Skip to main content

ते पंधरा लाख !

Published on सोमवार, 04/06/2018
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

याद्या 65597
प्रतिक्रिया 264

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मराठी कथालेखका, अरे , मोदी सरकारची धोरणे,योजना ह्या मुख्यत्वे गरीब वर्गासाठी बनवल्या आहेत, राबवल्या जात आहेत. तेव्हा प्रत्येक योजनेचा फायदा हा प्रत्येक नागरिकास मिळेलच असे नाही
माईसाहेब कुरसूंदीकर , अगं तू म्हणतेस ते खरंच आहे. पण ज्याला फायदा मिळणार नाही तो वर्ग निवडणूकीत पाठिंबा देईल याची शक्यता कमीच.

In reply to by गामा पैलवान

त्यामुळे तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही मोदीद्वेष्टे आहात यावर शिक्कामोर्तब होतं
ना मी मोदीप्रेमी आहे ना मोदीद्वेष्टा.. माझ्यासाठी मोदी एक पंतप्रधान आहे जसे आतापर्यंत अनेक पंतप्रधान होवून गेलेत. बाकी सरकारच्या प्रत्येक योजनेचं आणि निर्णयाचं श्रेय मोदीना एकट्याला देण्याच्या मोदीभक्तांच्या खास सवयीमुळे भाजपातील इतर मंत्री /दिग्गज नेते दुखावले गेलेत आणि परिणामी २०१९ मध्ये स्पष्ट बहूमतापासून भाजप दूर राहिला तर मात्र मी आश्चर्य व्यक्त करणार नाही.

In reply to by मराठी कथालेखक

पण ज्याला फायदा मिळणार नाही तो वर्ग निवडणूकीत पाठिंबा देईल याची शक्यता कमीच
फायदा फक्त आर्थिकच नसतो. उ.दा. रेल्वेची सेवा सुधारली, स्थानके स्वच्छ असली, बसस्थानकांवर पिचकार्या मारणे बंद झाले तर अनेक लोकांना आनंद होईल. आजूबाजुला गरीबीत राहणार्या अनेकांचे जीवनमान सुधारताना दिसले तर (निदान आमच्यासारख्यांना तरी) आनंद होतो. नोटाबंदीमुळे लोकांच्या हालाला पारावर उरला नाही.. आता जिंकणे कठीण आहे असे चित्र रंगवले गेले पण उत्तर प्रदेशात भाजपावाले जिंकले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फायदा फक्त आर्थिकच नसतो
मान्य. पण इतरही फायदे विशेष दिसत नाहीयेत. उदा : स्वच्छ भारत - मी राहतो त्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसते, शहर विद्रुप करणार्‍यांवर काही कारवाई होताना दिसत नाही. आता सगळ्याच बाबी केंद्राच्या अखत्यारीत येत नाहीत ह्याची मला कल्पना आहे म्हणून इथे सगळे मुद्दे लिहित नाही. रेल्वे - सुमारे एक दीड महिन्यापुर्वी एक पाच-सव्वा पाच तासांचा रेल्वे प्रवास केला, पण या प्रवासाला १ तास ४५ मिनिटे विलंब झाला तर रेल्वे सुधारली असं कसं म्हणू मी ? नाही म्हणायला कल्याण स्टेशनवरची स्वच्छता वाखाणण्याजोगी होती हे पण मान्य करतो. कायदा व सुव्यवस्था - ही बाब प्रामुख्याने राज्याच्या अखत्यारीत येते (कारण पोलिस दल राज्याचे असते) पण तरी केंद्र काहीच प्रभाव टाकू शकत नाही का ? तसा काही प्रभाव टाकून कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर मला आनंद वाटला असता. माझ्या अपेक्षा फार साध्या आहेत - मध्यरात्री फटाके वाजवणार्‍यांना पुरता धाक बसेल अशी कारवाई व्हावी, रस्त्यातून उलट्या दिशेने वाहन चालवणार्‍यांचा बंदोबस्त व्हावा, रस्त्यातील अतिक्रमणे निघून जावी , मोठे प्रदूषण करणार्‍या रिक्षा व इतर वाहनांवर कारवाई व्हावी. रस्ते - हा विषय सुद्धा महापालिका / राज्याच्या अखत्यारीत आहे, पण तरी केंद्राने प्रभाव टाकावा. मी हिंजवडीत नोकरी करतो. हिंजवडी भागातील वाहतू़क कोंडी सर्वश्रुत आहेच. त्या कोंडीत कितीतरी वेळ आणि इंधन वाया जातेच पण प्रदूषण वाढते, माझा प्रदूषणाशी संपर्क अधिक वेळ राहतो. मी वर्षाला मोठा टॅक्स भरतो, बदल्यात माझी सरकारकडून इतकीच अपेक्षा आहे की मला माझ्या कामाच्या ठिकाणी सहज जाता यावे आणि रात्री माझ्या घरात सुखाने झोपता यावे.

In reply to by मराठी कथालेखक

प्लिज नका देऊ मत भाजप ला , तुम्ही जर भाजप ला मत दिले तर तुमच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्यामूळे भाजपचे मंत्रिमंडळ व कार्यकर्त्यांना फाशी घ्यायला झाडे कमी पडतील .

In reply to by सोमनाथ खांदवे

बरं आजोबा !! [मिपावर वावरताना एकमेकांच्या वयाचा काहीही अंदाज नसताना मला उगाच 'काका' म्हणण्यात मला तुमचा खोडसाळपणा दिसतो, त्याची मी केलेली परतफेड. असो ]

In reply to by मराठी कथालेखक

जशी न केलेल्या अपेक्षांची आपली यादी आहे तर केलेल्या किंवा आपल्याला ठळकपणे दिसून येणार्या कामांची यादी आहे का? नसल्यास ते कळवणे पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेला मिपाकर नाखु

In reply to by नाखु

२०१४ च्या पुढे दिसणारे बदल .......आता तरी काही आठवत नाहीयेत.. पण आठवलेत तर नक्की लिहिन कारण मी मोदी वा भाजपद्वेष्टा नाहीये (आणि भक्तपण नाहीये !!) एक दोन गोष्टी मी वर मान्य केल्या आहेतच - जसे नोटाबंदी नंतरच्या सुरवातीच्या त्रासानंतर आता काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे पदरात पडत आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

मकले साहेब, जर सरकारी योजनांचा प्रत्येकाला होणाऱ्या फायद्यांचा विचार करायचा झाला तर प्रत्येक योजना प्रत्येक व्यक्तीलाच नव्हे तर समाजातल्या प्रत्येक घटकांनाही फायदेशीर असणे शक्य नाही. उदा. मदरश्यांना लागू होणाऱ्या योजना समस्त हिंदूंना काही कामाच्या नाहीत. उज्ज्वला योजना शहरी लोकांच्या उपयोगाची नाही कारण टारगेट ग्रुप वेगळा आहे. सगळ्या ग्राहकांना लाभ व्हावा अशी GST करप्रणाली लागू केली गेली. पण त्यावर व्यापारी वर्ग नाराज झाला, तसेच बऱ्याच व्यावसायिकांनी, उदा. रेस्टॉरंटवाले, कर कमी झाल्याने होणारा फायदा पुढे ग्राहकापर्यंत पोचवला नाही. प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतोय याचं हे उदाहरण नाही का? इथे तुम्हीही फक्त "मला काय फायदा झाला" याचाच विचार करताय. पेट्रोल २-५ रुपयाने महाग झालं पण का झालं? अजूनही सबसिडी देऊन किमती कमी ठेवाव्या असं वाटतं का? कर कमी करायचं म्हणाल तर राज्यस्तरीय कर पण आहेत. बिगरभाजप राज्य कर कमी करून इतर राज्यांवर आणि केंद्र सरकारवर दबाव का निर्माण करत नाहीत? माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाही योजना म्हणजे अगदी शेतकरी कर्ज माफी योजनेसारखी एखादी योजना आयटी मधील आणि त्यातही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पाहिजे का? इन्फ्रास्ट्रक्चर मधील सुधारणा, नोटबंदी/ जीएसटी मुळे घरांच्या कमी झालेल्या किंवा स्टेबल झालेल्या किमती आणि त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, तसेच रेरा सारख्या कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेले संरक्षण - यापैकी काहीच तुम्हाला फायद्याचं नाहीये? गुणगान करावं असं म्हणणं नाही पण नावं पण ठेवण्यासारखं काय आहे ते दाखवून द्या. स्थानिक गोष्टींमध्ये मोदी लक्ष घालू शकणार आहेत का? तुमच्या शहरातील/ गावातील/ विभागातील स्वच्छतेसाठी तिथली जनता आणि मुनिसिपालिटी जबाबदार नाही का? इथे तुम्ही नुसती योजना चालू केली आणि पुढे स्वच्छता झाली नाही/ राहिली नाही म्हणून मोदींना दोष देताय पण त्याचप्रमाणे कित्येक योजना चालू करून त्या नीट न राबवणारी, किंबहुना भ्रष्टाचार करणारी, काँग्रेस का बरं दोषी नाही? त्याच योजना थोड्या सुधारणा करून मोदींनी नीट राबवून दाखवल्या तर त्याचे श्रेय न देता वर जुन्याच "नावाच्या" योजना राबवल्या म्हणून नावं ठेवली जातात? जनता म्हणून आपले काही कर्तव्य आहे याची जाणीव का नाही? परदेशात फिरण्यासाठी म्हणून गेलेला भारतीय सुद्धा कचरा करत नाही कारण जबर दंड असतो, अमेरिकेत रस्त्यांवर कचरा करणाऱ्यास $१००० दंड आहे असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या इथे रु. १००० दंड लावला तरी लोक सरकारला नावं ठेवणार आणि त्यातही अजून एक भ्रष्टाचाराची संधी शोधणार.

In reply to by ट्रेड मार्क

माफ करा तुम्हाला माझा प्रतिसाद नीट कळालेला दिसत नाहीये.
रत्येक जण आपापला स्वार्थ बघतोय याचं हे उदाहरण नाही का?
खरी गोष्ट आहे, प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघणार आणि ते अगदी नैसर्गिक आहे. दुसर्‍याच ओरबाडून मला काही नकोय... पण मलाही काहीतरी हवंय इतकं नक्की.
योजना म्हणजे अगदी शेतकरी कर्ज माफी योजनेसारखी एखादी योजना आयटी मधील आणि त्यातही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पाहिजे का?
मी वर म्हणालोय की मला अर्थिक फायद्यांची विशेष अपेक्षा नाही. मी कमावतो आहेच. पण माझे जीवन सुकर व्हावे यासाठी केंद्रातील सरकार काही करु शकते का ?
इन्फ्रास्ट्रक्चर मधील सुधारणा
दिसत नाहीयेत.. मी वर रेल्वेचे उदाहरण दिलेय. गाड्यांना होणारा विलंब यामुळे रेल्वे बदनाम आहे, यात सुधारणा केली का ? मला ५:१५ तासाच्या प्रवासाला १:४५ तास विलंब झाला (एप्रिल २०१८). ही बाब तर केंद्राच्याच अखत्यारीत येते ना ? मी याचा दोष मोदी सरकारलाच देतो आहे असे नाही. पण गौरव करावा असेही काही दिसत नाही. हिंजवडितल्या होणार्‍या वाहतूक कोंडीचा मी वर उल्लेख केलाय. मान्य की ही बाब केंद्राच्या थेट अखत्यारीत येत नाही. पण या ठिकाणी लाखो लोक काम करतात त्यातून कित्येक कोटींचा महसूल केंद्रास मिळत असणार (बहूतेक सगळ्या कंपन्या नफ्यात आहेत, त्यांच्या नफ्यावर मिळणारा कंपनी कर, आम्हा कर्मचार्‍यांचा आयकर ई) तर असे असताना केंद्राने या बाबतीत लक्ष घातले असते , आमचा रोजचा प्रवास थोडा सुखकर झाला असता तर नक्कीच काही कौतूक केले असते. आता मेट्रोचा घाट घातला आहे. त्याचा कितपत उपयोग होईल ते माहित नाही. मी नकारात्मक दृष्टीकोन ठेवत नाही , कदाचित खूप चांगली च्यवस्था असू शकेल ती. पण भविष्यात कार्यान्वित होणार्‍या गोष्टीसाठी मी आताच कौतुक व निंदा दोन्ही करणार नाही.
नोटबंदी/ जीएसटी मुळे घरांच्या कमी झालेल्या किंवा स्टेबल झालेल्या किमती
याबद्दल नक्की माहित नाही. तसेही माझे २०१० मध्ये घर खरेदी करुन झाले आता सध्या तरी काही विचार नाही म्हणून घरांच्या किमती बघितल्या नाहीत.
त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर,
काही प्रमाणात खरंय. पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर. पण हे किती दीर्घकाळ टिकणार ? माझ्या गृहकर्जाचे काही दर मी खाली नमूद करतो आहे ते पहा. येवू घातलेला पुढचा दरही यात आहे. व्याजदर पुन्हा वाढायला सुरवात होते आहे , पुन्हा ते २०१४ च्या पातळीवर जातील काय ? 01-DEC-2013 - 10.75 01-MAR-2014 - 10.25 01-JUN-2015 - 10.05 01-JUL-2015- 9.90 01-JAN-2016 - 9.65 01-APR-2017 - 9.50 01-APR-2018 - 9.70 01-JUL-2018 - 9.80
इथे तुम्ही नुसती योजना चालू केली आणि पुढे स्वच्छता झाली नाही/ राहिली नाही म्हणून मोदींना दोष देताय पण त्याचप्रमाणे कित्येक योजना चालू करून त्या नीट न राबवणारी, किंबहुना भ्रष्टाचार करणारी, काँग्रेस का बरं दोषी नाही?
नाही. मी मोदींना दोष देत नाहीये. पण त्यांचा गौरव करावा असेही काही दिसत नाही ना. आणि काँग्रेस दोषी नाही असंही मी म्हणत नाही. पण मग काँग्रेसच्या पातळीचं काम भाजप करत असेल तर विशेष गौरव तरी का करावा याचं उत्तर देवू शकता का ?
त्याच योजना थोड्या सुधारणा करून मोदींनी नीट राबवून दाखवल्या तर त्याचे श्रेय न देता वर जुन्याच "नावाच्या" योजना राबवल्या म्हणून नावं ठेवली जातात?
माझ्या प्रतिसादात हे कुठे दिसलं ? कोणतीही योजना कोणत्याही नावानं राबवा त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मी केवळ वस्तुनिष्ठ विचार करतो.
परदेशात फिरण्यासाठी म्हणून गेलेला भारतीय सुद्धा कचरा करत नाही कारण जबर दंड असतो, अमेरिकेत रस्त्यांवर कचरा करणाऱ्यास $१००० दंड आहे असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या इथे रु. १००० दंड लावला तरी लोक सरकारला नावं ठेवणार आणि त्यातही अजून एक भ्रष्टाचाराची संधी शोधणार.
सत्तेचा मोह असणार्‍या सरकारांना लोक नाव ठेवणार याची भिती असते आणि ते लोकधार्जिणे निर्णय घेत राहतात, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठोस पाउले उचलावीत.

In reply to by मराठी कथालेखक

एका अनुभवावरून मत बनवून टाकलं का? मी जेव्हा लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास केला तेव्हा ट्रेन्स अगदी वेळेवर होत्या. एवढंच नव्हे तर ७-८ तासाच्या प्रवासात २ वेळा तरी रेल्वेचे लोक स्वतःहून येऊन डबा पुसून गेले. रेल्वे स्थानके आणि डबे सुद्धा बरेच स्वच्छ दिसले. हिंजवडीचं म्हणाल तर मी स्वतः सुद्धा हिंजवडीला रोज प्रवास केलेला आहे, त्यालाही ७-८ वर्ष होऊन गेली. माझ्या मते ट्राफिक जॅमला लोकही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक चारचाकीत एक माणूस दिसतो, कारपूल करावा किंवा कंपनीच्या बस वापराव्या किंवा जाण्यायेण्याच्या वेळा थोड्या बदलाव्या असा कोणी विचार करत नाही. मी हिंजवडीत असताना कंपन्यांनी स्वतः पुढाकार घेऊन इन आऊट टाईमिंग्स बदलले होते, ते सध्या बारगळलं का? मी मोदींना दोष देत नाहीये. पण त्यांचा गौरव करावा असेही काही दिसत नाही ना एकूण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही फारच छोट्या परिघात विचार करताय असं वाटतं, कदाचित तुम्ही म्हणताय तसं मला तुमचा प्रतिसाद कळला नसावा. तुमच्या माझ्या दोष देण्याने किंवा गौरव करण्याने मोदींना काही फरक पडेल असं वाटत नाही. एवढंच काय २०१९ मध्ये पंतप्रधान पद नाही मिळालं तरी त्यांना काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. काँग्रेसच्या पातळीचं काम भाजप करत असेल तर एका ट्रेनच्या प्रवासावरून आणि तुमच्या येणाजाण्याच्या रस्त्यावरून तुम्ही मत बनवताय. यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवताय. पण दुसरीकडे व्याजदर कमी झाले त्याचं श्रेय मात्र मोदी सरकारला नाही देत आणि म्हणताय "मी केवळ वस्तुनिष्ठ विचार करतो."! शहरांतर्गत रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे जरा बघा. "रेपो रेट" हे शब्द कधीतरी ऐकले असतील अशी आशा करतो, हे काय आहे आणि त्याचा ग्राहक कर्जाशी काय संबंध असतो हे जरा गुगलून बघा. गृहकर्ज का स्वस्त झालं हे इथे वाचा आणि इथे पण वाचा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर कर्जाचे दर आणि ठेवींचे दर एक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे ठेवींवर १०% आणि कर्ज मात्र ८% असं होऊ शकत नाही. म्हणून कर्जाचे दर कमी करायचे झाले तर ठेवींचे दर पण कमी करायला लागणार. म्हणजे मग ठेवीदार, मुख्यतः ज्येष्ठ नागरिक रागावणार. हा तिढा कसा सोडवायचा सांगा बघू. सत्तेचा मोह असणार्‍या सरकारांना लोक नाव ठेवणार याची भिती असते आणि ते लोकधार्जिणे निर्णय घेत राहतात माझ्या मते तरी निश्चलीकरण आणि जीएसटी या निर्णयांसाठी मोदींना सगळीकडून शिव्या बसल्या आहेत. छोटे आणि मध्यम व्यापारी, जे मोदींचे समर्थक मानले जात होते, त्या लोकांना या दोन्ही निर्णयांचा फटका बसला. निश्चलीकरणात सामान्य माणसाचे पण हाल झाले असं म्हणतात. मग हा सत्तेचा मोह आहे म्हणता येईल का? त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर सारख्या योजना आग्रहाने राबवल्या. त्यामुळे मधल्यामध्ये पैसे खाणारे लोक नाराज झाले. पेट्रोल/ डिझेल वरील सबसिडी बंद करून ते जागतिक दरांशी संलग्न केले, त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर भारतातले पण दर वाढले. ते वाढायला लागल्याबरोबर लगेच मोदींवर टीका झाली. कर हा त्यातला मोठा भाग आहे आणि ते कमी करावेत अशी मागणी होते आहे. पण त्यात राज्यस्तरीय करांचा पण मोठा सहभाग आहे. जर राज्य तयार नसतील तर काय करायचं?

In reply to by ट्रेड मार्क

एका अनुभवावरून मत बनवून टाकलं का?
आता ४ वर्षांत मी एकदाच ट्रेनने फिरलो तर एकच अनुभव येणार ना ? एक असेल तर तो मोजायचा नसतो का ? बरं ट्रेनला विलंब व्हायला काही तात्कालिक कारणही दिसत नव्हते (खराब हवामान, अपघात ई) आणि काही मित्रांच्या सांगण्यावरुन हे ही कळले की हे ट्रेन नेहमीच अशी धावते ..म्हणजे मला आलेला अनुभव अगदीच चुकून आला होता असंही नाही ना.
एका ट्रेनच्या प्रवासावरून आणि तुमच्या येणाजाण्याच्या रस्त्यावरून तुम्ही मत बनवताय.
बरं मग ? यावरुन मत बनवू नये असा नियम आहे का ? कारण बाकी गोष्टी अर्थिक आहेत ज्यांचा केंद्राशी संबंध आहे (पेट्रोल दरवाढ , आयकर कमी होणे ई) पण अर्थिक लाभाची अपेक्षा ठेवत नाही. केंद्र गरीबांसाठी काहीतरी करत असल्याने नोकरदार मध्यमवर्गाला अधिक अर्थिक लाभ देवू शकत नाही तर ठीक आहे, त्याबद्दल तक्रार नाही. पण आमचे जीवन सुखकर करण्यासाठी काही करु शकते का ?
यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवताय. पण दुसरीकडे व्याजदर कमी झाले त्याचं श्रेय मात्र मोदी सरकारला नाही देत
हा खोडसाळपणा झाला. मी अगदी स्पष्टपणे म्हंटलं आहे की व्याजदर कमी झाल्याच श्रेय मी मोदीला द्यायला तयार आहे. पुन्हा वाचा हवं तर
पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर.
झालंच तर हिंजवडीच्या वाहतुकीचा वा रेल्वेच्या विलंबाचा दोषही मी मोदींच्या माथी मारलेला नाहीच.
शहरांतर्गत रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे जरा बघा.
पुन्हा एकदा खोडसाळ वाक्य. मी स्पष्टच म्हंटले आहे -
मान्य की ही बाब केंद्राच्या थेट अखत्यारीत येत नाही.
हवं तर माझा त्या संबंधीचा परिच्छेद पुन्हा वाचा.
"रेपो रेट" हे शब्द कधीतरी ऐकले असतील अशी आशा करतो, हे काय आहे आणि त्याचा ग्राहक कर्जाशी काय संबंध असतो हे जरा गुगलून बघा. गृहकर्ज का स्वस्त झालं हे इथे वाचा आणि इथे पण वाचा.
समजा की मला यातलं काहीच कळत नाही. आणि ते समजण्याची माझी कुवत पण नाही. पण व्याजदर कमी होण्याचं श्रेय मी मोदी सरकारला द्यायला तयार आहे असं मी म्हंटलं आहेच ना ? मग वाद कुठे यात ? आता व्याजदर कमी होण्याच श्रेय जर मोदी सरकारला गेलं तर व्याजदर पुन्हा समजा या सरकारच्या कार्यकाळात वाढलेत तर त्याचा दोष ही या सरकारला घ्यावा लागेल ना ? 'श्रेय मोदी सरकारचं दोष दुसर्‍या कुणाचा' अशी तुमची भूमिका असेल तर सांगा अन्यथा यात अधिक वाद करण्यासारखे काही दिसत नाही.
एकूण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही फारच छोट्या परिघात विचार करताय असं वाटतं,
हो.. अर्थातच.. मी काही कु़णी जगाचे ज्ञान असलेला विचारवंत नाही ,मी एक सामान्य माणूस आहे. मी स्वतः , माझे कुटूंब आणि आणि माझे मित्रमंडळी यांचे अनुभव ई वर माझा परीघ अवलंबून आहे तो छोटाच आहे. आणि ते मान्य करण्यात मला अजिबात कमीपणा नाही.

In reply to by मराठी कथालेखक

साहेब, आमचा दंडवत स्वीकारावा. या प्रतिसादातील खालील वाक्यांमुळे जरा गैरसमज झाला. त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, काही प्रमाणात खरंय. पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर. मी म्हणतो म्हणून का होईना तुम्ही मोदींना याचं श्रेय द्यायला तयार झालात, तुमचं मन खरंच मोठं आहे. हे मनापासून म्हणतोय बर्का, नाहीतर तुम्हाला खोडसाळपणा वाटायचा.

In reply to by ट्रेड मार्क

मी म्हणतो म्हणून का होईना तुम्ही मोदींना याचं श्रेय द्यायला तयार झालात, तुमचं मन खरंच मोठं आहे.
धन्यवाद... पण खरंच या अर्थिक बाबी गुंतागुंतीच्या असतात. व्याजदर कमी असलेले चांगले की जास्त असलेले इतका छोटा मुद्दा घेतला तरी मोठ्या चर्चा घडू शकतात. त्यामुळे अर्थिक आघाडीपेक्षा मी इतर मुद्द्यांकडे अधिक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. त्यात दैनंदिन शहरी-नोकरदार माणसाच्या जीवनात केंद्राच्या अखत्यारित असलेल्या बाबींशी थेट संबंध कमीच येतो. मी नकारात्मक विचार नक्कीच करत नाहीये. किंवा मोदी सरकारवर टीका करणे हे उद्दिष्टही नाही. हो पण माझी मत कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचली आणि सरकारने उरलेल्या एक वर्षात जरी काही पाऊले उचलली तरी मला या सरकारला पाठिंबा द्यायला आवडेल. मला इतकेच म्हणायचेय की शहरी मध्यमवर्गाकडेही सरकारने लक्ष द्यावे १) रेल्वेतील सुधारणा - तुम्ही म्हंटलंय तसं काही गाड्या वेळेवर धावतात हे खरेच आहे (सुपरफास्ट एक्स्प्रेस) आणि त्यातली स्वच्छता, सुविधा पण चांगल्या असतात. पण त्याचवेळी काही गाड्या (बहूधा मेल एक्स्प्रेस ) अजिबात वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत , इतर गाड्यांच्या पासिंग साठी वेळोवेळी थांबवल्या जातात. रेल्वेचा हा दुजाभाव जुनाच असला तरी आता तो संपुष्टात आला पाहिजे. बरेच रेल्वे अपघातही होत असतात. गेल्या चार वर्षातही झालेत. त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. २) शहरातील प्रदूषण - कारखाने तसेच , वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. शहरात प्रत्यक्षात प्रचंड धूर ओकत असूनही PUC प्रमाणपत्र घेवून फिरणारी अनेक वाहने आढळून येतात. PUC शी संबंधित जुनाट कायदे बदलले गेले पाहिजे. वाहन प्रदूषण करत असूनही खोटे आकडे टाकून PUC प्रमाणपत्र देणार्‍या केंद्राने जबर बसणे गरजेचे आहे. ३) संरक्षण - सीमेवरील संरक्षणाच्या परिस्थितीबद्दल बोलण्याइतका माझा काही अभ्यास नाही. पण शहरी भागात लष्करी हद्दीतील विकासकामे , रस्ता रुंदीकरण , पुण्यातील लोहगाव येथील लष्करी-नागरी विमानतळाची क्षमता वाढवणे या बाबी संरक्षण मंत्रालयाने मार्गी लावणे गरजेचे आहे. ४) ध्वनी प्रदूषणाबाबत कठोर कायदे करणे गरजेचे आहे. सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाच्या १० नंतर लाऊडस्पीकर फटाके यांना बंदी या निर्णयाचाच काहीसा आधार आहे. पण या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी ज्यायोगे होईल असे कायदे केंद्र बनवू शकेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

निवडणुकेत मत कोणाला द्यायचं हा वेगळा विषय आहे. पण कॉमनमॅन जर तक्रार करणार नाहि, अपेक्षा व्यक्त करणार नाहि तर लोकशाहीचा काहि उपयोग नाहि.

In reply to by मराठी कथालेखक

ह्ये लंच ब्येस म्हंतो मी ! "६० वर्षातली घान चार वर्षात येकदम सपासाट क्येली नाय म्हून साठ वर्सं घान करन्यार्यांना परत आजून घान कराया निवडून द्येनार काय ?!*" वारं गब्रू वा, ह्येलाच शिक्शित मानून म्हन्तात व्हय ? * : ह्या परश्न आमाच्या श्येतातल्या रामा गड्यानं आमच्या लोकल न्येत्याला (सरपंच रामभाव) इचारला व्हता. (तेवा रामभावची दातखिळ बस्ली, त्ये येग्ळं :) ).

In reply to by गब्रिएल

माफ करा पण आपल्या लेखनशैलीमुळे मला आपल्याशी अधिक संवाद /प्रतिसाद शक्य होणार नाही. धन्यवाद.

In reply to by manguu@mail.com

ब्रिटिश इंडियाची फाळणी झाली तेव्हा मुस्लिम बहुसंख्य तो पाकिस्तान आणि हिंदु बहुसंख्य तो भारत अशी झालेली आहे ! हा देश हिंदुंचाच आहे ! हिंदुंनी स्वयं प्रेरणेने सर्वधर्मसम्भाव हे तत्व स्विकारुन देश धर्मनिरपेक्ष ठेवला आहे. हिंदु बहुसंख्य नसते तर देश धर्म निरपेक्ष राहिलाच नसता. ह्या येथुन पार युरोपात जाई पर्यंत तुम्हाल एकही* धर्मनिरपेक्ष देश दिसणार नाही. धर्मनिरपेक्षता हा हिंदुंचा वीक पॉईट नसुन इतिहास आहे , इथे आमच्या महाराष्ट्रात सातवाहनांनी बौध्द जैन सर्वांना समान वागणुक दिलेली आहे २००० वर्षांपुर्वी ! . तस्मात हिंदुना धर्मनिरपेक्षतेचे नाव काढुन डिवचणारे स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेले लोक हेच हिंदुंमधील हिंदुराष्ट्र ह्या संकल्पनेच्या आग्रहाला कारणीभुत आहेत ! ( * एक तुर्कस्तान दिसेल पण लक्षात ठेवा कि तसा तो धर्म निरपेक्ष होवु नये म्हणुन ज्या गटाने चळवळ केलेली त्यांना तुमच्याच महान नेत्याने पाठिंबा दिला होता, केमाल पाशाने तो गाढवपणा मोडीत काढला धर्मनिरपेक्ष देश करायचा प्रयत्न केला अन तुमचे महान नेते तोंडावर आपटले )

In reply to by प्रसाद गोडबोले

इथे आवडत नसेल तर सिरीयाला जा / न्यूयॉर्कला जा / मंगळावर जा , असे नेटवर कितीतरी लोक बोलत असतात , म्हणून मीही बोललो.

In reply to by manguu@mail.com

सिरीया हा जाहीरेपणे बा'अथिझम ला सपोर्त करणारा इस्लामिक देश आहे , न्यु यॉर्क पक्षी अमेरिका हा जरी धर्मनिरपेक्ष देश असला तरीही इथे प्रोटेस्टंट खिर्श्चनंचा जाहीर प्रभाव आहे ! इन फॅक्ट , हिरव्या नोटेवर स्पष्ट लिहिलेले असते " इन गॉड वी ट्रस्ट" . ( हे असे आपल्या नोटेवर , स्वतःला सनातनी म्हणणार्‍या गांधीबाबाच्या फोटुच्यावर लिहिले तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल नै ! कित्ती मजा येईल तुमचा तळतळाट बघायला =)))) ) बाकी बोलत राहा , फार मनोरंजन होते तुमचे प्रतिसाद पाहुन :)

दुबईत ड्राईव्हींग लायसन सहज मिळत नाही, बर्याच ट्रेनिंग टेस्टींग नंतरच लायसन मिळत ! पण युरोप अमेरिकेतुन आलेल्या लोकांना त्याच्या मायदेशातल्या लायसनच्या बदल्यात युऐईच लायसन मिळत ! ह्या लिस्ट मध्ये आता चायनातुन आलेल्या लोकांचाही सामावेश केला आहे !! विचार करा अश्या फॅसिलीटीसाठी भारताचा कधी विचार होउ शकेल ? रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणार्या डंपर ट्रक ने समोरुन धडक दिल्याने अहमदाबाद मधल्या ऐकाच कुटुंबातील ६ लोकांचा बळी घेतला. अश्या ट्रक ड्राईव्हरनां काय शिक्षा करता येईल ? मला वाटत की अश्यांना समोरुन गोळ्याच घालाव्यात अस मला वाटत !

In reply to by डँबिस००७

पण युरोप अमेरिकेतुन आलेल्या लोकांना त्याच्या मायदेशातल्या लायसनच्या बदल्यात युऐईच लायसन मिळत
व्हिसाचेही तसे आहे असे ऐकले आहे. म्हणजे युरोपियन पास्पोर्ट असणारे नागरिक अमेरिका/ऑस्ट्रेलिया/कॅनडा येथे तात्पुरते जाण्यास टुरिस्ट विसाची गरज नसते. आपला देश बदलतोय पण अजूनही भारत तिसर्या जगातला(थर्ड वर्ल्ड कंट्री) देश म्हणूनच ओळखला जातो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्यात काहि प्रॉब्लेम नाहि. मुळात थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे मागासलेले देश नाहित तर शीतयुद्धकालीन जगाच्या रचनेत अमेरीका आणि रशीया, पक्षी एन.डी.ए आणि यु.पी.ए पासुन फारकत घेतलेले थर्ड फ्रंट टाईप देश. पण थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे मागासलेले असच साधारणपणे समजल्या जातं हे ही खरं आहे.

डोळे भरून पावले , तुम्ही थोडी तरी कामे मान्य केलीत . आम्हाला तरी भाजप कुठं सतत बोकांडी पाहिजे ? पण 5 वर्षात हिशोब मागणे , सरकार बदलने अशा विचारांचे असू नये देशात 70 % जनता ही गरीब दरिद्री असल्यामुळे त्याचें जीवनमान भाजप लगेचच नाही बदलू शकणार . 10 / 15 वर्षा नंतर तुलनात्मक काँग्रेस जर वरचढ वाटली तर आणू परत काँग्रेस ला निवडुन !

In reply to by सोमनाथ खांदवे

नाव एल्गार काम विखार मग "प्रकाश"कुठलाही असूदे अंधारच अंधार चोहीकडे,आनंदी आनंद गडे!! चुकाही होत असतील नव्हे आहेतच पण काम करत आहेत म्हणूनच चुका होतात हे समजत आहै.लोक प्रश्न विचारत आहेत म्हणजे अपेक्षा आहे आणि हेच सरकार करेल याबाबत बहुतांश सकारात्मक बदल ठेवून आहैत,एखाद दुसरा तोंडाळ, उपद्रवी गणंग साफ होतीलच रस्त्याच्या कामांचा वेग , संरक्षण खात्यात भरीव पायाभूत सुविधा विकसित होत आहेत,पुण्यातील मेट्रोला मागील सरकारने फक्त कागदावरच घोडे नाचवून ७-८ वर्ष घालवली बेंगळुरू, पुणे एकाच वेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते याची नोंद घ्यावी पाठपुरावा करून तीन वर्षांत सगळ्या परवानग्या,हरीत लवादाच्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावून प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे. सगळं काही आलबेल आहे असं नाही पण बदल होत आहेत,याच चार वर्षांत पुनः पुन्हा निघणारे मोर्चे प्रतिमोर्चे,धृवीकरणासाठी केलेल्या दंगली, जातीयवादी शक्तींना खतपाणी घालून ( सत्ता भ्रष्ट नेत्यांची लालसा), या सर्व पार्श्वभूमीवर कामकाजात प्रगती आहे अगदी १८० कोनातून नसेलही पण पाऊल पुढे नक्कीच आहे आता लक्ष फक्त तुलनेत कमी असलेल्या बाजूकडे द्यायचं का मला मोफत, विनासायास,कुणाच्या हक्क मारून काहीच दिले नाही म्हणून प्रत्येक विकासकामात कण्हायचं, ज्याचं त्यानं ठरवावं कुठेही पाच पैसे ही सभासद नसलेला नाखु चिल्लर खुर्दा

In reply to by नाखु

विकासकामांबद्दल लोक भ्रमिष्ट झाले आहेत. विकासकामांत भूसंपादनास जास्त काळ जातो , नंतरची कामे वेगात होतात. खुद्द गुजरात मेट्रो 2003 पासून अडकली आहे. आणि आमची मुंबई मोनोरेल सगळे होऊनही एकदाच ( की एकदाची ! ) आग लागल्याने तशीच पडून आहे . ( चालू झाली की मी डायरेकट हाजी अलीला जाणार आहे . )

In reply to by अर्धवटराव

हा ना राव, त्ये न्हेमिच्या तिरकस लिवन्याच्या सवयीचं इक्त गुलाम झाल्याती की त्येंच्याकडं दुसर कायबाय हाय की नाय ह्ये त्येंना म्हाईत पडंनासं व्हतं. =)) =)) =))

In reply to by manguu@mail.com

मंगु बाबा , तूंच्या वैचारिक प्रवाह ची नस बरुबर सापडली बगा . म्या म्हणतुय तिकडं पाकिस्तान ची टीव्ही च्यानल वाले मोदी सरकार च्या योजना चें तोंड फाटस्तवर कौतुक करतंय या , आन आमचा मंगुबाबा च का किरकिर कर्तुया ? न्हाई म्हंजी अस्तिल थोड्या उणीवा भाजप सरकार च्या पण नांदवून घ्यायचं नाय आन सारख काडीमोड ची धमकी ह्ये आसल यल्गार वालच करत्याल बगा . खायचं आन हागायच याच्या पुढ त्यांची डोस्की चालतच नाय .

In reply to by सोमनाथ खांदवे

नाव एल्गार काम विखार मग "प्रकाश"कुठलाही असूदे अंधारच अंधार चोहीकडे,आनंदी आनंद गडे!! चुकाही होत असतील नव्हे आहेतच पण काम करत आहेत म्हणूनच चुका होतात हे समजत आहै.लोक प्रश्न विचारत आहेत म्हणजे अपेक्षा आहे आणि हेच सरकार करेल याबाबत बहुतांश सकारात्मक बदल ठेवून आहैत,एखाद दुसरा तोंडाळ, उपद्रवी गणंग साफ होतीलच रस्त्याच्या कामांचा वेग , संरक्षण खात्यात भरीव पायाभूत सुविधा विकसित होत आहेत,पुण्यातील मेट्रोला मागील सरकारने फक्त कागदावरच घोडे नाचवून ७-८ वर्ष घालवली बेंगळुरू, पुणे एकाच वेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते याची नोंद घ्यावी पाठपुरावा करून तीन वर्षांत सगळ्या परवानग्या,हरीत लवादाच्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावून प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे. सगळं काही आलबेल आहे असं नाही पण बदल होत आहेत,याच चार वर्षांत पुनः पुन्हा निघणारे मोर्चे प्रतिमोर्चे,धृवीकरणासाठी केलेल्या दंगली, जातीयवादी शक्तींना खतपाणी घालून ( सत्ता भ्रष्ट नेत्यांची लालसा), या सर्व पार्श्वभूमीवर कामकाजात प्रगती आहे अगदी १८० कोनातून नसेलही पण पाऊल पुढे नक्कीच आहे आता लक्ष फक्त तुलनेत कमी असलेल्या बाजूकडे द्यायचं का मला मोफत, विनासायास,कुणाच्या हक्क मारून काहीच दिले नाही म्हणून प्रत्येक विकासकामात कण्हायचं अन् कुंथायचं, ज्याथचं त्यानं ठरवावं कुठेही पाच पैसे ही सभासद नसलेला नाखु चिल्लर खुर्दा

CORPORATES SELL TO REPAY BANK LOANS - Modi ends the free rides given by Manmohan - Chidambaram gang Biggest ever Sale of Indian Corporate Assets in Indian History.. The so called Suited Booted Sarkar has really booted the rear of the Corporates who borrowed easy Public Money during Congress rule to buy Assets for themselves.. Jindal Steels is selling 49% of its Rail business, 5% of its Energy exchange and its 3,500 MW Power plant.. Essar is selling a huge stake in its Steel business and 49% of its Oil to a Russian Oil business.. GVK sold 33% of its Bangalore Airport stake as well as its controlling stake in Bombay Airport and its complete Road assets.. DLF is selling its Saket Mall and 40% of all its Rental Assets and Land Assets.. GMR Highway Projects, South African Coal Mine, Istanbul Airport, 70% in a Singapore Power Project, 2 Coal Mines in Indonesia.. JP Group sold all its Cement Assets to Ultra Tech Cements.. Yamuna Expressway stake, Power to JSW Energy.. Tata is selling its Corus Steel in UK.. Dhamra Port, Communications Arm Neotel in South Africa.. Land in Bombay.. Lanco Assets in Power Generation on sale in Andhra and Udupi.. Videocon selling Telcom Spectrum in 6 circles.. Oil assets in Mozambique.. Renuka Sugars is selling its Brazil Power, Sugar and Bio-fuel business.. Sahara groups 86 Real Estate Assets are on sale.. 42% stake in Formula 1, Mumbai's Sahara Hotel, Grosvernor House Hotel London, New York Plaza Hotel, The Dream New York Hotel and 4 Airplanes.. Nearly all of Vijay Mallya's Assets are on Sale.. Reliance Infrastructure is selling 49% in Electricity Generation, Transmission in Mumbai.. Cement business to Birla Corp.. Also it's entire Portfolio of Road Projects, 100% of it.. Have you heard in 60 years any Indian Promoter selling their Company to repay Bank Loans.!? Now you know who is cracking the Whip . http://www.thehindu.com/business/Industry/the-biggestever-fire-sale-of-indian-corporate-assets-has-begun-to-tide-over-bad-loans-crisis/article8573163.ece

In reply to by डँबिस००७

जो घेणार तोही ह्याच्यासाठी लोनच घेईल ना ? राजाने हत्ती विकायला काढला म्हणून फिदीफिदी हसायचे. पण तो घेणार कोण आणि कसा ? तसे तर व्हाट्सप तज्ज्ञ बोलतात - मोदींमुळे कराची बंदरही विकायला काढले आहे म्हणे .

गोरक्षेचा मुद्दा आला , त्यात मुसलमानांना आत टाकले आता भीमा कोरेगाव प्रकरणात दलित आणि आदिवासीना. एकंदर आपल्या probable विरोधी गटाला कशात ना कशात अडकवलयागत वाटते आहे.

‌ ‌1 ) गेल्या 70 वर्षात लाखों कोटींची माया काँग्रेस नेते आमदार ,खासदार व नगरसेवकांनी गोळा केली तरी निवडणूक लढण्या साठी जनते कडे भीक मागणारी काँग्रेस , ‌2 ) ज्या 'आप ' ने काँग्रेस ला हाकलताना खारू चा वाटा उचलला त्याच्या च बरुबर निर्लल्ज पनाणं युती चर्चा सुरू करणारी काँग्रेस , ‌3 ) 70 वर्ष संपूर्ण भारत देश 'गांधी लिमिटेड कंपनी ' प्रमाणे चालवणारी काँग्रेस , ‌4 ) 70 वर्ष काँग्रेस पक्षात गांधी परिवारा व्यतिरिक्त दुसरे नेतृत्व बहरू न देणारी काँग्रेस , ‌5 ) मुबंई हल्ल्या वेळी खंबीरपणा न राखता दोन तासात चार वेळा कपडे बदलणारे नेते असलेली काँग्रेस ‌6 ) ' मुबंई हल्ल्या मध्ये पाकिस्तानी आई एस आई चा हात आहे ' हे नवाज शरीफ ने मान्य केले पण त्या हल्ल्यात आर एस एस ला गुंतवण्या साठी पुस्तक प्रसिद्ध करणारी काँग्रेस , ‌7 ) पाकिस्तान मध्ये जाऊन तेथील मीडिया ला ' भाजप ला हरवण्यासाठी मदत करा ' अशी विनंती करणारे नेते असलेली काँग्रेस , ‌8 ) दिल्ली बाटला हाऊस हल्ल्यातील आतेरिकी अफगाणिस्तान मध्ये सापडला , परंतु त्या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या इंस्पेक्टर चांद बद्दल सदभावना व्यक्त न करता त्यात आतेरिकी मारला गेला म्हणून रात्रभर न झोपता दुःख व्यक्त करणारी अध्यक्ष असलेली काँग्रेस , ‌9 ) आझाद मैदान मुंबई वरील दंगली मध्ये रझाकार संघटने केलेले जाळपोळ ,नुकसान व महिला पोलिसां च्या विनयभंग बद्दल एक ही खटला उभा न करता केस दाबणारी काँग्रेस , ‌10 ) देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या आदर्श मध्ये फ्लॅट बाळकवणारे नेते असलेली काँग्रेस . ‌ ‌निर्लल्जपणाचा कळस असलेली काँग्रेस ची सध्या थोडीच उदाहरणे दिली आहेत , ‌याबद्दल तुमचे काय मत आहे मुंबा बाबा ?. ‌मी सुद्धा कित्येकवेळा पूर्वी काँग्रेस ला मत दिलय पण ‌काँग्रेस सुधारायच नावच घेत नाय वो .

आदरणीय श्री मोदीजींच्या नेत्‌त्वाखाली प्रबळ असलेल्या भाजपाला निवडणुकीत तोंड देण्यासाठी विरोधी पक्षाने शेवटी महा ठग बंधन केल आहे ह्या ठग बंधनाच्या पं प्र साठी उमेदवाराची निवड केली आहे, मायावतीची !! ह्या पुर्ण गेम मध्ये कॉंग्रेस अगदी महत्वाची अशी नगण्य छोट्या भावाची भुमिका पार पाडत आहे.

हा धागा कोना सामान्य व्यक्तीचा नाहीये. ज्यांना आपण एरवी समाजधुरीण म्हणतो त्या वर्गातील व्यक्तीचा हा धागा आहे. अनके अर्थाने हा धागा वैशिष्ट्य पूर्ण आहे.
  • धागा लेखकाने चर्चेत फारसा भाग घेतलेला नाही
  • लेखकाने, उपरोधाने का होईना, परंतु जनतेचा १५ लाख रुपयांचा दावा मान्य केला आहे हे महत्वाचे आहे
  • जनतेला १५ लाख आधीच मिळाले आहेत याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ५००० कोटी रुपयांचे देणे सरकारने दिले आहे, त्यामुळे आपल्याला १५ लाख मिळाल्यातच जमा आहे असा त्यांचा दावा आहे. देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यातील ४० कोटींच कमावते आहे असे मानले तरी फक्त काल्पनिक फक्त १२५ (सव्वाशे) रुपये आपल्याला आत्तापर्यंत मिळाले आहेत. म्हणजे १४ लाख ९९ हजार ८७५ रुपये अजून येणे आहेत
  • विद्यमान सरकारची एकूणच आकडेवारी फारशी विश्वासार्ह नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर केले जाणारे दावे वास्तवात दिसत नाही. उज्वल योजनेखाली जर एव्हडी भरमसाट गॅस कनेक्शन्स दिले असतील तर जागो जागी जनतेच्या लांबच लांब रांगा गॅसच्या दुकानाबाहेर दिसायला हव्या होत्या. त्या उलट पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत

हा धागा कोना सामान्य व्यक्तीचा नाहीये. ज्यांना आपण एरवी समाजधुरीण म्हणतो त्या वर्गातील व्यक्तीचा हा धागा आहे. अनके अर्थाने हा धागा वैशिष्ट्य पूर्ण आहे.
  • धागा लेखकाने चर्चेत फारसा भाग घेतलेला नाही
  • लेखकाने, उपरोधाने का होईना, परंतु जनतेचा १५ लाख रुपयांचा दावा मान्य केला आहे हे महत्वाचे आहे
  • जनतेला १५ लाख आधीच मिळाले आहेत याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ५००० कोटी रुपयांचे देणे सरकारने दिले आहे, त्यामुळे आपल्याला १५ लाख मिळाल्यातच जमा आहे असा त्यांचा दावा आहे. देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यातील ४० कोटींच कमावते आहे असे मानले तरी फक्त काल्पनिक फक्त १२५ (सव्वाशे) रुपये आपल्याला आत्तापर्यंत मिळाले आहेत. म्हणजे १४ लाख ९९ हजार ८७५ रुपये अजून येणे आहेत
  • विद्यमान सरकारची एकूणच आकडेवारी फारशी विश्वासार्ह नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर केले जाणारे दावे वास्तवात दिसत नाही. उज्वल योजनेखाली जर एव्हडी भरमसाट गॅस कनेक्शन्स दिले असतील तर जागो जागी जनतेच्या लांबच लांब रांगा गॅसच्या दुकानाबाहेर दिसायला हव्या होत्या. त्या उलट पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत

In reply to by सर टोबी

आपल्या विधानांना काही पुरावा वगैरे ? की असंच हवेत? का गरिबांना फुकट गॅस कनेक्शन दिल्याचा हेवा वाटतोय?

In reply to by सर टोबी

तुमचे असे म्हणणे आहे की बिल्डिंग मध्ये राहणारे पाईप ने गॅस भेटण्या अगोदर फ्लॅट मध्ये चूल पेटवत होते ? त्यांच्या कडे पूर्वी सुद्धा कनेक्शन असणार ना . जर नव्हते , तर आता पुण्यातील वितरकाकंडे गॅस शिल्लक कसा राहिला व त्याच्यावर दूर दूर पर्यंत वितरित करण्याची वेळ का आली ? दोनच शक्यता आहेत 1) गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत आहे 2 काळाबाजार थांबविण्यात यश आले ज्या रंगाचा चष्मा घालू तसे दिसणार .

In reply to by सोमनाथ खांदवे

गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत आहे हे शक्य नाही कारण भारत गॅस आयात करतो. याचा अर्थ दुसरा पॉईंट बरोबर आहे.

In reply to by डँबिस००७

पूर्वी तर टेलिफोनलाही रान्गा लागायच्या. लोक्सण्ख्या वाढेल, गावाचा विस्तार वाढेल , तशा एजन्सीही वाढल्या, स्पर्धेमुळे लोकाना चाण्गली सुविधा मिळू लागली. केबल ऑपरेटर , गॅस एजन्सी , मोबाइल सगळ्या व्यवसायात हेच चित्र आहे. पूर्वी विकणार्याचे मार्केट होते, आज ग्राहकांचे आहे. पण काय आहे, उद्या सूर्यग्रहण सुटले तरी ते मोदींमुळे सुटले, असे म्हणायची पद्धत आहे. जगभर एल ई डी दिव्याच्या किमती कमी झाल्या हेच सप्रमाण दाखवले तरी मोदींच्या योजनेमुळे भारतातील बल्बच्या किमती ढासळल्या , यावर भक्त ठाम असतात.

In reply to by manguu@mail.com

मोगा खान India orders 770 million LED light bulbs, prices drop 83 per cent https://www.theregister.co.uk/2016/04/01/india_orders_770_million_led_light_bulbs_prices_drop_83_per_cent/

आपण चष्मा लावलेला असल्याने आपले डोळे उघडले तरी आपल्याला अंधारच दिसणार आहे.

पण इतर लोकांच्या माहितीसाठी वरील दुवा पाठवला आहे जो भारतातील पत्रकारांचा नसून विलायतेतील आहे. त्यांनी The scheme's already seen over 50 million LED bulbs distributed and India's reportedly placed massive orders with manufacturers as it chases a target of 770 million LED bulbs. No wonder the price is going down: India may well be scoring bulk purchase discounts.असा म्हटलं आहे. मोदीद्वेष असला किंवा हिरवा चष्मा लावला कि असाच होतंय.

In reply to by सुबोध खरे

http://www.ledlightsinindia.com/news/led-bulb-will-get-cheaper-worldwide Philips Electronics is also offering low-cost LED bulbs. You can buy Philips’s 10.5-watt LED at The Home Depot for less than $15, which is 50% less compared to competing LED bulbs. The company plans to provide a same bulb for below $10 by the end of 2013. Philips 10.5-watt LED bulbs are as bright as 60-watt incandescent lighting. They are even 80% more efficient and don’t have mercury. These bulbs cannot be dimmed like expensive ones. 2013 ची बातमी आहे , 11 जून 2013 जरा मोगाद्वेष बाजूला ठेवून राष्ट्रहित पहा

In reply to by manguu@mail.com

हायला तुम्हाला उंदराबद्दल फारच आकर्षण आहे असं वाटतंय. जेंव्हा पाहावा तेंव्हा डोंगर पोखरुन उंदीर काढताय? २०१३ चा दुवा देताय ज्यात एल इ डी चा भाव ६५० रुपयाचा आसपास दाखवला आहे/ होता. मी दुवा दिला आहे जो २०१६ चा आहे ज्यात एल इ डी चा भाव ५५ रुपये दिला आहे. बाकी सर्व सोडा निदान दुवा उघडून पाहायचे कष्ट तरी घ्या. आणि हो डोळे उघडले नाही तर अंधार दिसणारच. उगाच मोगा द्वेष करायला तुम्ही माझ्या खिजगणतीतहि नाही. तुमच्या भंपक आणि बिनबुडाच्या वाक्यांचा प्रतिवाद मात्र मी करतो.

In reply to by सुबोध खरे

2013 साली worldwide हे शब्द त्यात आहेत. असे bulb ग्राहपोपयोगी असले तरी ते company च्या पायावर धोंडा हाणानारे आहे , कारण bulb ची life वाढल्याने कमी पिसेस भविष्यात विकले जाणार , त्यामुळे जितका मिळेल तितका बिझनेस , किमतीत अडून न रहाता करणे क्रमप्राप्त होते. पूर्वी 60 जीबी हार्ड डिस्कचा पीसी 30 हजारला यायचा. आता 500 जीबी चा 18000 त असेंम्बल करून मिळतो, पण म्हणून काँग्रेसने computer क्रअंती आणली , म्हणून किमती कमी झाल्या , असे कुणी म्हणत नाही कंपन्या त्यांचे प्रॉफिट कुणाच्या सांगण्यावरून कमी करत नाहीत मै व्यापारी हू, तसे , वो भी व्यापारीही है

In reply to by manguu@mail.com

https://thewire.in/economy/why-you-shouldnt-be-bedazzled-by-modis-led-claims बल्ब सगळीकडे दिवे लावून झाले , तर नंतर govt order बंद झाल्या , तर किमती पुन्हा वर जाणार आहेत का ? नाही ना ?

In reply to by manguu@mail.com

मोगा खान तुमचा दुवा असुरक्षित आहे त्यामुळे उघडत नाही.

In reply to by manguu@mail.com

कंपन्या त्यांचे प्रॉफिट कुणाच्या सांगण्यावरून कमी करत नाहीत तुम्ही व्यापारी असलात तर तुम्हाला व्यापारात काही कळत नाही असेच म्हणावे लागेल. लोक एवढी प्रचंड ऑर्डर मिळवण्यासाठी जेमतेम नफ्यावरही काम करण्यास तयार होतात. ७७ कोटी एल इ डी बल्ब ची ऑर्डर किती प्रचंड आहे हे समजतंय का? एकदाच ऑर्डर पूर्ण करून आयुष्यभर बसून खाता येईल इतकी आहे. अगदी १० रुपये नफा धरला तरी ७७० कोटी होतील. ५ रुपये नफा धरला तरी ३८८ कोटी होतात. आणि एल इ डी बल्ब चे आयुष्य ५ वर्षे धरले तरी त्याची परत मिळणारी ऑर्डर परत तितकीच मोठी आहे.

In reply to by सुबोध खरे

एल इ डी बल्ब चे आयुष्य This particular 10-year claim means that the bulb can last for nearly 11,000 hours. So if we were to have the bulb on for eight hours every day (two hours in the morning and six hours in the evening, for instance—possibly longer on the weekends), this means that it would only last shy of three and a half years. https://www.howtogeek.com/280843/do-led-light-bulbs-really-last-10-years/ एल इ डी बल्ब लावण्याचे कारण केवळ त्याचे आयुष्य जास्त आहे असे नव्हे तर ते एक एकक विजेट साध्या बल्ब च्या १० पट प्रकाश देतात. ( ENERGY TO LIGHT CONVERSION ५% IN BULB AND ५० % IN LED). म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६० वॉट च्या बल्ब इतका प्रकाश देतो तोसुद्धा पिवळा नव्हे तर पांढरा. मोदीद्वेषाचा चष्मा लावला आहे आणि त्यावर डोळे हि बंद केले आहेत. मग प्रकाश दिसणार कसा?

In reply to by सुबोध खरे

LED lights पुराण, What is so special about LED lights? LED lights are up to 80% more efficient than traditional lighting such as fluorescent and incandescent lights. 95% of the energy in LEDs is converted into light and only 5% is wasted as heat. ... Less energy use reduces the demand from power plants and decreases greenhouse gas emissions How much can you save by buying LED light bulbs? If you run a single incandescent bulb 5 hours a day for two years, it will cost you around $32 (depending on your energy rates). Most of that money is spent on electricity. If you run a single LED bulb 5 hours a day for two years, it will cost you $12. What are the benefits of using LED lights? Benefits Of LED Lighting. LEDs are extremely energy efficient and consume up to 90% less power than incandescent bulbs. Since LEDs use only a fraction of the energy of an incandescent light bulb there is a dramatic decrease in power costs ईतकी महती असलेल्या LED lights चा प्रसार मा. श्री मोदीजींनी भारताच्या प्रगतीसाठीच केलेला आहे. पॉवर सेव्ड = पॉवर प्रोडुस्ड , ह्या समिकरणा नुसार मा. श्री मोदीजींनी त्यांच्या ह्या एका प्रोजेक्ट द्वारे हजारो मॅगाव्हॅट विज निर्मिती केलेली आहे. "विकास , विकास" आणखी काय असत ? मिपावर काही लोक, ब्रिटिशांनी बनवलेली रेल्वे मोडुन नविन रेल्वे करायला पाहीजे होती का काँग्रेसने ? असा तिरसट सवाल विचारत असतात. जिथे आस असते तिथे रस्ता असतो

In reply to by सुबोध खरे

म्हणजेच ६ वॉट चा एल इ डी ६० वॉट च्या बल्ब इतका प्रकाश देतो तोसुद्धा पिवळा नव्हे तर पांढरा. पिवळा प्रकाश देणारा एल ई डी बल्ब हा पांढरा प्रकाश देणाऱ्या एल् ई डी बल्ब पेक्षा महाग असतो.

In reply to by सुबोध खरे

लोक एवढी प्रचंड ऑर्डर मिळवण्यासाठी जेमतेम नफ्यावरही काम करण्यास तयार होतात. ७७ कोटी एल इ डी बल्ब ची ऑर्डर किती प्रचंड आहे हे समजतंय का? ही इतकी मोठी ऑर्डर नेमकी कोणाला मिळाली हे सांगू शकाल का?

In reply to by सुबोध खरे

India orders 770 million LED light bulbs, prices drop 83 per cent भारताने कोणाला ह्या बल्बच्या ऑर्डर दिल्या आणि ह्या ऑर्डरमुळे जगात कुठे कुठे ह्या बल्बच्या किमती कमी झाल्या?

In reply to by सोमनाथ खांदवे

तुम्ही एका प्रतिसादात राजकीय विचारधारा बदलण्याचा संकेत दिला होता म्हणून हा प्रतिसाद. अन्यथा आडमुठ्या प्रतिसादांचा मी प्रतिवाद करीत नाही. असं बघा, पाईप गॅस आल्यामुळे जी कनेक्शन्स उपलब्ध झाली ती कुणालातरी मिळालीच ना. म्हणजे गॅसच्या दुकानाबाहेर जी पहाटेपासून रांग लागत होती ती तशीच राहायला हवी होती. तशी परिस्थिती नाहीये. आमच्या परिसरातील गॅस वितरकाला त्याचा एरिया वाढवून दिला आहे. म्हणजे उज्वल योजनेतील वाढीव कनेक्शन्स आकडा हा निदान पुण्यापुरता तरी संशयास्पद आहे. गॅसचा काळाबाजार हा तुम्ही म्हणता तेव्हडा कधीच मोठा प्रश्न नव्हता. तरीही तुमच्या भूमिकेवर ठाम असाल तर देवाक काळजी.

पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत !! चांगलीच गोष्ट आहे की ही, गॅस सिलींडर सोडाच आता गॅस पाईपने सुद्धा घरोघरी पोहोचवला गेलेला आहे. सबका साथ सबका विकास !!

ग्राहकांच्या एका चुकीमुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे. धनादेशावरील स्वाक्षरी न जुळल्याने एसबीआयने एवढी रक्कम ग्राहकांच्या खात्यातून कमी केली आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, स्टेट बॅंक ऑफ इंडियाने गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 लाख धनादेश स्वाक्षरी न जुळल्याने परत पाठवले. एका आरटीआयचं उत्तर देताना बॅंकेने मान्य केलं की, कोणताही धनादेश परत होतो (चेक रिटर्न) त्यावेळी बॅंकेकडून १५० रुपये चार्ज आकारला जातो, तसंच त्यावर जीएसटीही लागतो. म्हणजे प्रत्येक चेक रिटर्न झाल्यावर खातेदाराला १५७ रुपयांचा भुर्दंड बसला. आर्थिक वर्ष ( परत गेलेले चेक) 2015-16 60,0169 2016-17 99,2474 2017-18 79,5769 2018-19 83,132 (केवळ एप्रिल) यापूर्वी जानेवारीमध्ये आलेल्या एका अहवालानुसार एसबीआयने खात्यामध्ये किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) न ठेवणाऱ्यांकडून 1771 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले होते. मिनिमम बॅलन्स म्हणून वसूल करण्यात आलेली ही रक्कम एसबीआयच्या दुसऱ्या तिमाहीच्या नेट प्रॉफिटपेक्षाही जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एसबीआयचं नेट प्रॉफिट १५८१.५५ कोटी रुपये होतं. https://www.loksatta.com/desh-videsh-news/sbi-deducted-rupees-from-customers-account-due-to-non-match-of-cheque-1694637/

In reply to by manguu@mail.com

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ने गेल्या 40 महिन्यांमध्ये 38 कोटी 80 लाख रुपयांची कमाई केली आहे हे श्रेय मात्र श्री माननिय मोदीजीनाच द्यायला पाहीजे. १) स्टेट बॅंक ऑफ इंडिया एफिशीयंट झालेली आहे. २) धनादेशावरील स्वाक्षरी बारकाईने तपासली जात असल्याने होणार्या संभाव्य ग्राहकाम्च्या पैश्याच्या चोरीला अटकाव केलेला आहे. ३) धनादेशावरील स्वाक्षरी बारकाईने तपासली जात असल्याने व त्यावर दंड आ कारत असल्याने बँकेच्या ग्राहकांनी किमान स्वाक्षरी करताना तरी सावधानी बाळगली पाहीजे. असे अनेक धडेच या मुळे सामान्य जनतेला मिळालेले आहेत.

देशाची अर्थव्यवस्था कॅशलेस करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. जनतेच्या हाती असलेल्या रोख रकमेने विक्रम केला आहे. १८.५ लाख कोटींवरही ही रोकड पोहोचली आहे. नोटाबंदीच्या काळातील तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. नोटाबंदीनंतर जनतेच्या हाती जवळपास ७.८ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. सध्या १९.३ लाख कोटीहून अधिक रक्कम चलनात आहे. पण नोटाबंदीच्या काळात हा आकडा ८.९ लाख कोटी रुपये इतका होता. बँकांकडील रक्कम वगळता चलनात जनतेच्या हाती किती रोकड आहे हे समोर आलं आहे, रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली.

आता बोटांनी पूर्वीपेक्षा जास्त नोटा मोजायच प्रमाण वाढलं,ह्यालाच डिजीटल व्यवहार वाढले असं म्हणायचं.

मा श्री मोदीजींच्या जीवाच बर वाईट करण्याचा कट आता ऊघडकीस आलेला आहे !! हा कट वाम पंथीय पक्षाच्या नेत्यांनी नक्षल अतिरेक्यांबरोबर मिळुन केला असल्याच समोर आलेल आहे !! ह्या संबधीचे लिखीत पुरावे नावानीशी पुणे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत !! ह्या कटात कॉंग्रेसचे जेष्ठ नेतेही लिप्त असल्याच समजल आहे !! ऐका निस्वार्थी जन नेत्यांच्या जिवा ऊठणे हे ह्या कट करणार्या लोकांचा नाईलाज झालेला दिसतोय !! मा श्री मोदीजीच्या अथक परीश्रमामुळे देश प्रगतीपथावर वेगाने धावु लागलेला विरोधी पक्षाला पहावत नाही म्हणुनच त्यांनी मिळुन ठग बंधन निर्माण करण्याचा प्ल्ँन आहे !! पुणे पोलिस ह्या कटाच्यामागे असलेल्या सर्व कारस्थानींना लवकरच अटक करेल !! ह्या कटाचा सुगावा पोलिसांना लागल्यामुळे हादरलेल्या शैला राशिद ह्या वाम पंथिय स्रीला मा श्री मोदीजींच्या जीवा बद्दल अचानक कळवळा आला व ह्या कटाचा आळ त्यांनी गडकरी व आरऐसऐस वर केलेला आहे !! त्याला ऊत्तर म्हणुन गडकरींनी शैला राशिद वर मानहानीचा दावा ठोकला !!

In reply to by डँबिस००७

तिचे नाव शेहला रशीद जे एन विद्यापीठ ची स्तूडेंट आहे , ज्या विद्यापीठात इंडिया मुर्दाबद व भारत तेरे तुकडे होंगे हजार चे नारे दिले जातात .ह्या विदयार्थ्यां वरील खर्च मंगु बाबा सारख्या लोकांनी भरलेल्या इनकम टॅक्स मधून केला जातो हे विशेष .

In reply to by सोमनाथ खांदवे

मुरदाबादचे व्हिडीओ प्रथम भाजपयानाच मिळतात अन नंतर ते खोटेही ठरतात , त्यांचा खर्च कोण करते ?

In reply to by सोमनाथ खांदवे

नोटांबंदीनंतर श्री मोदीजी बोलले - सगळे अतिरेकी , नक्षली समाप्त आता हे अजून कुठून आले ? की त्या 21 वेळा निक्षत्रियसारखे आहे ?

In reply to by डँबिस००७

एक कट उघडकीस काय आला , तोही खरा की खोटा , हेही माहीत नाही , तर मोदीजी व भक्तजी चिंतेत पडले. गांधीजींवर तर नथुरामने तीन वेळा attempt केले होते . तरी गांधीजी स्थितप्रज्ञ होते. गांधीजींचे फोटो हलवून स्वतःचे घालणे सोपे नाही.

In reply to by manguu@mail.com

तो कट खरा किंवा खोटा काहीही असू द्या , पण ज्यांनी देशाविरोधात एल्गार परिषद आयोजित करून दंगल घडऊन देशाच्या संपत्ती चे नुकसान केले अशा नक्सलींना चकमकीत यमसदनी धाडले पाहिजे .या देशात सहिष्णुता आहे म्हणूनच नक्षलीचें कार्यकर्ते ढोबळे ,विल्सन,राऊत गडलिंग व इतर उजळमाथ्याने शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत व तरुणांची डोकी भडकवत आहेत ( मुंगा बाबा , तुम्हाला मी देश प्रेमी नागरिक समजतो ) .

In reply to by सोमनाथ खांदवे

देशातील संपत्तीचा नाश करणे , हा गुन्हा आहेच , त्याला पोलीस व कोर्ट कारवाई करेल पण असे नुकसान तर अयोध्या , सेना , मनसे , गोमांस प्रकाराने यातही झाले आहे, शिक्षा सर्व अपराध्याना द्याव्यात .

In reply to by manguu@mail.com

योग्य बोललास रे मंगू. "लोकशाही गेली तुमची चूलीत'म्हणणर्या शिवसेनेकडे भाजपाने 'आमचा नैसर्गिक मित्र' म्हणूनच पाहिले. १९९२ साली दंगलीचा आगडोंब उसळवून देणारे उप-पंतप्रधानही झाले. अमित शहांबद्दल तर बोलायलाच नको. जे.एन.यु.मध्ये डाव्यांचे प्राबल्य आहे ते भाजपावाल्यांना मोडून काढायचे आहे.

शेहला राशिद , उमर खालिद , कन्हय्या कुमार हे सर्व लाल सलाम वाले व त्यांचे पाठीराखे कोण ? सिताराम येचुरी , डी राजा सारखे कम्युनिस्ट व पप्पु सारखे टाळु वरचे लोणी खाणारे !!

ठग्ज अॉफ ईंडीया !! पुर्वीच्या काळातले ठग्ज म्हणे लुटायचे लुट झाल्यावर जिव ही घ्यायचे !! आता अश्याच ठगांनी "ठग बंधन" करुन श्री मोदीजींविरुद्ध मोर्चा उघडलाय व आता हा कटाची बातमी आलीय!!

In reply to by डँबिस००७

उत्तरेकडील राज्यांमध्ये दलित समाज मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला होता. आता तर भाजपने नक्षलवाद्यांनी दलित आंदोलनाचा वापर करून मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा ढिंढोरा पिटल्यामुळे दलित समाज आणखी संतापलेला आहे. नक्षलवाद्यांनी लिहिलेली कथित पत्रे पोलिसांच्या हाती लागण्याआधीच प्रसारमाध्यमांना मिळतात यावरूनच या सर्व प्रकरणात खरोखरच किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. पुणे पोलिसांनी या पत्रांची सत्यता तपासून पाहिलेली नाही. न्यायालयातही या पत्रांच्या वस्तुनिष्ठतेबाबत शहानिशा झालेली नाही. त्यामुळे भाजपने दलितविरोधी पाऊल उचलून राजकीय धोका पत्करला आहे असे म्हणावे लागते. https://www.loksatta.com/lal-killa-news/bjp-in-india-1694739/

NDTV: PM Modi Assassination Plot Revealed In Maoist Letter, Say Cops: 10 Facts All India Reported by Saurabh Gupta, Edited by Deepshikha Ghosh A plot to assassinate Prime Minister Narendra Modi in a "Rajiv Gandhi-type incident" during one of his roadshows has been revealed in a letter seized from a suspected Maoist, the Pune police told a court on Thursday.

In reply to by डँबिस००७

First the Maoists plot to assassinate Modi. Then they write a long letter detailing the entire plan of assassination giving reasons on why they think Modi should be assassinated. They also give the possible locations where Modi can be targetted and how in the same letter. They talk about BJP's electoral victories in the same letter almost praising Modi for being instrumental in getting those victories. Then, in the same letter the Maoists ask for specific sum of money to procure specific type of arms and specific amounts of rounds of ammunition. They also solicit a reply to the letter in writing from the person to whom the letter has been sent. They mention the names of their "Comrades" in that letter, who would be involved in this assassination. They end the letter with even a "date" written at the end clearly defining when it was written. 18/4/17 And all this happens in that digital age, where data encrypted messaging apps are on every phone and one doesnt really have to send anyone any written letters. So yes, either the Maoists are stupid or someone thinks that the people are stupid to fall for this.

In reply to by नितिन थत्ते

थत्ते साहेब सगळे कम्युनिस्ट आणि माओवादी हे भाजप आणि रा स्व संघासारख्या राष्ट्रवादी संघटनांचा कट्टर द्वेष करतात. माओवादी कोणत्याही थरा ला जाऊ शकतात. जे लोक १२-१४ वर्षाच्या मुलांना फूस लावून दहशतवादी कार्याला लावून घेतात ते लोक मोदींसारख्या माणसाची हत्या करण्याचा करण्याचा कट करणार नाहीत हे म्हणणेच मूर्खपणाचे आहे. पत्र कदाचित योगायोगाने पोलिसांच्या हाती लागले असेल. माओइस्ट हे घातपाती आणि देशद्रोही कारवाया करण्याबद्दल प्रसिद्ध आहेतच. त्यांना चीनचा छुपा किंवा उघड पाठिंबा आणि आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत मिळत असते. या लोकांवर (कम्युनिस्ट आणि माओवादी) भरोसा ठेवणे हि एक संपूर्ण चूक आहे. कारण लोकशाहीवर त्यांचा मुळातच विश्वास नाही. डॉ मनमोहन सिंह काय म्हणाले ते खाली वाचून घ्या. आणि ही काँग्रेसची स्वतःचो योजना होती. आता केवळ विरोधी पक्षात गेले म्हणून माओवाद्यांना सहानुभूती दाखवणारा असतील तर पूर्णपणे आत्मघातकी धोरण ठरेल. In April 2006, Indian Prime Minister Manmohan Singh, a celebrated “moderate,” described the Maoists as the “single biggest internal security threat” — underscoring the country’s adherence to seeking a purely military solution to the conflict. Thereafter, Singh proceeded to allot a special budget for providing combat assistance to districts where Maoists were present. A rapid militarization of the police was undertaken and armories were upgraded with drones and other equipment designed for high-intensity warfare. Traditionally, anti-Maoist activities had been under the purview of civilian police and the central paramilitary forces. But Singh — for the first time — tried roping in the Indian military. Ideas like the bombing of Maoist strongholds floated around New Delhi’s power circles. The move was decried as overkill and unethical. Singh’s cabinet didn’t find adequate support for this even in the ranks of his own party. Moreover, the Indian Army publicly expressed its reluctance to get involved in domestic issues and turn its guns on citizens. शेवटी महाभारतात काय लिहिले आहे आम्ही पाच विरुद्ध शंभर असू परंतु बाह्य आक्रमण असेल तर आम्ही १०५ आहोत. हे धोरण सोडून संजय निरुपम किंवा श्री शरद पवार हे पत्र खोटं आहे असं कोणत्याही सबळ पुराव्या अभावी म्हणतात यात त्यांची कोती, आत्मकेंद्रित आणि राष्ट्रविरोधी वृत्तीच दिसून येते. गंमत म्ह्ण्जे सीताराम येचुरी यांच्या सारख्या कट्टर मोदी आणि भाजप द्वेष्ट्या माणसाने सुद्धा त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

In reply to by सुबोध खरे

दुवे https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/cops-book-maoists-for-using-minors-in-subversive-activities/articleshow/63945822.cms https://thediplomat.com/2017/09/half-a-century-of-indias-maoist-insurgency/

A plot to assassinate Prime Minister Narendra Modi in a "Rajiv Gandhi-type incident" during one of his roadshows has been revealed in a letter seized from a suspected Maoist, the Pune police told a court on Thursday. Soon after, it was reported that Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has also received letters, alleged from Maoist outfits, threatening him and his family. Home Minister Rajnath Singh said: "We are always concerned about our PM's security. Maoists are just fighting a losing battle".

सर्व विरोधी पक्षाचे धाबे दणाणले असल्यामुळे वाम पंथी पक्ष आपल्या नक्षलवादी अतिरेक्याकडुन पं प्र श्री मोदीजींच्या हत्त्येचा कट रचला होता ! पण सक्रिय पोलिसांनी माहिती मिळाल्यावर लगेच अॅक्शन घेतली! देशाच्या पंप्र च्या जीवावर उठणारे वामपंथी लोक जनतेच भल ईच्छितात ह्यावर कोणाचाच विश्वास राहीलेला नाही !!

आहे. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला आहे. आंधश्रद्धेला खतपाणी घालणारं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, अहमदनगरचा उल्लेख 'अहमदनगर' नव्हे तर 'अंबिकानगर' असा करण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनी केलं. तसंच सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल असंही ते म्हणाले. ते अहमदनगरच्या टिळक रोड इथं झालेल्या सभेत बोलत होते. https://lokmat.news18.com/maharastra/couples-got-children-by-eating-mango-strange-statement-of-sambhaji-bhide-292287.html

संदीप चांदणे साहेब तुम्ही आजच मिपावर कविता विभागा मध्ये पोस्ट केलेली कविता त्यांची परवानगी न घेता पोस्ट करत आहे . बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८

In reply to by सोमनाथ खांदवे

कविता इथे चिटकवण्याचं प्रयोजन काय आहे, कृपया हे समजू शकेल का? म्हणजे नक्की काय अर्थ गवसला आहे, हे आम्हाला पण समजू द्या.

काँग्रेस च्या आता पर्यंत च्या वर्तणुकीला चांदणे साहेबा च्या कविते तुन भावार्थ योग्य प्रमाणात प्रकर्षित झाला म्हणून त्यांची माफी मागून चिटकवली !!! असो ! सुज्ञास वेगळे सांगण्यास कारण नसावे .

In reply to by सोमनाथ खांदवे

अच्छा असे आहे व्हय! समजले. === अवांतर: चांदणेंच्या नजरेतून कवितेचा काय भावार्थ प्रकर्षित होतो हे समजले असते तर आणखी मज्जा आली असती. पण त्यावर ते काही लिहतील या बद्दल शंका आहे. (तसे त्यांनी लिहूच नये म्हणा!) जो जे वांच्छिल तो तें लाहो .. असो..

सोमनाथ खांदवे , नमस्कार, भावना पोहोचल्या !! खरोखर गुड चॉईस ऑफ कविता !

संपादकांना विनंती प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख मिळेपर्यंत अथवा या धाग्यावर पंधरा लाख प्रतिसाद येईपर्यंत (दोन्हीपैकी जे आधी होईल ते) हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे :)

In reply to by धर्मराजमुटके

संपादकांना विनंती प्रत्येक भारतीयाला पंधरा लाख मिळेपर्यंत अथवा या धाग्यावर पंधरा लाख प्रतिसाद येईपर्यंत अथवा २०१९ वर्ष (तिन्हीपैकी जे आधी होईल ते) हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे :)

हा धागा जिवंत ठेवावा व सतत वर राहिले हे बघावे मंगु श्री हे कार्य करण्यास सक्षम आहेत !! त्यात त्यांचा स्वार्थ आहे हा भाग सोडा !!

19 june 1970 रोजी गांधी घराण्यात जन्म झालेले बाळ पुढे एक महान कलाकार , विनोदवीर होईल असे तेंव्हा काँग्रेस च्या चार सल्लागार ( चांडाळचौकडी )ला सुद्धा वाटले नसेल . 48 वर्षा चा होईल तरी मुंडावळ्या बांधण्याचा योग नाही , एक एक करून सतरा अठरा काँग्रेस चे बहुमत असलेली राज्य हातातून निसटून गेली , प्रादेशिक पक्षाची मारण्यात काँग्रेस आख्खी ची हायात गेली त्या प्रादेशिक पक्षांना मुखमंत्री पद दोन्ही हाताची ओंजळ करून द्यावे लागले . अशी कित्ती कित्ती दुःख एकट्याने सहन करून व चेहऱ्यावर मात्र सतत हासू ठेवून , या भारत देशातील जनतेला सतत हसत ठेवण्याचे महान कार्य या राजपुत्राने केले आहे . 15 लाख मिळावे म्हणून आसुसलेल्या जनतेचे दुःख आपल्या राष्ट्रीय विनोदवीर नक्कीच कमी केले आहे . काहीही असू द्या पण या विनोदवीर रागा ला किमान 100 वर्ष आयुष्य लाभो व पुढील काही पिढया चें असेच मनोरंजन करो . " स्पीकर मॅडम, सॉरी ! सॉरी !!, चेअरमन सर !" टाळ्या . "गुजरात को दूध दिया हैं तो इन महिलाओ ने दिया है "टाळया चां कडकडाट . " इधर से आलू डाला ,उधर से सोना " या वाक्याला तर मतदार खल्लास . मी तर म्हणतो मोदींनी 15 लाख देण्याचे वचन काही पाळले नाही ज्यांना ज्यांना ते 15 लाख हवेत त्यांनी रागा ला विनंती करावी , देतील तुम्हाला काही तरी शोध लावून . " इधर से कुछ तो डाला , उधर से 15 लाख " ज्यांना 15 लाख हवेत बघावे त्यांनी नशीब अजमावून .

In reply to by सोमनाथ खांदवे

नोटाबंदीच्या अपयशाने खचलेले भक्त आता स्वतःची केविलवाणी करमणूक करून घेत आहेत.

In reply to by मार्मिक गोडसे

चुकतो एखादा निर्णय , अशा हजारो चुकलेल्या निर्णय मूळे काँग्रेस ने तर किमान 100 वर्ष निवडणूक लढविली नाही पाहिजे .भाजप ला नोटबंदीत अपयश आले तर आपणांस हर्षवायू झालेला दिसतोय . मी तर पूर्वीच सांगितले आहे की मी मोदी भक्त नाही , पण तुम्ही रागा चें भक्त आहात हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला . असते गुलामगिरी त खितपत पडण्याची काहींची ईच्छा . आपण सुद्धा रागा चे यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून फिदीफिदी हसला होता की नाही ते सदसद्विवेकबुद्धी ला स्मरूण सांगा .

In reply to by सोमनाथ खांदवे

नोटबंदीच्या तुलनेचे काँग्रेसचे चुकलेले हजार जाऊ द्यात पण ३-४ चुकलेले निर्णय कृपया सांगता का ? तुलना करायला बरे पडेल. तेवढीच आमच्या ज्ञानात भर.

In reply to by सोमनाथ खांदवे

चुकतो एखादा निर्णय , मान्य केल्याबद्दल धन्यवाद. भाजप ला नोटबंदीत अपयश आले तर आपणांस हर्षवायू झालेला दिसतोय . नोटाबंदीच्या काळात जनतेचे झालेले हाल , atm, बँकेच्या रांगेत उभे राहिल्याने झालेले मृत्यू पाहून तुम्हाला हर्षवायू झाला होता का? नोटाबंदीच्या भोंगळ अंमलबजावणीला माझा विरोध मी कधीच लपवला नाही. पण तुम्ही रागा चें भक्त आहात हे पाहून माझा आनंद द्विगुणित झाला . कशाच्या आधारे तुम्ही असा निष्कर्ष काढला? आपण सुद्धा रागा चे यू ट्यूब वरील व्हिडिओ पाहून फिदीफिदी हसला होता की नाही ते सदसद्विवेकबुद्धी ला स्मरूण सांगा . मी कोणाचेही व्हिडिओ पूर्ण बघतो, त्यामुळे एखादेच वाक्य ऐकून चुकीचा अर्थ काढून फिदीफिदी हसण्याचा बालिशपणा करत नाही.

ऑ आश्चर्य आहे , काँग्रेस ने देशाची आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात किती प्रगती केली हे तुम्हाला माहीत असून तुम्ही मला विचारताय . तरी पण आसू द्या मी करतो बापुडा सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रयत्न . रोजगार हमी योजना - यात त्या त्या दुष्काळी भागातील आमदार,पंचायत समिती सदस्य , सरकारी अधिकारी सगळ्या नीं खोटे मजूर दाखवून बक्कळ पैसे कमावले . दिल्ली ते गल्ली तील सगळ्यांना माहीत होते की यात भ्रष्ट्राचार होतोय पण ती कोणीही बंद किंवा बदलण्याचा प्रयत्न केला नाही .किती कोट्यवधी रुपये पाण्यात गेले हा संशोधनाचा विषय . आणीबाणी - सर्रास होणारा भ्रष्ट्राचार आणी त्याबद्दल कार्यवाही करायच्या ऐवजी 1972 साली देशाला 21 महिन्याच्या आणीबाणीत ढकलले . काँग्रेस चे मवाली नेते सोडून इतर सगळ्या पक्षाचे नेते , कार्यकर्ते व सामान्य जनता अक्षरशः क्रूरपणे भरडली गेली होती . गेल्या महिन्यात देशपातळीवर केलेल्या सर्व्हे मध्ये नोटबंदी त झालेला त्रास सहन करून पुन्हा भाजप / मोदींवर च विश्वास दाखविला होता हे आपल्या लक्षात असेलच . लोकसंख्या नियंत्रण , गरिबी हटाव मध्ये सपशेल अपयशी . शहाबानो केस मध्ये राजीव गांधी चे घुमजाव . . मुस्लिम समुदायाचे लांगुलचालन केल्यामुळे बहूसंख्य हिंदू काँग्रेस पासून दुरावले .टाडा आणि पोटा या कायद्यांचे काँग्रेसच्याच काळात दुरुपयोग वाढल्या मुळे दोन्ही कायदे बंद करावे लागले . अजून भरपूर आहेत पण काँग्रेस चा नाकर्तेपणा सिद्ध करण्यासाठी एवढे पुरेसे ठरतील आणि मला वाटतंय वरील मुद्दे दुव्या शिवाय तुम्हाला पटतील . शेतकरी आत्महत्या , रोजगार उपलब्धता , आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली व त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास , 1984 शीख हत्याकांड असे भरपूर मुद्दे सापडतील जे नोटबंदी च्या तुलनेत ज्यास्त चुकीचे आहेत .

In reply to by सोमनाथ खांदवे

तरी जुनाच जप अजून सुरू आहे. नोटांबंदीने काय साधले ? याचे उत्तर काय , तर काँग्रेसने शहाबानो प्रकरण केले !

In reply to by सोमनाथ खांदवे

शेतकरी आत्महत्या , रोजगार उपलब्धता , आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली व त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास , 1984 शीख हत्याकांड असे भरपूर मुद्दे सापडतील जे नोटबंदी च्या तुलनेत ज्यास्त चुकीचे आहेत .>>> ==>> हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. १. शेतकरी आत्महत्या - काँग्रेसच्या कोणत्या निर्णयामुळे ही समस्या निर्माण झाली? २. रोजगार उपलब्धता - २ करोड रोजगाराचं पुढे काही समजलं नाही. पण काँग्रेसच्या मागच्या १० वर्षामध्ये चांगली स्थिती होती. आमच्या मागच्या पिढीच्या काळात पण नोकऱ्या मुबलक होत्या, पण जागा भरायला लोकं मिळत नसायचे.(मला वाटतंय हा मुद्दा दुव्या शिवाय तुम्हाला पटेल). ३. आता पर्यंत झालेल्या हजारो दंगली- काँग्रेस सत्तेत असल्यावर कशाला स्वतःच दंगली घडवेल.(घडवू ही शकतो, पण त्याला काहीतरी आधार द्या) ४. त्यात फक्त हिंदुनाच झालेला त्रास- हा हवेतला गोळीबार आहे. ५. 1984 शीख हत्याकांड - माझ्या अल्प माहिती प्रमाणे त्या हत्याकांडानंतर पंजाब शांत/थंड होत गेले. (हत्याकांडाचे बिलकुल समर्थन नाही, हे नमूद करू इच्छितो). एवढे होऊन देखील आज घडीला तेथे काँग्रेसची सत्ता आहे. ६. रोजगार हमी योजना - भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधून संबंधित लोकांना शिक्षा झाली पाहिजे, यात वाद नाही. फक्त चालू सरकार ने हा चुकीचा ठरलेला निर्णय मॉडिफाय (?) करून पुढे का चालू ठेवला आहे? ७. काँग्रेससी आणीबाणी - आपला पास. ==== शहाबानो वगैरे विषयामध्ये मला बिलकुल गती नाही आहे.

शेतकरी आत्महत्या - मी स्वतः शेती करत असल्यामुळे शेतकऱ्याचे दुःख थोडं तरी समजत . शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिका साठी हमीभाव निश्चित नसणे , मारवाडी व्यापाऱ्यांची साखळी ,पावसाचे प्रमाण , सावकारी पाश , दुष्काळी भाग किंवा कोल्हापूर पट्टा येथील जुन्याच पद्धतीने केली जाणारी शेती त्यामुळे ऐका ठिकाणी पाण्याचा अपव्यय तर दुसऱ्या ठिकाणी सतत दुष्काळ , 60 वर्ष सत्तेत असून सुद्धा कृष्णा खोरे योजने मधील आपण आपल्या वाट्याचे पाणी उचलू शकलो नाही कारण पूर्वी ची काही धरणे अर्धवट आहेत व कालव्याच्या नियोजनाचा पत्ता नाही .गेल्या 40 / 50 वर्षात ज्यांच्या जमीनी धरणात गेल्या ते धरण ग्रस्त सतत त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे काढत आहेत , आता मला तुम्ही सांगा 60 वर्षात काँग्रेस ला हे प्रश्न का नाही सुटले ? . रोजगार उपलब्धता -आपल्या वेळी लोकसंख्या कमी होती म्हणून जागा भरायला माणसं मिळत नसतील (40 वर्षा पूर्वी ). सुशिक्षित पदवीधर रिक्षा चालवतात , शिपाई च्या पदा साठी बी कॉम , एम कॉम चे उमेदवार मुलाखती साठी येतात असल्या शैक्षणिक विटंबनेच्या सुरस कथा आपण किमान 20 वर्षा पासून ऐकल्या असतील . आपण जरा " आहे रे " दृष्टी सोडून "नाही रे " दृष्टी ने बघितले तर गरीब सुशिक्षित लोकांना पावलो पावली उदभवणार्या अडचणी कळतील . दंगल - हजारो दंगली मध्ये काँग्रेस ने मुस्लिमनां कुरवाळले , हिंदु ना वाऱ्यावर सोडले . पण " काँग्रेस ने दंगली घडवल्या " असे मी म्हणलोच नाही . शहाबानो प्रकरणात सुद्धा काँग्रेस ने दुटप्पीपणा केला होताच . रोजगार हमी योजना - कोण ? कोणाचा ?आणि केंव्हा पासून ? भ्रष्टाचार उकरून काढणार . शीख हत्याकांड - माझा पण पास . मोगा भाऊ , काँग्रेस चे मुसळ सोडून भाजपचे कुसळ नका शोधत बसू .