या नायकाचा आणि त्याचा विचारांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. नौकरी मिळाल्यानंतर एक एक करून त्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण केले आणि मी भालचंद्र नेमाडेंची फ्यान झाले. माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक, म्हणजे एकदा नेमाडेंना भेटणे आणि त्यांच्या पुस्तकांविशयी माझ्या मनातले सर्व प्रश्न त्यांना विचारणे हे होते.

ओळखले का?

लेखक राजू यांनी शनिवार, 02/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"ए शुक शुक" "ए अरे थांब" अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते. म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो. आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते. तर "ए" अशा एकेरी नावाने आ

भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/04/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी - डॉ. सुधीर रा. देवरे भारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल? भारताच्या शेतकर्‍याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय? दुष्काळात शेतकर्‍यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो? पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो? गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो? आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे? इतका दैवाधिन का आहे? इतका पारंपरिक का आहे? इतका कर्जबाजारी का आहे? त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही? असे असंख्य प्रश्न शेतकर्‍यांच्या बाबतीत विचार करताना उद्‍भवू लागतात. खरं तर भारतातील सर्व शेतकर्‍यांपुढील समस्या सारख्याच नाहीत.

महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली. साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.

माझी भाजीवाली – सखी, शिक्षिका!

लेखक उल्का यांनी गुरुवार, 31/03/2016 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज तशी बरीच शिल्लक होती. तेच खरे निमित झाले आजच्या संवादाला आणि उलगडला एकां कष्टकरी स्त्रीचा रोजचा दिवस. माझ्यासाठी ती ‘ए ताई’ आणि तिच्यासाठी मी ‘अहो ताई’. दोघीनाही एकमेकींचे नाव माहीत नाही. अर्थात, त्यावाचून काही अडलेही नाही. गेल्या कित्येक दिवसांचा शुद्ध व्यवहार आमचा. भाजी घ्यायची आणि रोख पैसे द्यायचे. तेसुद्धा घासाघीस न करता. तरीही त्या व्यवहाराला देखील एक अदृश्य अशी भावनिक झालर असतेच. नकळत जोडलेली.

सोशल नेटवर्क?

लेखक राजू यांनी बुधवार, 30/03/2016 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'डॉक्टर,आजकाल झोप व्यवस्थित होत नाही.जेवण जात नाही दिवसभर नुसते डोके दुखत राहते.' 'बरं पोट निट साफ होते का?' 'नाही ना डॉक्टर.' 'मी काही टेस्ट लिहून देतो त्या करून घ्या पण त्या अगोदर १५ दिवस रोज सकाळी उठल्यावर प्रातर्विधी अगोदर आणि नाष्टा झाल्यावर दैनंदिन कामाला सुरुवात करे पर्यंत दोन्ही हातांची अंगठा आणि त्याच्याशेजारची दोन बोटे अशी तीनही बोटे एकत्र गुंफून बसायचे दिवसभरात असा निवांत वेळ मिळाला कि १५ दिवस हा प्रकार करायचाच आहे हे लक्षात ठेवा.' ' डॉक्टर याने काय होईल?' 'मी ते १५ दिवसानंतर सांगतो ओके. आणि महत्वाची सूचना देतो यात अजिबात कंटाळा करायचा नाही कारण यानंतरच आपल्याला सर्व टेस्ट करा

डनिंग-क्रुगर इफेक्ट

लेखक अमृता_जोशी यांनी बुधवार, 30/03/2016 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.

अजून एक बार..

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 29/03/2016 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या उन्हाळ्यातली एक दुपार. टळटळत होते. बाईक घेउन निघालं. एरवी गावात आंब्या-चिंचेखालची पोरं किंवा आईस्क्रीम-कुल्फीवाला सोडल्यास विशेष लगबग नसेल. बळीराजा रानावनात झोपलेलं. दुपारचे दोन वाजत आलेलं. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. गाव नेहमीसारखंच आळसावलेलं. संध्याकाळी अजून काही कामे होती. म्हणून या भेटीकरता दुपारच उत्तम म्हणून निवडलेलं. मॅडम एका बसस्टॉपवर बसलं होतं. मला बघताच स्माईल करत उठलं. कानातले हेडफोन काढून मोबाईल पर्समध्ये ठेवलं. 'हाय' म्हणून हस्तांदोलन केलं चक्क. (असो..!) दुपार थोडी अधिकच टळटळत होतं.

अतृप्त.

लेखक राजू यांनी मंगळवार, 29/03/2016 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
ती उजव्या हाताला वळाली आणि थोडे पुढे येताच जसजसा मेन रोडवरील लाईटचा प्रकाश अंधुक होऊ लागला तसे गडद होत जाणाऱ्या अंधाराने आणि थंडीने तिला आज अमावस्या असल्याची जाणीव झाली आणि तिची पावले आता झपझप पडू लागली. काळ्याकुट्ट अंधारातून कुडकुडत चालताना आपल्या मागून कोणीतरी येत आहे असा तिला भास झाला पण मागे वळून पहायचे तिने टाळले.आपले दोन्ही हात आपल्याच शरीराशी घट्ट पकडत ती थंडीची तिव्रता कमी करायचा प्रयत्न करू लागली तिला जिथे जायचे होते त्या ठिकाणाचे अंतर जसजसे कमी होऊ लागले तसे तिला आपल्या मागे नक्कीच कोणीतरी आहे असे वाटू लागले नव्हे आता कोणाची तरी चाहूल तिला लागली आणि आता तिचा जीव भीतीने खालीवर होऊ ल