पापाची भागीदारी
प्रिय ग्राहक मित्रहो,
यंदा कांद्याचा भाव आणि कांद्याचे भावाचे राजकारण चांगलेच गाजले. हे आपण जाणताच.
यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन प्रतिएकरी कमी आले मात्र प्रति एकरी उत्पादनखर्च एकतर दरवर्षीएवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आला.
उत्पादनखर्च वाढीची कारणे:
१) वाढलेले डिझेलचे भाव
२) सेंद्रीय /रा. खताच्या वाढलेल्या किमती
३) दुपटी-तिपटीने अचानक वाढलेले शेतमजूरीचे दर.
४) अतिपावसामुळे वाढलेला मशागतीचा खर्च.
खर्च वाढलेत पण उत्पादन मात्र कमी आलेत, त्यामुळे कांदा उत्पादकाला यावर्षी कांदा पिकवायला प्रतिकिलो रू. ४०/- पेक्षा जास्त खर्च आला.
*
मागणीपुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, मागणी आणि पुरवठा यात तफ़ावत आल्याने कांद्याचे भाव वाढून ७०-८० रू. पर्यंत प्रति किलो एवढे वाढलेत. त्यामुळे निसर्गाने शेतकर्यांशी न्याय करून त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल अशी व्यवस्था केली.
*
पण विद्वत्ताप्रचूर विद्वान अर्थशास्त्र्यांनी कांगावा केला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच केंद्रशासनाने कांदा निर्यातबंदी केली एवढेच नव्हे पाकिस्तान मधून कांद्याची आयातही केली. अनैसर्गिकरित्या कृत्रिमपणे कांद्याचे भाव पाडलेत.
*
आता प्रतिकिलो २ रू सुद्दा शेतकर्यांच्या हातात पडणार नाही, अशी शासनाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे.
*
प्रिय ग्राहक मित्रहो,
आता स्वस्तात कांदा खरेदी करतांना तुम्हाला आनंद होत असेल तर आनंद जरूर माना.
पण आपल्याच देशातल्या गरीब, देशोधडीस लागलेल्या, कोणत्याही क्षणी आत्महत्या करण्याची पाळी येऊ शकते अशा कांदा उत्पादक शेतकर्याला आपण प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडत आहोत, याचीही जाणिव असू द्या.
*
भविष्यात एखाद्या कांदा उत्पादकाने आत्महत्या केली तर त्या पापाचे सुक्ष्म/अंशता आपणही तर भागीदार नाहीत ना? याचाही शोध घ्या.
*
हे निवेदन वाचून भावनाप्रधानही होऊ नका. कारण ग्राहकासमोर शेतकर्याला आता प्रतिकिलोमागे ३८ रुपयाने लुबाडण्याशिवाय इलाजही उरलेला नाही. फ़क्त हे स्वत:च्या मनात ठेवा.
तुम्हाला हे जर जिवाभावातून कळले, हृदयात सहानुभूती निर्माण झाली, नेमक्या प्रश्नाची जाणिव झाली तर "बुडत्याला लुटण्याच्या" पातकातून तरी नक्कीच मुक्ती होईल.
गंगाधर मुटे
*******
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अनेकांना प्रश्न पडतो की शेती
होय ! चांगला विचार मांडला आहे
कांदा वाढत वाढत जेव्हा ५०
प्रति किलो ४० रुपये शेतकर्याचा उत्पादन खर्च?
सहमत आहे पण मग कांदा खायचाच
+४९,९९९
हम्म! शेतकरी दलालाशिवाय कांदा
शेतकऱ्यांनीच शेतातून घरात असा
अव्यवहार्य.
राज्याची ५० भरली त्याचीच ही फळ !!! बोला जय महाराष्ट्र :(
तथाकथित फक्त व्यापारावर
सगळं समजतय हो लोकांना. काय
अरण्यरूदन ..
आपल्या विचाराशी सहमत आहे पण
जळजळ पोहोचली.
कांदा जीवनावश्यक वस्तू या
ते सांगणार...
- @ नेत्रेश, स्वतः शेती केली आहे का?
हो. माझी १० एकर शेती तसेच
भले ..
शेती मी विकत घेतलेली आहे
कांद्याला स्टोअरेज ऑप्शन
४० रुपये क्विंटल
कच्चा दुवा
ओ भौ
भिकारी चोर
या बाबतीतला अनुभव नाही
शेतकर्याला सर्वोच्च स्थान
ही पापाची भागीदारी होउ नये
जळजळ अजिबात नाही ..
सर्व मुद्दे पटत आहेत .. परंतु
वरील प्रतिसाद तुम्हाला
कांदा ५०० रु. किलो व्हावा हे मुर्खपणाचे विधान आहे
सहकारी संघ आणि सहकारी संस्था
कांदा गावातील शेतात पिकतो
एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्र
समजा असे केलेही,तरी फक्त
अहो, फक्त ज्वारी किंवा कांदे
एकेक दोन दोन
आता काय करावं!!! एकेक दोनदोन
तीच तर
यथावकाश
सहकारी संस्था
बागायतदार सहकारी संस्था'
आपले म्हनने कळते आहे.. पण
१.मी कधीकधी कांदा खातो.
सामुदायीक शेति वा कोरपोरेट
योग्य विषय...
मी व्यवसायाने दंतवैद्य
सबसिडी हाच रामबाण उपाय आहे..