Skip to main content

अनुभव

गँग्ज ऑफ वासेपुर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 04/07/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.

गुरु पौर्णिमा

लेखक jaypal यांनी मंगळवार, 03/07/2012 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
"गुरु गोविंद दोऊ खडे, किसको लागुं पाय । बलिहारी गुरु आपने, गोविंद दिया बताय ॥" गुरु पौर्णिमेचा हा धागा माझ्या आयुष्यात आलेल्या तमाम गुरुजनांना गुरुदक्षिणा म्हणुन समर्पीत. मला असंख्य गुरु लाभले पैकी १) माझे वडील , २) माझा मित्र/गुरु सर्वकाही आणि ३) माझे ज्युडोचे शिक्षक यांचा माझ्या आयुष्यावरील प्रभाव मला वाटत मी जिवंत असे पर्यंत कायम राहणार. त्यांच्या शिकवणींची परतफेड कोणत्याही रुपाने या जन्मी शक्य नाही. १) वडिलांकडुन या व्यवहारी जगात व्यवहारी राहुनही परोपकारी कस जगाव हे शिकलो.

गेले करायचे राहूनी...

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 30/06/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव येतात, अनेक आव्हाने येतात. आपल्याला जमेल तसा त्यांचा सामना आपण करतो. कधी यश येते तर कधी अपयश. कधी नशीब साथ देते तर कधी दुर्दैव आड येते. कधी आपण आव्हानाचा धीरोदात्तपणे सामना करतो तर कधी माघारही घेतो. पण एक मात्र नक्कीच आपण नेहमी पुढे चालत असतो. अन बऱ्याच यशस्वी माणसांबद्दल बोलले जाते की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. खरंच असे काही शक्य आहे? भरपूर यश मिळालं म्हणून कुणी मागे वळून पाहतच नाही. जे आपले स्वतःचे गत आयुष्य असते त्याकडे खरंच कुणी दुर्लक्ष करू शकते?

होस्टेलमधील पहिला दिवस.

लेखक जोयबोय यांनी सोमवार, 25/06/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
सदर गोष्ट आहे दहा वर्षापुर्वीची. त्यावेळी मी नुकताच डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष मी मित्राच्या खोलीवर रहायला होतो. यावेळी मी होस्टेल्मधे राहायला लागलो. तसा होस्टेलला भीतभीत प्रवेश घेतला. कारणही तसेच होते. कॉलेज शहरापासुन थोडे लांब होते. मनुष्यवस्तीही खुप तुरळक होती. होस्टेल ज्या जागेवर बांधलेले होते तीथे पुर्वी मेलेली मानसांना पुरण्यात येत असे. इमारत बांधत असताना किमान २ सांगाडे सापडले होते. तसा भुताखेतांवर माझा विश्वास नव्हता पन होस्टेलमधील काही मुलांना विचीत्र अनुभव आले होते. त्यातले दोघे माझ्याच वर्गातले.

शाळेतील संम्मेलन..

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/06/2012 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060) वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्‍याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते. मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच.

फोटोवरून निसर्गचित्र कसे बनवावे: फोटो पाठवा.

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 21/06/2012 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
(Paintings by Claude Monet: wikkimedia) या आधीच्या धाग्यात आधी काहीही पूर्व-योजना न करता, अमूर्त चित्र बनवून त्यातून एक निसर्ग चित्र केले, आता आपण एकाद्या फोटोवरून निसर्ग-चित्र कसे बनवू शकतो, हे बघूया. परंतु यासाठी तु

काही 'जपानी' अनुभव

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 18/06/2012 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
जपान, पृथ्वीवरील एक नंदनवन! निसर्गसौंदर्याने नटलेला एक नितांत सुंदर देश. त्याहुनही महत्वाचे म्हणजे प्राचीन संस्कृती आणि सभ्यता असलेला आणि त्यांची प्रचंड निष्ठेने जोपासना करणारा एक देश. देश, समाज, देशवासीय ह्यांचे आपण काहीतरी देणे लागतो, त्यांच्यामुळेच आपण एक सुसह्य सामुदायिक जीवन जगु शकतो अशी गाढ श्रद्धा असलेले जपानी लोक. अर्थात हे सर्व, जेव्हा जपानला गेलो त्यावेळी जाणवलेले. ह्या जपानबद्दल मला लहानपणापासून एक आदर होता. सुभाषचंद्र बोस हे माझे दैवत आणि त्या दैवताला विनाअट लष्कर उभारणीसाठी मदत करणारे एक राष्ट्र म्हणून जपानविषयी एक जिव्हाळा होता.

सायोनारा s s

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 18/06/2012 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
सायोनारा s s नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते.