अरे परा आपण एकाच माळेतले दिसतो........
आमची प्रगती शाळेत भाषण म्हणणार्या मुलांना पहिल्या रांगेतुन वेडेवाकडे चेहरे करुन दाखवणे ह्यापुढे झालीच नाही
आमची पण नाही झाली.... बाकी प्राजु तै शाळेतल्या आठवणी उभ्या राहील्या डोळ्यासमोर.......
डार्विन चा किस्सा ऐकुन खुस हसलो
कशी गुणाची पोर गं.... :)
प्राजु......मस्त लिहिलं आहेस. इतक्या सगळ्यातला तुझा वावर..... अशीच खूप खूप मोठी हो :)
तुला सांगू....... तुझं लहानपण ऐकून........मला माझंच लहानपण वाचतेय असं वाटलं ;) वक्तॄत्व, नाटक, गाणं, निवेदन, रेडीयो..... अगदी सेम टू सेम :)
आणि माझ्या वक्तृत्वाच। कथन.. ज्यांना आवडलं आणि ज्यांना नाही आवडलं.. अशा सर्वांचीच मनापासून आभारी आहे.
धन्यवाद.
आवांतर : माझ्या त्या डार्विन च्या किस्स्यानंतर कधी कधी बाबा मला मजेत किंवा प्रेमाने म्हणू आपण.. आजही "अहो.. डार्विन!!!!" अशी हाक मारतात. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
नाक उडवून हल्ल बोलणारी प्राजू डोळ्यांपुढे आली [तिला न पहाताच!]
आज किती हसायच आहे? बाकी लेख खूपच सुन्दर! अगदी माझ्या वक्तृत्वस्पर्धा आठवल्या.
माझी पण कधी कधी विच्छा होते अस काही लिहायची, पण तेवढा पेशंस कुठे आहे? आणि किती वेळ टंकाव लागेल!
त्यापेक्षा सगळ्यांचे लेख वाचावेत सुन्दर सुन्दर आणि प्रतिसाद तर त्याहून सुन्दर!
डार्विन तर भन्नाटच! बिच्चारा!
अवांतर :-बिपिनदाच्या शाळेत मी पण येणार!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
लिहिलं पण भारी आहे! :)
मी दुसरीत की तिसरीत असतांना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय आधीच दिले होते, त्यामुळे काय लिहायचं आहे ते ठाउक होतं. सगळा निबंध लिहुन संपवला आणी मग लक्षात आलं की २ वाक्य लिहायची विसरलोय. खरं तर ते २ वाक्य लिहिले नसते तरी काही फरक पडला नसता. पण नाही. आम्ही खुपच हुषार असल्यामुळे आयडिया चालवली.
निबंधाच्या शेवटी लिहिलं:
2nd line: ---------------
24th line: --------------
त्याच स्पर्धेतला अजुन एक किस्सा. माझा एक वर्गमित्र निबंध लिहित असतांना त्याच्या पेन्सिलीचं टोक तुटलं. आता हा मुलखाचा लाजाळु असल्यामुळे कुणाकडे शार्पनर पण मागितलं नाही. तसंच तुटलेलं टोक घेउन निबंध पुर्ण केला. त्यामुळे अर्धा निबंध चांगल्या सुवाच्य अक्षरात आणि बाकी दुसराच कुणीतरी लिहिल्यासारखा.
आमच्या दोघांचे निबंध नोटिस बोर्ड वर लावले होते नंतर काही दिवस...
माझ्यापण हे सगळे वाचून शाळेतल्या आठवणी जागा झाल्या...
शाळेत मी फक्त निबंध स्पर्धेत भाग घ्यायचो आणि एकदा सरांनी मुद्दाम वक्तृत्वाला नाव दिले होते.
फाटली होती पण मज्जा पण आली होती.
नंतर मी स्वतः नाव द्यायला लागलो.
वर्गात बोलतांना ऍनवेळी विषय बदलल्याची आठवण झाली.
प्रतिक्रिया
अरे परा
तुमचा ही निषेध..
मस्तै बर्का !!
मजा आली वाचायला.
प्राजु.......!!
मीं डार्विनच्या ......
माझं बालपण,..
हल्ल!
महान आहात!
शाळेची आठवण आली...