Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227966
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

ते बघू हो आमचे आम्ही. तुम्हाला काकांना बोलले तर एवढा ठसका का लागतोय ? तुम्ही पण कोणत्यातरी पक्षाच्या कामाची,नेत्याची वैयक्तिक पातळीला जाऊन मापे काढत असतातच की ! मग त्याच न्यायाने बाकीचे वागले तर ? का "हम करे तो रास लीला ,तुम करो तो कॅरेक्टर ढीला ??" हा रडीचा डाव भक्तांना शोभतो का? अजून तर २०२४ ची संभाव्य उमेदवारीही जाहीर करायची आहे. कळ काढा राव जरा !

In reply to by विशुमित

मनाची नाही तरी जनाची तरी लाज राखली असती तर बरे झाले असते. ते बघू हो आमचे आम्ही. तुम्हाला काकांना बोलले तर एवढा ठसका का लागतोय ? तुम्ही पण कोणत्यातरी पक्षाच्या कामाची,नेत्याची वैयक्तिक पातळीला जाऊन मापे काढत असतातच की ! मग त्याच न्यायाने बाकीचे वागले तर ? का "हम करे तो रास लीला ,तुम करो तो कॅरेक्टर ढीला ??" हा रडीचा डाव भक्तांना शोभतो का? अजून तर २०२४ ची संभाव्य उमेदवारीही जाहीर करायची आहे. च्या पेक्षा किटली लई येळ गरम ऱ्हाऊन कसं चालल ? च्या कळकतो त्यांनी कळ काढा राव जरा !

In reply to by lakhu risbud

बुडणार्या जहाजातून उंदरे बाहेर पडत आहेत असे उच्चारता तुम्हाला का मळमळ झाली? का पवारांचा झटका आला, ते पण नमके माझ्या प्रतिसादाखाली ? का खिंड लढवयला आला होतात? भक्ती करायची तर उघड करा हो, आम्ही तुमच्या श्रध्देच्या आड नसतो आलो. शिव्या द्यायच्या तर बिंदास्त द्यायच्या ना. माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला? त्यात नको असलेले देव संमतीशिवाय इतरांच्या माथी मारणारे, देवार्यात बसवणारे आणि लुडबुड करणार्या आपल्या भाईबंधाना सलमान च गाणं नीट समजून सांगा. === 2024च काय घेवुन बसलात, 2050 पर्यंतचे स्वप्नरंजन करणारे येथे महाभाग आहेत.

In reply to by विशुमित

मिपावर पण त्यांचा वॉच असण्याची दाट शक्यता आहे. अरेरे साहेब स्वतः एवढ्या खालच्या पातळीवर उतरणार नाहीत (त्यांच्याबद्दल जेवढे ऐकले वाचले आहे त्यावरून याची मला खात्री आहे) पण त्यांचे चेले मिपावर नजर ठेवून आहेत हे वाचून आश्चर्य वाटले. MORE LOYAL THAN THE KING असो

In reply to by सुबोध खरे

मी आयटी सेल बाबत बोलत होतो. पवारांबद्दल नाही. सेल वाल्यांचे ते कामच आहे. त्यामुळे कोणाच्या कामाची अवहेलना करणे योग्य नाही,असे वाटते. चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. हे जगमान्य झाले आहे. फक्त पुर्वी चमकोगीरी करणारे सगळे कुंपणावर बसले आहेत. जो माझा खरा विषय होता की बुडणार्या जहाजातून किती उंदीर बाहेर पडणार आणि आसरा घायला कुठे कुठे धावणार. हे सोडून दिले आणि असले नसलेले हिशोब चुकवण्यासाठी चेलेचपाटे विनाकारण शिक्के मारत फिरत आहेत. === डाॅ. साहेब तुम्ही जाणते आहात, तुम्हीच बघा काय तोडगा निघतोय का?

In reply to by विशुमित

त्यांची यादी करून त्यांच्याशी

संपर्क

करण्याचा प्रयत्न केला जातो
हे वाक्य काय दर्शवते? त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." बाकी आय टी सेल अशा हजारो लाखो लोकांशी संपर्क करत असते हे वाचून करमणुक झाली चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. बाकी चेला आणि चमचा यात फार फरक आहे. मी चमचा असा शब्द अजिबात वापरलेला नाही चेला हा शब्द आदरार्थी असतो. आणि चमचा हा शब्द स्पष्ट आहे.

In reply to by सुबोध खरे

चेला हा शब्द आदरार्थीच आहे, पण हिंदू शब्द आदरार्थी व मुस्लिम शब्द वाईट अर्थाने वापरायचे असतात उदा - तो ह्याचा शिष्य आहे. तो काय , त्या ह्याचाच चेला. हे आमचे सुपुत्र आहेत, ठेचून काढा ती औलाद .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आता शब्दांनाही धर्माचे लेबल लागणार ह्या कल्पननेने मनाचा केवळ थरकाप उडाला. भाषेला कोणतीही जात धर्म किंवा प्रांताचे बंधन नसते असे वाटणार्‍या माझे डोळे खाडकन उघडले. ही असली विषवल्ली जर फोफावली तर भविष्यकाळ नक्कीच अंधकारमय आहे याची मोठ्या तिव्रतेने जाणीव झाली. असल्या गलिच्छ आणि विभाजनवादी विचारसरणीचा मी स्पष्ट शब्दात धिक्कार करतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

chela (plural chelas or chele) a pupil or disciple, especially in Hinduism quotations ▼ https://en.wiktionary.org/wiki/chela मोगा खान तुम्ही तुमचा हिरवा चष्मा काढला आणि वस्तुस्थिती जाणून घेतली तर बरे होईल. गुरु -चेला (उदा- गुरु कि करणी गुरु जायेगा, चेले कि करणी चेला- उड जायेगा हंस अकेला हे पंडित कुमार गंधर्व यांचे अत्यंत लोकप्रिय भजन आहे त्यातील एक ओळ) आणि उस्ताद -शागीर्द अशा जोड्या आहेत. विचारसरणी गढुळ झाली आहे एवढेच म्हणेन.

In reply to by विशुमित

मला राग यायच काय कारण आहे. तुमच्या प्रतिसादाचा सूर तसा वाटला म्हणून... नसेल आला राग तर सोडून द्या. हाकानाका. तुमची बौधिक कुवत चंगली आहे तुम्हाला "चांगली" असं म्हणायचं असावं अशी आशा करतो. सर्टिफिकेटबद्दल धन्यवाद... ते शिक्के मारायचे काम बदला आता मी काही कोणावर शिक्के मारले नाहीत. आता काहींना अंगावर ओढून घ्यायची सवय असते, त्यामुळे ते स्वतःवरच शिक्का मारून घेतात. बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने? मी त्यांच्याबाजूने काहीच बोललो नाही. फक्त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सल्याने त्यांना बोलायचं ते बोलूदे असं म्हणलं. हे फक्त लख्मिचंद यांच्यासाठी नसून समस्त जनतेसाठी आहे. का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे? चालेल... कुठला तरी प्लॅन दिल्याचं समाधान तुम्हाला मिळूदे. बाकी तुम्ही प्लॅनचा बराच धसका घेतलेला दिसतोय! प्रयत्न तर करा, तुमचा कुठलाच प्लॅन फेल जाणार नाही... लावताय पैज?

In reply to by विशुमित

विशुमित भाऊ, कुठेतरी-कोणाकडून कळत-नकळत आपल्या श्रद्धास्थानाच्या धोतराला हात घातला गेला..........ते सत्याचा जवळ जाऊन कितीही बोचणारे असले ...............तरीही असे पातळी सोडून वागायचे नाही. ही शिकवण मिळाली तरी ती पाळण्याचा आवाका प्रत्येकाचाच असतो असे नाही. ऐऱ्यागैऱ्या ने माझी लायकी काढायला मी त्याच्या तीर्थरुपांचे खात नाही ही बाब नम्रपणे आपल्या आकलनात अनु इच्छितो. समर्थक मग काढायचा का नाही ते बघतील.... तुम्ही त्या काळजीने स्वतःचा रक्तदाब वाढवून न घेणे योग्य. राष्ट्रवादी- फडणवीस-भाजप हा संबंध या प्रतिसादात जोडण्यामागे तुमच्या प्रकांड अशा पांडित्याचे काय कारण असावे हे पण आम्हा सामान्य जनांना विषद करून सांगावे .

Jan 12, 2018 presser by judges has not served purpose: Former CJI Lodha on collegium सर्वोच्च न्यायालयाचे भूतपूर्व मुख्य न्यायाधिश लोधा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सद्याच्या कॉलेजियमबद्दलच्या टीप्पणी बोलक्या आहेत.

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाह यांनी स्वत: टि्वट करुन ही माहिती दिली आहे.

मैड़म सुद्धा पाठीमागे दोन तीन वेळा परदेशी उपचार करण्यासाठी गेल्या होत्या !!!!! त्यावेळी देखील तुम्ही ती ' बातमी ' मिपावर छापली असेल अशी आशा आहे .

In reply to by ट्रम्प

परदेशी उपचार हा फक्त गांधी कुटुंबाचा व त्यांच्या चमच्यांचा एकाधिकार आहे . मोगा मिंया च दुखः हे आहे की भा ज प चे लोक उपचारासाठी परदेशी कसे काय जाउ शकतात ?

In reply to by डँबिस००७

मला असे वाटते की भाजपच्या लोकांचे स्वदेशी अणि आयुर्वेदावर प्रचंड असा अभिमान अणि विश्वास असताना विदेशी उपचार घेण्याची का गरज पडत असावी असे ब्लैक कैट याना कुत्सितपणे सांगायचे तर नसेल? हिपोक्रेसी का काय म्हणतात ते! === काही ही असो.. जेटलीजीनी लवकरात लवकर बरे ह्वावे ही ईश्वरचरणी सदिच्छा!

In reply to by विशुमित

आरोग्य क्षेत्र विशाल आहे , कुणी कुठेही उपचार घ्यावेत व निरामय आयुष्य जगावे , राहुल गांधींनीही जेटलीना लवकर बरे व्हा , अशा शुभेच्छा दिल्या आहेत .

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

"कुणी कुठेही उपचार घ्यावेत व निरामय आयुष्य जगावे " अगदी खरे. पण ह्यापुढे दुसर्या पक्षाचा नेता उपचारासाठी/पर्यटनासाठी कोठे जातो ह्यात विनाकारण लक्ष घालू नये. दुसर्यावर जी वेळ येते तीच आपल्यावर येऊ शकते हे आता समजले असेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कोण परदेशात उपचार घेतो कोण धनगराचे मलम लावतो. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे औषध वेगळे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

)))राहुल गांधींनीही जेटलीना लवकर बरे व्हा , अशा शुभेच्छा दिल्या आहेत ==)) पण त्यानी त्या शुभेच्छा वाचल्या नसाव्यात्त. अमेरिकेत जावून एका ब्लॉग च्या माध्यमातून गांधी घराणे (especially राहुल गांधीना) लक्ष केले आहे. दवाखान्यात सुद्धा काम करणे सोडत नाहीत. मानलं पाहिजे! किती वर्क होलिक!!

https://indianexpress.com/article/cities/delhi/jnu-sedition-case-ex-abv… JNU sedition case: Ex-ABVP members claim outfit planned row At a press conference, former JNU ABVP unit vice-president Jatin Goraiya and former joint-secretary Pradeep Narwal also claimed students present in a video shown by a news channel allegedly raising the slogan of ‘Pakistan Zindabad’ were actually ABVP members or sympathisers

In reply to by विशुमित

BJP Tears Into Rahul Gandhi After Congress's Shocking 'suwar Ka Zukham' Jibe At Amit Shah, Says The "rogue" Needs To Learn Human Values ही गोष्ट जगजाहीर आहे आणि तिचा काँग्रेसच्या गटांतील अनेक विरोधी पक्षांनीही निषेध केला आहे. त्या मूळ कन्नड भाषेतील भाषणातील, संबंधीत मजकूराचे भाषांतर असे आहे... "Amit Shah knows very well. Even Narendra Modi knows well that you can't shake Karnataka. On Rafale issue, they've looted Rs 30,000 cr. They think using that money you can destabilise the govt in Karnataka. If there is a duplicate or bogus Chanakya, it's Amit Shah and they've proven this point. They keep trying again and again. Amit Shah is party to this crisis. He's already kidnapped 6 MLAs and placed them at a Mumbai hotel. They've been taken as prisoners and BJP and RSS workers are keeping vigil outside. Some MLAs have returned, so Amit Shah is worried and has fallen ill. It's not a normal fever, it's called 'pig fever' or swine flu. If you try to meddle with the Karnataka govt, not just 'pig fever', you will also get diarrhoea and vomiting illness," he said.

कन्हय्या कुमार , शैला राशिद व उमर खालिद यांच्या वर दाखल केलेल्या भर भक्कम एफ आय आर मुळे अर्बन नक्षल गँगची तंतरलेली आहे. ९२ लोकांच्या साक्षी, १० चित्रफिती ( डॉक्टर केलेल्या २ वगळुन) उमर खालिद , कन्हय्या कुमार व शैला राशिद यांच्यातला वॉट्स अ‍ॅप मेसेजेस, टेक्स्ट मेसेजेस , कॉल डेटा सर्व ह्या एफ आय आर मध्ये घेतलेला आहे. दोन तिन महिन्या पुर्वी मी दोषी असेल तर सरकार अजुन एफ आय आर का दाखल करत नाही अस म्हणणारा कन्हय्या कुमार आता ऐन निवडणुकीच्या पुर्वी एफ आय आर का दाखल करत आहेत अशी दयनिय कैफियत मांडत आहे !! NDTV ची निधी राझदान तर म्हणते कि JNU च्या लहान पोरांना विचारुन बनवलेला एफ आय आर कोर्टात काय टिकणार ? एकंदरच CBI चा प्रमुख काय बदलला सगळ्या गोष्टी लाईनीवर यायला लागल्यात !!

आज ओरीसाच्या समुद्रकिनाऱ्यावरील चंडीपूर येथे हवेतून हवेत मिझाईल सोडण्याची एक चाचणी झाली. या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे हे मिझाईल भारतीय बनावटीच्या लढाऊ हेलिकॉप्टरवर बसवलेले होते. या मिझाईलने हवेतल्या उडत्या वस्तूचा अचूक वेध घेऊन ती वस्तू नष्ट करण्यात यश मिळवल. भारतात हे प्रथमच होतय. म्हणजे चाचण्या खूप झाल्या पण यश मिळत नव्हत. ते आज मिळाल. अशी १५ हेलिकॉप्टर बनवायची ऑर्डर हाल(HAL) ला मिळालीय. त्यातील १० वायूसेनेसाठी व ५ सैन्यासाठी बनवली जातील. हेल्मेटलाच जोडलेल्या स्क्रीनमुळे वैमानिक कुठल्याही दिशेने हे मिझाईल सोडू शकेल. त्यासाठी त्याला हेलिकॉप्टर वळवायची जरूरी भासणार नाही. डागा व विसरून जा प्रकारचे हे मिझाईल आहे. बाकी बरीच उपकरण या हेलिकॉप्टरला आहेत व त्यांची चाचणी मागच्याच वर्षी होऊन ती उपकरणे परिक्षेत उत्तिर्णही झाली होती फक्त आजच्या चाचणीसाठी आपण थांबलो होतो. हे हेलिकॉप्टर सियाचीनला वापरता येणार आहे. जगात एवढ्या उंचीवर वापरले जाणारे अशा प्रकारचे पहिलेच हेलिकॉप्टर असणार आहे. अनेक वर्षाचे स्वप्न साकार होते आहे. HAL चे अभिनंदन. आणि हो एक लिहावयाचे राहिलेच. टेस्ट पायलट म्हणून कर्नल रणजित चितळे होते हे वेगळे सांगायला नकोच.

महाराष्ट्र सरकारने न्यायालयात इतकी अभ्यासपूर्ण बाजू मांडली की कोर्टाने शिवस्मारकावर स्थगिती आणली आणि डान्सबार वरची बंदी उठवली. *अभ्यासू सरकार*

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

1.समुद्रात कोणतेही बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभगाची परवानगी हवी.ती शिव स्मारक समीतिने घेतलेली आहे. 2.शिव स्मारक झाल्यास समुद्रातील मासाली वर परीणाम हो ऊ न आमच्या ऊप जीविकेचा प्रश्न निर्माण होइल असा अर्ज कोळी बांधवां नी केला होता.त्यासाठी वरील प्रमाणे बांधकाम परवानगी शिवाय वेगळे ना हरक त पत्र कोर्टाने सादर करण्यास सांगीतले आहे.तो पर्यंत स्थ गिती दिली आहे. 3.डांस बार वर बंदी आहेच.कायद्याप्रमाणे हे "मनोरंजन केंद्र"असून नाटक,चित्रपट गृहा प्रमाणे ,"ऑर्केस्ट्रा आणी नृत्य गृह"चालवण्यास अत्यंत कडक अटी घालून न्यायालयाने संमती दिलेली आहे.सरकार चा संबंध फक्त कायदा आणी सुव्यवस्थे पुरता असुन त्याला पूर्ण सहकार्य देण्याची जबाबदारी सदरहू मनोरंजन्गृह मालकाची राहील. 4.हे नियाम इतके जाचक आहेत की अद्याप एक ही नवीन परवाना दिलेला दिसत नाही.

*कॉंग्रेसच्या काळातही विकास कामे झाली : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत* नागपूर : सध्या विकासाची गती संथ आहे. हे खरे असले तरी गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे मी मानत नाही. मी सकारात्मक विचार करणारा आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.   प्रहार या संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना डॉ. भागवत यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या वक्तव्याला छेद दिल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कॉंग्रेसमुक्त भारतच्या संदर्भात केलेल्या भाजप नेत्यांच्या विधानावर डॉ. मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांपासून गेल्या 70 वर्षांमध्ये काहीच विकास झाला नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपासून गल्लीतील नेत्यापर्यंत बोलले जाते. या सर्वांना डॉ. भागवत यांनी विधाने करताना "दक्ष' राहावे, असे सल्ला दिल्याचे बोलले जात आहे. http://www.sarkarnama.in/rss-progress-32893

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेताकन्हैय्या कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले आहे. याप्रकरणी कोर्टाने दिल्ली पोलिसांची चांगलीच कानउघाडणीही केली. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली नाही, असा सवाल कोर्टाने पोलिसांना केला. 'राज्याच्या कायदा विभागाकडून परवानगी न घेता तुम्ही आरोपपत्र दाखल केलेच कसे?' अशी विचारणा शहर दंडाधिकारी दीपक राजावत यांनी केली. दिल्ली पोलिसांनी कन्हैयासह उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य, आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली आणि खालिद बशीर भट यांच्या विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. संसद हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आलेला दहशतवादी अफझल गुरू याच्या समर्थनार्थ ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयूत एका कार्यक्रमाचं आयोजन करून देशद्रोही स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपली चूक मान्य करत 'आप' सरकारची परवानगी घेणार असल्याचं दंडाधिकाऱ्यांना सांगितलं. सोबतच यासाठी कोर्टाकडून १० दिवसांची मुदत मागून घेतली.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

1.न्यायदंडा धिकार्यानी पोलिसाना सक्षम अधिकारयाची परवानगीघेउन आरोप पत्र फेरसादरकरण्यास सांगितले आहे 2.दिल्ली पोलिस नायब राज्य पालान्च्या अखत्या रीत आहेत.दिली सरकारच्या नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

1.न्यायदंडा धिकार्यानी पोलिसाना सक्षम अधिकारयाची परवानगीघेउन आरोप पत्र फेरसादरकरण्यास सांगितले आहे 2.दिल्ली पोलिस नायब राज्य पालान्च्या अखत्या रीत आहेत.दिली सरकारच्या नाही.

संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम उंच पर्वतरांगांमुळे लेह, लडाख व कारगील हे नेहमीच पाॅवरग्रीडपासून वंचित राहीले होते. पण या डोंगररांगांतून ३५० किमीची लाईन टाकण्यात आपल्याला आता यश मिळाल आहे. भारताच्या सर्वात उत्तरेला असलेला भाग आता राष्ट्रीय ग्रीडमधे आला आहे. या कामाचा शिलान्यास समारंभ मोदींच्या हस्ते १२ आॅगस्ट २०१४ रोजी साजरा झाला व ४ दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाले. या कामाचे सुरक्षीततेच्या दृष्टिने महत्व आहेच. पण त्याचबरोबर इथल्या लोकांच्या जिवनात खूपच फरक पडणार आहे. उणे ५० डिग्री तपमान असताना अखंडीत विज असण्याचे महत्व वेगळेच. जनरेटर्स चालवण्यासाठी कित्येक दशलक्ष लिटर्सचे डिझेल आता वाचणार आहे. पर्यटनाला फायदा होणार आहे व एकूणच अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. २०१३ पासून एनएचपीसी वीज निर्मिती करत होती व या भागाला विज पुरवली जायची. पण ग्रीडच्या जोडणीअभावी ही विजनिर्मिती पूर्ण क्षमतेने करता येत नव्हती. आता मात्र ही विज निर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू करून उन्हाळ्यात जास्तीची विज ग्रीडला पाठवायची व हिवाळ्यात १००-१५० मेगॅवॅट ग्रीडमधून उचलणे शक्य होणार आहे. महत्वाचे म्हणजे सोलर प्रोजेक्टमधून ७.५ गिगॅवॅट विज निर्माण करून ती ग्रीडला पाठवणे आता शक्य होईल. इतकेच नव्हे तर लडाख व कारगील हा भाग भारताचा अति उत्तरेकडील वीजनिर्मिती केंद्र म्हणून ओळखला जाऊ शकेल.

In reply to by शाम भागवत

ऊत्तम माहिती ! याने लेहमधील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होऊ शकते. लेह सारखी थंड हवामानाची ठिकाणे विकसित केल्यास भारतिय लोकांना आपल्याच देशात थंड हवामानातल्या सहलींचा आनंद घेता येईल. यामुळे, महत्वाचे परकीय चलन तर वाचेलच, पण लेहसारख्या दुर्लक्षित भागाचा विकासही होईल.

आयएलएफएस डबघाईला आल्याने झोजिला बोगदा बासनात. परत टेंडर मागवणार. बोगीबीलचे श्रेय लाटणारे मोदी ह्याचं अपश्रेय कॉंग्रेसच्या गळ्यात मारणार. https://www.thehindubusinessline.com/companies/after-scrapping-6800-cr-zojila-tunnel-ilfs-road-may-stop-3-more-projects/article26017322.ece

In reply to by नगरीनिरंजन

आयएलएफएस डबघाईला आल्याने झोजिला बोगदा बासनात. परत टेंडर मागवणार. बोगीबीलचे श्रेय लाटणारे मोदी ह्याचं अपश्रेय कॉंग्रेसच्या गळ्यात मारणार. मगरीचे अश्रु बंद करा, आयएलएफएस डबघाईला आल्याच कारण काँग्रेसच आहे, तत्पुर्वी २०१३ ला कॅबिनेटची ह्या प्रकल्पाला परवानगी मिळाल्यावर टेंडर नोटिसा निघाल्या त्यात आयएलएफएस च टेंडर सर्वात कमी होत व त्यांना काश्मिरातलाच Chenani-Nashri Tunnel हा प्रकल्प पुर्ण करण्याचा अनुभव होता त्याबळावर आयएलएफएस ला हे काम २०१८ ला मिळाल. जानेवारी २०१८ पासुन ५ वर्षांत हा बोगदा पुर्ण व्हायला पाहीजे होता पण आयएलएफएसच्या प्रॉब्लेम मुळे सरकारने लगचे निर्णय घेऊन आयएलएफएस ला ह्या कामावरुन हटवले. लगेच निर्णय घेणे हे सुद्धा एका चांगल्या सरकारचे गुण असतात. वायुदलासाठी तसेच देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे लढाऊ विमान १२ वर्षे खरेदी करु न शकणार्या निरुपयोगी सरकारपेक्षा हे सरकार फार फार बरे !!

In reply to by डँबिस००७

अरे! कॉंग्रेसच्या गळियात अपश्रेय मारायचे काम मोदींना करावेच लागत नाही. भक्तच परस्पर करतात! वाह मोदीजी वाह!

In reply to by डँबिस००७

ह्याच्या सारखेच खाजगीतही अनेक कॉर्पोरेट प्रोजेक्ट्स स्टॉल्ड आहेत अर्थव्यवस्थेची तंतरल्यामुळे याकडे भक्त सोयीस्करपणे दुर्लक्ष करणार!

काश्मीर हा भारताचाच भाग आहे, यामध्ये पाकिस्तानने लुडबुड करणे बंद करावे असे एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, होता आणि यापुढेही असेल असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या प्रश्नात पाकिस्तानने नाक खुपसण्याची अजिबात गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर प्रश्न हा जेम्स बॉन्ड किंवा रॅम्बो सिनेमातील धोरणांप्रमाणे सोडवावा असे आपल्याला वाटत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्या ओवैसी ला कोणीही काहीही म्हणो पण मला मात्र त्याचे आश्चर्ययुक्त कुतूहल वाटते !!! 15 मिनटात कापाकापी चा विषय सोडला तर हा माणूस अभ्यासपूर्वक बोलतो . अल्पसंख्यक समाज मध्ये याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्या मुळे अल्पसंख्यक चा ढोंगी मसीहा काँग्रेस चे धाबे दणानले आहेत .

नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे mhnmk.com | NMK All Maha NMK Job Recruitments advertisement details in Marathi in one place. Maha MH NMK Marathi Nokari Recruitments details information in Marathi with NMK Mahanews Mahajobs Updates about latest jobs, upcoming Naurki ads and MahaNews Maharashtra Government Jobs Details.

Less than three months before the parliamentary elections, the Europe chapter of the Indian Journalists’ Association (IJA) is set to demonstrate how electronic voting machines (EVMs) can be hacked. The demonstration will be held in London Monday, and the IJA has roped in a US-based cyber expert, who they say is also a designer of EVMs in India. “His contention is these machines are not only hackable, but have routinely been hacked in recent Indian national and state elections so as to rig elections,” reads the IJA invite. https://theprint.in/governance/how-to-hack-indian-evms-us-cyber-expert-…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

निवडणुक आयोगाच्या EVM Machine हॅक करुन दाखवा ह्या खुल्या चॅलेंजला कोणी माई का लाल समोर आला नव्हता मग ईंग्लंड मध्ये EVM Machine हॅक करुन दाखवली तरी फरक पडणार नाही कारण निवडणुका सध्या तरी भारताच्या बाहेर होण्याचा चांस नाहीय !! पुढे मागे कॉंग्रेसने बनवलेल्या EVM Machines मात्र हॅक झाल्या नाही तरच नवल !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अजून कोणत्याही गोष्टीसाठी इंग्लंडकडे पहायचे सोडून द्या. गोर्‍यांचे राज्य १९४७ साली संपले. तुमच्या मनातूनही त्याला जितके हद्दपार कराल, तितके तुम्हाला नीट दिसू लागेल. (कठीण आहे, पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही.) :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नुसते बेलट पेपर स्वीकारले तर गोरयांचे अनुकरण होते का ? ( तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत)

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हाहाहा..!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

गोरे करतात ते सर्वोत्तम असते, अशी गुलामिची मनोवस्था अजून काही भारतियांमध्ये जागून आहे, हे दु:खद आहे. १. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच दिले होते, हे इतक्यातच विसरलात ? सत्य व तर्कशुद्ध बोलत राहण्याचा सर्वात मोठा फायदा असा की पूर्वी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागत नाही, आणि मग असे होत नाही. =)) २. शिवाय, तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत अश्या असंबंध टीप्पणीमुळे सभ्यतेने वादविवाद करण्याची तुमची क्षमता (परत एकदा) उघड झाली आहे. बेताल वक्तव्ये करून तोंडावर आपटल्यानंतर, स्वतःवरचा ताबा सुटून, काहींची अशी अवस्था (वारंवार) होते. तेव्हा, उगी उगी ! =)) =)) =)) *************** अवांतर : आता विषय काढलाच म्हणूनच केवळ सांगत आहे की, माझ्या एका कर्मभूमीत अनेक गोरे माझे कनिष्ठ म्हणून काम करत होते. सर्वसाधारण गोर्‍यात विशेष फार मोठी विचारक्षमता आहे असे मला दिसले नाही. मात्र, कातडी गोरी आहे म्हणून त्यांच्यासमोर (शारिरिक व मानसिकरित्या) सतत वाकून राहणारे अनेक भारतिय होते व त्याचा ते पुरेपूर फायदा उठवत असत, हे पाहून सकारण दु:ख होत असे. भारतातही अजून असे लोक आहेत, हे सिद्ध करणारे प्रतिसाद वाचून काय वाटते, हे तुम्हाला सांगून समजणार नाही आणि ते तुम्हाला सांगण्यात अर्थही नाही. :( तेव्हा, मोठे व्हा!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

म्हणून मी विचारले , की डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीत , यात माझी काहीच चूक नाही, इंग्रजी अनुकरण , म्हणून ,बेलेट पेपर वापरा , असेही मी बोललो नाही, मी सहज विचारले होते , Evm बंद केलेल्या अनेक देशांची सकारण यादी नेटवर आहे, आणि evm ला विरोध ह्या लोहपुरुषांनीही केला होता, अडवाणी , १०इयर चॅलेंज 2009-2019 उदाहरण घ्यायला हरकत नसावी. http://archive.indianexpress.com/news/advani-has-doubts-about-evm-wants…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आणि EVM परदेशातून आले , तर बेलेट पेपर भारतात भोजराजाने आणले की काय ? तेही परदेशातच प्रथम वापरले गेले ना ? अमेरिकेत ना ? मग जगाने अनुकरण केले ना ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

दुसर्‍याने (मग ते ज्याच्या पायी आपली निष्ठा वाहिली आहे अश्या आपल्या नेत्याने असो, की दुसर्‍या एखाद्या देशाने) केले म्हणून ते बरोबर आणि आपण पण तेच करायला पाहिजे, यालाच गुलामगिरीची मनोवस्था म्हणतात. अश्या मनोवस्थेत, जगाने अनुकरण करावे असे काही आपण काही तरी जगात सर्वप्रथम करावे (किंवा करू शकतो) हा विचार मनाला शिवत नाही! आधी ज्यांना आपण नाक मुरडले आहे अश्या गोष्टी (उदा : योग) पश्चिमेकडे जाऊन परत आल्या (उदा : योगा) की मग आपोआप गोड वाटू लागतात. अनेक पाश्चिमात्य देश ईव्हीएमच्या वापराचा विचार करत आहेत. त्यांनी त्याचा वापर सुरु केला की मग ते अश्या मनोवस्थेला चांगले वाटू लागेल. =)) =)) ही मनोवस्था बदलणे कठीण असते. बाकी चालू द्या. शुभेच्छा !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

Evm हैक होतात ऐसे जर काँग्रेस के म्हणणे आहे तर 1999 पासून 2009 पर्यंत एम एम चे सरकार मशीन हैक करून निवडून आले होते ऐसे म्हणावे लागेल . मग त्या न्याय्याने मोदिना अजुन 5 वर्ष सरकार चालवायला भेटली पाहिजे .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारतीय निवडणूक आयोगाने त्या गोर्याना पण चालेंज द्यायला हवे की आमच्या भारतात येवून EVM ह्याक करुन दाखवा.. काय हरकत आहे? मग काळे भेदच नाही रहायचा?

In reply to by विशुमित

भारतीय निवडणूक आयोगाने सगळ्यांनाच खुल्ले चालेंज दिले होते पण काळा का गोरा कोणीही आला नव्हता !!

In reply to by डँबिस००७

काथ्या कुटायला ह्या घ्या दोन बातम्या. .. === https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-sp-bsp-congress-aap-invol… https://www.loksatta.com/desh-videsh-news/gopinath-munde-was-aware-of-e…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

खुद्द इंग्लडवालेही विलेक्शनला पेपर वापरतात ना ? इंग्लडवालेही विलेक्शनलाच नव्हे तर इतर अनेक गोष्टींसाठी पेपर वापरतात. मग पुढे?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

जेथेजेथे कायदा,तेथे तेथे पळवाट त्याप्रमाणेजेथे संगणकीय तांत्र , तेथेह्यकिंगची शक्यता आहेच.त्यावर उतारा म्हणून्ं EVPAT असे काही तरी तन्त्र आहेच.त्यात मतदाराला छापील पावती मी ळ ते असे म्हणतात.(मी अजून अनुभवले नाही)

In reply to by Chandu

पावती बहुतेक मिळत नाही , एका वेगळ्या पेटीत त्या पावतीचे सात की किती सेकंद दर्शन होते अन मग ती पावती पेटीत अंतर्धान पावते, हातात येत नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

पावती सात सेकंदानंतर पेटीत पडते हे बरोबर (पण अर्धवट). पुढे जाऊन गरज पडल्यावर त्या पावत्यांचीही गणना करता येते. आणि सात सेकंदात एखाद्या व्यक्तीला पावतीवरील नाव जरी वाचता आले नाही तरी चिन्ह नक्कीच कळेल? संदर्भ : https://www.misalpav.com/node/43800 पण आजवरची तुमची वाटचाल बघता, तुम्हाला सकारात्मक चर्चा न करता फक्त गैरसमज आणि गोंधळच माजवायचा असतो हे कळतं.

India likely to surpass UK in world's largest economy rankings: Report https://m.timesofindia.com/india/india-likely-to-surpass-uk-in-the-worl… वर्ल्ड बँकेच्या अहवाला नुसार २०१७ मध्ये भारताच्या अर्थ व्यवस्थेने फ्रांसच्या अर्थ व्यवस्थेला मागे टाकल होत ! ५-६ जागेसाठीची स्पर्धा ईंग्लंड व फ्रांस मध्ये दर वर्षी असते. फ्रांसला मागे टाकल्याने ह्या वर्षी भारत ईंग्लंडलाही मागे टाकेल अशी आशा वर्ल्ड बँकेच्या अहवालात केलेली आहे !! अंध विरोधकांच अश्या बातम्यांकडे दुर्लक्ष होण असहज आहे ! किती डोळे झाक कराल ? हा विजय भारतीय अर्थ व्यवस्थेचा म्हणजे जनतेचा आहे ! अर्थ व्यवस्थेला वळण द्यायचे काम नेत्याचे आहे हे आणी नेता काम करत आहे व अश्या बातमी मुळे अर्थ व्यवस्था योग्य मार्गावर आहे ह्याला दुजोरा मिळतो !!