Skip to main content

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs… कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 311129
प्रतिक्रिया 1112

प्रतिक्रिया

२००० च्या नोटमधे एक चिप असणार आहे व नोट खराब न करता ती काढता येणार नाही की त्यात बदल करता येणार नाही. ही चीप नोटेचे स्थान व क्रमांक परावर्तीत करेल. त्यामुळे सॅटेलाईटच्या सहाय्याने स्थाननिश्चिती करता येईल. जेव्हा हे सिग्नल्स खूपच जोरदार असतील व ते स्थान संशयास्पद असेल तर त्याचा ठावठिकाणा लावता येईल. तसेच त्याच्या वाहतुकीवरही लक्ष ठेवून छापा घालता येईल.

In reply to by शाम भागवत

असे असेल तर भारताच्या इतिहासात technology चा हा सर्वोत्तम उपयोग ठरेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर ते यश निर्विवादपणे मोदींचेच असेल. Kudos to Mr Prime minister.

In reply to by शाम भागवत

धोरण व अंमलबजावणी दोन्हीची मस्त सांगड घातली आहे असे वाटतेय. मुख्य म्हणजे जो काळा पैसा नोटांच्या स्वरूपात नसेल तो जर कधी भविष्यात नोटामधे परावर्तीत करायचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न उघडकीस येण्याची शक्यता आहे.

In reply to by साहना

मी लोकसत्तेच्या बातमीच्या आधारावर लिहिले आहे. अर्थात लोकसत्तेचे संपादक दिलगीरी व्यक्त करून अग्रलेख मागे घेऊ शकतात तसे या बातमीचे होणारच नाही असे मी ठामपणे म्हणू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नोटा छापण्यासाठी एक प्रायव्हेट लि. कंपनी स्थापन केली आहे हे ऐकले होते. तसेच या पध्दतीने खर्च खूप कमी होतो असेही ऐकले होते. रूपयाच्या नोटेचा खर्च सव्वा ते दीड रूपयाच्या घरात जात असल्याने त्या नोटा बंद केल्या होत्या मात्र या आधुनिक पध्दतीने उत्पादन केल्यास हा खर्च ७५ का ७८ पैसे इतकाच येतो त्यामुळे १ रूपयाची नोटही सुरू करता येईल असे ऐकले/वाचले होते. ही जी चीप आहे तिचे संशोधन अंदाजे १० वर्षापूर्वी सुरू झाले होते. मॉल मधे गिर्‍हाईकांनी ठकल्गाडीतून सामान काऊंटरवर आणल्यावर त्या सामानाला हातही न लावता तत्क्षणी बिल तयार करणे हा त्यामागे हेतू होता. येणारा संदेश आरशाप्रमाणे परावर्तीत करणारी चीप असल्याने त्याला बॅटरी लागणार नसल्याचे अनेक वर्षांपूर्वी वाचले होते. हल्ली पाश्चात्य देशात मॉलमधे ही यंत्रणा असते असे म्हणतात. २०१६ पर्यंत या तंत्रज्ञानात नक्कीच सुधारणा झाली असणार. युरोप अमेरिकेतील कारमधील जीपीएस यंत्रणा उपग्रहाशी थेट संपर्क करून कारची स्थाननिश्चिती करू शकते. व अशा कोट्यावधी कार्स ची स्थाननिश्चिती करता येते. मात्र येथे ही यंत्रणा स्वतःहून उपग्रहाशी संपर्क साधत असल्याने विजेची गरज भासते. भारतातही दुर्गम भागात जेथे इंटरनेट किंवा मोबाईलची रेंज येत नाही तेथे मोबाईलमधील जीपीएस यंत्रणेद्वारे स्थाननिश्चिती करता येते व गुगल मॅपच्या आधारे आपण दिशादिग्दर्शन मिळवू शकतो. येथेही मोबाईल स्वतःहून संपर्क साधत असल्याने बॅटरीची आवश्यकता आहे. मात्र यासाठी आपला मोबाईल जीपीएस यंत्रणेला अनुकुल असायला हवा. आज भारताने ७ उपग्रहांची मालिका बनवून स्वतःची जीपीएस यंत्रणा उभारली आहे. नवीन सॉफ्टवेअर उभारण्यासाठी आवश्यक मनुष्यबळही भारताकडे उपलब्ध आहे. थोडक्यात जीपीएस यंत्रणा व संदेश परावर्तन करणारी नॅनो चीप यांच्या एकत्रीत उपयोगाने असे काही करता येऊ शकेल असे वाटल्याने, लोकसत्तेतील बातमी ही निव्वळ एक कविकल्पना आहे असे मला वाटले नाही. मी हे सर्व कुठेतरी वाचून कॉपी पेस्ट करत नसून फक्त तर्क लढवून टंकत आहे. तरी कृपया बातमीचा दुवा मागू नये. मात्र कोणी मला दुवा दिल्यास तो हात जोडून नम्रतापूर्वक स्विकारला जाईल. :)) तसेच माझा तर्क १०० टक्के बरोबर आहे असे माझे म्हणणे नसल्याने इतरांची मते वाचायला आवडेल

In reply to by शाम भागवत

मी लोकसत्तेच्या बातमीच्या आधारावर लिहिले आहे
कृपया बातमीची लिंक देताल का? मी सर्च केलं पण सापडलं नाही.

In reply to by शाम भागवत

आजिबात छाननी न करता अश्या बातम्या देणं लोकसत्तेत होणं म्हणजे कमाल झाली. जगाला आदर्श पत्रकारिता शिकवणाऱ्या कुबेरांनी याची जबाबदारी घेऊन निदान दिलगिरी तरी व्यक्त करावी.

In reply to by शाम भागवत

दोन हजाराच्या नोटेत अशी कुठलीही चीप नाही, असे काल मंत्र्यांनी सांगितले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इकोनॉमिक्स टाईम्समधे आलेय. चीप बद्दल जेटलींनी विचारल तर त्यांनी स्पष्ट उत्तर न देता प्रतिप्रश्न केला की, "तुम्हाला हे कुठुन कळल? मी तरी अस काही ऐकल नाही."

In reply to by चिगो

खरं खोटं माहित नाही. काल एक शेजारी भेटला होता, त्याचा भाऊ बँकेत नोकरीला असतो. बँकेत जेव्हा त्यांना (म्हणजे या शेजार्‍याचा भाऊ आणि इतर स्टाफ) यांना नोटेची माहिती दिली गेली तेव्हा त्या चीप आहे असं सांगितलं होतं माझा हा शेजारी अफवा पसरवणारा नाही. त्याचा भाऊ पण तसा नसेल अशी आशा आहे :)

In reply to by अन्नू

आज ATM चालू होते का ? मला तरी नाही दिसलेत. पण सरकारी निवेदनात काय म्हंटलं होतं की १० तारखेला 'काही' ATM बंद राहतील. म्हणजे निदान काहीतरी चालू असायला हवेत ना ? पण माझ्या या शेजार्‍याने मला कालच सांगितलं होतं (अर्थातच त्याच्या भावाकडून आलेल्या माहितीच्या आधारे) की 'ATM उद्याही बंद असेल' म्हणून. चिपची गोष्टही तशीच असू शकते. म्हणजे 'आतली गोष्ट' जी खरेतर बाहेर फुटणं अपेक्षित नव्हतं पण फुटली म्हणून आता नाकारली जात आहे. मला माहिती आहे की ATM बंद असणे आणि नोटेत चिप असणे या दोन गोष्टी फार भिन्न आहेत आणि त्यांची अशा प्रकारे तुलना करणं फारसं योग्य नाही तरीही एक शक्यता म्हणून विचार करायला हवा. बाकी बँकिग क्षेत्रातील कुणी इथे असल्यास अधिक माहिती देवू शकतात (वेळ मिळाला तर :)

In reply to by मराठी कथालेखक

आमच्या इथेही एटीएम बंद होती. पण ती त्या त्या बँकानी बंद केलेली होती. कारण स्टेट बँकेने शंभर रुपयाच्या नोटा इतर बँकाना दिल्या नाहीत. फक्त दहा आणि विसाची बंडले दिली. साहजिकच बँका एटीएम मधे कॅश भरू शकल्या नाहीत. शंभरच्या नोटा आणि पाचशेच्या नव्या नोटा मिळू लागल्या की एटीम नीट काम करू लागतील.

In reply to by मराठी कथालेखक

आज ATM चालू होते का ?>>>>>> माझ्या माहितीप्रमाणे कालपासूनच काही एटीएम चालू करण्यात आले होते (सर्व ठिकाणचे नसावेत कदाचित), शिवाय त्यांना विड्रॉ पैशाची मर्यादाही होती. चिपची गोष्टही तशीच असू शकते>>>> नाही. चिपला कार्यरत करण्यासाठी पॉवर सोर्स नाही. आणि इतक्या लांबून सॅटेलाईटला सिग्नल देण्याईतपत तर नाहीच नाही. तसं करायचं जरी बोललं तर त्याला अवाजवी खर्च येऊ शकतो जो कि भारताला परवडणारा नाही. काही लोक याला मॉलमध्ये वगैरे ठिकाणी असलेल्या डिटेक्टरचं उदाहरण देऊन हे काम करेल असा दावा करतात. पण प्रत्यक्षात ते अशक्य आहे. तो डिटेक्टर शॉर्ट डिस्टन्सला काम करतो, ना कि इतक्या दूरच्या वस्तूंना. साधं लॉजिक आहे- भारतात अजुन फोरजीला नीट नेटवर्क देता येत नाही तिथे नोटेला इतका पावरफुल नेटवर्क भारत कसा उपलब्ध करेल? https://www.youtube.com/watch?v=RnW3VkPgi7M

In reply to by सस्नेह

http://www.misalpav.com/comment/898363#comment-898363 आता, परत परत चिपची कहाणी ऐकून रागावलेल्या एका कायप्पाकराची तुमच्यावर "मेहेरनजर" झाली तर तो / ती तुम्हाला नोटेवरच्या मंगळयानातून सफर घडवून आणेल ! ;) =)) =))

अत्यंत प्रशंसनीय निर्णय. या निर्णयाचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. काळ्या पैशावर अंकुश लावणे आणि बनावट चलन रोखणे असे दोन हेतू साध्य होतील असे वाटते. अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल. माझे दोन प्रश्न आहेत कृपया जाणकारांनी उत्तर द्यावे: १. जरी 500 आणि 1000 च्या सध्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी घातली असली तरी 1 जानेवारीपासून 2000 आणि 500 च्या नव्या नोटा चलनात येतील असे ऐकले. मोठ्या denomination च्या नोटा म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. तेव्हा परत काळा पैसा असणाऱ्यांच्या हे पथ्यावरच पडेल. जरी ट्रेड मार्क म्हणतात त्याप्रमाणे ट्रॅकर असेल तर अतिउत्तम परन्तु त्यापेक्षा 100 च्या नोटांची अधिक मोठ्या प्रमाणात छपाई करून चलनाचा प्रश्न सोडवता आला नसता का? २. सध्या जे काळा पैसा बाळगून आहेत ते बँकांतून त्यांच्याजवळच्या बँकेतून आहेत तेवढ्या नोटा बदलून आणू शकणार नाहीत का? बँकांना अशा प्रकारे मोठी रक्कम बदलण्याकरिता आणणाऱ्यांबद्दल काही निर्देश मिळाले असतील का? प्राप्तिकर खाते बेनामी सम्पत्ती असणाऱ्यांना कसे ट्रॅक करू शकेल?

In reply to by पुंबा

नोटा कोणीही बदलून आणू शकेल. फक्त बदलताना आयडी प्रूफ लागणार. आणि तेही दिवसाला ४०००रु इतकेच मिळणार. (२ आठवड्यानंतर बहुधा रोज १००००)

In reply to by अनुप ढेरे

.... त्या सगळ्या नोटबदलूंची सरकारात नोंद राहणार आहे, म्हणजे कोणत्या व्यक्ती व कुटुंबे वा व्यावसायिक मोठ्याप्रमाणात नोटा बदलत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाउ शकते हे तर फारच महत्वाचे आहे. या सरकारचे जे म्हणणे आहे की काळ्या पैशाची निर्मितीच थांबवीर्मितीच, तसे ते करुन दाख्वीत आहेत. छानच लगाम लावलाय श्री. मोदींनी.

In reply to by पुंबा

प्रत्येकाला तीन लाखावर रक्कम असेल तर स्पेशल सोय रिझर्व बँकेत केलीय. तिथे झाडा झडती होईल. लालू टाईप लोक्स पिलावळ घेऊन गेले तरी एखादा कोटी पांढरा होईल.

In reply to by खेडूत

अहाहा.. हे वाचून दिल गार्डन गार्डन झाला.. असे असेल तर मात्र हि एकच योजना 2019 ला मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यास मदत करेल..

In reply to by पुंबा

मला वाटतं याचा संबंध नोटेच्या छपाई करीता लागणार्या खर्चाशी असावा. १०० ची एक नोट छापायला जेवढा खर्च येतो (१०० * २०) त्यामानाने २००० ची नोट छापण्यात जास्त फायदा असावा. अर्थात हा फक्त एक अंदाज..

In reply to by पुंबा

अर्थात अर्थव्यवस्थेतील चलनपूरवठा कमी होऊन महागाई आणि व्याजदर वाढतील त्याने उद्योगाच्या वाढीला थोडा अडथळा निर्माण होईल.
हे वाक्य चुकीचे आहे हे अधिक वाचनाने समजले. लोकांकडील पैसा कमी झाल्याने महागाई काहीशी कमी होऊ शकते, मात्र आजच्याघडीला रोख चलन मिळवण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागल्याने मध्यम फळीतील विक्रेत्यांनी किमती कमी केलेल्या नाहीत. बँकांकडील तरलता वाढल्याने कर्ज अधिक स्वस्त होतील असा अंदाज आहे. मी मोदींनी जे पाऊल उचलले आहे त्याचा समर्थक आहे मात्र, खात्यात पैसा असूनही ATM बंद असल्याने जो प्रचंड त्रास मला होतो आहे त्यावरून लोक फार काळ हे मुकाट्याने सहन करतील असे वाटत नाही. अक्षरशः 2 दिवसांपासून मी उधार उसनवारी करून व्यवहार करतो आहे सकाळपासून 8 ATM वर गेलो कोठेच कॅश नव्हती. उद्या तरी परिस्थिती सुधारावी अशी आशा आहे.

अ‍ॅब्सोल्यूट ब्रिलियन्स ! हे आधीच मागणीवर होतं, मायजीओव्ही वर वर वगैरे वाचलेलं आहे. शिवाय नागपूरच्या एका अर्थतज्ञाने म्हणे यावरचं एक संशोधन मांडलं होतं. देशांचं सरासरी दरडोई उत्पन्न आणि त्यांचं महत्तम चलन याच्या गुणोत्तरावर आधारलेल्या या अभ्यासाबद्दल वाचलं होतं आधी. पण हे प्रत्यक्षात होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे ज्यांना वाटलं नव्हतं त्यांची वाट्ट लागलीय आता. ब्रावो मोदी !

प्रशंसनीय निर्णय.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

काय माई, यवढंच. तुमचे हे काही म्हटले नाहीत वाटतं. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नोटा बदलायला गेलेत.(येतील्च इतक्यात)

In reply to by पैसा

देवळांतील दानपेटीत असणाऱ्या 500 1000 च्या नोटांचे काय होईल काय माहित. तसेही ते करमुक्त उत्पन्न असल्याने 300000 ची मर्यादा नसेल त्यामुळे बँकांना नोटा बदलून द्याव्याच लागतील. काळा पैसा पळून असणारे देवळात सेटिंग करून, काही कमिशन देऊन काळा पैसा त्यांच्या माध्यमातून पांढरा करून घेतील अशी भीती वाटते.

In reply to by पुंबा

हो पूर्वी अस झाल आहे. कोर्टात केसेसही झाल्या आहेत. निकाल देवळांच्या बाजूने लागला होता. तरी एकूण काळ्या पैशाचे प्रमाण पाहता दर्यामें खसखस.

In reply to by शाम भागवत

तिरुपती संस्थानाने 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारत असल्याचे सांगितले आहे. बँकांकडून हे चलन तिरुपती संस्थान बदलून घेऊ शकेल काय? असे झाले तर या योजनेचा सम्पूर्ण उद्देशच फोल ठरत नाही काय?

In reply to by पैसा

आज अमृतसरच्या सुवर्नामान्दिराने ५०० व १००० च्या नोटा सिवाकारल्या जाणार नाहीत असे सांगितले. बालाजी मंदिराने क्रेडीट कार्ड चेक द्वारे दान स्वीकारले जाईल असे सांगून तशी सोय केली आहे.

काळा पैसा व अतिरेकी कारवायात गुंतलेल्या पैश्याच्या मुळावर घाला घालणारे अत्यंत प्रशंसनिय पाऊल ! विशेष म्हणजे जाहीर केल्यापासून काही तासांत (आणि तेही नॉन-वर्किंग तासांत) हा नियम अमलात (आज रात्री १२ वाजता) येणार आहे, हा खरा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे, भूतकाळात नोटा रद्द केल्यावर दिली गेली तशी काळा पैसा पांढर्‍यात बदलायला मुदत मिळणार नाही.

अर्थशास्त्राप्रमाणे पैसा म्हणजे नुसती रोख रक्कमच नाही तर देवाणघेवाण facilitate करायची क्षमता असलेली प्रत्येक गोष्ट ही पैसा आहे. आतापर्यंत ५०० आणि १००० च्या नोटांना पैसा असे का म्हटले जात होते? मी समजा एखादी गोष्ट दुकानातून विकत घेतली आणि त्यासाठी ५००/१००० च्या नोटा दिल्या तर दुकानदार त्या नोटा माझ्याकडून का घेत होता? याचे कारण त्याच नोटा वापरून अन्य कोणती वस्तू विकत घेता येईल अशी त्या दुकानदाराला खात्री वाटत होती. म्हणजेच त्या नोटांमध्ये देवाणघेवाण facilitate करायची क्षमता होती.ती क्षमता एका क्षणात काढून घेतली गेली आहे.त्यामुळे या नोटांचा 'पैसेपणा' हरवला आहे :) पी.के चित्रपटात दाखविल्याप्रमाणे नायकाला गांधीजींचे चित्र असलेले कागद (नोटा) देऊन वस्तू घेता येतात हे समजले त्यानंतर तो गांधीजींचे चित्र असलेले कोणतेही कागद देऊन नोटा घ्यायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा त्याला लोक 'पीके हो क्या' असा प्रश्न विचारू लागले. म्हणजेच वस्तू कशामुळे विकत घेता येत होत्या? तर त्या गांधीजींच्या चित्रामुळे नव्हे तर ते चित्र असलेले कागद पुढील देवाणघेवाणीचे व्यवहार facilitate करू शकतील या सर्वांना असलेल्या विश्वासामुळे. सरकारच्या या एका निर्णयामुळे अर्थशास्त्रातील एक महत्वाचा धडा सगळ्यांना कळेल. असो.जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा.

In reply to by गॅरी ट्रुमन

जगातून रोख रक्कम (कॅश) पूर्णपणे नाहिशी व्हावी आणि सगळे व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनच व्हावेत आणि तो दिवस याची देही याची डोळा बघता यावा ही इच्छा. +१

In reply to by गॅरी ट्रुमन

ह्या एका झटक्याने लाखो लोक paytm कडे वळले आहेत. सम्पूर्ण अर्थव्यवस्था कॅशलेस होण्याच्या दिशेने छोटे का होईना एक पाऊल पडले याचा आनंद आहे.

In reply to by पुंबा

पेटीयम हा केवळ पेमेंट गेटवे आहे त्यामुळे लोक स्पेसिफिकली पेटीयमकडे वळण्याचे कारण काय असू शकेल? एक ऑफर प्रकार वगळता जी सुविधा पेटीयम देते ती सुविधा थेट उपलब्ध असते.

In reply to by जयंत कुलकर्णी

हेच म्हणतो. चायनाच्या अलिबाबा कंपनीने यात (इफ आय एम नॉट मिस्टेकन) ४०% गुंतवणुक केलेली आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

नेमके काय सुचवायचेय? बाकी पेटीएमचे मालक भारतीय आहेत आणि मुख्य गुंतवणूक माउंटन कॅपिटल ची आहे वाटतं.

सगळ्यात जास्त मजा भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांची येणार आहे... जाहिरात: आमच्याकडे कला पैसे पांढरा करून मिळेल, कमिशन 50 टक्के!!!

निर्णय स्वागतार्हच आहे. पण यात अजून एक मजेशीर प्रकार होणार आहे... आधी जणूकाही आपण साधे आहोत असे वागत सर्जिकल स्ट्राईक, मग एनडीटिव्हीवर बंदी, बंदी उठाव वगैरे बाता चालत असताना फिस्कल सर्जिकल स्ट्राईक... हे सरकार उद्या काय करेल याचा विचार करत, आता विरोधकांच्या झोपा उडणार आहेत.

In reply to by विकास

हा निर्णय असा आहे की विरोधकांना ना याला विरोध करता येईल ना पूर्ण समर्थन देता येईल. कारण बहुतांशी जनतेला हा निर्णय होईल याची आशा खूप पूर्वीपासून होती. अर्थात रागा आणि केजरीचं काही सांगता येत नाही ते कधीही कशालाही समर्थन देऊ शकतात आणि कधीही विरोध करू शकतात. पण बरेच छोटे मोठे मासे, म्हणजे बिल्डर्स, सोनार, इस्टेट एजन्ट्स, राजकारणी, वेगवेगळ्या मार्गाने पैश्याची अफरातफर करणारे, मस्त गळाला लागणार नाहीतर भिकेला लागणार. एकूण झालेल्या घटना पाहता हे एक मोठठं जाळं विणायचं काम चालू होतं, अजूनही चालू आहे, ज्यात एक एक भक्ष्य स्वतःहून अडकत जात आहेत.

मला वाटते या आधी जनता सरकारमधे मोरारजी देसाईंनी असाच तत्कालीन १००० रू ची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अधिक माहिती असल्यास येथे लिहावीत!

मुत्सद्देगिरिचा कळस आहे हा...बाकीच्या गोष्टी तर आहेतच.. पण हा निर्णय अत्यंत गुप्त ठेवून बरोब्बर बुधवारी बँकांची बंद व्हायची वेळ पाहून त्या बंद झाल्यानंतरच हा निर्णय जाहीर केला गेला. वर परत त्याच दिवशी रात्रीपासून बंदी आणली. नन्तर २ दिवस बॅंका बंद ठेवल्या आणि तीनच दिवस जुन्या नोटा त्याही काही ठराविक ठिकाणीच चालतील असा निर्णय जाहीर केला.. तल्लखपणा असावा तर असा.

In reply to by सही रे सई

अगदी , अगदी ! खणखणीत षटकार ठोकलाय .. पार स्टेडियमच्या बाहेर ! खतरनाक माणुस आहे हा. एक एक ऐतिहासिक निर्णय छातीठोकपणे घेत सुटलंय हे सरकार. आतापर्यंतच्या त्रिशंकु लोकसभांचं रेकॉर्ड ब्रेक करत, त्यांना सर्वाधिकार देणार्‍या भारतीय लोकशाहीचं मनापासून कौतुक वाटतंय. आणि लोकांनी टाकलेला विश्वास सार्थ पण ठरवतंय हे सरकार , निदान बर्‍याच अंशी. हे ही नसे थोडके. भारतीय लोकशाही प्रगल्भ झाल्याची सगळी लक्षणं आहेत.

अजुन एक मुद्दा. ज्या काळोजीरामन लोकांनी काळा पैसा परकिय चलनामधे ठेवलाय त्याचं काय? त्यांना काय फरक पडेलसं वाटतं नाही. त्यावरही काहीतरी पाचर मारायाला हवी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

....मोदी काय करु शकतात याचा अनुभव आजवर येतोच आहे. असो, जे होते आहे ते देशहिताचे आहे हे नक्कीच.

In reply to by विनोद१८

ती पाचरसुध्धा मारली जाईल पण योग्य त्या वेळीच... आम्हाला हवे तेंव्हा आणि आम्हाला हवे तसे शत्रूंवर हल्ले केले जातील असे पर्रीकर आणि इतरही मंत्री म्हणाले होतेच. तेच या संदर्भात पण लागू होते. दाऊद च्या संदर्भात वाचल्याचे आठवते की त्याचे ४०कोटी रुपये अचानक गहाळ झाले आणि त्याच्या माणसानेच चोरले असा आरोप होता. पण नंतर समजले की रियाध का अशाच कुठल्यातरी मध्यपुर्वेतील देशामधल्या बँकांच्या (परीणामी त्या राज्यकर्त्यांच्या) सहकार्याने ती गुप्त कारवाई होती.

एका चर्चेत ऐकलं की जर उत्पन्नाचा सोर्स सांगता नाही आला तर ती रक्कम सरकार ताब्यात घेऊ शकते, असा कायदा आलाय म्हणे.