✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संघः कलियुगातील एक चमत्कार

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 09/12/2016 - 13:26  ·  लेख
लेख
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
83205 वाचन

💬 प्रतिसाद (480)

प्रतिक्रिया

आम्हाला ते आदर्श वाटतात

सुखीमाणूस
Wed, 09/14/2016 - 19:36 नवीन
निरलसपणे कार्य करतात
↩ प्रतिसाद: साहना

साधारणपणे ज्या काळामधे हिंदू

पगला गजोधर
Mon, 09/12/2016 - 23:58 नवीन
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली.
हिंदू धर्म उद्धारार्थ प्रकातलेल्या ह्या संघटनेला इफ्तार पार्टी का आयोजित करावी लागली बरे ?? रेफ- 2 जुलै 2016, दिल्ली

http://www.hindustantimes.com

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 00:09 नवीन
http://www.hindustantimes.com/india-news/rss-rebukes-reports-of-conducting-iftar-party/story-8LLVEeSxyiVyFkGK20YIgK.html
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ

पगला गजोधर
Tue, 09/13/2016 - 07:39 नवीन
मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ यांच्यात काहीच सबंध नाही का ? आता टेक्निकल गोष्ट उभ्या करून , जसे की इफ्तार मुरामं ने आयोजित केलाय, संघाने नव्हे; धूळफेक होऊ लागलीय.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आप समज्या नहीं भाई जान

साहना
Tue, 09/13/2016 - 10:09 नवीन
आप समज्या नहीं भाई जान जे काही चांगले आहे ते संघ, आक्षेप घेण्यासारखे आहे ते सगळे आऊट सोर्ज्ड आहे हो. रस्त्यात मारामारी करणारे, तोडफोड बजरंग दल. अपघात स्थळी मदत घेऊन पोचणारे संघ. भ्रष्टचार करून पैसे खाणारे भाजपवाले. रक्तदान करणारे संघ वाले. इफ्तार करणारे मुस्लिम मंच, दसऱ्याच्या दिवशी घोष वाजवणारे संघ. कम्युनिस्टां प्रमाणे बुरसटलेली आर्थिक नीती असणारा तो मजदूर संघ, गुरुपौर्णिमेला ध्वजवंदन करणारा फक्त संघ. थोडक्यांत काय तर संघ म्हणजे आलीस इन ओन्डरलॅंड आहे. काहींनी काम ना करता, कुठल्याही विषावर ठोस भूमिका ना घेता गुळमुळीत धोरण ठेवले कि कुणीही नवे ठेवू शकत नाही आणि जबाबदार झटकून टाकता येते.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 15:48 नवीन
मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ यांच्यात काहीच सबंध नाही का ?
नाही.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

खोटं

अनुप ढेरे
Tue, 09/13/2016 - 15:59 नवीन
http://muslimrashtriyamanch.org/ हे चेकवा.
It was on December 24, 2002 a group of nationalist Muslims and functionaries of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) came together in Delhi. The occasion was Id Milan and the program was organized at the initiative of noted journalist, writer and ..
http://muslimrashtriyamanch.org/
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 16:06 नवीन
संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय विचार मंच यांच्यात काय संबंध दिसतो या लेखातून? एका कार्यक्रमात संघाचे नेते व काही मुस्लिम नेते एकत्र आले व नंतर त्या मुस्लिम नेत्यांनी हिंदू व मुस्लिम यांच्यातील दरी मिटविण्यासाठी या मंचाची स्थापना केली. संपला संबंध. विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी

पगला गजोधर
Tue, 09/13/2016 - 17:48 नवीन
विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.
नॉन-स्टेट-ऍक्टर संघटना जसे की पाकिस्तानात, जमात-उल-दावा हिच्याशी पाकिस्तान सरकार, सैन्यदल, आय एस आय, पाकिस्तान पीपल्स पार्टी इत्यादींचा संबंध नाही ....
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

!

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 18:20 नवीन
!
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

पुणे: नथुराम गोडसे हा

पगला गजोधर
Tue, 09/13/2016 - 23:05 नवीन
पुणे: नथुराम गोडसे हा शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. सात्यकी सावरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आलं नाही, किंवा त्याने कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही, असं सात्यकी यांनी म्हटलं आहे. संघाशी एकनिष्ठा दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचं काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे. मात्र, नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्यानं संघाकडून केला जातो हे अतिशय क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाहची जबाबदारी सांभाळली, असा दावा सात्यकी यांनी केला. गांधी हत्येचं समर्थन न केल्याचं आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संघावर टीकाही केली आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही

पगला गजोधर
Wed, 09/14/2016 - 11:51 नवीन
काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे.
सात्यकी सावरकर यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ? आणि जे काही लेखन त्यांच्याकडे आहे, ते त्यांनी सार्वजनिक करून, पूर्ण चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

खरे आहे.. या संघटनांपैकी बर्

आनन्दा
Tue, 09/13/2016 - 21:04 नवीन
खरे आहे.. या संघटनांपैकी बर्‍याच संघटना पूर्वाश्रमींच्या संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या दिसतात. श्रीराम सेना माहीत नाही, पण बजरंग दल वगैरे परिवाराशी नाते सांगतात यात संदेह नसावा. किंबहुना सध्या जो घोळ चालू आहे ते मराठी भाषा आंदोलन पण यातच येते.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

संघाशी संबंधित संस्थांचे २-३

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 14:33 नवीन
संघाशी संबंधित संस्थांचे २-३ प्रकार आहेत. १) संघाने स्वतः सुरू केलेल्या उपसंस्था (यात विहिंप, अभाविप, भामंसं, वनवासी संघ, राष्ट्र सेविका समिती इ. चा समावेश होतो). या संस्था संघाने स्वतःहून सुरू केलेल्या असून संघाचे यांच्यावर नियंत्रण आहे. २) संघ स्वयंसेवकांनी स्वतःहून सुरू केलेल्या संस्था (यात ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण संस्था, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, बजरंग दल इ. चा समावेश होतो). या संस्था जरी संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केल्या असल्या तरी संघाशी यांचा तसा संबंध नाही व संघाचे यांच्यावर नियंत्रण नसते. ३) संघापासून स्फूर्ती घेऊन सुरू झालेल्या संस्था (उदा. मुस्लिम राष्ट्रीय मंच). अशा संस्थांवरही संघाचे नियंत्रण नसते व अशा संस्थांशी संघाचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणताच संबंध नसतो ४) यात अजून एक प्रकार आहे. तो म्हणजे संघाच्या हिंदुत्व, राष्ट्रवाद इ. काही तत्वांशी काहीशी जवळीक असणार्‍या संस्था. यात पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, वंदेमातरम संघटना, हिंदू मुन्नेन मुन्नानी, शिवसेना, सनातन संस्था, हिंदू जागृती मंच, श्रीराम सेने इ. चा समावेश होतो. संघाचा या संस्थांशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणता संबंध नाही. संघाचे या संस्थांवर कोणतेही नियंत्रण नाही किंवा संघ यांना मार्गदर्शनही करीत नाही. परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.
↩ प्रतिसाद: आनन्दा

परंतु अशा संस्थांनी जर काही

पगला गजोधर
Wed, 09/14/2016 - 16:21 नवीन
परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.
'असे कांगावा करणारे' यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ? आणि जे काही पूर्ण सत्य चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्तत्य सूचना आहे. या सूचनेला

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 22:41 नवीन
स्तत्य सूचना आहे. या सूचनेला मी अनुमोदन देतो. ही सूचना लवकरात लवकर संघाला पाठवा.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

साहेब....

अनिरुद्ध प्रभू
Tue, 09/13/2016 - 09:59 नवीन
मुळात संघ आणि संघाचं हिंदुत्व यांवर निदान बेसिक वाचन चालु करावं ही विनंती. एकदा बेस कळाला कि बरेचसे प्रश्न पडणार नाहीत. पहिलं मुळं पक्कं करा. विनंती.. आ.न. अनिरुद्ध
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हिंदुत्वाची संघ मान्य

साहना
Tue, 09/13/2016 - 10:11 नवीन
हिंदुत्वाची संघ मान्य व्याख्या काय आहे बरे ?
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

सरकार...

अनिरुद्ध प्रभू
Tue, 09/13/2016 - 10:28 नवीन
हिंदु नक्की कोणाला म्हणावं? जी व्यक्ती अखंड हिंदुस्तान वा आपला भारत यांवर अत्यंत मनापासून, प्रेम करते मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरीही ती हिंदूच.... संघ हे प्रमाण मानतो.. स्वा. सावरकरांची हिंदुत्त्वाची व्याख्या जी संघ मानतो ती अशी आहे. परिपूर्ण, व्यापक, पण निश्चित. ..........."आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका........... पितृभूपुण्यभूश्चैव........... स वै हिंदुरीतिस्मृतः" जो सिंधुनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या ह्या विशाल खंडप्राय देशाला, आपल्या वाडवडीलांची, पूर्वजांची भूमी मानतो, तसेच पवित्रभूमी मानतो, तो हिंदू.
↩ प्रतिसाद: साहना

व्याख्या हिंदुत्वाची विचारली

साहना
Tue, 09/13/2016 - 11:05 नवीन
व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही. "हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ? हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? " आपली हिंदू धर्माची व्याख्या सुद्धा गोंधळ उडवणारी आहे. १. आपण दिलेली व्याख्या आणि सावरकर ह्यांची व्याख्या ह्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या दोन्ही सामान नाही आहेत. २. मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात. ३. जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ? धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ? ४. आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ अ-हिंदू मानतो काय ? बाली किंवा कंबोडिया मधील हिंदू संघाच्या मते अ-हिंदू आहेत का ? ५. ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे भारतावर प्रेम आहे ? तथाकथित संत तेरेसा ह्यांचे भारतावर प्रेम आहे म्हणून त्यांना आम्ही हिंदू मानायचे का ? मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही आहे काय ? थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही. हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. ती सुद्धा समजली अर्धवट. गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी.
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

!!..एकच फाईट वातावरण टाईट..!!

विशुमित
Tue, 09/13/2016 - 11:31 नवीन
!!..एकच फाईट वातावरण टाईट..!!
↩ प्रतिसाद: साहना

आपल्या

अनिरुद्ध प्रभू
Tue, 09/13/2016 - 14:08 नवीन
प्रत्येक प्रश्नाच उत्तर मी देउ शकतो पण एवढ सगळं टाईप करायचा कंटाळा आणि तेवढा नसलेला वेळ पाहता आपली भेट घेण्यास उत्सुक आहे... बाकी आपल्या कोर्टात चेंडु...आपण ठरवावे...मी आहेच!!
↩ प्रतिसाद: साहना

नेमका राग कोणावर ?

झेन
गुरुवार, 09/15/2016 - 17:42 नवीन
"थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही" तुमचा नेमका राग स्वयंसेवकांवर का चड्डिवर का तो तुमचा वैचारिक गोंधळ ?
↩ प्रतिसाद: साहना

Anyone who is the national of

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 15:58 नवीन
Anyone who is the national of this country, irrespective of being a Shaiva, Shakta, Vaishnava, Sikh, Jain, Muslim, Christian, Parsi, Buddist or Jew by way of his creed or mode of worship, is a Hindu. http://www.archivesofrss.org/why-hindu-rashtra.aspx When a Muslim Swayamsevak of RSS was questioned about Sangh's definition of 'Hindu' and 'Hindu Rashtra', he said that a Hindu is a person who has been born and brought up in Hindustan, and 'Hindu' is not a religion, it's a way of life. The idea of unity in diversity has been path of the Indian culture since ancient times and Indian cultural identity is defined by Hindutva, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat said on Sunday. http://www.thehindu.com/news/national/hindutva-is-indias-identity-rss-chief/article4937750.ece
↩ प्रतिसाद: साहना

संघाची कामं

गामा पैलवान
Tue, 09/13/2016 - 02:49 नवीन
रविकिरण फडके,
स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत.
अहो, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही संघाची जबाबदारी नाही. ही कामं संघाने केली तर पोलीस काय करणार मग? आ.न., -गा.पै.

हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी

साहना
Tue, 09/13/2016 - 11:57 नवीन
हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी खालील प्रकारे आहे. सदर कामे करायला आणखीन कुणालाही वेळ नसल्याने हि पुण्याची कामे संघ करतो. "रेप इंडियात होतात भारतात होत नाहीत" अशी थोर वचने निर्माण करणे, स्वतः अविवाहित असून स्त्री मंडळींना त्यांच्या वस्त्रां बद्दल अनाहूत सल्ले देणे गो मूत्र आणि गो विष्ठा ह्यांचे विविध उपयोग लोकांना सांगणे हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी लोक (ख्रिस्ती, मुस्लिम सुद्धा) "हिंदू" आहेत असे सांगून अमेरिकन भारतीय हिंदू कडून हिंदू स्वयंसेवक संघाच्या नावाने देणग्या घेणे. हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी ख्रिस्ती सुद्धा (म्हणे) हिंदू असले तरी सुद्धा धर्मांतराच्या नावाने बोंब मारणे. बौद्धिकामध्ये चाचा नेहरूंना शिव्या देणे आणि मीडिया मध्ये नेहरूंनी संघाची कशी स्तुती केली होती असे कंठ दाटून सांगणे फोटोशॉप मध्ये स्वदेशी किती चांगली आहे असे ग्राफिक्स करून फेसबुक वर टाकणे संघ कसा व्यक्तिपूजक नाही हे गुरुजी आणि डॉक्टर ह्यांची उदाहरणे घेऊन त्यांच्या तसबिरी समोर सांगणे भारद्वाज ऋषी ह्यांचे विमान शास्त्र वाचून विना इंधन चालणारे विमान गुप्त पणे निर्माण करणे. (टेस्ला वाले एलोन मूषक ह्यांनी ह्या प्रकल्पाचा फार मोठा धसका घेतल्याचे ऐकिवात आले) कम्युनिस्ट मंडळींचे आर्थिक व्यवस्थेचे विचार वाचून ते आपल्या नावाने ऑरगॅनिझर आणि पांचजन्य मध्ये छापून आणणे RTE , हिंदू देवळे ह्या वरील सरकारी बळजबरी, इत्यादी महत्वाच्या हिंदू विषयावर मूग गिळून गप्प बसणे सर्व चांगल्या स्वतंत्र हिंदू विचारवंतांना वाळीत टाकणे आणि PN Oak किंवा कल्याणरामन सारख्या भोंदू विचारवंताचे लेखन प्रमोट करणे.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

... अजुन दोन कामे राहिली

चंपाबाई
Tue, 09/13/2016 - 18:42 नवीन
१. खाजगीत गांधीजीना शिव्या घालणे व सार्वजनिक ठिकाणी ते संघास प्रातःस्मरणीय आहेत असा जयघोष लावणे. २. खाजगीत आरक्षण व दलिताना नावे ठेवणे व संघात आंबेडकर जयंती साजरी केल्याचा गांजावाजा करणे.
↩ प्रतिसाद: साहना

लोचट प्रतिसाद!

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 18:43 नवीन
लोचट प्रतिसाद!
↩ प्रतिसाद: चंपाबाई

या असल्या आक्षेपांवर

नर्मदेतला गोटा
Wed, 09/14/2016 - 00:18 नवीन
या असल्या आक्षेपांवर तुम्ही वेगळा धागा का काढत नाही
↩ प्रतिसाद: चंपाबाई

तिळपापड का झाला बरे?

गामा पैलवान
Tue, 09/13/2016 - 18:43 नवीन
साहना, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी संघाची नाही. यावर अचूक बोट ठेवल्याने तुम्हाला राग आलेला दिसतोय. चालायचंच! टालरन्स कमी झालाय खरा भारतातला! आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: साहना

आणि १०० ! पु प्र शु

नावातकायआहे
Tue, 09/13/2016 - 03:45 नवीन
आणि १०० ! पु प्र शु

एकंदरीत संघ हे एक वेगळं रसायन

फेदरवेट साहेब
Tue, 09/13/2016 - 07:34 नवीन
एकंदरीत संघ हे एक वेगळं रसायन आहेच. संघाचे नाव खराब करण्यात काही अघोषित (अन अंतःकरणापासून जातीयवादी) भाट लोक पुढे असतात, दुर्दैवाने खुद्द संघातही असली माणसे कमी नाहीत ह्याचे एक कार्यकर्ता म्हणून वैषम्य वाटते

परीट मेला त्या दिवशी त्याची

साहना
Tue, 09/13/2016 - 10:01 नवीन
परीट मेला त्या दिवशी त्याची खरी ऐपत कळते कारण इतर दिवशी तो लोकांचे छान छान कपडे घालून फिरत असतो. मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल. संघाचे अनेक चांगले गुण आहेत. पण हे लोक आर्थिक अफरातफर करत नाहीत म्हणणे खोटे ठरेल. अफ़रातफ़रीच्या गोष्टी ते उघड बोलवून दाखवत नाहीत. कोर्टात सिद्ध होईल असे पुरावे नसल्याने मी माझे प्रथम दर्शनी अनुभव देणार नाही. शिक्षण क्षेत्रांत असे काय बरे दिवे लावले आहेत संघाने ? ह्यांच्या नाकाखाली काँग्रेस सरकारने RTE, ९३वि घटनादुरुस्ती इत्यादी हिंदू विरोधी गोष्टी पास केल्या. ह्यांची एकल विद्यालये ह्या खाली सध्या बेकायदेशीर ठरतील. मनोहर पर्रीकर ह्या खंद्या स्वयंसेवकाने गोव्यात कसला कायदा केला बरे ? तर म्हणे ख्रिस्ती शाळांना १००% सरकारी अनुदान आणि हिंदू शाळांना शून्य. काल हेडगेवार शाळेंत शाखा घेतली म्हणून कारवाईचा हुकूम दुसऱ्या स्वयंसेवकाने (पार्सेकर) दिला आहे. अखंड भारताच्या घोषणा देता देता गोव्यांत संघाचीच फाळणी झाली आहे. जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात. ९० वर्षे झाली तरी नाव घेण्यासारखे एक तरी पुस्तक ह्यांच्या बौद्धिका मधून आले आहे काय ? "आमच्या भारद्वाज ऋषींनी आधीच विमानाचा शोध लावला होता" आणि "शेण लावल्याने कॅन्सर बरा होतो" असली थोतांड ५ वर्षांच्या पोरांना सांगणे हि ह्यांची बौद्धिक कुवत. राम स्वरूप, सीता रॅम गोयल, अरुण शॉरी ह्यांची १० पुस्तके एका बाजूला आणि ९० वर्षांचे संपूर्ण संघ साहित्य दुसऱ्या बाजूला. गोव्यांत संघ वाले Inquisition म्हणून ओरडतात पण एक तरी पुस्तक ह्यांनी त्या विषयावर अभ्यास करून लिहिले आहे का ? त्या विषयावरचे पुस्तक प्रियोळकर ह्या स्वतंत्र विचारवंताने लिहिले आहे. ते तरी पुन्हा प्रकाशित करावे असा घोषा मी लावला होता पण ह्यांची हिम्मत नाही. संघाचे सोंग म्हणजे "वृद्ध नरी पतिवृता" ह्या प्रकारचे आहे. चार मुंडकी आहेत म्हणून सांगताना आहे पण त्यांत आणि झोंबी मध्ये फरक काही नाही म्हणून तीच भर कम्युनिस्त ह्यांना भारी पडतात.

बंगाल मध्ये चालणार्या

महासंग्राम
Tue, 09/13/2016 - 10:24 नवीन
बंगाल मध्ये चालणार्या कम्युनिस्टांच्या अत्याचारांबद्दल आपले काय म्हणणे आहे हें सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
↩ प्रतिसाद: साहना

अत्याचार हे साम्यवादाचे

साहना
Tue, 09/13/2016 - 10:46 नवीन
अत्याचार हे साम्यवादाचे व्यवच्छेदक कि काय म्हणतात ते लक्षण आहे. बंगाल असो वर केरळ सापाचा धर्म विष उत्पन्न करणे आहे.
↩ प्रतिसाद: महासंग्राम

अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 10:29 नवीन
अभ्यास वाढवा एवढेच सांगू शकतो. संघाबद्दल असलेल्या गैरसमजुतींबद्दल पूर्वी अनेकदा चर्चा झालेली आहे. पुन्हा तेचतेच सांगण्याचा कंटाळा आलाय.
↩ प्रतिसाद: साहना

आपल्या बहुमूल्य सल्ल्या साठी

साहना
Tue, 09/13/2016 - 10:50 नवीन
आपल्या बहुमूल्य सल्ल्या साठी अतिशय धन्यवाद. संघाचा आणि संघाच्या कार्याचा व्यवस्थित अभ्यास होईल ह्या साठी ५ पुस्तके तुम्ही सुचवू शकता काय ? RTE ह्या विषयावर संघाची काय भूमिका आहे आणि ती त्यांनी कोठे मांडली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आपण मार्गदर्शन केले तर आपली आभारी राहीन.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

साहना जी,

विशुमित
Tue, 09/13/2016 - 11:13 नवीन
साहना जी, संघांच्या आऊट डेटेड साहित्य/ पुस्तकांबद्दल प्रचंड सहमत...
↩ प्रतिसाद: साहना

गुरूजी एकदा एक स्वतंत्र लेख

आनन्दा
Tue, 09/13/2016 - 21:08 नवीन
गुरूजी एकदा एक स्वतंत्र लेख लिहाच.. आम्हाला पण रेफरन्सला उपयोग होईल.. फक्त खालील गोष्टी टाळाव्यात. १. संघभक्तीपर लिखाण. संघाची बाजू मांडा, पण आंधळी भक्ती नको. २. संघाच्या कार्याचा लेखाखोजा देखील मांडा अशी विनंती.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+1

अनुप ढेरे
Tue, 09/13/2016 - 10:36 नवीन
मस्त प्रतिसाद! आवडला.
↩ प्रतिसाद: साहना

मनोहर पर्रीकर ह्या खंद्या

प्रीत-मोहर
Tue, 09/13/2016 - 19:48 नवीन
मनोहर पर्रीकर ह्या खंद्या स्वयंसेवकाने गोव्यात कसला कायदा केला बरे ? तर म्हणे ख्रिस्ती शाळांना १००% सरकारी अनुदान आणि हिंदू शाळांना शून्य.
माझे वरचे प्रतिसाद आणि तुम्हीच दिलेल सर्क्युलर पुन्हा वाचून समजून घ्या. गुरुजींनी वर ट्रान्सलेट केलयं ते वाचल तरी चालतय:)
↩ प्रतिसाद: साहना

+ १

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 20:31 नवीन
+ १ गोवा सरकारच्या त्या परिपत्रकात अत्यंत सोप्या शब्दात ६ मुद्दे लिहिले आहेत. सर्व मुद्द्यांचा अर्थ अगदी सोपा आहे व त्यात कोणतीही संदिग्धता नाही. कोकणी/मराठी शाळांचे अनुदान सुरुच राहील, नवीन शाळांना प्रोत्साहन देऊन अनुदान दिले जाईल व ज्या अनुदानित शाळा जून २०११ पूर्वी कोकणी/मराठी माध्यमाच्या होत्या व त्यानंतर ज्यांनी इंग्लिश माध्यम स्वीकारले आहे अशा शाळांना सुद्धा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अनुदान कायम राहील हे मुद्दे अत्यंत सोप्या शब्दात लिहिले आहेत. ख्रिस्ती शाळा, हिंदू शाळा असे त्या परिपत्रकात शब्दच नाहीत. कोणत्याही शाळांचे अनुदान काढून घेतलेले नाही. परंतु त्या परिपत्रकात काय लिहिलंय ते अजिबात न वाचता किंवा वाचले असल्यास अजिबात अर्थ न समजता खालच्या पातळीवर जाऊन, पर्रीकरांनी हिंदू शाळांचे अनुदान काढून घेतले व ख्रिस्ती शाळांना १००% अनुदान दिले असे धडघडीत खोटे आरोप पर्रीकरांवर आणि पर्यायाने संघावर करून व त्यांच्यावर टीकेचा भडीमार करून ते मोकळे झाले.
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

परीट मेला त्या दिवशी त्याची

श्रीगुरुजी
Tue, 09/13/2016 - 20:43 नवीन
परीट मेला त्या दिवशी त्याची खरी ऐपत कळते कारण इतर दिवशी तो लोकांचे छान छान कपडे घालून फिरत असतो. मंदिराच्या खुल्या मैदानावर कुणीही "इस देश मी राहेन होगा ... " घोषणा देतो पण ज्यादिवशी सरकार एखादा हिंदू विरोधी कायदा करते तेंव्हा ह्यांचा दंड उत्तिष्ठ असतो कि नाही हे पाहणे सूचक ठरेल.
नरसिंहरावांच्या काळात एक नवीन कायदा करण्याचा प्रयत्न सुरू होता. जे पक्ष धर्मावर अन्याय वगैरे प्रचारसभेत बोलतात त्या पक्षांची मान्यता रद्द करून त्यांना निवडणुक लढण्यास बंदी घालावी असा कायदा करण्यासाठी अर्जुनसिंग जोरदार प्रयत्न करीत होते. या कायद्याचे निमित्त करून भाजप व शिवसेनेवर बंदी घालावी असा त्यांचा हेतू होता. परंतु भाजपने या विधेयकाला जोरदार विरोध केल्यामुळे हा प्रयत्न बारगळला. युपीएने आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये Communal Violence Bill या नावाने नवीन कायदा आणण्याचा जोरदार प्रयत्न अगदी ऑक्टोबर २०१३ पर्यंत केला होता. देशातील जातीय दंगलींसाठी त्या भागातील बहुसंख्य असणार्‍या धर्माला (म्हणजे हिंदूंना) जबाबदार धरण्यात यावे अशा तर्‍हेची तरतूद त्या विधेयकात होती. भाजपने या विधेयकाला सुद्धा जोरदार विरोध केल्यामुळे तो बारगळला.
जेंव्हा संकट नसते तेंव्हा "भारत माता कि जय" म्हणायचे आणि रमजान मध्ये इफ्तार पार्टी द्यायची असले बोटचेपे धोरण आहे ह्यांचे. कुणी confront केले कि काय ह्याचे शेपूट उपविष होऊन हे लोक आपल्या बिळांत जाऊन लपतात.
संघ इफ्तार पार्ट्या देण्यासारख्या फालतू गोष्टी करीत नाही. आजवर असे संघाने कधीच केलेले नाही. मोदींनी सुद्धा आजतगायत गुजरातमध्ये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा एकसुद्धा इफ्तार पार्टी आयोजित केलेली नाही. एकंदरीत या सदस्याचा वरील प्रतिसाद व या धाग्यावरील इतर प्रतिसाद शून्य अभ्यास व संघाविषयीचा ओतप्रोत द्वेष दर्शवितात.
↩ प्रतिसाद: साहना

RTE बद्दल दुटप्पीपणा आहेच

अनुप ढेरे
Tue, 09/13/2016 - 10:18 नवीन
RTE बद्दल दुटप्पीपणा आहेच संघाचा आणि भाजपाचा. आता सत्तेत असूनदेखील या महत्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा देखील करावीशी वाटत नाही. RTEआधीच्या घटनांबद्दल हा लेख वाचा. http://swarajyamag.com/economy/how-congress-enshrined-sectarianism-in-indias-education-sector

मी ह्याच विषयावर मिपा वर दोन

साहना
Tue, 09/13/2016 - 10:48 नवीन
मी ह्याच विषयावर मिपा वर दोन लेख लिहिले आहेत. अभिप्राय जरूर कळवा वेळ असेल तर.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

साहना यांना प्रतिसाद

गामा पैलवान
Tue, 09/13/2016 - 12:49 नवीन
साहना, तुमचे इथले प्रश्न वाचले. मी स्वत: संघाचा स्वयंसेवक नाही. तरीही प्रश्नांची उत्तरं देतो. कारण प्रश्न हिंदुत्वाशी संबंधित आहेत. १. >> व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही. हे शब्दांचा कीस पाडणे आहे. २. >> "हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ? >> हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? " संघाच्या कुठल्या पुस्तकात काय आहे ते माहित नाही. पण मला हाच प्रश्न कोणी दहा वर्षाच्या मुलाने केला तर मी सांगतो की एक सत्य आणि अनेक रूपं हे हिंदू धर्माचं सार आहे. एको सत्य विप्रा: बहुधा वदन्ति. ३. >> मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये >> प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात. ख्रिस्ती वा मुस्लिमांस हिंदू मानायला काय अडचण आहे? ज्याप्रमाणे काबा, जेरुसालेम वगैरे पवित्र स्थानं आहेत त्याचप्रमाणे भारतभूदेखील पवित्र माना की. प्रश्न मिटला. किंबहुना दोन भूम्या पवित्र मानणारी एक जात भारतात इतरांसोबत गुण्यागोविन्द्याने नांदत आली आहेत. कोकणातले शनवारतेली म्हणजे बेणे इस्रायली लोकं जेरुसलेमप्रमाणे भारतालाही पवित्र मानतात. कारण की ज्याप्रमाणे अब्राहमला जेरुसलेम मध्ये देवाचं दर्शन झालं, अगदी तस्संच दर्शन खंडाळा (रायगड जिल्हा) येथे काही शनवारतेल्यांना झालं होतं. त्यांच्या मते भारत जेरुसालेम इतकाच पवित्र आहे. अब्राहम व शनवारतेली वगळता इतर कोण्याही यहुद्यांस देवदर्शन झालं नाही. जर शनवारतेल्यांना भारत आपला वाटतो तर ख्रिस्ती आणि मुस्लिमांना का वाटू नये? ४. >> जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ? >> धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ? भारताचे जे भाग धर्मांतरित झाले ते भारताहून तुटले. म्हणून धर्मांतर वाईट. ५. >> आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ >> अ-हिंदू मानतो काय ? माहीत नाही. पण मानत नसावा. ६. >> ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू >> स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे >> भारतावर प्रेम आहे ? भारतावर प्रेम करणारे लोकं मूर्त्या फोडणे, हिंदूंवर अत्याचार करणे, इत्यादी कामे करत नाहीत. ७. >> मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि >> वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही >> आहे काय ? ही वैचारिक दिवाळखोरी नाही. हे ख्रिस्ती आणि मुस्लीम पूर्वीचे हिंदूच होते. त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था उर्वरित हिंडूंहून वेगळी नाही. याअर्थी त्यांना हिंदू म्हंटले आहे. मात्र बेणे इस्रायली लोकांनी ज्याप्रमाणे उर्वरित हिंदूंचा द्वेष करीत नाहीत त्याप्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिमांनी वागावं. बस इतकंच. ८. >> थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. माझा तरी आजिबात गोंधळ उडाला नाही. ९. >> "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही. माझ्यासारखा थोर विद्वानास विचारायचे प्रश्न कोण्या चड्डीधारी स्वयंसेवकास विचारणे हे आपणांस अल्पबुद्धीचे लक्षण वाटंत नाही का? १०. >> हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. राष्ट्र आणि दहशतवाद या शब्दांच्या व्याख्या करतांना युनोची भंबेरी उडते. ११. >> हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. मग उसनवारीवर काय नाहीये ते जरा सांगणार का? ३९५ कलमं असलेली भारताची राज्यघटनाही उसनवारीवर घेतलेली म्हणायची का? १२. >> ती सुद्धा समजली अर्धवट. ही संघाची समस्या नव्हे. १३. >> गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. काय झालं मग? चांगले ते घ्यावे. अवघे मिळमिळीत टाकावे. हे रामदासस्वामींनी सांगितलंय. १४. >> आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी. हे मात्र बरोबर बोललात. संघाच्या जबाबदार लोकांत देखील भारताच्या दैदिप्यमान इतिहासाबद्दल औदासिन्य दिसून येतं. आ.न., -गा.पै.

फेसबुक वर तर सनातन आणि संघ

विशुमित
Tue, 09/13/2016 - 14:50 नवीन
फेसबुक वर तर सनातन आणि संघ समर्थकांचा कलगीतुरा वाजत आहे.... काय भानगड आहे ?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हिंदूंनी नेमका कोणता झेंडा

विशुमित
Tue, 09/13/2016 - 14:52 नवीन
हिंदूंनी नेमका कोणता झेंडा घ्यायचा हाती????
↩ प्रतिसाद: विशुमित

"न सुधरण्याचा झेंडा"

खालीमुंडी पाताळधुंडी
Tue, 09/13/2016 - 14:57 नवीन
"न सुधरण्याचा झेंडा" . . काही लोक तर फाॅरेन ला जाऊन पण सुधरत नाहीत
↩ प्रतिसाद: विशुमित

> हे ख्रिस्ती आणि मुस्लीम

साहना
Tue, 09/13/2016 - 16:38 नवीन
> हे ख्रिस्ती आणि मुस्लीम पूर्वीचे हिंदूच होते. त्यामुळे त्यांची मूल्यव्यवस्था उर्वरित हिंडूंहून वेगळी नाही. हे विधान मूर्खपणाचे आहे. इस्लाम, ख्रिस्ती धर्म आणि हिंदू धर्म हे पूर्णपणे विरोधी आहेत. "आपला तो एकाच देव आणि मूर्तिपूजक म्हणजे heathens" असली भावना असणाऱ्या भोंदू धर्माला हिंदू म्हणणे म्हणजे अष्टमीला बीफ कबाबचा नेवैद्य दाखवणे आहे. त्या शिवाय धर्मांतर झाले कि देशाची फाळणी होते पण ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहेत हे जरा डोक्यात नाही गेले. at this rate उद्या कुणी "जय श्री कृष्ण" म्हणजे "थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी" असे सांगितले तरी आश्चर्य वाटणार नाही.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा