शनिशिंगणापूरात समतेची गुढी
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१००
१००
म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत
हम्म,
हे ही पहा-
सहमत
=))
मतदानाचा अधिकार आणि मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार
तसं म्हणाल तर, मतदान केल्याने तरी काय फरक पडतो?
मतदान केल्याने फरक पडत नाही हे तुमचं मत आहे,
मंदिरात जाणं ही कुणाची मानसिक
मंदिरात न जाण्याने काहीही फरक पडत नाही हे ही तुमचं मत आहे!
सुधारणा टप्प्याटप्प्याणेच होतात-
(No subject)
शनी देव आणि शनी ग्रह यांचा
(No subject)
हे असं कोल्हापूरात कधी होणार
याची माहीती आणि ठोस संदर्भ
अद्द्या, मृत्युन्जय, विजय
गरिब चिमणा उडालेला आहे.
पुन्हा येईल
गरिब चिमणा उडालेला आहे आणि तो १० मिनिटात पुन्हा आलाय
ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला
हं समजलं!!!
ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड.
वल्ली भौ
ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं
हे दिसले की जराही दयामाया न
आधी मांडे घेऊन या, मग बोलू =)
मलाही हाच प्रश्न पडतो.
एक तर बेरोजगार इंजिनियर असेल
अजुन एक प्रश्न असाही पडतो की
कै म्हणता ;)
???
तो नवीन स्त्रीरूपात आलेला
वाह गुरुजि आपकि पारखि नजर और
..
आजचा मटा.
आलात :)
पूजा करुन गुन्हे वाढणार
प्रथेमागे स्त्रियांवर अन्याय करायचा हेतू होता का?
विडा नव्हे विदा. धन्यवाद व चुकीबद्दल क्षमस्व.
उत्तर आधीच दिलंय, तरीही-
असल्यास त्याचा विडा द्यावा
ही बातमी बघा-
लिंक ...
धन्यवाद.
शनि जागृत ग्रह आहे हे या
अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या
२४ तास न्यूज वाले जर या