मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनुभव

माझाही अनुभव...

बिपिन कार्यकर्ते ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बरोब्बर १ वर्षा पूर्वी मला आफ्रिकेला जायचा योग आला. तशी ती माझी आफ्रिकेची पहिलीच ट्रिप असल्याने मी एकदम खुशीत होतो. नैरोबीला राहणार होतो ३ च दिवस पण एक पक्कं ठरवलं होतं काहिही झालं तरी तिथलं झू बघाच्चं म्हणजे बघाच्चंच. काम खरं म्हणजे २ च दिवसाचं होतं आणि तिसरा दिवस विमानची वेळ सोयीची नव्हती म्हणून पदरात पडला होता. म्हणजे सगळं व्यवस्थित जुळून येत होतं. गेल्या गेल्या पहिलं काम काय केलं असेल तर कंपनीच्या ड्रायव्हरला मस्का मारायला सुरुवात केली. नाहीतर आम्हाला टॅक्सी भाड्याने (टारू वाला भाड्या नाही :) ) घेऊन झू वगैरे बघायला जावे लागले असते. ते काही परवडले नसते.

साप मारण्याचा पराक्रम

आगाऊ कार्टा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वप्रथम माझ्या अनुभवाला आपण सर्व मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादबद्दल मनापासून आभार... हा माझा साप मारण्याचा उपद्व्यापसुद्धा सुट्टीतलाच आहे पण यात आम्ही सगळी भावंडे सहभागी होतो. झालं काय.. आमच्या गावात त्या दिवशी एका घरी लग्न होते. आमचे त्यांच्याशी खूप जुने संबंध होते त्यामुळे आमच्या घरातले सगळे तिकडे गेले होते. आम्ही सगळी भावंडे सुद्धा गेलो होतो पण लग्न जरा लवकर होते आणि जेवायला थोडा वेळ होता म्हणून लग्न लागल्यावर आम्ही घरी धूम ठोकली आणि घरी दडवून ठेवलेला चिवड्याचा डबा शोधायला सुरुवात केली. थोड्यावेळाने मी कशालातरी स्वयंपाकघरात गेलो तेव्हा मांजराचा ओरडण्याचा आवाज ऐकला.

माझा अनुभव

आगाऊ कार्टा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु.भु.दे.घे. हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे. मे महिन्याचे दिवस होते. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. दिवसभर नुसते उंडराणे, कैर्‍या, चिंचा धोंडे मारुन पाडून खाणे आणि गावभर गजाली करत हिंडणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशातच एक दिवस बातमी समजली की आमच्या गावाजवळच्या जंगलात एक वाघ आला आहे. माझा भाऊ (अभिनव) सुद्धा तेव्हा आमच्याकडे आला होता. मला ही बातमी समजल्यावर मी अभिनवला म्हटले की आपण वाघ बघायला रात्री जाऊया..... पण यात एक मोठा "पण" होता.

यासुकुनी श्राईन

सहज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय.

काळ थांबला कधीचा...

राघव ·
लेखनविषय:
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

अमेरिकेची नवी वाट

आनंद घारे ·
लेखनविषय:
पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. मला अमेरिकेच्या भूगोलाची माहिती नसल्यामुळे त्याचा कांही संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत होती. न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे. आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे.

आपापले जग.

कलंत्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे. काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा. ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे. आता विषय प्रवेश. २५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग. स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा. अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग. माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना? मी : हो, माहित आहे. तो : अरे त्याचा काडीमोड झाला. मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते.

सलामत हरी राया!!!

स्वप्ना हसमनीस ·
लेखनविषय:
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत. त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात. रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात. कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

प्राजु ·
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...