नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
134078
प्रतिक्रिया
637
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशी सपशेल शरणागती पत्करलीत तर
In reply to अपेक्षित प्रतिसाद आलेत, by संदीप डांगे
मोदक, आपल्यावर कोणी जसे आरोप
In reply to अशी सपशेल शरणागती पत्करलीत तर by मोदक
अहो डांगे.. शेवटी स्मायली
In reply to मोदक, आपल्यावर कोणी जसे आरोप by संदीप डांगे
स्मायली टाकून शिव्या दिल्या
In reply to अहो डांगे.. शेवटी स्मायली by मोदक
ठीक आहे, तुम्ही वरच्या
In reply to स्मायली टाकून शिव्या दिल्या by संदीप डांगे
कूपन्स
यावर आरबीआयचे माहितीपत्रक
In reply to कूपन्स by कपिलमुनी
एक वेगळा विचार
टोल नाके काल बाह्य
कसयं ना,सरकारचा निर्णय योग्य
आर्रर डब्बल झाला कि!! कृपया
In reply to कसयं ना,सरकारचा निर्णय योग्य by चेक आणि मेट
सहमत! बाकी या अशा नको त्या
In reply to कसयं ना,सरकारचा निर्णय योग्य by चेक आणि मेट
चांगले आहे की.. या मार्गाने
In reply to सहमत! बाकी या अशा नको त्या by हतोळकरांचा प्रसाद
स्वतःचे बुरखे फाटलेले दिसत
In reply to चांगले आहे की.. या मार्गाने by मोदक
गुरुजींना पुरावे द्या आधी, मग
In reply to स्वतःचे बुरखे फाटलेले दिसत by संदीप डांगे
तुम्ही तुमची सफाई द्या आधी
In reply to गुरुजींना पुरावे द्या आधी, मग by मोदक
मोदक - Thu, 01/12/2016 - 19
In reply to तुम्ही तुमची सफाई द्या आधी by संदीप डांगे
तुम्ही तुमची सफाई द्या आधी
In reply to तुम्ही तुमची सफाई द्या आधी by संदीप डांगे
श्रीगुरुजी या सदस्याला
In reply to श्रीगुरुजी या सदस्याला by संदीप डांगे
मराठी व्याकरण व व्याकरणाचे
In reply to श्रीगुरुजी या सदस्याला by श्रीगुरुजी
तुम्ही आहात काय दलाल?
In reply to मराठी व्याकरण व व्याकरणाचे by श्रीगुरुजी
तुम्ही पैसे घेऊन लिहिता का..?
In reply to तुम्ही आहात काय दलाल? by संदीप डांगे
मी नाहीच आणि कधीच नव्हतो आणि
In reply to तुम्ही आहात काय दलाल? by संदीप डांगे
या नोटाबंदिच्या पार्श्वभुमीवर
1.80 lakh ATMs recalibrated
जवळ जवळ २५ दिवसात १ लाख ८०
इथे आता भाजपविरोधी
इथे आता भाजपविरोधी
In reply to इथे आता भाजपविरोधी by संदीप डांगे
आपण काय बोलत आहात हे कळतय का ?
In reply to इथे आता भाजपविरोधी by संदीप डांगे
तुम्ही हायबरणेशन मध्ये जावा
In reply to आपण काय बोलत आहात हे कळतय का ? by सुज्ञ
वरील तीन प्रश्नांची उतारे द्या
In reply to तुम्ही हायबरणेशन मध्ये जावा by संदीप डांगे
इतका त्रास होत असेल तर या आधी
In reply to इथे आता भाजपविरोधी by संदीप डांगे
तुम्ही ठरवणार मी जे लिहिलं ते
In reply to इतका त्रास होत असेल तर या आधी by मोदक
आणि लिहिलं तर तुम्हाला
In reply to तुम्ही ठरवणार मी जे लिहिलं ते by संदीप डांगे
लॉजीकल आहे की नाही ते वाचक
In reply to तुम्ही ठरवणार मी जे लिहिलं ते by संदीप डांगे
.
कोणावर काय लिहावे याबद्दल
In reply to . by सुज्ञ
लॉजिकल नसेल तर मुद्देसूद
In reply to कोणावर काय लिहावे याबद्दल by संदीप डांगे
लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा,थोडे वरचे प्रतिसाद वाचायचे कष्ट घ्या की. उत्तरे नाहीत म्हणून संभाषणामधून तुम्ही पळ काढला आहे.लोकांना अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली तर आपल्यालाही भक्तभाट म्हटले जाईल याची शक्यता ध्यानात घेतली नसावी,भक्तभाट / भाट असे संबोधून संभाषणाची पातळी तुम्ही पहिला खालावलीत.. मग तुमच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्हाला धर्म आठवला काय..?अंधविरोधक, चष्मेधारी, पेड
In reply to लॉजिकल नसेल तर मुद्देसूद by मोदक
हा हा हा.. आणखी येवूद्यात असे
In reply to अंधविरोधक, चष्मेधारी, पेड by संदीप डांगे
नाही? उत्तर नाही? अरारारा...
In reply to हा हा हा.. आणखी येवूद्यात असे by मोदक
लॉजिकल नसेल तर मुद्देसूद
In reply to अंधविरोधक, चष्मेधारी, पेड by संदीप डांगे
लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा,यावर आपले अमूल्य ज्ञानकण शिंपडा की..वैयक्तिक हल्ल्यांना उत्तर
In reply to लॉजिकल नसेल तर मुद्देसूद by मोदक
मोदक शेट
In reply to लॉजिकल नसेल तर मुद्देसूद by मोदक
अहो ही असली प्रवृत्ती इग्नोर
In reply to मोदक शेट by सुबोध खरे
मिपाचे ठेकेदार! नमस्कार! :)
In reply to अहो ही असली प्रवृत्ती इग्नोर by मोदक
देव तुम्हाला खोटे न
In reply to मिपाचे ठेकेदार! नमस्कार! :) by संदीप डांगे
देव तुम्हालाच सर्व बुद्धी
In reply to देव तुम्हाला खोटे न by मोदक
देव तुम्हालाच सर्व बुद्धी
In reply to देव तुम्हालाच सर्व बुद्धी by संदीप डांगे
"इतके दिवस प्रतिसाद देताना
In reply to देव तुम्हालाच सर्व बुद्धी by सुबोध खरे
=))
In reply to देव तुम्हालाच सर्व बुद्धी by संदीप डांगे
सहमत आहे
In reply to मोदक शेट by सुबोध खरे
संपादकांच्याच धाग्यावर काय
१. Demonetisation: 27 senior
त्यानंतरही, इतर अवैध संपत्ती
In reply to १. Demonetisation: 27 senior by डॉ सुहास म्हात्रे
त्यानंतरही, इतर अवैध संपत्ती (जमीन, रियल इस्टेट, सोने, इतर प्रकारची बेनामी संपत्ती, इ) बाहेर काढायला सरकार इतर काही उपाय पोतडीतून बाहेर काढेल ही भिती नव्हे तर दाट शक्यता आहेच.हे नक्की होईल. फक्त पुढील सर्व धोरणांमध्ये आणखी चांगल्या अंमलबजावणीची तरतूद केली जावी..!यातल्या अंमलबजावणीमधल्या तृटी
In reply to त्यानंतरही, इतर अवैध संपत्ती by मोदक
या कारवाईतल्या अंमलबजावणीमधे
In reply to यातल्या अंमलबजावणीमधल्या तृटी by डॉ सुहास म्हात्रे
या कारवाईतल्या अंमलबजावणीमधे तृटी राहण्याचे मुख्य कारण "सर्वंकश गुप्तता राखण्याची कळीची आवश्यकता" हे होते.खरे तर, "सर्वंकश गुप्तता राखण्याची कळीची आवश्यकता" हे कारण पाहता त्या तृटी नसून "न टाळता येण्याजोगा नाईलाज (कन्सट्रेन्स)" होता, असे म्हणणे जास्त संयुक्तीक होईल.पॉल क्रुगमन ह्यांच्यासारख्या
पाठवायला माझी हरकत नाही.
In reply to पॉल क्रुगमन ह्यांच्यासारख्या by संदीप डांगे
Income Tax department rejects
हे तुमच्या मनातले मांडे आहेत
In reply to Income Tax department rejects by डॉ सुहास म्हात्रे
सेकंदभर विचारात पाडलं होतत !
In reply to हे तुमच्या मनातले मांडे आहेत by अर्धवटराव
अर्धवटराव,
अर्धवटरावांचा प्रतिसाद
In reply to अर्धवटराव, by गामा पैलवान
भूल गये हम ....
In reply to अर्धवटरावांचा प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
नोट बंदी च्या आड मोदी विरोध
केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे !
सरकारने market stabilization
खोट्या भारतीय नोटांचा प्रवास.
टोलचा झोल ?
महाराष्ट्रात टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांनी सरकारकडे ३ आठवडे टोल वसुली बंद ठेवण्यात आली म्हणून १२५ कोटीची नुकसान भरपाई मागितली आहे.. कमाल आहे ना... म्हणजे विचार करा जर ३ आठवड्यात १२५ कोटी रूपये वसुली होत आहे तर एका महिन्यात जवळपास १६६ कोटी रुपये आणि एका वर्षांत अंदाजे १९९२ कोटी रुपये रोख स्वरूपात जमा केली जाते.. अशी टोल वसुली वर्षानुवर्षे चालूच आहे.. म्हणजे विचार करा खरा काळा पैसा कोणाकडे आहे..वर्षाला अंदाजे १९९२ कोटी रुपये खर्चून सर्व सामान्य जनतेला रस्त्यावर कोणत्या सुविधा मिळतात..?? या व्यतिरिक्त आपण नविन वाहन खरेदी करताना कराच्या स्वरूपात हजारो लाखो रुपये रक्कम जमा करतो त्याचा हिशोबच नाही..आता टोल वसुली कंपन्यांनी वरील तीन आठवड्यांचे न मिळालेल्या उत्पन्नाचा लेखाजोखा, त्यांनी पूर्वीच्या करविवरणांत दाखविलेल्या उत्पन्नाशी ताडून, बरेच काही सत्य बाहेर काढायला मदत होईल. बघुया काय होते ते !