✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अरविंद बरोबर दीड तास!

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 03/20/2014 - 13:24  ·  लेख
लेख
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं. या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
80166 वाचन

💬 प्रतिसाद (219)

प्रतिक्रिया

अत्यंत जाणता नेता भारतीय राजकारणातील एकमेव आशास्थान !

मारवा
गुरुवार, 03/20/2014 - 14:07 नवीन
अरविंद केजरीवाल इतका प्रामाणिक आणि तळमळीचा नेता भारताला लाभलाय हे भारताच मोठ भाग्य. त्याचा विरोधासाठी विरोध करण हे भारतीय लोकशाही च सर्वात मोठ दुर्देव! विशेषतः इतर सर्व नेत्यांचा इतका भयावह अनुभव घेतल्यानंतरही कीमान केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच पाहीजे. त्यांनी केलेल्या चुका तरी ते प्रांजलपणे मान्य करतात. सुधारण्याची कायम तयारी दाखवितात. उलट बाजुने विचारायच तर याहुन चांगला नेता आणि पक्ष सर्व चुका कंसीडर करुनही दुसरा कोण आहे ? मग या पक्षाला तरी का संधी देउ नये? का याचा ही जीझस बनवायचाय ? संजय क्षीरसागर यांच्याशी १०० % सहमत.
  • Log in or register to post comments

केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच ..

उन्मेष दिक्षीत
गुरुवार, 03/20/2014 - 14:25 नवीन
= दिली होती ना संधी दिल्ली मधे. काय केलं त्या संधीचं त्यांनी ? नुसतं लोकपाल लोकपाल ओरडत बसले आणि त्या संधीची माती केली. तो मुद्दा एकदा सत्तेत यायला ठीक होता. त्यानंतर एफेक्टीव अ‍ॅडमीनीस्ट्रेशन द्यायला नको का ? सत्तेत आले म्हणजे काहीही करु शकतात असा आणि विचार त्यामागं. हातात सत्ता असताना कोण धरणे धरतं का रस्त्यावर ? का लोक विश्वास ठेवतील परत ? आणि आव असा आणायचा की मसीहा (कि मसायाह ? ) आहे आणि इकडं तर अगदी नाटकीपणानं म्हणायचं, "मै तो बोहोत छोटा आदमी हुं, मेरी तो कोइ औकात ही नही है".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच ..

उन्मेष दिक्षीत
गुरुवार, 03/20/2014 - 14:25 नवीन
= दिली होती ना संधी दिल्ली मधे. काय केलं त्या संधीचं त्यांनी ? नुसतं लोकपाल लोकपाल ओरडत बसले आणि त्या संधीची माती केली. तो मुद्दा एकदा सत्तेत यायला ठीक होता. त्यानंतर एफेक्टीव अ‍ॅडमीनीस्ट्रेशन द्यायला नको का ? सत्तेत आले म्हणजे काहीही करु शकतात असा आणि विचार त्यामागं. हातात सत्ता असताना कोण धरणे धरतं का रस्त्यावर ? का लोक विश्वास ठेवतील परत ? आणि आव असा आणायचा की मसीहा (कि मसायाह ? ) आहे आणि इकडं तर अगदी नाटकीपणानं म्हणायचं, "मै तो बोहोत छोटा आदमी हुं, मेरी तो कोइ औकात ही नही है".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

नका इतका तळतळाट करु. केजरीवाल

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 14:27 नवीन
नका इतका तळतळाट करु. केजरीवाल बनेल आणि ड्यंबिस आहे तो तसाच राहणार. असले पन्नास व्हीडीओ बनवेल आणखी लोकांना फसवायला. लोक येडे नव्हेत आता. एकदा बनले दिल्लीत आता नाही फसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत

लिंक बद्दल धन्यवाद......

मुक्त विहारि
गुरुवार, 03/20/2014 - 14:07 नवीन
लिंक बद्दल धन्यवाद......
  • Log in or register to post comments

छान छान. अरविंद एक नंबर

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 14:25 नवीन
छान छान. अरविंद एक नंबर अभिनेता आहे याची खात्री पटली.
  • Log in or register to post comments

मग या अभिनेत्याला मोदी घाबरले

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 03/20/2014 - 14:28 नवीन
मग या अभिनेत्याला मोदी घाबरले का हो? थेट बडोदा गाठले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 14:29 नवीन
कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व नेत्याची स्वतःची स्ट्रॅटेजी असते त्याप्रमाणे वागतात. अनेक नेते अनेक ठिकाणाहून उभे राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

इमानदारी के शेर की दहाड सुनकर

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 03/20/2014 - 15:26 नवीन
इमानदारी के शेर की दहाड सुनकर बेईमानी की लोंबडीया भाग खडी होती है'अशी आपची वैचारीक स्ट्रटेजी असावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

आपच्या इमानदारीचे धिंडवडे

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:27 नवीन
आपच्या इमानदारीचे धिंडवडे काढलेत पहा ग्रेटथिन्कर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

.... जरा डोके ठिकाणावर ठेवुन लिहावे....

विनोद१८
गुरुवार, 03/20/2014 - 20:40 नवीन
लिहीण्याचे स्वातन्त्र्य आहे म्हणुन असली बिनडोक विधाने करु नयेत, मोदी गेली ४० वर्षे समाज व राजकारणात आहेत, गेली १२ वर्षे मुख्यमन्त्री आहेत, त्याना तुमच्यापेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते, सबब आपल्यापेक्षा अक्कल त्याना असल्याने ते त्यान्च्या द्रुष्टीने जे योग्य तेच करतील. बरे तुमचा हा गजकर्णी अरविन्द कसला आलाय 'शेर' ??? ५० दिवस धड दिल्ली साम्भाळु शकला नाही आणि चाललाय 'दिल्ली'वर झेन्डा लावायला, देश चालविणे म्हणजे मिडीयासमोर बकवास करण्याइतके सोपे आहे का ?? तेव्हडा मगदुर आणि कुवत अजुन तरी दिसली नाही....... विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

१००% मान्य

क्लिंटन
गुरुवार, 03/20/2014 - 22:30 नवीन
१००% मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

पण

विकास
गुरुवार, 03/20/2014 - 23:03 नवीन
त्याना तुमच्यापेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते, पण मोदींना धरणे धरता येतात का? थयथयाट करता येतो का? मग? असो, जोक अपार्ट... गेल्या १-२ दिवसांत कधीतरी चेतन भगतचे एक चांगले निरीक्षण वाचले. दिल्लीतून पळ काढल्यानंतर माध्यमांना सामोरे जाणार्‍या एकेंनी माध्यमांच्या विरोधात आक्रस्ताळेपणा चालू केला. मोदींनी म्हणे माध्यमांना विकत घेतले. सत्तेवर आल्यावर त्यांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली... या उलट १२ वर्षे माध्यमांनी मोदींना छळले, राक्षस असल्याची प्रतिमा तयार केली. पण त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा केल्याचे देखील ऐकलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

<<<जरा डोके ठिकाणावर ठेवून लिहावे

बाळकराम
Fri, 03/21/2014 - 04:04 नवीन
कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात! ;) आणि तुमचंच (गंडलेलं) लॉजिक तुम्हालाच लावायचं म्हटलं तर काँग्रेसवाले गेली १३० वर्षे राजकारणात आहेत आणि ६५+ वर्षे सत्तेत आहेत- त्यामुळे त्यांना तुमच्या पेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते- सबब आपल्यापेक्षा अक्कल जास्त असल्यामुळे त्यांना जे पाहिजे ते करतील, तुम्ही कोण त्यांना शिकविणार? देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

+१

विटेकर
Fri, 03/21/2014 - 09:53 नवीन
देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>> सहमत . ते लै मंजे लै च सोप हाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

देश चालवणे म्हणजे "दक्ष

मंदार दिलीप जोशी
Fri, 03/21/2014 - 10:01 नवीन
देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>> केजरीवाल ने तेव्ढे सुद्धा करुन दाखवले नाही :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

कारण तुम्हाला सगळ्यात पहिली

आनन्दा
गुरुवार, 03/27/2014 - 10:14 नवीन
कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात!
बहुधा तुमचे इतिहासाचे ज्ञान कच्चे दिसतेय.. जरा शिकवणी लावा चांगली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

+१

बॅटमॅन
गुरुवार, 03/20/2014 - 14:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

गोविंदा हा अभिनेता सुद्धा

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 14:31 नवीन
गोविंदा हा अभिनेता सुद्धा निवडून येतो ते आठवले :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

!!!

सव्यसाची
गुरुवार, 03/20/2014 - 17:41 नवीन
Shooting facts that suits theory instead of shooting theories that suits facts.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

वा वा..!!

हाडक्या
गुरुवार, 03/20/2014 - 22:48 नवीन
वा वा..!! Sherlock Holmes: [to Watson] Never theorize before you have data. Invariably, you end up twisting facts to suit theories, instead of theories to suit facts.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची

धन्यवाद

सव्यसाची
Fri, 03/21/2014 - 08:01 नवीन
मी पहिल्यांदाच याचे ओरिजिनल व्हर्जन ऐकतो आहे. पण सारांश तोच आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

शेरलॉक

हाडक्या
Fri, 03/21/2014 - 19:55 नवीन
शेरलॉक पहाच मग तुम्ही.. सहा वर्षात नऊ भाग केलेत फक्त. पण जवळपास सगळेच उत्तम आहेत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची

थांकू

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 03/20/2014 - 14:26 नवीन
थांकू
  • Log in or register to post comments

हा केजरीवालांचा अरविंदा ना!

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/20/2014 - 14:32 नवीन
हा केजरीवालांचा अरविंदा ना! अस्सच करतो लहानपणापासून!
  • Log in or register to post comments

नायक २

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/20/2014 - 14:40 नवीन
ह्या निमित्ताअने आठवले युट्युब वर "नायक २" चा व्हिडीयो नक्की पहा =)))) अरे तुम आयायती से हो , कोई युथ ओरीयंटेटेड घिसिपिटी बूक क्यों नही लिखते =))
  • Log in or register to post comments

Feuds and barbs spoil AAP party

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 14:41 नवीन
Feuds and barbs spoil AAP party EW DELHI: The party with a difference has been besieged with problems faced by traditional ones. With the Aam Aadmi Party's eighth list on Wednesday taking the number of candidates named so far to 287, allegations of bribery, favoritism and in-fighting refuse to die down. The latest being Kerala-based social activist Aswathy Nair who withdrew her candidature accusing the party of feudalism and corruption. The allegations, though denied by the state unit, have found echoes in Uttar Pradesh, Delhi, Punjab and Bihar. Just a day earlier, candidate from north-west Delhi Mahender Singh had alleged that former Delhi minister and party colleague Rakhi Birla had demanded Rs 7 lakh to campaign for him. In the last few weeks, allegations have swirled around Khaled Parvez , the party's Moradabad candidate. Parvez was found to be a bank defaulter just as Singh was found to have served a jail term on a fake currency case only after his candidature was announced. While dismissing Singh's allegations, AAP leader Manish Sisodia said, "Singh raised these issues only after his candidature was cancelled. He should have spoken earlier if Birla had made such demands. But looking at the past few cases I do feel that we have lacked in public scrutiny. Our internal scrutiny based on the candidate's papers and testimonies is fair but due to lack of time, we have not been able to make names public before finalizing them like we did in the Delhi elections.'' Sisodia said the party would cancel ticket of any candidate if a case of corruption or lack of probity was found even on the last day. There have been unsubstantiated allegations that a senior political affairs committee member has sold the Lok Sabha seats of Sitapur, Jaunpur, Machhalishahar, Mohanlalganj and Mishrikh, which have been rubbished by the party for lack of evidence. But this is not all. There are others like Savita Bhatti who bowed out of the race in Chandigarh citing lack of cooperation from party volunteers. Earlier, national executive member Ashok Agrawal resigned from the party alleging that it was run by elites while prominent singer Jaspinder Narula too turned her back on the party.
  • Log in or register to post comments

हे असं बोलू नये..

चिगो
गुरुवार, 03/20/2014 - 15:26 नवीन
हे असं बोलू- लिहू नये, मंदारराव.. आप आरोप करते, ते पुराव्याविनाही खरे, कळकळीचे आणि जनतेच्या हिताचेच असतात. आपवर आणि निर्मोही, निर-अहंकारी केजरवाल ह्यांच्याविरोधात बोललेला प्रत्येक शब्द अथवा आरोप हा खोटा, बीनबुडाचा आणि पाॅलिटीकली मोटीव्हेटेडच असतो.. तुमचा निषेध !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

(No subject)

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:27 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

सरकॅझम ?

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/20/2014 - 15:30 नवीन
वरील कमेंट सरक्यॅस्टीक आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अर्थातच गोडबोले

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:30 नवीन
अर्थातच गोडबोले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

संधी अशी दिली की ज्यात काहीच दम नाही काही अधिकारच नाही

मारवा
गुरुवार, 03/20/2014 - 14:52 नवीन
त्या दिल्ली त राज्य करण्याची संधी दिली जीथे राज्य सरकार ला अगदीच कमी अधिकार काहीही कायदा करायचा म्हटल तर केंद्राची परवानगी लागते. अशा अर्धवट अधिकार देउन काय अपेक्षा करता? पुर्ण सत्ता मिळायला हवी होती. तरीही इतक्या मर्यादीत अधिकारातही आणि इतक्या बंधनातही विज कंपन्याचे ऑडीट चा निर्णय घेतला ( आजपर्यंत कोणाची हींमत झाली नव्हती हे एकच उदाहरण पुरेसे आहे) आणि मुकेश अंबानी विरोधात तर भले भले शेपुट आत घालतात त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत तर दाखविली.
  • Log in or register to post comments

ज्यांच्या विरोधात बोलायचे

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:02 नवीन
ज्यांच्या विरोधात बोलायचे नंतर त्यांचीच मदत घ्यायची असा आपचा जुना शिरस्ता आहे. कोंग्रेसविरुद्ध आंदोलन करुन आणि त्यांची मदत घेणार नाही असे सांगून यु टर्न (या संज्ञेवर आपने प्रताधिकार घ्यावा) घेऊन त्यांचाच पाठींबा घेतला. समजा अरविंद पंतप्रधान झालाच, तर "तो क्या है, फाईन मारा उनको और अब वो स्वच्छ हैं, अंबानी हुए तो क्या हुआ, उनको भी एक मौका और मिलना चाहीये ना" असं म्हणून पलटी मारेल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अरविंदकडे नैतिकता आहे

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 03/20/2014 - 15:07 नवीन
अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

नेफळेचाचा, अरविंदच्या

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:11 नवीन
नेफळेचाचा, अरविंदच्या नसलेल्या नैतिकतेचे सगळीकडे वाभाडे निघत आहेत. हे पहा. याप्रश्नांची उत्तरे आहेत का त्याच्याकडे? आपच्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र सिंह कोली यांच्या विरोधात पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. --------- आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न (१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्‍या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का? (२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत? (३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे? (४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे? (५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार? (६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा? (७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे? (८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत? (९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्‍या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले? (१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का? (११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का? (१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण? (१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे. (१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का? (१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय? (१६) सरकारी सेवेत असताना जास्त पगार लाटल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप होता. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांनी अतिरिक्त पगार परत केला. त्यांनी बेकायदेशीररित्या जास्त पगार ढापला नव्हता तर त्यांनी तो जास्तीचा पगार परत का केला? (१७) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्‍या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

>>> अरविंदकडे नैतिकता आहे

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/20/2014 - 20:46 नवीन
>>> अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही. अरविंदकडे नैतिकता आहे म्हणूनच तो 'इंडिया टुडे'च्या विमानातून फिरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

इंडीया टुडेने आयोजित केलेल्या

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 03/20/2014 - 21:19 नवीन
इंडीया टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो त्यांच्याच व्यवस्थेने जाणार ना! उद्या महाराष्ट्र मंडळ USA ने श्रीगुरुजीना भाषण द्यायला बोलावले तर ते स्वतःच्या खर्चाने जाणार की मंडळाच्या खर्चाने.? 'विका'सपुरुष कोणत्या न्यायाने अदाणीचे हेलिकॉप्टर वापरतात ते ही सांगा..कि दिले तर घ्या असा प्रकार आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ग्रेटथुंकर नामांतर करून परत

श्रीगुरुजी
Fri, 03/21/2014 - 14:33 नवीन
ग्रेटथुंकर नामांतर करून परत आलेले दिसताहेत. डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांच्या निकालानंतर ते उद्विग्न होऊन परागंदा झाले होते. आता नामांतर करून परत आलेले दिसत आहेत. पण नाव बदलले तरी विचार कसे बदलणार? असो. एकतर इंडिया टुडे या कॉर्पोरेटचा कार्यक्रम घेऊन त्यांच्याशी जवळीक कशाला साधायची? आणि जर घेतला तर कार्यक्रमाच्या दिवशी दिल्लीत हजर न राहता जयपूरमध्ये का भटकायला गेले? आणि समजा गेले तर तिथून स्वतःची वाहनव्यवस्था (म्हणजे आम आदमी वापरतो ती रेल्वे, बस, टमटम, वडाप सारखी सार्वजनिक वाहतूक) का नाही केली? कॉर्पोरेटच्या चार्टर्ड विमानातून स्वतः जायचं, नंतर 'विमानात केजरीवाल बसला नव्हता, तर आम आदमी बसला होता' ('आज केजरीवाल मुख्यमंत्री नही बना है, आज हर आम आदमी मुख्यमंत्री बना है' च्या धर्तीवर) अशी मखलाशी करायची आणि शेवटी इतर लोकं कशी उद्योगपतींची हेलिकॉप्टर्स वापरतात म्हणून दुगाण्या झोडायच्या! बादवे, इंडिया टुडे च्या कार्यक्रमात भाषण करू का नको? आणि नंतर त्यांचे विमान वापरू का नको? या प्रश्नांवर अरविंदने लोकांकडून एसेमेस मागवून त्यांचे मत मागविल्याचे ऐकले नाही. तसे काही केले असल्यास लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

>>> अरविंदकडे नैतिकता आहे

श्रीगुरुजी
Sat, 03/22/2014 - 20:26 नवीन
>>> अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही. वाचून खूप हसायला आलं. केजरीवाल संबंधात आपणच काही दिवसांपूर्वी काय लिहिलं होतं ते विसरलेले दिसतंय. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ .उत्तर द्या ____________________________________________________________________________
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

आपचा जुना शिरस्ता आहे

बॅटमॅन
गुरुवार, 03/20/2014 - 15:11 नवीन
आपचा जुना शिरस्ता आहे
बळंच???? काँग्रेस/भाजप इ. चा जुना शिरस्ता आहे म्हटलं तर ठीक, आप तर परवापरवा स्थापन झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

आहो जुना म्हणजे त्यांच्या

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:12 नवीन
आहो जुना म्हणजे त्यांच्या सुरवातीपासूनचा. दिल्ली - उदाहरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शेपुट घालणारे

मारवा
गुरुवार, 03/20/2014 - 15:01 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ह्या फोटोने काय सिद्ध होते?

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:03 नवीन
ह्या फोटोने काय सिद्ध होते? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

लाचारी ! मोडुन पडलेला कणा !

मारवा
गुरुवार, 03/20/2014 - 15:19 नवीन
हा फोटो दाखवितो की मोदी कधीही मुकेश अंबानी चा विरोध करु शकणार नाहीत. मोडुन पडलेला कणा ! यात जणु मोदी अंबानींना म्हणत आहेत पाठीवर हात ठेवुन नुसते लढ म्हणा ( निवडणुक )
  • Log in or register to post comments

राजकारणात असं काही नसतं हो.

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:20 नवीन
राजकारणात असं काही नसतं हो. जौद्या तुम्हाला नै समजणार्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

कसलं अनुमान आहे !!

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/20/2014 - 15:26 नवीन
कसलं अनुमान काढलय ...लोल =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

नौटंकी पक्षः आप

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:19 नवीन
नुसत्या गप्पा मारून, टी व्ही समोर पत्रकार परिषदा करून आणि मेण बत्त्या मोर्चे काढून सरकार चालवता येत नसते. दैव देतं आणि कर्म नेतं हेच खरं. आपला मिळालेल्या अनपेक्षित जागा पाहून वाढलेल्या अपेक्षा आणि आता त्या लोकान्चे रोजचे नौटन्कि प्रकार पाहून लोक स्वत:च्याच थोबाडित मारून घेत असतील.
  • Log in or register to post comments

'आप'ले मरण : लोकसत्ता

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:20 नवीन
'आप'ले मरण : लोकसत्ता "आप' काय करू पाहतो, याचा अंदाज येण्यासाठी त्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुद्दय़ांकडे लक्ष वेधायला हवे. सर्वप्रथम म्हणजे सत्तेवर आल्यावर केजरीवाल विजेच्या दरात पन्नास टक्क्य़ांनी कपात करणार आणि सर्व ग्राहकांना दररोज ७०० लिटर पाणी फुकट देणार! याच्या जोडीला भाज्यांच्या दरात ताबडतोब निम्म्याने कपात करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. नवी दिल्लीत जे जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते सर्वच्या सर्व नियमित करण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे. (निदान या प्रश्नावर तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा ते करू शकतात. असो.) हे सगळं ते कसं करणार? किंबहुना, त्यांना ते करायचंही नसतं. कारण हे सर्व होणार नाही, हे त्यांनाही माहीत असतं. म्हणून मग विरोधाची भूमिका घ्यायची आणि आचरट मागण्या करायच्या किंवा वाह्यात आरोप करायचे. त्यात या निवडणुकीत केजरीवाल यांच्यासाठी आदर्श परिस्थिती होती. ते वाटेल त्याच्यावर वाटेल ते आरोप करू शकत होते आणि त्याला कोणीही प्रत्युत्तर देऊ शकत नव्हते. त्यांच्या विरोधात बाकीचे सगळे हतबल होते. कारण केजरीवाल हे सत्ताखेळातला अनाघ्रात पत्ता असल्यामुळे त्याचं काय करायचं, हेच कोणाला माहीत नव्हतं. आणि त्यात माध्यमांनी- बाकीचे सगळे कसे चोर आहेत, या भावनेला खतपाणी घालायचं ठरवलं असल्यामुळे केजरीवाल यांची ताकद आहे त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात अधिक वाटू लागली".
  • Log in or register to post comments

‘आप’चे प्रशांत भूषण अडचणीत! १५ एकर जमीन जप्त होणार

मंदार दिलीप जोशी
गुरुवार, 03/20/2014 - 15:22 नवीन
‘आप’चे प्रशांत भूषण अडचणीत! १५ एकर जमीन जप्त होणार काश्मीरप्रश्नी बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेणारे आम आदमी पक्षाचे नेते अॅड. प्रशांत भूषण पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शिक्षण संस्था चालविण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारकडून घेतलेली १५ एकर जमीन भलत्याच कामासाठी वापरल्याचा ठपका भ्रष्टाचारविरोधी पथकाने भूषण यांच्यावर ठेवला असून ही जमीन जप्त करण्याची शिफारस सरकारला केली आहे.
  • Log in or register to post comments

जस्ट सी धिस

संजय क्षीरसागर
गुरुवार, 03/20/2014 - 15:43 नवीन
माझी पोस्ट दुपारी १ वाजून २४ मिनीटांनी प्रकशित झालीये. विडिओ जवळजवळ दीड तासाचा आहे. तो शांतपणे पाहून मत बनवायला, पूर्वग्रहरहित मन असेल तर, किमान २ वाजून ५६ मिनीटं (तरी) व्हायला हवी होती! मनपूर्वग्रहदूषित असेल तर वेळेचा प्रश्नच येत नाही (त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?) घे कि-बोर्ड की दे प्रतिसाद (खरं तर `उचल कॉपी आणि कर पेस्ट', कारण सगळं मटेरीयल जुनंच आहे). इतके दीर्घ प्रतिसाद इतक्या कमी वेळात अशक्य आहेत. It only shows a biased mind. विरोधी मताबद्दल प्रश्न नाही पण त्यामागे विचार हवा. आणि प्रतिसाद देतांना हे देखिल लक्षात येत नाहीये की आपण मांडलेल्या अनेक मुद्यांचा उहापोह विडिओत ऑलरेडी झालायं आणि तो ही समाधानकारकरित्या.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा