मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

सुधीरन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा. त्यासाठी तृप्ती देसाई यांच्या प्रमाणेच इतरही अनेक महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुरुष देखील या लढ्यात सामिल व्हावेत. हो, दुष्काळ, नापिकी, नागरी प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. मात्र ते प्रश्न आहेत म्हणून या प्रश्नास हात घालू नये का? या अशा प्रश्नांची ढाल करून महिलांच्या मंदिर प्रवेशाचा मुद्दा टाळता येणार नाही. स्त्री-पुरुष समानता तत्वतः मान्य करूनसुद्धा इतर अनेक मुद्दे (जसे धार्मिक ग्रंथातील दाखले, परंपरा, मुर्तीचे तेज स्त्रियांस सहन न होणे इ.) पुढे करून मंदिर प्रवेशाच्या प्रश्नास बगल दिली जाते. तसेच स्थानिकांचा विरोध, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इ. गोष्टीही पुढे केल्या जातात. मतांच्या राजकारणामुळे मते गमाविण्याच्या भीतीने संवैधानिक पदावरच्या व्यक्तिसुद्धा ठाम राहत नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाचा देखील मान ठेवला ज़ात नाही. स्त्रियांना चौथ-यावर प्रवेश मिळू नये म्हणून पुरुषांस देखील मज्जाव केला गेला. पण पुरुषांनी (कुठल्याही कारणाने असेल) तो मोडून काढल्यावर नाइलाजास्तव का होईना स्त्रियांस चौथ-यावर जावू देणे भाग पडले. आणि गेली कित्येक वर्षे चाललेल्या या लढ्यास अखेर यश आले. शिंगणापूरात पुरोगाम्यांनी मिळविलेला हा विजय पुढील लढ्यासाठी प्रेरक ठरावा, उत्तरोत्तर असेच वा याहून मोठे यश चळवळीस प्राप्त व्हावे आणि या देशात परिवर्तनाची पहाट व्हावी अशी अपेक्षा.

वाचने 37224 वाचनखूण प्रतिक्रिया 280

नाईलाजाने का होईना पण ट्रस्टला हा निर्णय घ्यावा लागला याचा आनंद झाला . पण मोठ्या मनाने न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय झाला असता तर अधिक आनंद झाला असता . असो .

lgodbole Sat, 04/09/2016 - 05:59
आंदोलन सुरु असताना हे काँग्रेसचे षडयंत्र म्हणुन हिंदुत्ववादी ओरडत होते. त्यामुळे आता या समानतेच्या निर्णयाचे श्रेयही काँग्रेसलाच द्यावे लागेल. अभिनंदन

In reply to by कंजूस

माहितगार Sat, 04/09/2016 - 08:32
इतर चराचरांप्रमाणे शनी महाराज त्यांच्या आवडी निवडी सवडीनुसार सर्व दगडांमध्ये संचार करु शकतात हे खरे, पण काही म्हणा मस्जिदी सर्वत्र बांधल्या तरी लोक मक्केला जायचे थांबत नाहीत असे म्हणतात.

In reply to by कंजूस

सतीश कुडतरकर Sat, 04/09/2016 - 15:36
उलट पालखी-दिंडी सोहळे चालू होतील. ठिकठिकाणच्या साई मंदिरांचे शिर्डीपर्यंत पायी दिंडी सोहळे काढण्याची सध्याची रीत आहे. नाशिक हायवेला वर्षभर चालू असतात.

In reply to by कंजूस

अगदी खरं. शनिचा तोच दगड सॉरी देव पावतो आणि बाकीचे शनि पावत नाही, असं कुठे असतं. -दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम Sat, 04/09/2016 - 08:13
लाखो मैलांवर असलेला शनि दगडाच्या स्वरूपात एखाद्या गावात अाहे असं मानणं आणि त्याच्याभोवती मंदीर बनून लोकांनी त्याची पूजा करुन त्याला तेल वाहून तेलाची नासाडी करणं हा मूर्खपणा आहे. या मंदिरात प्रवेश हवा म्हणून आंदोलन करण्याऐवजी मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं. असो. आता गावाची अर्थव्यवस्था सुधरायला हरकत नाही. शेवटी जगात काय आणि मिपावर काय, पैसा हेच सत्य. (पैतै ह.घ्या.)

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार Sat, 04/09/2016 - 08:47
एका धाग्यावर आस्तीकजन नास्तीक मनोविकारी कसे याचे धागे काढतात, दुसर्‍या बाजूला नास्तीक मंडळींना आस्तीकांबद्दल बोलताना आपण दुसर्‍यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा अनमान करतो आहोत याचे भान रहात नाही काय म्हणावे याला ? जो पर्यंत दुसर्‍यांच्या स्वातंत्र्या आड येत नाहीत तो पर्यंत काय मुर्खपणा म्हणा शहाणपणा म्हणा जे काय असेल ते करण्याचे ज्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. 'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं' हे म्हणण्या एवढे जघन्य अपराध तेथे होत नसावेत उलटपक्षी तेल हे मानवी आरोग्यासाठी टाळणे उपयूक्त असते तेल जेवढे नाश होईल, तेवढे महाग होईल तेवढ्या तब्येती सुधारतील त्यामुळे शनी देवाला तेल वाहणे तेल खाऊ भारतीयांच्या तब्येतीच्या दृष्टीने हित कारकच. सांस्कृतिक स्वातंत्र्याचे दमन करण्यात कै पॉईंट ? हां मिथकीय अंधश्रद्धा प्रबोधनातून दूर करता येऊ शकतात त्यासाठी संकृतीवर गदा आणलीच पाहीजे असे नाही. आस्तीक आणि नास्तीक दोन्हींनी आपापल्या भूमिका तपासून असहिष्णूतेचा त्याग केला पाहीजे किंवा कसे.

In reply to by माहितगार

सतिश गावडे Sat, 04/09/2016 - 08:55
'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं' हे म्हणण्या एवढे जघन्य अपराध तेथे होत नसावेत उलटपक्षी तेल हे मानवी आरोग्यासाठी टाळणे उपयूक्त असते तेल जेवढे नाश होईल, तेवढे महाग होईल तेवढ्या तब्येती सुधारतील त्यामुळे शनी देवाला तेल वाहणे तेल खाऊ भारतीयांच्या तब्येतीच्या दृष्टीने हित कारकच.
यात जर उपहास नसेल तर तुम्ही माझा दिवस बनवला आहे. ;)

In reply to by माहितगार

बोका-ए-आझम Sat, 04/09/2016 - 10:43
तर मी अगदी डंकेकी चोटपर असहिष्णू आहे. सहिष्णुतेच्या नावाखाली श्रद्धेचा बाजार चालत असेल तर माझं त्यालाही काही म्हणणं नाही. पण मग त्याला सरळ बाजार असं म्हणावं. देवस्थान आणि शनिचा प्रकोप वगैरे नाटकं करु नयेत. माझं सिद्धीविनायक आणि लालबागचा राजा यांच्या बाबतीतही तेच म्हणणं आहे. आणि अंधश्रद्धा जर संस्कृतीचा भाग बनू पाहात असतील तर अशा संस्कृतीचाही त्याग करायला पाहिजे. मी शंभर टक्के आस्तिक आहे, फक्त असला फालतूपणा चालत नाही. मग असहिष्णुता म्हणालात तरी चालेल. (Proud to be असहिष्णु) बोका-ए-आझम

In reply to by बोका-ए-आझम

राही Sat, 04/09/2016 - 11:27
(केवळ या) प्रतिसादाशी १००% सहमत, आणि, जोरदार टाळ्या. मंदिरे बंद करण्याच्या मुद्द्याला सध्या काळ अनुकूल नाही. मंदिरे बंद करण्याऐवजी उपासनेचे स्वरूप बदलण्याचे प्रयत्न कालानुरूप ठरतील.

In reply to by राही

माहितगार Sat, 04/09/2016 - 12:20
मंदिरे बंद करण्याच्या मुद्द्याला
सध्या
काळ अनुकूल नाही.
अंधश्रद्धा विरोधी प्रबोधनाचे समर्थन वेगळे. सध्या म्हणजे काय ? तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही म्हणून त्या गोष्टींचे सांस्कृतीक दमनाचे समर्थन समर्थनीक कसे ठरते या बद्दल साशंकता आहे

In reply to by माहितगार

राही Sat, 04/09/2016 - 12:33
सध्या म्हणजे सांप्रत. अर्थात चळवळी करणार्‍यांनी चळवळी कराव्यातच. त्यांना अडवण्याचे प्रयोजन नाही. पण सांप्रत काळ अनुकूल नसल्याने प्रयत्नांच्या मानाने यश येणे कठिण. (म्हणजे खूप अधिक प्रयत्न करावे लागणार.) तेव्हा एकदम अशा ड्रास्टिक मुद्द्यावर आक्रमक आंदोलन उभारण्यापेक्षा परिघावरच्या मुद्द्यांना आधी हात घालून परिघाचा संकोच करीत न्यावा आणि मग कोअरला हात लावावा असे वाटते. भात गरम असला की मध्ये हात घालण्याऐवजी आपण बाजूबाजूने उचलतो, तसेच काहीसे. पण माझ्यामते मंदिरबंदीपेक्षा उपासनेची पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न करणे हे अधिक व्यवहार्य ठरेल.

In reply to by राही

माहितगार Sat, 04/09/2016 - 16:22
राही आपणास तसे कदाचित म्हणावयाचे नसेल पण, मंदिरे बंद पाडण्यासाठी सांप्रत काळ अनुकुल नाही म्हणणे म्हणजे काळ अनुकुल असेल तर आम्ही इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेपकरुन मंदिरे बंद पाडली असती, आम्ही मोगल बादशहा अथवा अफगाणि सुल्तान असतो तर मंदिरांवर अवश्य घाव घातला असता असे अप्रत्यक्ष म्हणणाण्यासारखे नाही का, अशी साशंकता आहे.

In reply to by माहितगार

तर्राट जोकर Sat, 04/09/2016 - 16:47
राहींचे आतापर्यंतचे प्रतिसाद बघता तुम्ही जो म्हणताय तो अर्थ तर त्यांच्या बोलण्यात नक्कीच नाही. अनुकूल काळ म्हणजे काय याचे त्यांचे उत्तर त्या देतील. पण मला जो वाटतो तो अर्थ म्हणजे अंधश्रद्धेबद्दल प्रबोधन हळू हळु करणे आवश्यक. आताचा काळ मंदिर थेट बंद करा ह्या टोकाची भूमिका घेण्याचा नाही. भाविकांना मंदिरात जाण्याचा फोलपणा जसजसा लक्षात येईल तसतसा मंदिरांचा बाजार बंद होईल असे त्यांना म्हणायचे असेल. असो.

In reply to by तर्राट जोकर

राही Sat, 04/09/2016 - 18:03
"भाविकांना मंदिरात जाण्याचा फोलपणा जसजसा लक्षात येईल तसतसा मंदिरांचा बाजार बंद होईल असे त्यांना म्हणायचे असेल. " हेच म्हणायचे होते. आणि जसजसे जास्तीत जास्त लोक मु़ख्य प्रवाहात येतील, जसजसा त्यांचा भाबडेपणा जाऊन त्याची जागा विवेक घेईल तसतसा या बाजाराला काळ प्रतिकूल होत जाईल. आपोआपच. शिक्षण, ज्ञान हे एक अमोघ शस्त्र आहे. ते आपोआपच प्रबोधन करते. सांप्रत आपल्याकडे शिक्षणाचा/लोकशिक्षणाचा पहिला टप्पा चालू आहे. थोडीशीच सजगता आल्यावर कुतूहल अधिक वाढते, यानुसार सध्या भोळ्या भाविकतेकडे समाजमन झुकलेले जाणवते. भविष्यात तसे ते राहाणार नाही.

In reply to by माहितगार

राही Sat, 04/09/2016 - 17:52
खाली त.जो. यांनी बरोबर अर्थ पकडला आहे. घावबिव घालण्याची काहीच आवश्यकता नाही. एखादा जीर्ण वाडा आपोआप कोसळावा तशा ह्या जीर्ण प्रथा आपोआप गळून पडतात. त्या जागी नव्या प्रथा येतात. किंवा प्रथांमधला फोलपणा लक्ष्यात आला की लोकच हळूहळू त्यांच्याकडे पाठ फिरवतात. आपला धर्म (किंवा आपला लोकसमुदाय/समाज म्हणा हवे तर.) प्रचंड चैतन्यशील आहे. परिवर्तनशीलही आहे. पण एका हयात पिढीत हे परिवर्तन दिसत नाही त्यामुळे आपल्या डोळ्यांदेखत ते घडत नाहीय असा भास होतो इतकेच. जी प्रथा सोयीस्कर नाही, त्याला लोक प्रतिकूल होत जातात आणि तिच्या सब्स्टिट्यूशनसाठी काळ अनुकूल होत जातो; इतके सोपे लॉजिक आहे हे.

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार Sat, 04/09/2016 - 12:08
एका असहिष्णुतेला दुसर्‍या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्‍या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्‍याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे.
श्रद्धेचा बाजार चालत असेल तर माझं त्यालाही काही म्हणणं नाही. पण मग त्याला सरळ बाजार असं म्हणावं. देवस्थान आणि शनिचा प्रकोप वगैरे नाटकं करु नयेत.
१) बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते. २) कुणि कशाला काय म्हणाव आणि कशाच नाटंक कराव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुख्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असावा.

In reply to by माहितगार

बोका-ए-आझम Sat, 04/09/2016 - 15:32
कुणि कशाला काय म्हणाव आणि कशाच नाटंक कराव हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा मुख्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न असावा.
बरोबर. मग अशा गोष्टींना फालतूपणा म्हणण्याचं इतरांना स्वातंत्र्य आहेच. शिवाय तुमच्या म्हणण्यानुसार - उद्या कुणीही स्वतःला देव/संत म्हणवून घेऊ लागला तर त्याचं स्वातंत्र्य त्या माणसाला आहेच, बरोबर? मग अशा प्रवृत्तीवर टीका करण्याचं स्वातंत्र्यही आम्हाला आहेच.

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार Sat, 04/09/2016 - 16:28
फालतू या शब्दाचा निरुपयोगी उपयोग करण्याचे स्वातंत्र्य आपणास आहेच, मुख्य आक्षेप 'मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं.' + 'तर मी अगदी डंकेकी चोटपर असहिष्णू आहे.' यांची बेरीज होऊन सांस्कृतीक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दमनाचे जे समर्थन होते आहे त्याला आहे म्हणुन आपल्या भूमिके बद्दल साशंकता आहे.

In reply to by माहितगार

बोका-ए-आझम Sat, 04/09/2016 - 22:04
एका समुहाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अंधश्रद्धा किंवा तत्सम समाजविघातक रुढी पसरवत असेल तर त्या स्वातंत्र्याला आवर घालावा लागतो. साधं उदाहरण आहे. इथे मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तरीही त्याचा गैरवापर करणारे बॅन होतातच. असल्या रूढी पसरवणा-यांवरही तत्सम कारवाई झाली पाहिजे. मग त्याला असहिष्णुता म्हणालात तर so be it. -(Proud to be असहिष्णु about all sorts of फालतूगिरी) बोका-ए-अाझम

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार Sat, 04/09/2016 - 23:04
याच फिरुन उत्तर खालील प्रमाणेच रहाते.
एका असहिष्णुतेला दुसर्‍या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्‍या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्‍याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा 'आपला' नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे.

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार Sat, 04/09/2016 - 23:23
आणि हे पहा या सदस्य प्रतिसादात तुमच्या एक्झॅक्टली आपोझीटसाईडच तुमच्याच स्टाईलच उत्तर आधी पासून तयार आहे. बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते हे खरे नाही का ?

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार Sat, 04/09/2016 - 12:16
फालतूपणाला फालतूपणा म्हणणं ...
मी आपल्या ज्या प्रतिसादाला उत्तर दिलं तिथे आपण 'फालतू' या तुच्छतादर्शक विशेषणाचा उपयोग केला नव्हता, आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर गदा आणू इच्छित "..मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं." असहीष्णूतेचे प्रदर्शन करनार्‍या भावना व्यक्त केल्या, मध्यपुर्वेत नास्तीकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाकारुन फासावर चढवले जाते आणि विरुद्ध दिशेला नास्तिक आस्तीकांचे मंदिरे तोडण्याची भाषा करतात ह्या वरकरणी भिन्न दिसणार्‍या कृतीं मागील दुसर्‍याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याची वृत्ती समानच असते किंवा कसे.

In reply to by बोका-ए-आझम

@या मंदिरात प्रवेश हवा म्हणून आंदोलन करण्याऐवजी मंदीर कायमचं बंद पडावं म्हणून आंदोलन करायला हवं होतं. >> चुकीच्या भुकेच प्रबोधनानी निर्दालन, आणि योग्य पर्यायी मार्ग तयार केल्याशिवाय हे कालत्रयीही शक्य होणार नाही.

In reply to by मितभाषी

@त्यामुळे तो विषय तिथेच संपलेला आहे. असे मला वाटते. >> धन्यवाद. पण ते आगो बा असल्यानी त्यांनि लावली नाही काडी,तर पेटत नाही (त्यांचीच!) http://www.freesmileys.org/smileys/smiley-char002.gif विडी! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt014.gif अशी त्यांची कडी लागल्यासारखी अवस्था होते! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif ----------------------- आगोबा-करंटआत्मा http://www.freesmileys.org/smileys/smiley-char005.gif http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw022.gif

In reply to by बोका-ए-आझम

सतिश गावडे Sat, 04/09/2016 - 08:53
मंदीर बंदीचा टोकाचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. मात्र तेलाच्या नासाडीविरोधात आणि शनीच्या हॉरर स्टोरींच्या विरोधात समाज प्रबोधन करण्याऐवजी चक्क त्यात सहभागी होता यावे म्हणून स्त्रीयांनी आंदोलन करणे म्हणजे प्रबोधनाची दिशा बदलून टाकण्यासारखे आहे.

In reply to by सतिश गावडे

माहितगार Sat, 04/09/2016 - 09:11
...प्रबोधनाची दिशा बदलून टाकण्यासारखे आहे.
गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा विश्वशांतीची असावी म्हणून स्त्रीयांनी सैन्यात समान संधी मागू नयेत म्हणण्यासारखे होत नाहीए ना ? केवळ समतेची संस्कृती म्हणून बघा समतेची संक्सृती राबवण्यासाठी शक्यत्या प्रत्येक सांस्कृतीक गोष्टीत समान संधी द्यावी, या प्रित्यर्थ आम्ही आपणा सहीत सर्व मिपाकर पुरुषांना स्त्रीयांप्रमाणे केशरचना, वेशभूषा, रांगोळी काढणे ते हातावर मेंडी रंगवणे यात समानसंधी द्यावी असे समस्त अनाहीतांना आवाहन करतो ;) (मिपाकर पुरुषांनो ह. घ्या.)

In reply to by माहितगार

सतिश गावडे Sat, 04/09/2016 - 09:18
गावडेसाहेब प्रबोधनाची दिशा विश्वशांतीची असावी म्हणून स्त्रीयांनी सैन्यात समान संधी मागू नयेत म्हणण्यासारखे होत नाहीए ना ?
"सैन्य नको" हा विचार कितीही आदर्श असला तरीही सैन्य ही काळाची गरज आहे. त्यामुळे सैन्याकडे जर सेवेची संधी म्हणून पाहीले जात असेल तर तिथे स्त्रीयांनी समान संधी मागण्यात काहीइ गैर नाही. दगडाच्या मूर्तीवर तेल ओतणे ही काळाची गरज नाही असे मला तरी वाटते. :)

In reply to by सतिश गावडे

आनन्दा Mon, 04/11/2016 - 12:13
माहीतगारसाहेबांचा मुद्दा बहुधा केवळ "व्यक्तीस्वातंत्र्य" एव्हढाच मर्यादित आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करून अस्तित्वात आलेली कोणतीही व्यवस्था/ परिवर्तन काळाच्या कसोटीवर टिकणे कठीण आहे हे खरेच. त्यामुळे जे काही करायचे ते त्याच परिघात राहून केले पाहिजे.

In reply to by सतिश गावडे

राही Sat, 04/09/2016 - 10:12
शनीच्या हॉररस्टोरीविरोधात आंदोलन चालू होईलच. (ते तुरळक प्रमाणात कुठे कुठे वैचारिक पातळीवर चालू आहेच.) पण आता ते स्त्री-पुरुष दोघांचेही प्रबोधन म्हणजे पूर्ण समाजाचे प्रबोधन या स्वरूपात असेल. शिवाय तैलार्पणाशिवायही दर्शन घेता येऊ शकेल की. तसे ते अनेकजण (स्त्रिया वगळून) आधीही घेत होतेच. शनिमंगळाची दहशत समाजमनातून काढून टाकणे ही गोष्ट स्त्रीसंघटना, अंनिस, काही समाजसुधारासाठी झटणार्‍या संघटना यांच्या अजेंड्यावर आधीपासून आहेच. आत्ताचे यश ही एक छोटी पायरी आहे. अशा छोट्या छोट्या पावलांतूनच मोठी झेप घेण्याचे बळ येते. मंदिरबंदी हा टोकाचा विचार वाटतो. आता पहिली काही वर्षे उलट या मंदिरातली गर्दी वाढल्याचेच दिसेल. दर्शन हिरावले गेलेला महिलावर्ग हिरीरीने दर्शनासाठी रांगा लावेल. काही काळ या यशात त्यांना न्हाऊन घेऊ दे. आपोआपच ही हिरीरी कमी होऊन यातल्या अंधश्रद्धेकडे किंवा श्रद्धेच्या बाजाराकडे त्यांचे लक्ष्य वळेल.

सतिश गावडे Sat, 04/09/2016 - 08:46
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी ठीक असेलही; आताच्या काळात तो खुळेपणा आहे. हे म्हणजे पुरुष जो मुर्खपणा करतात तो मुर्खपणा करायचा अधिकार स्त्रीयांनाही हवा असा प्रकार झाला आहे. आता खर्‍या अर्थाने समाजाची "स्त्री-पुरुष समानते"च्या दिशेने पावले पडू लागली आहेत असे म्हणायला हरकत नाही.

In reply to by सतिश गावडे

माहितगार Sat, 04/09/2016 - 08:58
पुरुष जो मुर्खपणा करतात तो मुर्खपणा करायचा अधिकार स्त्रीयांनाही हवा
शहाणपणा अथवा मुर्खपणा कशाला म्हणावे या सापेक्ष गोष्टी असतात, आपण कदाचित श्रद्धा अंधश्रद्धेचा तराजू लावत आहात तो क्षणभर बाजूला ठेऊन त्याकडे संस्कती म्हणून पाहीले आणि समानतेची संस्कृती रुजवण्यासाठी रोज दररोजच्या सांस्कृतीक बाबतीत समानता मागितली तर त्यात हरकत काय काय ?

In reply to by माहितगार

सतिश गावडे Sat, 04/09/2016 - 09:03
एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा मुर्खपणा नाही का? किती तेल वाया जाते याचा माझ्याकडे विदा नसला तरी ते प्रमाण खचितच कमी नसेल. ही संस्कृती आहे? समानता चांगल्या गोष्टीमध्ये मागायलाच हवी. या असल्या बाबतीत जर स्त्रीयांना समानता हवी असेल तर मग नक्कीच प्रबोधनाची चळवळ उलट दिशेने चालू लागली आहे असे म्हणावे लागेल.

In reply to by सतिश गावडे

माहितगार Sat, 04/09/2016 - 09:30
संस्कृती आहे?
'काय आहे' आणि 'काय असावे' हे भिन्न प्रश्न आहेत. मला किंवा तुम्हाला संस्कृतीतील काय आवडते अथवा नाही यावर संस्कृती ठरत नाही. स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना शरीराला पूर्ण व्यायाम देणारे कबडी असो वा फूटबॉल सारखे खेळ न खेळता लोक (तुमचे शब्द वापरावयाचे झाल्यास मुर्खांसारखे) तोंडात बोटे घालून क्रिकेट पहात बसतात, क्रिकेट हिरोंचे व्यक्तिपूजन करतात, ते चांगल आहे का वाईट ती एक संस्कृती आहे पैशाचा स्रोतांचा येथे सुद्धा अपव्यय होतोच. अंशतः स्रोत वापरल्या शिवाय संस्कृती उभी सुद्धा रहात नाही. तेल वाहील्या मुळे शनिदेव प्रसन्न होतात असे काही जणांना वाटत असेल तर त्यांना तसे वाटण्याचे स्वातंत्र्य असावे. पण शनीदेव असणे आणि तेल वाहण्याने प्रसन्न होण्यावर शंका व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य असावे. दोन्ही पक्षांनी तर्कावर भर द्यावा 'मूर्खपण' या विशेषणातून तुमचा रोष व्यक्त होत असेल तर्क व्यक्त होत नाही. आणि जिथे तर्क व्यक्त होत नाही तो रोष स्विकारला जाणेही कठीण असावे किंवा कसे.

In reply to by माहितगार

दगडावर तेल वाहणे हा मुर्खपणाच आहे,आणि तसा मुर्खपणा करण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. आणि तर्क वापरून कथित देवाधर्माची चिकित्सा करण्याइतपत आपला समाज तितका आधुनिक झाला नाहीये. कर्मकांड आणि निखळ भक्ती यातला फरक लोकांना माहित नाही,निखळ भक्ती असेल तर नैवेद्य,तेल,धूप,कापूर,घंटा(मंदिरातील) या गोष्टी गौण आहेत. निराकार तो निर्गुण ईश्वर

In reply to by दिग्विजय भोसले

माहितगार Sat, 04/09/2016 - 09:45
विशेषणातून तुमचा रोष व्यक्त होत असेल तर्क व्यक्त होत नाही. दुसर्‍यांना दुषणे देणे सोपे असावे किंवा कसे.

In reply to by माहितगार

विजय पुरोहित Sat, 04/09/2016 - 11:58
स्वतः मैदानावर उतरुन सर्वांना शरीराला पूर्ण व्यायाम देणारे कबडी असो वा फूटबॉल सारखे खेळ न खेळता लोक (तुमचे शब्द वापरावयाचे झाल्यास मुर्खांसारखे) तोंडात बोटे घालून क्रिकेट पहात बसतात, क्रिकेट हिरोंचे व्यक्तिपूजन करतात, ते चांगल आहे का वाईट ती एक संस्कृती आहे पैशाचा स्रोतांचा येथे सुद्धा अपव्यय होतोच. अंशतः स्रोत वापरल्या शिवाय संस्कृती उभी सुद्धा रहात नाही. +१११११११

In reply to by विजय पुरोहित

राही Sat, 04/09/2016 - 19:27
"अंशतः स्रोत वापरल्याशिवाय संस्कृतीसुद्धा उभी राहत नाही" मुळात संस्कृती हाच एक स्रोत असतो आणि उलटही. या स्रोताची मुळे सभोवतालात असतात. या सभोवतालातून संस्कृती पुष्ट होते आणि वायसे वर्सा म्हणजे संस्कृतीतून सभोवताल पुष्ट होते. एका परीने संस्कृती आपल्याला घडवीत असते आणि दुसर्‍या परीने क्रियाशील समाज आपल्या क्रियेतून संस्कृती घडवीत असतो. असे हे परस्परावलंबी नाते आहे. समाज जडशीळ, मूढ झाला की संस्कृतीची वाढ मंदावते, ज्याला आपण र्‍हास म्हणतो. चैतन्यशील, गतिशील, परिवर्तनशील समाजात संस्कृती वर्धमान असते, आणि अशा संस्कृतीची लेकरे नवनवोन्मेषशाली निपजतात.

In reply to by राही

माहितगार Sat, 04/09/2016 - 21:34
हम्म.. स्रोत वस्तुरुप किंवा आर्थीक म्हटले, जसे की परकिय चलनाच्या गंगाजळीवर ताण टाकणारे सोन्यावरचे भारतीयांचे अतीप्रेम मला खटकते पण सोन्याच्या वापरा शिवाय कोल्हापुरी साज सुद्धा बनत नाही. जर रांगोळी केवळ रंगांनी काढली तर ठिकच पण बदल म्हणुन कुणी धान्य वापरुन रांगोळी काढली तर एका अर्थाने धान्याचा अपव्यय होतोच. समईत तेल वापरण्याने तेलाचा अपव्यय होतोच पण तीच रांगोळी किंवा समई सास्म्कृतीक वातावरण निर्मितीसही हातभार लावत असते. अर्थात स्रोतांचा अती अपव्यय टाळण्यासाठी प्रबोधन केले पाहीजे. आपल्या संस्कृतीत अपव्यय टाळण्याचे अप्रत्यक्षपणे सुचवणार्‍या खुलभर दुधाची कहाणी सारख्याही कथा आहेत. बेसिकली लोकांसमोर संस्कृतीची रचनात्मक आणि सकारात्मक बाजू पुढे ठेवणे एक मोठे आहान असावे. अंधश्रद्धेतून नाही पण अंधश्रद्धेशिवाय चोरी न होणारे जग पहाण्यास कुणालाही आवडेल किंवा चोरी झाली तरीही काळजी करणार नाही हाही दृष्टीकोण असू शकतो. अंधश्रद्धा दूर ठेऊन केवळ संस्कृती म्हणून आम्ही आमच्या गावातील दारांना दरवाजे शक्यतो लावणार नाही हि अंधश्रद्धा टाळून जपलेली संस्कृती राहू शकते. अंधश्रद्धा टाळणे म्हणजे संस्कृतीचे दमन केले पाहीजे असे नाही. शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात शनी ग्रहाची माहिती देणारे प्रदर्शन कदाचीत ऑब्झ्र्वेटरी कदाचित प्लॅनेटोरीअम उभारुन संस्क्र्तीतील अंधश्रद्धा कमी करुन संस्कृती वेगळ्या पद्धतीने जपता येऊ शकतील.

In reply to by माहितगार

तर्राट जोकर Sat, 04/09/2016 - 22:16
शनी मंदिरा सोबत बाजूला आवारात शनी ग्रहाची माहिती देणारे प्रदर्शन कदाचीत ऑब्झ्र्वेटरी कदाचित प्लॅनेटोरीअम उभारुन संस्क्र्तीतील अंधश्रद्धा कमी करुन संस्कृती वेगळ्या पद्धतीने जपता येऊ शकतील. बाकी सगळे ठिक असले तरी हे मात्र काहीच उपयोगाचे नाही बरं का. कारण प्रतिमासंयोजन. सुर्याभोवती फिरणारा कडे असलेला ग्रह आणि साडेसातीत त्रास देणारा देव हे एकच आहे हे काही सत्य नाही. हे अंधश्रद्धाळू लोकांनाही पक्के ठावूक आहे. प्लॅनेटोरियम नाहीत किंवा कुंडलीतले ग्रह म्हणजेच सुर्यमालेतले ग्रह असा समज असल्याने लोक अंधश्रद्धाळू आहेत अशी आपली काहीशी अंधश्रद्धा झालेली वाटते. :) (ह.घ्या.)

In reply to by होबासराव

पेशवा भट Wed, 04/13/2016 - 16:59
शनीला पण कळेल साडेसाती म्हणजे काय असते ते... +११११११११११११११११११११ ... संपुर्ण प्रतिसादांच्या काथ्याकुटात या एकच प्रतिसादाने हसुन हसुन पार वाट लागली. पाटिल साहेब कोपरापासुन ______/\______.

In reply to by सतिश गावडे

नाना स्कॉच Sat, 04/09/2016 - 10:27
एका दगडी मूर्तीवर तेल ओतणे हा मुर्खपणा नाही का? किती तेल वाया जाते याचा माझ्याकडे विदा नसला तरी ते प्रमाण खचितच कमी नसेल. ऐकिव माहीतीनुसार, शनि चौथर्यावरील अर्पण केलेले तेल वाया जात नाही तर ते तेल जमा करून लिलावात साबण निर्मात्या कंपन्यांना विकले जाते, ज्यातून येणारा पैसा हा येणाऱ्या भक्तजनांसाठी नव्या सोईसुविधा पुरवणे इत्यादी वर ट्रस्ट खर्च करत असावा खरे खोटे शनिदेव जाणे __/\__

In reply to by नाना स्कॉच

राही Sat, 04/09/2016 - 11:55
दोनतीन देवळांमध्ये तेच तेल जमा करून पुनर्विक्रीसाठी छोट्याछोट्या पणतीसारख्या द्रोणातून ठेवलेले बघितले आहे. रुईच्या पानांच्या माळाही मूर्तीवर (जिथे शनिमूर्ती असेल तेथे-शनी व मारुती जोडीने असतात अलीकडे.) वाहिल्यानंतर काही वेळाने बाजूला काढून गाभार्‍याच्या मागील बाजूने पुढच्या दरवाज्यासमोर विक्रीस आणतानाही पाहिले आहे. नारळही पुनर्विक्रीसाठी येतात. अधिकृत लिलाव होतोच असे नाही. ख.खो.शनिदेव जाणे.

In reply to by राही

विजय पुरोहित Sat, 04/09/2016 - 11:59
यात चूक देवाची का देवाच्या नावावर बाजार मांडणा-या मानवी स्वार्थ वृत्तीची? ही स्वार्थी वृत्ती सर्वच क्षेत्रात दिसून येत नाही का?

In reply to by विजय पुरोहित

राही Sat, 04/09/2016 - 12:08
चूक निश्चितच लोकांचीच आहे. त्यासाठीच लोकांचे प्रबोधन आवश्यक आहे. सर्व चळवळी या लोकप्रबोधनासाठीच असतात. देव बिचारा (असलाच तर) एका कोपर्‍यात असतो. तो सांगतच नाही की मला तेल वाहा म्हणून. त्याने तर 'पत्रं पुष्पं फलं तोयम्' असे कधीचेच म्हणून ठेवले आहे.

In reply to by राही

राही Sat, 04/09/2016 - 12:22
भ्रष्टाचार सर्वच क्षेत्रांत आहे. आणि त्याविरुद्ध देशव्यापी, जगद्व्यापी लढे चालू आहेत. मग श्रद्धेचे क्षेत्र तरी मागे कसे राहील? पनामा पेपर्स हे विश्वव्यापी लढ्याचे उदाहरण आहे. व्यापम घोटाळ्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. माहिती अधिकारकायद्याखाली माहितीची मागणी करणार्‍यांचे खून झाले आहेत. तूरडाळीचा घोटाळा, महानंद(आरे) डेअरी घोटाळा, गर्भलिंगनिश्चिती घोटाळा असे अनेक क्षेत्रातले भ्रष्टाचार उघडकीस आणणारे लढे सर्वत्र चालू आहेत. मग श्रद्धेचे क्षेत्र या लढ्यांना अपवाद कसे ठरेल? आणि का ठरावे?

In reply to by सतिश गावडे

तेल वाया जात नाही पण वाहणार्याचा पैसा मात्र जातो. माझ्या माहीतीप्रमाणे हे तेल साबण बनवणार्या कंपन्या विकत घेतात व काही तेल रिसायकल होते. ह्यातून संस्थान व काही हितसंबंधी लोक चांगला पैसा कमावतात व "श्रद्धाळू" हा पैसा आपणहुन नेउन त्यांना अर्पण करतात. आजकाल प्रसाद ही सुद्धा नविन इंडस्ट्री चालु झाली आहे.

In reply to by सतिश गावडे

अत्रे Sat, 04/09/2016 - 09:19
प्रश्न तत्वाचा आहे. आणि विरोध मोडायला न्यायालयात जावं लागलं याचा अर्थ लढाई सोपी नव्हती. एका गोष्टीत समानता आली की त्याचे साइड इफेक्टस दुसरीकडे ही दिसतील, असे वाटते.

In reply to by सतिश गावडे

माहितगार Sat, 04/09/2016 - 09:43
मंदीरप्रवेशाची चळवळ शंभर वर्षांपूर्वी ठीक असेलही, आताच्या काळात तो खुळेपणा आहे.
हि केवळ दोन वर्षा पुर्वीची महाराष्ट्रातीलच बातमी आहे की नव विवाहीत दलित दांपत्त्याला एका मंदिरात दर्शनासाठी प्रवेश नाकारला गेला होता. नास्तिकांना कितीही नको असले तरी मंदिरेही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत हे वास्तव आहे. महाराष्ट्रापेक्षा पुरोगामी असणे अभिप्रेत असलेल्या तामीळनाडु राज्यात ना मंदिर संस्कृती मिटली आहे ना दलितांवरील अत्याचारांचा अंत झाला आहे. दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत. मंदिर या केंद्रीय सांस्कृतिक गोष्टीत समानता येणे हे समता मानसिक पातळीवर स्विकारली जाण्यासाठी कदाचित अजूनही महत्वाचे नाहीच असे नेमकेपणाने सांगणे कठीण असावे.

In reply to by माहितगार

आनन्दा Mon, 04/11/2016 - 12:17
दलितांवरील तेथील सर्वाधिक अत्याचार मंदिर गितिविधीत सहभगासाठी समानतेचा आग्रह आणि आंतरजातीय विवाहाच्या कारणांनी तामीळनाडूतील गेल्या दशकाभरात ऑनर किलींग वाढत चालली आहेत.
कदाचित याचा अर्थ असाही होतो की आंतरजातीय विवाह देखील वाढत आहेत. हे देखील एक चांगले लक्षणच.

चला आता शनिमहारांजाच्या कृपेने महिलांचे प्रश्न सुटणार तसेच त्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून येईल असे वाटते.

In reply to by प्रचेतस

माहितगार Sat, 04/09/2016 - 09:54
प्रचेतसजी या विषयावरच्या मागच्या दोन धाग्यापासून तरी मिपा अनाहिता गायब हैत असे वाटते, याचे रहस्य काय असावे ब्रे ?

In reply to by माहितगार

पैसा Sat, 04/09/2016 - 12:56
कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. माझ्या बाबतीत म्हटले तर जे काय चालू आहे ते मला ठीक वाटते. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा असे तर माझा पाठिंबा आहेच. पण त्यासाठी मी पदरमोड करून आणि वेळ घालवून आंदोलने करायला जाणार नाही. वयाच्या तिशी पस्तिशी नंतर आपण स्वतःलाही बदलू शकत नाही. तेव्हा लोकांना बदलायचा प्रयत्न करणेही अवघड आहे. लोकांच्या सवयी बदलण्यासाठी भारतात तरी सरकारचे कायदे किंवा न्यायालयाचे निर्णय असा एखाद्या जास्त मोठ्या "दादाचा" हस्तक्षेप लागतो. चौथर्‍यावर फक्त पुरुषांना प्रवेश का यासाठी आंदोलन करणेही बरोबर आहे आणि मुळात अंधश्रद्धा का वाढवावी हेही बरोबर आहे. मुक्तता करायची असेल तर त्र्यंबकेश्वरासारखे अनेक देव पुजार्‍यांच्या विळख्यात सापडले आहेत. त्या सगळ्यांचीच मुक्तता व्हायला हवी. देव किंवा राक्षस असा दगड किंवा मूर्तीत नसतो. असलाच तर तुमच्या माझ्यासारख्या माणसात असतो. त्यातल्या काहीजणांना वेगवेगळ्या गुलामगिरीत रहायला भाग पाडणे हे राक्षसी कर्म आहे. बर्‍याच बायकांना कितीतरी लांबून पाणी डोक्यावर उचलून आणावे लागते. घरात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर बहुधा मुलीला पैसे वाचवण्यासाठी भावापेक्षा कमी दर्जाचे शिक्षण दिले जाते. अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला चालू असतात. हे सगळे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र त्यात काही बदल करणे एकट्या दुकट्या माणसाचे काम नाही. त्यासाठी हुतात्मा व्हायची तर अजिबात गरज नाही. आपण मरतो तेव्हा आपल्याबरोबर जगही मरते त्यामुळे आपण मेल्यानंतर जग पुढे जातय का मागे जातय याची चिंता करून हातात असलेले आयुष्य फुकट का घालवावे? दर्शनाची सोय झाली. आता त्यातही ५०० रुपये देणार्‍यांना स्पेशल दर्शन, अजून जास्त देणार्‍यांना तेलाचा अभिषेक स्वतःच्या हाताने करता येईल वगैरे प्रकार सुरू होतील. मग ते बंद करा म्हणून कोणीतरी आंदोलने करत राहील. चालू दे सगळे. एव्हरीथिंग इज ओके. मात्र असल्या आंदोलनांसाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यापेक्षा तूरडाळ जर २०० रुपये किलो असताना बागायतदार सोसायटीत १४० ने मिळत असेल तर तिथे रांग लावणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थात कोणाला जर शनि चौथर्‍यावर रांग लावायची असेल तर त्यालाही माझी ना नाही. दुसर्‍या कोणाला मूर्ख म्हणायचा मला हक्क पोचत नाही. देव बिव काही आपल्या मदतीला येत नाही हे माझे मत असले तरी एखाद्या काडीच्या आधारामुळे कोणाच्या सायकिअ‍ॅट्रिस्टकडच्या ट्रिपा वाचणार असतील तर तेही ठीक. दुसर्‍या कोणाला त्रास होत नाही तोपर्यंत प्रत्येकाला घटनेनेच हे स्वातंत्र्य दिले आहे. त्रासात असताना कोणी देवाचा आधार घेतो, कोणी नशेचा घेतो. यात बरे वाईट काय हे कोण तिर्‍हाईत कसे ठरवणार?

In reply to by पैसा

माहितगार Sat, 04/09/2016 - 13:19
प्रश्न स्त्रीयांचे मत या बाजुचे आहे का त्या बाजुचे असा नाही. शनि शिंगणापूरला प्रवेश मिळतो न मिळतो हे गौण त्या प्रसंगामुळे जी संस्कृतीत समताधिष्टीत मुल्य प्रस्थापना करण्यासाठी लागणारी वैचारीक कलहाची संधी मह्त्वाची. मिपा महिलांनी प्रत्यक्ष आंदोलनात जाणे अभिप्रेत नाही. 'अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात.' हि स्थिती चिंतेची आहे. मंदिर प्रवेश झाला आहे त्यामुळे पुरुषीवृत्ती या धाग्यावर जराशा गप्प झालेल्या दिसतात पण मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला. आणि तरीही गोपाळ गणेश आगरकरांचा एक धागा टाकलाच गोपाळ गणेश आगरकरांना आजच्या काळापेक्षा अधिकच सहन करावे लागले असेल त्यांच्या अग्रलेखांचे पुस्तक प्रुफरिडींगसाठी विकिस्रोतावर आहे. त्यांची बर्‍याच लेखातील वचने अशा विवादातून महिलांना उधृत करण्यासारखी आहेत पण आगरकर विषयक धाग्यात पिराताईच तेवढ्या काय पोहोचल्या आणि त्याही केवळ महाराष्ट्रीय शब्दाच्या योग्यायोग्यते बाबत चर्चा करुन पाय काढता घेऊन गेल्या. तिकडे मराठी विकिपीडियावर स्त्री अभ्यासकेंद्रांच्या विद्यार्थीनींनी दिल्लीतील विद्वान स्त्रियांच्या पुस्तकांची बरीच परिक्षणे मराठी विकिपीडियावर टाकली पण चालू प्रश्नाची-आंदोलनाची दखल घेण्यास त्यांनाही वेळ नाही. तृप्ती देसाईंवरचा विकिपीडिया लेख शेवटी मी स्वतः चालू केला. असो.

In reply to by माहितगार

तर्राट जोकर Sat, 04/09/2016 - 13:37
मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.
हा विचार चांगलाच आहे. कारण मग "इथे तुम्हाला आम्ही आमंत्रण दिले नव्हते आमची बाजू घेऊन भांडा" असा उद्धटपणा ऐकून घ्यावा लागतो.

In reply to by तर्राट जोकर

माहितगार Sat, 04/09/2016 - 13:43
अगदीच असा अनुभव व्यक्तिशः आत्तापर्यंत आलेला नाही- मी काढलेल्या पहिल्या धाग्यात अनाहितांनी उपस्थिती लावली होती पण त्यासाठी त्या धाग्यात मी अगदीच उचकवले होते - पण शेवटी ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांचा नैसर्गिक रिस्पॉन्स हवा की नको ?

In reply to by माहितगार

तर्राट जोकर Sat, 04/09/2016 - 14:42
अनुभव आला नसेल तर चांगलंच आहे. पण येणार नाही याची कोणतीच खात्री नाही. शेवटी ज्यांच्यासाठी भांडायचे त्यांचा नैसर्गिक रिस्पॉन्स हवा की नको ? >> =)) चांगला प्रश्न आहे.

In reply to by माहितगार

पिलीयन रायडर Sun, 04/10/2016 - 00:38
तुम्ही आठवण काढलीत म्हणुन प्रतिसाद.. पहिली तर गोष्ट की वर पैसाताईने अगदी नीट सांगितले आहे.. जे कित्येकदा आधी सुद्धा सांगितले गेले आहे पण हरदासाची कथा मुळपदावर.. तुम्ही फार तार्किक लिहीता म्हणुन तुमच्याकडुन हे अपेक्षित नव्हते.. सर्व स्त्री आयडी म्हणजे अनाहिता नाहीत. अनाहिताचे एकच असे मत वगैरे नसते. त्यामुळे मिपावर स्त्री आयडींना उद्देशुन बोलताना "अनाहिता" असा उल्लेख करु नये. विषयच अनाहिता असेल तर मी अनाहिता ह्या नात्याने लिहेन कदाचित. पण एरवी मी मिपा सदस्यच आहे. इतरही अनाहितांचे साधारण असेच मत असावे. दुसरं तुमच्या लेखांवर प्रतिसाद न देण्याबद्दल.. मला तुमचे लेख / प्रतिसाद वाचण्याचा अतोनात कंटाळा येतो. प्रश्न मेगाबायटी लेखन वाचण्याचा नाहीये. तुमच्या लेखनाची मांडणी मला अत्यंत बोजड आणि कंटाळवाणी वाटते. ह्या व्यतिरिक्त १. रतीब घातल्यासारखे लेख लिहीणे २. जिथे तिथे त्यांची झैरात करणे इ. कारणेही लागु आहेत. त्यामुळे विधान करताना आधी लोक तुमचे लेख मुळात वाचत आहेतच हे गृहीत धरण्याचे कारण नाही. तुमच्या तुरळकच लेखांना जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो (त्यातही विषय धार्मिक अथवा गाजत असलेला / राजकीय असेल तर विशेषतः). स्त्री आयडींना खास पाँईट आउट करण्याची गरज नाही. त्यातही धाग्याचे नाव वाचुन तुमच्या स्वयंपाकघराच्या धाग्यावर अनेकींनी प्रतिसाद दिला होता. मी सुद्धा भरपुर लिहीले होते. पण खाली तुम्ही त्याबद्दल "उचकवणे" आणि "नैसर्गिक रिस्पॉन्स" वगैरे बोलुन त्याबद्द्ल पश्चाताप करायला लावल्याबद्दल धन्यवाद! (बाकी तुमच्या कुठल्याही धाग्यावर स्त्री आयडी फारशा आल्याचे मला तरी दिसले नाही.. तुमची विधाने दुसर्‍या धाग्याबद्दल असली तरी आक्षेपार्हच आहेत..) आता मुळ मुद्द्याबद्दल एखाद्या गोष्टीसाठी स्त्रियांनी लढा दिला आणि यश मिळवले ही खरंतर उत्तमच गोष्ट आहे. मी स्वतः देवधर्म मानित नसल्याने मला व्यक्तिशः काही फरक पडला नाही. ही शक्ति इतर जास्त महत्वाच्या आणि गंभीर स्त्री विषयक मुद्द्यांसाठी वापरली गेली असती तर जास्त बरे झाले असते.. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मला हा प्रकार खरं तर राजकीय स्टंटबाजीचा जास्त वाटतो. म्हणुन काही विशेष आनंद वगैरे झाला नाही. बाकी सर्व मत एकम्दरीत पैसाताई सारखेच आहे. आणि हो.. पुन्हा कधी तुम्हाला फुकट निराश व्हावं लागु नये म्हणुन.. खरंच स्त्री आयडींनी आमंत्रण दिलं नव्हतं कोणाताही धागा काढताना. तेव्हा उगाच "आयजीचा जीव बायजीत.. बायजीचा जीव खेटरात.." टाईप सुर लावु नये. इथे कुणीही जेव्हा स्त्तीयांच्या बाजुने लिहीते / भांडते तेव्हा स्वतःच्या मतांसाठी.. विचारांसाठी बोलत असते. स्त्रीयांनी त्याबद्दल उपकृत रहाण्याची अपेक्षा न केल्यास बरे. धन्यवाद!

In reply to by माहितगार

अजया Wed, 04/13/2016 - 16:36
माहितगार, तुमच्याकडून असा प्रतिसाद यावा याचे सखेद आश्चर्य वाटते आहे! मला गेले तीन दिवस मिपा उघडतच नव्हते कसा प्रतिसाद देणार? दुसरे या विषयावर मी एकदा तुमच्याच धाग्यावर मला काय वाटते ते लिहिले आहे.अशा चमको आंदोलन आणि शनिला देव समजून महत्त्व देणे वगैरे गोष्टी माझ्यासाठी दुर्लक्षणीय आहेत.स्त्रियांसाठी करण्यासारख्या अनेक गोष्टी या भूमातांनी केल्या तर जास्त आवडेल.

In reply to by माहितगार

पैसा Wed, 04/13/2016 - 16:28
मंदिरे व आक्रमणे हा धागालेख आणि काही प्रतिसादातील पुरुषीवृत्ती पहा त्यांच्या खंडनाला हातच लावला गेला नाही. मीही उत्तरे देण्यास कंटाळलो होतो हे खरे त्याच वेळी महिलांनाच सोयर सुतक नाही आपण कशाला मेगाबाईट खर्चायचे असाही एक विचार मनात तरळत राहीला.
यासाठी धन्यवाद! मात्र खरे सांगायचे तर अशा विषयांवर निकोप चर्चा होऊ शकत नाही हा जुना अनुभव आहे. मग तिथे अनाहिता वगैरे अनेक संबंध नसलेल्या गोष्टी येतात. आणि चर्चा नीटशी होत नाही तर फक्त भांडणे होऊन संपादकांचे काम वाढते त्यामुळे मी अशा प्रकारांना उत्तर द्यायचे फार पूर्वीच बंद केले आहे. बरे काही उत्तर देऊन कोणाचे मत बदलण्याचीही कधी सुतराम शक्यता नसते. या चर्चांमधे आगलावेपणा करणारे कोण हे नेहमीच ठरलेले असतात. त्यामुळे तिथे आपला वेळ आणि शक्ती खर्च करण्यापेक्षा दुसरे काही विधायक करण्यावर मी लक्ष केंद्रित करते.

In reply to by पैसा

अ-मॅन Sat, 04/09/2016 - 13:20
कारण अनाहितांचे असे काही एक कॉमन मत कधी नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती.
अगदी नैसर्गीक. अनाहितांमधेही अगदी प्रचंड देवभोळ्या, अतिशय सश्रद्ध पासून टोकाच्या नास्तिक पर्यंत सगळे प्रकार आहेत. कदाचित चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा अनेकदा लोकांच्या अकला वगैरे काढल्या जातात तिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा चर्चांमधे फार येत नसाव्यात. नाही नाही आम्हाला त्यांच्या स्वयंघोशीत प्रतिनीधींची अनुपस्थीती जाणवते... आता यात पुन्हा म्हणाल की अशा कोणी स्वयंघोशीत अनाहीता प्रतिनीधी अजिबात अस्तित्वात नाहीत पण लक्षात घ्या त्या आहेत असे अनेक अनाहितांचे गुप्त उघड म्हणने आहे कदाचीत चर्चेला पुरेसा वेळ देता येत नाही किंवातिथे आपण कुठेपर्यंत पुरे पडू अशा भीतीने महिला आयडी अशा स्वयंघोशीत प्रतिनीधींच्या बाबत चर्चांमधे फार येत नसाव्यात इतकेच.

In reply to by अ-मॅन

पिलीयन रायडर Sun, 04/10/2016 - 00:44
मिपावय पाच महिने आणि नॉन अनाहिता असुन तुम्हाला अनाहिता बद्दल बरीच माहिती दिसते. इतकेच नव्हे तर अगदी अनाहिता तुमच्यापाशी मन मोकळे करताना दिसतात. तुम्हाला त्यांचे गुप्त उघड म्हणणे आणि त्यामागचे कारणही माहिती आहे. इंटरेस्टींग!