Skip to main content

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 14/11/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !

वाचने 134078
प्रतिक्रिया 637

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

मोदक, आपल्यावर कोणी जसे आरोप करू नये असे आपल्याला वाटते तसे आरोप दुसऱ्यावर करू नये असा शहाणपणा आपण काही दिवस आधी इथेच कुठेतरी शिकवत होतात, विसरलात काय?

In reply to by संदीप डांगे

अहो डांगे.. शेवटी स्मायली टाकल्या आहेत त्यांच्याकडे पण बघा हो. थोडे तरी हलके घ्या की. ;) असो, वाईट वाटले असेल तर बाकीच्या प्रतिसादांचा योग्य प्रतिवाद करा. तुमचे चुकले असेल तर मान्य करा. मिपाकर सूज्ञ आहेत तसेच मनाने मोकळे ढाकळेही आहेत.

In reply to by संदीप डांगे

ठीक आहे, तुम्ही वरच्या प्रतिसादांचा प्रतिवाद करा मग मी माझे विधान स्मायल्यांसह परत घेतो.

टोलनाक्यावर आता कूपन्स ! अशी कूपन्स देणे म्हणजे पॅरॅलल करन्सी निर्माण केल्यासारखे आहे आणि अशा कूपन्सची सक्ती चुकीची आणि बेकायदेशीर आहे . कारण ही कूपन्स सार्वत्रिक स्विकार्ह नसणार आहेत

मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले ५०० / १००० च्या नोटा बंद झाल्याने बर्याच लोकांना (ज्यांच्याकडे ह्या नोटांचा साठा ( अवैध संपत्तीच्या रुपाने) त्यांना त्रास झालेला आहे.ते लोक ह्या नोटा अवैध मार्गाने बदलण्यासाठी कोणाच्याही मागे लागण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थीतीत नातलग, ओळखीचे वैगेरे लोक पैसे बदलवुन घेण्यासाठी भाजपाच्याच सत्तेत असलेल्या लोकांवर प्रेशर आणुन शकतात व सत्तेतले लोक ह्याला बळी पडु शकतात. सरळ नकार देण भारतीयांना सहज जमत नाही. त्यामुळे मोदीजीनी वॉर्निंग दिलेली असु शकते. ८ नोव्हेंबर नंतर मोदीजी तडक जापानला गेले तेथुन आले ते गोव्याला. त्या कार्यक्रमात एक विषेश घटना घडली होती जी काही लोकांच्याच लक्षात आली असावी. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर हात जोडुन काहीतरी अजिजी पंतप्रधानांच्या समोर करत होते. अगदी लोटांगण घालायच्या परिस्थीतीत आले होते. पंतप्रधानांनी त्यांना सरळ इग्नोर केल होत. हे सर्व कॅमेरात रेकॉर्ड आले. अश्या अजिजीच कारण काय असावा ?

सरकार भारत भरातील टोल नाके बंद करुन त्याजागी प्रत्येक गाडीवर रेडिओ फ्रिक्वेंसीवर चालणारे आयडी चिकटवुन त्या द्वारे टोलचा डायरेक्ट भरणा करणार आहे. प्रत्येक गाडी वर असा आयडी असेल. आपण आपल्या खात्यात टोल ला लागणारे पैसे ठेवायचे, आयडी ह्या खात्याला लिंक असणार आहे. टोलच्या जागी पास होताना आयडी मार्फत टोल आपोआप कापला जाईल. टोल भरण्यासाठी थांबायची गरज उरणार नाही, गतीरोध उरणार नाही. ब्रेक फ्री जर्नी होईल. सरकारच्या वृत्ता नुसार ह्या रेडीओ आयड्या प्रत्येक गाडीवर बनताना कंपनी तर्फेच लावुनच गाडी मार्केटला येईल.

कसयं ना,सरकारचा निर्णय योग्य आहे असे सर्वचजण म्हणतात पण काहीजण अंमलबजावणीमधल्या त्रुटींचे विश्लेषण करतात. आता विरोध करणार्या लोकांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं याचं एक उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी संजय आवटे(साम मराठी) यांनी आपल्या फेसबुकवर "urjit patel missing" असा काहितरी dp ठेवला होता,आता त्यांनी तो बदलला आहे हि गोष्ट निराळी! पण यातून त्यांच्या मनोदशेचा अभ्यास करता येतो. ते असं कि आपलं वार्तांकन कुणी ऐकत नाही,ऐकलं तर ते कोणाला पटत नाही,आपण ज्या पक्षाला कायम विरोध करतोय तो तर वाढतच चालला आहे,नगरपालिका निवडणूकांमध्ये मिळालेलं अनपेक्षित यश तसेच झुकाव असलेल्या पक्षाची पीछेहाट,लोकांचा नोटबंदीला असणारा सपोर्ट,तसेच विरोधकांच्या आंदोलनात नसलेली हवा त्याला जनतेनं दाखवलेला ठेंगा त्यातून झालेला त्यांचा पोपट, आणि आपले विचार कोणी स्वीकारत नाहीत,इत्यादी सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून अशा मंडळींना जोरात फ्रस्टरेशन आलेलं आहे,तर त्यातूनच त्यांचा असा पोकळ विरोध सुरू असतो.शेवटी यामध्ये psychological factor's काम करत आहेत त्यात त्यांचा काही दोष नाहीये म्हणा.पण फ्रस्टरेशनचा ज्वर बाकि हाय लेवलवर आहे हे मात्र नक्की. (पत्रकार मंडळींमध्ये इकडचे आणि तिकडचे असे दोन्ही प्रकार आहेत,पण सरकारविरोधींचा सूर थोडा जास्तच जोरकस आहे,पण त्यांना अपयश येत आहे.) ---मोदीभाट,केजरीभाट,गांधीभाट (खोबरं तिकडं चांगभलं)

In reply to by चेक आणि मेट

सहमत! बाकी या अशा नको त्या ठिकाणी केलेल्या पोकळ विरोधामुळे हळूहळू सर्वसामान्यांचं मत "हे विरोध करत आहेत म्हणजे सरकार काहीतरी चांगलं करतंय" असं होऊ नये म्हणजे मिळवली.

In reply to by मोदक

स्वतःचे बुरखे फाटलेले दिसत नाहीत, लोकांचे बघण्याची फार हौस असते काही लोकांना, मोदकशेठ! :)

In reply to by संदीप डांगे

तुम्ही तुमची सफाई द्या आधी
ते तुम्ही आणि मोदकशेठ बघून द्या. पण तुम्ही माझ्याविरूद्धचे पुरावे कधी देताय?

In reply to by संदीप डांगे

श्रीगुरुजी या सदस्याला प्रतिसाद देतांना भाजप चे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली, तुम्ही आहात असे कधी म्हटले? तुम्ही अंगावर कशाला घेताय?
संपूर्ण प्रतिसाद मला उद्देशून आहे प्रतिसादात दोन वेळा माझे नाव घेऊन माझ्यावर टीका केलेली आहे. तरीसुद्धा दलाल हा शब्द मला उद्देशून नाही अशी वकिली मखलाशी सुरू आहे. शेवटी शेपूट घातलीच तर.

In reply to by श्रीगुरुजी

मराठी व्याकरण व व्याकरणाचे नियम समजत असाल अशी अपेक्षा आहे. स्वतःच लिहिलेले खालील वाक्य नीट वाचा.
श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
यातील पहिली आणि शेवटची ओळ एकाच वाक्याचा भाग आहेत. वाक्याचा शेवटचा भाग हा पहिल्या वाक्याचाच भाग आहे. यात पूर्णविराम कोठेही नसून फक्त स्वल्पविरामच शेवटी असल्याने पहिले वाक्य "येवो" या शब्दानंतर संपलेले नसून पुढील भाग हा पहिल्या वाक्याचाच भाग आहे. तुम्ही वकिली मखलाशी सुरू केल्याने नाईलाजाने हे सांगावे लागत आहे.

In reply to by संदीप डांगे

मी नाहीच आणि कधीच नव्हतो आणि कधीही नसेन. तुम्ही मात्र बेधडक माझ्यावर दलाल असण्याचा आरोप करून मोकळे झालात आणि आता वकिली मखलाशी करून "मी नाही बाई त्यातली" अशा धर्तीवर अंग काढून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे.

या नोटाबंदिच्या पार्श्वभुमीवर मी एका लेखमालीकेची आतुरतेने वाट पाहतोय. "महिंद्रा ट्रक,वीस लाख,एक सरदार आणी मी- भाग १.,२,३,........." (संबधितांनी हलके घ्यावे,सध्या बरच काही जड झालय.)

जवळ जवळ २५ दिवसात १ लाख ८० हजार एटीएम ना रिकॅलिब्रेट करण हे कठीण काम एटीएम कंपन्यांनी करुन दाखवल आहे, त्या विरुद्ध बँकेतील अधिकार्याच्या संगनमताने सरकारातल्या ऊच्च अधिकार्यांनी आपले काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग सुरुच ठेवलेला दिसतोय, अजुनही काही लोकांना पैसे बदलुन मिळतील का असा फोन येतो असे समजले आहे. सरकारने अश्या उच्च अधिकार्यांना अगोदर नोटबंदीची कल्पना दिली असती तर काळा पैसा कुठेच दिसला नसता, आता ह्या पुढे ही पकडलेल्या ५००/१००० चलनी नोटांवर/लोकांवर वेळीच योग्या कठोर कारवाई करण्यास सरकारातील उच्च अधिकार्यांनी योग्यते सहकार्य करावे, अन्यथा नोटबंदीसारखा ईतका मोठा उपद्वाप फोल ठरेल.

इथे आता भाजपविरोधी विचारसरणीच्या लोकांनी येऊ नये म्हणून सर्रास धमक्या दिल्या जात आहेत, तरी संस्थळांचे चालक मालक यांना हा प्रकार आणि हि धोरणं चालत असतील तर स्पष्ट करावे. कम्पूबाजीच्या जिवावर बुलिंग चालू आहे. माझ्यावर पैसे घेऊन प्रतिसाद देत असल्याचे आरोप करणारे भाजपचे पेड सदस्य आहेत हे समजायला आता हरकत नाही. विरोध अजिबात सहन होत नाही हे खरे दुखणे यानिमित्त बाहेर पडले आहे, चालू द्या.

In reply to by संदीप डांगे

इथे आता भाजपविरोधी विचारसरणीच्या लोकांनी येऊ नये म्हणून सर्रास धमक्या दिल्या जात आहेत, तरी संस्थळांचे चालक मालक यांना हा प्रकार आणि हि धोरणं चालत असतील तर स्पष्ट करावे.
भाजपचे द्लाल इथे मिपावर नकोत असे तुम्हीच म्हटला होता ना? तुम्हाला भाजपचे पेड विरोधक म्हटले तर चालेल का? भाजपने घेतलेले चांगले निर्णय अजिबात सहन होत नाहीत हे खरे दुखणे यानिमित्ताने बाहेर पडले आहे, चालू द्या.

In reply to by संदीप डांगे

इथे आता भाजपविरोधी विचारसरणीच्या लोकांनी येऊ नये म्हणून सर्रास धमक्या दिल्या जात आहेत कोणी तुम्हाला धमक्या दिल्या हो ? आणि इथे येऊ नका अशा ?? आणि ते हि तुम्ही भाजपविरोधी वगैरे आहेत म्हणून ? इथे या नाहीतर येऊ नका कोणाला काय फरक पडतो तुमचा ? त्यानिमिताने तुम्ही स्वतः भाजपविरोधी आहेत हे काबुल केल्याबद्दल अभिनंदन. नाही उगाच कुंपणावर बसून लोकांना स्वतः तटस्थ असल्याच्या शेंड्या लावत होता तर इतके दिवस

In reply to by संदीप डांगे

वरील तीन प्रश्नांची उतारे द्या. चवथ्या प्रश्नाचे खरे उत्तर दिलेत तरीही चालेल. आमची काळजी सोडा

In reply to by मोदक

तुम्ही ठरवणार मी जे लिहिलं ते लॉजिकल आहे की नाही? सरळ सांगा ना सरकारविरोधी, भाजप विरोधी लिहू नका म्हणून..

In reply to by संदीप डांगे

लॉजीकल आहे की नाही ते वाचक ठरवतीलच हो.. पण कधी..? तुम्ही उत्तरे दिलीत तर. तुम्ही आरोप करून पळ काढता. उत्तरे द्यायचे कष्ट घेत नाही हे मिपावर कितीतरी ठिकाणी सिद्ध झाले.

नक्की काय म्हणायचे आहे आपल्याला ? म्हणजे सरकारविरोधी लिहिलेले सगळे लॉजिकल का इल्लोजिकल ? का आपण सरकार विरोधी लिहिता म्हणून ते सगळेच लॉजिकल ?

In reply to by सुज्ञ

कोणावर काय लिहावे याबद्दल दबाव आणणे याला आक्षेप आहे, मी लिहितो किंवा कोणी काय लिहितो हे वाचकांना ठरवू देत कि लॉजिकल आहे की नाही ते... लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा, लोकांना अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली तर आपल्यालाही भक्तभाट म्हटले जाईल याची शक्यता ध्यानात घेतली नसावी,

In reply to by संदीप डांगे

लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा, थोडे वरचे प्रतिसाद वाचायचे कष्ट घ्या की. उत्तरे नाहीत म्हणून संभाषणामधून तुम्ही पळ काढला आहे. लोकांना अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली तर आपल्यालाही भक्तभाट म्हटले जाईल याची शक्यता ध्यानात घेतली नसावी, भक्तभाट / भाट असे संबोधून संभाषणाची पातळी तुम्ही पहिला खालावलीत.. मग तुमच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्हाला धर्म आठवला काय..?

In reply to by मोदक

अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली कोणी??? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ...

In reply to by मोदक

नाही? उत्तर नाही? अरारारा... आता कसं व्हायचं? =)) ज्याला कुणाला इण्टरेस्ट असंल की बॉ नोटाबंदीच्या चर्चा सुरु झाल्यापासून इथे 'मी कोणालाही भक्तभाट म्हणण्याआधी' विरोधी मत प्रदर्शित करणारांना "अंधविरोधक, पेड प्रतिसादक, काळे-पिवळे चष्मेवाले" असे आधी म्हटले गेलेच नाही त्यांनी उत्खनन करुन घ्यावे. अजुनही प्रतिसाद तिथेच असतील. "अंधविरोधक, पेड प्रतिसादक, काळे-पिवळे चष्मेवाले" असे मिपाकरांना नाही तर बहुतेक परग्रहावरच्या लोकांना उद्देशून म्हटले गेले म्हणुन कोणी इतकं मनावर घेतलं नसेल. पण भक्तभाट म्हटल्यावर मात्र जखम चिघळली... =)) =))

In reply to by मोदक

वैयक्तिक हल्ल्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यालाच आपण लॉजिकल प्रतिवाद म्हणत असाल तर धन्य आहे. फक्त गा.पै. यांचा प्रतिसाद सुयोग्य प्रतिवाद म्हणावा असा होता, बाकी नुसता थयथयाट... इग्नोर पक्शी फाट्यावर मारले. बाकी, पळ काढला, उत्तर दिले नाही, इत्यादी गमजा म्हणजे मनातले मांडे, खुशाल खावे ज्याला पाहिजे तितके.

In reply to by मोदक

मोदक शेट तुम्हाला तुमचाच प्रतिसाद परत देतो आहे. कशाला पातळी सोडताय? डांगे अण्णांना सवय आहे कि बेफाट आणि बेजबाबदार विधाने करायची आणि त्याला उत्तर देता आले नाही कि गिगा बायटी प्रतिसाद द्यायचा आणि गोल फिरत राहायचे. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ते कधीही चूक नसतातच. गेल्या काही दिवसात पाहिलंत तर मी, डॉक्टर सुहास म्हात्रे, तुम्ही, श्री गुरुजी, सुज्ञ अशा अनेक लोकांशी यांचे भांडण चालू आहे आणि ते वैचारिक भांडण नसून केवळ बेफाट आरोप केल्यामुळे आहे. तेंव्हा सोडून द्या.( पातळी नव्हे वाद घालणे)

In reply to by सुबोध खरे

अहो ही असली प्रवृत्ती इग्नोर केले की आम्ही जिंकलो म्हणून उड्या मारत बसणार, म्हणून बुरखे फाडून दुर्लक्ष करावे असे ठरवले. वाद घालण्यात मलाही रस नाही, पण जगात फक्त मलाच सगळ्या गोष्टींचा फर्स्टहँड अनुभव आहे अशा थापा मारत फिरवलेला वीस लाखाचा ट्रक किमान मिपावर चालणार नाही इतके कळाले तरी बास आहे..! तुमच्या सल्ल्यानुसार आता दुर्लक्ष करत आहे.

In reply to by संदीप डांगे

देव तुम्हाला खोटे न लिहिण्याची सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला बालदिनाच्या शुभेच्छा. =))

In reply to by मोदक

देव तुम्हालाच सर्व बुद्धी प्रदान करून गेलाय, त्यामुळे नवीन स्टॉक येईपर्यंत आम्हाला झेलावं लागेल. फुकट फौजदारी, ठेकेदारी, दादागिरी, धमकीबाजी सोडाल त्या दिवसासाठी बेस्ट लक!

In reply to by संदीप डांगे

देव तुम्हालाच सर्व बुद्धी प्रदान करून गेलाय, त्यामुळे नवीन स्टॉक येईपर्यंत म्हणजे तुम्ही हा स्टॉक येईपर्यंत बुद्धी न वापरता प्रतिसाद देणार कि काय? ह. घ्या.

१. Demonetisation: 27 senior bank officials suspended to check corrupt practices २. Income tax department keeping an eye on all suspect money trails, warns finance ministry आता या जाळ्यात सापडलेल्या लोकांच्या तपासणीत सापडलेले धागेदोरे मुख्य गुन्हेगारांकडे नेतील ! अती-आत्मविश्वासी काळाबाजारवाले अलगद आयकर विभागाच्या जाळ्यात सापडतील असेच दिसत आहे ! ३. Businessman declares Rs 13,000 crore under disclosure scheme, fails to pay tax हा माणूस आपली अवैध संपत्ती सीएकरवी ३० सप्टेंबरला जाहीर करून त्याला त्यावेळच्या कायद्याने मिळालेली सूट मिळूनही तो सद्या गायब आहे. याचा एक अर्थ असा असू शकतो की, त्याच्या चौकशीत (जाहीर केलेल्या उत्पन्नाचेही स्त्रोत विचारण्याचा हक्क आयकर विभागाला असतो) अजून ज्यांची नावे बाहेर येऊ शकतील त्यांचा त्याच्यावर दबाव आला असावा. तरीही, सीएच्याकडे असलेल्या माहितीवरून बरेच काही धागेदोरे बाहेर येतीलच. यापुढे, सरळ सर्व अवैध संपत्ती जाहीर करून नवीन वियमांप्रमाणे दंड स्विकारावा अथवा सर्व वैध नोटा गुप्तपणे नष्ट कराव्या हेच दोन जरा बरे पर्याय काळ्या नोटा जवळ असलेल्यांच्या समोर आहेत. त्यानंतरही, इतर अवैध संपत्ती (जमीन, रियल इस्टेट, सोने, इतर प्रकारची बेनामी संपत्ती, इ) बाहेर काढायला सरकार इतर काही उपाय पोतडीतून बाहेर काढेल ही भिती नव्हे तर दाट शक्यता आहेच. आता दिलेल्या मुदतीत सगळे उघड केले नाही तर, "कायद्याची तलवार सतत डोक्यावर लटकत आहे" ही भिती सतत मनात असलेले असह्य जीवन जगावे लागेल !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यानंतरही, इतर अवैध संपत्ती (जमीन, रियल इस्टेट, सोने, इतर प्रकारची बेनामी संपत्ती, इ) बाहेर काढायला सरकार इतर काही उपाय पोतडीतून बाहेर काढेल ही भिती नव्हे तर दाट शक्यता आहेच. हे नक्की होईल. फक्त पुढील सर्व धोरणांमध्ये आणखी चांगल्या अंमलबजावणीची तरतूद केली जावी..!

In reply to by मोदक

या कारवाईतल्या अंमलबजावणीमधे तृटी राहण्याचे मुख्य कारण "सर्वंकश गुप्तता राखण्याची कळीची आवश्यकता" हे होते. ९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या केवळ २३ दिवसांच्या कालखंडात एन्सीआर या कंपनीने ९०% एटीएम मशीने रिकॅलिब्रेट केली. ८ नोव्हेंबरपूर्वी पूर्वी हे केले असते किंवा बॅंकांना त्या कारवाईत करायच्या कामाची माहिती पुरवली असती तर त्या कारवाईचा वास आलेल्या काळाबाजार्‍यांनी आणि त्यांनी फितवलेल्या बँक मॅनेजर्सनी मिळून कारवाईतली सर्व हवाच काढून टाकली असती. यापुढच्या पुढच्या सर्व पायर्‍यांना त्या स्तराच्या अती-गुप्ततेची गरज राहणार नाही कारण आता सरकारचा मूळ उद्येश उघड झालेला आहेच (कॅट इज आऊट ऑफ द बॅग). हे न समजण्याइतके काळाबाजारी निर्बुद्ध नाहीत. यापुढे सरकारला वॉटरटाईट प्रणाली तयार करून व पुढच्या कारवाईतून सुटून जाण्याचे प्रयत्न करणार्‍यांना पकडण्यासाठी बिनाभोकांची जाळी पेरून, मगच पुढच्या कारवायांची सुरुवात करावी लागेल. आता, पायाभूत व्यवस्था तयार झाल्यावर, काळ्या अर्थकारणाविरुद्धच्या अनेक कारवाया समांतरपणे चालू झाल्या नाही तरच मला आश्चर्य वाटेल. यानंतरही, छोट्यामोठ्या समस्या येणारच, त्यांना प्लॅनिंगमधल्या चुका समजले जात नाही, हे कोणीही समतोल प्लॅनिंग तज्ज्ञ सांगेल. कारण आपल्याला फायदेशीर असलेल्या वातावरणात अंमलबजावणी होणार्‍या कोणत्याही प्रकल्पांतही समस्या येण्यासाठी "अज्ञात अज्ञात (unknown unknown)" कारणे असतात. इथे तर, ७० वर्षे उलटसुलट कारवायांचा अनुभव असलेले व त्यांना सार्वजनिक-खाजगी क्षेत्रांत मदत केलेले, अनेक हितसंबंधी विरोधात उभे आहेत... ही काही कमी स्तराची समस्या नाही... त्यांच्यामध्ये आपली कातडी बचावण्यासाठी अनेक खरे-खोट्यावर आधारलेले अनपेक्षित अडथळे निर्माण करण्याची क्षमता आहे. ते अचानक गर्भगळीत होऊन सरकारला सहकार्य करतील अशी आशा करणे वास्तविक होणार नाही. या युद्धातला प्रतिस्पर्धीही ७० वर्षांचा अनुभवी, जाणकार व प्रबळ आहे. सरकारने काळाबाजार्‍यांच्या व त्यांच्या पित्त्यांच्या खटपटीवर वरताण करत, एखाद्या लढाईत काही हानी झाली तरी त्वरीत सावरून, अंतीम युद्ध जिंकणे आवश्यक आहे... वास्तव जीवनातल्या मोठ्या प्रकल्पांत अगदी हेच करावे लागते..

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या कारवाईतल्या अंमलबजावणीमधे तृटी राहण्याचे मुख्य कारण "सर्वंकश गुप्तता राखण्याची कळीची आवश्यकता" हे होते. खरे तर, "सर्वंकश गुप्तता राखण्याची कळीची आवश्यकता" हे कारण पाहता त्या तृटी नसून "न टाळता येण्याजोगा नाईलाज (कन्सट्रेन्स)" होता, असे म्हणणे जास्त संयुक्तीक होईल.

Income Tax department rejects declarations from Mahesh Shah, Mumbai family, worth a total of Rs 2,13,860 crore हा आकडा "उघड केलेल्या एकूण रकमेपैकी आयकर विभागाने नाकारलेल्या" रकमेचा आहे. असा नकार बहुदा... अ) उघड केलेल उत्पन्न, ते उघड करणार्‍याचे स्वतःचे नाही (त्याला मूळ व्यक्तीने स्वतःला वाचविण्यासाठी पुढे केलेले आहे) असा संशय येणे, आ) पूर्ण उत्पन्न उघड केले नाही असा संशय येणे, इ) उत्पन्न उघड करताना इतर काही गैरव्यवहार झाला आहे असा संशय येणे, इत्यादी कारणांनी असतो. "आजपर्यंत उघड न केलेल्या रकमेचा" व "उघड केलेल्या व आयकर विभागाने मान्य केलेल्या रकमेचा" यात अंतर्भाव नाही. याचा अर्थ, आयकरापासून लपवलेल्या काळ्या पैश्याची व्याप्ती आता आयकर विभागाने नाकारलेल्या रकमेपेक्षा (रु२ लाखा कोटीपेक्षा) मोठी आहे. अजून काहीतरी सरकारी सवलत मिळेल ही आशा जवळ जवळ संपुष्टात आल्याने, ३१ सिसेंबरपर्यंत धीर सुटून अजून बरेच काळे धन उघड होण्याची बरीच शक्यता आहे. यामुळे, या एकाच कारवाईने बाहेर आलेल्या धनामुळे काही साध्ये साधणार आहेत... १) काही महत्वाचे तात्कालीक परिणाम अ) इतक्या मोठ्या प्रमाणात काळे धन बाहेर आणणे अगोदर कधी जमलेले नाही. हा सरकारचा काळ्या धन साठवणार्‍यांच्या विरुद्धच्या युद्धातील एका लढाईतला विजय म्हणायला हरकत नाही. आ) हे धन आतापर्यंत लपललेले असल्याने त्यावरचे सरकारचे बुडालेले उत्पन, अधिक दराच्या कराच्या व दंडाच्या रुपात वसूल होईल. यामुळे सरकारला विकासासाठी कोणतेही बंधन/अट/व्याज नसलेले उत्पन्न मिळणार आहे. २) काही महत्वाचे दीर्घकालीन परिणाम अ) लपलेले आणि एका प्रकारे "एनपीए" असलेले हे धन बँकिंग व्यवहारांत आल्यामुळे "खेळते" होऊन यापुढे वर्षानुवर्षे भारताच्या जीडीपीत वाढ करायला मदत करेल. आ) बँकिंग प्रणालित आलेले हे उत्पन्न धारकाने त्याच्या स्त्रोताचे विवरण आयकर विभागाला दिलेले असल्याने, भविष्यात तो स्त्रोत व त्यापासूनचे उत्पन्न लपवणे कठीण होईल. याचा परिणाम, भविष्यातले आयकराचे उत्पन्न वाढण्यात (ते योग्य तेवढे राहण्यात) मदत होईल. इ) काही कारणाने का होईना (या कारवाईत झालेल्या त्रासाने, आता बँकिंग व्यवहार सोपे, सोईचे व निर्धोक आहेत अशी खात्री झाल्याने, इ) सर्वसामान्य जनता जास्तीत जास्त बँकिंग/इ-अर्थव्यवस्थेकडे वळल्यावर व्यवसाय-उद्योगधंद्यांना बँकिंग/इ-अर्थव्यवस्थेच्या आधारे व्यवहार करण्यास भाग पडणार आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिकाधिक पारदर्शक व त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त होण्यास मदत होईल. हे वरचे फायदे अजून बळकट करण्यासाठी व बँकिंग/इ-अर्थव्यस्था जास्तीत जास्त सुलभ करण्यासाठी सरकारने भविष्यात सबळ कायदा-नियम-प्रक्रियेचे सुसंसाधन निर्माण करण्यासाठीच्या कारवाया करणे जरूरीचे आहे व तसा मनोदय सरकारातील महत्वाच्या व्यक्तींनी (पंतप्रधान, मंत्री, ब्युरोक्रॅट्स, आरबीआय, इ) जाहीर केला आहेच. थोडक्यात, सद्याच्या डिमॉनेटायझेशन कारवायीचे अपेक्षित परिणाम दिसू लागले आहेत आणि त्यांत भविष्यातल्या अनेक कारवायांची भर पडून देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणिय बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत. मुख्य म्हणजे, विरोधकांनी चालवलेल्या गदारोळाकडे लक्ष न देता (त्यांनी गदरोळ केला नसता तरच आश्चर्य वाटले असते); सर्वसामान्य सामान्य जनता सरकारवर विश्वास ठेवून, होणारा कमीजास्त त्रास सहन करीत आहे; ही सर्वसामान्य जनतेची मानसिकता अभिनंदनिय व भारताच्या भविष्याच्या दृष्टीने आशादायक आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ते तुम्हीच खा. जनतेची दिशाभूल करु नका. नोटबंदीनी यातलं काहिही साध्य होणार नाहि. सरकारने आपले २.५ वर्षांचे अपयश झाकायला हा खेळ मांडला आहे. परदेशातुन काळा पैसा भारतात आणुन प्रत्येकाला १५ लाख रु. देण्याचं यांना कधि जमणार नाहि, म्हणुन हा काहिच्या काहि खटाटोप मांडला आहे. (अजुन काहि विरोधी वाक्य हवे असल्यास मिपावरच अनंत विद्वानांनी मत प्रदर्शन केलं आहे. त्यातले हवे ते निवडावे :प )

In reply to by अर्धवटराव

सेकंदभर विचारात पाडलं होतत ! =)) =)) =)) पण, (कोल्हा आला रे आला टाईप) बुद्धीभेदी मार्‍यांची सवय (अक्लमटायझेशन*) झाल्याने त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून केव्हाच शीळफाट्यावर सोडून देण्यात आलेले आहे ;) :) ====== * : हा मूळ शब्द क्लायमेटशी संबंधीत असला तरी भारतीय राजकारणात तो तितकाच 'अक्ल'शीही संबंधीत असल्याचा नवीन शोध लावला आहे. सर्व हक्क स्वाधिन. ;) =))


In reply to by गामा पैलवान

अर्धवटरावांचा प्रतिसाद उपरोधीक आहे ! :) पहिल्या एकदोन वाक्यांनी मलापण संभ्रमात पाडले होते =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टर, भूल गये थे हम, हमारा वोह औपरोधिक स्वभाव, कुछ पलोंके लिये! क्या अच्छे दिन सचमुच आ गये? :-) आ.न., -गा.पै.

केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे ! जमिनीवरची वस्तूस्थिती... १. कॅशलेस इन मुंबई... २. करायचे म्हटले तर काय होऊ शकते... स्विडनमधले कर्मचारी-विरहित दुकान... ३. ऑस्ट्रेलियाच्या नव्या नोटा (खोट्या नोटांची समस्या फक्त भारतापुरती मर्यादीत नाही)...

सरकारने market stabilization scheme ची कमल मर्यादा तीस हजार कोटींवरून सहा लाख कोटींवर वाढवली. त्यामुळे रिझर्व्ह बँक CRR कमी करू शकेल. कर्जाचे व्याजदर कमी होऊ शकतात ...

खोट्या भारतीय नोटांच्या प्रवासाचा हा नकाशा पाहून, पाकिस्तान भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्यासाठी किती जोमाचे प्रयत्न करत आहे हे ध्यानात यावे...

डिमॉनेटायझेशनच्या कारवाईतून काही अनपेक्षित चांगले परिणाम येत आहेत. टोलनाक्यावर जुन्या रु५०० व १००० च्या नोटा स्विकारण्यासाठी परवानगी देण्यामागे सरकारचा जनतेचा त्रास कमी करण्यापलिकडे काही उद्येश होता कि नाही हे कळायला मार्ग नाही, पण सद्या कायप्पावर फिरणार्‍या खालील संदेशावरून टोलचा झोल... (अ) उत्पन्न लपविण्याचा भ्रष्टाचार भूतकालात केलेला असल्यास आणि / किंवा (आ) या तीन आठवड्यांत टोलचे वाढीव उत्पन्न दाखवून काळ्याचे पांढरे करण्याचा प्रयत्न केला असल्यास ...उघड होऊ शकेल असेच दिसते. महाराष्ट्रात टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांनी सरकारकडे ३ आठवडे टोल वसुली बंद ठेवण्यात आली म्हणून १२५ कोटीची नुकसान भरपाई मागितली आहे.. कमाल आहे ना... म्हणजे विचार करा जर ३ आठवड्यात १२५ कोटी रूपये वसुली होत आहे तर एका महिन्यात जवळपास १६६ कोटी रुपये आणि एका वर्षांत अंदाजे १९९२ कोटी रुपये रोख स्वरूपात जमा केली जाते.. अशी टोल वसुली वर्षानुवर्षे चालूच आहे.. म्हणजे विचार करा खरा काळा पैसा कोणाकडे आहे..वर्षाला अंदाजे १९९२ कोटी रुपये खर्चून सर्व सामान्य जनतेला रस्त्यावर कोणत्या सुविधा मिळतात..?? या व्यतिरिक्त आपण नविन वाहन खरेदी करताना कराच्या स्वरूपात हजारो लाखो रुपये रक्कम जमा करतो त्याचा हिशोबच नाही.. आता टोल वसुली कंपन्यांनी वरील तीन आठवड्यांचे न मिळालेल्या उत्पन्नाचा लेखाजोखा, त्यांनी पूर्वीच्या करविवरणांत दाखविलेल्या उत्पन्नाशी ताडून, बरेच काही सत्य बाहेर काढायला मदत होईल. बघुया काय होते ते !