Skip to main content

अनुभव

एक उनाड दिवस .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 29/12/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार : दिनांक १९/१२/२००९ सौभाग्यवती गुरूवारीच सोलापूरी, माहेरी गेलेल्या होत्या. त्यामुळे यावेळच्या विकांताचे आमचे प्लानिंग सॉलीड ठरवले होते. म्हणजे शनिवारी पहाटे १० वाजता उठायचे. मग चहा करुन घ्यायचा. त्याप्रमाणे उठलो. चहाचा (करायचा) कंटाळा आल्याने नुसतेच थंडगार दुध घशाखाली उतरवले. नाष्ट्याला काय बनवावे बरे? :/ पोहे, उप्पीटाचा कंटाळा आलाय. मॅगी नावाच्या शेवया मला आवडत नाहीत. घरातली पास्त्याची पाकीटे संपलेली. आधी विचार आला की पनीर पकोडे वगैरे काहीतरी मस्त चमचमीत करुन खावे. पण फ्रीज उचकला तेव्हा लक्षात आले की फ्रीज मध्ये पनीरच काय, साध्या हिरव्या मिरच्याही नाहीत. :T .

सांगा पतंग कुणी हा पाहिला?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 25/12/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
सांगा पतंग कुणी हा पाहिला? संक्रांतीचे दिवस जसे जवळ येतात तसे पतंग उडवण्याचेही दिवस येतात. काही ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवायला सुरूवात करतात. पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण लुटतात. या आनंदाच्या वेळी अनेक वेळा अपघात होतात व अनेक जण आपल्या प्राणाला मुकतात. मी पतंगामुळे होणार्‍या नेहमीच्याच अपघातांबद्दल- जसे वीज वाहक तारेला स्पर्श होणे, उंच इमारतीवरून पडणे आदी.- बोलणार नाही. हे असले अपघात पतंग उडवणार्‍यांना होतात. पतंग उडवणारे जर काळजी घेवून उडवत नसतील तर होणार्‍या परिणामांना तेच जबाबदार असतात. हे ठिक आहे.

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

लेखक दशानन यांनी सोमवार, 21/12/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा.

होतं असं कधी कधी...

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 18/12/2009 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका.

लोह्गडचा ट्रेक .

लेखक मॅन्ड्रेक यांनी गुरुवार, 17/12/2009 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार राजमाची येथील यशस्वी ट्रेक नंतर प्रोत्साहित होऊन आमचा - (team elegance) पुढचा ट्रेक लोहगड येथे निश्चित झाला शनिवारी ठरल्याप्रमाणे दुपारी १ वाजता ७ जण जमले. अनपेक्षितपणे आयत्यावेळि १ वीर यायला तयार झाले ( डॉ आनंद नातू)अखेर स्कोर्पिओ मध्ये सामानसुमान कोंबून दाटीवाटीने - ८ जणांची टीम ३ वाजता लोणावळ्याकडे निघाली . मळवली येथे १ फक्कडसा चहा पिऊन आम्ही लोहगडाकडे कूच केले.(वेळ सायंकाळचे ५) खडकाळ रस्ता , वेडीवाकडी वळणे, उंचसखल टेकड्या पार करत आम्ही पुढे जात असतानाच एका वळणावर नान्दिबैलानी हल्ला बोल केले सर्वात पुढे असलेला वीर - नावात अजिंक्य असले तरीही - हरला .

लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...

लेखक दशानन यांनी गुरुवार, 17/12/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा घ्यावा म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला छोटासाच. बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर आत गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम.

भिगवणचे परदेशी पाहुणे

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.

घ्या..... केळी..........

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 15/12/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत बरेचदा शब्दार्थामुळे काय च्या काय अनर्थ होतात. पण केवळ एखादा शब्दार्थ संप मोडून काढू शकतो हा अनुभव मात्र न भूतो भविष्यति. सामान्यतः एखाद्याला नारळ देणे या वाक्प्रचाराचा अर्थ निरोप देणे काढून टाकणे असा होतो. हात हलवत जाणे म्हणजे रिकाम्या हाताने परत येणे/पाठवणे असा होतो. वाटाण्याच्या अक्षता कोणी पाहिल्यात कोण जाणे पण मराठी भाषेत त्या बरेच महत्वाचे स्थान मिळवुन आहेत. नारळ ,वाटाणे, चणे ,अक्षता, हळद फुटाणे वगैरे कठीण पदार्थ सुद्धा वाक्प्रचारात आले की अनर्थ घडवतात. मिरच्या या वाक्प्रचारातही तिखटपणा सोडत नाहीत. फक्त त्या तोंडाऐवजी नाकाला झोंबतात.