अंताक्षरी मागे का बरे पडली? व वरून मीच गाणे देऊ ?
वादळवारं सुटलं ग,वार्यानं तुफान उठलं ग,
भिरभिर वार्यात,पावसाच्या तोर्यात्(की असेच कायसेसे)
सजणानं होडीला पाण्यात लोटलं ग..
ग वरून गाणं टाका रे कोणी तरी..
ग साजणी
कुण्या गावाची कुण्या नावाची
कुण्या राजाची तू ग राणी..ग....
आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी
खुळुखुळु घुंगराच्या तालावर झाली दंग तालावर झाली दंग
शालु बुट्टेदार लई लई झाला तंग लई लई झाला तंग
सोसणा भार घामाघूम झालं अंग
गोर्या रंगाची न्यार्या ढंगाची चोळी भिंगाची ऎन्यावानी
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
डाळिंबाच दाण तुझ्या पिळलं ग ओठावरी पिळलं ग ओठावरी
गुलाबाच फुल तुझ्या चुरडलं गालावरी चुरडलं गालावरी
कबुतर येडं खुळ फिरतयं भिरीभिरी फिरतयं भिरीभिरी
तुझ्या नादानं झालो बेभान जीव हैराण येड्यावानी...ग..
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
कवळ्यात घेऊनिया अलगद उचलावं अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीच्या दैवरात भिजवावं दैवरात भिजवावं
पिरतीच बेणं तुझ्या काळजात रुजवावं काळजात रुजवावं
लाडेगोडीनं खुळ्या ओढीनं राहू जोडीनं राजाराणी..ग
आली ठुमकत मान मुरडत
नार लचकत हिरव्या रानी
तुफान लोकप्रिय गीत निळू फुले बैलगाडीत उभं राहून म्हणत आहेत. वर्णन संध्याचं आहे. चित्रपट सांगायची गरज नाही. पिंजरा.
गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम
न घ्या.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
गीतकार: जगदीश खेबुडकर संगीत: राम कदम
आणि गायकः वाघ्या आणि कोरस..या वाघ्या बद्दल कोणाला काही माहिती आहे का?
अवांतरः पिंजरा करता अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची नावे प्रमोट केली गेली होती पण शांतारामबापू संध्याबाईंशिवाय दुसर्या कोणालाही लिड रोल द्यायला तयार नव्हते, असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे.
न वरून-
नको नको रे पावसा,
अस्सा धिंगाणा अवेळी,
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली..
(इंदिराबाई संत)
लवलव करी पात, डोळं नाही थार्याला
एकटक पहावं कसं, लुकलूक तार्याला
चवचव गेली सारी, जोर नाही वार्याला
सुटं सूटं झालं मन, धरु कसं पार्याला
अवांतर ;) आता आम्हाला ( गुगल शोधाशोध करुन) एक मराठी गाण्याचा अड्डा सापडला आहे,आता आमच्याकडे भरपूर गाणी आणि कविता आहेत चालेल का अस्स कॉपी करुन ! :)
घ्या 'ल'
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केशवा..... माधवा......... तुझ्या नामात रे गोडवा...तुझ्या नामात रे गोडवा....||धृ.||
तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा...
वेळोवेळी, संकटातुनि...तारिसी मानवा.......||१||
केशवा.... माधवा.... तुझ्या नामात रे गोडवा......
------"व"
:)
लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
व्हावयाची भेट त्यांची व्हावयाचा संवादही
जवळ येते ती घडी अन् दूर जातो का धीर
भरुनी येती उगी डोळे कंप देही सारखा
भास होतो पावलांचा कानी येतो सादही
लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
दोन भुवया या कमानी पापण्यांची तोरणे
प्रियकराच्या स्वागतासी सिध्द झाली लोचने
जीव थांबे लोचनी त्या ना तनूची दादही
लाज वाटे आज बाई वाटतो आल्हादही
हे भलते अवघड असते...कोणी प्रचंड आवडणारे....दुर दुर जाताना...
डोळ्यातील अडवुन पाणी..... हुंदका रोखुनी कंठी.... तुम्ही केविलवाणे हसता...आणि तुम्हांस नियती हसते..... हे भलते अवघड असते....
कवी : संदिप खरे
अल्बम : आयुष्यावर बोलु काही
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी ...
चंद्र आहे ...गंध वाहे... धुंद या गाण्यातुनी..
आज तु डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा.........
तु अशी जवळी रहा......
If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
प्रतिक्रिया