Skip to main content

आस्वाद

माझी चार अंग वस्रे

बुधवार, 21/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

वाहनमहिमा

लेखक शरद
गुरुवार, 15/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
वाहनमहिमा बारामासी दु:ख मानसी वाहतुक दाटे चोहिकडे ! क्षणात होते सिग्नल हिरवे क्षणात फिरुनी लाल गडे !! भवती बघता शतगाड्यांचा गोफ दुहेरी विणलासे ! अरुंद रस्ते काय बांधिले चालक वाटा काढितसे !! झाला पिवळा लाल वाटतो अहा ! अहा ! हिरवा उघडे ! झणी रस्त्यावर, उंच घरांवर काळा काळा धूर उडे !! उठती वरती आणि सभोवती प्रदूषणांचे रंग पहा ! सर्व थरांवर हाय रेखिले भीषणतेचे रूप महा !! वाहनमाला जाता भासे कल्पांताची माळची ते ! उतरूनी येती अवनीवरती कळीकाळची एकमते !! धडधड खडखड आवाज करोनी वाहनचालक सावरती !

'शुद्ध सात्विक' मोर आणि भगवान रमण महर्षी

लेखक मूकवाचक
सोमवार, 12/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान रमण महर्षी - संक्षिप्त परिचयः "मी कोण आहे?" (तत्वार्थाने - माझे मूळ स्वरूप कसे आहे?) या सनातन प्रश्नाचे उत्तर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अचानक मृत्युसमान अनुभव येउन ज्यांना सहज गवसले असे एक लोकविलक्षण, आत्मसाक्षात्कारी आणि ज्ञानी सत्पुरूष अशी श्री. रमण महर्षींची आज जगभर ख्याती आहे. आत्मचिंतनाच्या धारदार तलवारीने सारे लौकिक पाश कापून काढत, त्या दृष्टीने सर्वसंगपरित्याग करून साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या दक्षिण भारतातल्या परमपवित्र अरूणाचल पर्वताच्या आश्रयाला ते सोळा वर्षांचे असताना जे आले, ते शेवटच्या श्वासापर्यंत वास्तव्य करण्यासाठीच.

दारुबंदी झालीच पाहिजे!

शुक्रवार, 09/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मद्यप्रेमी आणि मद्यपरिणामभयग्रस्त यांच्यात नेहेमीच चकमकी झडत असतात. दोन्ही पक्ष आपापल्या परीने योग्यच बोलत असतात. दोन घटका विरंगुळा म्हणुन वा मजा म्हणुन कधी चार दोस्तांबरोबर निवांत बसुन मैत्रीबरोबर मद्याचा आस्वाद घेणे काही गैर नाही - हे ही योग्य. एकदा पीण्याची चटक लागली तर बरबादी होण्याची खात्री हेही बरोबर. कोण आस्वाद घेईल आणि कोण व्यसनी होईल हे सांगणे अशक्य आहे. असो. सध्या सोत्रिंच्या चावडीवरून सुरू झालेल्या चर्चासत्रावरुन मला माझा एक जुना किस्सा आठवला.

स्कायफॉल-

सोमवार, 05/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी चित्रपटात सकस कथा, स्पष्ट व्यक्तिचित्रण व अतिप्रगत छायालेखन यांचा संगम अनेक वेळा दिसून आलेला आहे. या सर्व व्यक्तिचित्रणात चार्ली चाप्लीन यांचा ट्रॅम्प, ब्रॅम स्टोकर यांचा काउंट ड्राक्युला , इयान फ्लेमिंग यांचा जेम्स बॉण्ड व स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा इंडियाना जोन्स हे लोकप्रिय आहेत. ५० वर्षे टिकून जेम्स बॉन्ड याने त्यात आघाडी घेतली आहे यात शंकाच नाही. नुकताच प्रदर्शित झालेला "स्कायफॉल" हा॑ चित्रपट कथेत जरा कमी असला तरी फोटोग्राफी , अभिनय, व्यक्तिचित्रण यात सरस ठरलेला आहे. पूर्वी दुखावलेला एक ब्रिटिश गुप्तहेर आता सायबर टेररिस्ट झालेला आहे.

यशोमति मैयासे बोले नंदलाला

लेखक शरद
सोमवार, 05/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
यशोमती मैयासे बोले नंदलाला " श्रीकृष्ण हा जगद्गुरू खरा, त्याने गीतेमधून सर्व उपनिषदांची सार काढले हेही खरे पण भारतातल्या निम्या लोकांना, स्त्रीवर्गाला, त्याचे काही कौतक नाही. त्यांना ते माहितही नसेल. त्याने कंसाला मारले, पांडवांना मदत करून कौरवांना हरवले हे त्यांना माहीत असले तरी "ते देवाचे कामच आहे" अशी संभावना केली जाईल. त्यांच्या दृष्टीने कृष्ण एकच, "बाळकृष्ण". रांगत रांगत येऊन वडीलांच्या ताटातला घास त्यांनाच भरविणारा, मडके फोडून लोणी पळवणारा, गोकुळातील सर्वांचा लाडका, सावळा बाळकृष्ण. आपल्या घरांत रांगणार्‍या मुलाकडे कौतकाने पाहणार्‍या आईला तिथे दिसत होता तो बाळ्कृष्णच.

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

बुधवार, 31/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

रागिणी सुहावनी- किरवाणी

रविवार, 28/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
आपले भारतीय संगीत व आयुर्वेद यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असला पाहिजे. भारतीय संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत . यात उत्तर भारतीय संगीत व कर्नाटक संगीत असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीत एका सप्तकात मूल व विकृत असे मिळून बारा स्वर आहे असेच मानतात.या बारा स्वरांच्या रचनेला काही बन्धने आहेत. नियम आहेत त्याना राग असे म्हणतात. अनेक वर्षांच्या वैचारिक व आस्वादात्मक प्रयोगप्रक्रियेनंतर याचे एक शास्त्र बनले आहे. काय बहुतांशी कानांना रंजक वाटले व काय अरंजक वाटले याचा चिकित्सक शोध घेऊन आजचे राग संगीत बनले आहे.