जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे.
अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत.
हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही.
स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही.
स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले.
शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
प्रतिक्रिया
9 Apr 2016 - 11:01 am | अ-मॅन
स्वग्तः- आम्हाला मिपाच्या सर्व चौथर्यांवर प्रवेश कवा मिळनार ?
9 Apr 2016 - 11:03 am | माहितगार
हम्म.. या या, बराच वेळचा हा प्रतिसाद कसा आला नाही म्हणून वाट पहात होतो ;)
9 Apr 2016 - 11:06 am | अ-मॅन
या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.
9 Apr 2016 - 11:12 am | माहितगार
होईल होईल ते ही होईल :)
11 Apr 2016 - 8:32 pm | होबासराव
आता का अनाहिता जॉइन करता का ? मग आयडि निदान अ-वुमॅन तरि घ्यायचा.
अनाहिता सदस्यत्व
मिपा महिला विभाग 'अनाहिता' मध्ये सदस्यत्वासाठी इच्छुक महिला सदस्यांनी कृपया पैसा, अजया, रेवती, मितान, लीमाउजेट यांच्यापैकी कोणाशीही संपर्क साधावा.
9 Apr 2016 - 11:39 am | अद्द्या
चला
शिंगणापूरचा धंदा वाढीला लागेल म्हणायचा.
चांगलंय
9 Apr 2016 - 11:42 am | मराठी_माणूस
त्या नेपाळी बायंकावर दिल्ली मधे अत्याचार केले गेले त्यावर ह्या महीला अघाड्यांनी काय केले ?
इथे त्या मानाने क्षुद्र काराणा साठी शक्ती वाया घालवली
9 Apr 2016 - 12:20 pm | मितभाषी
मराठी माणूस किमान आपली हद्द सोडून विचार करायला तर लागला.
9 Apr 2016 - 12:29 pm | अत्रे
शक्ती नेमकी कोणी वाया घालवली? बंदी करणाऱ्यांनी का मोडणाऱ्यानी?
9 Apr 2016 - 12:38 pm | माहितगार
+१ चांगला प्रश्न. स्त्री शक्ती योग्य बाजूनेच खर्च झाली.
9 Apr 2016 - 12:33 pm | माहितगार
साहेब दुसर्या देशाच्या डिप्लोमॅतीक पासपोर्टच्या मंडळींना खाली हात वर पाय करुन चालले तरीही हात लावता येत नाही तो आंतरराष्ट्रीय संकेत आहे. हम्म.. कारवाई सौदी अरेबियाच्या डिप्लोमॅटवर सौदी अरेबियाने सौदी अरेबीयन कायद्याखाली कारवाई करणे अभिप्रेत होते -तशी ती सौदी अरेबियाने केली असण्याची शक्यता कमी आहे- त्यासाठी खरे आंदोलन सौदी अरेबियात जाऊन अथवा सौदी अरेबियातील महिलांनी करावयास हवे होते, अर्थात भारतात आणि + इतर मुस्लिम बहुल देशात मुस्लिम महिलांना सोबत घेऊन खरेच आंदोलन करण्यास हरकत नव्हती किमान मुस्लिम स्त्रीयांचे डोळे उघडण्यास मदत झाली असती किंवा आपण हाच प्रश्न जे एन युच्या कन्हय्या कुमारला विचारला असतात तरीही कदाचित चपखल राहीला असता.
तिथे शरीर गेल इथे स्त्री कुठेतरी वावरली म्हणून गाईच्या दुधाने जमीन धुताना स्त्रीच मन मारलं गेलं, स्त्रीचे शरीर असो वा मन त्यावर राज्य करण्याची इच्छा पाशवीच एका गोष्ट केल्याने अथवा न केल्याने दुसर्या गोष्टीच्या करण्याचे महत्व कमी होत नाही कोणत्या न कोणत्या गोष्टीत पाशवी विचारांचा मुकाबला केला गेला हे महत्वाचे
9 Apr 2016 - 1:27 pm | गरिब चिमणा
महिलासुरक्षा हा पोलिसांचा प्रांत आहे,पोलिसांनी तंगड्या टाकून पसरायचे अनि लोकांनी आंदोलने करायची हे गैरलागू आहे.
9 Apr 2016 - 1:37 pm | माहितगार
ग.चि. हा प्रतिसाद देण्यापुर्वी आपण मराठी माणूस म्हणताहे त्या केस मधील पोलीसांची भूमिका अभ्यासली आहेत का ? आंतरराष्ट्रीय संकेतांच्या मर्यादा लक्षात घेता पोलीसांनी दिलेल्या स्थितीत जमेल तेवढे कर्तव्य पार पाडले असावे. लोलीस चुकत नसावेत असे नाही पण घे हातात आणि टोलास काही पॉइंट नाही. सौदी एंबसींसमोर मुस्लीम महिलांनीच आंदोलन केले असते तर त्यांच्या सौदींना थोडी फार लाज वाटण्याची आंतरराष्ट्रीय बदनामी टळावी म्हणुन त्यांनी काहीतरी हालचाल केली असती. आणि असे आंदोलन खरेच जरुरी असावे कारण अशा प्रकारच्या सौदी डिप्लोमॅटच्या वर्तनाचा काही आफ्रीकन देशातही इतिहास असावा -इंग्लंडात सौदी श्रीमंत वेगळ्या पद्धतीने सुटल्याच्याही बातम्या असाव्यात.
9 Apr 2016 - 12:19 pm | तर्राट जोकर
चांगली चर्चा आहे. =))
आंदोलकांनी कुठे कशी कशासाठी आंदोलने करावी ह्याबद्दल रोचक मार्गदर्शन मिळाले.
9 Apr 2016 - 12:58 pm | माहितगार
पंढरपूरमध्ये (कदाचित विधवा) महिला प्रवेशासाठी -पहिल्या महायुद्धाच्या आसपासच्या काळातले- आंदोलनाचे वर्णन बहुधा चिंतामण विनायक जोशींच्या 'चार दिवस सुनेचे' या कादंबरीत (१९५५च्या आसपास प्रकाशित) आहे बहुधा सत्यघटनेवर आधारीत असावे असे वाटते अर्थात संदर्भ दुजोरा उपलब्ध होऊ शकले नाही -(पै ताईंना काहि ह्या विषयावर माहिती आहे का ते त्यांना विचारावयास हवे) (चुभूदेघे) . योगा योगाने 'चार दिवस सुनेचे' मधील स्त्री आंदोलन स्टाईलचे वर्णन आणि तृप्ती देसाई स्टाईल बर्याच सारख्या वाटल्या.
अर्थात साने गुरुजींनी पंढरपुरात केलेला उपवास आणि त्या सोबत प्र.के. अत्रेंनी पंढरपुरच्या चौका चौकात उभे राहून केलेली भाषणे प्रबोधनाच्या दृष्टीने अधिक प्रभावी असावीत. तृप्ती देसाईंनी आंदोलन केले ते ठिक पण स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतर स्त्रीयांना पुरेशी संधी मिळालेली असताना स्त्रीयांमधून साने गुरुजींच्या (व्यक्तिमत्व) उंचीची आणि प्र.के. अत्रेंनी पंढरपुरात जशी भाषणे दिली तशी भाषणे करणारी स्त्री या आंदोलनात दिसली नाही. याच नव्हे स्त्री विषयक इतर आंदोलनातही बहुतांश स्त्रीया झाडाच्या फांदीवरच बसलेल्या दिसतात.
9 Apr 2016 - 1:11 pm | तर्राट जोकर
माझा रोख कदाचित आपल्या लक्षात आला नाही. आंदोलकांनी कुठे, कशासाठी, कधी आंदोलन करावे ह्याबद्दल इथले काय प्रतिसाद अभिनिवेशयुक्त मार्गदर्शन करतात. 'एवढीच हिंमत, कळकळ,इत्यादी आहे तर मग अमुक धमुक का करत नाही' छापाचे प्रतिसाद मनोरंजक आहेत.
9 Apr 2016 - 1:44 pm | माहितगार
ओह ओके :)
9 Apr 2016 - 12:23 pm | तर्राट जोकर
माझ्या एका सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर देईल का कुणी?
मंदिरात अमुक हे व्हावे, हे होऊ नये, अमुक लोकांना प्रवेश द्यावा, पैसे घेऊन स्पेशल प्रवेश द्यावा ह्याचे अधिकार मंदिरसमिती, ट्रस्टीला कसे काय मिळतात. देव व देवाचे मंदिर ही समाजाची मालमत्ता आहे की तळे राखील त्याच्या मालकीची?
9 Apr 2016 - 12:28 pm | पैसा
क्रिकेटची टीम इंडिया ही भारत देशाची टीम आहे का बी सी सी आय ची या प्रश्नाचे उत्तर आहे तेच.
13 Apr 2016 - 3:50 pm | sagarpdy
:D
9 Apr 2016 - 2:49 pm | मितभाषी
१००
9 Apr 2016 - 3:39 pm | महासंग्राम
धाग्याच्या शंभरी प्रित्यर्थ आता धडाडीच्या कार्यकर्त्या तृप्ती देसाई महिलांच्या इतर प्रश्नांद्दल जसे स्त्री भृण हत्या, हुंडाबळी, सार्वजनिक शौचालये याकडेही लक्ष देतील अशी अपेक्षा करूया
9 Apr 2016 - 4:07 pm | प्रदीप साळुंखे
म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत जास्ती हस्तक्षेप करू नये असे वाटते का?
वरील कार्यांमध्ये स्त्रियांचाच 50% सहभाग असतो. म्हणजे पूर्ण छळ पुरूषी नसतो.
म्हणजे हुंड्यासाठी सुनेचा छळ करणारी सासू ही स्त्रीच असते.
भ्रूणहत्या करवून घेणारी आई ही स्त्रीच असते.
9 Apr 2016 - 4:01 pm | प्रदीप साळुंखे
हम्म,
चौथर्यावर प्रवेश मिळाला हे उत्तमच झाले,
आता ही भूमाता ब्रिगेड आमच्या कोल्हापूरात येवून महालक्ष्मी(कि अंबाबाई?) मंदिर गाभार्यात प्रवेश करणार आहेत अशी बातमी आहे.
9 Apr 2016 - 5:22 pm | सुधीरन
जगात अनेक प्रश्न असतात. एखाद्या प्रश्नाला कोणी हात घातला की लगेच त्याचे विरोधक या प्रश्नांचे काय? त्या प्रश्नांचे काय? असे मुद्दे मांडू लागतात. त्या त्या व्यक्तिवर अवलंबून असतं की त्यास कोणता मुद्दा महत्वाचा वाटावा व त्याने कोणत्या मुद्द्यास हात घालावा. स्त्री पुरुष समानता ही निदान तत्वतः तरी सर्वांस मान्य असते (वा तसे दाखवावे लागते). त्यामुळे इतर मुद्दे रेटले जातात.
वेदाधिकारांविषयी बोलले तर, काय ठेवले आहे त्या वेदांत?, मंदिर प्रवेशाविषयी बोलले की, काय गरज आहे मंदिरांची? असे प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु ज्यास हे अधिकार नाहीत वा नव्हते त्यास या अधिकारांचे महत्त्व वाटावे वा वाटू नये, हे आपण कसे सांगायचे?
हो, २१वे शतक आहे, या अशा प्रश्नांत जास्त गुंतू नये. मात्र अनेक व्यक्तींची ही शिक्षण घेणारी केवळ पहिली वा दूसरी पीढ़ी आहे, त्यानी लगेच आपण वैश्विक वगैरे विचार करावा, हे सांगणे व त्यांची कीव करणे थोडेसे त्यांवर अन्याय करण्यासारखे ठरते. त्यात आपली शिक्षण व्यवस्था स्वतंत्र विचारांस कितपत वाव देते ते आपल्याला माहितच आहे!
9 Apr 2016 - 5:39 pm | lgodbole
ते लंडन पैलवान लंडनात बसुन विचरत आहेत .... बायकाना या आंदोलनाची काय गरज होती ?
मतदानाच्या अधिकारासाठी इंग्लंडातही एके काली स्त्रीयानी मोर्चे काढले होते ना ?
9 Apr 2016 - 11:04 pm | मितभाषी
आ न
लंडन पैलवान
13 Apr 2016 - 9:48 am | बोका-ए-आझम
यांच्यात फरक आहे. मतदान न केल्याने फरक पडतो. मंदिरात न गेल्याने काय फरक पडतो?
13 Apr 2016 - 10:08 am | सुधीरन
मंदिरात गेल्याने तुम्हाला नसेल फरक पडत, ज्यांना पडतो, त्यांना पडतो.
पुरुष मंदिरात गेलेला चालतो, स्त्री का नाही चालत?
13 Apr 2016 - 10:12 am | बोका-ए-आझम
वस्तुस्थिती नाही. मंदिरात न जाण्याने काहीही फरक पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. ते माझं मत नाहीये. आणि मुळात असला भेदभाव करणारी मंदिरं किंवा कोणतीही धार्मिक स्थळं हवीत कशाला हा माझा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कुणीही दिलेलं नाही.
13 Apr 2016 - 10:25 am | तर्राट जोकर
मंदिरात जाणं ही कुणाची मानसिक गरज असू शकते किमान तेवढा तरी फरक पडू शकतो ते मान्य आहे का? मंदिरात जाण्याने काहीही फरक पडत नाही हेही तुमचे वैयक्तिक मत झाले.
13 Apr 2016 - 10:25 am | सुधीरन
वस्तुस्थिती नाही!
देव, धर्म, धार्मिक स्थळे इ. विषयी मला बिलकुल ममत्व नाहिए.
परंतु त्यांचे अस्तित्व ही वस्तुस्थिती आहे. मग जर तिथे भेदभाव होत असेल तर तो नष्ट व्हावा अशी अपेक्षा कोणी करीत असेल व त्यासाठी आंदोलन करीत असेल तर त्यांस पाठिंबा आपण द्यायला हवा.
जाता जाता-
धार्मिक स्थळांस तुमचा विरोध आहे असे दिसते. त्यासाठी आंदोलन करू शकता.
9 Apr 2016 - 5:29 pm | सुधीरन
सर्व मंदिरे बंद व्हावित यासाठी कुणाला आंदोलन करावयाचे असेल तर त्याने ते दुस-याना शिकविण्यापेक्षा स्वतः करावे. त्यांना ब-याच लोकांचा पाठिंबाही मिळू शकेल. लोका सांगे...
9 Apr 2016 - 10:36 pm | 'पिंक' पॅंथर्न
9 Apr 2016 - 10:37 pm | 'पिंक' पॅंथर्न
शनी देव आणि शनी ग्रह यांचा काय संबंध आहे का ? ... शनी ग्रहाच्या भोवती कडी आहेत. अशीच कडी शनिमहाराजांना होती का ? ... मग ती कडी तृप्ती देसाई यांनी तोडली का ? ...
वा !! वा !!..
एक यान करा "इस्रो" तर्फे आणि ती शनी ग्रहाची कडी पण तोडुन शनि ग्रह मोकळा करा..
एक अतिशय क्लेश दायक प्रतिक्रिया !!
9 Apr 2016 - 10:38 pm | 'पिंक' पॅंथर्न
11 Apr 2016 - 11:05 am | सूड
हे असं कोल्हापूरात कधी होणार त्याची वाट बघतोय. बायकांनी आंदोलनं केली की पुरषांना पण प्रवेश नाकारायचा हा पॅटर्न शिंगणापूरवाल्यांनी कोल्हापूरातनंच उचललेला दिसतोय.
11 Apr 2016 - 11:53 am | नाखु
इथेच दिले पाहिजेत अन्यथा एका शांत आणि बाजारीकरणाचा लवलेष नसलेल्या सुंदर देवस्थानचा अवमान केल्याबद्दल गरीब चिमणा यांनी जाहीर माफी मागेतली पाहिजे ( त्याकरीता त्यांनी आत्मशुन्य्,केंजळे कुठलाही आय डीने न लिहिता गरीब चिमणा याच आय्डीने लिहावे,
ता. क. मी मिपाकरांबरोबर (पंच म्हणून घेउन) गरीब चिमणा यांना (माझ्या खर्चाने ) गोंदवल्यास घेऊन जायला तयार आहे पुण्यात असतील पुण्यातून्,मुंबैत असतील तर मुंबैहून तेथील विश्वस्थांकडून कधी आंदोलन करून ही प्रथा (आधी असल्यास) बंद पाडली तेही कळेल आणि गरीब चिमणा यांना काही (बुद्धी गंज निवारक प्रसाद) मिळाला तर मिपाकरांचेही भले होईल.
गोंदवल्यास किमान ७-८ वेळा गेलेला नाखु
11 Apr 2016 - 3:21 pm | श्रीगुरुजी
अद्द्या, मृत्युन्जय, विजय पुरोहित, कपिलमुनी, तर्राट जोकर , नाद खुळा,
गरीब चिमणा नामक ब्रिगेडीच्या विद्वेषी प्रतिसादाला योग्य उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! हा माणूस अत्यंत जात्यंध आहे. याने इतर धाग्यातही आपली ब्रिगेडी पिंक टाकलेली आहे. हा म्हणे गोंदवल्याच्या जवळ फलटणला राहतो म्हणून याला इतरांपेक्षा म्हणे जास्त माहिती आहे. मुळात फलटण हे गोंदवल्यापासून सुमार्र ५० किमी अंतरावर आहे. म्हणजे ते गोंदवल्याजवळचे गाव नाही. दुसरं म्हणजे हा आपल्या उभ्या आयुष्यात कधी गोंदवल्याला गेला असेल का याविषयी शंका आहे. मी स्वतः गोंदवल्याला दरवर्षी जातो. आतापर्यत किमान १५-१६ वेळा मी तिथे गेलेलो आहे. ३-४ वेळा मी तिथल्या भक्तनिवासात एक रात्र राहिलेलो सुद्धा आहे. मी जानवे, शेंडी इ. ब्राह्मणत्वाची कोणतीही बाह्यचिन्हे कधीही वापरीत नाही. परंतु आजतगायत तिथल्या कोणीही एका शब्दाने सुद्धा यावर विचारलेले नाही किंवा जानवे, शेंडी इ. नाही म्हणून कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला गेलेला नाही. जानवे असलेल्यांना कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक दिल्याचे पाहिलेले नाही व जानवे नसलेल्यांना कमी दर्जाची वागणूक दिल्याचे पाहण्यात नाही. जानवे असलेल्यांना व नसलेल्यांना सुद्धा एकाच रांगेतून दर्शनासाठी प्रवेश असतो, एकाच रांगेतून ते जेवणासाठी जातात, जे अन्न जानवेवाल्यांना देतात तेच अन्न जानवे नसलेल्यांना सुद्धा देतात, कोणाकडूनच एक रूपया सुद्धा मागितला जात नाही, जानवेवाले व जानवे नसलेले मंदीरात, भोजनगृहात, ध्यानमंदीरात एकमेकांशेजारीच एकाच सतरंजीवर बसतात, जानवेवाले व जानवे नसलेले रात्री एकाच मोठ्या सभागृहात एकाच भल्यामोठ्या सतरंजीवर शेजारीशेजारी झोपतात, जानवेवाल्यांना गाद्यागिरद्या व जानवे नसलेल्यांना झोपायला तरट असा भेदभाव कधीही नसतो, जानवेवाल्यांना स्पेशल बैठक, दर्शनव्यवस्था नसते, रोज हजारो भक्त जेवून जातात व त्यासाठी कोणताही मोबदला नसतो. सर्वत्र बर्यापैकी स्वच्छता व शिस्त असते. शिर्डी किंवा तिरूपतीप्रमाणे या गावचे शहरीकरण, व्यापारीकरण झालेले नाही.
अशा देवस्थानाबद्दल धडधडीत खोटे व जातीय विद्वेषाने भरलेले आरोप करताना गरीब चिमणा या ब्रिगेडीला मनोमन शरम वाटायला हवी.
11 Apr 2016 - 3:53 pm | पिलीयन रायडर
गरिब चिमणा उडालेला आहे.
तक्रारीची दखल घेतल्याबद्दल सरपंचांचे जाहीर आभार!
11 Apr 2016 - 4:00 pm | नाखु
आणि किमान १५-२० दिवस तळ ठोकेल हे नक्की . इथेच एक गोडबोले नावाचा आय डी आहेच की.
11 Apr 2016 - 4:07 pm | होबासराव
आणि १० व्या मिनिटाला गरिब चिमणा ह्या नावाने मला व्यनि केला "हं तर काय म्हणत होतात तुम्ही?" ह्या आशयाचा. जणु काही चहा पिऊन आलो, चला गप्पा कंटिन्यु करुया.
http://www.misalpav.com/comment/825393#comment-825393
पिरा इथे ह्या धाग्यावर सुद्धा सेम झालय, तुमच्या प्रतिक्रिये नंतरच्या २ प्रतिक्रिया बघा.
11 Apr 2016 - 4:09 pm | प्रचेतस
ह्यावेळी रामदेवबाबसारखा आलेला दिसतोय बाईच्या वेषात लब्बाड.
11 Apr 2016 - 4:10 pm | विजय पुरोहित
हं समजलं!!!
11 Apr 2016 - 4:11 pm | होबासराव
:)
11 Apr 2016 - 4:14 pm | होबासराव
प्रश्न हा पडतो कि त्याचा आत्ताचा आयडी ३ आठवड्यांपुर्वि घेतलाय...म्हणजे हा सतत आय्डी तयार करतच असतो.
मला माझा आयडी अॅक्टिव्हेट व्हायला बराच वेळ वाट बघावि लागलि होति ते आठवल.
11 Apr 2016 - 4:20 pm | प्रचेतस
ऑटो अप्रोव्हल मुळे होत असावं आणि हल्ली मोबाईल डाटाचे आयपी डायन्यामिक असल्याने सतत बदलत असतात त्यामूळे तपासणे अवघड.
बाकी अशा व्यक्ती आयडी सतत तयार करतात असतात. ह्यांना ब्यानरुपी असुरक्षिततेच्या भावनांनी सतत घेरलेले असते. ह्यांना सुप्तावस्था आवडत नसल्याचे दिसते.
हे दिसले की जराही दयामाया न दाखवता लगेच उडवणे हाच उपाय.
11 Apr 2016 - 4:46 pm | अद्द्या
हे दिसले की जराही दयामाया न दाखवता लगेच उडवणे हाच उपाय
>>
हे असं होऊ लागेल तेव्हा लागेल तेवढे मांडे पाठवण्यास मी तयार आहे =]]
jokes apart
असं खरच होईल का ?
11 Apr 2016 - 5:20 pm | सूड
आधी मांडे घेऊन या, मग बोलू =))
11 Apr 2016 - 4:22 pm | पिलीयन रायडर
मलाही हाच प्रश्न पडतो.
अजुन एक प्रश्न असाही पडतो की प्रत्येक नव्या आयडीसाठी नवा इमेल आयडी पण लागतो ना? म्हणजे इतक्या डु आयडी साठी इतके नानाविविध इमेल तयार करायचे. आणि हा सगळा खेळ सांभाळायचा.. कशासाठी माणुस असं करत असेल? आम्हाला घरातले आणि हापिसातले खेळ खेळुन खेळुन मरायला होतंय... बाकी सुद्धा कितीतरी चमत्कारिक आणि मनोरंजक गोष्टी आयुष्यात चालु असतात. लोकांना बरा वेळ मिळतो राव इथे तमाशे करत फिरायला..
11 Apr 2016 - 11:30 pm | अद्द्या
एक तर बेरोजगार इंजिनियर असेल किंवा नको तेवढ्या वरच्या पदावर पोचलेला मूर्ख असेल :)
या दोघानाही वेळ भरपूर असतो , पहिल्याला कमीत कमी अक्कल तरी असते , दुसऱ्याचा मेंदू वापर कमी झाल्यामुळे सडत चाललेला असतो
11 Apr 2016 - 11:36 pm | सायकलस्वार
गैरसमज.
11 Apr 2016 - 11:53 pm | टवाळ कार्टा
कै म्हणता ;)
11 Apr 2016 - 4:10 pm | विजय पुरोहित
???
11 Apr 2016 - 8:39 pm | श्रीगुरुजी
तो नवीन स्त्रीरूपात आलेला आयडी पूर्वाश्रमीचा गरीब चिमणा नाही. तो एल गोडबोलेचा नवीन अवतार आहे. गरीब चिमणा नक्की येणार. आला की ते कळेलच.
11 Apr 2016 - 8:45 pm | होबासराव
वाह गुरुजि आपकि पारखि नजर और ये सायकोपॅथ युजर (डुआयडी)
11 Apr 2016 - 3:36 pm | mugdhagode
छन चरचा
11 Apr 2016 - 3:49 pm | mugdhagode
http://m.maharashtratimes.com/nation/drought-in-maharashtra-result-of-sa...
शनि 'पापग्रह' आहे. त्यामुळे शनिची पूजा केल्यास महिलांच्या विरोधातील गुन्हे वाढतील, बलात्काऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
11 Apr 2016 - 8:49 pm | टवाळ कार्टा
आलात :)
12 Apr 2016 - 7:00 am | स्रुजा
पूजा करुन गुन्हे वाढणार असतील तर तुम्ही मंदीरात जाऊन २-४ शिव्या द्या शनिदेवाला, काही गुन्हे तरी थांबतील.
11 Apr 2016 - 6:25 pm | गामा पैलवान
सुधीरन,
तुमचं सुरुवातीचं विधान पटलं नाही :
>> त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज
>> गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली.
ही प्रथा असण्यामागे स्त्रियांवर मुद्दाम अन्याय करायचा हेतू होता का? असल्यास त्याचा विडा द्यावा. नसल्यास ती प्रथा मोडीत काढून काय लाभ होणार आहे? तसेच स्त्रियांना चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्याने त्या पुरुषांच्या बरोबरीस कशाकाय येणार आहेत?
आ.न.,
-गा.पै.
11 Apr 2016 - 6:26 pm | गामा पैलवान
11 Apr 2016 - 10:42 pm | सुधीरन
१. उघड दिसणा-या गोष्टींस विदे द्यायचे? तुम्हीच विचार करा की, का स्त्रीयांस मंदिरात / चौथ-यावर / गाभा-यात का प्रवेश दिला जात नसेल? जी कारणे दिली जातात (धार्मिक ग्रंथांत वगैरे), ती तर्काच्या कसोटिवर टिकतात का? तुमच्या माहितीत तशी एखादी गोष्ट असेल तर सांगा.
२. स्त्रियांवर अन्याय करण्याचा, त्यांस कमी लेखण्याचा, त्यांस स्वतःविषयी कमिपणा वाटवण्याचा हेतू सहजच दिसतो.
३. ही प्रथा मोडीत काढल्याने- इतर मंदिरांत स्त्रीयांचा प्रवेश होण्यास साह्य होईल, अशा प्रथांविषयी स्त्रीया प्रश्न करू लागतील, जागरूकता वाढेल, सोबतच अन्य स्त्रीविषयक प्रश्नांस हात घातला जाईल.
४. चौथ-यावर प्रवेश मिळवणे यामुळे 'त्या'बाबतीत स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीस आल्याच की! असं सर्व ठिकाणी, सर्वच बाबतीत होईल, तेव्हा त्या सर्वच ठिकाणी, सर्वच बाबतीत बरोबरीस येतील!
11 Apr 2016 - 6:48 pm | होबासराव
विडा पुर्वि उचलायचे, आजकाल फकस्त सुपारी देउन काम भागते :)
ह.घ्या. ;)
11 Apr 2016 - 10:55 pm | सुधीरन
m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=12079861
11 Apr 2016 - 11:03 pm | mugdhagode
www.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=12079861
11 Apr 2016 - 11:08 pm | सुधीरन
धन्यवाद.
11 Apr 2016 - 11:58 pm | वैभव जाधव
शनि जागृत ग्रह आहे हे या धाग्यावर आल्यावर पुराव्याने शाबीत झालेलं आहे.
13 Apr 2016 - 7:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अता देसाईबाईंनी स्त्रियांच्या ज्या खर्या गरजा आहेत त्यासाठीही जनआंदोलन उभे करावे. देव मंदिर वगैरेंपेक्षा हुंडाबळी, स्त्री भृणहत्या, सामाजिक सुरक्षा, आरोग्यसेवा वगैरे आवश्यक गोष्टींसाठी आपली आंदोलनशक्ती खर्च करावी.
13 Apr 2016 - 10:50 am | अद्द्या
२४ तास न्यूज वाले जर या बातम्यासाठी नाचणार असतील बाईंच्या सोबत तर ते हि करतील ,
त्यात काय एवढं :)
13 Apr 2016 - 11:14 am | वेल्लाभट
यावरून एक गाणं सुचलं
(आज ब्लू है पानी पानी)
आज गुड है शनी शनी शनी शनी शनी शनी
अन चैथर्यावर जाऊ शकतो एनी एनी एनी
आजा ओ करले अभिषेक
काम करले तू भी नेक
और हो पुण्याचा धनी धनी धनी धनी धनी
चालू द्या !
बाकी भक्ती ही असल्या अटी आणि परवानग्यांच्या पलिकडची गोष्ट असते असं मानणारा
वेल्लाभट
13 Apr 2016 - 8:37 pm | संदीप ताम्हनकर
शिंगणापुर मध्ये मुद्दा धर्माचे दुकान चालण्याचा आहे हे सिद्ध झालय. जात ब्राम्हण नसलेली तरीही कट्टर आणि अडमुठी अशी पुरोहितशाही, ज्याला पुरोगामी विरोध करतात त्याचे हे उदाहरण आहे.
13 Apr 2016 - 10:43 pm | सतिश गावडे
आत्मबंध यांनी सनातनी हा शब्द सनातनी असाच लिहीलेला वाचून डोळे भरून आले. प्रगो यांचे आयडी बलिदान व्यर्थ गेले नाही तर.
18 Apr 2016 - 12:51 pm | गामा पैलवान
सुधीरन,
आपला इथला प्रतिसाद वाचला. उशीरा उत्तर देतोय याबद्दल क्षमस्व. तर आपण मुद्द्यांकडे वळूया.
१.
>> जी कारणे दिली जातात (धार्मिक ग्रंथांत वगैरे), ती तर्काच्या कसोटिवर टिकतात का?
धर्मश्रद्धांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणे कितपत योग्य? शिवाय बायकांना प्रवेश नसल्याने त्यांच्यावर असा काय मोठा अन्याय होतोय? त्यांचा जीव जातोय का?
२.
>> स्त्रियांवर अन्याय करण्याचा, त्यांस कमी लेखण्याचा, त्यांस स्वतःविषयी कमिपणा वाटवण्याचा हेतू सहजच दिसतो.
अजिबात नाही. हिंदू धर्मात स्त्रीला शक्तीरूपिणी मानलं आहे. बायकांनी काही ठिकाणी प्रवेश न करणे हा त्या त्या देवतेच्या उपासनेचा भाग आहे.
३.
>> अशा प्रथांविषयी स्त्रीया प्रश्न करू लागतील, जागरूकता वाढेल, ....
माझ्या मते जागरूकता वाढवायला प्रथा मोडायची गरज नाही.
४.
>> .... सोबतच अन्य स्त्रीविषयक प्रश्नांस हात घातला जाईल.
हे दिवास्वप्न आहे. तसंही पाहता प्रथांना हात न घालताही प्रश्नांना वाचा फोडता येते.
५.
>> चौथ-यावर प्रवेश मिळवणे यामुळे 'त्या'बाबतीत स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीस आल्याच की!
ही जर तुमची स्त्रीपुरूष समानतेची कल्पना असेल तर स्त्रियांसाठी वेगळी सार्वजनिक शौचालये बांधायला नकोत. आगोदर ते प्रबोधन हाती घ्या.
मूत्रविसर्जन दिवसभर दाबून ठेवल्याने बायकांना नाना प्रकारच्या व्याधींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मुंबईतल्या स्त्रियांनी Right to Pee ही मोहीम चालवली आहे. तुमच्या समानतेच्या कल्पना जरा त्यांच्या कानावर घालणार का?
आ.न.,
-गा.पै.
18 Apr 2016 - 9:53 pm | सुधीरन
>>धर्मश्रद्धांना तर्काच्या कसोटीवर घासून
पाहणे कितपत योग्य?
पूर्णतः योग्य. सर्वच गोष्टी तर्काच्या कसोटिवर घासुन पाहिल्याच पाहिजेत. धर्मश्रद्धांचा अपवाद का करायचा?
>> माझ्या मते जागरूकता वाढवायला प्रथा
मोडायची गरज नाही.
>>हे दिवास्वप्न आहे. तसंही पाहता प्रथांना
हात न घालताही प्रश्नांना वाचा फोडता येते.
हा एकमेव मार्ग नाही. हा ही मार्ग आहे, एवढंच. आणि त्यांना जमतंय ते त्या करत आहेत. तुम्हाला दुसरं काही सुचतंय तर तुम्ही ते करा. हे का? ते का नाही? असे प्रश्न विचारत का बसताय?
>> चौथ-यावर प्रवेश मिळवणे यामुळे 'त्या'बाबतीत स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीस आल्याच की!
हे वाक्य पुन्हा नीट वाचा. उत्तर मिळेल (हिंट-डाविकडून ५वा शब्द!).
>>Right to Pee
यासारखे खूप प्रश्न आहेत. सर्वाना सर्वच प्रश्न हाताळने कसे बरे जमेल?
शिवाय माझा पूर्ण लेख तसेच माझे प्रतिसाद नीट वाचा. सर्वच प्रश्नांची उत्तरे आहेत त्यांत. वाक्य बदलून बदलून तेच ते प्रश्न विचारले जात आहेत.
तुमच्या धर्माश्रद्धाना धक्का बसल्याने चिडणे समजू शकतो. ज़रा अभिनिवेश बाजूस ठेवून सहानुभूतिने विचार करा, इतकंच.
19 Apr 2016 - 11:22 pm | गामा पैलवान
सुधीरन,
तुमच्या वरील प्रतिसादातलं हे विधान रोचक आहे :
१.
>> सर्वच गोष्टी तर्काच्या कसोटिवर घासुन पाहिल्याच पाहिजेत. धर्मश्रद्धांचा अपवाद का करायचा?
त्याचं काय आहे की जेव्हा तालिबानी जिहाद करतो ना, तेव्हा त्याचा उद्देश समोरच्याच्या श्रद्धेचे तुकडे तुकडे करायचा असतो. दहशतवादाविरुद्ध लढायला श्रद्धाच कमी येते. तिथे तर्क दुबळा आहे. तुम्ही भले श्रद्धेची चिकित्सा करायला उतावीळ असाल, पण आम्ही श्रद्धाळू त्यास आत्मघात म्हणतो. श्रद्धेचं भंजन करून तुम्हाला दहशतवाद्यांना मदत करायची आहे का?
असो. आता उरलेल्या प्रतिसादाकडे वळतो.
२.
>> हा एकमेव मार्ग नाही. हा ही मार्ग आहे, एवढंच. आणि त्यांना जमतंय ते त्या करत आहेत.
>> तुम्हाला दुसरं काही सुचतंय तर तुम्ही ते करा. हे का? ते का नाही? असे प्रश्न विचारत का बसताय?
मुळातून हा स्त्रियांवर अन्याय नाही. मग यासंबंधी काही कृती करायची गरज नाही.
३.
>> हे वाक्य पुन्हा नीट वाचा. उत्तर मिळेल (हिंट-डाविकडून ५वा शब्द!).
मंदिराच्या चौथऱ्यावर वा गाभाऱ्यात प्रवेश मिळवणे हा स्त्रीपुरुष समानतेचा निकष नव्हे.
४.
>> सर्वाना सर्वच प्रश्न हाताळने कसे बरे जमेल?
भूमाता ब्रिगेडला बायकांचे महत्त्वाचे प्रश्न हाताळायचे नाहीत. जो प्रश्न अस्तित्वात नाही त्याचं अवडंबर माजवून स्त्रीपुरूष समानता प्रस्थापित केल्याचा आव मात्र आणायचाय. यांस पुरोगामी कर्मठपणा म्हणतात. नेहमी ब्राह्मणांना कर्मकांडावरून शिव्या घालणारे पुरोगामी स्वत: निरर्थक कर्मकांडेच करत बसतात.
आ.न.,
-गा.पै.
19 Apr 2016 - 11:57 pm | तर्राट जोकर
त्याचं काय आहे की जेव्हा तालिबानी जिहाद करतो ना, तेव्हा त्याचा उद्देश समोरच्याच्या श्रद्धेचे तुकडे तुकडे करायचा असतो. दहशतवादाविरुद्ध लढायला श्रद्धाच कमी येते. तिथे तर्क दुबळा आहे. तुम्ही भले श्रद्धेची चिकित्सा करायला उतावीळ असाल, पण आम्ही श्रद्धाळू त्यास आत्मघात म्हणतो. श्रद्धेचं भंजन करून तुम्हाला दहशतवाद्यांना मदत करायची आहे का?
लै म्हणजे लैच हुकलंय हे.
20 Apr 2016 - 12:01 am | mugdhagode
लंडनच्या उंटावर बसुन ते भारतातील शेळ्या हाकतात.
20 Apr 2016 - 6:30 pm | गामा पैलवान
तर्राट जोकर,
काय हुकलंय म्हणालात? हा ब्रिगे. मलिक यांच्या पुस्तकातला उतारा आहे :
>> Terror struck into the hearts of the enemies is not only a means, it is the end in itself.
>> Once a condition of terror into the opponent's heart is obtained, hardly anything is left to be
>> achieved. It is the point where the means and the end meet and merge. Terror is not a
>> means of imposing decision upon the enemy; it is the decision we wish to impose upon him. >> Psychological and physical dislocation is, at beat, a means, though, by no means, conclusive
>> for striking terror into the hears of the enemies. Its effects are related to the physical and
>> spiritual stamina of the opponent but are seldom of a permanent and lasting nature.
>> An army that practices the Quranic philosophy of war in its totality is immune to
>> psychological pressures.
पुस्तकाचं नाव : The quranic concept of war.
शत्रूच्या (म्हणजे हिंदूंच्या) श्रद्धांचा विनाश केल्याखेरीज त्यांना इस्लामची दहशत बसणार नाहीये. एका हृदयात श्रद्धा आणि दहशत एकत्र नांदत नसतात.
आ.न.,
-ग.पै.
20 Apr 2016 - 9:10 pm | तर्राट जोकर
धर्मश्रद्धांची चिकित्सा करण्यासाठी आपण विरोध करत आहात. ओके?
जे ह्या धर्मश्रद्धांच्या चिकित्सेचा आग्रह धरत आहेत त्यांना आपण दहशतवाद्यांचे मदतनीस संबोधित आहात. ओके?
तुम्ही सरळ सरळ हिंदू च्या धर्मश्रद्धेची चिकित्सा करणार्यांना इस्लामी दहशतवादी असल्याचा आरोप करत आहात. तुम्हाला अभिप्रेत असलेला हाच काय तो चिकित्सेसाठी सदैव तयार असणारा हिंदूधर्म? इथे तर तुमच्यात आणि मुस्लिम कट्टरवाद्यांत काहीच फरक नाही असे दिसत आहे. तुम्ही ठरवाल त्याचीच चिकित्सा व्हावी अन्यथा नको असे धोरण दिसते.
इथे हिंदूंच्या श्रद्धेबद्दल चर्चा सुरु असतांना इस्लाम वर चर्चा करण्याचे काय प्रयोजन? मला तर इथले कैक टिकोजीराव इस्लाम, दहशतावादाच्या धाग्यावर हिंदूंवर टिका का करता, चर्चेत अवांतर विषय का आणता असे विचारतात. तुमच्यासारख्यांचे प्रतिसाद त्यांना दिसत नसावेत.
आता तरी समजले काय काय हुकलंय ते?
20 Apr 2016 - 9:11 pm | तर्राट जोकर
दुसरे असे की हिंदूंच्या धर्मश्रद्धांच्या चिकित्सेला तुमचा विरोध आहे पण इस्लामने तेच म्हटले तर तुम्हाला चालत नाही. हा दुटप्पीपणा अनेक बाबी स्पष्ट करतो.
20 Apr 2016 - 10:31 pm | गामा पैलवान
तर्राट जोकर,
तृप्ती देसाई यांनी केली ती श्रद्धेची चिकित्सा नसून भंजन होतं. या भंजनाचा लाभ दहशतवाद्यांना झालेलाच आहे. चिकित्सा व्यासपीठावर होते.
धागाकर्ते सुधीरन (मिपा व्यासपीठावरून) तर्काधिष्ठित चिकित्सा करू म्हणताहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धार्मिक बाबतीत कुठेही स्त्रियांसाठी वेगळी प्रथा असेल तर ती त्यांच्यावर अन्याय करण्यासाठीच मुद्दाम निर्मिलेली असते. नेमकं हेच मूळ गृहीतक मला मान्य नाही.
जमेल तितका खुलासा केला आहे.
आ.न.,
-गा.पै.
20 Apr 2016 - 11:11 pm | तर्राट जोकर
मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच योग्य. स्त्रियांना केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून प्रवेश रोखणे हाच अन्याय आहे. तुमची अन्यायाची व्याख्या काय आहे?
व्यासपिठीय चर्चा करायला ही तत्त्वज्ञानाची नाही, अन्यायमूलक वर्तणूकीविरुद्धची लढाई आहे. 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर' छाप चिकित्सा तुम्हाला मान्य नसेल तर नसू देत. शनीचा कोप होईल म्हणुन प्रवेश बंद होता ह्यावर व्यासपिठीय चर्चेचा उपयोग नाहीए. थेट चौथर्यावर प्रवेश घेऊनच केलेली ह्या श्रद्धेची चिकित्सा अतिशय योग्य आहे.
देवाचे अस्तित्व कपोलकल्पित भीतीद्वारे दाखवण्याचे प्रयत्न हाणून पाडणे हिंदूंसाठीच चांगलेच आहे पण काहींची दुकाने बंद होतील म्हणून भीती आहे का?
बाकी हिंदु जगतात तुमच्या मनाविरुद्ध होणार्या प्रत्येक गोष्टीचा इस्लामी दहशतवादाशी संबंध जोडणे हे मजेदार असले तरी हिंदूंसाठीच घातक आहे हे तुमच्या सनातनी मनाला समजणार नाही. त्यामुळे असोच. तुमचा खुलासा गुंजभर उपयोगाचा नाही.
21 Apr 2016 - 11:40 pm | सामान्यनागरिक
तृप्ती देसाई यांचे कार्य उत्तमच आहे. त्यांच्या पुढील कार्यामध्ये त्या यशस्वी होवोत.
पण यांचे नांव या पूर्वी कधी ऐकू आलेले नाही. त्यांच्या या पूर्वीच्या कार्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
22 Apr 2016 - 12:00 am | ट्रेड मार्क
त्या पण सामान्य नागरिक होत्या. :)
22 Apr 2016 - 1:33 am | गामा पैलवान
तर्राट जोकर,
तुमचा वरील प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.
१.
>> मूर्ख श्रद्धांचे भंजन होणेच योग्य. स्त्रियांना केवळ त्या स्त्रिया आहेत म्हणून प्रवेश रोखणे हाच अन्याय आहे.
उपरोक्त श्रद्धा मूर्ख आहे हे तुम्ही एकतर्फी कसे ठरवलेत? कुणाशी चर्चा केलीत का? काही शास्त्राधार आहे का?
गाभाऱ्यात बायकांना बंदी आहे. लक्षात घ्या देवळात नव्हे. या प्रवेशबंदीमुळे स्त्रीची शारीरिक वा आर्थिक हानी होत नाही. जर कुणाची मानसिक हानी होत असेल तर अशा स्त्रियांनी देवळात जाऊ नये. देवळात जायचं असेल तर तिथले नियम पाळलेच पाहिजेत.
स्त्रियांच्या प्रवेशबंदीमागे कारण आहे ते समजावून घ्यायचा प्रयत्न होत नाही.
२.
>> तुमची अन्यायाची व्याख्या काय आहे?
अन्याय झालेला नसल्याने मी व्याख्येच्या भानगडीत पडंत नाही.
३.
>> शनीचा कोप होईल म्हणुन प्रवेश बंद होता ह्यावर व्यासपिठीय चर्चेचा उपयोग नाहीए.
स्त्रीची इंद्रिये शरीरात असतात. याउलट पुरुषांची बाहेर असतात. शनीच्या स्पंदनांचा स्त्रीला अतिरिक्त त्रास होऊ शकतो.
सर्वसाधारण लोकं यास शनीचा कोप म्हणोत वा अजून काही म्हणोत.
४.
>> काहींची दुकाने बंद होतील म्हणून भीती आहे का?
दुकाने? कसली दुकाने? बायकांच्या प्रवेशबंदीमुळे कोणाची दुकाने फोफावली?
५.
>> बाकी हिंदु जगतात तुमच्या मनाविरुद्ध होणार्या प्रत्येक गोष्टीचा इस्लामी दहशतवादाशी संबंध जोडणे
>> हे मजेदार असले तरी हिंदूंसाठीच घातक आहे
काफीरांच्या श्रद्धाभंजनाचा संबंध जिहादशी जोडला आहे तो ब्रि. मलिक यांनी. जर हिंदूंच्या निरुपद्रवी श्रद्धांचे विनाकारण भंजन होत असेल तर ते दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडणारच.
आ.न.,
-गा.पै.
22 Apr 2016 - 4:35 pm | टवाळ कार्टा
याबद्दल काही विदा मिळेल का वाचायला?
22 Apr 2016 - 4:57 pm | सतिश गावडे
मी ही स्वतःला सर्वसाधारण लोकांमध्ये गणतो. मात्र मी याला अडाणभोटपणा म्हणतो.
22 Apr 2016 - 5:04 pm | टवाळ कार्टा
एक आस्काय क्यारेक्टर का सर्कव्लेस रे =))
28 Apr 2016 - 5:58 pm | सतिश गावडे
अवकृपा होऊ नये म्हणून. :)