माझाही अनुभव ....(तो प्रसंग कधीच विसरु शकलो नाही...)
लेखनप्रकार
नमस्कार मित्रांनो..तुमचे अनुभवाचे लेख वाचुन मला माझ्याही जीवनातील एक प्रसंग आठवला..तेव्हा मी लहान होतो...माझी आई मला नेहमी सांगायची कि आपण एखाद्याला मदद करावी..पण मी लहान होतो..जास्त लक्ष देत नव्हतो.पण आईचे संस्कार अंगिकारले होते..
....दहावीची परिक्षा जवळ आली होती ..फक्त एकच दिवस बाकी होता..आदल्या दिवशी मी दिवसभर घराबाहेर निघालो नाही..काही महत्वाचे मुद्दे वाचुन काढ्ले..डोक्यामध्ये फुल टेन्शन्..परिक्षेचा पहिला दिवस उजडला..आईने सकाळी लवकर उठवले..बाहेरच्या चुलीवर मस्तपैकी पाणी गरम केले..छान आंघोळ केली..पहिला पेपर मराठीचा होता..त्यामुळे जादा दडपण नव्हते..
हायस्कुल घरापासुन बरोबर ६ किमी अंतरावर होते..मी सायकल वरुन जायचो..आंघोळ झाल्यानंतर जेवन केले.आईच्या पाया पडलो..आणि ९.३० ला घरातुन निघालो. पेपरची वेळ ११ ची होती..एकदम फ्रेश होतो..घरापासुन सायकलवर बसलो आणि तीन चार किमी गेल्यावर सायकल पंक्चर!!! उन्हामुळे घाम सुटला होता..पण वेळ भरपुर होता .ठरवले भरभर चालत जाऊया...१०.३० ला तालुक्याला पोचलो..गावात एंट्री केली की लगेच सायकल चे दुकान होते..तो दुकानवाला ओळखीचा होता..त्याला म्हणालो..माझी सायकल पंक्चर झाली आहे..मला दुसरी सायकल दे .दुपारी परत करतो.माझ्या सायकलचे पंक्चर काढ्...त्याच्याकडे पण खुप गर्दी होती..
त्याला समजवायला १० मिनिटे गेली..त्याने परिक्षा असल्यामुळे मला सायकल दिली..तो पर्यंत सगळी मुले पण पाठीमागुन आली..वर्गातलीच दोस्त मंडळी असल्यामुळे जरा बरे वाटले..सायकल वरुन गेलो तर शाळेत १५ मिनिटात पोहोचणार होतो..त्यामुळे निम्म्यापेक्षा जादा टेंन्शन कमी झाले..उन खुप होते..घाम खुप येत होता..शाळेच्या अगोदर पंचायत समितिचे कार्यालय होते.तिथे आलो आणि एक अपंग माणुस मुलांना मदतीसाठी विनंती करत होता..त्याचे पाय खुप लहान होते..तो व्यवस्थित चालुच शकत नव्ह्ता हातात कुबड्यापण नव्ह्त्या.फक्त हातात एक काठी होती...तो मुलांना हाका मारत होता..त्याचा चेहरा फार सुकला होता.आणि त्यात मुले त्याच्याकडे बघुन हसत होती आणि पुढे निघुन जात होती..पेपर असल्यामुळे कोण जास्त लक्ष देत नव्हते..सगळे भरभर शाळेकडे जात होती..
१०.४५ वाजले होते..आमचा घोळ्का त्या माणसापाशी आला आणि तो माणुस प्रविण ला म्हणाला मला जरा एस.टी. टेशन वर सोड रे बाळा..परव्या न ऐकता पुढे निघुन गेला..
मला त्या माणसाची दया आली..पण पेपरची वेळ झाली होती...म्हणुन कोनच थांबत नव्हता..मी म्हटले काय झालं मामा..कुटं जायाच हाय तुमाला..तो म्हणाला सलगर ला.मला स्ट्यांड्जवळ सोड्..तिथे आमचे गाववाले हायेत ..मी जाईन घरी तिथुन .
मी एकदा घडाळाकडे पाहिले..आणि शाळे़कडे पाहिले..शाळा स्पष्ट्पणे दिसत होती...आणि आश्चर्य म्हणजे..पुढे गेलेली माझी सगळी दोस्त मंड्ळी बघत उभी होती..आणि त्यांच्याबरोबर्.बाकीची पोरं पण ...आमच्या दोघाकडे बघत उभे होते..
माणुस साधारण २८ ते २९ वयाचा असावा..आणि त्याला सायकलवर स्वतःला बसता पण येत नव्हते..तेव्हढ्यात एक वर्गातला दोस्त सायकल वरुन जाताना दिसला..त्याला हाक मारली...ये बबल्या ..आरं जरा हिकडं यी..जरा धरू लाग बाबा..त्ये पण कारटं न थांबता पुढेच गेले....मनात कसेतरी झाले..मग मी ताकद लावुन त्याला सायकल वर पुढच्या नळीवर बसवला..आणि आणि पुन्हा एकदा मागे वळुन पाहिले..तर काय्..सगळी पोरं माझ्याकडे बघत उभी होती...आणि पहिली गजर बेल वाजली..मग मला समजले १५ मिनिटांनी पेपर चालु होणार्..सगळी पोरं वर्गाकडे धावली.. मी सायकल स्टँड़कडे वळवली..पाच ते सात मिनिटात स्टँडवर पोचलो..त्याला खाली उतरवला..त्याने मला जास्त काहीच नाही विचारले..म्हणाला बाळ तुझं नाव काय्..मी म्हणालो ..माझे नाव राम...तु मला लय मदद कीलीस बघ्..सरकारी कामं लवकर व्हत व्हाईत बघ ..पेन्सल मिळावी म्हुन पंचायतीत आलु व्हतु..मी म्हणालो. आता मी जातो..माझा पेपर हाय्..उशीर हुईल मला..त्याचा चेहरा माझ्याकडे पाहुन खुप समाधानी होत होता...मी शाळेकडे सायकल मारली..फुल स्पीड ने..शाळेत आलो..शाळेसमोरील मैदानात कोणीच मुले दिसत नव्हती..छातीत धडधडत होते...पहिलीच बोर्डाची परिक्षा आणि हा सगळा प्रकार आजच झाला होता..घामाने फुल भिजुन निघालो होतो..पण तसाच वर्गाच्या दारासमोर गेलो..सिट नंबर बी ब्लॉक मध्ये होता हे आधीच माहित होते..बहुतेक पेपर चालु होता..असा अंदाज लागला..मला वाटले आता शिक्षकाने कारण विचारले तर काय सागायचे...पण माझी घामाने भिजलेली अवस्था पाहुन तो शिक्षक काहिच बोलला नाहि...
मला प्रश्न पत्रिका दिली आणि मी हळुहळु दबक्या पायाने हात गेलो..सगळी पोरं माझ्याकडे पेपर लिहता तिरका डोळा करुन बघत होती..मी माझा मोकळा बाक कुठे आहे ते पाहत होतो..आणि सचिन ने हात वरती केला.माझी जागा सापडली...प्रश्नपत्रिकेवर एकदा नजर फिरवली..पेपर सोपा वाटला..सगळा पेपर व्यवस्थीत लिहला..सगळ्यात शेवटी मी पेपर सबमीट केला..पेपर चांगला गेला याचे समाधान वाटले..डोक्याचा ताण कमी झाला होता..मग माझी सायकल आठवली..शाळेतुन जोरात सायकल वरुन निघालो..दोस्त मंडळी गप्पा मारत आरामात येत होती..मी न थांबता सायकल दुकानाकडे गेलो..सायकल परत करुन त्याला म्हणालो..तु जर आज मला सायकल दिली नसतीस तर मी माझा पेपर लिहलाच नसता....तो पण गंभीरपणे म्हणाला..आरं आमीबी शाळत जात हुतु की लेकाच्या..असु दे असुदे ..३ रु दे .अन तुझी सायकल घिऊन जा..
मी त्याला पैसे दिले आणि घरी निघालो..घरी गेल्या गेल्या आईने विचारले ..झाला का पयला पेपर..बरा हुता नव्ह,,,मी म्हणालो ..सोपा गेला.
आईला खुप बरे वाटले..मग मला आईने मला जेवायला वाडले..मी जेवत जेवत आईला सगळा प्रकार सांगितला..आईच्या डोळ्यातुन पाणी आले..आई म्हणाली तुला एवढी अक्कल आली कुठुन्...आईला खुप आनंद झाला होता..आणि मलाही आईचे आनंदाश्रु पहायला मिळाले..सुट्टीचे दिवस असेच निघुन गेले..आणि मी तो प्रसंग पुर्णपणे विसरुन गेलो होतो..
आणि तो दिवस उजाडला.त्या दिवशी परिक्षेचा निकाल होता...मी परिक्षा खुप प्रामाणिकपणे दिली होती.विशेष म्हणजे कॉपी न करता ..तसा लहानपणा पासुन शाळेत हुशार होतो .शाळेत सगळी दोस्त मंड्ळी भेटली..सवे मुलाना शाळेच्या व्हरांड्यात बसवले..शिदे सर सर्वांचे लाडके होते..ते निकाल वाटत होते..पास झालेल्या मुलांची टक्केवारी आणि नावे सांगत ...मुले आपापले नाव वाचले की शांतपणे निकालपत्रक घेऊन परत जागेवर बसत्..माझे नाव वाचले..काळीज धडधड करु लागले..आणि कानावर आले..५३ टक्के मिळाले पास झाला...मग जरा मी शांत झालो..शेतकर्याचा मुलगा होतो.शेतातली कामे करुन आभ्यास केला होता..त्यामुळे मिळालेल्या गुणामघ्ये समाधान होतो..सगळ्यांचा निकाल समजला..माझ्या ग्रुप मध्ये मीच टॉप होतो..बाकी सगळी पोरं ४५..४४..३८. टक्के ह्या लेवल मध्ये होती..
आणि बरीच मुले नापास झाली होती..तेवढ्यात विकास आला ..आणि तो नापास झाला होता..तो म्हणाला.."आयला रामानं त्या पांगळ्या माणसाला मदद केल्यामुळे ..त्याच्या आशिर्वादाने हा पास झाला बघ."..आणि मला तो सगळा प्रसंग पुन्हा आठवला..
ती गोष्ट मी आजपर्यंत विसरलेलो नाही..
जेव्हा जेव्हा मला त्या प्रसंगाची आठवण येते..मनाला समाधान वाटते.......तो प्रसंग मनात घर करुन बसला आहे......आणि आज मिपामुळे मला पुन्हा हा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला..
मिपामुळे मला खुप चांगले लेख वाचायला मिळतात..
मी मि.पा. चा मनापासुन आभारी आहे..
राम दादा..
वाचने
11297
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
वा वा
गरजवंत.....
छान
आपला
खूपच वेगळा अनुभव
हे एक
In reply to हे एक by रेवती
ठ्ठो..... ५
अतिशय हृद्य प्रसंग!
.."आयला
अभिनंदन
छान प्रतिक्रिया..
मस्त
वा.....!!
बाण मदन