मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी गझल

मनातल्या मनात मी...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
मनातल्या मनात मी तुलाच गुणगुणायचे अशीच मी,कधीतरी.. तुझ्यासवे जगायचे! तुटून तारका क्षणात आसमंत लांघते उगाच रात्र-रात्र मी नभात चमचमायचे! गुलाब-पाकळ्यांतुनी तुझी गझल घुमायची उरात लाख मोगरे सुरात घमघमायचे!

सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे?

सत्यजित... ·
लेखनविषय:
हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे... सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस चांदणे? अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे? किती अरे, उरात खोल पेरतोस चांदणे! बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू... विचारताच, चोर कोण? सांगतोस..चांदणे! उनाड चंद्रमा बनून हिंडतोस रात्रभर पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे! नभात लक्ष तारका उधाणतात कैकदा मिठीत केवढे कसून घुसळतोस चांदणे! मधाळ चांद, वितळतो..रसाळ रात वाहते... असे कुण्या सुरांत रे! पुकारतोस चांदणे! —सत्यजित

'गुलज़ार'

सत्यजित... ·
लेखनविषय:
सूर श्वासांच्या लयीवर स्वार झाला पाहिजे काळजाच्या 'कोपऱ्यावर',वार झाला पाहिजे! दुःखसुद्धा एवढे तालात आले पाहिजे की सुखांचा,'उंबरा' तय्यार झाला पाहिजे! जाणिवांची ओल इतकी खोल रुजली पाहिजे जीवनाचा बाग हिरवागार झाला पाहिजे! कागदावरच्या फुलांना रंग दे,मधु-गंध दे शब्द-शब्दाचा तुझ्या 'गुलज़ार' झाला पाहिजे! शाल श्रीफळ अन् फुलांनी फार झाले आजवर चंद्र-सूर्यांनी तुझा सत्कार झाला पाहिजे! —सत्यजित

मांडतो आहे नव्याने...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे! सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!

भरवू नकात आता...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
भरवू नकात आता बाजार आरश्यांचा येथे कुणी न उरला खरिदार आरश्यांचा! अाजन्म राहिलो मी वस्तीत आंधळ्यांच्या केला कसा न जाणे,व्यापार आरश्यांचा!

तू अशी

संदीप-लेले ·
लेखनविषय:
मौन माझे तुला एवढे सांगते तू किती बोलते तू किती बोलते मैत्रिणी मैत्रिणी रोज जे बोलती फोनची कंपनी त्यावरी चालते वाजले चार रे, दे मला तू चहा मी नव्हे, तू मला, रोज हे सांगते उंट तंबू मधे, आणि उघडयात मी या कपाटात तू, वल्कले कोंबते सांगतो दुःख मी, अश्रू तू गाळते ते न माझ्यावरी, तू टिव्ही पाहते शस्त्र नाही करी, हार नाही तरी येतसे लोचनी, चक्क ब्रम्हास्त्र ते वाढले वय तसे, समज ही वाढली रात्र समजून तू, दिवसभर झोपते राग मानू नको, स्वप्न होते तुझे दिवस संपेल हा, का तरी लोळते

फुंकिले मी प्राण माझे...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
फुंकिले मी प्राण माझे,बासुरीचा सूर झाले गायचे तू टाळलेले..गीत मग मशहूर झाले! हे बरे झाले खरे तर..मी तुला मंजूर नव्हते जाहले नाही तुझी पण,या जगा मंजूर झाले! चालले होते कुठे मी? मज कुठे रस्ते कळाले? पाय जेथे थांबले ते,गाव ही निष्ठूर झाले! सांगतो आहेस आता,खूण माझ्या आठवांची पास मी होते तुझ्या तर,कोण होते दूर झाले! काजवे घेवून हाती,शोध माझ्या सावल्या तू घेवुनी हाती उन्हे मी,चांदण्याचा धूर झाले! जीवना बघ..मी तुझाही,साजरा मधुमास केला तू विखारी दंश करता,अमृताचा पूर झाले! —सत्यजित

कधी मध्यम,कधी पंचम...

सत्यजित... ·
लेखनविषय:
काव्यरस
कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला! मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला! असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!

...नवल!

सत्यजित... ·
लेखनविषय:
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!

झाली...पहाट झाली!

सत्यजित... ·
लेखनविषय:
रानात पाखरांची..चर्चा अफाट झाली उगवेन सूर्य आता ही रात्र दाट झाली! फांदीवरुन कानी येतात सूर काही मी ऐकतो भुपाळी जी चिवचिवाट झाली! गेला चुकून ताफा येथून राजशाही इतक्यात राजरस्ता ही पायवाट झाली!