Skip to main content

अनुभव

माझ्याही कर्वेनगरात ...

लेखक मन यांनी सोमवार, 09/01/2017 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
"दाह" चा धागा वाचला "कर्वेनगरात" नावाचा. जॉबच्या सुरुवातीच्या काळातलं बरच काही आठवलं. आठवतच गेलं. हा ज्या काळात तिथे होता* जवळपास त्याच काळात मीही त्याच भागात होतो. २००९ च्या शेवटाचा तो काळ. पण तिकडे नंतर येउ. मुळात मी तिथवर कसा पोचलो ते सांगतो. २००६ जुलै. डिग्रीचा निकाल हाती लागला आणि दोनच दिवसात , ऑगस्ट २००६ मध्ये आय टी कंपनीत रुजु झालो. कॅम्पसमध्येच निवडलो गेलो होतो. तिसर्‍या वर्षाच्या शेवटी ज्या उन्हाळी सुट्ट्या असतात; तेव्हा निवडलो गेलो. इंजिनिअरिंगचं चौथं वर्ष त्यामुळे जॉबच्या बाबत निश्चिंत होतो. उरलेले सर्व सेमिस्टर व्यवस्थित पास होणं इतकच उद्दीष्ट होतं.

पैसा झाला खोटा…

लेखक इरसाल कार्टं यांनी रविवार, 08/01/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा झाला खोटा… मागच्या दोन महिन्यांपासून भारतभर नोटबंदीचा विषय ट्रेंडींग आहे, जवळ असलेले पैसे असे रातोरात गेलाबाजार झाले. कोणीही ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारेनसे झाले. पण मागच्या दोन वर्षाच्या काळात कामानिमित्त भारतभर(खासकरून उत्तर भारत) फिरताना मला नोटबंदी नसतानाही असले अनुभव आले होते, त्यातील काही… लखनऊ ला जात होतो, रेल्वेने. हि माझी दुसरी फेरी होती लखनऊ ला. सगळं व्यवस्थित पॅक केले आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन निघालो. रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे मी जवळ कमीत कमी रोकड बाळगत असे. ए.टी.एम. आता बर्यापैकी स्टेशन्स वर उपलब्ध असल्यामुळे डेबिट कार्ड वापरणे मी सोयीस्कर मनात होतो.

देशाचा अपमान

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 05/01/2017 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" तन्मय, आमची थोरली पाती. "इकडे ये, मला नीट ऐकू नाही आलं." अस्मादिक. . . "बाबा, जन-गण-मन केव्हाही म्हटलं की देशाचा अपमान होतो ना?" अ‍ॅक्शन रिप्ले. "तुला कोणी सांगितलं? कुठे ऐकलं" (प्रश्नाचे सरळ उत्तर देतील तर पालक म्हणवून घेण्यावर बट्टा लागेल नै?) "असंच, मला माहिती आहे." थोरली पाती. "अरे, म्हणजे कुठं ऐकलं, कोणी सांगितलं, कोणी बोलत होतं का असं?" "गौरव म्हणाला. केव्हापण जन-गण-मन म्हटलं तर देशाचा अपमान होतो." . . वय वर्षे सहा, वर्ग पहिला. शाळेतल्या गप्पांमधे झालेला विषय घरी चर्चिला जाणे रोजचंच.

मकरंद बोरीकर

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 03/01/2017 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक मोठा सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट चालू होता. आमचा क्लायंट होता,अमेरिकेचा. तिथला एक मोठा उद्योगसमूह त्यांचा होता. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे खूप मोठी टीम, ज्यात भरपूर डेव्हलपर, टेस्टर, डीबीए, इन्फ्रा, त्यांचे लीड्स, प्रोजेक्ट मॅनेजर, रिलीज मॅनेजर, व्हर्जन मॅनेजर, अशी सगळी मांदियाळी कामाला जुंपली होती. भारतात दोन तीन शहरात तर जोमात काम चालु होतच. पण तिकडे क्लायंटच्या ऑफिसमध्ये म्हणजेच साईटवरसुद्धा आमची मोठी टीम होती. त्या देशातल्या आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्येसुद्धा काही लोक काम करत होते.

कर्वेनगरात

लेखक दाह यांनी सोमवार, 02/01/2017 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम. बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात. स्वागत म्हणून की काय कोण जाणे , स्वारगेटवर उतरताच जो बदाबदा पाउस कोसळायला लागला थांबायचं नावंच घेईना.

तुलपा - हादरवून टाकणारा योगिक अनुभव

लेखक साहना यांनी शनिवार, 31/12/2016 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही महिन्या पासून आमच्या नास्तिक ग्रुप चा अभ्यास योगी, ध्यान इत्यादी विषयावर सुरु आहे. मला विशेष रस नसला तरी स्लेन्डरमन मर्डर्स ह्या विषयावर अभ्यास करणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली आणि त्यानंतर काही दिवसांनी एक तिबेटियन लामाशी भेट झाली. तिबेटियन लामाने मला तुलपा विषयी माहिती दिली आणि तुलपा ह्याचा सीलेंडरमॅन शी काही संबंध असावा असे समजून मी तुलपा चा अभ्यास सुरु केला. स्लेन्डरमन मर्डरस : जास्त खोलांत जात नाही. अमेरिकेत विविध ठिकाणी आणि विविध काळांत पौंगडावस्थेतील मुली अचानक आपल्या मैत्रिणींचा खून करू लागतात.

...लहान दिवा लवकर विझतो!

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 28/12/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून लिहायचे होतेया विषयावर, पण राहून जात होते. कालच्या प्रसंगाने मात्र मला लिहायची इच्छा आवरता आली नाही. झालं असं कि काल कामानिमित्त मुंबईत जाणे झाले. एकट्याने जायला कंटाळा आला आणि येताना समानहि होते आणायचे म्हणून जोडीला विकास नावाच्या मित्राला घेऊन गेलो. विरार ला पोचल्यावर त्याने एक आठवण सांगितली, विकासची एक वर्षाची पुतणी 3-4 महिन्यांपूर्वी आजारी पडली होती. न्युमोनिया झाला होतं तिला आणि त्यांनी तिला विरारमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. छोटीला उपचारांनी बरे तर वाटत होते पण रुग्णाच्या तब्बेतीतील प्रगती विचारल्यावर डॉक्टरांची उत्तरे कायमच घाबरवणारी असायची असे तो म्हणाला.

धावते विचार :)

लेखक मन यांनी सोमवार, 26/12/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
---------काल गावाकडून पुण्याकडे एशियाड्मधून येत होतो. तेव्हाचं डोक्यातलं विचारचक्र ------ पंधरा नम्बरची सीट मिळालेये मस्त.अगदि मध्यभागी बसच्या.शिवनेरी वॉल्वो ऐवजी ह्यावेळी एशियाड घेउन किती स्मार्टपणा केलाय बॉस मी. संध्याकाळची वेळ. मस्त आल्हाद गारवाय हवेत. वाहती हवा. अगदि गरमी म्हणावी अशीही हवा नाही, आणि अगदि गारठून वैतागावे अशीही थंडी नै. मी स्वतःवरच खुश. आपण किती स्मार्ट आहोत त्याबद्दल. एरव्ही खूपदा शिवनेरीने जातो असह्य उकाडा वाटला तर. साडे तीनशे ऐवजी ऑल्मोस्ट सातशे रुपये पडतं भाडं इन द्याट केस. . . एशियाडच्या साडे तीनशे ऐवजी जवळपास दुप्पट... म्हंजे सातशे रुपये भाडं शिवनेरीचं.

कासव

लेखक अभ्या.. यांनी सोमवार, 26/12/2016 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं" "तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा" "बाप नाय डोस्क्याला ताप हाय" आप्पा कोरे म्हणजे अ‍ॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं.

आठवणी दाटतातः माझी मुंबई

लेखक नूतन सावंत यांनी रविवार, 25/12/2016 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background: url(https://lh3.googleusercontent.com/Lp_d4i7_2MsOm0urqKpCOtvWkKCpcWUtKx9R26oyRLUdsXVNFLWI9fchPBYuB1tDK0x-MqG1Ew=w320-h331-no); background-size: 100%; background-repeat: repeat; } माझी मुंबई जगात कुठेही फिरायला गेलं तरी काही दिवसांनी मुंबईची आठवण यायला लागते..आद्य मुंबई बनली ती माहीम, परळ, माझगाव, वरळी, बॉम्बे कुलाबा आणि छोटा कुलबा या सात बेटांनी मिळून, मुंबादेवी या ग्रामदैवातावरूनमुंबईचं नाव पडलं. मुंबा,मुंबाय,मुंबैमुंबई,मुंबापुरी,Bombaim,बॉम्बे,बंबई,अशी कितीतरी नावं.