Skip to main content

अनुभव

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

लेखक दशानन
Published on सोमवार, 21/12/2009
शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा.

होतं असं कधी कधी...

लेखक अनामिक
Published on शुक्रवार, 18/12/2009
मी अगदी लहान होतो तेव्हा बाबांबरोबर घडलेली गोष्टं (मी ऐकलेली). माझ्या दादाचं शाळेत नाव घालायचं होतं म्हणून बाबा गावातल्याच शाळेत गेले. तिथले कर्मचारी, शिक्षक तसे ओळखीचेच होते, त्यामुळे आधी गप्पा झाल्या आणि नंतर दादाच्या नाव नोंदणीचा फॉर्म भरायला घेतला. त्यात मुलांचं नाव काय असं विचारलं आणि बाबा गोंधळात पडले... घरी दादाला 'दादा'च म्हणत होते सगळे आणि त्यामुळे बाबा त्याचं नावंच विसरले होते... झाली का पंचाईत! सगळे कर्मचारी हसायला लागले.... नाव काही केल्या आठवेना... तेव्हा लोकांसमोर हशा तर झालाच, पण घरी नाव विचारायला आल्यावर काय झालं ते विचारू नका.

लोह्गडचा ट्रेक .

Published on गुरुवार, 17/12/2009
नमस्कार राजमाची येथील यशस्वी ट्रेक नंतर प्रोत्साहित होऊन आमचा - (team elegance) पुढचा ट्रेक लोहगड येथे निश्चित झाला शनिवारी ठरल्याप्रमाणे दुपारी १ वाजता ७ जण जमले. अनपेक्षितपणे आयत्यावेळि १ वीर यायला तयार झाले ( डॉ आनंद नातू)अखेर स्कोर्पिओ मध्ये सामानसुमान कोंबून दाटीवाटीने - ८ जणांची टीम ३ वाजता लोणावळ्याकडे निघाली . मळवली येथे १ फक्कडसा चहा पिऊन आम्ही लोहगडाकडे कूच केले.(वेळ सायंकाळचे ५) खडकाळ रस्ता , वेडीवाकडी वळणे, उंचसखल टेकड्या पार करत आम्ही पुढे जात असतानाच एका वळणावर नान्दिबैलानी हल्ला बोल केले सर्वात पुढे असलेला वीर - नावात अजिंक्य असले तरीही - हरला .

लुटा मौज कराड - बौध्दकालीन लेण्यांच्या सफरीची ...

लेखक दशानन
Published on गुरुवार, 17/12/2009
कोल्हापुरहून पुण्यासाठी निघालो होतो सकाळ सकाळी. कुठेतरी चहा घ्यावा म्हणून बाईक जरा हळूच चालवत होतो तोच डाव्याहाताला एक बोर्ड दिसला छोटासाच. बौध्दकालीन लेणी व मार्गदर्शन बाण. थोडासा विचार केला व बघू म्हणून गाडी आत वळवली. काही मिटर आत गेल्यावर रस्ता संपला. आता काहीच कळेना मार्गदर्शक बोर्ड तर इकडेच रस्ता दाखवत होता मग रस्ता गेला कुठे, एक दोन जणांना विचारले तर त्यांनी एक कच्चा रस्ता दाखवला, तो रस्ता आहे हेच मला पटत नव्हते हा विषय वेगळा. पण काही किलोमीटर आत गेल्यावर एक नितांत सुंदर अशी जागा दिसते एक पाण्याचे तळे, तळ्याच्या बाजूला एक शेडवजा बांधकाम असलेले आश्रम.

भिगवणचे परदेशी पाहुणे

Published on मंगळवार, 15/12/2009
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.

घ्या..... केळी..........

लेखक विजुभाऊ
Published on मंगळवार, 15/12/2009
मराठी भाषेत बरेचदा शब्दार्थामुळे काय च्या काय अनर्थ होतात. पण केवळ एखादा शब्दार्थ संप मोडून काढू शकतो हा अनुभव मात्र न भूतो भविष्यति. सामान्यतः एखाद्याला नारळ देणे या वाक्प्रचाराचा अर्थ निरोप देणे काढून टाकणे असा होतो. हात हलवत जाणे म्हणजे रिकाम्या हाताने परत येणे/पाठवणे असा होतो. वाटाण्याच्या अक्षता कोणी पाहिल्यात कोण जाणे पण मराठी भाषेत त्या बरेच महत्वाचे स्थान मिळवुन आहेत. नारळ ,वाटाणे, चणे ,अक्षता, हळद फुटाणे वगैरे कठीण पदार्थ सुद्धा वाक्प्रचारात आले की अनर्थ घडवतात. मिरच्या या वाक्प्रचारातही तिखटपणा सोडत नाहीत. फक्त त्या तोंडाऐवजी नाकाला झोंबतात.

मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

लेखक देवदत्त
Published on शनीवार, 12/12/2009
मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे. (स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही.

मी पण पळालो...

लेखक विमुक्त
Published on गुरुवार, 10/12/2009
पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते... "पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या "हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत...