Skip to main content

इंधन, खरे काय?

लेखक भंकस बाबा यांनी मंगळवार, 03/09/2019 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
1994 साल, वर्ल्ड धिस वीक म्हणून एक कार्यक्रम यायचा दूरदर्शनवर. जगातील घडामोडीवर एक चांगला माहितीपर कार्यक्रम होता हा . तर या कार्यक्रमामध्ये तेव्हा जपानने केलेल्या एका संशोधनावर बातमी आली होती. जपानने पाण्यावर चालणारी कार बनवली आहे, यात ईंधन म्हणून पाणी वापरले जाईल व प्रदूषण कमी होईल असे. आजतायगत या कारची वाट पहात आहे. सन 1986 मधे होंडा मोटरसाइकिलने 100 सीसीची एक मोटरसाइकिल भारतात दाखल केली. काही जनांस म्हणजे काही मोड़ेलनी 100 किमी प्रति लीटर माइलेज दिला होता , कंपनीचा दावा 80 किमीचा होता. होंडा कंपनीने या अशा माइलेज देण्यार्या गाड्या तपासणी करून परत घेतल्या होत्या , त्याबदल्यात त्या ग्राहकाना नवीन गाडी व भरलेले पैसे परत केले होते. त्यानंतर 100 किमीचा माइलेज देणारी गाडी मार्केटमधे बघितली नाही. 100 चा दावा बजाजची प्लाटिना करते , पण 70च्या आसपासच जाते. गाडीचा शोध लागून आज सव्वाशे वर्षे झाली. गाड्या आलीशान झाल्या पण कमी ईंधन पिणाऱ्या गाड्या तितकयाशा बनल्या नाहीत. मला म्हणायचे आहे की इंजिनमधे पाहिजे तेवढे संशोधन झाले नाही, पण गेल्या एकदोन वर्षात अचानक संशोधनाने जोर पकडला आणि नवनवीन शोध पुढे येऊ लागले आहेत. नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही. जाणकार , अभ्यासू मिपाकर अजुन प्रकाश टाकतील काय?

वाचने 75771
प्रतिक्रिया 134

प्रतिक्रिया

अॅव्हरेज चा दावा कंपन्या सांगताना आदर्श परिस्थिती मध्ये असा अर्थ असतो. गियर कमीत कमी बदलून, क्लच व ब्रेकचा अत्यंत कमी वापर करून दिडशे पर्यंत मायलेज मिळवणारे स्पर्धकांविषयी मागे वाचल्याचं आठवतं. ऐंशी रुपयांत साठ सत्तर किलोमीटर खूप परवडेबल आहे असे म्हणतो.

दलिंदर लोकं अॅव्हरेजचा विचार करून अजून दलिंदर पणा करतात. बुलेट सारख्या गाड्यांचे मालक पेट्रोलच्या किंमती विषयी फालतू टेंशन घेत नाहीत. भारतीय मानसिकता म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणं.

माझ्या प्रश्नाचा रोख हा ईंधन बचतीचा नसून संशोधन न होण्यावर आहे. बुलेट घेणारा माइलेज बघत नसेल, पण एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी बुलेट हा पांढरा हत्ती असतो. वापरून बघा

इथंच इंडिया मार खाते. आपल्याकडं स्थावर जंगम मालमत्ता किती आहे, किती पोरं होऊ दिली तर सर्व गरजा भागून टेचीत जगता येईल याचा कोणताही विचार करायचा नाही.‌ लग्नाच्या वयाचे झाले की द्यायचं गळ्यात घोंगडं अडकवून. मग महागाई च्या नावाने बोंबा मारायच्या. अवांतराबद्दल क्षमस्व. मी बुलेट वापरली आहे. आता वयोमानामुळे स्कुटी चालवतो.

In reply to by तमराज किल्विष

विषय सोडून भलतिकडे भटकत आहात. मला म्हणायचे आहे की आतापर्यंत जी काही संशोधन झाली ती व्यावसायिक तत्वाने वापरली गेली नाही. मला आठवते तेव्हा बजाज चेतक फॉर्म मधे होती. त्यावेळी काही लोकल मैकेनिक त्या गाडीला होंडा 100 सीसीचा कार्बुरेटर बसवायचे व माइलेज वाढवायचे. असे संशोधन बजाजने केल्याचे आठवत नाही, उलटे काइनेटिकने जेव्हा बिना गियरची स्कूटर बाजारात आणली तेव्हा हे हमारा बजाजवर अटकुन चेतकमधे कोणतीही सुधारणा करत नव्हते. परिणाम चेतकच क़ाय तर सर्व गियरवाल्या स्कूटर कालबाह्य झाल्या. नवीन संशोधन म्हणजे चेतकचा एवरेज पस्तीसचाळीसच्या पुढे कधी गेला नाही.

In reply to by भंकस बाबा

मला तरी वाटते की आय सी इंजिनाला मर्यादा आहेत. लोकांना जास्त बिएचपी असणाऱ्या, जोरात पळणाऱ्या गाड्यांचं आकर्षण जास्त आहे. गरीब लोक जे चैन करु शकत नाहीत ते प्लॅटिना सारख्या गाड्या घेतात. संशोधन नक्कीच झाले आहे. टू स्ट्रोक इंजिन जे खूप प्रदुषण करायचे ते आता बादच झाले आहेत. बजाज चेतक ला दुसरा कार्बोरेटर बसवल्यानं लोड खेचण्याची ताकद कमी पडत होती आणि इंजिनवर ताण येऊन घसारा वाढत होता. हाच प्रकार बुलेट बरोबर पण काही लोकांनी केला होता. पुर्वी राजदूत गाड्या ग्रामीण भागात बहुतेक रॉकेल टाकून चालवायचे लोकं.

1853 का 54 साली भारतात पहिली रेल्वे धावली त्या गाडी साठी वाफेच्या इंजिन चा वापर केला होता . बोरीबंदर ते ठाणे हे अंतर तिने एक तास चोवीस मिनिटात पूर्ण केले .14 coach ची गाडी होती आणि तिला sion ला पाणी भरण्यासाठी थांबावे लागले होते आता तेच अंतर विद्युत इंजिन असलेल्या गाड्या 30 मिनिटात पूर्ण करत आहेत आणि इंजिन सुद्धा सुटसुटीत आहे म्हणजे खूप बदल तर झालाच आहे . इंधन हे आता आर्थिक विषय झाला आहे खूप अर्थकारण त्या वर अवलंबून आहे . त्या आसपास सहज मिळणाऱ्या घरगुती पदार्थ इंधन म्हणून वापरणे शक्य असले तरी आर्थिक स्वार्थ तसे होवून देणार नाही . इंधन ची मालकी एकाच बलाढ्य उद्योगपती किंवा सरकार कडेच राहील ह्याची पूर्ण काळजी घेतली जाईल . विजेवर चालणारी वाहन जरी आली तरी वीजनिर्मिती हे मोठे उद्योगच करतील . घरात वीज निर्मिती करण्यापासून बरेच अडधाळे निर्माण केले जातील . ह्याचे उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मिती करणे नुकसानीचा व्यवहार ठरेल असेच प्रयत्न होत आहेत. त्या मध्ये अधिक संशोधन होवून उत्पादन खर्च कमीतकमी करण्याचे प्रयत्न नगण्य आहेत

एक महत्त्वाच्या मुद्द्यावर लिहेल्याबद्दल धन्यवाद.. भारतात देखील सरकार आणि टाटा मोटर्स संयुक्तरीत्या 'हायड्रोजन' ला इंधन म्हणून वापरण्याच्या दिशेने संशोधन करत होते. मी २००७-०८च्या दरम्यान ह्याबद्दल वाचल्याचे आठवते. (त्यावर तेव्हा एका CSE Mains च्या पेपरमध्ये प्रश्न आल्याचेही धुसरपणे स्मरतंय.) त्यात एक मोठी समस्या हायड्रोजनची प्रचंड ज्वलन /विस्फोटक्षमता, व त्याचमुळे त्याच्या स्टोरेज/ वाहतूक इत्यादीमध्ये येणार्‍या अडचणी ही होती. हायड्रोजनचा वापर केल्यास धूर म्हणून केवळ वाफ/पाणी बाहेर पडेल. ह्यावर गुगलले असता, आता टाटाने एक हायड्रोजन सेल फ्युलवर चालणारी एक स्टारबस आणली आहे, असे कळले. मात्र अजूनही त्याबाबतीत फार काही झाल्याचे दिसत नाही.

In reply to by चिगो

धन्यवाद. ब्राजील व अर्जेंटीनामधे पूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत, असे वाचल्याचे स्मरते. माझे मत असे आहे की सरकारच ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवत नाही कारण खनिज तेलाच्या माध्यमातून सरकारला बराच वित्तीय पुरवठा होतो. शिवाय खनिज तेलावर प्रक्रिया करून त्याचे फिनिश प्रॉडक्ट सरकार निर्यातदेखील करते , या सर्वावर कोण सुखासुखी पाणी सोडेल?

In reply to by भंकस बाबा

@कारण खनिज तेलाच्या माध्यमातून सरकारला बराच वित्तीय पुरवठा होतो. - ब्राब्बार बोलला बगा . Cng मंजि उसाच चिपाड! पर त्ये बी 11:50 रूपे किलो नि सुरू करून आता 56 रुपयावर निउन ठिवलय! दुष्ट दुष्ट सरकार!

In reply to by भंकस बाबा

परवा मोटारीत पेट्रोल भरले तेंव्हा पंपावर त्यात १० % पर्यंत इथेनॉल आहे अशी नोटीस वाचली जालावर खोदून पहिले तर हि सुरुवात झालेली आहे असे समजते https://economictimes.indiatimes.com/industry/energy/oil-gas/ethanol-bl… https://www.mycarhelpline.com/index.php?option=com_easyblog&view=entry&…

संशोधन होत आहे. काही वर्षांत वीजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि कार्स मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील. छोटेखानी सूर्य नावाचा मोठा प्रकल्प आज सुरू आहे. तोसुद्धा काही वर्षात पूर्ण होईल. श्री. गडकरी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर काही काळात छोट्या प्रमाणावर जागोजागी जैविक इंधन निर्मितीचे प्रयत्न सुरू होतील.

भला मोठा सूर्य आहे ना फुकटचा त्याचा पहिला पूर्ण शमतेने वापर करायचा सोडून छोट्या सूर्याचा विलासी हट्ट कशा साठी . उसाची मळी आहे ना जैविक इंधन त्याचा वापर करा ना मोठ्या प्रमाणात

In reply to by अमर विश्वास

मी लेखाच्या सुरूवातीलाच म्हटले आहे की 1994 मधे ही टेक्नोलॉजी जपानने वापरली होती, पण तिला प्रत्यक्षात यायला इतका वेळ? ती सुद्धा आली नाही अजुन!

चांगला धागा आहे .. सकारत्मक चर्चा झाली तर बरेच काळेबेरे बाहेर येऊ शकते .. मला वाटत , मिपासारख्या प्रगल्भ मंचावर मान्यवरांची आणि हुशार अभ्यासू लोकांची वानवा तर मुळीच नाही आहे .. माझे वैयक्तिक मत किंवा अनुभव म्हणा हवं तर मी इथे या धाग्यात नोंदवू इच्छितो .. साधारण तीनेक वर्षांपूर्वी माझ्या मावशीच्या मिस्टरांनी मला भेटायला बोलावले होते .. बरेच मागे लागल्यावर मी वेळ काढून तिथे गेलो .. त्यांच्यासोबत एक महाशय तिथे आधीच स्थानापन्न होते . त्यांनी मला एका स्कीमबद्दल सांगण्यास सुरुवात केली .. मला या मल्टीलेव्हल मार्केटिंगचा आधीच कंटाळा आहे त्यामुळे मी थोडेफार दुर्लक्ष करूनच ऐकत होतो .. मग त्यांनी मला माझ्याकडे असलेल्या गाड्यांची माहिती विचारली .. माझ्याकडे एक जुनी होंडा सिटी ( टाईप २ मॉडेल ) आणि वॅगन आर होती असे मी त्यांना सांगितले .. ते म्हणाले तुम्ही मला जर कुठलीही एक गाडी माझ्याकडे असलेले इलेक्ट्रोड लावायला दिलीत आणि तर ती तुम्ही पंधरा दिवसांनी मला त्या गाडीच्या मायलेजमधला फरक सांगा .. तुम्ही स्वतःच हा सेट बोलाल त्या किमतीत विकत घ्याल .. मी कुतूहलापोटी मग सविस्तर वाचायला घेतले .. नीट वाचल्यावर कळले कि ती व्यक्ती जे काही बोलत आहे त्यात खोत तर बिलकुल नाही आहे .. साधं लॉजिक वापरलेले होते .. जे पण इंधन गाडीच्या इंजिनात उतरेल त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देणे जेणेकरून त्याचे कमीतकमी १०० % वापर होईल .. फक्त एक गोष्ट होती ती म्हणजे तो इलेकट्रोडचा सेट लावायला जरा जागा लागणार होती आणि तीही बोनेटमध्येच कुठेतरी .. त्यामुळे ते माझ्या होंडामध्ये जास्त इंटरेस्टेड होते .. मी त्यांना मग त्यांनी कुठे हा सेट लावला आहे का त्याबद्दल विचारणा केली .. त्यांनी तात्काळ मला त्यांच्या स्वतःच्या टाटा सफारीमध्ये लावला आहे म्हणून सांगितले .. मग मी त्यांना पूर्वीचा आणि आताचा मायलेज विचारला , त्यांनी सांगितले पूर्वी ती ११ ते १२ द्यायची आता चक्क ४५ ते ५० देते .. मी चाट पडलो .. मी हिच्याशी सल्लामसलत केली पण हीच स्पष्ट नकार होता आणि तिला थोडी धास्तीही होती त्यामुळे ते प्रकरण बारगळले .. पण सांगायचं मुद्दा हा कि इंजिनातले इंधन जर जास्तीत जास्त वापरले गेले तेही कमी कार्बन उत्सर्जन करून तर मायलेज नक्कीच वाढू शकतो ..

In reply to by खिलजि

पुष्कळ धन्यवाद अशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित होता. अजूनही सुहास म्हात्रे सर व खरे सराचे प्रतिसाद आले नाहीत, ते जेव्हा येतील तेव्हा चर्चा खरी रंगेल. टाटा मोटर्सने फक्त हवेवर चालणारी गाडीचा देखील शोध लावला होता. ही गाडी हवा ईंधन म्हणून नाही तर पिस्टनला धक्का मारून चालवण्यासाठी वापरली जाईल. हवा प्रेशरने पिस्टनवर जाईल व जे काम स्पार्कप्लगवर पेट्रोल जाऊन करते तीच सिस्टम वापरली जाईल, पण इथे हे प्रेशरने होईल ना कि इंधनाच्या ज्वलनाने! नेमके कुठेतरी पाणी मुरत आहे, त्यामुळे ही संशोधने बाहेर येत नाहीत.

In reply to by खिलजि

मला तरी ही रमर पिल्ले टाइप गोष्ट वाटते. दोन पाच किलोमीटर जरी मायलेज वाढत असतं तर कंपन्यांनी पाहिजे तेवढे पैसे देऊन तंत्रज्ञान विकत घेतले असते. फेकाफेक वाटतं. ऑक्सिजन जास्त मिळावा म्हणून टर्बो जोडतात आता.

In reply to by तमराज किल्विष

टर्बो हा प्रकार काय आहे ते आधी जाणून घ्या, जे ईंधन जळत नाही ते सायलेंसरमार्फत बाहेर टाकले जाते, तेच पुन्हा इंजिनकडे वळवून इंधनाची बचत करतात. जट्रोफा, मोगली एरंड या झाडापासुन बायोडिझेल तयार करतात. त्यामुळे रामन पिल्ले तोतया संशोधक असेल पण त्याची थियरी खोटी असू शकत नाही

In reply to by भंकस बाबा

टाटाच्या नावाने सर्च मारा गुगलवर, त्यांच्या हवेवर चालणाऱ्या गाडीविषयी माहिती मिळेल. थोडा अभ्यास करून प्रतिसाद टाका, नाही टाकले प्रतिसाद तर कोणी काही बोलणार नाही तुम्हाला.

In reply to by भंकस बाबा

माझ्या माहितीप्रमाणे इंजिनच्या इनटेक पाईपमधील हवा atmospheric प्रेशरला आणण्यासाठी अधिकचा कॉम्प्रेसर वापरतात. हा पाईप इंजिन कम्पार्टमेंटमध्ये वाकडातीकडा बसवला असल्याने हवेचे प्रेशर कमी होते त्यामुळे सिलिंडर मध्ये इंधन पूर्ण एफीसीएनसिने जळत नाही. हा अधिकचा कॉम्प्रेसर बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्ट ग्यासच्या प्रेशरने चालवतात.

In reply to by खिलजि

तुम्हाला जो प्रकार दाखवला गेला त्याला एचएचओ किट असे म्हणतात. त्यात पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करुन हायड्रोजन आणी ऑक्सिजन वेगळे केले जाते. ते इंजिनात वापरून इंजिनचे मायलेज वाढते असा या लोकांचा दावा असतो. ३०० रुपड्याच्या स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या एका प्लास्टिक बॉक्समध्ये पॅक करुन १२००० हजारला हे मलम वाले विकतात. तेव्हा सावधान. एचएचओ किट स्वतः वापरले नसल्याने त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती देणे मला शक्य नाही.

In reply to by खिलजि

जे पण इंधन गाडीच्या इंजिनात उतरेल त्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देणे जेणेकरून त्याचे कमीतकमी १०० % वापर होईल
एरवीही सगळंच इंधन जळतं ना? अगदी १०० % ? कि काहि इंधन धुरांड्यातुन बाहेर पडतं ?

In reply to by अर्धवटराव

इंटर्नल कंबश्शन इंजिनाची इंधन वापराची कार्यक्षमता (thermal efficiency): पेट्रोल इंजिन : सर्वसाधारणपणे २० ते जास्तीत जास्त ३८% डिझेल इंजिन : जवळ जवळ ४०% इंधनाची बाकीची टक्केवारी मुख्यतः, न जळलेले इंधन व उष्णतेत फुकट गेलेली उर्जा, यांच्या स्वरूपात वाया जाते. https://www.greencarreports.com/news/1091436_toyota-gasoline-engine-ach… इंटर्नल कंबश्शन इंजिन, हे मानवाने शोधलेल्या अतीव कार्यक्षम प्रणाल्यांपैकी एक आहे. खनिज तेल अत्यंत स्वस्त असण्याच्या काळात त्याचा विकास झाला व मानवी/पशूशक्तीपेक्षा खूप जास्त कार्यक्षम असल्याने त्याचा इतका जम बसला की नंतर त्याला पर्याय शोधणे व त्या पर्यायाला व्यावहारीकरित्या यशस्वी (मेनस्ट्रिम) करणे अशक्य झाले. जे काही पर्याय होऊ शकले असते त्यांना तेलाशी हितसंबंध असलेल्या कंपन्यांनी साम-दाम-दंड-भेद वापरून 'अयशस्वी' केले/ठरवले गेले. सद्या, (अ) तेलाच्या सतत वर असलेली किंमती आणि (आ) जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वाढलेला दबाव, या दोन गोष्टींमुळे खनिज तेलाचा उपयोग करणार्‍या इंटर्नल कंबशन इंजिनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जोमाने चालू झाले आहेत. हे प्रयत्न यशस्वी झाले तरी ते व्यवहारात आणून, अनेक दशके खोलवर पाय रोवून बसलेली व अनेक ट्रिलियन डॉलर्सचे असेट्स असलेली, तेलावर आधारलेल्या वाहन व अर्थव्यवस्थेला टक्कर देण्यासाठी सबळ, स्वस्त, सहज उपलब्ध असलेला पर्याय होण्यासाठी, नवीन पर्यायांना एक-दोन दशके तरी जातील.

In reply to by भंकस बाबा

या विषयाला जागतिक अर्थकारण, राजकारण व इतिहासाचे इतके पदर आहेत की त्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांचा गोषवारा सांगायचा तरी लेखमाला होईल. सद्या व्यस्त असल्याने इतका वेळ व श्रम शक्य नाहीत, त्यामुळे क्षमस्व.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

वीजेवर चालणार्‍या गाड्यांचा आणि प्रदुषण यांचा विचार करताना एक गोष्ट नेहमी विसरली जाते... ती म्हणजे गाडी चालवण्यासाठी वापरण्याची वीज तयार करताना निर्माण होणारे प्रदुषण. कारण, सद्या उपलब्ध असलेले अपारंपारिक उर्जास्त्रोत (तेलावर किवा कोळशावर अवलंबून नसलेले वीजनिर्मिती प्रकल्प) एकतर महागडे आहेत आणि/किंवा (तेलाला पर्यायी होतील इतक्या) पुरेशा प्रमाणात वीजनिर्मिती करत नाहीत. हे महत्वाचे मुद्दे विसरून व्यावहारिक पर्याय निर्माण करता येणार नाही.

त्या इलेक्ट्रोड्सची किंमत काय सांगितली होती?

In reply to by चामुंडराय

आर ओ आय म्हणण्यापेक्षा आपण याला मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणू .. मी स्वतः ते उत्पादन विकत घ्यायचं आणि दुसरं गिर्हाईक आणलं कि त्या गिर्हाईकाच्या पैश्यातले २००० रुपये मला मिळणार .. जेव्हढी गिर्हाईक आणाल तेव्हढा नफा मिळत जाईल ..

आपण फक्त तर्क मांडू शकतो तांत्रिक बाजू मला तरी माहीत नाहीत. इंजिन साठी इंधन आणि हवा ह्यांचे ठराविक प्रमाणात मिश्रण आवशक्य असते त्याचा बंदिस्त जागेत नियंत्रित स्फोट केला जातो आणि इंजिन चालू होते . ह्या मध्ये हवेचा रोल हा ऑक्सीजन पुरवणे हाच असावा कारण ज्वलन ला ऑक्सीजण ची गरज असतेच.होणारा स्फोट हा इंधनाचाच होतो ..स्फोट ची तीव्रता जेवढी जास्त तेवढी इंजिन ची ताकत जास्त . म्हणजे जिथे चढ आहे किंवा गाडीला वेग द्यायचा आहे हवेचा विरोध झुगारून तिथे इंधन जास्त लागणार . ते वाचवण्यासाठी त्याची मात्रा कमी केली तर इंजिन ची ताकत सुधा कमी होणार .. एकतर इंधन वाचू शकत किंवा इंजिनची ताकत कमी करू शकतो आपण दोन्ही एकावेळेस साध्य होणार नाही .

स्विफ्ट या गाडीचं डिझेल इंजिन फारच उत्कृष्ट आहे. आवाज,कंपन एकदम स्मूथ पेट्रोल इंजिन प्रमाणे आहे. आता या इंजिनाची सर्व बाबतीत सारखी पण अर्ध्या आकाराची इंजिनं बनवली तर नॅनो, अल्टो, रिक्षा सारखी वाहनं आरामात चालतील व इंधन बचत होऊन प्रदुषण देखील कमी होईल.

प्रतिसाद इंग्रजीतून देत आहे कारण अनेक शास्त्रीय व्याख्या मराठीतून लिहिणे अवघड आहे there are many Pneumatic tools running on Compressed air. But this compressed air is not prime mover. It is used as means of energy transmission. In other words, compressed air needs to be generated first using some prime mover (again a IC engine) also to travel say 100 KM, how much compressed air will be needed? where to store that? . So this is commercially nonviable Please read the article on following link which will tell more about compressed air vehicles. https://www.livemint.com/Industry/DqLFO06I5l39RDqhiWBzSN/Tata-Motors-wo…

In reply to by अमर विश्वास

तुमचे मत वाचले. ज्या गाड्या कॉम्प्रेस एयरवर चालणार त्यांना नक्कीच हवा स्टोर करावी लागणार, पण ही हवा त्यांना अतिशय स्वस्तात कुठेही म्हणजे, पंक्चर काढण्यार्याकडे उपलब्ध होईल. किंवा आजकाल हवा भरण्यासाठी छोटे इलेक्ट्रिक पंप मिळतात ते पण उपयोगात येऊ शकतात. इथे गोम अशी आहे की अशा गाड्या याव्यात अशी इच्छाच कोणी व्यक्त करीत नाही आहे. नितिन गडकरी इलेक्ट्रिक गाड्याची वार्ता करतात. पूर्ति नावाची त्यांची एक कंपनी अशा रिक्शा बनवते.

In reply to by भंकस बाबा

पूर्ती इलेक्ट्रिक रिक्षा बनवते असे मला तरी माहित नाही .. कृपया लिंक द्यावी .. बाकी इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल बोलायाचे तर तेच भविष्य आहे. शासनाची इलेक्ट्रिक वेहिकल पॉलिसी खरंच उत्तम आहे. मागील वर्षी भारतात फक्त ८००० इलेक्टिक कार्स विकल्या गेल्या आणि त्या सर्व महिंद्रा ने बनवल्या होत्या बाकी युरोप मध्ये इलेक्टिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तम धोरण आहे जसे : टॅक्सेस कमी आहेत , वेगळे पार्किंग स्लॉट्स चार्जेर सह , बस च्या लेन मधून जाण्याची परवानगी वगैरे तेंव्हा इलेक्टिक वेहिकल आणि पूर्ती चा संबंध जोडू नका ही विनंती

In reply to by अमर विश्वास

पूर्तिच्या नावाने चांगभल! गुगलवर सर्च मारले तर ही कंपनी बायोफ्यूएलच्या धन्द्यात आहे. कोलपासून ईंधन बनवण्यावर संशोधन चालू आहे. बघा लिंक लागते आहे का? गड़करिनि काही महिन्यापूर्वी केलेली भाषणे आठवा. त्यांनी असे म्हटले होते की देशभरात मिथेनॉलला पाठिंबा देऊन त्यावर आधारित गाड्या आल्या पाहिजेत. मिथेनॉल हे कोळशापासून तयार होणारे ईंधन आहे, व ते पेट्रोलमध्ये 15 टक्के टाकायचे घाटत आहे. पूर्ति या कंपनीचा पहिला उल्लेख मी जेव्हा दिल्लीमधे एका ईरिक्शावाल्याने एका अपघातात एका लहान मुलाला तेलाच्या कढ़ईत उडवले होते तेव्हा वाचला होता, तेव्हा या कंपनीचे नाव घेतले गेले होते, पण क्षमस्व मला आता तरी आन्तरजालावर काही माहिती मिळत नाही आहे. यापुढे नक्की माहिती उपलब्ध असली तरच पोस्ट टाकीन

In reply to by भंकस बाबा

एकदा नक्की ठरवा ... इलेक्ट्रिक वेहिकल का बायो फ्युएल .... बाकी माझी कमेंट इलेक्ट्रिक कार्स बद्दल होती ... बायो फ्युएल बद्दल सविस्तर लिहितो वेळ मिळाला कि

In reply to by अमर विश्वास

ज्या अनुषंगाने धागा काढला आहे त्यात हि सर्व संशोधन कोणाला तरी नुकसान होते वा फायदा होतो हे उलगडून काढण्यासाठी आहे. इलेक्ट्रिक वेहिकल हा विषय नाही तर ईंधन हा आहे. संशोधन का पुढे येत नाही हा मूळ विषय आहे. कृपया अजुन काही माहिती जी तुम्हाला माहित आहे अशी येउद्या. जसे काही वर्षापूर्वी एक रसायन बाजारात आले होते. ते पेट्रोलमध्ये टाकल्यावर एवरेज वाढतो अशी अफवा होती. मी पण वापरून बघितले, काहीही फरक पडला नाही. पण भारतीयाची मानसिकता एवरेज कितना देती है ही असते. असो. त्या रसायनाऐवजी तितक्या किमतीचे पेट्रोल टाकले असते तर जास्त फायदा झाला असता.

In reply to by अमर विश्वास

आसाम मध्ये एकाने कॉम्प्रेस्ड एयरवर चालणारी जीप बनवली होती. पण त्याची लिंक सापडत नाहीये.

आज मी जाट्रोपाबद्दलच लिहिणार होतो पण तुमचा प्रतिसाद वाचला आणि हायसे वाटले .. मला वाटत आता कुठे या महत्वपूर्ण धाग्याला धार चढायला लागलीय .. हा विषय इथेच सोडू नये .. कारण ह्या पेट्रोल कंपन्या आपला स्वार्थ शेवटपर्यंत सोडणार नाहीत .. सर्वप्रथम रामा पिल्ले बद्दल बोलूया .. तो माणूस नक्कीच वेडा नव्हता .. पण दुर्दैवाने आज त्याला खरोखरच वेडा करून टाकलं आहे .. माझा दुसरा अनुभव मी इथे पुन्हा टंकत आहे .. मागे जवळजवळ दहाएक वर्षांपूर्वी एम एस सी आणि पी एच डी साठी रुईया महाविद्यालयात प्रवेश केला .. तेथे बरेच प्रकल्प राबवले जायचे .. नाविन्यपूर्ण आणि आव्हानात्मक .. आजही राबवले जातात .. मी नोकरी सोडून तिथे प्रवेश घेतलेला त्यामुळे सर्वजण माझ्यापासून चार हात लांबच राहायचे .. कोण कुणास ठाऊक सर्वजण मला जणू वाळीत टाकल्याप्रमाणे ठेवलं होते .. त्यामुळे माझ्याकडे फारसं काही काम नसायचं . अश्यातच एक संधी चालून आली आणि ती आयतीच मला मिळाली .. सौराष्ट्र विद्यापीठातून कुणीतरी बडी हस्ती आपल्या रुईयात येणार आहे असे मला सरानी सांगितले .. ती हस्ती म्हणजे दुसरी कुणी नसून डॉक्टर नागर होते . त्यांनी सौराष्ठ्र विद्यापीठात जेट्रोपा या वनस्पतीवर काम केलेलं होत .. रुईया महाविद्यालयाने या प्रकल्पासाठी त्यावेळेस परशुराम घाटात डोंगराळ जागा घेतली होती .. फक्त या वनस्पतीच्या लागवडीसाठी .. मला नागर यांच्यासोबत बर्याच विषयांवर चर्चा करायला मिळाल्या .. मी , माझा मित्र अभिजित आणि नागर आम्ही सर्व जण त्या घाटात गेलो .. साधारण सकाळी १०.३० च्या सुमारास पोहोचलो .. डॉ नागर एकदम बिनधास्त माणूस .. आम्हाला जमिनीचा सामू घेण्यासाठी पंधरा फूट अंतर सोडून चारी दिशेला कमीत कमी ८ असे खड्डे मारायला सांगितले आणि माती गोळा करायला सांगितली .. हे साहेब ११ च्या सुमारास जे त्या निर्बीड जंगलात गायब झाले ते थेट संध्याकाळी मावळायच्या आधी उगवले .. आम्हाला वाटलं कि त्यांना कुणी खाल्लं कि काय .. असो .. तर त्या माणसाने जेट्रोपाबद्दल बरीच माहिती दिली .. स्वतः सरकार जेट्रोपा बिया खरेदी करते . जेट्रोपा वनस्पतीची लागवड कुठेही करता येते .. तिच्या बिया येण्यास साधारण दीडेक वर्ष लागते पण एकदा का बिया धरायला सुरुवात झाली कि मग उत्पन्न सुरु होते .. पूर्वी मशाली पेटवायला जास्त करून याच बियांचा वापर व्हायचा .. तर एकूण असे प्रकरण आहे सर्व .. हे सर्व मोठे गौडबंगाल आहे , असे वाटतंय .. मला वाटत सकस चर्चा झाली आणि तीही अनुभवांची जोड देऊन तर एक साचेबध्ध अनुभवसंपन्न मत तयार होऊ शकते ..

In reply to by खिलजि

रमर पिल्लेने थियरी पण चोरलेली असेल. बेमालूम पणे तो लोकांना उल्लू बनवत होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घरगुती प्रमाणात जैविक डिझेल बनवण्याचे यंत्र बनवलं आहे.

In reply to by खिलजि

होय , अशाच चर्चेने काही माहिती मिळाली तर उत्तमच आहे. जट्रोफा लागवडीसाठी सरकार काही अनुदान पण देते. पण हे पिक कमी पावसाच्या प्रदेशातील आहे. मला स्मरते की राजस्थानमध्ये याची व्यावसायिक लागवड झाली आहे. मधे एकदा या जट्रोफापासुन तयार झालेले डीझेल वापरुन रेल्वेचे इंजिन चालवले होते हे वाचल्याचे आठवते. दिल्लीच्या आसपास इंडियन ऑयल कंपनीने हे केले होते. मध्यंतरी स्पाइसजेट या विमान कंपनीने बायोफ्यूलवर विमान उडवल्याचे वाचले होते, पण या गोष्टीला म्हणावी तशी प्रसिद्धि मिळाली नव्हती. फक्त बायोफ्यूएल असे मोघम उल्लेख होता पण ते कशापासुन बनले आहे वा त्याचे प्रमाण काय याचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही.

तेलावर जागतिक राजकारण आणि युद्धे चालतात... तेल कंपन्यांचा बाजार उठेल असे संशोधन इतक्या वर्षात पुढे येउ न देण्यास तेल कंपन्यांनीच हातभार लावला असावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)

In reply to by मदनबाण

हेच खरे आहे. जर का गाड्या पेट्रोल डिझेलएवजी शाश्वत इंधनावर धावू लागल्या तर यांचे दिवाळेच निघतील.

काही संशोधन होत नाही हे अनुमान का काढले? तर प्रोटोटाईप मॉडेल दाखवले जाते पण ते व्यापारी उत्पादनात दोन पाच वर्षांत येत नाही म्हणून. १) हिस्ट्री चानेलवरच्या शिपमेंट वॉरमध्ये ट्रकवाले स्पेंट ओईल वापरताना दाखवतात. २) लिपु अँड पिटबुलमध्ये कारची एचपी वाढवण्यासाठी टर्बो लावताना दाखवतात. मग हखच टर्बो कार बनवणारे कगोदरच का लखवत नाहीत? आता यामध्ये काही तांत्रिक/आर्थिक अडचणी असणार. त्या ओळखून कार बनवणारा वापरत नसणार.

*कारची एचपी वाढवण्यासाठी टर्बो लावताना दाखवतात. मग हाच टर्बो कार बनवणारे अगोदरच का लावत नाहीत?*

In reply to by कंजूस

लिपू आणि पिटबुलमधे मॉडिफाई करण्यात येणाऱ्या गाड्या जुन्या असतात. टर्बो इंजिन ही संकल्पना तशी नवीन आहे. या शोमधे गाड्या लुक व पॉवर ह्या संकल्पनेवर मॉडिफाई केल्या जातात. मी काही भाग बघितले आहेत या शोचे. कुठेही एनर्जी एफिशियन्ट गाडी बनवताना पाहिले नाही

लिपु आणि पिटबूल न गाडी बनवल्यानंतर ती कितीही डबडा दिसत असली तरी गाडी मालक भारावून म्हणतात " व्वा, मला जशी हवी होती त्याहून भारी बनवली आहे."

मला हेच सांगायचं आहे. फक्त वरून रुपडं बदलत नाहीत तर प्रत्येक जचन्या गाडीत नवीन एंजिन किंवा टर्बो एडिशन करताना दाखवतात. खर्च बारा हजार डॉलर्सपर्यंत खरणारे गिऱ्हाईक. त्यांची कुवत इंधन खाणारी गाडी संभाळणारी आहे. इफिशंट एंजिनवाली गाडी हे त्यांचे ध्येय नाही. १) गाडीचं एंजिन कार्यक्षम करणे/ २) अधिक माइलेज देणे/ ३)वेगाने पळणारी गाडी हे सर्व एकाच गाडीत कसं शक्य आहे?

मला वाटत , शंभर टक्के इंधन जळतच नाही कुठल्याही गाडीत .. चला आपण असे मानूया कि १० मिली मागे फक्त ६ मिलीच वापरले जातेय . हाच विनियोग वाढवून कदाचित ९ मिली पर्यंत आला तर मायलेज नक्कीच चांगले असेल आणि प्रदूषणही कमी होईल .. सर्व माहित असते , चर्चाही घडतात पण जेव्हा कुणी संशोधन करत असेल तर त्याला वेडे ठरवले जाते .. रमण पिल्लईने थियरी चोरली असेल तरी ती थियरी खोटी नक्कीच नव्हती ..

ये सूट तुम्हे मुझसे हि खरीदाना पडेगा और इस सूट को चालना है तो युनिक पार्टीकल मुझसे हि खरीदने पडेंगे।

माफ करा, असेच्या असे इंग्लिशमधून पेस्टवतोय .. गरज आहे म्हणून अनुवाद करायला येळ लागला असता .. What happened to Ramar Pillai, the Tamil Nadu boy who in 1996 claimed to have discovered Herbal fuel? IIT and LMES(so called teaching real engineering) claimed that Ramar has used wax in that water to create this fuel…I was first angry about Ramar but after some analysis, i had a question, how come wax dissolve in water and create a fuel..wax is non-polar and water is polar..if Ramar was able to dissolve wax in water it is a great invention.which needs to be appreciated…. I have a small doubt, a person from 1996 is trying to bring the fuel to the people, I am not a scientist to check Ramar’s claim but i feel some truth is there behind him….if a person is making mistake, why will he do the same mistake again and again…..I remember Stanley Meyer, who claimed that he can use water to run vehicle’s, he introduced the term “fuel cells”, The people who supported him after some misunderstandings called him fraud, he was said to be killed after that, Now we hear the news that water powered cars are going to be released..same things must not happen again to Ramar..people don’t believe blindly at the same time don’t underestimate….centuries back Galileo… years back Stanley..In Future no Idea who is going to be ignored and made false for there efforts

इंधनाच्या पूर्ण क्षमतेने वापर न करण्या मागे गाड्या उत्पादित करणाऱ्या कंपन्या नक्की नसणार ते कशाला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतील . मग दुसरा अर्थ तेल कंपन्या ह्यांचे टक्के वारीवर संगनमत किंवा दुसरे कारण सरकारी दबाव . सरकारी दबाव ह्या साठी की तेलाचे खूप मोठे अर्थकारण आहे गाड्या निर्मिती chya उत्पादन पेक्षा खूप मोठे . 100%, इंधन क्षमता वापरणे शक्य नाही अशक्य आहे ती गोष्ट

अहो त्या रामन पिल्लेचा डेमो टिवीवर पाहिला आहे. लोक फक्त हसले आणि चालू पडले. --- आपल्या विषयाकडे वळुया. दहा एमेल पैकी सहा किंवा नऊ एमेल इंधन यांत्रिक शक्तीमध्ये बदलतं हे कुठं वाचलत?

In reply to by कंजूस

पण हे सर्व त्याला दुनियेसमोर करून काय फायदा मिळणार होता ? मुळात कुणी असे करेलच का ? जर समजा मला काही गोष्ट सिद्ध करायची असेल तर मी ती स्वतः आधी नीट पुन्हा पुन्हा तपासून घेईन , तिथले जे वरिष्ठ आहेत त्यांची परवानगी घेईन आणि मगच सामोरे जाईन .. मला आठवतंय त्याच्या सिनियर्सनी हा सर्व मोठा डाव असल्याचं त्याकाळी सांगितलं होतं पण त्या गोष्टी आत सध्या मला कुठे मिळत नाही आहेत .. माझी स्मरणशक्ती अजून तरी शाबूत आहे आणि मी ते सर्व त्याकाळी पेपरमध्ये सतत वाचत होतो .. अर्थात त्याच्या विरुद्धच बातम्या जास्त येत होत्या पण काही जण जे त्याला नीट ओळखत होते ते मात्र त्याच्या वर विश्वास ठेवून होते .. असो .. मूळ विषय भलतीकडेच चालला आहे म्हणून मी या रामर पिल्लईच्या चर्चेला इथेच पूर्णविराम देतो आहे .. मूळ धागा , इंधन म्हणजे काय आहे ? हा आहे आणि त्यावरच चर्चा झडावी असे मला वाटते.. मी अजूनही या मतावर ठाम आहे कि पेट्रोल कंपन्या आणि गाडी उत्पादक कंपन्या या सर्वांची मिलीभगत आहे .. तसे नाही तर मग का अजून आपल्या देशात , विजेवर चालणार्या गाड्या सर्रास दिसत नाहीत .. खरंच जर हे सर्व थांबावं असं वाटत असेल तर त्यादृष्टीकोनातून प्रयत्न होताना दिसले पाहिजेत .. दुर्दैवाने तेच तर होत नाही आहेत ..

तो डेमो कश्यावरुन खरा होता .. रामर पिल्लेने जे धाडस दाखवलं त्याला सलाम .. संपूर्ण देशासमोर किंबहुना जगासमोर तो असा वेडेपणा कश्याला करून घेईल .. बरं ते जाऊ देत , त्याला वेडे का ठरवलं गेलं ? तो तसाही हुशार होता .. त्याला मोकळं ठेवायचं होतं ना ? इस्पितळात भरती करण्याचं काय प्रयोजन ? तिथे नक्की काय झालं असेल ते देव जाणे .. अहो देशाच्या राष्ट्रपतींवर जर प्राणघातक हल्ला होऊ शकतो तर रामर पिल्ले हा अंतर सामान्य माणूस .. त्याला प्रयोग करण्याआधीच काहीतरी काळेबेरे झाले असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ..

रमर पिल्लेला प्रयोग करताना प्रत्येक वस्तूचे वजन करून दिले होते. तयार प्रॉडक्ट चे वजन जास्त भरत होतं म्हणून त्याच्या प्रत्येक वस्तूचे बारिक निरिक्षण केल्यावर जी रवी होती ती पोकळ असून त्यात त्यानं ज्वलनशील पदार्थ भरून आणलेला होता. त्याचं छिद्र गरम पाण्यात उघडलं आणि तो पदार्थ पाण्यात मिसळला. चोरी पकडली व नाचक्की झाली असेल तेव्हा तो अज्ञातवासात गेला असेल.

In reply to by तमराज किल्विष

परत एकदा सांगतो, रामन पिल्लई जी थियरी वापरत होता म्हणजे वनस्पतिजन्य पदार्थापासुन ज्वलनशील रसायन मिळवणे, ती सत्य होती. प्रयोगामधे त्याने चालबाजी केली असेल. जैट्रोफापासून ईंधन ही त्याच्या थियरिची पुढची पायरी आहे. उसाच्या चिपाडापासून वा त्याच्या पातेर्यापासून कोळसा बनवण्याची विधी तुनळीवर उपलब्ध आहे, पण जो प्रकार मी बघितला तो अगदीच मागास आहे. जऱ हेच व्यवस्थित शास्रीयरित्या केले तर प्रचंड ईंधन बचत होईल

परत एकदा सांगतो, रामन पिल्लई जी थियरी वापरत होता म्हणजे वनस्पतिजन्य पदार्थापासुन ज्वलनशील रसायन मिळवणे,
हो बाबा हो. पटलय. यात पिल्लेने कोणता शोध लावला? किती आणि कोणत्या वनस्पतीजन्य भागातून किती आणि कोणत्या दर्जाचे इंधन मिळू शकते यात काही गोपनीय नाही. फक्त आर्थिक गणित जमवायचे आहे. प्रत्येक प्रकारच्या इंधनात खोट आहेच. कालानुरुप ती खोट क्षम्य किंवा कमी त्रासदायक/नुकसाकारक ठरते.
नेमका हा काळ असा आहे की अमेरिकेला खनिज तेलात तितक़ा रस राहिलेला नाही. जाणकार ,
यामध्ये अभ्यास वगैरे काही नाही, अमेरिकेकडे खनिज तेल आहे पण तेल उत्पादक सर्व देश चाल खेळतात. आपल्या देशातले भूमीतले तेल कधी व किती काढून बाजारात आणायचे याबद्दल.

गाडी 1 ltr इंधना मध्ये किती किलो मीटर जाईल हे अनेक घटकांवर अवलंबून असते .. पाहिले ते इंधन शुद्ध असायला हवे पेट्रोल आणि डिझेल चे जे रासायनिक सूत्र आहे त्याच प्रमाणात सर्व घटक त्या मध्ये असतात का ? तर ह्या प्रश्नच उत्तर निगेटिव्ह आहे त्या मध्ये भेसळ असते . पाणी हायड्रोजन चे २, अनु आणि ऑक्सिजन चा एक आणि हे पाण्याचे सूत्र आहे पण असे पण असे पाणी पृथ्वी तलावावर अस्तित्वात आहे का ? पेट्रोल आणि डिझेल हे जीवाश्म इंधन आहे दबावाखाली ह्यांचा स्फोट होतो आणि हेच सूत्र वापरून इंजिन तयार केलेलं असते . पाहिले तर ते शुद्ध नाही . इंजिन नी निर्माण केलेली ऊर्जा आणि प्रतक्षात चाकाला मिळालेली ऊर्जा ह्या मध्ये फरक असतो . फरक हवेचा विरोध ,गाडीचा आकार,रस्त्याचा प्रकार ,गाडीवर असलेलं वजन किती तरी प्रकार गाडी १ ltr इंधनावर किती अंतर कापेल हे अवलंबून असते . ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होताना ऊर्जेचा रहास होतो हे सर्वसामान्य नियम आहे . मग इंधनाचा पूर्ण वापर होत नाही त्याचा पूर्ण वापर झाला तर गाडी जास्त average देईल ह्या मताचा पाया काय आहे हे समजलं नाही . दुसरे स्वस्त इंधन शोधणे हा पर्याय योग्य आहे पण इंधनाचा पूर्ण वापर इंजिन मध्ये केला जात नाही ह्याला कोणता आधार आहेत