Skip to main content

आस्वाद

स्वामिनी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 01/02/2013 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं. तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा.

हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग २

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 31/01/2013 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
इथे भाग १ वाचावा आपण पहिल्या लेखांकात पाहिले आहे की राग एक मसाला असेल तर पदार्थ म्हणजे काय बुवा ? ते आता जरा पाहू. राग हा गोडवा निर्माण करण्याचा राजमार्ग आहे. असाच पदार्थ चविष्ट करण्याचा " राजमार्ग" मसाला उत्पादकानी शोधून काढला आहे. असो. तर मी काय म्हणत होतो तर पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे " ख्याल" आणि उपशास्त्रीय प्रकार. त्याअगोदर जरा स्वर या संकल्पनेची माहिती घेउ. मानव वंश विकसित होत असताना मानवाने २० ते २०००० हर्टझ या आवाक्यातील निरनिराळ्या ध्वनिलहरी ऐकून घेतल्या.

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 31/01/2013 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता.

गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं

लेखक अक्षया यांनी मंगळवार, 29/01/2013 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले. हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते.

क्या बात है इस जादूगरकी ? अर्थात ओ पी नय्यर -एक शापित गंधर्व -२

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 26/01/2013 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा पूर्वार्ध इथे ओपी नय्यर व निरनिराळी वाधे यांचे अफेअर - ओपीनी कोणकोणती वाद्य प्रामुख्याने वापरली याचा उल्लेख वर आलाच आहे. तंतू वाद्यांचा उपयोग तालवाद्ये म्हणून करणे ही ओपींची खास विशेषता. ओपी व हार्मोनियम- ओपीनी हारमोनियम हे वाद्य ज्या पातळी वर वापरले त्याला तोड नाही. बाबु सिंग हे बिनीचे वादक हारमोनियम हा संयोग हे नय्यर साहेबांच्या ऑर्केस्ट्रातील महत्वाचे बलस्थान आहे.

स्वरमग्न - उस्ताद अमजद अली खाँ (२/२)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 23/01/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
Ustad_Amjad_AliKhan_Family (अमेरिकेतल्या भारतीय वकिलातीत एका उच्चपदस्थ अधिकार्‍यासमवेत उ. अमजद अली आणि परिवार) सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून 'स्थलांतरित' होत होत हे वाद्य अमजद अलींच्या 'बंगश' घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं.

वन्ही तो चेतवावा रे .....

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 22/01/2013 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीराम समर्थ॥ वन्हि तो चेतवावा रे.......... www.samarthramdas400.in महाराष्ट्रदेशीं संताचा महान वारसा आहे. भागवत संप्रदाय, नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय अशा अनेक समॄद्ध परंपरा आहेत. सर्व प्रकारची आस्मानी आणि सुल्तानी संकटे पचवून या साऱ्या परंपरा महाराष्ट्रात आणि भारतवर्षात केवळ टिकूनच नव्हे तर दिवसेंदिवस वर्धिष्णु होत आहेत, हे महाराष्ट्राचे परम भाग्यच! असाच एक प्रखर संप्रदाय - रामदासी संप्रदाय!