नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला.
या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी :
१. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच.
२. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे.
३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच.
माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात...
काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते.
त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते.
बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता.
केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते.
इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल.
मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला.
हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत.
आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत.
परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वाचने
134078
प्रतिक्रिया
637
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप खूप धन्यवाद श्रीरंग.
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
हेच तर चुकतं !!!!!!!
In reply to कमाल मर्यादा ₹२५,००० by श्रीरंग_जोशी
नायतर काय !
In reply to हेच तर चुकतं !!!!!!! by इरसाल
अनिवासी भारतीय
In reply to तोच तर प्रॉब्लेम आहे. रु. by राघवेंद्र
हि माहिती पुरेशी नाही
In reply to अनिवासी भारतीय by समर्पक
परदेशातून "भारतीय नोटांच्या
In reply to हि माहिती पुरेशी नाही by बंड्याभाय
काश्मीर समस्येत फरक दिसू लागले...
मराठा मूक मोर्चे देखील
In reply to काश्मीर समस्येत फरक दिसू लागले... by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to काश्मीर समस्येत फरक दिसू लागले... by डॉ सुहास म्हात्रे
१४ लाख कोटींपैकी २ लाख कोटी
नोटंच्या ऐवजी स्टैंप
छान आयडीया आहे, पण
In reply to नोटंच्या ऐवजी स्टैंप by पहाटवारा
एकात्मिक भरणा पद्धती
- सरकारी एकात्मिक भरणा (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) पद्धतीचा वापर केला तर दैनंदिन रोखीचे व्यवहार कमी होतील.
- चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम यांचा वापर कमी होते.
- अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे व्यवहार कमी होऊन जोखीम कमी होते.
- पैसे आपल्या बॅंक खात्यातच रहात असल्याने व्याजाचेही नुकसान होत नाही.
या पद्धतीची माहिती आपल्या जवळच्या दुकानदाराला आणि व्यावसायिकाला द्या. तत्काळ पैसे देण्यासाठी याच उपयोग होईल. अगदी चहा ते भाजीवालाही असे पैसे स्विकारू शकेल.चांगली माहिती,याचे नीट
In reply to एकात्मिक भरणा पद्धती by निनाद
ग्रेट!
In reply to चांगली माहिती,याचे नीट by संदीप डांगे
याबद्दल सविस्तर व योग्य
In reply to एकात्मिक भरणा पद्धती by निनाद
पण अॅप
In reply to याबद्दल सविस्तर व योग्य by संदीप डांगे
कोणतेही अॅप चालेल
In reply to पण अॅप by निनाद
सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !!
आधीचे पंतप्रधान म्हणजे...
In reply to सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !! by बंड्याभाय
आधीचे पंतप्रधान उत्तम
In reply to सुरूवात तर नक्कीच चांगली आहे !! by बंड्याभाय
भ्रष्टाचार कमी होईल का....
सहमत, करप्शन इज अ ह्युमन
In reply to भ्रष्टाचार कमी होईल का.... by चौकटराजा
आता गैर लोकाना नवे मार्ग
In reply to भ्रष्टाचार कमी होईल का.... by चौकटराजा
आता गैर लोकाना नवे मार्ग शोधावे लागतील.हे प्रश्न मानवी स्वभावामुळे निर्माण होत असल्याने, हा चोर-पोलिस खेळ मानवाच्या सुरुवातीपासून चालू असून मानवाच्याच्या अंतापर्यंत चालू राहील, यात संशय नाही.एक अवांतर दृष्टीकोन
बघा तुम्ही
In reply to एक अवांतर दृष्टीकोन by चौकटराजा
कपिलमुनी,
भाजप धार्जिणी म्हणजे सगळ्यात
In reply to कपिलमुनी, by डँबिस००७
बँकांसमोरच्या रांगा अजूनही
टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध
In reply to बँकांसमोरच्या रांगा अजूनही by डॉ सुहास म्हात्रे
(No subject)
In reply to टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध by श्रीगुरुजी
विडिओ पाहिला..पण संगीत काही
In reply to (No subject) by श्रीगुरुजी
शाईचं कळालं नाही. रोज ४५००
In reply to बँकांसमोरच्या रांगा अजूनही by डॉ सुहास म्हात्रे
बँक बंद झाल्यावर संध्याकाळी
In reply to शाईचं कळालं नाही. रोज ४५०० by मराठी कथालेखक
रंग नै बरं, रांग असेल रांग!
In reply to बँक बंद झाल्यावर संध्याकाळी by संदीप डांगे
याला उपाय म्हणून आता सरकारने
सरकारच्या दूरदर्शीपणाचा भक्कम
In reply to याला उपाय म्हणून आता सरकारने by डँबिस००७
म्हात्रे सर, या कारवाईचे
आन्ना ...
In reply to म्हात्रे सर, या कारवाईचे by संदीप डांगे
चौरकाका, तुमचा प्रतिसाद सद्य
In reply to आन्ना ... by चौकटराजा
दुसऱ्या ठिकाणी लिहिलेला
In reply to आन्ना ... by चौकटराजा
हे सगळे आणि पाकिस्तानी
In reply to म्हात्रे सर, या कारवाईचे by संदीप डांगे
खूप खूप धन्यवाद!
In reply to हे सगळे आणि पाकिस्तानी by डॉ सुहास म्हात्रे
पुढील लक्ष्य कोणते ....
याबाबतीत माझे काही अंदाज (ते
In reply to पुढील लक्ष्य कोणते .... by गामा पैलवान
विरोधी पक्षांचे नेते केवळ
देवा विरोधी पक्षातील अश्या
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
सरबरीत झालाय तो...
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
गैरसोयीचे असल्याने यावर
In reply to विरोधी पक्षांचे नेते केवळ by डॉ सुहास म्हात्रे
दुसर्यांचा विरोध हा "अंध
In reply to गैरसोयीचे असल्याने यावर by मोदक
The question that still need
Backfire ?
बॅकफायर म्हणजे रद्दबातल नाही
In reply to Backfire ? by मोहन
डांगेजी - मी ही Backfire
अशा लेखांना फाट्यावर मारायचं,
In reply to डांगेजी - मी ही Backfire by मोहन
या निर्णयाने ज्यांचे मोठे
In reply to डांगेजी - मी ही Backfire by मोहन
कारवाईच्या विरुद्ध असलेली
In reply to या निर्णयाने ज्यांचे मोठे by डॉ सुहास म्हात्रे
कारवाईच्या विरुद्ध असलेली मतेही (काही अतिउत्साही राजकारणी सोडले तर) अगदी लॉजिकल वाटावी अशीच मांडली जाणार.वरचे अखिलेश यादव यांचे "काळा पैसा अर्थव्यवस्थेला उपयोगी असते" हा दावा एक मूर्खपणा नसून नेत्याच्या शब्दांवर डोळे मिटून विश्वास ठेवणार्या भारतातल्या असंख्य अंधभक्तांना आपल्या बाजूला वळविण्याचा किंवा त्यातला खोटेपणा ओळखूनही स्वार्थी हितसंबंधासाठी त्या दाव्याची भलावण करून आपली रोटी भाजणार्या लोकांना दिलेला दिलासा आहे. जेव्हा केजरीवाल किंवा राहूल गांधी "कोठे आहेत करोडपती बँकेच्या रांगात?" असे विचारतात तेव्हा फारसा विचार न करणार्या सर्वसाधारण माणसाचा "अरे खरंच, ते लोक का नाही उभे माझ्याबरोबर उभे?" असा विचार करण्याइतका बुद्धीभेद होतो. जरा विचार केल्यावर हे ध्यानात येते की, (अ) ज्यांना खर्या व्यवहारांसाठीसुद्धा बँकेत जावे लागत नाही असे कोट्याधिश आता तेथे जावून १, ५, १०, १०० कोटी बॅगेत (किंवा टेंपोमध्ये) घेऊन बँकेत जातील व सरकारच्या जाळ्यात अडकण्याचा मूर्खपणा करतील का?"; (आ) "असे केले तरी त्यांचे त्याच्या कोट्यावधी काळ्या पैशातले कितीसे पैसे सुरक्षितपणे पांढरे होतील?"; (इ) "काळे पैसे लपवायला इतर सुरक्षित मार्ग शोधणे किंवा 'बिझनेस लॉस' समजून काळे पैसे नष्ट करणे/कचर्यात टाकून देणे व स्वतः सुरक्षित रहाणे (पक्षी : सीर सलामत तो पगडी पचास न्याय) त्यांच्या करिता जास्त चांगले असणार नाही का?" या प्रश्नांची खरी उत्तरे वरची विधाने करणार्या राजकारण्यांना माहित नसतील इतके ते निर्बुद्ध निश्चितच नाहीत. त्याउलट, लोकांचा बुद्धीभेद करून आणि त्यांना उल्लू बनवून त्यांच्यावर राज्य करणे हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आणि जीवनभरचा व्यवसाय असतो, नाही का ? :)सहमत
backfire ची शक्यता आहेच
ज्याची जळते त्यालाच कळते!!
In reply to backfire ची शक्यता आहेच by मराठी कथालेखक
अनंत अडचणी आहेत
In reply to backfire ची शक्यता आहेच by मराठी कथालेखक
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी
In reply to अनंत अडचणी आहेत by ट्रेड मार्क
ही सर्वसाधारण रूपरेखा आहे
In reply to भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी by मराठी कथालेखक
पोलीस वाहनांमधून नेल्या
जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द
In reply to पोलीस वाहनांमधून नेल्या by संदीप डांगे
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही
In reply to जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द by गामा पैलवान
काहीही हं संदीप....!
In reply to म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही by संदीप डांगे
अहो बँकेत रोजंदारीवर मजूर
In reply to काहीही हं संदीप....! by गामा पैलवान
त्याला आता चाप बसेल.
In reply to अहो बँकेत रोजंदारीवर मजूर by संदीप डांगे
असा "मजूर" एका बँकेतल्या एका
In reply to अहो बँकेत रोजंदारीवर मजूर by संदीप डांगे