महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १
कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले......
कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं.
गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली
अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता.
कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो.
MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो. फक्कड चहा वगेरे झाला , आमचं अजिंठ्याला जायचं planning होतं, मग "मामा" म्हणाले कि आधी लांबची ठिकाण करून या
(आम्हाला "अंबाजोगाई" ला जायचं होतं), आम्हाला काय.. कुठेतरी जायचं तर होतंच .
फ्रेश होऊन ९ ची अहमदपूर ला जाणार "स्पेशल" गाडी पकडली . जादा गाडी असल्याने रिकामीच होती. आरामात बसलो. आमचा अंदाज होतं ३ ४ तासात पोहोचू , तर मास्तरांनी बॉम्ब टाकला ३ वाजतील.
(बापरे ९ ते ३ , सहा तास? ) काय करणार "आलिया भोगासी" (औरंगाबाद-अंबाजोगाई अंतर २५० km आहे).
एकदाचे ३.१५ ला आम्ही पोहोचलो, सकाळ पासून फक्त "पोह्यावर " होतो. पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,गेल्या गेल्या सिताफलांचे ढीग दिसले, मग काय त्याच्यावरच ताव मारला ,
एवढी गोड सीताफळं कधीच खाल्ली नवती....
आम्हाला दुसऱ्यादिवशी सकाळी "अभिषेक" करायचा होता , म्हणून मग आजच्या उरलेल्या वेळात "परळी वैजनाथ" ला जाण्याचं ठरलं. रिक्षाने जाण सर्वात सोप्पं.... पण तिकडचे रस्ते एवढे वाईट होते कि.... बस रे बस... होडीत बसल्यासारखं वाटत होतं. अतिपाव्साने म्हणे रस्ते उखडले गेले होते...
एवढे वाईट रस्ते तर मुंबईत पण बघितले नव्हते. बैलगाडीच्या वेगाने तो रिक्षा चालवत होता, १ तासाच्या अंतराला त्याने २ तास घेतले, पोहोचे पर्यंत अंधार पडलेला होता. पटापट जाऊन दर्शन घेतलं.
सुदैवाने गर्दी अजिबात नव्हती, छान दर्शन झालं. थोडावेळ थांबलो आणि लगेच निघालो
(वैजनाथाच देऊळ)
परत तोच रस्ता .. आता तर भयाण अंधार होता साथीला ..आम्ही सोडलो तर कोणीही चिटपाखरू नव्हतं आजूबाजूला, मधून मधून एखादं वाहन जायचं ... पण मला ती शांतता पण खूप भिडली होती... वेगळंच वाटत होतं.
एकदाचे पोहोचलो कसेतरी.. दिवसभराचे उपाशी. आता तरी काहीतरी खायला मिळेल या आशेवर होतो . भक्त निवासात गेलो तर ९.१५ पासून जेवण मिळेल असे उत्तर आले आणि आता तर फक्त ८ वाजले होते , एवढं वेळ थांबणे कोणाच्यानेच शक्य नव्हते
मग परत बाहेर आलो, हॉटेल नावाचा प्रकार तिथे दिसतंच नव्हता. एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली.
पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे.
भाज्यांमध्ये एवढं तेल होतं कि भाजीत तेल घातलंय कि तेलात भाजी,तेच कळत नव्हतं. कसेबसे दोन घास गिळून बाहेर पडलो. तरी आल्यावर झोप कधी लागली ते कळलंच नाही.दुसऱ्या दिवशी आंघोळ वगेरे करून जिच्यासाठी आलोय तिचं दर्शन घेतलं "योगेश्वरी"..................
अतिशय पुरातन पण अतिशय सुंदर असं "हेमाडपंथी शैलीचं मंदिर".
(देवळात फोटो काढायची परवानगी नाही , म्हणून आंतरजालावरून साभार )
देवीची मुद्रा बघून भवताल विसरायला होतं.....
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बक्ये गौरी , नारायणी नमोस्तुते"
हेच भाव दाटून येतात.बऱ्याच कोकणस्थ ब्राम्हणांची "कुलस्वामिनी " आहे ही. मला तिच्या चरणांशी बसून अभिषेक करण्याचा योग आला. देवीची मूर्ती सुद्धा "करारी", डोळे ऊर्ध्व दिशेकडे रोखलेले .
अभिषेक झाल्यावर नेवेद्य. पण तो १२ वाजता असतो, मग मधल्या वेळात आसपास च्या परिसरात भटकायला निघालो.
पहिलं ठिकाण कवी मुकुंदराजांची समाधी - एका डोंगरातल अतिशय रमणीय ठिकाण , इथे म्हणे मोर दिसतात. आम्हाला पण एक दिसला पण तो खूप लांब होता.समोरची दरी सुद्धा रमणीय दिसत होती.
बाकी पावसाची रिप रिप सुरु असल्याने वातावरण अतिशय "प्रसन्न" झालं होत.
त्यानंतर "योगेश्वरी" देवीचं मूळ मंदिर बघितलं.
तिथून पुढे एक "शिवाचं" प्राचीन देऊळ, इतर भग्नावशेष आणि दासोपंतांची समाधी पाहिली
धर्मशाळा
जागोजागी असे हत्ती दिसत होते..... आता सगळे भग्न झालेत पण .....
त्यातल्या त्यात माझी फोटूग्राफी
हे बघून रत्नाकर मतकरी यांच्या "गहिऱ्या पाण्याची " आठवण झाली
काही भग्नावशेष आणि तुटलेली दीपमाळा
मधेच मेंढ्यांचा कळप दिसला .. मग प्रत्येकाने फोटू काढायची हौस भागवून घेतली.
नुकताच पावसाळा संपलेला असल्याने.... रानफुलांचा जणू उत्सव त्या डोंगरावर फुललेला होता.....
त्यातल्याच काहींना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केलाय.... कॅमेरा अतिशय सामान्य असल्याने विशेष काही टिपू शकलो नाहीये...
निळाई
त्यातच वेगळी "शेड" सुद्धा .. निसर्गाची कमाल आहे
या फुलांपेक्षा लहान फुलं मी आजवर कुठेही पाहिलेली नाहीत........
हे सगळं बघेपर्यंत १२ वाजत आलेले होते, देवीच्या नेवेद्याची वेळ झालेली होती....
परतलो , जेवलो, देवीच दर्शन घेऊन ते रूप डोळ्यात साठवत.......
औरंगाबादेकडे निघालो.......
पुढच्या भागात वेरूळ दर्शन
क्रमश:
परत तोच रस्ता .. आता तर भयाण अंधार होता साथीला ..आम्ही सोडलो तर कोणीही चिटपाखरू नव्हतं आजूबाजूला, मधून मधून एखादं वाहन जायचं ... पण मला ती शांतता पण खूप भिडली होती... वेगळंच वाटत होतं.
एकदाचे पोहोचलो कसेतरी.. दिवसभराचे उपाशी. आता तरी काहीतरी खायला मिळेल या आशेवर होतो . भक्त निवासात गेलो तर ९.१५ पासून जेवण मिळेल असे उत्तर आले आणि आता तर फक्त ८ वाजले होते , एवढं वेळ थांबणे कोणाच्यानेच शक्य नव्हते
मग परत बाहेर आलो, हॉटेल नावाचा प्रकार तिथे दिसतंच नव्हता. एक पंचवटी नावाचं हाटेल दिसलं. बरं वाटलं म्हणून गेलो . थाळीची ओर्देर दिली.
पण हाय रे किस्मत ... एवढं बकवास जेवण मी कुठेही बघितलं नव्हतं आणि खाल्लंही(अन्नाला नाव ठेवू नयेत हे मान्य तरी सुद्धा.........) दिलेली रोटी ही घडी केलेल्या "टर्किश टॉवेल" सारखी होती.... भाजण्याची क्रिया केली होती कि नाही देव जाणे.
भाज्यांमध्ये एवढं तेल होतं कि भाजीत तेल घातलंय कि तेलात भाजी,तेच कळत नव्हतं. कसेबसे दोन घास गिळून बाहेर पडलो. तरी आल्यावर झोप कधी लागली ते कळलंच नाही.दुसऱ्या दिवशी आंघोळ वगेरे करून जिच्यासाठी आलोय तिचं दर्शन घेतलं "योगेश्वरी"..................
अतिशय पुरातन पण अतिशय सुंदर असं "हेमाडपंथी शैलीचं मंदिर".
(देवळात फोटो काढायची परवानगी नाही , म्हणून आंतरजालावरून साभार )
देवीची मुद्रा बघून भवताल विसरायला होतं.....
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बक्ये गौरी , नारायणी नमोस्तुते"
हेच भाव दाटून येतात.बऱ्याच कोकणस्थ ब्राम्हणांची "कुलस्वामिनी " आहे ही. मला तिच्या चरणांशी बसून अभिषेक करण्याचा योग आला. देवीची मूर्ती सुद्धा "करारी", डोळे ऊर्ध्व दिशेकडे रोखलेले .
अभिषेक झाल्यावर नेवेद्य. पण तो १२ वाजता असतो, मग मधल्या वेळात आसपास च्या परिसरात भटकायला निघालो.
पहिलं ठिकाण कवी मुकुंदराजांची समाधी - एका डोंगरातल अतिशय रमणीय ठिकाण , इथे म्हणे मोर दिसतात. आम्हाला पण एक दिसला पण तो खूप लांब होता.समोरची दरी सुद्धा रमणीय दिसत होती.
बाकी पावसाची रिप रिप सुरु असल्याने वातावरण अतिशय "प्रसन्न" झालं होत.
त्यानंतर "योगेश्वरी" देवीचं मूळ मंदिर बघितलं.
तिथून पुढे एक "शिवाचं" प्राचीन देऊळ, इतर भग्नावशेष आणि दासोपंतांची समाधी पाहिली
धर्मशाळा
जागोजागी असे हत्ती दिसत होते..... आता सगळे भग्न झालेत पण .....
त्यातल्या त्यात माझी फोटूग्राफी
हे बघून रत्नाकर मतकरी यांच्या "गहिऱ्या पाण्याची " आठवण झाली
काही भग्नावशेष आणि तुटलेली दीपमाळा
मधेच मेंढ्यांचा कळप दिसला .. मग प्रत्येकाने फोटू काढायची हौस भागवून घेतली.
नुकताच पावसाळा संपलेला असल्याने.... रानफुलांचा जणू उत्सव त्या डोंगरावर फुललेला होता.....
त्यातल्याच काहींना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केलाय.... कॅमेरा अतिशय सामान्य असल्याने विशेष काही टिपू शकलो नाहीये...
निळाई
त्यातच वेगळी "शेड" सुद्धा .. निसर्गाची कमाल आहे
या फुलांपेक्षा लहान फुलं मी आजवर कुठेही पाहिलेली नाहीत........
हे सगळं बघेपर्यंत १२ वाजत आलेले होते, देवीच्या नेवेद्याची वेळ झालेली होती....
परतलो , जेवलो, देवीच दर्शन घेऊन ते रूप डोळ्यात साठवत.......
औरंगाबादेकडे निघालो.......
पुढच्या भागात वेरूळ दर्शन
क्रमश:
- महाराष्ट्र दर्शन - भाग २/ "दौलताबाद"
- महाराष्ट्र दर्शन - भाग ३/ "वेरूळ "
- महाराष्ट्र दर्शन - भाग ४/ "पैठण"
- महाराष्ट्र दर्शन - भाग ५/ "अजिंठा"
प्रतिक्रिया
छान
स्पा मस्त......अंबाजोगाई आमची
श्री. स्पा, राजा जयपाल
प्रयत्न केलाय....
धन्यवाद. आता माहितीही मिळाली,
स्पा,
आणखी थोडी बाल की खालः
स्पा, वर्णन फारच छान आहे.
फालतू आणि निरर्थक कौल काढणा
धन्यवाद.........
छान रे स्पावड्या! झकास वर्णन
दमदार सुरुवात !!
मस्त रे....
छान
अरे वा वा वा.. अचानक गावाची
अंबाजोगाईला देवीचा मंदिराच्या
वेरुळच्या आधी दौलताबाद लिहीन
फार सुन्दर लेख लिहलात तुमच्या
लेख आवडला. आपल्या राज्याची
धन्यवाद
अभिनन्दन...