मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संघः कलियुगातील एक चमत्कार

नर्मदेतला गोटा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला

वाचने 84267 वाचनखूण प्रतिक्रिया 480

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 23:21
विकीपिडीयातील माहिती मिठाची चिमूट घेऊनच वाचावी लागते. बर्‍याचदा माहिती चुकीची, अर्धवट किंवा पक्षपाती असते. वरील लिंकमध्ये काही ढोबळ चुका आहेत. उदा. It drew initial inspiration from European right-wing groups during World War II. संघ ही स्थापनेपासूनच हिंदुत्ववादी विचारांची संघटना होती. संघस्थापनेनंतर तब्बल १४ वर्षानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यामुळे दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात संघाला युरोपमधील उजव्या विचारांच्या संघटनांकडून स्फूर्ती मिळाली हे चुकीचे विधान आहे. The RSS was banned once during British rule and then thrice by the post-independence Indian government — first in 1948 when a former RSS member assassinated Mahatma Gandhi; then during the emergency (1975–77); and for a third time after the demolition of Babri Masjid in 1992. हे पण चुकीचे विधान आहे.

In reply to by विशुमित

पगला गजोधर Mon, 09/12/2016 - 22:59
प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्या दिवशी हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत."

In reply to by पगला गजोधर

अभ्या.. Mon, 09/12/2016 - 23:06
१९३८ साली तिरंगा हा भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून घोषित होता का? कींवा अशोकचक्राच्या ऐवजी चरखा असणारा काँग्रेसचा ध्वज म्हणून माहीत होता? का स्वतंत्रता सेनान्यांचा ध्वज म्हनून माहीत होता? त्याचा सध्या आहे तसा प्रोटॉकॉल वगैरे त्यावेळी नसावे काही.

In reply to by अभ्या..

पगला गजोधर Mon, 09/12/2016 - 23:09
२२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदू जगत उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"

In reply to by पगला गजोधर

अभ्या.. Mon, 09/12/2016 - 23:14
मग त्यांचे हे पक्षांचे पक्षांचे भांडण झाले ध्वज कोणता असावा याबद्दल. कॉग्रेसने पुढे आणलेल्या तिरंग्याला त्यानी केला असेल त्यावेळी विरोध. हा राष्ट्रध्वजाला थोडीच विरोध झाला. (कारण त्यावेळी राष्ट्रध्वज म्हणून नसणारच)

In reply to by अभ्या..

पगला गजोधर Mon, 09/12/2016 - 23:16
https://books.google.co.in/books?id=rNxGvlOoUvsC&pg=PA50&lpg=PA50&dq=हिंदू+महासभा+17+एप्रिल+1941&source=bl&ots=sZePpJGBNj&sig=-14Q0nbq9HZLTX19jgp5Th55sv8&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjIju2wsIrPAhWDKJQKHfbDB_kQ6AEIIzAD#v=onepage&q=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%2017%20%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%201941&f=false

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय Tue, 09/13/2016 - 15:16
तीन तीनदा एकच चुकीचा मुद्दा रेटुन नक्की काय मिळवणार आहात? अभ्याने पुर्वीच लिहिले आहे की जेव्हा तिरंगा हा भारताचा झेंडा नव्हताच तेव्हा त्याला विरोध करणे हे देशाच्या झेंड्याला विरोध करणे होउच शकत नाही. भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल खान्ग्रेस आणी संघ यांच्यामध्ये दुमत होते आणि खान्ग्रेस ने आपला मुद्दा रेटुन तिरंगा मान्य करायला लावला किंवा तशी परिस्थिती निर्माण केली असे फारतर म्हणता येइल

In reply to by विशुमित

विकास Wed, 09/14/2016 - 21:43
संघाचे वर्तमान प्रसारप्रचार प्रमुख श्री. मनमोहन वैद्य यांची गेल्याच आठवड्यात (हिंदूस्थान टाईम्स चे एक उद्योग-अर्थव्यवस्था आदीवरील जालीय पत्र) लाईव्ह मिंट मधे मुलाखत आली होती. ती मुलाखत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. पण येथे तिरंग्या संदर्भातील त्यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे चिकटवत आहे. It is often said that the RSS has reservations about the Indian flag. Is that true? The Indian flag as it was adopted by our Constitution must be respected by all. There have been people from the Sangh who have given up their lives to protect the flag so there is no question of us not accepting the flag. We are not interested in changing it. Was there no objection to the flag when it was adopted? The tricolour flag emerged in political scenario in 1921. It was Gandhiji’s idea to have a flag representing all major communities. Hence a tricolour flag with red (not saffron) at the bottom, green in middle and white at the top representing Hindus, Muslims and Christians. Then itself, lot of people objected, calling it a communal flag. The very idea of identifying each community separately and trying to forge unity among them was termed as communal thinking. They demanded to have a non-communal, national flag. This demand was so strong that All India Congress Working Committee appointed a seven member committee (popularly known as flag committee) to look into the matter. After hearing both the sides, the flag committee came to a unanimous conclusion. The flag committee report published in 931 says, “It was decided that our flag should be artistic, distinct and non-communal. It was decided unanimously that it should be of one single colour. And if there is a colour that is more distinct that another, one that is more acceptable to the Indians as a whole and one that is associated with this ancient country by long tradition it is the saffron kesari colour.” The flag committee recommended a rectangular saffron-colour flag with a blue charkha on top corner. The communalization of the colour saffron has happened post-Independence—particularly post the insertion of the word secular in the Constitution, when the definition of what is communal and what is secular began to get distorted.

श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 15:04
पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला.
दुरूस्ती. संघाच्या कार्यकर्त्यांनी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या दादरा, नगर, हवेली या भागांच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे इ. १२५ स्वयंसेवकांनी १९५३ मध्ये दादरा, नगर, हवेली इ. भागांवर सशस्त्र हल्ला करून हा भाग मुक्त केला होता. त्याव्यतिरिक्त संघाने १९३८ मध्ये हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतला होता. हे आंदोलन संघानेच सुरु केले होते. वैयक्तिक पातळीवर अनेक संघ स्वयंसेवक स्वातंत्र्यलढ्यात होते.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Mon, 09/12/2016 - 15:16
हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही... अन या गोवा दाद्र्याचं संघवाल्याना भारीच कौतुक असतं !

In reply to by चंपाबाई

हायला , कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही
ह ह पु वा झाली माझी... बाई अभ्यास वाढवा हो...!!!

In reply to by अनिरुद्ध प्रभू

श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 15:24
आता पुढचा जावईशोध म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात सोनिया, राहुल, प्रियांका, रॉबर्ट इ. स्वातंत्र्यसैनिकांनी कठोर कारावास भोगला होता व त्यांच्या प्रयत्नांमुळेच आख्खा भारत स्वतंत्र झाला.

In reply to by श्रीगुरुजी

चंपाबाई Mon, 09/12/2016 - 15:29
हो ना ! १९४२ साली फितुरी करुन इंग्रजांची मदत केलेल्या एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते. त्यापेक्षा हे ऐकायला मिळाले तर नक्कीच चालेल

In reply to by चंपाबाई

मुक्त विहारि Mon, 09/12/2016 - 15:37
....एका युगपुरुषाला भाजपीय सरकारने देशरत्न की काहीतरी पुरस्कार दिल्याचे ऐकले होते." तुम्ही हे असे मनोरंजक प्रतिसाद देता, म्हणून आजकाल आम्हाला तुमचे कौतूक वाटते....

In reply to by चंपाबाई

चिनार Mon, 09/12/2016 - 15:37
त्यापेक्षा,
"युवराजांनी कँडी क्रशची नऊशेवी लेव्हल पार पाडल्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून "राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार" जाहीर !!
ही बातमी जास्त मनोरंजक आणि सत्याच्या जवळपास जाणारी असेल नाही का चंपाताई ??

In reply to by चंपाबाई

चिनार Mon, 09/12/2016 - 15:21
कॉंंग्रेसने अख्खा देश स्वतंत्र केला त्याचे कौतुक नाही..
असं कसं म्हंता चंपाताई..त्यांचेच त पांग फेडून राह्यलो 60-70 वर्ष झाले.. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विलीन करावी असे गांधीजींचे म्हणणे होते असं वाचलंय..त्याच काय झालं ते कळलं नाही.. बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??

In reply to by चिनार

बाकी काँग्रेस विलीन (= बरबाद) करावी हे युवराजांनी मनावर घेतलंय असं दिसतंय..पोकेमॉन गो दिला का त्यांना डाऊनलोड करून ??
फर्मास बर का चिनार भाउ....

In reply to by चंपाबाई

मुक्त विहारि Mon, 09/12/2016 - 15:34
इतके मनोरंजक प्रतिसाद द्यायला, तुम्हाला कसं, कसं, सुचतं हो... तुमच्या सारख्या व्यासंगी, विद्वान, हजरजबाबी आणि बरेच काही गूण असलेल्या व्यक्तींच्या समावेशामुळे मिपा नक्कीच पहिल्या क्रमांकावर येणार बघा.

In reply to by चंपाबाई

मुक्त विहारि Mon, 09/12/2016 - 15:43
इतक्या वेळा आय.डी. उडून पण आपली कोडगेपणाची चिकाटी अद्द्याप टिक्कुन आहे... हा पण आपला एक विशेष गूण आहेच.

In reply to by श्रीगुरुजी

फेदरवेट साहेब Mon, 09/12/2016 - 18:46
ह्याच पुरंदऱ्यांनी काँग्रेसचा प्रचार करून सोनिया गांधींस निवडून आणा म्हणून केलेला प्रचार विसरलात का गुरुजी ?? तात्पर्य, माझा संघ मोठ्या नावांचा मोताद नाहीये, नावांनी संघ स्वतःला चिकटवून घ्यावा, संघाला कोणाच्या नावाची गरज नाही (कट्टर कार्यकर्ता) ढेल्या.

In reply to by श्रीगुरुजी

फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 07:27
पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना अनंतराव थोपटेनाच मत द्या म्हणून साकडं घातलं होतं. वाटल्यास आपल्या चालत्याबोलत्या राजकीय ज्ञानकोश उर्फ गॅरी ट्रुमन उर्फ क्लिंटन ह्यांच्याकडून फॅक्ट व्हेरिफाय करवून घेऊ शकता आपण

In reply to by फेदरवेट साहेब

श्रीगुरुजी Tue, 09/13/2016 - 08:36
>>> पुरंदरे संघाचेही प्रचारक आणि काँग्रेसचेही . भोरला झालेल्या सोनियांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सभेत तिला आधुनिक भारताच्या जिजाऊ म्हणत तलवार नजर करून मुजरा केला होता आणि लोकांना याचे काही संदर्भ आहेत का?

In reply to by श्रीगुरुजी

विवेकपटाईत Tue, 09/13/2016 - 10:01
दुसर्या विश्वयुद्धाचा काळात १5 -२० लक्ष भारतीय लोक ब्रिटीश सैन्यात दाखील झाले. अनेक गोळा बारूद चे कारखाने भारतात लागले. त्यातले अर्ध्याहून अधिक सैन्याला युद्धा नंतर निवृत्त करावे लागणार होते. अश्या परिस्थितीत विश्वयुद्धानंतर देशाला स्वतंत्रता देण्या शिवाय काही गत्यंतर नव्हते. कांग्रेस मुळे ब्रिटिशांना देशाचे दोन तुकडे करता आले एवढेच. सन १९४५ नंतर देशाला स्वतंत्रता देण्याची कार्रवाई ब्रिटिशांनी सुरु नसती केली तर नक्कीच सेन्याने त्यांना हाकलून लावले असते. एखादा जनरल गादीवर बसला असता.

रविकिरण फडके Mon, 09/12/2016 - 17:44
(एक शंका: हा लेख 'चर्चा'त का नाही?) बाकी, संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही. तो आहे हे मान्य. कारण संघाचा स्वयंसेवक असलेला एक लांबचा काका होता माझ्या लहानपणी. शिवाय संघ-प्रमुखांचे विचार वगैरे वाचनात येतात (त्यांच्यावर टीका होते तेव्हा) त्याही अर्थी संघ असावा. पण मला वाटते तो दूर कोठे तरी असतो - मिझोराम, नागालँड, असा, किंवा भूतकाळात गोवा मुक्तिसंग्रामात, नाहीतर कुठे भूकंप वगैरे झाला तर. पण मी जिथे जिथे राहिलो आहे तिथे तिथे काही समस्या निर्माण झाली आणि संघ पुढे आला असे मी अनुभवलेले नाही. स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात. किंवा असे आहे का की ते पडद्यामागून सूत्रे हलवितात पण श्रेय घेत नाहीत म्हणून मला दिसत नाहीत? नाहीतर कदाचित माझा अनुभवच तोकडा असेल.

In reply to by रविकिरण फडके

अंतरा आनंद Mon, 09/12/2016 - 18:06
संघ हा एक चमत्कार खरा! कारण तो मला तरी तो आसपास कुठेच दिसत नाही.
स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत. ते फक्त मोठ्या समस्याच हाती घेतात.
एक नंबर विचारणा. आमच्याकडेही त्यांची उपस्थिती मैदानावर काठ्या घेऊन हजेरी लावण्यापुरतीच आणि लहानांची बौध्दिके घेण्यापुरतीच दिसते. सामान्य माणसाला कुठले प्रॉब्लेम नसावेत असं त्यांचा समज असावा किंवा "नमामि वत्सले" म्हटल्याबरोबर सगळे प्र्~ओब्लेम छू होतात असं काहीतरी असावं.

In reply to by अंतरा आनंद

आनन्दा Tue, 09/13/2016 - 21:00
माझ्या घरात आणि आसपास संघ आहे, आणि मी तो बर्‍याच वेळेस अनुभवतो. एकदा तळासरीच्या वनवासी कल्याण केंद्राला भेट देऊन या. हे माझ्या माहितीतेल उदाहरण, बाकी माहीत नसलेली अनेक उदाहरणे असतील.

In reply to by रविकिरण फडके

विशुमित Mon, 09/12/2016 - 18:14
काठ्या घेऊन गुंडाना काय मारणार आहेत ते ? स्त्रियांची छेडछाड रोखण्यासाठी स्त्रियांना च उपदेश देत असतात ना तोकडे कपडे घालू नका, घराबाहेर पडू नका, स्त्री मर्यादा सांभाळा वगैरे वगैरे.. मोठ्या समस्येसाठी गेले 60-70 वर्ष घाशीत आहेत कोठे फरक पडला ?

In reply to by चंपाबाई

जेपी Mon, 09/12/2016 - 20:35
चंपाबाई, उद्या बकरा कुर्बान करणार आहात का ? नाय मंजे एक वाटा आमाला पण द्या..

In reply to by रविकिरण फडके

श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 23:33
कोणतीही व्यक्ती वा संघटना काही ठराविक क्षेत्रातच काम करताना दिसते. समाजाच्या सर्व क्षेत्रात तितक्याच तीव्रतेने काम करणे शक्य नसते. बाबा आमटे, प्रकाश आमटे यांनी कुष्ठरोग सेवा, आदिवासींची सेवा या क्षेत्रात काम केले आहे. अण्णा हजारे गावसुधारणा, भ्रष्टाचार विरोध इ. क्षेत्रात काम करतात. नानाजी देशमुख यांनी वनवासी क्षेत्रात काम केले. तसेच संघ हिंदू संघटन, नैसर्गिक आपत्ती व युद्धासारख्या प्रसंगी मदतकार्य, जातीयता निर्मूलन, शिक्षण इ. क्षेत्रात काम करतो. अण्णा हजारे किंवा बाबा आमटे या लोकांचा दहशतवात विरोधी कार्यात हातभाग किती किंवा कलाक्षेत्रासाठी यांनी काय केले किंवा महागाईविरोधात त्यांनी काय केले हे प्रश्न जसे चुकीचे ठरतील तसेच संघ बाकीच्या आपले मुख्य कार्यक्षेत्र सोडून इतर क्षेत्रात का नाही हा प्रश्न देखील योग्य ठरणार नाही.

"कलियुग" ही संकल्पना थोतांड आहे, "चमत्कार" या शब्दावर माझा आक्षेप आहे. आणि सतत संघाचे धागे मिपावर येण्यालाही माझा एक मिपाकर म्हणून आक्षेप आहे. ' ' धन्यवाद

'संघे शक्ति कलौ युगे,' असं एक वचन आहे. त्याला अनुसरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. सांप्रत, संघाच्या विविध सेवाभावी संस्थांना जे यश आणि पाठिंबा मिळत आहे त्याच्या मागे हीच शक्ती (चमत्कार नाही)असावी.

In reply to by श्रीनिवास टिळक

चंपाबाई Mon, 09/12/2016 - 22:25
सोंगे शक्ती कलीयुगे ... अशीही एखादी म्हण असावी... सोंग काढणे हीही एक शक्तीशाली कला कलियुगात विकसित झाली आहे.

In reply to by चंपाबाई

श्रीगुरुजी Mon, 09/12/2016 - 23:35
पुरूष असताना बाईचा आयडी असल्याचे सोंग घेणे किंवा अनेकवेळा हाकलून लावलेले असताना सुद्धा लोचटपणे पुन्हा पुन्हा इथे घोटाळणे ही कोडगेपणाची शक्तिशाली कला तुमच्यात चांगलीच विकसित झाली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

साहना Tue, 09/13/2016 - 11:37
ज्येष्ठ नागरिक असताना शेंबड्या पोराप्रमाणे ढगळ चड्डी घालून हवेत दंड फिरवीत काल्पनिक म्लेंच्छाची डोकी फोडणाऱ्या बाबत आपले काय मत आहे ? उत्तिष्ठ, उपविष करताना "चप्पल प्रमुख" सारख्या उच्च पदावर जबाबदारीचे सोंग आणणाऱ्या बाबत आपले काय मत आहे बरे ?

In reply to by साहना

शाम भागवत Tue, 09/13/2016 - 18:19
अस काही वाचल की संघ अधिकाधिक बळकट होतोय, तसेच २०१९ साली मोदी परत निवडून येणार असे वाटायला लागते. :)) २०१४ साली संघ व मोदी विरोध असाच उफाळून आला होता व भाषा तर याहूनही खतरनाक होती. तुम्ही छुपे मोदी समर्थक तर नाही ना? ;-)

In reply to by शाम भागवत

फेदरवेट साहेब Tue, 09/13/2016 - 18:53
साहेब , उघडा डोळे बघा नीट (किमान) गुजरतेतल्या बातम्या, अत्युच्च पातळीला पोचले की भल्याभल्या संस्कृतींचा ऱ्हास होतो. हे बीजेपी काँग्रेस आप वगैरे यःकिश्चित राजकीय पक्ष आहेत. (केवळ नियतीस इमानदार असलेला कुत्रा) ढेल्या

In reply to by फेदरवेट साहेब

शाम भागवत Tue, 09/13/2016 - 19:08
:) तस काही नाही हो. राग व द्वेष यांची मात्रा जरा जास्त वाटली म्हणून अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचा उपयोग केला.

पगला गजोधर Mon, 09/12/2016 - 23:58
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली.
हिंदू धर्म उद्धारार्थ प्रकातलेल्या ह्या संघटनेला इफ्तार पार्टी का आयोजित करावी लागली बरे ?? रेफ- 2 जुलै 2016, दिल्ली

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Tue, 09/13/2016 - 07:39
मुस्लिम राष्ट्रीय मंच व संघ यांच्यात काहीच सबंध नाही का ? आता टेक्निकल गोष्ट उभ्या करून , जसे की इफ्तार मुरामं ने आयोजित केलाय, संघाने नव्हे; धूळफेक होऊ लागलीय.

In reply to by पगला गजोधर

साहना Tue, 09/13/2016 - 10:09
आप समज्या नहीं भाई जान जे काही चांगले आहे ते संघ, आक्षेप घेण्यासारखे आहे ते सगळे आऊट सोर्ज्ड आहे हो. रस्त्यात मारामारी करणारे, तोडफोड बजरंग दल. अपघात स्थळी मदत घेऊन पोचणारे संघ. भ्रष्टचार करून पैसे खाणारे भाजपवाले. रक्तदान करणारे संघ वाले. इफ्तार करणारे मुस्लिम मंच, दसऱ्याच्या दिवशी घोष वाजवणारे संघ. कम्युनिस्टां प्रमाणे बुरसटलेली आर्थिक नीती असणारा तो मजदूर संघ, गुरुपौर्णिमेला ध्वजवंदन करणारा फक्त संघ. थोडक्यांत काय तर संघ म्हणजे आलीस इन ओन्डरलॅंड आहे. काहींनी काम ना करता, कुठल्याही विषावर ठोस भूमिका ना घेता गुळमुळीत धोरण ठेवले कि कुणीही नवे ठेवू शकत नाही आणि जबाबदार झटकून टाकता येते.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे Tue, 09/13/2016 - 15:59
http://muslimrashtriyamanch.org/ हे चेकवा.
It was on December 24, 2002 a group of nationalist Muslims and functionaries of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) came together in Delhi. The occasion was Id Milan and the program was organized at the initiative of noted journalist, writer and ..
http://muslimrashtriyamanch.org/

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी Tue, 09/13/2016 - 16:06
संघ आणि मुस्लिम राष्ट्रीय विचार मंच यांच्यात काय संबंध दिसतो या लेखातून? एका कार्यक्रमात संघाचे नेते व काही मुस्लिम नेते एकत्र आले व नंतर त्या मुस्लिम नेत्यांनी हिंदू व मुस्लिम यांच्यातील दरी मिटविण्यासाठी या मंचाची स्थापना केली. संपला संबंध. विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Tue, 09/13/2016 - 17:48
विहिंप, अभाविप, भामसं, वनवासी संघ इ. संघटनांची पितृसंस्था संघ आहे. या संस्था संघाच्या अखत्यारीत येतात. मुस्लिम विचार मंच, बजरंग दल, पतितपावन संघटना, हिंदू एकता दल, हिंदू मुन्नेन मुन्नानी, श्रीरामसेने इ. संघटना स्वतंत्र आहेत. संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही व त्या संघाने सुरू केलेल्या वा चालविलेल्या नाहीत.
नॉन-स्टेट-ऍक्टर संघटना जसे की पाकिस्तानात, जमात-उल-दावा हिच्याशी पाकिस्तान सरकार, सैन्यदल, आय एस आय, पाकिस्तान पीपल्स पार्टी इत्यादींचा संबंध नाही ....

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Tue, 09/13/2016 - 23:05
पुणे: नथुराम गोडसे हा शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता, असा दावा गोडसेच्या नातवाने केला आहे. सात्यकी सावरकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. नथुराम गोडसेला संघामधून कधीही काढण्यात आलं नाही, किंवा त्याने कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नाही, असं सात्यकी यांनी म्हटलं आहे. संघाशी एकनिष्ठा दाखवणाऱ्या नथुराम आणि गोपाळ गोडसे या दोघांचं काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे. मात्र, नथुराम स्वयंसेवक नसल्याचा दावा सातत्यानं संघाकडून केला जातो हे अतिशय क्लेशदायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1932 मध्ये सांगलीत नथुरामने संघामध्ये प्रवेश केला आणि शेवटपर्यंत बौद्धिक कार्यवाहची जबाबदारी सांभाळली, असा दावा सात्यकी यांनी केला. गांधी हत्येचं समर्थन न केल्याचं आपण समजू शकतो, मात्र सत्यापासून पाठ फिरवली जाऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी संघावर टीकाही केली आहे.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Wed, 09/14/2016 - 11:51
काही महत्त्वपूर्ण लेखन आम्ही जपून ठेवल्याचं सात्यकी यांनी म्हटलं आहे.
सात्यकी सावरकर यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ? आणि जे काही लेखन त्यांच्याकडे आहे, ते त्यांनी सार्वजनिक करून, पूर्ण चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?

In reply to by पगला गजोधर

आनन्दा Tue, 09/13/2016 - 21:04
खरे आहे.. या संघटनांपैकी बर्‍याच संघटना पूर्वाश्रमींच्या संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या दिसतात. श्रीराम सेना माहीत नाही, पण बजरंग दल वगैरे परिवाराशी नाते सांगतात यात संदेह नसावा. किंबहुना सध्या जो घोळ चालू आहे ते मराठी भाषा आंदोलन पण यातच येते.

In reply to by आनन्दा

श्रीगुरुजी Wed, 09/14/2016 - 14:33
संघाशी संबंधित संस्थांचे २-३ प्रकार आहेत. १) संघाने स्वतः सुरू केलेल्या उपसंस्था (यात विहिंप, अभाविप, भामंसं, वनवासी संघ, राष्ट्र सेविका समिती इ. चा समावेश होतो). या संस्था संघाने स्वतःहून सुरू केलेल्या असून संघाचे यांच्यावर नियंत्रण आहे. २) संघ स्वयंसेवकांनी स्वतःहून सुरू केलेल्या संस्था (यात ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षण संस्था, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, बजरंग दल इ. चा समावेश होतो). या संस्था जरी संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केल्या असल्या तरी संघाशी यांचा तसा संबंध नाही व संघाचे यांच्यावर नियंत्रण नसते. ३) संघापासून स्फूर्ती घेऊन सुरू झालेल्या संस्था (उदा. मुस्लिम राष्ट्रीय मंच). अशा संस्थांवरही संघाचे नियंत्रण नसते व अशा संस्थांशी संघाचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणताच संबंध नसतो ४) यात अजून एक प्रकार आहे. तो म्हणजे संघाच्या हिंदुत्व, राष्ट्रवाद इ. काही तत्वांशी काहीशी जवळीक असणार्‍या संस्था. यात पतितपावन संघटना, हिंदू एकता आंदोलन, वंदेमातरम संघटना, हिंदू मुन्नेन मुन्नानी, शिवसेना, सनातन संस्था, हिंदू जागृती मंच, श्रीराम सेने इ. चा समावेश होतो. संघाचा या संस्थांशी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष असा कोणता संबंध नाही. संघाचे या संस्थांवर कोणतेही नियंत्रण नाही किंवा संघ यांना मार्गदर्शनही करीत नाही. परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Wed, 09/14/2016 - 16:21
परंतु अशा संस्थांनी जर काही दुष्कृत्ये केली तर लगेच संघ परिवारातील संस्थांनी दुष्कृत्ये केली असा कांगावा केला जातो.
'असे कांगावा करणारे' यांनी संघाची बदनामी केली म्हणून, संघ किंवा अनुयायांपैकी, त्यांच्यावर दावा करणार काय ? आणि जे काही पूर्ण सत्य चित्र लोकांपुढे यावे, म्हणून त्यांच्यावर कोर्टातून आदेश घेऊन येणार का ?

In reply to by पगला गजोधर

मुळात संघ आणि संघाचं हिंदुत्व यांवर निदान बेसिक वाचन चालु करावं ही विनंती. एकदा बेस कळाला कि बरेचसे प्रश्न पडणार नाहीत. पहिलं मुळं पक्कं करा. विनंती.. आ.न. अनिरुद्ध

In reply to by साहना

हिंदु नक्की कोणाला म्हणावं? जी व्यक्ती अखंड हिंदुस्तान वा आपला भारत यांवर अत्यंत मनापासून, प्रेम करते मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरीही ती हिंदूच.... संघ हे प्रमाण मानतो.. स्वा. सावरकरांची हिंदुत्त्वाची व्याख्या जी संघ मानतो ती अशी आहे. परिपूर्ण, व्यापक, पण निश्चित. ..........."आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका........... पितृभूपुण्यभूश्चैव........... स वै हिंदुरीतिस्मृतः" जो सिंधुनदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या ह्या विशाल खंडप्राय देशाला, आपल्या वाडवडीलांची, पूर्वजांची भूमी मानतो, तसेच पवित्रभूमी मानतो, तो हिंदू.

In reply to by अनिरुद्ध प्रभू

साहना Tue, 09/13/2016 - 11:05
व्याख्या हिंदुत्वाची विचारली होती हिंदू शब्दाची नाही. "हिंदुत्व म्हणजे काय हो असे १० वर्षांच्या मुलाने विचारले तर एका स्वयंसेवकांचे उत्तर काय असेल ? हि व्याख्या संघाच्या कुठल्या साहित्यात दिलेली आहे ? " आपली हिंदू धर्माची व्याख्या सुद्धा गोंधळ उडवणारी आहे. १. आपण दिलेली व्याख्या आणि सावरकर ह्यांची व्याख्या ह्यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. त्या दोन्ही सामान नाही आहेत. २. मुस्लिम/ख्रिस्ती लोकांची पुण्यभू हिंदुस्थान नाही ती काबा/जेरुसलेम इत्यादी आहे. सावरकरांच्या व्याख्ये प्रमाणे ख्रिस्ती/मुस्लिम हिंदू नाहीत. आपल्या व्याख्येप्रमाणे ते हिंदू असू शकतात. ३. जर राष्ट्रपेमी ख्रिस्ती सुद्धा हिंदू आहे तर मग उगाच धर्मांतराला का बरे विरोध कार्याचा ? धर्मांतर केले म्हणून राष्ट्रप्रेम का कमी होते ? ४. आमची मुले जी परदेशांत जन्माला अली आहेत स्थायिक आहेत जी भारतात कधीही अली नाही अश्याना संघ अ-हिंदू मानतो काय ? बाली किंवा कंबोडिया मधील हिंदू संघाच्या मते अ-हिंदू आहेत का ? ५. ज्या ख्रिस्ती/मुस्लिम धर्मानी आमच्या हिंदू धर्माची थट्टा केली, आमच्या मूर्तीना फोडून टाकले, आमच्या हिंदू स्त्रिया वर अत्याचार केले, शेकडो लोकांचे शिरकाण केले त्यांना सुद्धा आम्ही हिंदू मानायचे काय कारण त्याचे भारतावर प्रेम आहे ? तथाकथित संत तेरेसा ह्यांचे भारतावर प्रेम आहे म्हणून त्यांना आम्ही हिंदू मानायचे का ? मूर्तिपूजा, निसर्गपूजा ह्यांना सर्वांत मोठे पाप मानणाऱ्या ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माला "हिंदू" मानणे हि वैचारिक दिवाळखोरी आणि आमच्या धर्म परंपरासाठी बलिदान केलेल्या आमच्या पूर्वजांचा घोर अपमान नाही आहे काय ? थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही. हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करताना ह्यांची भंबेरी उडते. हिंदू शब्दाची व्याख्या उसनवारी वरून घेतली कुणाकडून तर सावरकर ह्यांच्या कडून. ती सुद्धा समजली अर्धवट. गणवेश आणि एकूण संघटन पद्धती घेतली युरोपिअन लोकां कडून. आपल्याच इतिहास संस्कुर्तीचा नाही अभ्यास आणि चालले आपले धर्म रक्षण करण्यासाठी.

In reply to by साहना

प्रत्येक प्रश्नाच उत्तर मी देउ शकतो पण एवढ सगळं टाईप करायचा कंटाळा आणि तेवढा नसलेला वेळ पाहता आपली भेट घेण्यास उत्सुक आहे... बाकी आपल्या कोर्टात चेंडु...आपण ठरवावे...मी आहेच!!

In reply to by साहना

झेन गुरुवार, 09/15/2016 - 17:42
"थोडक्यांत काय तर संघाचा वैचारिक गोंधळ ह्यातून स्पष्ट होतो. "हिंदुत्व म्हणजे काय रे? " ह्या सध्या प्रश्नाचे उत्तर चड्डिधारी स्वयंसेवकांना देता येत नाही" तुमचा नेमका राग स्वयंसेवकांवर का चड्डिवर का तो तुमचा वैचारिक गोंधळ ?

In reply to by साहना

श्रीगुरुजी Tue, 09/13/2016 - 15:58
Anyone who is the national of this country, irrespective of being a Shaiva, Shakta, Vaishnava, Sikh, Jain, Muslim, Christian, Parsi, Buddist or Jew by way of his creed or mode of worship, is a Hindu. http://www.archivesofrss.org/why-hindu-rashtra.aspx When a Muslim Swayamsevak of RSS was questioned about Sangh's definition of 'Hindu' and 'Hindu Rashtra', he said that a Hindu is a person who has been born and brought up in Hindustan, and 'Hindu' is not a religion, it's a way of life. The idea of unity in diversity has been path of the Indian culture since ancient times and Indian cultural identity is defined by Hindutva, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat said on Sunday. http://www.thehindu.com/news/national/hindutva-is-indias-identity-rss-chief/article4937750.ece

गामा पैलवान Tue, 09/13/2016 - 02:49
रविकिरण फडके,
स्थानिक गुंडगिरी, स्त्रियांची छेडछाड, अशा किरकोळ गोष्टीपासून संघाचे लोक दूर राहत असावेत.
अहो, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही संघाची जबाबदारी नाही. ही कामं संघाने केली तर पोलीस काय करणार मग? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

साहना Tue, 09/13/2016 - 11:57
हो ना, संघाची प्रमुख जबाबदारी खालील प्रकारे आहे. सदर कामे करायला आणखीन कुणालाही वेळ नसल्याने हि पुण्याची कामे संघ करतो. "रेप इंडियात होतात भारतात होत नाहीत" अशी थोर वचने निर्माण करणे, स्वतः अविवाहित असून स्त्री मंडळींना त्यांच्या वस्त्रां बद्दल अनाहूत सल्ले देणे गो मूत्र आणि गो विष्ठा ह्यांचे विविध उपयोग लोकांना सांगणे हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी लोक (ख्रिस्ती, मुस्लिम सुद्धा) "हिंदू" आहेत असे सांगून अमेरिकन भारतीय हिंदू कडून हिंदू स्वयंसेवक संघाच्या नावाने देणग्या घेणे. हिंदुस्तानातील सर्व देशप्रेमी ख्रिस्ती सुद्धा (म्हणे) हिंदू असले तरी सुद्धा धर्मांतराच्या नावाने बोंब मारणे. बौद्धिकामध्ये चाचा नेहरूंना शिव्या देणे आणि मीडिया मध्ये नेहरूंनी संघाची कशी स्तुती केली होती असे कंठ दाटून सांगणे फोटोशॉप मध्ये स्वदेशी किती चांगली आहे असे ग्राफिक्स करून फेसबुक वर टाकणे संघ कसा व्यक्तिपूजक नाही हे गुरुजी आणि डॉक्टर ह्यांची उदाहरणे घेऊन त्यांच्या तसबिरी समोर सांगणे भारद्वाज ऋषी ह्यांचे विमान शास्त्र वाचून विना इंधन चालणारे विमान गुप्त पणे निर्माण करणे. (टेस्ला वाले एलोन मूषक ह्यांनी ह्या प्रकल्पाचा फार मोठा धसका घेतल्याचे ऐकिवात आले) कम्युनिस्ट मंडळींचे आर्थिक व्यवस्थेचे विचार वाचून ते आपल्या नावाने ऑरगॅनिझर आणि पांचजन्य मध्ये छापून आणणे RTE , हिंदू देवळे ह्या वरील सरकारी बळजबरी, इत्यादी महत्वाच्या हिंदू विषयावर मूग गिळून गप्प बसणे सर्व चांगल्या स्वतंत्र हिंदू विचारवंतांना वाळीत टाकणे आणि PN Oak किंवा कल्याणरामन सारख्या भोंदू विचारवंताचे लेखन प्रमोट करणे.

In reply to by साहना

चंपाबाई Tue, 09/13/2016 - 18:42
१. खाजगीत गांधीजीना शिव्या घालणे व सार्वजनिक ठिकाणी ते संघास प्रातःस्मरणीय आहेत असा जयघोष लावणे. २. खाजगीत आरक्षण व दलिताना नावे ठेवणे व संघात आंबेडकर जयंती साजरी केल्याचा गांजावाजा करणे.

In reply to by साहना

गामा पैलवान Tue, 09/13/2016 - 18:43
साहना, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी संघाची नाही. यावर अचूक बोट ठेवल्याने तुम्हाला राग आलेला दिसतोय. चालायचंच! टालरन्स कमी झालाय खरा भारतातला! आ.न., -गा.पै.