Skip to main content

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 24/03/2016 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62703
प्रतिक्रिया 482

प्रतिक्रिया

सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे जर कोणी विकृत माणूस एखादया धर्माच्या देवतांबद्द्ल अत्यंत अश्लील पेंटिग काढून प्रसिध्द करत असेल तर जस भंकस बाबा म्हटले तस त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडलेच पाहिजे अशी सर्वसामान्य हिंदुंची फक्त भावना आहे लगेच या भावनेला शर्लि हेब्दो च्या आफिस वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेशी तुलना करायची गरज नाही .उद्या कोणी जर म्हणाल की बघा मी तुमच्या देवी देवतां ची अश्लील चित्रे काढतो आणी ती प्रकाशित करतो आणि तुमच्या प्रतीकीयेवरून तुमची असहिष्णुता ठरवेन तर ते हास्यास्पद आहे .जर कोणीही देशद्रोहा बद्दलची प्रमाणपत्र देऊ शकत नाही तशीच असहिष्णुते बद्द्लचीही प्रमाण पत्रे देण्याचा कोणाला अधिकार नाही .

In reply to by viraj thale

बरोबर. पण सहिष्णुतेची सेल्फ अटेस्टेड प्रमाणपत्रं स्वतःलाच देण्यासाठी धागे काढले जातात ती एक विसंगती लक्षात येते, बघा आता कसं ते.

एम.एफ. हुसेन चित्र विषयक सदस्य भंकस बाबा आणि इतरांची चर्चा कायदे विषयक बाजू पासून बर्‍यापैकी दूर असण्याची शक्यता पाहून दिल्ली न्यायालयाच्या निकालावर आधारीत स्वतंत्र धागा काढला आहे, तेथे निकाल अनुवाद आणि चर्चेत सहभागाचे आदरपुर्वक निमंत्रण आहे. एम. एफ. हुसेन विषयक दिल्ली उच्चन्यायालयाच्या निर्णयाच्या अनुवादात साहाय्य हवे

In reply to by DEADPOOL

अभिव्यक्ती संदर्भाने मी बराच आधी पासून बरेच काही लिहित आलो आहे. हे मला नित्याचे आहे. लेख कुठेतरी बॅक ऑफ द माईंड आधी पासून असतो निमीत्त मिळाले की एकुण चर्चेस अनुरुप रहाते

उन्माद.

असहिष्णुता इतकी वाढली आहे कि ब्रिगेडी मंडळीने कालनिर्णय घ्यायचं बंद केलं आहे।। ओम भट स्वाहा।

छान चाललीय आहे चर्चा! सगळी वाचली! विशेषतः दोन्ही बाजू मांडणारे लोक आहेत,शिवाय मनोरंजनासाठी इथे ट्रोलांची पिलावळ आहेच. एकंदरीतच मस्त आहे मिसळपाव!

भारतमाता म्हणणे सक्तीचे नाही.. आर एस एस

दाभोळकर, पानसरे यांच्या हत्त्याबाबत काय म्हणने आहे हिन्दूत्ववाद्यांचे?

In reply to by मितभाषी

दाभोलकर व पान्सरे यांना हिन्दूत्ववाद्यानी मारले याचा काय पुरावाआहे! समीर पाटीलला न्यायालयाने अजून दोषी ठरविले नाही! कश्मीरी पंडिताविषयी द्या उत्तर

In reply to by DEADPOOL

दाभोलकर व पान्सरे यांना हिन्दूत्ववाद्यानी मारले याचा काय पुरावाआहे!
=)) =)) =)) ते पुढे बघु आपण. अजून ट्रेलरच चालू झालाय तुम्ही थेट क्लायमॅक्सलाच पोहोचले. हत्येबद्दल मत विचारले होते. सनातन्यांची भूमिका जाणून घ्यायची आहे.

In reply to by DEADPOOL

चला किमान एक मान्य केले तुम्ही सनातनी नाही. माझा मूळ प्रश्न "हिन्दूत्ववाद्यांची" भूमिका याबद्दल तुम्ही सोइस्कर मऔन बाळगले आहे.

काय ठरल मग ?

In reply to by इरसाल

छ्या. असं काही ठरत असतं का इरसालबुवा? जुनीजाणती माणसं तुम्ही, तुमको क्या बताना. या मिपावरी अष्टोप्रहरी, चर्चांचे गुर्हाळ चाले निरंतरी उसाला तर तोटा नाही, जळणाला मिळतेच काहीतरी.

In reply to by DEADPOOL

अशा कश्मीरी पण्डिताविषयी लिंका द्यायच्या नसतात. खांग्रेस तर त्यांना अनुल्लेखाने मारते. उगाच्च तुम्ही सर्वधर्मसम्भाववाल्याच्या धोतराला हात घालत आहात.

आत्ताच एक क्लिप बघितली. कायउप्पवर वायरल झाली आहे. उस्मान ख्वाजा औस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत चालु असताना काय चाळे करत आहे त्याची! बघा आणि विसरून जा.

वाचन मात्र करावा

In reply to by विटेकर

विटेकरजी आपण दुसर्‍य धाग्यावर सुचवल्यामुळे योगी अरविंदांचे एक पुस्तक डाउनलोड केले. योगी अरविंदांनी एम.एफ. हुसैन बद्दल काय मत मांडले असते असा सहजच मनात प्रश्न पडला, आपले योगी अरविंदांवर बरेच वाचन असणार आता या धागा चर्चेचा टंकाळा आलेला असेल तर ठिकच पण पुढे मागे प्रसंग पाहून आपले योगी अरविंदांच्या दृष्टीकोणातून मत काय राहीले असते हे जाणून घेण्यास उत्सुक असेन.

आता भाग 2 येवू द्या. आम्ही वाचायला घाबरत नाय;;

येईल ओ! जसे की अच्छे दिन आने वाले है!!!!

@गुरुजी,
इतर धर्मियातील कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले की निवडणुकीत फायदा होतो. मते मिळतात. सत्ता मिळते. कट्टरवाद्यांच्या माध्यमातून व्होट बँक जोपासता येते.
>> असे करुनच राज्यांमधे व केंद्रात भाजपा सत्तेत आली आहे काय?
उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी असे प्रमाणपत्र मिळाले की माध्यमातून प्रतिष्ठा मिळते. जातीयवादी असा शिक्का मारून वाळीत टाकले जात नाही. हातून चुकीची गोष्ट घडून चव्हाट्यावर आली की हा जातीयवाद्यांचा, मनुवाद्यांचा कट आहे असा कांगावा करता येतो. कट्टर, धर्मांध, पुराणमतवादी, मनुवादी, अल्पसंख्याकविरोधी असे शिक्के मारून तुच्छतेने बघितले जात नाही. आचारविचारातील ढोंगावर पुरोगामित्वाचा लेप चढून ढोंग झाकले जाते.
>> ह्याने काय फायदा होतो?

In reply to by तर्राट जोकर

>> असे करुनच राज्यांमधे व केंद्रात भाजपा सत्तेत आली आहे काय?
आधीच्या प्रतिसादातील "इतर धर्मियातील" हे शब्द वाचलेले दिसत नाही.
>> ह्याने काय फायदा होतो?
सगळे फायदेच प्रतिसादात दिले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

इतर धर्मियातील म्हणजे? नीट कळले नाही. जरा विस्तार कराल का? तसेच वरचे फायदे कसे काय ते कळले नाही. ते तर तुमची मतं आहेत तेही सभ्य भाषेत मांडलेली पण त्यामागची तुच्छता लपत नाही. तुमची मतं नकोत, पुरोगाम्यांना नक्की काय फायदे होतात ते जीवंत उदाहरणांसकट स्पष्ट सांगा. तुम्ही दिलेली उदाहरणे जर खरी मानायची तर हे कारच्या मागे धावत जाणार्‍या श्वानांसारखे दिसते. तुम्हाला खरंच असे म्हणायचे आहे काय?

In reply to by तर्राट जोकर

इतर धर्मियातील म्हणजे? नीट कळले नाही. जरा विस्तार कराल का?
इतर धर्मियातले म्हणजे हिंदू धर्म वगळता इतर धर्मियातले.
तसेच वरचे फायदे कसे काय ते कळले नाही. ते तर तुमची मतं आहेत तेही सभ्य भाषेत मांडलेली पण त्यामागची तुच्छता लपत नाही. तुमची मतं नकोत, पुरोगाम्यांना नक्की काय फायदे होतात ते जीवंत उदाहरणांसकट स्पष्ट सांगा. तुम्ही दिलेली उदाहरणे जर खरी मानायची तर हे कारच्या मागे धावत जाणार्‍या श्वानांसारखे दिसते. तुम्हाला खरंच असे म्हणायचे आहे काय?
इतक्या स्पष्ट शब्दात फायदे काय व कोणते आहेत ते लिहिले आहेत ते समजले नसावेत असं वाटतंय.

In reply to by श्रीगुरुजी

तजो,इस्लाम धर्मीय आणि इस्लाम धर्माविषयी काहीही मतप्रदर्शन करण्या आधी तारेक फ़तह यांच्या मुलाखती बघा असे मी वेगवेगळ्या धाग्यांवर विनंती केली होती. https://www.youtube.com/results?search_query=tarek+fatah&page=2 शरिया चा उदय https://www.youtube.com/watch?v=DJtLKLPIYB4 ही ती संपूर्ण मुलाखत https://www.youtube.com/watch?v=yjNX_3jJt-E तुम्ही ती सोयीस्कर पणे दुर्लक्षिली. अर्धवट ज्ञानावर इथे बसून अक्कल पाजळण्यात कोणता कंड शमतो हे तुमचे तुम्हालाच माहित. ज्या धर्माच्या संस्थापकाच्या मृत्युनंतर २४ तासाच्या आतच पुढचा वारस कोण याच्या वरून अत्यंत रक्तरंजित पद्धतीने घडामोडी घडल्या,वाळवंटात,जिथे दिवसाचे तापमान ५० अंशा पेक्षा जास्त जाते अशा ठिकाणी संस्थापकाचा मृतदेह ४८ तास कुठल्याहि मरणोत्तर विधी शिवाय तंबूत ठेवला जातो,कारण काय ? तर त्या दैवी संस्थापकानंतर पुढचा वारस कोण होणार हे ठरलेले नसते. जे दोन गट दावेदार असतात त्यांच्यातला प्रबळ गट दुसऱ्या गटाच्या सर्व पुरुषांना शब्दशः कापून काढतो,तेव्हाच या वादाचा निकाल लागतो. आणि त्यानंतरच मरणोत्तर विधी पार पडतो. जिंकलेला गट पराजित गटाच्या बायका मुलांना मारण्यासाठी मारेकरी पाठवतो,त्यांना ७ व्या शतकात सिंध चा राजा दाहीद (हो हो हिंदू !) आश्रय देतो.संपूर्ण जगातले दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक स्थळ भारताच्या केरळ या राज्यात तिथला राजा जागा देऊन बनवून घेतो.आजकालच्या बुद्धीमंतांच्या मतांनुसार हि असहिष्णुताच म्हणावी लागेल. ज्या धर्मग्रंथाचा दाखला अनुयायी उठता बसता देत असतात तो धर्मग्रंथ संस्थापकाने लिहिलेलाच नाही. संस्थापकाच्या मृत्युनंतर जवळचा अनुयायी,ज्याला सर्व वचने मुखोद्गत होती, ती त्याने त्याला जशी आठवत होती त्या क्रमाने लिहून काढली.या धर्मग्रंथात दैवी आवाजाचे संस्थापकाच्या मुखातून आलेले उल्लेख कोणत्याही क्रमाशिवाय आलेले आहेत. या धर्माच्या अत्यंत जाणकार म्हणविणाऱ्याना सुद्धा त्याच्या सुयोग्य क्रम सांगता येत नाही. तीच गोष्ट रोजच्या जगण्यातील कानून सांगणाऱ्या दुसऱ्या एका कायद्याची.संस्थापकाच्या मृत्युनंतर सुमारे २०० वर्षे त्यात भर पडत होती. संस्थापकाने तो सांगितलेला नाही. ती भर सुरुवातीला या धर्माच्या नावाखाली ज्यांना स्वताची मनमानी करायची होती अशा म्हणायला अनुयायी पण आतून विरोधक असणाऱ्या कट्टर अनुयायांनीच घातली. त्यालाच दैवी आवाज,संस्थापकाच्या मुखातून आलेले एकमेव सत्य वचन असे रूप दिले. आजच्या आधुनिक काळातील या धर्मासंबंधित जगातील जवळपास सर्व प्रश्न या भ्रष्ट रुपामुळेच तयार झाले आहेत. मुळ स्वरूपातील धर्माची उपासना आणि जाण असणारे विवेकी असणारे, काही मुठभर लोक खाजगी जीवनात करतात. परंतु या भ्रष्ट रुपाला विरोध करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही.या अशा विवेकी लोकांना समर्थ करणे हे या देशासाठी आणि कालांतराने संपूर्ण जगासाठी एकमेव पर्याय उरणार आहे. तुमच्या सारखे अर्धवट बुद्धिमंत,आणि अनुयायी सुद्धा ज्यांना या धर्मांध दाहकतेच्या येणाऱ्या काळातील आव्हानांची जाण नाही ते या धर्माच्या आजच्या भ्रष्ट रूपाचे जीव तोडून समर्थन करतात. हि प्रवृत्ती त्या नदीकिनारी असणाऱ्या मगर आणि माकडा च्या कथे सारखी आहे, त्या माकडाला वाटते मी मगरीला मदत केली,ती मला खाणार नाही. वास्तवात तसे काही घडत नाही. मगर मला खाणार नाही हा मूर्खपणा आजच्या सेकुलर/धर्मनिरपेक्ष बुद्धीमंतात ठासून भरलेला आहे. ती मगर तुम्हाला खाणारच फक्त शेवटी खाईल इतकेच. तेव्हा मदत करायला सुद्धा कोणी नसेल याची खात्री बाळगा. आपल्या शेजारच्या देशाला (जो मुळचा भारतच होता) या अशाच विचारसरणी चा कर्क रोग झाला आहे. तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष बुद्धीमंत त्या धर्माच्या भ्रष्ट रूपाचे समर्थन करून तोच कर्करोग या देशात आणण्याचा प्रयत्न करत आहात.

In reply to by lakhu risbud

रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची खरंतर काहीच गरज नव्हती. तुमच्या प्रतिसादातल्या इस्लामबाबतच्या तीनही परिच्छेदांबद्दल काहीच आक्षेप नाही. मला कधी ह्याविषयी खंडन करतांना पाहिले आहे काय? किमान शरियाचे समर्थन करतांना पाहिले आहे काय? अर्धवट ज्ञानावर इथे बसून अक्कल पाजळण्यात कोणता कंड शमतो हे तुमचे तुम्हालाच माहित. >> माझ्याबद्दल अशी वक्तव्ये करुन तुमचा कोणता कंड शमायला मदत झाली तेही तुमचे तुम्हाला माहित. मुळ स्वरूपातील धर्माची उपासना आणि जाण असणारे विवेकी असणारे, काही मुठभर लोक खाजगी जीवनात करतात. परंतु या भ्रष्ट रुपाला विरोध करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही.या अशा विवेकी लोकांना समर्थ करणे हे या देशासाठी आणि कालांतराने संपूर्ण जगासाठी एकमेव पर्याय उरणार आहे. >> ह्या पर्यायाचा उल्लेख मी इथं मिपावर जेवढं वाचलंय तेवढ्यावरुन तरी तुमच्याशिवाय कोणीही केलेला आजवर आढळला नाही. जेवढं मुस्लिमांबद्दलचे प्रतिसाद वाचले ते सर्व घृणा, द्वेष ह्यांनीच ओतप्रोत भरलेले आढळले. केवळ घृणा, आरोप आणि आरोपांच्या पुष्ट्यर्थ दिले जाणारे मुस्लिम दहशतवादाचे पुरावे ह्यापलिकडे कोणीही हा विचार इथे मांडलेला दिसला नाही. 'ते असेच आहेत आणि कधीही सुधारणे शक्य नाही' हीच अंडरकरंट भूमिका यच्चयावत प्रतिसादकांची आजवर बघितली आहे. मुस्लिमांच्या समस्यांबद्दल करवादण्याशिवाय कोणीही काही करत नाही. आपल्या घृणेला समर्थन देणार्‍या जहाल मतांची पिंक बघितली. माझ्यामते काहीतरी सकारात्मक विचार मांडनारे तुम्ही पहिलेच. अभिनंदन! (बाकी कोणी असतील तर क्षमस्व. पण अशा विचारांचा कोणताही प्रभाव इथल्या प्रतिसादांवर दिसला नाही.) तुमच्या सारखे अर्धवट बुद्धिमंत,आणि अनुयायी सुद्धा ज्यांना या धर्मांध दाहकतेच्या येणाऱ्या काळातील आव्हानांची जाण नाही ते या धर्माच्या आजच्या भ्रष्ट रूपाचे जीव तोडून समर्थन करतात. >> तुमच्यासारखे अर्धवट बुद्धिमंत हा तर थेट व्यक्तिगत अपमान आहे, कदाचित तुमची सहिष्णुतेची पातळी फारच खाली असावी. कोण किती बुद्धीमंत आहे आणि नाही ह्याचे प्रमाणपत्र वाटायचा अधिकार तुम्ही कुठून मिळवला ते जाणून घेण्याची उत्सुकता आहेच पण त्याआधी तुमच्या पुढच्या वाक्याकडे बघूया. तुम्ही म्हणताय की तुमच्यासारखे या धर्माच्या आजच्या भ्रष्ट रुपाअचे जीव तोडून समर्थन करतात. हाउ डू यू से दॅट? माझा एक प्रतिसाद इथे मिसळपाववर दाखवा ज्यात मी भ्रष्ट स्वरुपाचे तर सोडा, इस्लामचे चिमूटभर तरी समर्थन केले आहे. उत्खननाला जाण्याआधी पुढचं वाचून घ्या, कारण ज्या बेफिकिर वृत्तीने तुम्ही हे वाक्य फेकले आहे त्यातुन आपली चष्मेबहादूर वृत्ती दिसली. इथे काही सदस्यांच्या प्रतिक्रियांना विरोधी मत प्रदर्शित केले तर थेट 'इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन' ह्या अगदी टोकाच्या बाजूला कसे पोचलात? मला नानानेफळे, ग्रेटथिंकर, मोगाखान ह्यांच्या लाईनीत बसवल्याबद्दल तुमचा निषेध करावा तेवढा कमीच. बरे हिंदूंच्या वाईट चालिरीती, प्रथा, मान्यतांबद्दल टिका केली तर ते 'इस्लामच्या भ्रष्ट स्वरुपाचे जीव तोडून समर्थन' असा अर्थ असेल तर धन्य आहे. अशा प्रथा, मान्यतांना विरोध करनार्‍या ऐतिहासिक पुज्य हिंदुंबद्दल आपण हेच बोलणार का? माझी सुरुवातीपासून एकच भूमिका आहे ती अशी की आज जो काही हिंसाचार मुस्लिम धर्माच्या, कुराणाच्या नावावर करतात तो फक्त आधार घेऊन. त्यांची मूळ मानसिकताच तशी आहे किंवा काहीतरी कुठेतरी बिनसलेले आहे. हे वर तुम्हीच प्रतिसादात दिलंय की संस्थापकाच्या मृत्यूनंतर काय काय झाले व जे काही भयंकर झाले तेव्हा तर कुरान लिहिलेले नव्हते, हे तुम्हीच लिहिलंय. मग माझ्या विधानात काही चुकते आहे काय? मीही तेच म्हणतोय पण इथले काही सदस्य म्हणतात मुस्लिम हिंसाचार करतात कारण त्यांना कुराणातून प्रेरणा मिळते. मला वाटतं तुम्ही त्या सदस्यांना इस्लामचा व मुस्लिमांचा इतिहास सुरुवातीपासून शिकण्यास सांगायला हवं. इथल्या सदस्यांच्या काही गैरसमजूतींना उत्तर देणे, त्या ज्या बाबतीत आहेत त्याबद्दल सत्य सांगणे हे इस्लामच्या भ्रष्ट स्वरुपाचे जीव तोडून समर्थन आहे की काही हिंदूंच्या घृणा करण्याच्या कारणांचे उच्चाटन करणे आहे? दुसर्‍या एका धाग्यावर काही गैरसमजुतींना उत्तरादाखल काही पुरावेही दिलेत. इथल्या सदस्यांना त्यापेक्षा जास्त काही समजत असेल, त्यांच्याकडे ती आकडेवारी, पुरावे, विधानं खोडणारी काहीही सामग्री असेल तर प्रतिवाद करावा. नुसती बसल्याजागी टिवटिव करुन स्वतःच्या मनातला नपुंसक द्वेष वाढवुन आजूबाजुच्या वातावरनाला गढुळ करण्याला हातभार लावण्यावाचून ह्या समजूतींचा काय उपयोग? इथले सदस्य म्हणतात की ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा? दुसरे म्हणतात बसट्रेनविमानात भीती वाटते. अशा पद्धतीने विचार करुन आपण 'मुळ स्वरूपातील धर्माची उपासना आणि जाण ठेवणार्‍या विवेकी मुस्लिमांना' कशी मदत करणार? तुमची नजर गढुळ असेल तर ते 'विवेकी' तुम्हाला कधीच रिस्पॉन्स देणार नाहीत हे परमसत्य आहे. ते शेवटी धर्मालाच सामिल होणार आणि तसेच वागणार. मुलामुलींना रितसर शिकवणारे, चार बायका नसणारे, ढिगभर पोरं नसणारे, मुल्लांचे फतवे न मानणारे, इसिससारख्यांना विरोध करणारे जे मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दल इथे चांगले लिहिणे म्हणजे 'इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन' आहे हे तुमच्याकडूनच समजले. अहो पण हीच तर ती विवेकी लोकं आहेत ना ज्यांना समर्थन द्यावे असे तुम्ही सुचवताय. तुमचेच तर काम मी करत आहे इथे. हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दलची दिवसेंदिवस वाढत चाललेली घृणा दहशतवादावर उत्तर नाही. पण ती गल्ली-मोहल्ल्यात पेटू शकणार्‍या दंगलीसाठीचे पेट्रोल आहे. अशा दंगली ज्या स्थळ काळ उद्देश जात धर्म बघत नाहीत. दहशतवादापेक्षा माझ्यासाठी ह्या दंगलींचा, धार्मिक उन्मादाच्या स्थितीचा मोठा प्रश्न आहे. कारण १०० दहशतवादी हल्ले प्लान केले जातात त्यापैकी ९९ आधीच रोखले जातात. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणांचे मोठ्या स्तरावर ह्यावर काम चालू असते. हे हल्लेही मुख्य ठिकाणावर केले जातात जसे मेट्रो शहरे, स्ट्रॅटेजीक लोकेशन्स. पण दंगल भडकली तर अगदी पन्नास हजार लोकवस्तीच्या गावातही कित्येक दशकं भरुन येणार नाही असे नुकसान करुन जाते. लोक रोज सिरीया, इजिप्त, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथे होणार्‍या हिंसाचाराबद्दल चर्चा करुन मुस्लिमांबद्दल सरसकट प्रतिमा बनवतात. पण तुम्हाला रोज ज्यांच्या सोबत जगावे लागते त्या आजुबाजुच्या भारतीय मुस्लिमांबद्दलही तुम्ही तोच विचार करुन शांततेने रात्री झोपू शकाल काय? तुमच्या गल्लीमोहोल्ल्यात दंगल भडकली तर तुम्ही काय करु शकाल? काहीच नाही. त्यापेक्षा दंगल न भडकण्यासाठी, धार्मिक सलोखा आणि सहजीवनासाठी चांगले प्रयत्न तर नक्कीच करु शकता. भारतात अशी अनेक गावं शहरं आहेत जिथे हिंदु मुस्लिम दंगल कधीच झाली नसेल, कधीच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले नसतील. अशा शहरांमधे धार्मिक ताणतणाव होतातही, नाही असे नाही. पण आपसी सलोख्याने परिस्थिती नियंत्रनात आनली जाते. विशेषतः राजकिय हेतुने जे तणाव प्रेरित नसतात ते असेच आटोक्यात आणले जातात. अशा शहरांची शांतता बिघडवण्याचे अचूक काम गैरसमजुतींनी तयार होणारी घृणा करते. आपण त्याला हातभार लावतोय का याचा विचार इथल्या सदस्यांनी जरूर करावा. तुम्ही तारिक फतेह काय म्हणतो त्याबद्दल शंभरवेळा सांगणार. त्यात काही विशेष नाही. तुम्हाला आवडेल अशी भाषा बोलणार्‍यांचाच संदर्भ तुम्ही द्याल. माझ्यामते गुरुजींनी वर सांगितलेले पुरोगामी असण्याचे सर्व फायदे फतेहसाहेबांना हवे आहेत. केनेडात बसून ते भारतीय मुस्लिमांबद्दल काय बोलतात ह्यापेक्षा इथे भारतात माझ्या आजूबाजूला काय घडतंय, काय जळतंय, स्थानिक पातळीवर, देशभरात काय काय चाललंय, इथल्या हिंदू, मुस्लिमांशी बोलून, त्यांचे विचार ऐकून, वर्तन बघुन आपले मत ठरवणे जास्त इष्ट आहे. अर्थात हे आपले माझे मत. आपण कोणावर लादत नाही. अधिक माहितीसाठी वाचा: https://www.quora.com/How-do-Pakistanis-view-Tarek-Fatah-who-considers-… भारतात सतत उद्धार केल्या जाणार्‍या फुरोगाम्यांची आठवण येईल. बाकी तुम्हाला हिंदू किंवा मुस्लिमांबद्दलची माझी भूमिका माझ्या आजवरच्या प्रतिसादांमधून कळली नाही ह्याचे श्रेय तुमच्या चष्मेबहादूर वृत्तीला द्यावे की कसे हा प्रश्न राहिला शेवटी. (वरच्या काही वाक्यांमधे इथल्या सदस्यांबद्दल, प्रतिसादांबद्दल लिहिले आहे ते सरसकटीकरण सम्जून मला झोडपण्याची उत्तम संधी दवडू नये असे कोणाला वाटत असेल तर देव त्यांना चांगली बुद्धी देवो! समझदार को इशारा काफी ;-) )

In reply to by तर्राट जोकर

हा आणि असे ४-५ स्पष्टीकरणात्मक प्रतिसाद एका पानावर डकवून त्याचा दुवा आपल्या स्वाक्षरीत (लेखकाची भूमिका) ठेवत चला. बरेच निरर्थक वाद आणि मेगाबायटी प्रतिसाद टळतील.

In reply to by तर्राट जोकर

हिंदूंच्या वाईट चालिरीती, प्रथा, मान्यतांबद्दल टिका केली तर ते 'इस्लामच्या भ्रष्ट स्वरुपाचे जीव तोडून समर्थन अहो हिंदू धर्माची चिकित्सा करा ना,चालीरीतीबद्दल प्रश्न सुद्धा विचारा. असे चिकित्सक विचार करणाऱ्यांना हिंदू समाजाने सुरवातीच्या विरोधानंतर त्या चिकित्सेची योग्यता ध्यानात आल्यावर शिरोधार्य सुद्धा मानले आहे. इस्लाम धर्मात अशी किती उदाहरणे आहेत ? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हिंदू धर्माची,बहुसंख्य असणाऱ्या समाजाच्या अंतर्गत विरोधाभासांची चिकित्सा करण्याचे महत कार्य तुम्हाला इस्लाम धर्म,भारत या देशाच्या संबंधित कोणत्याही धाग्यावर करण्याचे का सुचते? त्यासाठी वेगळा धागा सुरु न करता प्रतिसाद देनारयांचेच कसे चुकते हा युक्तिवाद का करत असता ? धार्मिक कट्टरता मुस्लिम धर्मात जशी लहानपणा पासून बिंबवली जाते त्याच प्रकारे हिंदू धर्मात बिम्बविली जाते का याचा विचार करा. माझ्या आई ला आणि बायको ला जो पर्यंत मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मी सुद्धा मशिदीत जाणार नाही अशी तारेक फ़तह यांची भूमिका आहे, स्त्रियांसाठी समानतेचा आग्रह धरणारी अशी किती उदाहरणे मुस्लिम धर्मात तुच्या डोळ्यासमोर आहेत ? हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दलची दिवसेंदिवस वाढत चाललेली घृणा दहशतवादावर उत्तर नाही. पण ती गल्ली-मोहल्ल्यात पेटू शकणार्‍या दंगलीसाठीचे पेट्रोल आहे. तुम्ही इथे मिपावरचे बहुसंख्य प्रतिसाद देणारे मुस्लिमांच्या बद्दल "ते तसलेच आहेत"या भूमिकेतून प्रतिसाद देतात अशी मांडणी करता.पण सामान्य माणूस ज्याचा या धर्माच्या लोकांशी रोजच्या जगण्यात कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंध येतो अशा लोकांना या धर्माबद्दल असा विचार का करावासा वाटला याच्या कार्यकारण भावाचा शोध न घेता तुम्ही ते विरोध करतात म्हणून त्यांच्या विरोधात ओरडत सुटलेले आहात. तुम्ही तारिक फतेह काय म्हणतो त्याबद्दल शंभरवेळा सांगणार. त्यात काही विशेष नाही. तुम्हाला आवडेल अशी भाषा बोलणार्‍यांचाच संदर्भ तुम्ही द्याल कमाल आहे बुवा, एक अभ्यासू इस्लामी विचारवंत ,ज्यांचा आजच्या भारताशी,देशाच्या तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीशी काहीच संबंध नाही किंबहुना ते असली विचारसरणी नाकारतातच.असे असून सुद्धा राष्ट्रवादाची भाषा मांडणारे विचारवंत आणि तारेक फ़तह इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी यांच्या बाबत एकमत कसे ? हे खरच कळत नाही. आता त्यांचे आणि इथल्या राष्ट्रवादी विचारवंतांचे एका मुद्द्यावर एकमत आहे म्हंटल्यावर तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष विचारवंत त्यांना खोटे म्हणणर हे ओघाने आलेच. या बाबतीत ज्यांनी आपल्याच धर्माच्या ३० लाख लोकांना फक्त भाषा उर्दू न स्वीकारल्यामुळे मारले असा पाकिस्तानी दृष्टीकोन तुम्हाला महत्वाचा वाटतो यावरूनच तुमच्या वैचारिक पातळीची उंची कळून येते.स्वतःचा मुद्दा खरा ठरवण्यासाठी प्रसंगी पाकिस्तानी जे कि अत्यंत दुटप्पी,ढोंगी,भारतद्वेषी,हिंदुद्वेषी लोक आहेत अशा माध्यमां मधील बातमीचा विदा तुम्हाला द्यावासा वाटतो,तुमच्या बुद्धीची कीव येते! खरंच! तारेक फ़तह यांनीच सांगितलेला किस्सा, हिमाचल प्रदेशात एक थंड हवेचे ठिकाण आहे १२०० च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या त्या गावात मुस्लिम समाजाची संख्या ६० च्या आसपास आहे. तिथल्या माशिदिवरचा भोंग्या वरून पहाटे ४.३० वाजता मोठ्ठ्या आवाजात अजान दिली जाते.फ़तह त्या ठिकाणी मुक्कामी असताना त्यांनी हि अजान ऐकली,एवढ्या सकाळी अशा शांत ठिकाणी मोठ्या आवाजातील ती अजान सगळ्यांच्या झोपमोडीचे कारण ठरली तर नवल नाही.ते त्या मशिदीत गेले तेव्हा तिथे त्यांना नमाजासाठी आलेले फक्त ४ लोक दिसले, त्यांनी तिथल्या इमाम ला समजावले कि या एवढ्या मोठ्या आवाजाच्या भोन्ग्याची गरज नाहीये, इमाम सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून पहाटे तो भोंगा न वापरण्याबद्दल तयार झाले. २ दिवस असे गेल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना पूर्वीच्याच मोठ्या आवाजातील अजान ऐकू आली.फ़तह त्या मशिदीत गेल्यावर तेथील इमाम म्हणाले कि तुमचे म्हणणे आम्हाला पटते पण समाजातील जी तरुण मुले आहेत ती ऐकण्यास तयार नाहीत,त्यांच्या आग्रह मी मोडू शकत नाही त्यामुळे अजूनसुद्धा माशिदिवरचा भोंग्या वरूनच पहाटे ४.३० वाजता मोठ्ठ्या आवाजात अजान दिली जाते. आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत. असहिष्णुता वाढली अशी जी ओरड होत आहे त्याला बर्याच अंशी इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी कारणीभूत आहे. जी गेल्या १०-१५ वर्षापासून आहे, सरकारचा या गोष्टींशी संबंध नाही.

In reply to by lakhu risbud

चारच लोक येतात म्हणुन भोंगा वाजवु नये , हा कुठला कायदा म्हणे ? कोपर्‍या कोपर्‍यात लाल शेंदरी दगड असतात , ते पुजायला चार लोकही नसतील तर चार लोकही नसतात , हे कारण दाखवुन ते हटवणे चालू शकेल का ?

In reply to by lgodbole

त्या कोपऱ्यावरचे दगड सकाळी उठून कोणाची झोपमोड करायला जात नाहीत! आणि काही लोकांच्या त्या दगडावरच आशा असतात!

In reply to by lgodbole

चारच लोक येतात म्हणुन भोंगा वाजवु नये , हा कुठला कायदा म्हणे ? कोपर्‍या कोपर्‍यात लाल शेंदरी दगड असतात , ते पुजायला चार लोकही नसतील तर चार लोकही नसतात , हे कारण दाखवुन ते हटवणे चालू शकेल का ?
क्षमा असावी गोडबोले साहेब, आपली तुलना प्रथमदर्शनी तार्कीक उणीवेची आणि भूमिका किमान उपरोक्त प्रतिसादा पुरती लांगुलचालनाची दिसते. भोंगा वाजला त्या आवाज निर्मात्याची पार्श्वभूमी बाजूला ठेवा, १) मानवी कानाच्या, मेंदूच्या, आणि आवश्यक दैनंदीन जिवनाच्या सुसह्यतेत कोणतेही ध्वनी प्रदुषण येणे रास्त होत नाही मग तो भोंगा फॅक्टरीचा, असो अथवा धर्म स्थानाचा, किंवा एखाद्या मिरवणूकीने केलेले ध्वनी प्रदुषण समर्थनीय होत नाही. २) जो पर्यंत कायद्याची चौकट सांभाळली जाते तो पर्यंत तुमच्या चार भिंतीतून तुम्ही काय करत आहात याच्याशी इतरे जनांना देणे घेणे असण्याचे कारण नाही, इतरे जनांना त्रास न पोहोचवणारा चार भिंतीतील व्यवहार आणि आपल्याला दिलेल्या चार भिंतींच्या पलिकडे असलेल्या जनसमुदायावर नकारात्मक परिणाम करणारे कार्य यात फरक आहे.एक समांतर तुलना करु खत निर्मिती करणारा कारखाना दुसर्‍यांना इजा पोहोचवत नाही खताची निर्मिती चार भितींच्या आत करतो तो पर्यंत समस्या नाही. पण भोपाळ वायु दुर्घटनेत झाले तसे चार भिंतीच्या आतून विषारी वायू सोडेल आणि आजू बाजूच्या समुदायाला विषामध्ये गुरफटेल तर त्याचे समर्थन होत नाही. असो.

In reply to by lakhu risbud

खरंतर माझ्या प्रतिसादात माझी भूमिका स्पष्ट केल्यावर थांबावे असे ठरवले होते. पण तुमची तशी इच्छा दिसत नाही.असो.
अहो हिंदू धर्माची चिकित्सा करा ना,चालीरीतीबद्दल प्रश्न सुद्धा विचारा. असे चिकित्सक विचार करणाऱ्यांना हिंदू समाजाने सुरवातीच्या विरोधानंतर त्या चिकित्सेची योग्यता ध्यानात आल्यावर शिरोधार्य सुद्धा मानले आहे. इस्लाम धर्मात अशी किती उदाहरणे आहेत ?
>> हिंदूंनी चिकित्सा करणार्‍यांना शिरोधार्य मानले. ओके. पण त्यांना इस्लामचे समर्थक तर मानले नव्हते ना? जे आजकाल सर्रास होते. परत इस्लाम मधे अशी उदाहरने असण्याचा नसण्याचा हिंदूधर्माशी नक्की काय संबंध? मी सांगतो काय संबंध ते. हिंदूंना त्यातल्या त्यात कट्टर हिंदूंना टिका सहन होत नाही. त्यांना कुठलेही रिफॉर्म्स नको असतात. कारण त्यांची दुकाने बंद होतील. झाली आहेत. हिंदू संस्कृतीला वारंवार इस्लामशी तुलना करण्याचे कारण हेच आहे की तिकडे बघा धर्माविरुद्ध बोलले की कशी मुंडकी उडवतात, इकडे उडवत नाहीत म्हणून तुम्हाला बोलायला मिळतं. इतकी सुविधा आहे ना मग कशाला बोलता असा तर्क मांडणे चालू असते. म्हणजे वेगळ्या भाषेत टिका नको हेच सांगणे. वास्तविक इस्लामम्धे धर्मसुधारणेवर बंदी आहे की नाही ह्याचे हिंदूंना काही घेणे-देणे नसावे. तुमचा प्रश्न बघितला तर असे काही वाटते जणू लाखो करोडो हिंदू पळत सुटले आहेत हवाहवासा वाटणारा इस्लाम कबूल करायला आणि तुम्ही सांगताय अरे इस्लाममधे अमुक नाय तमुक नाय, तिकडे जाऊ नका. काळजी करु नका, कोणी मरायला तिकडे जाणार नाही. बाकी मी इस्लामचे समर्थन केलेले नसल्याने हा प्रश्न मला विचार असेल तर माझ्या भूमिकेशी संयुक्तिक नाही असेच म्हणेन. ह्याचा अर्थ उत्तर टाळतोय असा नसून तुमच्या प्रश्नात तथ्य, वजन नाही असा आहे.
आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हिंदू धर्माची,बहुसंख्य असणाऱ्या समाजाच्या अंतर्गत विरोधाभासांची चिकित्सा करण्याचे महत कार्य तुम्हाला इस्लाम धर्म,भारत या देशाच्या संबंधित कोणत्याही धाग्यावर करण्याचे का सुचते? त्यासाठी वेगळा धागा सुरु न करता प्रतिसाद देनारयांचेच कसे चुकते हा युक्तिवाद का करत असता ?
ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी आपल्याला काही दाखले देतो. १. तुडतुडी ह्यांचा हा प्रतिसाद. सदर धाग्यात फक्त हिंदूंच्या चालिरीतींबद्दल चर्चा चालू असतांना ह्यांनी धाग्याचा विषय नसतांना मुस्लिमांवर यथेच्छ टिका करायला सुरुवात केली. तेव्हा आपण असा प्रश्न आपण विचारला नाही. जेव्हा जेव्हा हिंदूंना सुधारनांविषयी बोलल्याजाते, टिका केली जाते तेव्हा 'त्यांना आधी सांगा, तिकडे सांगायची हिंमत आहे का' म्हणून कोण मुस्लिमांचा असंबंधित विषय काढतो? हिंदूंच्या चालिरीतींच्या मागासलेपनाला मुस्लिम कारणीभूत असल्यासार्खे तर्क इथे बघितले. जणू मुस्लिम नीट झाले की हिंदू आपोआप नीट होणार आहेत. तुडतुडींच्या मतांविरुद्ध मत मी मांडले तेव्हा तो धागा हिंदूंशी संबंधित होता. २. दुसरा धागा हा http://www.misalpav.com/node/33048?page=1 ह्यात खूद्द धागालेखकांनी धर्मनिरपेक्षतेवर धागा लिहलाय. ह्यात अफझलखान-शिवाजी प्रकरणाचे धार्मिक धृवीकरणासाठी जे राजकारण केले जाते त्याविरूद्ध मी बोललो. तेव्हा धागाविषय तोच होता. ह्या धाग्यावरचे माझे सर्व प्रतिसाद वाचा आणि मी काय व कशावर बोलतोय ते ध्यानात येतं का बघा. ३. तुडतुडी यांचा इसिसवाला हा एक धागा http://www.misalpav.com/node/33103 बघा इथे मी हिंदूंबद्दल टिकास्पद कुठे आणि काय बोललोय ते. बाकी त्या धाग्यावर आलेल्या जहाल प्रतिक्रियांबद्दल तुमचा काही प्रतिसाद दिसला नाही. ४. ढोलपथकांबद्दलचा वेल्लाभट यांचा धागा http://www.misalpav.com/node/33075. इथे मी हिंदूंच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीचे खंडन करतोय की काय ते बघा. ५. मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे ह्या धाग्यावर ट्रेडमार्क यांचा हा प्रतिसाद बघा. आणि त्यानंतर सुरु झालेली सर्व चर्चा बघा. धाग्याचा विषय मुळात गोमांसावरुन झालेली हत्या आणि त्या निमित्त विचारवंतांचे पुरस्कारपरतीकरण. मूळ विषय हिंदूभावना व मुस्लिम खाद्य संस्कृती ह्याचा झगडा आहे. ह्यात मला चुकीच्या वाटनार्‍या प्रतिसादांना मी प्रतिवाद केलाय. इथे हिंदूंचा विरोध, टिका केलेली नाही. शुद्ध राजकिय स्वरुपाची चर्चा होती. ६. सगळ्यात मजेदार तर हा धागा आहे. http://www.misalpav.com/node/33256 मोहरमबद्दल माहिती. ह्यात तोच प्रश्न विचारला आहे जो इथे ह्या धाग्यावर विचारला आहे. कट्टरपणा हिंस्रपणाचे मूळ धर्मात की वृत्तीत? पण काही लोकांना सरळ प्रश्नांना सरळ उत्तर देता आले नाही वर माझीच खरडपट्टी काढायला गेले आणि धागा भरकटला. एवढेच धागे आहेत तुम्ही म्हणता तसे. बाकीचे तर सगळे राजकिय धागे आहेत. त्यात भाजपविरोधी, संघविरोधी, मोदीविरोधी, भक्तविरोधी प्रतिसाद दिलेत. तेही हिंदूविरोधी वाटत असतील तर धन्य आहे.
तुम्ही इथे मिपावरचे बहुसंख्य प्रतिसाद देणारे मुस्लिमांच्या बद्दल "ते तसलेच आहेत"या भूमिकेतून प्रतिसाद देतात अशी मांडणी करता.पण सामान्य माणूस ज्याचा या धर्माच्या लोकांशी रोजच्या जगण्यात कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंध येतो अशा लोकांना या धर्माबद्दल असा विचार का करावासा वाटला याच्या कार्यकारण भावाचा शोध न घेता तुम्ही ते विरोध करतात म्हणून त्यांच्या विरोधात ओरडत सुटलेले आहात.
मी कसलाही शोध घेत नाही, माझे ज्ञान अपुरे, बुद्धी अर्धवट इत्यादी बोलून तुम्हाला समाधान मिळतं काय? असु देत. या धर्माबद्दल असा विचार करायला त्यांना भाग पाडलं जात आहे. राजकिय हेतुसाठी धार्मिक धृवीकरण करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना गेल्या कित्येक दशकांपासून प्रयत्न करत आहेत. गेल्या दहा बारा वर्षात त्याला उधान आलंय कारण आता जगात वाढलेला इस्लामप्रेरित हिंसाचार सपोर्टला आहे. गेल्या काही वर्षात डोळ्यात भरण्यासारख्या काही मोठ्या घटना झाल्या आहेत. ज्यात मुंबैचा आझाद मैदानावरचा हिंसक मोर्चा, ओवेसीबंधूंची भाषणे, काही दंगली ह्या पण आगीत तेल ओतत्या झाल्या आहेत. गेल्या दहाबारावर्षांआधी धार्मिक तणाव नव्हतेच आणि ते आताच आलेत असेही नाही म्हणत मी. धार्मिक तानतनाव संवेदनशील भागांमधेच होते. हिंदुबहुल भागांमधे ज्यांच्या अशा दंगली तनावांशी प्रत्यक्ष कधी संबंध आला नाही तिथल्या हिंदूंमधे मुस्लिमांबद्दल एक कडवट प्रतिमा होती. पण ती आजसारखी विखारी द्वेषाने भरलेली नव्हती आजच्यासारखा इस्लामोफोबिया नव्हता. आजच्या सारखी शत्रू भावना नव्हती. ज्या सामान्य माणसाला ज्या मुस्लिमांशी व्यवहार करण्याची फारशी गरज पडत नाही त्यांच्याबद्दल घृणा मात्र पराकोटीची निर्माण झालेली आहे हे आजुबाजूला बघतोय. ह्याचा कार्यकारण भाव मी जमिनीवर राहून बघत आहे. खयाली पुलाव पकवत नाही.
कमाल आहे बुवा, एक अभ्यासू इस्लामी विचारवंत ,ज्यांचा आजच्या भारताशी,देशाच्या तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीशी काहीच संबंध नाही किंबहुना ते असली विचारसरणी नाकारतातच.असे असून सुद्धा राष्ट्रवादाची भाषा मांडणारे विचारवंत आणि तारेक फ़तह इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी यांच्या बाबत एकमत कसे ? हे खरच कळत नाही. आता त्यांचे आणि इथल्या राष्ट्रवादी विचारवंतांचे एका मुद्द्यावर एकमत आहे म्हंटल्यावर तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष विचारवंत त्यांना खोटे म्हणणर हे ओघाने आलेच.
तारेक फतह बद्दल ची माझी विधानं तुम्ही हाच परिच्छेद टाकावा म्हणून केली होती. तारेक फतह तुम्हाला अभ्यासू, विचारवंत इत्यादी वाटतो. कारण तो इस्लामची पिसं काढतो. पण तिथेच हिंदूंची पिसं काढणार्‍यांना विचारजंत, पुरोगामी व काय काय तुच्छ नावांनी पुकारल्या जाते ते सोयिस्कर विसरल्या जातं. ह्याच तारेक ने समजा हिंदूधर्माची अशीच पिसं काढली तर तुमचा काय पवित्रा असेल? तुम्ही त्याला अभ्यासू इत्यादी म्हणायला धजाल? त्याच्याबद्दल अधिक टंकत बसून मला वेळ घालवणे योग्य वाटत नाही. कालचा एक लेख पुर्ण वाचा. तारेकला काय हवंय ह्यावर अधिक विचार करावा. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय मुस्लिमांचे बॅशिंग करण्याचा आनंद फसवा आहे. या सगळ्यात फायदा फक्त तारेक फतह ह्या एकाच व्यक्तिचा होनार आहे हे जरा खोलात विचार केल्यावर लक्षात येईल.
या बाबतीत ज्यांनी आपल्याच धर्माच्या ३० लाख लोकांना फक्त भाषा उर्दू न स्वीकारल्यामुळे मारले असा पाकिस्तानी दृष्टीकोन तुम्हाला महत्वाचा वाटतो यावरूनच तुमच्या वैचारिक पातळीची उंची कळून येते.
माझ्या वैचारिक पातळीची उंची मोजण्याआधी वर उल्लेख केलेला पाकिस्तानी दृष्टीकोनाचे कुठेतरी उल्लेख करुन मी समर्थन केल्याचे तुम्ही दाखवुन द्यावे. अन्यथा प्रतिपक्षावर अतिघाईने, उतावीळपणे, मागचा पुढचा विचार न करता बेछूट आरोप करत, बिनबोभाट शिक्के मारत सुटणाराची वैचारिक पातळी वाचकांना लगेच लक्षात येईल.
स्वतःचा मुद्दा खरा ठरवण्यासाठी प्रसंगी पाकिस्तानी जे कि अत्यंत दुटप्पी,ढोंगी,भारतद्वेषी,हिंदुद्वेषी लोक आहेत अशा माध्यमां मधील बातमीचा विदा तुम्हाला द्यावासा वाटतो,तुमच्या बुद्धीची कीव येते! खरंच!
अहो पण ते पाकिस्तानी जे अत्यंत दुटप्पी, ढोंगी, भारतद्वेषी, हिंदुद्वेषी का काय ते लोक आहेत ते त्यांच्याच एका हाकलून दिलेल्या नागरिकाबद्दल काय विचार करतात ते दिलंय त्या दुव्यात. त्या पाकिस्तान्यांनी तारेकबद्दल तसा विचार करणे आणि त्यांचे भारतद्वेषी, हिंदूद्वेषी असण्याचा काय संबंध? मी फक्त त्याला पाकिस्तानी कसे बघतात तेवढे पाहायला सांगितले. आपल्याकडच्या डाव्या, पुरोगामी, लोकांबद्दल हिंदुत्त्ववादी ज्या भावना ठेवून असतात अगदी तशाच पाकिस्तानी त्यांच्या देशातल्या पुरोगाम्यांबद्दल ठेवून असतात. माझ्या बुद्धीची किव करण्याची सवड तुम्हाला मिळणार नाही जर मी काय म्हणत आहे ह्याचे नीट डिकोडिंग केले तर. अर्थात ते जमायला हवे. तुम्ही तारेकची बाजू घेताय याची मौज वाटते पण. खरंच!
तारेक फ़तह यांनीच सांगितलेला किस्सा
बघा आता. कोण कोठला तो पाकिस्तानी पण त्याने तुमच्या आवडीचा मुद्दा मांडला तर किती कौतुक दाटून आलेय शब्दांमधे? हा जो किस्से सांगतो, ज्या प्रकारे सांगतो ते ऐकून तुम्ही माना डोलावणार. पण तिकडे आयसिसविरुद्ध फतवा काढणार्‍या भारतीय मुस्लिमांकडे नाके मुरडणार. तुमच्या वृत्तीतच घृणा भरली आहे हे ह्याचे द्योतक आहे. तो पाकिस्तानी इथे भारतीय मुस्लिम आणि भारतीय हिंदूंमधे अधिकाधिक तेढ कशी निर्माण होईल याची जोरदार पेरणी करतोय आणि आपलेच देशबांधव त्याच्या ह्या परस्परद्वेष वाढवण्याच्या धंद्याला समर्थन देतात हे बघून वैषम्य वाटते.
आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत.
आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत? आहेत ना. पण त्यात धार्मिक उन्मादाची मुस्लिमांची एकमेव नाहीत. हिंदूंच्या विभत्सतेकडे भयंकर वेगाने धावू लागलेले सण उत्सव आहेत, डिजेच्या दणदणाटात साजरी होणारी शिवजयंती आहे, गनपती आहे, अजून बरंच काही आहे. पर्यावरनाचे नियम धाब्यावर टाकून होणारे उत्सव आहेत. कायमस्वरुपी बांधकामं आहेत. त्याबद्दल ओरड करनार्‍याम्चे आवाजही गप दाबले जातात. हिंदुविरोधी आहेत म्हनून मानहानी केली जाते. कसे असते ना आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.
असहिष्णुता वाढली अशी जी ओरड होत आहे त्याला बर्याच अंशी इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी कारणीभूत आहे. जी गेल्या १०-१५ वर्षापासून आहे, सरकारचा या गोष्टींशी संबंध नाही.
आता खरेच काय खरे मानावे हाच प्रश्न पडलाय. लोक म्हणतात इस्लामची दादागिरी चौदाव्या शतकापासून सुरु आहे. तुम्ही म्हणताय गेल्या १०-१५ वर्षा पासून आहे. गेल्या १०-१५ वर्षात धर्माच्या नावाखाली कसली दादागिरी केल्या गेली आहे व तेही हिंदूंवर त्याबद्दल जरा सांगाल काय? आणि दादागिरी म्हणजे नक्की काय हे आपणास ठावूक असावे. पुन्हा लक्षात घ्या. मी असे कधीच म्हटले नाही की भारतीय मुस्लिमांमधे कोणतेच प्रश्न नाहीत. पण ज्या पद्धातीने तुम्ही किंवा हिंदुत्ववादी सतत प्रोजेक्ट करत आला आहात गेल्या दोन दशकांपासून ते तसे खूप भयंकर, दैत्यस्वरुपाचे, प्रलयाकारी नाहीत. मी कोणत्याही प्रकारे शहामृगासन करत नाही. दोन धर्मियांमधे निर्माण झालेली दरी कंस्ट्रक्टीव प्रयत्नांनी लवकरात लवकर मिटवणे आवश्यक आहे. मुस्लिमांमधे रिफॉर्म्स हवेत तर तसे प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण तिथे हिंदुत्ववादी टाळाटाळ करतात. काय तर हिंदूंचा संबंध काय त्यांच्या मागासलेपणाशी? त्यांचे त्यांनी बघावे. म्हणजे इथे मिटक्या मारत फालतू गैरसमजांवर मारे टिवटिव करायची. मुस्लिम कसे धोकादायक झालेत हे वढवून सांगायचे. संतुलीत भारतीयांनाही आपल्या चर्चांनी नुसते घाबरुन सोडायचे. ह्यावर उपाय काय म्हटलं तर हात झटकायचे. ह्याशिवाय हिंदुत्ववाद्यांनी दुसरं काय केलंय? मुस्लिमांवर येताजाता टिका केल्याने नक्की काय बदल घडणार आहे कुणास ठावूक. इथं एक रहिलंच. तुमच्या आधीच्य प्रतिसादात विवेकी लोकांना समर्थन द्यावे असे तुम्ही म्हटलात. त्याबद्दल काय करावे, कसे करता येईल हे ह्या प्रतिसादात काही दिसले नाही. नेहमीसारखा विद्वेषी सूर दिसला. ते 'विवेकी लोकांना समर्थन' वैगरे बाता मुखवटा आहे काय?

In reply to by lakhu risbud

हे सुटलं नजरेतून.
माझ्या आई ला आणि बायको ला जो पर्यंत मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मी सुद्धा मशिदीत जाणार नाही अशी तारेक फ़तह यांची भूमिका आहे, स्त्रियांसाठी समानतेचा आग्रह धरणारी अशी किती उदाहरणे मुस्लिम धर्मात तुच्या डोळ्यासमोर आहेत ?
इस्लामचं तर जाऊ द्यात. इथे मंदिरांमधे स्त्रियांना प्रवेश देऊ नये म्हणून मारामारी चालली आहे. तेव्हा किती पुरुष तारेक फतेह सारखी भूमिका घेतांना दिसत आहेत? आपण नाक वर करुन विचारतोय पण आपल्याच नाकाला शेंबुड आहे हे विसरलं जात आहे. बाकी, माझा मुळ आणि महत्त्वाचा प्रश्नः मी इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन करतो हा निखालस खोटा आरोप जो तुम्ही केलाय त्याबद्दल पुरावा द्या. नाहीतर माफी मागा.

In reply to by तर्राट जोकर

शिंगणापुरच्या शनि मंदिरातील चौथर्यावर जायला बंदी आहे, आणि कार्तिकेयाच्या मंदिरात जायला बंदी आहे. इतर कुठे असल्यास दाखवुन द्यावी, असली तरी जगातील एकूण मंदिराची संख्या घेतल्यास .0001 टक्केच असेल कदाचित्! आता जगातल्या कोणत्या मशीदित महिलांना जायला परवानगी आहे? तजो साहेब मागे मी हुसैनच्या काही चित्राबद्दल आपले मत विचारले होते, ते तुमच्या आतापर्यन्तच्या प्रतिसादाला अनुकूल नव्हते म्हणुन कानाडोळा केला काय?

In reply to by भंकस बाबा

शिंगणापुरच्या शनि मंदिरातील चौथर्यावर जायला बंदी आहे, आणि कार्तिकेयाच्या मंदिरात जायला बंदी आहे. इतर कुठे असल्यास दाखवुन द्यावी, असली तरी जगातील एकूण मंदिराची संख्या घेतल्यास .0001 टक्केच असेल कदाचित्!
आलेत का पुन्हा मीनिंगलेस सांख्यिकीवर? पुन्हा मशिदीत प्रवेश नाही मंदिरात आहे हा मुद्दाही माझा नव्हताच. रिसबुडसाहेबांनी तारेक फतेह किती महान आहे हे सांगण्यासाठी दिलेला. मी त्याला फक्त प्रतिप्रश्न केलाय की ज्या मंदिरांमधे प्रवेश नाही महिलांना तिथे किती पुरुषांनी अशा भूमिका घेतल्या. तरी तुमच्या इच्छेसाठी एक यादी देतो, काही नावाजलेली हिंदू मंदिरे आहेत. आणि मंदिरांची संख्या मोजू नका, भक्तांची मोजा. तसेच जशी ही आहेत तशी लहान मंदिरांची उदाहरने हजारोंने असू शकतात. आणि जे आहे ते आहे म्हणा. काही बट्टा लागणार नाही हिंदूधर्माला. आपला धर्म चुकत नाहीच हे छातीठोकपणे सांगणारे सगळ्यात धर्मात असतात, जसं तुम्ही आता करत आहात. http://newseastwest.com/10-temples-in-india-that-still-dont-allow-entry… मुस्लिम महिलांना मशिदीत परवानगी नाही ही समस्या मी कुठेही अमान्य केली नाही. पण ज्या पद्धतीने तारेकफतेह चे कौतुक केले जाते ते बघता हिंदूंमधेही असे पुरुष आहेत का हा प्रश्न तर साहाजिकच येईल. कारण गरज तर इथेही आहे. त्यात 'प्रमाण' आणून मुद्दा डायलूट केला जाऊ शकत नाही. हुसैनच्या चित्रांबद्द्ल माझ्या मताची तुम्हाला काय गरज? तुम्हाला कसे कळले की ते माझ्या प्रतिसादांना अनुकूल प्रतिकूल आहे म्हणून? पैगंबराचे वादग्रस्त चित्र, जिजसचे वादग्रस्त चित्र हे जेवढे माझ्यासाठी मुल्यहिन आहेत तेवढीच हिंदू देवतांची वादग्रस्त चित्रे महत्त्वहिन आहेत. I don't believe in stupidity called Religion. That's all.

In reply to by तर्राट जोकर

माझ्या प्रतिसादात दाखवुन द्या, सांख्यिकी देण्याचे कारण त्यावरनच तर ठरेल ना की काय प्रमाण आहे भेदभावाचे! हुसैनच्या चित्राबाबत, तुम्ही म्हणता त्यात आक्षेपार्ह काहीच नाही मग तसं दाखवुन द्या ना. मी तुम्हाला इथे परत सांगत आहे की मी नास्तिक असुनदेखिल ही चित्रे बघुन भड़कतो मग ज्यांची या देवांवर श्रद्धा आहे त्याची काय स्थिति होत असेल? मी अजूनही त्यावर बोलायचे टाळत आहे कारण ही चित्रे आक्षेपार्ह आहेच वर बीभस्यदेखिल आहेत. तुम्ही ती बघितलि का? हनुमान व् सीतेचे तसेच रावण,हनुमान व् सीता असे? साध्या प्रश्नाचे इतके कठिन उत्तर द्यायला कोणी तुमच्याकडून शिकावे.

In reply to by भंकस बाबा

तुमचे सांख्यिकी देण्यामागेच उद्देश दिसत आहे की हिंदू धर्म चुकत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे. तसे नसेल तर मागे घेतो माझे विधान. जे आहे ते आहे. त्यात काय? सांख्यिकीवरुन भेदभाव ठरवायचा? हाउ कूल! तेही त्या ज्याची कोणतीच आकडेवारी मिळणे आतातरी शक्य नाही. इमॅजिनरी आकड्यांची सांख्यिकी ग्राह्य नसते धर्ली जात. बरं मुद्दा सांख्यिकीचा नाहीच. फक्त अशा पुरुषांचा आहे ज्यांनी तारेक फतेह सारखी भुमिका घेतली आहे. हुसैनच्या ती चित्रे मी बघितलीत. त्याबद्दल माझे मत दिले आहे. तुम्हाला कळत नाही त्याचे मी काय करु? तुम्ही नास्तिक असून तुम्हाला ही चित्रे आक्षेपार्ह वाटली यात तुमच्या नास्तिकपणाचा काय संबंध? शार्ली हेब्दोने काढलेली इतर सर्व धर्मांची आक्षेपार्ह चित्रे तुम्हाला अशीच खटकली आहेत का? हा प्रश्न विचारतोय कारण तुम्ही नास्तिक ना? आता त्यात हिंदूंचे नास्तिक, मुस्लिमांचे नास्तिक, क्रिश्चनांचे नास्तिक असा प्रकार नसतो ना म्हणून. जितके महत्त्व मी शार्ली हेब्दोने काढलेल्या पैगंबराच्या, क्रिश्चनांच्या कथित आक्षेपार्ह चित्राला देतो तेवढेच महत्त्व मी हुसैनच्या त्या तथाकथित हिंदू देवांच्या चित्राला देतो. काही कळलं काय? ह्याला नास्तिकतेची भूमिका म्हणतात.

In reply to by तर्राट जोकर

कोणत्या आकड्याची बात करत आहात तुम्ही, नाही मिळणार आकडेवारी याची चिंता तुम्ही करु नका. हिंदू कडून एकाची सुरुवात झाली तर दुसरीकडे तो आकड़ा हजारवर पोहोचला असेल. आवाजी मतदानाने प्रस्ताव पास व्हावा. चिठ्या टाकून मतदानाची गरज नाही हुसैनच्या चित्राबाबत चित्र एक , हनुमान लंका जाळत आहे व् नग्न असलेली सीता त्याच्या शेपटीवर बसलेली आहे. यात हुसेनला जे म्हणायचे आहे ते अत्यंत घाणेरडे आहे दूसरे चित्र हनुमान रावणाबरोबर युध्द करत आहे व् नग्न असलेली सीता त्याच्या मांडिवर बसलेली आहे. आपला विकृतपणा हुसैन या चित्रातुन दाखवत आहे. या चित्राचे समर्थन करणारा हुसैन व् रामन राघव यात फरक काय असू शकेल ? हुसैनला काहीतरी लैंगिक समस्या असाव्यात त्याशिवाय तो अशी चित्र काढणार नाही रच्याकने शर्ली अद्बोने छापलेले व्यंगचित्र होते कलाविष्कार नव्हे. त्यात ते व्यंग दाखवनार. हुसैन मात्र भारतीय संस्कृति चितारल्याचा आव आणत होता.

In reply to by तर्राट जोकर

दारुल उलूम नि आज काढलेला फतवा बघा. दारुल उलूम ही मुस्लिमांची प्रमुख धर्मसंस्था आहे. त्यांनी आज फतवा काढला की 'भारतमाता की जय' हे म्हणणे इस्लामविरोधी आहे त्यामुळे कोणत्याही मुसलमानाने ही घोषणा देऊ नये. तजो म्हणतात की मुसलमानांकडे या नजरेने बघू नका. पण प्रयत्न त्यांच्या बाजूनी होताहेत का? खरं तर ही एक छान संधी होती दोन्ही बाजूंची मने सांधायची ती घालवली. त्यातून पण भारतविरोधी नारे पण देऊ नयेत हे सांगायला फतवा काढत नाहीत. बस/ ट्रेन/ विमानात वाटण्याबद्दल - ही प्रतिमा मुसलमानांनीच तयार केलीये आणि ती बदलण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत ते पण विदा देऊन सांगा. एक उदाहरण देतो. तुम्ही राहता त्या भागात एक गुंड आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्याचे उद्योग, लोकांकडे पैसे मागणे, मारहाण करणे, मुलींची/ बायकांची छेड काढणे ई ई करून तो कसा तेथील लोकांना त्रास देतो हे पण तुम्ही बघताय. जर का तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर जात असताना तो समोर आला तर तुम्ही कसे वागाल? माझे म्हणणे तुम्हाला समजले नसावे. ही प्रतिमा मुसलमानांनीच बनवली आहे. का बाकी कोणाबद्दल लोकांना भीती वाटत नाही? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भारतात कितीतरी गावं असतील की जिथे धार्मिक दंगल झाली नाहीये. पण ज्यांनी धार्मिक दंगल प्रत्यक्ष अनुभवलीये त्यांची भीती अनाठायी आहे का? (तजो: तुम्हाला कशाला कोण झोडपेल? हा पण तुम्ही बाकीच्यांबद्दल करून घेतलेला समजच नाही का?)

In reply to by ट्रेड मार्क

मस्त ट्रेड मार्क! पण तजो याचा युक्तिवाद करायला येतील असे वाटत नाही!

In reply to by ट्रेड मार्क

भारतमाता की जय म्हणणे सक्तीचे नाही , असे साक्षात संघानेच जाहीर केले आहे. त्यामुळे इतर कुणी काय नोटिसा काढतात याची आता काय गरज ? मुस्लिम ' हिंदुस्तान झिंदाबाद ' अशे घोषणा देवू शकतात / देतात. ' अखंड हिंदुस्तान झिंदाबाद ! '

लोकहो, आज ही बातमी वाचली. http://hindi.irib.ir/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A… याला म्हणतात असहिष्णुता. तन्निमित्त कोणी पुरस्कार परत केलेले दिसंत नाहीत! कुण्णीही कसलाही आवाज काढला नाही. सगळे गपचिप पडलेत. काय कारण आहे बरे? आ.न., -गा.पै.

In reply to by DEADPOOL

माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला दिसला बरे डेडपूल? मूळ प्रतिसादात गा पै यांनी इथल्या सगळ्यांना प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाचे त्यांच्यामते काय उत्तर असेल ह्याबद्दल उत्सुकता होती, ह्यात माझा मुद्दा उलटल्याचे कुठे बरे आढळले? नस्ता उतावीळपणा आवरला तर तुमचाच फायदा आहे.