मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दृष्टीकोन

पानात लपलेल्या फुलाला पाहून...

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
मला झाडावरची फुले तोडावयास आवडत नाही. मी दुसर्यान्या पण तोडू देत नाही.

आनंदयात्री

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
सरल्या साऱ्या चिंता खंती उरल्या नुसत्या खाली भिंती नाही कुणाचे उगा लोढणे दुसर्‍या साठी उगा कुढणे संपून गेले वसंत वैभव भोगत आहे शिशीराचे यौवन फणसा सारखे पिकले गरे आपण बरे,आपले काम बरे पांघरून भूत भूतकाळाचे वेध लागले भविष्याचे खेद ना खंत या भूताचा विचार आता फक्त स्वताचा आनंदयात्री या जगातील वाट चालतो अनंताची ठेऊन दृष्टी अदृष्यातील वाट पाहतो गंतव्याची

सारे प्रवासी घडीचे

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
या चंद्रमौळीत माझ्या लक्ष सुखे ऱममाण असते कधी सुखाला सांगा कुठे परिमाण जिर्ण शीर्ण झोपडीत माझ्या तिरीप कोवळ्या उन्हाची भासे जणू ही रेघ सोनसाखळी गळ्याची वाकून पाहतो हा चंद्र पौर्णिमेचा ठेवतो नजर हा थवा चांदण्याचा क्षण माझीया सुखाचे चोरावया पहातो उन्मुक्त होऊनी मी चादंण्यात नहातो घुसतो धटिंगण वारा सवे आणतो थेंब पावसाचे उध्वस्त करू पहातो साम्राज्य माझिया सुखाचे कोणी गरीब म्हणूनी हसती मजवर सारे इथे काय आहे म्हणूनी आकलेचे तोडती तारे सारे प्रवासी घडीचे सांगा कोण कुठे काय नेते समाधान हेच असते परिमाण ते सुखाचे या चंद्रमौळीत माझ्या ...... १६-१-२०२२

पुरूष एक वाल्या कोळी.

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
पुरूष एक वाल्या कोळी आयुष्यभर विणतो जाळी पापाचा घडा मात्र शेवटी त्याच्याच भाळी जाळ्यात शिकार फसेल म्हणून वाट बघत बसतो कर्तव्य पुर्तीचा भ्रम उगाच जपत आसतो पुरूष एक वाल्या कोळी..... तहान नाही भूक नही. बसला होता नाक्यावर डोक आलं जाग्यावर जेव्हाआप्तानीं मारलं फाट्यावर नारायण नारायण जाप करी नारदाची आली स्वारी ऐकुन विनंती वाल्याची म्हणती,त्रेता मधे एकच होता पुरूष एक वाल्या कोळी...... कलीयुगी सारेच वाल्या एवढे राम कोठून आणू नाही केवट नाही राम ज्याचे ओझे त्यालाच घाम कलियुग आहे बाबा, खुळ्या भ्रमात नको राहू दुसऱ्याच ओझं नको वाहू पुरूष एक वाल्या कोळी...... नारायण नारायण म्हणत गेले वाल्याचे डोके

चक्कर

अनुस्वार ·
लेखनविषय:
प्रश्न आयुष्याचा असतो उत्तर असते आयुष्याचे. आपण निव्वळ कोरे कागद नशीब छपाईच्या कामाचे. शब्दांना का कळतो अर्थ लिहिणाऱ्याच्या मनातला? अर्थ कोणता जीवनाला मग जन्म देत असे अज्ञातातला. मृत्यू म्हणजे शेवट कसला? पितरांच्या शांतीत काकही फसला. अनुभवाचे गाठोडे सोडून वर्तमानावर भूतकाळ हसला. विश्वाचे मुळ गूढ भयंकर सोबत नाही एकही शंकर. अंधाराला शोधीत भास्कर पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!

नजर..

मन्या ऽ ·
लेखनविषय:
नजर.. बालपणीचा पाऊस म्हणजे असे मजामस्ती, शाळेत जाण्याची धांदल ,वाहत्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या आणि अवखळ खेळ तारुण्यात तोच पाऊस म्हणजे गुलाबी जग सारे, प्रेमपत्र, चोरटी बावरलेली नजर आणि पावसातली ती घट्ट मिठी उतारवयात पाऊस तोच ; पण नेत्र असतात पाणावलेले, हक्काची नातीही दुरावलेली, कोणीच नसे सोबती; दोन शब्द बोलायला. पाऊस असे तोच. दरसाल तसाच बरसुन जाई वयाप्रमाणे बदलत जाई ती आहे 'नजर' पावसाला अनुभवण्याची! -दिप्ती भगत २५जून,२०१९