यशोमती मैयासे बोले नंदलाला "
श्रीकृष्ण हा जगद्गुरू खरा, त्याने गीतेमधून सर्व उपनिषदांची सार काढले हेही खरे पण भारतातल्या निम्या लोकांना, स्त्रीवर्गाला, त्याचे काही कौतक नाही. त्यांना ते माहितही नसेल. त्याने कंसाला मारले, पांडवांना मदत करून कौरवांना हरवले हे त्यांना माहीत असले तरी "ते देवाचे कामच आहे" अशी संभावना केली जाईल. त्यांच्या दृष्टीने कृष्ण एकच, "बाळकृष्ण". रांगत रांगत येऊन वडीलांच्या ताटातला घास त्यांनाच भरविणारा, मडके फोडून लोणी पळवणारा, गोकुळातील सर्वांचा लाडका, सावळा बाळकृष्ण. आपल्या घरांत रांगणार्या मुलाकडे कौतकाने पाहणार्या आईला तिथे दिसत होता तो बाळ्कृष्णच.