सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
प्रतिक्रिया
7 Jan 2019 - 7:12 pm | तेजस आठवले
कागलकर तुम्ही फेबु, व्हॉट्सअँप वर पडीक असता मग रुग्ण कधी तपासता ?
तुम्हाला मिपावर तहहयात आरक्षण कसे काय मिळते ते पण सांगा एकदा सगळ्यांना.
7 Jan 2019 - 9:24 pm | विशुमित
हे बरोबर नाही. याचा अर्थ रेगुलर मिपाकर हे पडिक असतात असा अर्थ घ्यायचा का??
8 Jan 2019 - 9:42 am | सुबोध खरे
मिपावर तहहयात आरक्षण
a cat has nine lives.
8 Jan 2019 - 7:02 pm | गामा पैलवान
मांजरीस नवजीवन (= ९ जीवने) मिळते.
-गा.पै.
7 Jan 2019 - 7:29 pm | मदनबाण
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दहा टक्के आरक्षण, मोदी सरकारचा निर्णय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हुस्न पंचम... ;) :- ZERO
8 Jan 2019 - 7:00 pm | डँबिस००७
देशात नव्याने सुरु झालेल्या Iconic ट्रेन १८ वर रेल्वे ट्रॅकवरच्या माणसाने दगड भिरकावला ! त्यामुळे ट्रायल वर वेगाने जाणार्या ह्या ट्रेनची एक ग्लास फुटली ! आत प्रवासी नसल्याने कोणाला दुखापत झालेली नाही !
कसल्या मानसिकतेचे प्रदर्शन हे दगड फेके करतात ? काय आसुरी आनंद मिळतो त्यांना ? काही वर्षांपुर्वी मुंबईत लोकल वर झालेल्या दगड फेकीत एका स्रीला आपला डोळा गमवावा लागला होता!! तो अपराधी मिळाला वा नाही हे समजल नाही !!
8 Jan 2019 - 7:57 pm | Blackcat (not verified)
डॉ. श्रीराम लागू ह्यांचा मुलगाही लोकलवर दगड टाकल्याने जखमी झाला होता.
8 Jan 2019 - 8:13 pm | सुबोध खरे
जखमी नव्हे मृत्युमुखी (दुर्दैवाने)
8 Jan 2019 - 8:43 pm | डँबिस००७
चालणार्या रेल्वेवर विरुद्ध दिशेने येणारा दगड हा खुप फोर्स ने लागत असतो, अगदी छोट खडाही असा रेल्वेवर लागला तर काचेची खिडकीच काय, अल्युमिनियमची भींत ही तडकवु शकतो. हे रेल्वे च्या ट्रॅकवर दगड फेक करणार्या लोकांच्या डोक्यात येत नसते, त्यांच्या मते ते गंम्मत करत असतात पण कोणा एकाद्याच्या जिवाशी खेळ होतो.
अश्या लोकांना जर पकडायच असेल तर रेल्वेच्या आजु बाजुला कॅमेरे लावावे लागतील पण हे अशक्य आहे. लोकांनीच हे काम करायला पाहीजे, आपल्या मोबाईल मध्यल्या कॅमेर्याने फोटो घेऊन पोलिसांना द्यावे व पोलिसांनी त्यांना पकडुन, पोलिसी खाक्या दाखवावा.
8 Jan 2019 - 8:44 pm | डँबिस००७
एखाद्या दुर्दैवी अपघातात आपल्या कॅमेर्यात लाईव्ह गोष्टी कैद करणारे महाभाग अश्या गोष्टी आपल्या जवाबदारी खाली येतात हे विसरतात.
8 Jan 2019 - 8:49 pm | सुबोध खरे
पोलिसांनी त्यांना पकडुन, पोलिसी खाक्या दाखवावा.
आणि याला सार्वत्रिक प्रसिद्धी द्यावी
पण आपल्याकडे असे झाले तर मेणबत्त्या घेऊन हलकट मानव अधिकार वाले मोर्चा काढतील आणि त्या पोलिसांवर चौकशीचा ससेमिरा लागेल.
9 Jan 2019 - 12:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
उगीच मानवी अधिकारवाल्यांच्या नावाने कशाला रिसीट फाडायची? भारतात अनेक वेळा पोलिस निर्दयपणे मारतात, संशयित म्हणून अनेक महिने डांबून ठेवतात, एन्काउण्टरच्या नावाखाली पैसे उकळतात.. ही वस्तुस्थिती आहे ना ? मध्यमवर्गाला ह्याची सहसा ह्याची झळ पोचत नाही पण गरीब वर्गातील अनेकांना हा नुभव येतो.
'विजय' चोर, जो अर्थमंत्र्यांना पळण्याआधी एक दिवस भेटतो , ३० बॅगा भरून इंग्लंडला पळतो, बाकीचे 'नीरव' चोर/संदेसरा चोर... ह्या चोरांना भारतात आणून 'पोलिसी खाक्या' कधी दाखवला जाणार ? की मग आता इंटरपोलच्या नावाने रिसीट फाडायची?
9 Jan 2019 - 1:06 pm | सुबोध खरे
माईसाहेब
सामान्य माणसांना आणि असामान्य माणसांना कायदे वेगळे असतात.
तुमच्या ह्यांना "घोटाळा" करून कुरसुंदीहून ३० बॅगा घेऊन परदेशात पळून जात येईल का?
मल्ल्या साहेबाना मदत करणारे कोण कोण आहेत ते पाहून घ्या हो.
He was elected to the Rajya Sabha as independent member twice from his home state of Karnataka, first in 2002 with the support of the Janata Dal (Secular) and Indian National Congress and then in 2010 with the support of the Janata Dal (Secular) and BJP [37].
तेंव्हा त्यांना बाहेर जाण्यास कुणी कुणी मदत केली असेल ते समजून घ्या
असे करणारे लोक हाताच्या बोटावर मोजता येतील असे असतात. आणि त्यांना सहजासहजी कोणी हात लावू शकत नाही. श्री मोदी यांनी त्यांनी केलेल्या घोटाळ्यापेक्षा जास्त संपत्ती जप्त करून केवळ विरोधी पक्षाचा नव्हे तर स्वपक्षातील लोकांचा रोष ओढवून घेतलेला आहे. राजकारण हे असंच आहे.
श्री राहुल गांधी अमेरिकेत परकीय चलनाच्या घोटाळ्यात अडकले( मादक द्रव्याच्या लफड्यात असे गुप्तचर विभागाचा अहवाल सांगत असे) असताना श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले "वजन" खर्च करून त्यांना सोडवले होते हा इतिहास आहेच ना?
ज्या दहशतवाद्याला ए के ४७ आणि हातबॉम्ब सकट पकडले असता दुसऱ्या दिवशी तो जामिनावर सुटतो आणि पुढच्याच शुक्रवारी फारुख अब्दुल्लांबरोबर नमाज पढताना दिसतो हे माझ्या वर्गमित्राने स्वतः पाहीलेले उदाहरण आहे.
सुरक्षा दलांनी एक्सीलरेटरवर पाय द्यायचा आणि राजकारण्यांनी ब्रेक मारायचा अशी नैराश्य आणणारी स्थिती कायमच दिसत आली आहे.
अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत.
इसाप म्हणून गेला आहे कि छोट्या चोरांना फाशी दिले जाते आणि मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो.
पण कोणीही उठावे आणि रेल्वेवर दगडफेक करावी हे कसे चालेल. असे सरसकटीकरण होऊ दिले जाणे राजकारणी लोकांना कसे चालेल?
बाकी मानव अधिकार वाल्यांबद्दल न बोलणेच चांगले. याकूब मेमनला मानवाधिकार असतात
पण मेजर गोगोई यांनी केवळ दहशतवाद्याला जीपला पुढे बांधले म्हणून त्यांची चौकशी झाली हि आपल्याकडे शोकांतिका आहे.
त्या दहशतवाद्याला जीपला पुढे बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले.
https://www.news18.com/news/india/human-rights-panel-directs-jk-govt-to-...
9 Jan 2019 - 1:17 pm | Blackcat (not verified)
घोटाळे केले , हा एक गुन्हा , तो काँग्रेस काळात झाला ,
मग पळून जाणे , हा दुसरा ( स्वतंत्र) गुन्हा , तेंव्हा सरकारात कोण होते , त्यांच्यावरही जबाबदारी येणारच ना ?
की सगळ्याला नेहरू गांधी काँग्रेस जबाबदार ?
5 वर्षे बाजपेयीं व 5 वर्षे मोदी येऊनही काँग्रेस काळात सर्वाना न्याय सारखा नव्हता , याचे तुणतुणे कशाला ?
आणि कर्जापेक्षा जास्त वसुली कुठल्या प्रकरणात केली म्हणे ?
9 Jan 2019 - 1:21 pm | Blackcat (not verified)
साक्षात इसाप म्हणून गेला आहे कि छोट्या चोरांना फाशी दिले जाते आणि मोठ्या चोरांना सलाम ठोकला जातो.
मग फक्त आमच्या बिचार्या काँग्रेसलाच का दोष द्यायचा म्हणे ?
10 Jan 2019 - 10:41 am | सुबोध खरे
बिचार्या काँग्रेसलाच का दोष द्यायचा
हो ना
बिचारे काँग्रेस वाले त्यांचा २ G, कोळसा, कॉमन वेल्थ इ. कशाकशाशी संबंध नाही. हे प्रेसवाले उगाच त्यांना बदनाम करत आहेत.
पण ते प्रेस वाले तर काँग्रेसचेच खाते पिते आहेत ना?
बघा ना घरचं खाऊन परक्याची चाकरी करायची म्हणजे?
नाक्यावर ऐकलेला एक संवाद
9 Jan 2019 - 1:26 pm | Blackcat (not verified)
राहुल गांधी , डॉलर ( ड्रग ? ) हेही प्रकरण सांगोवांगीच दिसते आहे .
9 Jan 2019 - 1:38 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हे प्रकरण २००१ साली आम्हीही ऐकले होते रे ब्लॅक-कॅट्या. तेव्हा दोन प्रश्न पडले होते जे अजूनही अनुत्तरीत आहेत.
१) वाजपेयीनी अमेरिकन अध्य़क्षांना फोन केला होता असे ऐकले होते. खरे तर अशी अनायासे काँग्रेसच्या बदनामीची संधी चालून आली असताना भाजपाने ही संधी सोडली कशी?
२) अमेरिकन कस्टम खाते ज्यात सरकारी हस्तक्षेप सहसा नसतो, त्यांनी असे सहजासहजी सोडून दिले? हे ही विश्वास ठेवायला कठिण वाटते.
10 Jan 2019 - 10:37 am | सुबोध खरे
http://zeenews.india.com/news/india/rahul-gandhi-was-caught-in-us-with-d...
http://subramanianswamy.blogspot.com/2013/04/dr-subramanian-swamy-explai...
10 Jan 2019 - 11:49 am | Blackcat (not verified)
मूळ 2001 की 3 ची एकही बातमी नाही,
हा त्याला बोलला , तो ह्याला , मग त्याने पेपरात लिहिले , ते वाचून तुम्ही लिहिले , असेच ते आहे ,
10 Jan 2019 - 12:27 pm | सुबोध खरे
२००१ चे हि दुवे आहेत पण ते तुम्हीच जरा खणून काढा (नुसती पचपच करण्यापेक्षा) .
तुम्हाला सोयीचे काही होईल असे करण्याची माझी मुळीच तयारी नाही.
सुब्रमण्यम स्वामी हे एक खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खोटे बोलत आहेत म्हणून खटला करण्याची गांधी कुटुम्बाची हिम्मत होत नाही यावरून काय ते समजून घ्या.
9 Jan 2019 - 1:56 pm | विशुमित
(उगीच मानवी अधिकारवाल्यांच्या नावाने कशाला रिसीट फाडायची)
==)) आजकाल ती फ्याशन झाली आहे. विषय कोणता ही असो पुरोगामी, मानव अधिकार, पू. वाप्सी वाले, कर्जमाफी, पिछले 60साल, कॉंग्रेस्सी म्हणून मोकळे होय्चे. हा का ना का
===
तरी प्रतिसादकर्ते System मधे काम केले ले आहेत.असो...
9 Jan 2019 - 7:08 pm | सुबोध खरे
त्या दहशतवाद्याला जीपला पुढे बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळाले.
https://www.news18.com/news/india/human-rights-panel-directs-jk-govt-to-...
हा दुवा वाचला का?
काश्मीर मध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिक आणि अर्ध सैनिक दलांची काहीच किंमत नाही?
का नेहेमीप्रमाणे त्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून पगार मिळतो आहे ना? त्यांना दगड खायला / मरायलाच नोकरी दिलेली आहे.
दहशतवादापासून आपल्या सैनिकांना वाचवणार्या सैनिकी अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीचं लफडं लावलं आणि ज्याला जीपला पुढे बांधलं त्याला १० लाख रुपये दिले.
गटाराचे झाकण नसल्याने त्यात वाहून गेलेल्या माणसाच्या कुटुंबाला २ लाख मिळतात. कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून २ लाख मिळतात. रेल्वे अपघातात गेलेल्या तरुण माणसाच्या विधवेला ५ लाख रुपये मिळतात. मग हा गोमाजी कोण लागून गेला हो?
का काश्मीरच्या मधल्या माणसांचे मानवाधिकार इतर भारतातील माणसांपेक्षा जास्त आहेत.
बाकी "पू. वाप्सी वाले, कर्जमाफी, पिछले 60साल, कॉंग्रेस्सी म्हणून मोकळे होय्चे. हा का ना का"
हे सर्व वड्याचे तेल वांग्यावर नात्याने या प्रतिसादात आणले तेंव्हा तुमचा पूर्वग्रह लगेच दिसून येतोच आहे.
तेंव्हा चालू द्या.
9 Jan 2019 - 7:18 pm | Blackcat (not verified)
https://www.indiatoday.in/india/story/farooq-ahmad-dar-tied-to-army-jeep...
पोलीस म्हणतात की तो फक्त वोटिंगला घराबाहेर आला होता,
जर अतिरेकी होता , तर त्याच्यावर कारवाई कधी झाली होती का ? की नुसते जीपला बांधून सोडून द्यायचे , हीच कारवाई ?
9 Jan 2019 - 7:29 pm | सुबोध खरे
कसाबला सर्व पुरावे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले तुकाराम ओंबळे यांनी बंदुकीसकट पकडला तरी दहशतवादी जाहीर करून फाशी द्यायला पूर्ण चार वर्षे लागली
फुकटच्या फुसकुल्या सोडू नका.
दहशतवादी पकडणे आणि त्याला कोर्टात उभे करून शिक्षा देणे हि गोष्ट मिपावर दर वेळेस हाकलले तरी लोचटासारख्या नवीन नवीन आय डी घेऊन येण्या इतके सोपे वाटले का?
काश्मीर पोलिसांची निष्ठा कुठे पाणी भरते आहे ते एकदा श्रीनगरच्या पुढे चार दिवस प्रवासी म्हणून राहून या म्हणजे मग कळेल.
आणि जीपला बांधल्याबद्दल १० लाख रुपये मिळणार असतील तर मी दर महिन्याला जीपला उलट टांगून घ्यायला तयार आहे.
9 Jan 2019 - 7:33 pm | Blackcat (not verified)
सर्वात महत्वाचे म्हणजे ,
हे प्रकरण झाले 2017 ला , तेंव्हा खुद्द काश्मिरात भाजपा व केंद्रात मोदी सरकार होते,
जर तो अतिरेकी असता तर मोदी सरकारने त्याला आत टाकला असता ,
पण कदाचित तो अतिरेकी नसेल म्हणून त्याच्या मनसतापाची भरपाई म्हणून मोदी सरकारनेच त्याला दहा लाख दिले ( अजून 5 द्यायला हवे होते , म्हणजे एकाला तरी 15 लाख मिळाले असते ! )
त्याच्या 10 लाखाबद्दल कुरकुर करून तुम्ही मोदींची गुंणग्राहकता , न्याय , व 56 इंच ह्या सर्वास काळिमा लावण्याचे कृत्य का बरे करत आहात ?
9 Jan 2019 - 11:28 pm | विशुमित
त्याच्या 10 लाखाबद्दल कुरकुर करून तुम्ही मोदींची गुंणग्राहकता , न्याय , व 56 इंच ह्या सर्वास काळिमा लावण्याचे कृत्य का बरे करत आहात ?
==अरर्रा खतरनाक.
9 Jan 2019 - 11:09 pm | विशुमित
रेल्वेवर दगड मारणारा पोरासाठी किती मेन्बत्यावाले येतात ते आपण बघूच!
===
उगाच आपली अजेंडायुक्त मळमळ जिथे तिथे काढत बसायची.
9 Jan 2019 - 11:16 pm | विशुमित
)काश्मीर मध्ये जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या सैनिक आणि अर्ध सैनिक दलांची काहीच किंमत नाही?
का नेहेमीप्रमाणे त्यांना आमच्या करदात्यांच्या पैशातून पगार मिळतो आहे ना? त्यांना दगड खायला / मरायलाच नोकरी दिलेली आहे.))
==)) मनाला येईल ते काही ही फेकता तुम्ही. कोणी किंमत दिली सैनिकाना. जिथे अतिरेक झाला तिथेच त्याना टोक ले गेले.
9 Jan 2019 - 11:18 pm | विशुमित
"कोणी किंमत दिली नाही सैनिकाना" असे वाचावे
10 Jan 2019 - 10:30 am | सुबोध खरे
कोणी किंमत दिली सैनिकाना.
हे (चुकून) खरं लिहिलंत पहा.
10 Jan 2019 - 11:34 am | विशुमित
प्रतिसादाचा आशय बघता टंकन चूक आहे हे शेमड्या पोराला पण समजले असते.
आपण तर हुशार आणि अभ्यासू आहात.
===
बाकी तुम्हाला शिक्के मरायची भारी हौस आहे.
जणू आम्हाला सैन्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकीच नाही.
===
<ins><strong>(संपादित)</strong></ins>
10 Jan 2019 - 11:46 am | सुबोध खरे
अवांतर: तुमच्या मुलाला प्रोत्साहीत करता की नाही आर्मीत जायला?
याचं उत्तर मी मागेच मिपावर दिलं आहे. शोधून काढा हवं तर.
जिथे अतिरेक झाला तिथेच त्याना टोक ले गेले.
किती अतिरेक झाला आणि त्याबद्दल १० लाख मिळाले हे वाचून आपली विचारसरणी समजली.
बाकी चालू द्या
10 Jan 2019 - 11:47 am | सुबोध खरे
बाकी मुद्दे संपले कि वैयक्तिक पातळीवर उतरण्याची सवय काही जात नाही.
असो.
10 Jan 2019 - 11:55 am | विशुमित
बाकी मुद्दे संपले कि वैयक्तिक पातळीवर उतरण्याची सवय काही जात नाही.
=== लोग सब जाणते है! कोण काय कर्तय ते.
10 Jan 2019 - 12:00 pm | विशुमित
किती अतिरेक झाला आणि त्याबद्दल १० लाख मिळाले हे वाचून आपली विचारसरणी समजली.
==)) बघा मारला शिक्का!
===
<strong><ins>संपादित</ins></strong>
10 Jan 2019 - 12:28 pm | सुबोध खरे
]
माझ्या मुलाने काय करावे हे सांगणारे/ विचारणारे तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात?
एवढीच जळजळ होत असेल तर काढा शोधून. मिपावरच आहे ते
10 Jan 2019 - 12:35 pm | Blackcat (not verified)
म्हणूनच सोनिया गांधींनी मुलाचे काय करावे , याबाबत तुमची मते आम्ही ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतो.
10 Jan 2019 - 12:38 pm | सुबोध खरे
वा!
काय असंबद्ध प्रतिसाद आहे?
artificial intelligence is no match for natural stupidity
10 Jan 2019 - 1:36 pm | साहेब..
वा!
10 Jan 2019 - 2:36 pm | ट्रम्प
भारतीय सैन्य ठिकानाची हेरगिरी करण्यात पूर्वी फक्त अल्पसंख्यक समाजाचे लोक सापडत होते परंतु गेले 10 / 15 वर्षात जेवणाच्या थाळीत भोक मारण्याची सवय हिंदू समाजात वाढल्या मुळे सैन्यविरोधात उलटसुलट प्रतिसाद देणाऱ्या मध्ये तीच वृत्ती आढळते , सैन्याकडून मोहिमा प्रतिकूल परिस्थितित राबवताना काही चुका होत असतील पण भाजप वरील राग सैन्यावर काढू नका .
10 Jan 2019 - 5:26 pm | विशुमित
कोण राग काढतय सैन्या वर? उगाच असंबंध रेटून लिहायचे?
धर्मांध लोकांनी भाजप प्रेमापायी दिसेल त्याला गप्प बसवण्याचे तन्त्र अवलंबले आहे.
==
तुमच्या घरात सैन्यामधे कोण कोण आहे ? माझ्या घरात आहे अणि पंचक्रोशीत नात्यातील 40एक फौज मधे आहेत. डॉक्टर साहेबां इतके Technical Knowledge नसेल कदचित पण मी सैन्य जीवन खुप जवळून अनुभवले आहे. संपादक मन्डळ अणि डॉक्टर साहेबांना माझा प्रश्न का रुचला नाही हे याच्यत सर्व आले.
===
देश हा सिस्टम वर चालत असतो. त्यात चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. पण याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टींचा ट्रेंड सेट केला जावा.
10 Jan 2019 - 4:53 pm | विशुमित
सैन्याबद्दल माझी विचारसरणी काय आहे हे विचारणारे/ठरवणारे तुम्ही कोण दत्तोजी लागुन गेला आहात?
===
आमचे पोट एकदम व्यवस्थित आहे. काही जळजळ नाही.
10 Jan 2019 - 8:42 pm | ट्रम्प
सैन्याबद्दल तुमचे उदात्त विचार सांगण्या साठी पंचक्रोशितिल नातेवाईकांची मदत घ्यावी लागते इथेच सर्व आले , शिवाय इतके जवळचे लोक सैन्यात असताना फारुख अब्दुल्ला , पी डी पी च्या लोकासारखे प्रश्न उपस्थित करता ? सैन्यात माझ्या घरातील कोणीही नाही आणि तरीपण एक सर्वसामान्य माणसा प्रमाणे सैन्याबद्दल मला अभिमान वाटतो . ब्लैक कैट नीं विषय काय मांडलाय ? त्यात आपण साथ द्यावी का ? ब्लैककैट च्या समर्थनार्थ सैन्याबद्दल प्रतिक्रिया देण्याअगोदर तुम्ही थोरल्या साहेबानां कसे विसरून गेलात ? एके काळी निधड्या छातीने सरंक्षण मंत्रिपद संभाळलय ना त्यांनी !!!
9 Jan 2019 - 5:53 pm | गामा पैलवान
अहो माईसाहेब,
तुमच्या ह्यांना जरा अभ्यास वाढवायला सांगा. राजीव गांधीने रोनाल्ड रेगनची बायको नॅन्सीला मध्ये घेऊन आदिल शहरयारला कसा सोडवला याची कथा सुरस व चमत्कारिक आहे. तूर्तास इथे अधिक माहिती वाचायला मिळेल : https://timesofindia.indiatimes.com/india/Sushmas-counterattack-Who-is-A...
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : आदिल शहरयार हे महंमद युनुसचे दिवटे अपत्य व संजय गांधीचे सावत्र भावंड.
10 Jan 2019 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे
After Lok Sabha, Quota Bill passes Rajya Sabha test
जाती-धर्माच्या वर उठून केवळ आर्थिक परिस्थितीवर आधारीत शिक्षण आणि नोकर्यांत १०% जागा राखीव ठेवण्याचे बिल राज्यसभेतही मंजूर झाले. आता केवळ राष्ट्रपतींची मंजूरी आणि नोटीफिकेशन या दोन औपचारिक पायर्या बाकी आहेत... त्या त्वरीत होतील यात संशय नाही.
जाती-धर्माच्या वर उठून केलेल्या या कायद्याबद्दल सरकारचे आणि त्याला (स्वतःहून व नाईलाजाने) पाठिंबा देणार्या सर्व पक्षांचे अभिनंदन !!!
10 Jan 2019 - 6:42 am | Blackcat (not verified)
या आधी नारसिंहराब यांनीही प्रयत्न केले होते.
https://www.livehindustan.com/national/story-efforts-has-been-made-for-u...
10 Jan 2019 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
अगोदरचे प्रयत्न यशस्वी झाले का ?
तसेही तुमची पार्टी नरसिंह राव यांना आपले मानत नाही, हे त्यांचे पार्थिव काँग्रेसभवनात न येऊ देता फूटपाथवर अडवून तुमच्या लाडक्या नेत्यांनी सांगितले आहे. रावांची अनवधानाने स्तुती केलीत... आता तुमचे काही खरे नाही. =)) =)) =))
अवांतर : त्यांचे नाव (नारसिंहराब नव्हे) नरसिंह राव आहे हे विसरले, तरी सोईस्कर वाटले तेव्हा त्यांची आठवण आली... टिपिकल ! =)) =)) =))
10 Jan 2019 - 6:41 pm | डँबिस००७
ह्या जमोप्याची जेथे मिळेल तेथे त्याची अशीच ठासली जावो !!
ह्याला कोणीही कुठेही भाव देत नाही म्हणु न सर्व ठिकाणी पिंका टाकत असतो !! फ्रस्टेटेड माणुस आहे !!
10 Jan 2019 - 6:50 pm | डँबिस००७
राज्य सभेत हे विधेयक मंजुर होत असताना कपिल सिब्बल म्हणत होते की हीच वेळ का मिळाली वैगेरे. त्यावर अमर सिंग ह्याची
प्रतिक्रीया खुपच बोलकी होती.
अमर सिंग : हे सर्वात चांगले विधेयक मोदी सरकारने आणलेले आहे, ह्या विधेयकाच मी समर्थन करतो. राज्यसभेत बरेच लोक ह्या
विधेयकाला नावे ठेवत होते. पण विरोध करायला कोणातही दम नाही !!
रविशंकर : हे विधेयक आणायला हीच वेळ का मिळाली ? सिक्सर स्लॉग ओव्हर मध्येच मारतात. असे अनेक सिक्सर आता येणार आहेत,
10 Jan 2019 - 10:07 am | ट्रम्प
आखिल भारतीय काँग्रेस महासमिति च्या महिला विभागाच्या चिटणीस म्हणून रागा नी नवीन इतिहास घडविला . अप्सरा रेड्डी या तामिलनाडु मधील तृतीयपंथी ची निवड ही लक्षणिय बाब आहे . गरजू , अडले नडलेल्याना रात्रदिवस न पाहता मदत करने ही राष्ट्रीय कुटुंबा ची खासियत वेळो वेळी दिसून आली आहे व अशा कित्तेक गरजू इच्छुक लोकांना रागाचे डैडी व काका ने राजकारणात आणले ( लोकसभेत ही !! ही !! करून हसणारी हिडिंबा ही त्यातलीच ) .त्या दोघानी राजकारणात प्रस्थापित केलेल्या अनेक लोकांच्या सुरस कथा बी बी सी वर उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे बी बी सी भाजप विरोधी बातम्या देण्यात एक्सपर्ट आहे . तीच परंपरा पुढे चालवत रागानी एका तृतीयपंथीला हात देवून संजय काका आणि डैडी च्या पुढे पावुल टाकले आहे .
या अप्सरे नी काही दिवस भाजपची वाट धरली होती परंतु कलागुणानां तेथे किंमत न मिळाल्या मुळे रागा ला त्यांनी हाक दिली व रागाने ही पटकन चिटणीस पदी नेमणुक करून औदार्य दाखवले .
10 Jan 2019 - 5:20 pm | mrcoolguynice
FB वर अफवा पसरवण्यात म्हातारे आघाडीवर
{{_https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/science-technology/p...}}
10 Jan 2019 - 5:38 pm | विशुमित
कुणाल काम्राचा एक भारी कॉमेडी वीडियो आहे.
नोट: भाषा आक्षेपार्ह आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
https://youtu.be/9NUXCAZs5VU
10 Jan 2019 - 7:36 pm | mrcoolguynice
थेरडेशाही....
अजुन काय !!!!
10 Jan 2019 - 7:32 pm | शाम भागवत
श्रीलंकेनंतर मलेशिआ पण पाकिस्तानी जेएफ- १७ पेक्षा भारतीय बनावटीच्या तेजसवर जास्त भरोसा ठेवायचा विचार करायला लागलीय. तिथे भरणाऱ्या २०१९ च्या संरक्षण विषयक प्रदर्शनात तेजस विमान ठेवण्यासाठी भारताला कळवण्यात आलय.
खरतर तेजस विमान, पाक व चिनने संयुक्तरित्या बनविलेल्या विमानापेक्षा २५ कोटींनी महाग आहे तरीही मलेशिआची पसंती तेजसला असल्याचे दिसून येते आहे.
खरतर तेजस अजूनही पूर्णपणे विकसीत झालेले नाहीये. तरीही या क्षेत्रातील तज्ञांच्या मते तेजस विमान जेएफ- १७ पेक्षा वजनाला हलके असून अद्ययावत डिजीटल नियंत्रण सुविधा, मायक्रोप्रोसेसरवर आधारीत उपकरणे यामुळे जास्त प्रभावी बनले आहे. विमानाच्या इंजिनाबद्दल तर सगळेच मान्य करतात की, तेजसला बसवलेले अमेरिकन बनावटीचे जीई४०४ इएन हे इंजिन नक्कीच पाकी विमानापेक्षा उत्कृष्ट आहे.
10 Jan 2019 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
पंतप्रधान, सर्वोच्च न्यायाधिशांनी नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयातिल एक सद्य न्यायाधिश आणि विरोधी पक्षनेता, यांच्या सिलेक्शन पॅनेलने अलोक वर्मा यांना, भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कामचुकारपणा (corruption and dereliction of duty) या कारणांनी सीबीआयच्या संचालकपदावरून बडतर्फ केले आहे.
निवृत्तीच्या ३१ जानेवारी २०१९ पर्यंत, डायरेक्टर जनरल (फायर सर्विसेस, सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड्स) या पदावर त्यांची बदली केली आहे.
काही दिवसांपूर्वी, त्यांना सुट्टीवर पाठविण्याचा निर्णय तांत्रिक कारणांसाठी अवैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची त्या पदावर परत नेमणूक केली होती. तसे करताना न्यायालयाने त्यांना धोरणात्मक निर्णय (policy decisions) घेण्यास प्रतिबंध केला होता.
10 Jan 2019 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा निर्णय २ विरुद्ध १ अश्या बहुमताने घेण्यात आला आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात गमतीची (खरे तर दुर्दैवाची) गोष्ट अशी झाली आहे...
लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेता या नात्याने पॅनेल सदस्य असलेल्या...
श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे, आलोक वर्मा यांच्या नियुक्त करण्याच्या वेळेस = विरोधी मत.
आणि आता,
श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे, आलोक वर्मांना भ्रष्टाचाराच्या कारणाने काढून टाकण्याच्या वेळी = विरोधी मत.
टीप्पणीची गरज नाही (No comments) !
11 Jan 2019 - 5:02 am | ट्रेड मार्क
आपली कुठलीच भूमिका ठामपणे धरून ठेवता येत नाही अशी काँग्रेसींची स्थिती झाली आहे. म्हणून तर वैयक्तिक आणि अशिष्ट हल्ले चालू आहेत. मोदी स्त्रीच्या मागे लपतात हे म्हणणे काय किंवा पर्रीकरांच्या घरात राफेलची फाईल लपवून ठेवली आहे म्हणणे काय किंवा निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून ही महत्वाची बिले/ योजना सादर करण्यात येतात हा आरोप काय. सगळाच मूर्खपणा आहे.
काय तर म्हणे अलोक वर्मा राफेलमधील तथाकथित घोटाळ्यांची चौकशी करणार होते म्हणून त्यांना त्रास देतात. या लोकांना हे पण माहित नाही की ते ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहेत. एवढ्या कमी वेळात कसली चौकशी करणार होते?
11 Jan 2019 - 6:07 am | Blackcat (not verified)
असे यु टर्न तर मोदीजींनी भरपूर घेतले आहेत,
आणि एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळचेच मत काही काळाने तसेच ठेवावे , असा काही नियम आहे का ?
11 Jan 2019 - 6:30 am | ट्रेड मार्क
म्हणून तर तुम्ही मोदींचा द्वेष करता ना? मग ते जसा यु टर्न घेतात तसाच यु टर्न तुमचे लाडके घेतात तेव्हा त्यांचा का द्वेष करत नाही?
एखाद्याच्या नियुक्तीच्या वेळचेच मत काही काळाने तसेच ठेवावे , असा काही नियम आहे का ?
नाहीये ना? पण निदान हे मत का बदलले ते तरी सांगावे. तसेच आधी विरोध का होता हे पण सांगावे.
11 Jan 2019 - 9:36 am | सुबोध खरे
अहो मोगा नी इतके यु टर्न घेतले आहेत कि नक्की कोणत्या दिशेला जायचंय तेच समजेनासे झाले आहे.
LLRC
11 Jan 2019 - 9:34 am | सुबोध खरे
आतली बातमी -- अगोदर खर्गे साहेबाना वाटलं कि आलोक वर्मा हे "लवचिक" नाहीत. म्हणून त्यांना विरोध झाला.
मग हरयाणातील जमीन घोटाळा ( कोण ते ओळखा) मध्ये त्यांनी "सोयीस्कर" भूमिका घेतली. अशी भूमिका घेतल्यावर "नावडती"ची "आवडती" झाली.
म्हणून मग शेवटचे १५ कामाचे दिवस असतानासुद्धा त्यांना पदावर कायम ठेवण्याचा निकराचा प्रयत्न चालू होता. आणि अलोक वर्मानी पहिल्या ३६ तासातच आवडत्या माणसांना परत आणण्याचे आदेश देऊन आपली निष्ठा दाखवून दिली.
परंतु श्री मोदी १ आणि श्री खर्गे १ अशा बरोबरीतील सामना असताना न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्रि यांनी तिसऱ्या पंचासारखे सर्व पुरावे पाहून श्री आलोक वर्मा ना आउट दिलंय. त्यामुळे आता खर्गे आणि काँग्रेसी लोक नोबॉल होता, बॅड लाईटच होता असले भंपक आरोप करत आहेत?
कोणीही न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्रि यांनी असा निर्णय का दिला हे बोलत नाहीत.
हरयाणातील जमिनीच्या घोटाळ्यातील घाण बाहेर आली तर काय हि खरी भीती आहे.
11 Jan 2019 - 12:48 pm | Blackcat (not verified)
हे सगळे तुम्ही सुप्रीम कोर्टास का नाही वदले ?
11 Jan 2019 - 1:08 pm | डँबिस००७
कॉग्रेस चे लोक स्वतःचीच कबर खोदत आहेत, चांगल आहे, देश वाचेल !!
11 Jan 2019 - 12:45 pm | Blackcat (not verified)
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला परशुराम वाघमोरे (वय २६) याच्या टूथब्रशवरील डीएनएचे नमुने हा न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १८ जणांविरोधात तब्बल ९ हजार २३५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gauri-lankesh-murder-case-dna-...
11 Jan 2019 - 1:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मग ३१ जानेवरीपर्यंत कामावर ठेवायला काय हरकत होती? मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे. वर्मा ह्यांनी त्यांचे मोबाईल्स टॅप केले होते. ज्या दिवशी अस्थाना ह्यांना अटक होणार होती त्याच्या आदल्या रात्री मध्यरात्री वर्मा ह्यांचे ऑफिस सील केले गेले. शिवाय गुजरात्मध्ये संदेसरा कुटुंबियांशी जवळीक करून पैसे खाल्ल्यचाही आरोप अस्थाना ह्यांच्यावर आहे.
आता अस्थाना कोणत्या स्थानी जाउन विराजमान होतात ते बघुया.
12 Jan 2019 - 9:21 am | ट्रेड मार्क
अहो माई, ही बातमी वाचा.
ही पण
आता बोला.
मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे.
मोदी आणि त्यांचे चेले तसलेच आहेत हो, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका. वर्मांनी त्यांचे फोन टॅप केले असं कोण म्हणतंय? आणि त्यातून काय निष्पन्न झालं?
11 Jan 2019 - 1:10 pm | Blackcat (not verified)
विद्यार्थ्यांचे म्हणणे काय ?
काही विद्यार्थी संघटनांचा पुणेरी पगडीला विरोध आहे. ‘पुणेरी पगडी हे पेशवाईचं प्रतीक असून फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतीक आहे. तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फुलेंनी अथक मेहनत घेतली. तर पुणेरी पगडीचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे पुणेरी पगडीच्या जागी फुले पगडीचा समावेश करण्यात यावा, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
https://www.loksatta.com/pune-news/savitribai-phule-pune-university-conv...
11 Jan 2019 - 6:52 pm | Blackcat (not verified)
मोदींविरुद्ध प्रतिज्ञापत्र देणाऱ्या माजी पोलीस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नीच्या गाडीला डम्परने उडवले. पत्नी व मुलगा जखमी.
11 Jan 2019 - 7:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कठिण आहे. आता 'अपघात हे रोजचेच असतात. त्यात विशेष ते काय?" अशी भक्त-संप्रदायी प्रतिक्रिया येईल. असो.
"Moreover, there was no number plate on the dumper nor were any vehicle registration or identification papers available."
https://newscentral24x7.com/ishrat-jahan-fake-encounter-case-cop-accused...
11 Jan 2019 - 10:01 pm | ट्रम्प
हा अपघात भाजप ला अडकवन्या साठी काँग्रेसने केले नसेल कशावरुन ?
वर्षानूवर्षे काँग्रेस च्या आशिर्वादा मुळे माजलेल्या भ्रष्ट्र बाबू शाहीने सुद्धा अपघात घडवन्या साठी मदत केली असेल आणि शिवाय काँग्रेस ला असे योगायोग घडविन्याची सवय आहे जसे कांग्रेस च्या काळात काही वर्षा पूर्वी इसरो चे चार शास्रध्न्य अचानक मरण पावले होते .
11 Jan 2019 - 10:40 pm | Blackcat (not verified)
ते तर गुजरातेत होते ना ?
तिथे तर मोदी अन भाजपाच आहेत ना?
11 Jan 2019 - 11:52 pm | डँबिस००७
अब्यास वाडवा !
12 Jan 2019 - 9:40 am | ट्रम्प
News central सोडून इतर कोणत्याही न्यूज़ पेपर , न्यूज़ चैनल वाल्यानी या बातमी ला महत्व दिले नाही अगदी बरखा आणि राजदीप सरदेसाई ने सुद्धा . मोदींच्या नावाने शंक वाजवत बसणाऱ्या एका ही न्यूज़ चैनल ने ही बातमी दाखवली नाही .
ब्लैक कैट ला तर भाजप कावीळ झाली आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक बातमी मध्ये भाजपला दोषी धरण्याची सवय लागली आहे . पण माई , तुझी देखील भाजप विरोधाची हातचलाखी वाखणन्याजोगी आहे = )
12 Jan 2019 - 10:00 am | Blackcat (not verified)
चॅनेलवर दाखवले नाही की म्हणायचे , बातमीला महत्व नाही,
चॅनेल्सवरदाखवले की म्हणायचे , ते विकले गेले आहेत , म्हणून मोदीविरोधात लिहीत असतात ,
कुठे शिकवतात ही मारीचकला ? नागपुरात ?
11 Jan 2019 - 11:51 pm | डँबिस००७
https://youtu.be/h39RogYBCFc
कॉंग्रेस व मोगा मिंया च्या लाडक्या पाकिस्तानची करामात !! भारतावर अतिरेकी हल्ला करायच्या तयारीत आहेत !!
तरी बर श्री मोदी मुळे भारताची तयारी उत्तम आहे आता ! गेल्या मुंबई हल्ल्या सारख झोपलेल सरकार आता नाही !!
ज्या सॅटेलाईट मुळे हा धोका लक्षात आलेला आहे तो आताच्या सरकारच्या पाठींब्यामुळे त्वरेने केलेल्या सॅटेलाईट मुळे लक्षात आलेला आहे !!
आता मोगा मिंया ह्यावर सुद्धा पचकल्या शिवाय रहाणार नाही वर Intolerence म्हणुन नाचायला मोकळा !!
12 Jan 2019 - 9:57 am | Blackcat (not verified)
कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत,
मोदी सरकारला युद्धांचा अनुभव नाही
12 Jan 2019 - 10:47 am | प्रसाद_१९८२
कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत,
--
काँग्रेस ??
मोग्या लेका किती फेकतोस !
12 Jan 2019 - 11:13 am | Blackcat (not verified)
पूर्वीच्या लढाया काँग्रेसने केल्या नाहीत ?
मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी केला हेही खोटेच का ?
12 Jan 2019 - 11:44 am | प्रसाद_१९८२
मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी केला हेही खोटेच का ?
--
असे मोदीनी केंव्हा म्हटले ?
सर्जिकल स्ट्राईक भारतीय सैन्याने केला व त्या मागे श्री मोदींचा भक्कम सपोर्ट होता.
12 Jan 2019 - 12:05 pm | Blackcat (not verified)
काँग्रेसचेही तसेच .
12 Jan 2019 - 11:16 am | डँबिस००७
कारगिल सोडता उरलेल्या लढाया काँग्रेसनेच केल्या आहेत,
पण एकही युद्ध निर्णायक जिंकता आलेल नाही ! म्हणुन पाकिस्तान दर पाच वर्षांनी युद्ध करण्यासाठी यैत होता.
युद्ध म्हणजे जनतेला लुटायची पर्वणी, त्यात कॉंग्रेसचा हात कोणीही धरु शकत नाही ! प्रत्येक खरेदीत कॉंग्रेसच्या भ्रष्ट सरकारने भ्रष्टाचार केला !
12 Jan 2019 - 11:25 am | Blackcat (not verified)
कुठल्या कोर्टात हा भ्रष्टयाचार सिद्ध झाला ?
12 Jan 2019 - 1:57 am | नंदन
रिपब्लिकन पार्टी ही रेसिस्टांची (आणि अलीकडे रेपिस्टांची) पार्टी बनत चालली आहे*, असं कुणी** म्हटलं की काही सुशिक्षित रिपब्लिकन (ही जमातही आता दुर्मीळ होत चालली आहे म्हणा!) दुखावले जातात.
डिनायल (उदा. ट्रम्पतात्यांवर थेट निक्सनच्या काळापासून रेसिझमचे आरोप आणि पुरावे असताना - "छे, छे, तो तर न्यू यॉर्क शहरातला आहे. तो कसा रेसिस्ट असेल!" सारखे पोकळ युक्तिवाद), लंगड्या सबबी, काणाडोळा, समस्येचे गांभीर्य आणि वारंवारिता आहे त्याहून फारच कमी आहे असा दावा करणं, व्हाटअबाऊटरी, 'ट्रम्प-जिंकला-म्हणून-हे-कांगावे आहेत' अशी स्वत:च स्वत:ची समजूत करून घेणं इत्यादी नेहमीचे डिफेन्सिव्ह उपाय मग चोखाळले जातात.
त्यांच्यासाठी हा, त्यांच्याच पक्षाच्या सिनेटरचा (टिम स्कॉट) हा घरचा अहेर:
ह्या लेखाची पार्श्वभूमी ही आयोवा राज्यातले काँग्रेसमन स्टीव्ह किंग यांच्या वक्तव्यांची आहे. आयोवा हे प्रायमरीमधलं (पक्षांतर्गत निवडणुका) सर्वात पहिलं राज्य असल्यामुळे तिथल्या जय-पराजयाचा पुढील राज्यांतील निवडणुकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे, २०१६ च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये सगळे उमेदवार स्टीव्ह किंगच्या रेसिस्ट वक्तव्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी झगडत होते. त्यात कोण यशस्वी ठरलं, हे वेगळं सांगायला नकोच!
मेक्सिकन सीमेवर भिंत बांधणं, गौरेतर इमिग्रंट्सना शिव्याशाप देणं, चुकीच्या गोष्टी/आकडे/बातम्या दडपून देणं, जन्माद्वारे प्राप्त होणाऱ्या नागरिकत्वाच्या ('बर्थराईट सिटिझनशिप') घटनादत्त हक्काला विरोध# आणि एकंदरीत श्वेतवर्णीय हाच सर्वोच्च वंश अशी भूमिका ("श्वेतवर्णीय वेस्टर्न सिव्हिलायझेशन सोडलं तर, जगातल्या इतर कुठल्याही संस्कृतीने/वंशाने मानवी विकासात भर घातलेली नाही" असा अज्ञानी, द्वेषमूलक दावा ह्या किंगआजोबांनी केला होता!) ही श्री. स्टीव्ह किंग यांची विचारअपत्यं. (ट्रम्पतात्यांनी ती बेमालूम आपलीशी करून घेतली. ट्रम्पतात्यांचे भक्त मात्र, हे ओरिगिनल विचार आमच्या दूरदृष्टीच्या तात्यांचेच असं मानतात, हा भाग अलाहिदा! :)))
*अर्थात, इथे सगळेच रिपब्लिकन्स रेसिस्ट असतात असं म्हणायचं नाही. तसं ज्यांना वाटत असेल, त्यांना वाढदिवसाच्या आणि अभ्यास वाढवण्याच्या शुभेच्छा! Most of the racists are Republicans, but most of the Republicans are not...इ.इ.
वानगीदाखल, टेक्ससमधली ही बातमी पहा:
Texas Republicans reject vote to oust GOP leader because he is Muslim.
** असले राजकारणी weasel words सराईतपणे वापरणं, हा आपण राजकारणी नसल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पतात्यांचा आवडता छंद आहे :)
# एरवी अमेरिकन राज्यघटना ही पवित्र असून, ती अजिबात बदलू नये - जशी आहे तशीच राहू द्यावी असा आग्रह धरणारे तथाकथित "कॉन्स्टिट्युशनली प्युरिस्ट" कन्झर्व्हेटिव्ह मात्र याबाबतीत कमालीची लवचीकता दाखवतात! ;);)
12 Jan 2019 - 2:38 pm | Blackcat (not verified)
चौकीदार उवाच :
काँग्रेसचे अनेक मोठे जामिनावर बाहेर आहेत.
– काँग्रेस विरोधात जन्मलेले पक्ष आज काँग्रेससमोर शरणागती पत्करत आहेत.
– चौकीदार थांबणार नाही, आता तर सुरुवात झाली आहे.
– चोर देशात असो किंवी विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही.
– आधीच्या सरकारमध्ये शौचलये, रेल्वे मार्ग, घरे, वीज-गॅस जोडणींची कामे ज्या वेगाने सुरु होती त्याच वेगाने ही काम चालली असती तर भरपूर वर्ष लागली असती माझ्या सरकारने ही सर्व कामे वेगाने केली.
– सर्व समस्या दूर झाल्या असे मी म्हणणार नाही अजून भरपूर काही करण्याची गरज आहे.
– शेतकऱ्यांवर कर्जाचा भार आहे त्याची कल्पना आहे.
– आम्ही अन्नदाता म्हणजे शेतकऱ्याला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.
– स्वामीनाथन आयोगाची शिफारस मंजूर केली. शेतकऱ्यांना खर्चाच्या दीडपट समर्थन मुल्य देत आहोत
– शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची आधी ज्यांची जबाबदारी होती त्यांनी शॉर्टकटचे मार्ग अवलंबले.
– आधीच्या सरकारने शेतकऱ्यांकडे मतपेटी म्हणून पाहिले.
– आधीपासून लागू असलेल्या आरक्षणाशी छेडछाड न करता नवीन आरक्षण दिले.
– काही जण नव्या आरक्षणावरुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कारस्थान आपल्याला हाणून पाडायचे आहे.
– युवा शक्ती भारताची मुख्य ताकत.
– देशाचा प्रत्येक पैसा राष्ट्र निर्माणासाठी वापरला जात आहे.
– १० टक्के आरक्षण नव्या भारताचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.
– सरकार भ्रष्टाचाराशिवाय चालू शकते हे भाजपाने सिद्ध केले आहे.
– दलालाना बाहेर काढता येते हे भाजपाने दाखवून दिले.
– देश नव्या विश्वासाने भाजपाकडे पाहत आहे.
– सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.
– आपल्या आधीच्या सरकारने देशाला अंधारात ढकलले.
– २००४ ते २०१४ ही दहावर्ष देशाने भ्रष्टाचार, घोटाळयामध्ये गेली.
– सरदार वल्लभभाई पटेल पहिले पंतप्रधान बनले असते तर देशाचे चित्र वेगळे असते.
– २००४ च्या निवडणुकीत अटलजी पंतप्रधानपदी कायम राहिले असते तर भारत आणखी उंचीवर गेला असता.
– देश प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालत आहे
– मला आज जास्त वेळ बोलायचे आहे.
– भारताला आपले लक्ष्य गाठायचे आहे.
– दोन खासदार असलेल्या पक्षाचे आज विशालस्वरुप झाले आहे.
– देशातील १६ राज्यांमध्ये भाजपाचे सरकार आहे.
12 Jan 2019 - 2:47 pm | डँबिस००७
चौकीदार जो बोले सही बोले !!
12 Jan 2019 - 8:49 pm | सुबोध खरे
मोगा खान असं बोलतात?
गांजा कडक दिसतोय
12 Jan 2019 - 2:48 pm | Blackcat (not verified)
पटेलांच्या भारतात सामील होऊ नका , अशी संस्थानिकांना पत्रे कुणी लिहिली होती म्हणे ?
12 Jan 2019 - 6:06 pm | डँबिस००७
नेहरुंनी लिहीली असतील !!
12 Jan 2019 - 8:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
एकंदरित कामाचा वेग व आखणी पाहिली तर भाजपा सरकार बर्यापैकी प्रगती करत आहे. मात्र सुडाचे राजकारण त्यांनी सोडायला हवे. संजीव भट्ट ह्यांना का गुंतवण्यात येत आहे, आलोक वर्मा ह्यांचे ऑफिस रात्री अडिच वाजता सील करणे. हे सर्व उदात्त हेतुने होत आहे ह्यावर भक्तही विश्वास ठेवणार नाही.
अरविंद पांगारिया, अरविंद सुब्रमण्यम्,सुरजीत भल्ला ,उर्जित पटेल ही सर्व परदेशस्थित आर्थिक क्षेत्रातील तज्ञ मंडळी. कालावधी पूर्ण न करता हे सर्व लोक सोडून गेले. आणी आता आलोक वर्मा.
'आम्हालाच सर्व कळते कारण आम्ही निवडून आलो आहोत' हा माज भाजपा-सेना युतीला १९९५-९९ ह्या काळात होता. चांगले काम तेव्हा झाले असूनही १९९९ च्या निवडणूकीत माज मतदारांनी उतरवला व पुन्हा काँग्रेसला निवडून आणले.
ईतिहास सर्वानी लक्षात ठेवायला हवा.
12 Jan 2019 - 8:48 pm | सुबोध खरे
माईसाहेब
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी पण श्री अलोक वर्मा याना हटवण्यासाठी आपले मत दिले याचाच अर्थ श्री अलोक वर्मा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यात काही तरी तथ्य असणार.
श्री मोदी आणि श्री मल्लिकार्जुन खर्गे यांचे विचार पक्षीय दृष्टिकोनातून असतील त्यामुळे एकांगी/ पक्षपाती असतील हे गृहीत धरले तरी एक निष्पक्ष न्यायाधीश जर तातडीने त्यांना हटवा यावर शिक्का मोर्तब करतो याचा अर्थच "पाणी मुरते आहे" हे स्पष्ट आहे.
काँग्रेसने जेवढी जहरी टीका केली त्यामधेय हा एक मुद्दा खुबीने टाळला आहे यातच सर्व काही आले.
12 Jan 2019 - 9:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
आलोक वर्मा ह्यांच्यावर जर गंभीर आरोप आहेत ह्याची सरकारला खात्री असेल तर कामावरून काढून का नाही टाकले? होम गार्ड खात्यात बदली का केली?
वर्मा ह्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणतेही पुरावे नाहीत ( https://www.livelaw.in/top-stories/no-evidence-of-corruption-against-alo... )
आलोक वर्मा काही महत्वाच्या केसेस हाताळत होते.
१) पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी भास्कर खुल्बे केस. (ह्यांचे नाव बंगाल मधील कोळसा घोटाळ्यात आले होते)
२)रजेवर जाण्याआधी राफेल घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी यशवंत सिन्हा/प्रशांत भूषण ह्यांनी केली होती.
३)पंतप्रधान कार्यालयातील दुसरे अधिकारी- हसमुख आढिया केस. सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी हसमुख आढिया ह्यांनी नीरव मोदीला व मेहुल चोक्सीला मदत केल्याची तक्रार केली होती.
४) स्टर्लिंग बायोटेक- संदेसरा कुटुंबीय. राकेश अस्थाना ह्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. अस्थाना ह्यांच्या मुलीचे लग्न संदेसरा ह्यांच्या फार्म हाउसवर झाले होते.
https://www.indiatoday.in/india/story/cases-that-were-on-alok-verma-s-ta...
आता वर्मा ह्यांना ३१ जानेवारी पर्यंतही वेळ का दिला नाही ते लक्षात आले असेल ?
12 Jan 2019 - 9:42 pm | डँबिस००७
माई साहेब,
आलोक वर्मा ह्यांच्यावर जर गंभीर आरोप आहेत ह्याची सरकारला खात्री असेल तर कामावरून काढून का नाही टाकले? होम गार्ड खात्यात बदली का केली?
अजुन तुम्ही लक्षात घेत नाहीत की सिबीआय च्या मुख्य अधिकार्याला नेमणुकीसाठी तिन लोकांची कमिटी नेमलेली आहे. त्यात मलिक्कर्जुन खरगे एक न्याय मुर्ती व पंत प्रधान सामिल आहेत. अस असताना सुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न कसे काय पडतात ?
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अर्जन कुमार सिक्री यांनी पण श्री अलोक वर्मा याना हटवण्यासाठी आपले मत दिले याचाच अर्थ श्री अलोक वर्मा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यात काही तरी तथ्य असणार.
**(( - एकंदरित कामाचा वेग व आखणी पाहिली तर भाजपा सरकार बर्यापैकी प्रगती करत आहे. मात्र सुडाचे राजकारण त्यांनी सोडायला हवे. संजीव भट्ट ह्यांना का गुंतवण्यात येत आहे, आलोक वर्मा ह्यांचे ऑफिस रात्री अडिच वाजता सील करणे. हे सर्व उदात्त हेतुने होत आहे ह्यावर भक्तही विश्वास ठेवणार नाही. )) **
तुम्ही फारच नाईव्ह आहात ! सुडाच राज कारण काँग्रेस कस खेळत हे बघायला उघड्या डोळ्याने ईतिहास बघायला हवा !!
ईतक्या लोकांनी पुरावा दिला, कोर्टात साबित झाल तरीही, मिडीया व काँग्रेस अजुनही इसरत जहान व सोहराबुद्दीन ह्या फेक एन काँऊंटर म्हणुन प्रसिद्ध आहेत.
हलकट लोक आहेत हे. नेताजींना व लाल बहादुर शास्त्रींना संपवुन वर अहिंसेचा खेळ खेळत आहेत.
12 Jan 2019 - 9:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सोहराबुद्दीन्/ईशरत जहान एन्काउंटर खोटे नव्हते? त्यांना मारणारे अधिकारी विनाकारण ५/६ वर्षे जेल्मध्ये गेले? तत्कालीन सी.बी.आय् अधिकारी /न्यायाधीश भ्रष्ट होते? आता नाहीत?
12 Jan 2019 - 11:25 pm | डँबिस००७
इसरत जहान केस :
Was tortured, told to sign on Ishrat affidavit, claims former bureaucrat
RVS Mani, former under secretary (Internal Security) in MHA, has claimed that he was used as a rubber stamp by government.
Evidence in Ishrat case was engineered: Ex-bureaucrat
RVS Mani alleged he was tortured by the SIT chief
https://timesofindia.indiatimes.com/india/Was-tortured-told-to-sign-on-I...
12 Jan 2019 - 11:42 pm | डँबिस००७
ईसरत जहान व तिचे तिन पाकीस्तानी साथीदार हे पर्यटनासाठी भारतात सशस्त्र फिरत होते ह्यावर फक्त सोनिया गांधी, दिग्विजय सिंग सारख्यांचा विश्वास बसला असेल !!
13 Jan 2019 - 12:08 am | माईसाहेब कुरसूंदीकर
सशत्र फिरत होते ? मुंबई(ठाणे) येथून ते अहमदाबादला गेले. ह्या प्रवासा दरम्यान गाडी थांबवता आली असती. मुंबई पोलिसाना कळवून त्याना आहे तेथेच अटक करण्यात आली असती. पण ५५० किमी प्रवास करू दिला व मारण्यात आले. ह्याचे कारण "मोदीना मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा" ही बातमी द्यायची असे ठरले होते. हरेन पंड्या ह्यांचा मारेकरी शेवटपर्यंत मिळाला नाही. अनेक 'पाकिस्तानी' संशयिताना पकडण्यात आले व नंतर सोडून देण्यात आले.
14 Jan 2019 - 11:05 am | सुबोध खरे
माईसाहेब
तुमचा भाजप द्वेष सरळ दिसू लागला आहे.
काहीही करून भाजप वर चिखलफेक करण्याची हि वृत्ती नैराश्य आणि चिडचिड यातून येते आहे असे दिसते आहे. डेव्हिड हेडली कोल यांनी मुंबईत न्यायालयात दिलेल्या कबुलीजबाबात इशरत जहाँ हि लष्कर ए तय्यबाची हस्तक होती हे स्पष्टपणे समोर आले आहे.
With 26/11 co-conspirator David Headley confirming in his deposition before a Mumbai court that Ishrat Jahan was indeed a lashkar-e-Tayyeba operative
तिची हत्या घडली कि घडवली हा मुद्दा वेगळा पण तिला क्लीन चिट देणारे कॉंर्ग्रेसी यांचे पितळ उघडे पडले आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांवर भरलेले खोटे खटले उघडे पडल्यामुळे त्यांना सोडावे लागले हि वस्तुस्थिती असून आजही तुम्ही
त्यांना मारणारे अधिकारी विनाकारण ५/६ वर्षे जेल्मध्ये गेले? तत्कालीन सी.बी.आय् अधिकारी /न्यायाधीश भ्रष्ट होते? आता नाहीत?
अशी विधाने करता आहात हि लाजिरवाणी बाब आहे.
The Congress-led Government of the day knew well that Ishrat Jahan was a terrorist. And yet, repeatedly and systematically, it sought to hide this fact from the public so that it could paint a political adversary in bad light. In the process, it also politicised what should have been a non-partisan security issue and polarised relations between communities. This only shows that, when it comes to politicking, the Congress's dirty tricks department has no problem in deifying a terrorist even if that’s what it takes to humiliate a political rival. the malicious political propaganda that had been unleashed by her apologists must end. In 2004, Ishrat Jahan, a 19-year-old college student suspected of conspiring to assassinate Mr Narendra Modi, then Chief Minister of Gujarat, was killed along with three associates by Gujarat Police in an armed encounter. Whether this encounter was staged is still being decided in a court of law. However, what has become clear is that Ishrat Jahan was no saint or martyr. She was an active member of a anti-India terrorist group and was planning to take down a sitting head of Government. This is not to suggest that she didn't deserve her day in court (assuming she was killed in a ‘fake encounter') or that it must not spark a larger debate on state-sanctioned extra-judicial killings that's for another day. The crucial issue now is the manner in which Ishrat Jahan's terror credentials were covered up or brushed aside with the sole intention of tarnishing the image of Mr Modi and his Government in Gujarat.
https://www.dailypioneer.com/2016/columnists/reality-of-ishrat-jahan.html
TerroristDavid Coleman Headley told a Mumbai court today that Indian investigators who met him in the US after he was arrested in 2009 did not pressure him to state that Ishrat Jahan, a college student killed by Gujarat's top cops, was a terrorist.
https://www.ndtv.com/india-news/was-not-tutored-to-say-ishrat-jehan-was-...
असो आपल्या समतोलपणाचं पितळ उघड पडलंय.
सांभाळून घ्या.
14 Jan 2019 - 2:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पुन्हा पुन्हा वैयक्तिक दोषारोप का ?
हेडलीला निकम ह्यांनी काय प्रश्न विचारले होते ? त्याने त्याप्रमाणे उत्तर दिले. गुजरात फाईल्स हे पुस्तक कृपया वाचा. गुजरात मधील भाजपा नेत्यांचे व पोलिस अधिकार्यांचे पितळ उघडे पडले आहे. "ईशरत जहान अतिरेकी नव्हती. पण तिला संपवण्याचा आदेश वरून आला" असे खुद्द तिला ठार मारणार्या वंजारा ह्यांनी कबुली दिली आहे.
(वंजारा/अमित शहा/सिंघल्/अमीन ह्या सर्व मंडळींचे पितळ उघडे पडले आहे. पुस्तक प्रसिद्ध होऊन १ वर्ष होऊन गेले. पण ह्या सर्व मंडळीनी त्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. कारण ह्या लोकांच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग केले गेले आहे.)
अमित शहा व मोदी ज्या मानसी सोनी ह्या तरूणीवर पाळत ठेऊन होते त्याबद्दल काय म्हणणे आहे?
https://www.youtube.com/watch?v=KQg5JhA3LJI
14 Jan 2019 - 5:02 pm | मामाजी
आपण गुजरात फाईल्स हे पुस्तक कोर्टात पुरावा म्हणून सादर करा की आपल्याला कोणी आडवलय.
14 Jan 2019 - 2:52 pm | तेजस आठवले
भाजपद्वेष तर भाजपद्वेष.अहो माईंनी आता निदान एक बाजू घेतली आहे एवढे पुरे नाही का? नाहीतर मेली सदानकदा "ह्यांच्या" खांद्यावरून गोळ्या मारायची त्यांची सवय."ह्यांचा" खांदा आता निखळायला आला तरी!
चला तर माई केरसुणी आणि लाटणे घ्या हाती
जोरदार प्रहार करून फोडा ५६" छाती.
बंदूक ठेवून ठेवून दुखतो "ह्यांचा" खांदा
कुणी निंदा कुणी वंदा माझा खोट्याचा धंदा.
झाली वैचारिक कावीळ दिसू लागली दुनिया पिवळी
"ह्यांना" येई खोकला, निसटे माझी कवळी
रिकामा वेळ हाताशी, नाही कसलेच टेन्शन
"ह्यांचे" नाव दाखवून मीच घेते सगळे पेन्शन
वापरून "ह्यांचे" नाव देते मी भाजपाला त्रास
आमचे "हे" खरंच आहेत का नुसताच आभास.
- कवी आपले हे नेहमीचेच आठवले नाहीत. ते वेगळे आहेत.
14 Jan 2019 - 5:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
वैयक्तिक शेरेबाजी नको. मोदी सरकार बर्यपैकी काम करीत आहे असे आमचे मत आहे. अनेक केंद्रिय मंत्री, सुरेश प्रभु, नितिन गडकरी,धर्मेंद्र प्रधान.. सुषमा स्वराज.. ह्या मंडळींची कामे निश्चित कौतुकास्पद आहेत पण म्हणून मोदी/शहा ह्यांचा गुजरातमधील ईतिहास लपून कसा राहणार?
14 Jan 2019 - 6:34 pm | तेजस आठवले
गमतीत लिहिले आहे.मनावर घेऊ नका.
12 Jan 2019 - 10:35 pm | Blackcat (not verified)
चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज काढत बसले , सरळ संघात जायला हवे होते,
नेताजींच्या फाईली मोदी सरकारनेच उघड केल्या ना ? काय आले त्यात ?
12 Jan 2019 - 11:19 pm | डँबिस००७
कॉंग्रेस सारख्या गद्दार लोकात न जाता त्यांनी फौज तयार केली !!
कॉंग्रेसच्या हलकट लोकांनी नेताजींच्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना युद्ध कैदी म्हणुन भारतीय कैदेत ठेवल , त्यापुढे जाउन कलकत्त्यात ९००० आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना त्यांच्या बॅरॅक मध्ये जिवंत जाळल ! जनतेचा रोष होउ नये म्हणुन तिथे जुट रीसर्च सेंटर उभ केल !
https://youtu.be/zf3fJU3FdW
12 Jan 2019 - 11:33 pm | Blackcat (not verified)
आणि आझाद हिंद सेनेच्या केसेस नेहरूंनीच जिंकल्या ना ? संघातही किती वकील अन ब्यारिस्टर होते , त्यांनी किती केसेस लढल्या ?
14 Jan 2019 - 10:50 am | सुबोध खरे
इथं रागा आणि सोगा च्या केसेस हिरीरीने लढणारी काँग्रेसवाल्यांची फौज आहे.
मग त्याच काँग्रेसमध्ये असणारे नेताजी सुभाषबाबू यांची केस लढवायला वेळ कॉन्रेसी लोकांना वेळ नव्हता?
नेताजी कधीच रा स्व संघात नव्हते. रा स्व संघाने त्यांची केस का लढावी?
इथे काँग्रेसच्या दुटप्पीपणा बद्दल चर्चा चालली आहे
तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी रा स्व संघच दिसतोय का?
उद्या विचाराल झाकीर नाईकांची केस रा स्व संघात एवढे वकील असून का लढत नाहीत>
आजार हाताबाहेर जायच्या अगोदर इलाज करून घ्या
14 Jan 2019 - 11:43 am | Blackcat (not verified)
तुम्हाला कुणी कुणाची केस कधी लढली , हे ठाऊक आहे का ?
https://hi.m.wikipedia.org/wiki/आजाद_हिन्द_फौज_पर_अभियोग
http://zeenews.india.com/hindi/india/jawahar-lal-nehru-fought-for-save-a...
नई दिल्ली : दिल्ली के ऐतिहासिक लालकिले से आज भारत की पहली निर्वासित सरकार की स्थापना की 75वीं वर्षगांठ मनाई गई. इस सरकार की स्थापना नेताजी सुभाष चंद्र बोस ने की थी और वही इस सरकार के मुखिया थे. लेकिन जब सुभाष चंद्र बोस की मृत्यु हो गई और उनकी आजाद हिंद फौज के हजारों अफसर और सैनिक गिरफ्तार कर लिए गए तो देश के सामने चुनौती पैदा हो गई.
अपने मित्र सुभाष की मृत्यु के बाद पंडित जवाहरलाल नेहरू ने इस काम को संभाला. उनके सामने सिर्फ यही चुनौती नहीं थी कि वे सुभाष के बलिदान और विरासत को संभालें. नेहरू को आजाद हिंद फौज (आइएनए) के उन हजारों सैनिकों को भी संभालना था, जो युद्ध में जर्मनी और जापान की हार के बाद ब्रिटिश सेना ने बंदी बना लिए थे. इनमें से बहुत से सैनिक दिल्ली के लाल किले में बंद थे. इन बंदियों में आइएनए के तीन प्रमुख कमांडर सहगल, ढिल्लन और शाहनवाज शामिल थे. इन तीनों को अंग्रेज सरकार ब्रिटेन के खिलाफ युद्ध छेड़ने के अपराध में फांसी की सजा सुना चुकी थी.
देश आजादी की दहलीज पर खड़ा था. और आजाद हिंद फौज का एक हिंदू, एक मुस्लिम और एक सिख कमांडर मौत की दहलीज पर. हजारों आइएनए सैनिकों का भविष्य तो खैर अंधकार में था ही.
तब नेहरू ने आइएनए डिफेंस कमेटी बनाई. इस कमेटी ने देश भर से आइएनए के सैनिकों की मदद के लिए चंदा इकट्ठा किया. इस कमेटी में देश के नामी वकील शामिल किए गए. इस समय तक देश में नारे लगने लगे: ‘‘चालीस करोड़ की ये आवाज, सहगल, ढिल्लन, शाहनवाज.’’
14 Jan 2019 - 11:46 am | Blackcat (not verified)
नेहरूंनी हे का केले नाही , गांधींनी हे का केले नाही , हे प्रश्न येऊ शकतात , तर कुणीतरी संघाने हे केले नाही , हेही विचारणारच,
नेताजी संघाचे नव्हते , म्हनून त्यांची केस संघाने लढली नाही , हे बोलून तुम्ही तुमच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन केले आहे ,
14 Jan 2019 - 12:07 pm | सुबोध खरे
तुम्ही तुमच्या कोत्या वृत्तीचे प्रदर्शन केले
आणि आझाद हिंद सेनेच्या केसेस नेहरूंनीच जिंकल्या ना ? संघातही किती वकील अन ब्यारिस्टर होते , त्यांनी किती केसेस लढल्या ?
हि खाजवून खरूज कुणी काढली आहे?
कोणत्याही धाग्याचा संदर्भ नाही. काही घेणे देणे नाही फक्त गरळ ओकायची.
आपण शेण खायचं आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायचं.
14 Jan 2019 - 12:09 pm | सुबोध खरे
चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज काढत बसले , सरळ संघात जायला हवे होते,
नेताजींच्या फाईली मोदी सरकारनेच उघड केल्या ना ? काय आले त्यात ?
याचा आगापिछा चालू घडामोडीत काय आहे?
12 Jan 2019 - 6:11 pm | डँबिस००७
तसेही अहींसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणुन खोटे पसरवणारे नेहरुच होते.
१५ ऑगस्टच्या पुर्वी आझाद सेनेच्या सेना पतींचा जय जय कार करणारे नेहरु . स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र लाल किल्यावरुन
" माऊंटबॅटन की जय " चा नारा दिलेला सगळ्यांनी बघितलेले आहे.
12 Jan 2019 - 6:34 pm | डँबिस००७
https://www.youtube.com/watch?v=zf3fJU3FdWw&t=18s
12 Jan 2019 - 11:38 pm | डँबिस००७
Bill to terminate Pakistan designation as major non-Nato ally introduced in US Congress
मोगामिंयाच्या लाडक्या
पाकिस्तानला अजुन एक झटका !!
https://m.timesofindia.com/world/us/bill-to-terminate-pakistan-designati...
13 Jan 2019 - 9:56 pm | Blackcat (not verified)
अडकल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या महिला एजंटने फेसबुकच्या माध्यमांतून जवानांना जाळ्यात अडकवले होते. जैसलमेर लष्करी तळावर सोमवीर सिंग या जवानास जाळ्यात ओढून महत्त्वाची माहिती काढून घेतली होती. २०१६ मध्ये सोमवीर जाळ्यात अडकला. त्यांनतर सोमवीरच्या फ्रेंड लिस्टमधील इतर काही जवानही जाळ्यात आडकल्याचा संशय आहे. प्रशासकीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार सोमवीरवर गुन्हा दाखल करून शुक्रवारी अटक केली आहे.
13 Jan 2019 - 11:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा, माईसाहेबांसारखे तुम्हालासुद्धा 'हे' आहेत होय?! =))
तुमच्या प्रतिसादाच्या वरचा प्रतिसाद पाहता, ते मोगाखान आहेत असा अर्थ होतोय!!! =)) =)) =))
13 Jan 2019 - 7:46 am | Blackcat (not verified)
नँशनल हेराल्ड या बहुचर्चीत खटल्यावर आणि त्यातील इतर कायदेशीर बाबींविषयी उकल करणारा हर्षवर्धन दातार यांचा महत्वपुर्ण लेख!
( मी आजपर्यंत या केसचा विचार Locus standi या आधारावर करत होतो, पण मला यातून खूप कांही नव्याने समजले)
१. नॅशनल हेराल्ड खटल्यातल्या आयकर कायद्याशी निगडित भागावर टिप्पणी करणारी ही पोस्ट. फौजदारी कायद्याशी निगडित भागावर काहीही होणार नाही याची मला तरी खात्री आहे कारण तिथे MENS REA म्हणजे गुन्हेगारी उद्देश सिद्ध करणे अवघड आहे.
आयकर खटल्यावर सध्या बरीच सुंदोपसुंदी माध्यमांमध्ये सापडत आहे.
२. ही पोस्ट दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहे. खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २९ जानेवारीला त्याची सुनावणी आहे.
३. १९९८ मध्ये यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना त्यांनी GIFT TAX रद्द केला. पुढे २००४ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी याला आयकर कायद्यात अंतर्भूत केले. तेव्हाच्या तरतुदीनुसार एखादा मनुष्य किंवा एच यू एफ यांना 'नातेवाईक' नसलेल्या व्यक्तींकडून 'भेट' किंवा 'GIFT' मिळाल्यास त्यावर 'आयकर' द्यावा लागत असे.
आजही तरतुदी तशाच आहेत पण आज अन्य प्रकारच्या व्यक्तीही (उदा. भागीदारी संस्था, LLP, कंपनी, ई.) यात समाविष्ट आहेत.
४. एखाद्या कंपनीने तिचे शेअर्स जारी करताना, दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य जर घेतले आणि ते सकल मूल्य, त्या शेअरच्या बाजारभावापेक्षा जास्त असेल तर फरकाच्या पैशांवर आयकर द्यावा लागतो. उदा. १० रु. दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य ४० रु. जर घेतले (सकल मूल्य ५० रु.) आणि बाजारभाव जर ३० रु. असेल तर २० रु. वर कंपनीला कर द्यावा लागतो. पण तोच शेअर ५० रु. दर्शनी मूल्यावर, अधिमूल्य ० रु. जर घेतले (सकल मूल्य ५० रु.) आणि बाजारभाव जर ३० रु. असेल तर कंपनीला कर द्यावा लागत नाही. याशिवाय ज्या व्यक्तीला हे शेअर्स दिले आहेत ती व्यक्ती जर आयकर कायद्यात नोंदणीकृत 'चॅरिटेबल ट्रस्ट' असेल तर कंपनीला कर द्यावा लागत नाही. (हा मुद्दा नॅशनल हेराल्ड खटल्यात सगळ्यात महत्वाचा आहे)
५. पं. नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली/प्रभावाखाली १९३७ मध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, त्यात जवळपास ५००० भागधारक होते. आज ही कंपनी 'नॅशनल हेराल्ड' नावाचं इंग्रजी वृत्तपत्र चालवते. त्या ५००० भागधारकांमध्ये बरेचसे स्वातंत्र्यसैनिक होते ज्यात पुरुषोत्तम दास टंडन, कैलाशनाथ काटजू (न्या. काटजूंचे पिताश्री), गोविंद वल्लभ पंत, ई. लोक होते. २०१० मध्ये त्यात जवळपास १००० भागधारक उरले.
पुढे कंपनीने काँग्रेस पक्षाकडून ९०.२१ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतले होते, हे कर्ज २०१०-११ मध्ये काँग्रेस पक्षाने शेअर्समध्ये रूपांतर करून, शेअर्स 'यंग इंडियन' नावाच्या तिसऱ्या कंपनीला देण्याची सूचना केली. हा व्यवहार भागधारकांच्या सभेत मान्यही झाला, अन हे शेअर्स 'यंग इंडियन' ला जारी करण्यात आले आणि कर्ज वळते करण्यात आले. (या व्यवहारात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने कसलेही अधिमूल्य आकारले नसल्याची कागदोपत्री नोंद/पुरावा आहे.)
६. 'यंग इंडियन' एक नफा न कमावणारी कंपनी म्हणून कंपनी कायद्याच्या (१९५६) कलम २५ मध्ये नोंदणीकृत कंपनी आहे. तिला आयकर कायद्यात नोंदणीकृत 'चॅरिटेबल ट्रस्ट' म्हणून मान्यताही होती. या कंपनीचे ७६% भागधारक राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत, ऑस्कर फर्नांडिस १२% आणि मोतीलाल व्होरा १२% भागधारक आहेत.
७. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे भागधारक 'यंग इंडियन'. 'यंग इंडियन'चे भागधारक राहुल गांधी, सोनिया गांधी, ऑस्कर फर्नांडिस आणि मोतीलाल व्होरा. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे शेअर्स 'यंग इंडियन'ला जारी करताना फायदा झाला असे सरकारचे म्हणणे आहे अन त्या फायद्यावर 'यंग इंडियन'च्या भागधारकांनी कर बुडवला असा सरकारचा दावा आहे, अन त्यावर पुढचे राजकीय इमले चढवण्यात आले आहेत.
८. २०१७ मध्ये 'यंग इंडियन' कंपनीचे आयकर कायद्यांतली नोंदणी रद्द करण्यात आली. या कृतीला आयकर लवादासमोर आव्हान देण्यात आले. हा खटला आजही प्रलंबित आहे. जरी 'यंग इंडियन' कंपनी हा खटला हरली तरी नोंदणी रद्द करण्याची कारवाई पूर्वलक्षी प्रभावाने करता येऊ शकत नाही, असं कोर्ट सांगते. त्यामुळे २०१०-११ च्या व्यवहारांवर २०१७ मधल्या विवादास्पद हालचालीच्या भरवश्यावर करआकारणी करता येऊ शकत नाही.
९. ३१ डिसेम्बर २०१८ रोजी, सरकारने (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT) एक परिपत्रक काढले आणि असे घोषित केले की जर एखादी कंपनी स्वतःचे शेअर्स जारी करत असेल तर करआकारणी होणार नाही. 'भेट' किंवा 'GIFT' च्या तरतुदी शेअर्स विकत घेताना किंवा विकताना लागू होतील पण स्वतःचे शेअर्स जारी करत असेल तर करआकारणी होणार नाही. त्याचा नॅशनल हेराल्ड खटल्यावर परिणाम होईल असे दिसल्यावर २ दिवसांत मागेही घेतले अन स्वतःचे हसे करून घेतले. याची कारणे सर्वोच्च न्यायालयात द्यावी लागतीलच.
भक्तमंडळी याला 'काँग्रेसचा' घातपात/षडयंत्र वगैरे नावं देताना दिसतात पण याचे मूळ कारण असे आहे की वेगवेगळ्या स्टार्टअप उद्योगांना या तरतुदींचा वापर करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या अन त्याविरुद्ध वाणिज्य, उद्योग मंत्री श्री. सुरेश प्रभू यांनी जाहीर नापसंती व्यक्त केली होती.
१०. दिल्ली उच्च न्यायालयाने हे सर्व मुद्दे रिट याचिकेत दाखल करून घेण्यास नकार दिला आणि आयकर कायद्यातल्या अपील तरतुदींसाठी हे सर्व मुद्दे सुरक्षित असल्याचे सांगितले. याविरुद्ध खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २९ जानेवारीला त्याची सुनावणी आहे.
११. आता प्रश्न उरतो मनी लॉण्डरिंग आणि फौजदारी तक्रारींचा, आयकर बुडवल्याचा दावा जर टिकला नाही तर मनी लॉण्डरिंग खटला आपसूकच रद्द होईल. हा सगळा जुमला सुब्रमणियम स्वामींनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर विसंबून उभारण्यात आला आहे.
१२. सर्वोच्च न्यायालयात यावर पुन्हा युक्तिवाद होतीलच पण ती एक रिट याचिका आहे आणि मूळ आयकर खटला खालच्या पातळीवर स्वतंत्रपणे लढवला जात आहेच.
१३. ज्यांना राजकीय गरळ उधळण्याची हौस असेल त्यांना शुभेच्छा.
#न्यायभारत #सीएच्यानजरेतून #NationalHerald
भाग १२
(ही किंवा अन्य कोणतीही पोस्ट शेअर करा, कॉपी पेस्ट करा, विचारण्याची गरज नाही. स्वतःच्या नावावर पोस्ट केली तरी माझी काही हरकत नसेल.)
© Harshvardhana Datar.
13 Jan 2019 - 11:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त स्ट्रॅटेजी... "मी दगड मारतोय. पण तो दुसर्या कोणीतरी माझ्या हातात दिला आहे. मला काहीही विचारू नका. (थोडक्यात, मी दगड मारणार. पण, मला जबाबदार धरू नका.)" काय पण नैतिकता !
अवांतरः सद्याच्या सामाजिक माध्यमांसंबंधीच्या कायद्याप्रमाणे, मूळ लेखका इतकाच, तो मजकूर पुढे सरकवणाराही जबाबदार असतो.
13 Jan 2019 - 9:16 am | ट्रम्प
अरे वा पूर्वी काँग्रेस पक्ष 90 कोटि पर्यन्त कर्ज द्यायचा !! कमाल आहे .
13 Jan 2019 - 9:53 am | Blackcat (not verified)
नायतर तुमच्या भाजपाने पैसे साठल्यावर ऑफिस बांधले ( तेही अपशकुनी आहे म्हणे )
13 Jan 2019 - 10:42 am | डँबिस००७
सुब्रमण्यम स्वामीनीं कोर्टा मार्फत
कॉंग्रेस पक्षाने नॅशनल हॅरॉल्ड ला ९० कोटी रु कसे transfer केले ?
कॉंग्रेस पक्षाने ९० कोटी रु कुठुन आणले ? असे प्रश्न विचारलेत त्याचे कागदी पुरावे बँक स्टेटमेंट मागीतलेत ! सो गा व रागा हे मुख्य आरोपी आहेत. कोर्टाने त्यांना बेलवर बाहेर सोडलेल आहे . त्यांना सु स्वा च्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत !!
13 Jan 2019 - 10:43 am | ट्रम्प
आता सगळ्या देणग्या चा हिशोब द्यावा लागतो हो , पूर्वी काय हापापा चा माल गपापा ! .
चांगल आहे . उद्योगपति कडून पक्षा साठी घेतलेल्या देणग्याच्या अफ़रातफ़री चा प्रयोग नेहरू पासून चालू आहे म्हणजे !!!!
13 Jan 2019 - 10:59 am | Blackcat (not verified)
राजकीय पक्षांच्या देणग्या मोदी सरकारने चौकशीमुक्त केल्या,
सन 2018
नेहरूंचा मृत्यू 1964-65 सुमारास जाहला,
https://www.thehindu.com/news/national/lok-sabha-passes-bill-to-exempt-p...
14 Jan 2019 - 1:18 am | डँबिस००७
पूर्वी काय हापापा चा माल गपापा
पूर्वीच नाही तर आता सुद्धा कॉंग्रेसचा अजेंडा तोच आहे !! "हापापा चा माल गपापा "
नॅशनल हॅरॉल्ड ला ९० कोटीच कर्ज दिल्याच खोटी कागद पत्र केली मग नॅशनल हॅरॉल्डची ५००० कोटीची मालमत्ता ह्यांच्या (म्हणजे सो गा व रा गा ) घश्यात गेली ! आता दोघेही बेल वर बाहेर आहेत !!
13 Jan 2019 - 11:16 am | ट्रम्प
1995 च्या वेळी लखनऊ मधील गेस्टहावुस मध्ये बहनजी आणि त्यांच्या आमदारांची अखिलेश सरकार चा पाठिम्बा काढण्या विषयी मिटिंग चालू असताना अखिलेश च्या समर्थकानी बहनजी वर हल्ला केला , जातिवाचक शिविगाळ केल्या होत्या . तेव्हां पासून ते कट्टरवैरी झाले होते .
आता 23 वर्षांनंतर त्याच बुवा भतीजा ला राजकीय अस्तित्व टिकवन्यासाठी पुन्हा एकत्र यावे लागले व त्यांनी सोइस्कर रित्या काँग्रेस ला बाजूला ठेवून जागा वाटप केले .
स्व. नरसिंहराव यांच्या नंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतृत्व विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवार (१९९९) यांच्याकडे होते. या पदावर असताना पवार यांनी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ३८ खासदार निवडून आणले होते. पण जेव्हा पंतप्रधानपदासाठी नाव सूचवायची वेळ आली तेव्हा स्वतः सोनिया गांधी पुढे सरसावल्या. अर्थात, त्यांचे विदेशीपण पाहून इतरांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. खरे तर तेव्हा विरोधी पक्षनेता असलेल्या पवार यांचे नाव पुढे केले असते तर इतरांनी पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असता. नंतर पवार, स्व. पी. संगमा व तारिक अन्वर यांनीही सोनियांचे विदेशीपण हा मुद्दा काँग्रेसमध्ये उचलला. सोनियांच्या भक्तांनी तिघांची हकालपट्टी केली होती .https://hindi.timesnownews.com/amp/india/article/ncp-chief-sharad-pawar-...
म्हणजे सत्ते च्या सारिपाटावर एकमेकांचे जुने वैर विसरून एकत्र आलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदींचे आभार मनावयास हवे .
ऊदा : मोगा , ब्लैककैट , गोडसे , विशुमित , माई , व इतर .
कृ ह घे.
14 Jan 2019 - 12:56 am | विशुमित
तात्या मिपापर कोण कोणाचे वैरी आहेत??
हा फक्त वाद संवाद चालू आहे. प्रतेक्षात सगळे (मोदी समर्थक, विरोधक अणि निव्ट्रल) वेगळी विचारधारा असताना सुद्धा एकमेकांचा बर्यापैकी आदर ठेवून आहेत.
उगाच मोदी प्रेमापायी मिपावर फुट पाडू नका.
==
उगाच नाही तिथे माझे नाव घायचा अती शहाणपणा करु नका, हा निर्वाणीचा इशारा!
14 Jan 2019 - 1:17 am | माईसाहेब कुरसूंदीकर
हेच म्हणते. वैयक्तिक टीका करायची सवय काही मंडळींना येथे आहे. मोदींवर्/भाजपवर टीका झाली की ही मंडळी थेट स्वातंत्र्य्पुर्व काळात जातात. नेहरू बोस ह्यांच्यावर पाळत ठेऊन होते, शास्त्रींचा खून झाला होता... असे मानणारे लोकही येथे आहेत हे पाहून आश्चर्य वाटते.
14 Jan 2019 - 12:02 pm | डँबिस००७
जगतीक महायुद्ध १ व २ च्या बॅकग्राऊंड वर जिथे युद्धात अक्षरशः करोडो लोक मारले गेले व ज्या युद्धात भारताचे किमान २५ लाख लोक मृत्युमुखी पडले ( भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नव्हता, ब्रिटीशांनी भारताला युद्धात ढकलल होत, गांधींनी ब्रिटीशांना भारतीय सैनीक वापरायची परवानगी दिलेली होती ) ह्या युद्धात स्वतः फक्त ४.५ लाख ब्रिटीश मारले गेले. या युद्धापुर्वी करोडो ज्यु लोकांचा अमानुषपणे संहार करण्यात आलेला होता त्या पुढे गांधीजींच्या अहिंसा चळवळीमुळे भारताला ईंग्रजांनी स्वातंत्र्य दिले हे मानणारे लोक आहेत. https://www.youtube.com/watch?v=7cgRwDkP6vk
नेहरुंनी सत्ता कशी बळकावली, सरदार पटेलांचा तसेच नेताजींचा काटा कसा काढला, आझाद हिंद सेनेच्या नावाचा कसा वापर करुन घेतला मग आझाद हिंद सेनेला कस बाजुला ढकलल, नेताजींना भुमिगत व्हाव लागल हे समजण्यासाठी ईतिहास उघडया डोळ्यानी शिकावा लागतो.
14 Jan 2019 - 12:09 pm | डँबिस००७
तुम्ही तुमचा अजेंडा चालु ठेवा, ईतिहास हा सहजा सहजी पुसला जात नाही,
नेहरुंनी काय काय उपद्व्याप केले होते हे सर्वांनाच माहिती आहे. लाल बहादुर शास्त्रीजींच्या मृत्युबद्दल ही असच गुढ अजुन आहे . जे नेहरुंनी केल ते ईंदिरा गांधीनी केल नसेल हे कश्यावरुन ? कारण लाल बहादुर शास्त्रीजींच्या नंतर पंत प्रधान पदी वर्णी ही त्यांचीच लागलेली होती.
14 Jan 2019 - 2:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपाच्या कुजबुज आघाडीची मते येथे नकोत. नेहरूंनी उपद्य्व्याप केले, पटेलांचा काटा काढला ह्यावर ठाम विश्वास असेल तर मोदी/शहा किंवा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने पुरावे आणावेत व टी.व्ही.वर सरळ सांगून टाकावे. पण ते धैर्य व हिंमत त्यांच्यात नाही. म्हणून समाजमाध्यमांतून अफवा पसरवायच्या.
14 Jan 2019 - 8:50 pm | Blackcat (not verified)
सहमत .
14 Jan 2019 - 9:48 pm | ट्रम्प
99 % गरीब जनता असलेल्या देशाचा पहिला पंतप्रधान हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास घेवून देशाची काय सेवा करत असेल ? म्हणजे उपलब्ध असलेले फ़ोटो तरी तेच सांगतात , आणि त्या फ़ोटो च्या ऑरिजिनीलीटी ला आज पर्यंत तरी काँग्रेस ने हरकत घेतली नाही .
एक वेळेस गाँधीचे कार्य , त्याग सामान्य माणूस मान्य करेल पण ििइंटरनेट वापरणारा कोणीही व्यक्ति चाचाची चाचेगिरी ओळखल्या शिवाय राहणार नाही .
14 Jan 2019 - 9:56 pm | Blackcat (not verified)
म्हणजे मिसळपाववर कॉकटेलचे धागे काढणारे आणि त्याला वा वा म्हणणारे वाईट आहेत का ?
14 Jan 2019 - 10:25 pm | Blackcat (not verified)
दारूची नशा उतरली की माणूस दुसर्या दिवशी परत माणसात येऊन आपले काम करतो,
पण ब्रह्मचर्य , संतपद , अतिकाम ( रादर , अतिकामाचे ढोंग ) ह्यांची नशा लागलेले लोक कधीही नॉर्मल माणसात येत नाहीत.
15 Jan 2019 - 9:52 am | सुबोध खरे
नॉर्मल ची व्याख्या काय तुमची?
केवळ लग्न करून संसारात असले कि नॉर्मल?
बायकोच्या चपला खाणारा आणि सासर्याला शिव्या देणारा नॉर्मल का?
15 Jan 2019 - 11:03 am | डँबिस००७
दुसर्याच्या बायकोला ('लेडी माउंटबॅटन) प्रेम पत्र लिहीणारे ह्यांचे आदर्श ! त्यांच्या कडुन अजुन काय अपेक्षा करणार ?
15 Jan 2019 - 12:46 pm | Blackcat (not verified)
आमच्या परिवाराकडून आपणास आरमी दिनाच्या शुभेच्छा
15 Jan 2019 - 7:29 pm | सुबोध खरे
धन्यवाद _/\_
18 Jan 2019 - 12:39 pm | lakhu risbud
हे असे खिंडीत नसते पकडायचे ! "हा वैयक्तिक हल्ला आहे" अशी बोंब मारण्याची संधीच ठेवलेली नाही.
असहिष्णुता वाढली आहे हे खरंच आहे.
14 Jan 2019 - 8:13 am | ट्रम्प
विनोदा चे वावडे आहे का तुम्हाला ?
काय राव कृ ह घे . लिहून सुद्धा निर्वाणी चा इशारा ?
15 Jan 2019 - 10:19 am | अनुप ढेरे
केवळ शिविगाळ नाही. मायावतींचे अगदी कपडे फाडण्याचा प्रकार घडत होता. तेव्हा भाजपाच्य ब्रह्मदत्त द्विवेदी नामक खासदाराने बंदुक दाखवत समाजवादीच्या गुंडाना रोखलं आणि मायवतींना त्या गदारोळातुन बाहेर काढलं.
13 Jan 2019 - 11:21 am | ट्रम्प
आता त्याच पावर साहेबा नीं गांधी कुटुंबा चे न थकता कौतुक करून जागा वाटप करून घेतले .
बाकी यू टर्न बाबत पवार साहेबांचा हात कोणीही धरु शकत नाही .
14 Jan 2019 - 7:31 am | Blackcat (not verified)
फाळणीच्यावेळी कर्तारपूर साहिब हे शिखांचे पवित्र ठिकाण भारताच्या ताब्यात घेण्यामध्ये कुचराई केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर टीका केली.
----------
होय ? मग तुम्ही जिंकून घेऊन या. सगळे काँग्रेसनेच करायचे का ?
14 Jan 2019 - 10:30 am | डँबिस००७
अय्या ,
तुम्हीच म्हणाला होतात की सगळी युद्ध कॉंग्रेसनेच लढली होती मग दर
युद्धाला थोडासा पाकिस्तानचा प्रदेश ह्या दराने एव्हांना पुर्ण पाकीस्तान जिंकुन झाला असता !!
ईतकी युद्ध लढली , पाकीस्तानचे ९० हजार युद्ध कैदी परत केले पण भारताचे ५०-६० सैनिक जे पाकिस्तानने युद्ध कैदी म्हणुन ठेवले होते त्यांना परत घ्यायला मात्र वेळ मिळाला नाही !
14 Jan 2019 - 10:42 am | सुबोध खरे
सगळे काँग्रेसनेच करायचे का ?
नाही
काँग्रेस सांगतंय आम्ही भ्रष्टाचार करतोय.
तुम्ही बाकी सगळं करा.
14 Jan 2019 - 7:40 pm | डँबिस००७
सगळे काँग्रेसनेच करायचे का ?
आ य ला काँग्रेस हा पाकिस्तानशी चार वेळा युद्ध् करुन सुद्धा आपली भुमी हरणारा जगातला असा पहिला पक्ष असेल जो स्वतःला विजेता घोषीत करतो. गिलगीट बाल्टीस्तान, काश्मिरचा पाक व्याप्त भाग हा अजुनही पाकिस्तान कडेच आहे. त्यातला काही भाग चीन ने गिळलेला सुद्धा आहे.
14 Jan 2019 - 8:45 pm | Blackcat (not verified)
Sanghi portal 'My Nation' spreads fake news about “Rahul Gandhi stumped by a 14-year-old girl” in Dubai
The article by ‘My Nation’ has no accompanying video to back its claim. Quite predictably, the article was soon found circulating on social media. Notable among those who shared it was addtional RBI director, Gurumurthy who has a penchant for falling for hoaxes. Turns out, it is a three-year old image!
https://www.altnews.in/my-nation-spreads-fake-news-about-rahul-gandhi-st...
14 Jan 2019 - 8:48 pm | Blackcat (not verified)
*माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवताना पकडला गेला राज्य भाजप IT सेल प्रमुख*
मुंबई : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला आहे. विशेष *एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला आहे.*
वास्तविक राहुल गांधी यांच्या मुलाखती विषयीची एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करण्यात करण्यात आली होती. वास्तविक एबीपी न्यूजच्या त्या मूळ फ्लॅश न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोशॉप करून त्यात राहुल गांधी जे बोलले नव्हते ते मुस्लिमांशी संबंधित वाक्य बनवून त्याला स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं होतं.
भाजपच्या या फेक महाशयांनी या मूळ बातमीमध्ये फोटोशॉपकरून “काँग्रेस मुस्लिमो की है और उनकी ही रहेगी – राहुल गांधी” अस धार्मिक रूप देऊन हिंदुत्वाचा ठरल्याप्रमाणे अजेंडा राबविण्याचा कार्यक्रम आखल्याचे सिद्ध आहे. वास्तविक त्यात राहुल गांधी यांनी कोणताही धार्मिक विधान केलं नव्हतं. परंतु, हिंदू मुस्लिम असा द्वेष पसरवून समाजात विकृती पसरविणे हा त्यांचा एकमेव अजेन्डा असल्याचे सिद्ध होत आहे. विषय केवळ फोटोंचानसून तर अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा खोडसाळपणा करून ते समाज माध्यमांच्या आधारे तरुण-तरुणींची माथी भडकविण्याचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांच्या या कृत्यामुळे ते प्रसार माध्यमांची सुद्धा अप्रत्यक्ष बदनामी करत आहेत. बातमी खोटी असल्याचे निदर्शनास येताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.
https://www.maharashtranama.com/politics/maharashtra-state-bjp-it-cell-h...
14 Jan 2019 - 9:12 pm | सुबोध खरे
मला वाटलं पोलिसांनी पकडलं. अटक झाली खटला भरला इ. इ.
चार काँग्रेसीं नेटकरींनी पकडलंय.
डोंगर पोखरून "झुरळ" निघालं
15 Jan 2019 - 5:59 am | Blackcat (not verified)