मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ते पंधरा लाख !

सुधीर मुतालीक ·

In reply to by उगा काहितरीच

( जनतेचा )अ‍ॅप्रोच तर २०१९ मध्ये दिसेलच पण नोटबंदी आणि जी एस टी ने दुकानदार किरकोळवाले यांचे मोडलेले कंबरडे आणि रेरा मुळे बिल्डर लॉबीची लागलेली वाट सरळ दिसत असताना असे लेख म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटतात. माझ्यासारख्या पगारदार (पक्षी व्हाईटवाले) आणि क्रेडिट / डेबिट कार्ड आणि पेटीएम वाल्यांनी तरी परिस्थितीशी लवकरच जुळवुन घेतले आणि वेळच पडली तर निमुटपणे बँकांबाहेर रांगाही लावल्या. पण वर उल्लेख केलेल्या वर्गाचे काय हाल झाले ते त्यांनाच माहित. ईंधन दरवाढीचे चटके तर सर्वजण रोजच सोसत आहेत मग ते थेट असो किंवा वाहतुकीचे दर वाढल्याने होणारी भाव वाढ असो. आता प्लॅस्टीकबंदीचे वारे वाहु लागलेत. थोडक्यात काय योजना कितीही चांगल्या असल्या तरी अंमलबजावणी कशी करावी याचा काही विचार कराल की नाहि?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

जिएस्टी मुळे फक्त करबुडव्यांना त्रास होतोय. बाकी काही नाही. मार्केट आणि व्यापारी केव्हांच पुढे निघून गेलेत. रेरा हा सुद्धा कायदा आपल्यासाठी हितकारक आहे. सामान्य माणसाला लुबाडणाऱ्या बिल्डर लॉबीला नियंत्रणात आणता यावे म्हणून हा कायदा आणण्यात आलेला आहे. प्लास्टिक बंदी सुद्धा खूप गरजेची आहे. त्याने धंद्याच कसलंही नुकसान होत नाही. सरतेशेवटी इंधन भाव वाढ. जी काही कारण दिली जात आहेत ती तर मलाही पटत नाहीये. कारण आजूबाजूच्या राज्यात, महाराष्ट्रापेक्षा कमी भाव आहेत. महाराष्ट्रातच इतकी भाव वाढ झालेली आहे. धन्यवाद बाबा योगीराज.

manguu@mail.com 04/06/2018 - 17:12
त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, मागणारे , देणारे , घेणारे तुम्हाला सांगुन देवाण्घेवाण करणार आहेत का ? आम लोकाना नोटाबन्दीचा बडगा दाखवुन ऐन नोटाबन्दीत अचानक वॉलन्टरी डिस्क्लोजरची सन्धी देणारे लोक हे ३३ हजार कोटी तुम्हाला सांगुन देह्घे करणार आहेत की काय ? अरे देवा , हा आकडाही ३३ कोटीच का ?

सुबोध खरे 04/06/2018 - 19:01
मुळात

"आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू"

असे मोदी म्हणाल्याचे कधीही पाहिले किंवा वाचले नाही. मी पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये श्री मोदी असे म्हणतात कि

"जर काँग्रेसच्या काळात देशाबाहेर गेलेला पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील".

या दोन वाक्यात असलेला स्पष्ट फरक लक्षात घेतला तर विरोधी ही पक्षांनी याचे केलेले राजकीय भांडवल सहज लक्षात येईल. अर्थात त्यांचा याला आक्षेप असाच असणार आहे कि मग परदेशात असलेले पैसे आणा कि भारतात तुम्हाला कोणी थांबविले आहे. श्री मल्ल्या किंवा स्पष्ट पणे पुरावे असणाऱ्या अबू सालेम सारख्या लोकांना येथे आणण्यात किती कायद्याच्या भानगडी कराव्या लागत आहेत हे जर आपण पहिले तर हे काम किती कठीण आहे हे समजून येईल. अर्थात मोदी द्वेष्ट्या लोकांना समजूनच घ्यायचे नाही त्यामुळे मी अजून काही लिहिणारच नाही. जर श्री मोदी "आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू" हे म्हणाल्याचं व्हिडीओ कुणाकडे असेल तर मी माझे म्हणणे मागे घेईन. अन्यथा आरोपांचे गुऱ्हाळ चालू द्या. आम्ही बसतो पोपकोर्न घेऊन.

In reply to by सुबोध खरे

राही 04/06/2018 - 21:03
माफ करा पण आपला आदर राखून विचारावेसे वाटते की आपण अनेकदा पिचक्या, पिंका असे शब्द का वापरता? आपल्या प्रतिसादांत हे शब्द अगदी खड्यासारखे खुपतात.

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 04/06/2018 - 22:38
काही तरी म्हटल्याचे आठवते. म्हणजे १५ लाख आपल्या खात्यात जमा होतील हि जनतेची अपेक्षा अगदीच अस्थानी होती असे नाही. जनताच मूर्ख आहे अशा अर्थाचे आता बरेच ऐकावयास येते. पर्वा गडकरी म्हणाले कि टोल रद्द होईल असे ते कधी म्हणालेच नाही. मग 'जो खेल मैने शुरू किया उसे मैंही खतम् करुंगा' हे त्यांच्या स्टॅन्ड अप कॉमेडीमधील वाक्य असे समजायचे काय?

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 04/06/2018 - 23:49
सगळा काळा पैसा चार वर्षात परत येईल अशी आपली अपेक्षा असेल तर ती फारच बाळबोध आहे असेच म्हणावे लागेल. चिदंबरम यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या इतक्या न्यायालयीन डावपेचातुन सबळ पुरावा असूनही गोष्टी बाहेर काढायला इतका वेळ लागतो आहे मग जिथे पैसा झिरपला आहे त्याचा मग शोधून काढायला किती वेळ लागेल. जनतेला आपले बूड न हलवता 15 लाख पाहिजेत नाही तर मोदी कुचकामी फेकू आशा शिव्या द्यायला लोक मोकळे. 1995 सालची केस आता निकाल लगीन लालू प्रसाद तुरुंगात जातात 23 वर्षांनी आणि लोकांना 23 दिवसात पैसे पाहिजेत.

70 % टक्के गरीब जनता असलेल्या देशा ची प्रगती करण्यास मोदींनां 5 काय 15 वर्ष सुध्दा कमी पडतील . 60 वर्ष्यात देशाचा खूळखुळा करून ठेवला होता काँग्रेस व त्यांच्या बगलबच्यानीं . मी म्हणत नाही की सेना व भाजप चे नेते भ्रष्ट्राचार करत नाही पण स्वतः मोदी वर आता पर्यंत एक ही रुपया चा आरोप झालेला नाही . सत्तेत नसताना सुद्धा सरकारी बंगले बळकावून बसणाऱ्या काँग्रेस , भाजप ,बीएसपी व इतर पक्ष्यातील निर्लल्ज जनसेवकांना शेवटी बंगले सोडावे लागलेच . राहिला प्रश्न 15 लाखाचा , ' गरिबी हटाव ' घोषणा देऊन काँग्रेस ने कित्तेक निवडणुका जिंकल्या , पण त्यांनी फक्त काँग्रेस चे नेते व कार्यकर्त्याचीं गरिबी हटवली . काहीही केले तरी 130 करोड लोकसंख्या असलेल्या देशाची प्रगती हळूहळू च होणार . पायाभूत सुविधा , शिक्षण , नोकऱ्या आरोग्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न चुटकीसरशी मोदींनीं आपण दिलेल्या 5 वर्षात सोडवले पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे . 60 वर्षात देशातील बहूसंख्य जनता ही गरीब राहीली हा त्या जनते चा दोष नाही तर त्यांना गरीब ठेवून आपल्या उरावर राज्य करणाऱ्या निर्लल्ज काँग्रेस चा आहे . मी मोदी भक्त बिलकुल नाही पण ' अजून 10 वर्ष भाजप ला देऊन मगच भाजप ने देशा चा काय विकास केला याचा हिशोब मागावा ' या मताचा आहे .

भारतात्/भारताबाहेर एवढा काळा पैसा आहे की तो जर पूर्ण पांढरा असेल तर तेवढे पैसे जमा होऊ शकतात... अशा प्रकारचे ते विधान होते रे मंगू. बाकी निश्चलनीकरणाचा निर्णय योग्यच होता असे आमचे मत. अनेकाना त्रास झाला हे मान्य व सरकारने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती.
ईंधन दरवाढीचे चटके तर सर्वजण रोजच सोसत आहेत मग ते थेट असो किंवा वाहतुकीचे दर वाढल्याने होणारी भाव वाढ असो. आता प्लॅस्टीकबंदीचे वारे वाहु लागलेत.
आधीच्या सरकारच्या तुलनेत ह्या सरकारच्या अनेक योजना चांगल्या आहेत..कौशल विकास, सुकन्या सम्रुद्धी वगैरे.. कदाचित त्या योजनांसाठी हा जास्तीचा पैसा वापरला जात असावा. वाजपेयी सरकारची धोरणे मुख्य्त्वे मध्यमवर्गासाठी असायची. मोदी सरकारची धोरणे कनिष्ठ्/गरीब वर्गासाठी आहेत असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

manguu@mail.com 04/06/2018 - 21:49
मोदी असे बोललेच नव्हते, मग शहा चुनावी जुमला नेमक्या कशाला बोलले होते ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 04/06/2018 - 23:42
मोगा खान स्पष्ट पुरावा असेल तर द्या. मूळ व्हिडीओ काय आहे तो तुम्ही पण पाहिला असेलच पण निवडक विस्मरण होण्याची तुमची सवय आहे शाह साहेब यांचा व्हिडीओ मी पाहीलाआहे.

नाखु 04/06/2018 - 21:19
हा आरोप पंधरा लाख प्रतिसाद मिळेपर्यंत तेवत ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे या स्वयंघोषित लोकांनी घेतली आहे तुम्ही सफरीवर लक्ष केंद्रित करावे हीच विनंती शिक्कामोर्तब झालेला य:किंश्चित नाखु

In reply to by नाखु

नाखुंनी पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणुन पिंपरी चिंचवड (नदी पल्याडचे) मतदार संघातुन निवडाणुकीला उतरावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे हो ! - ह घ्या

Ram ram 04/06/2018 - 21:26
साधारण नव्वद टक्के भारतीय फुकटे आहेत, कोणाची तरी इस्टेट मिळावी फुकट काही तरी पदरात पडावं अशी अपेक्षा ठेवून असतात. यांच्या बापाने ठेवलेत पंधरा लाख रुपये.कसाब व त्याच्या साथीदारांचं मी आभार मानले असते जर त्यांनी सर्व आमदार मारून टाकले असते. या हरामखोरांची संपत्ती एवढी कशी वाढली हे आधी विचारा.

साहना 05/06/2018 - 01:03
कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी साहेबांचा जयजयकार" "मोदी साहेब की जय" इतके लिहिले तरी भावना पोचतात. १५ लाख वगैरे मिळण्याची अपेक्षा ठेवून कुणी जगतोय असे वाटायला लोक मूर्ख आहेत काय ? थापच मारायची आहे तर काँग्रेस ५० लाख द्यायची थाप मारू शकते म्हणून लोक काय राहुल गांधीला वोट मारण्याइतके ठोंबे आहेत काय ? मोदी साहेब नेहमीच्या साच्यातले राजकारणी वाटत नव्हते. दिल्लीत जाऊन ते नेहमीच्या ल्युटेन वाल्यांचे तक्थ फोडतील, कोंग्रेस च्या पॉलिसी १८० डिग्री दिशेने फिरवतील. इतर भाजप नेत्याप्रमाणे गुळमुळीत धोरण न पत्करता विरोधकांना सळो कि पळो करतील इत्यादी लोकांची अपेक्षा होती. ती अपेक्षा बहुतांशी फोल ठरली आहे हे भाजपचेच कार्यकर्ते मान्य करतात. हि ५ वर्षे गेली आता पुढील ५ वर्षांत तर किमान काही मोठे निर्णय मोदी साहेब घेतील अशी अपेक्षा बाळगून दिवस काढायचे. नाही तर आपले नेहमीचे बाबू छाप राममाधव, प्रकाश जावडेकर इत्यादी लोक खुर्च्या गरम करत राहतील.

In reply to by साहना

+१ एकदम मनतील बोललात ! ममसिंगांना दहा वर्षे पाहिल्यानंतर मोदींकडुन जितक्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण झाल्या नाहीत हे कोंणीही मान्य करेल ! शिवाय नोटाबंदी , जी. एस.टी.ची घाई गडाबडीत केलेली अंमलबजावणी वगैरे चुकाही झाल्याच आहेत फक्त एका विरोधकाला धड अक्कल नसल्याने ह्या गोष्टींचे भांडवल करुन सरकार पाडाता आले नाही ! बाकी ही आजादी गँग कितीही अव्वाच्या सव्वा करुन गोष्टी फुगवत असली तरीही ते तुर्तास बाजुला ठेवुन विचार केल्यास दलितांवर अत्याचार वाढले हे नाकरता येत नाही . . शहरी सुसंस्कृत हिंदु "हे आम्ही केले नाही" म्हणुन झटकुन टाकत असला तरीही भाजपाला ते तसे झडाकता येणार नाही . विशेषकरुन उत्तरभारतातील निर्बुध्द स्वमतांध दांभिक हिंदुंचा माज पाहुन फार फार कीव वाटते ! इथे काही भाजपा समर्थक लोकं लगेच " आधीच्या सरकार मध्ये अत्याचार होत नव्हते का ?" असला मुर्खागमनी व्हॉटअबाऊटिझम करणारा प्रश्न करुन ह्या विषयत भाजपाला अजुनच कमकुवत बनवतात. भाजपाला सगळ्यात जास्त घाईला कोणी आणले असेल तर ह्या असल्या निर्बुध्द समर्थकांनी ! बाकी तुर्तास कितीही झाले तरी मोदी साहेबांना विरोधी पक्षात सबळ पर्याय दिसत नाही . यदाकदाचित सर्वच्या सर्व विरोधी पक्षांनी युती करुन मोदी सरकात पाडले तरी पंप्र कोण होणार हा फार गहन प्रश आहे ! त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत ! ह्या मॅडम पंप्र झाल्यास ५ वर्षे मजा येणार =)))) आसो. आपण आपले मजा पहात राहु , कारण कोणीही निवडौन येवो देत , ना इनकम टॅक्स कमी होणार आहे ना जी. एस.टी ना डवल टॅक्सेशन ! तस्मात - तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

साहना 05/06/2018 - 03:19
> बाकी तुर्तास कितीही झाले तरी मोदी साहेबांना विरोधी पक्षात सबळ पर्याय दिसत नाही . सध्या बाराचा ठोका वाजला आहे आणि अश्या वेळेला सिंड्रेलाची हालत काय होते हे सर्वांना ठाऊक आहे . पुढील विलेक्शन जवळ असताना चुकून जरी काँग्रेस ममता वगैरे आली तर देशाचे बारा आणखीन वेगाने वाजणार आहेत. त्यामुळे मन मारून का होईना पण कमळावर शिक्का मारणे आवश्यक आहे अर्थांत कमळावर शिक्का मारायचा म्हणजे बुद्धी गहाण टाकून मोदी साहेबांचा जयजयकार करायचा असे नाही.

In reply to by manguu@mail.com

आस कस ? , आहेत ना पर्याय --- 1 ) रागा उर्फ चौकट राजा -मीडिया समोर बावळट सारखी बडबड करणारा व मोलकरणी सारख अचानक 1 महिना सुट्टीवर जाणे , त्या बदनाम चार राजकीय सल्लागार च्या तालावर नाचणे . 2) बॉंगली दीदी - रक्तरंजीत हिंसाचार करवून निवडणूक जिंकणाऱ्या व हिंदू च्या हत्ये कडे दुर्लक्ष करून मुल्ला ची दाढी कुरवाळनाऱ्या . 3) मायावती - दलितांची उद्धारकर्ती चा आव आणून काळी माया जमा करने , सरकारी बंगला खाली करण्या ऎवजी बंगल्यास कांशीराम भवन नाव देणारी बाई . 4) अखिलेश व मुलायम - हे म्हणजे बॉंगली दीदी ला लाजवेल असे काम करतात . हे वरील सर्व व चंद्राबाबू , लालू , तेलंगणा मुख्यमंत्री राव , नितीशकुमार या पैकी कुणीही राजकीय दृष्ट्या परिपक्व नाही , एकमुखी नेतृत्व करू शकत नाही . भाजप व वि ही प च्या काही कार्यकर्त्यांनी गेल्या चार वर्षात माज करून मोदी साहेबांची डोकेदुखी वाढवली हे नक्की . गोरक्षक बनून त्यांनी दलितांना व मुस्लिमांना मारहाण करून त्याचे व्हिडीओ व्हायरल केले ,त्या मुळे जागतिक स्तरांवर भारताची व हिंदुत्वाची प्रतिमा मलिन झाली .

In reply to by मराठी कथालेखक

विशुमित 05/06/2018 - 16:44
हायला हा ऑप्शन डोक्यात आला नव्हता. तिहेरी फायदा १) प्रथमदर्शनी माहिती प्रमाणे स्वच्छ प्रतिमा आणि उच्च विद्याविभूषित २) महाराष्ट्राचा पंतप्रधान ही मराठी मनात राहिलेली खंत ३) भाषणे ऐकवण्यात वेळ न दवडता मान खाली घालून मस्त काम करतील हा विश्वास. (मॅडमचे लाडले तर ते आहेतच)

In reply to by विशुमित

पुंबा 05/06/2018 - 17:23
++१११ फालतूचे हीतसंबंध महाराष्ट्रात नाहीत(शिक्षणसंस्था, सा. कारखाने वगैरे). भ्रष्टाचाराचा आरोप नाही. उलट 'हाताला लकवा मारला' गेल्याची ख्यातीच आहे. पृथ्वीराजबाबा उमेदवार असतील तर काँग्रेसला फुल्ल सपोर्ट.

In reply to by विशुमित

अर्धवटराव 05/06/2018 - 21:41
बारामतीकरांशी कारण नसताना वाकडं आहे या साहेबांचं. रा.काँ. काँग्रेसमधे विलीन व्हावी, शरद पवार पं.प्र. व्हावे, आणि त्यांनी काँग्रेसला गांधी फॅमिलीमुक्त करावे हि आमची इच्छा... पण ति पूर्ण होण्याचे शान्सेस शुण्य :(

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 05/06/2018 - 09:18
मुर्खपणा, प्रच्छन्न मुजोरी आणि बेताल वक्तव्ये करणार्या मंत्री संत्री नेत्यांचा धिक्कार केला च पाहीजे मूक राहून या गणंगाच समर्थन केले जात असेल तर फार घातक आहे भाजपालाही आणि राजकारणालाही!!! त्यांनी शेण @@@म्हणून आम्ही शेण @@@ हा युक्तिवाद बोगस आणि निर्लज्ज आहे सरधोपट नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 05/06/2018 - 09:37
@ मार्कस ऑरेलियस फक्त एका विरोधकाला धड अक्कल नसल्याने ह्या गोष्टींचे भांडवल करुन सरकार पाडाता आले नाही ! याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं बहुमत असताना सरकार कसं काय पडणार होतं? दलितांवर अत्याचार वाढले हे नाकरता येत नाही हि स्थिती केवळ २०१४ पासूनची नसून २००६ पासूनची आकडेवारी पाहिलीत तर हा आलेख वाढतच आहे https://www.firstpost.com/india/crime-rate-against-dalits-increased-by-25-from-2006-to-2016-cases-pending-investigation-up-by-99-4419369.html हा मुर्खागमनी व्हॉटअबाऊटिझम आहे असे आपल्याला वाटते का? त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत हि शक्यता सर्वात कमी आहे कारण या बाई अत्यंत एककल्ली लहरी आणि हेकेखोर आहेत तेंव्हा त्यांच्या नावाचे एकमत होणे हे केवळ अशक्य आहे. सर्वात उत्तमी व्यक्ती म्हणजे नितीश कुमार होती पण मोदी शाह जोडीने त्यानं धूर्तपणे आपल्याकडे वळवल्याने बादशाह वारल्यावर जनानखान्याची जशी केविलवाणी स्थिती होती तशी विरोधकांची झाली आहे. त्यातल्या त्यात बरी म्हणता येईल अशी व्यक्ती म्हणजे "अखिलेश यादव" आहे. कारण मायावती, अजित सिंह, लालू पुत्र किंवा चंद्राबाबू नायडू याना जनाधार फारसा नाही. खरं तर सर्वव्यापी असा जनाधार कुणालाच नाही. राहुल गांधी नावाचे बुजगावणे उभे केले आहे त्याला काँग्रेसने टेकू देऊन उभा केलेला जनाधार आहे परंतु जर यदाकदाचित राहुल गांधी पंतप्रधान झालेच तर कपिल सिब्बल सारख्या धूर्त माणसांना रान मोकळे मिळेल.

In reply to by सुबोध खरे

याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं बहुमत असताना सरकार कसं काय पडणार होतं?
नोटाबंदीचा निर्णय नक्कीच चुकीचा होता , हेतु शुध्द होता असे म्हणता येईल पण निर्णय मात्र धाधांत चुकीचा होता , तेव्हा योग्य नेतृत्वाने ह्या निर्णयचे सामाजिक आर्थिक परिणाम कसे चुकीचे आहेत हे मुद्देसुद दाखवुन दिले असते अन ५० दिवसांच्या मुदतीनंतर निर्णय कसा गंडला हे दाखवले असते तर सरकार नक्कीच पडले असते, भाजपातील कित्येकांचा ह्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध होता म्हणे. नोटाबंदीच्या निर्णायानंतर पहिल्यांदा मला मोदींच्यात इंदिरागांधी स्टाईल हुकुमशाही मनोवृत्तीची झलक दिसुन आली होती ! ( माझा पॉलिटिकल इकोनॉमिक्स चा अभ्यास नाही पण ऐकीव माहीती नुसार देशाच्या करन्सी चे निर्णय हे सर्वस्वी आ.बी. आय च्या चेअरमन च्या हातात असले पाहिजेत , " मै ग्राहक को ५०० रुपये देणे का वचन अदा करता हुं" असे म्हणुन खाली त्याची सही असते. त्याचा तो अधिकार ओव्हर राईड करुन स्वतःच तडकाफडकी निर्णय घोषित करणे हा सर्वप्रथम स्टंट होता , सेकंडली असंविधानिक होते , आणि सर्वात महत्वाचे म्हणाजे मी म्हणीन तेच खरे ह्या वृत्तीचे प्रतीक होते . रगुराम राजन सरां सारखा एक जरी जाणता अभ्यासु विरोधक असता तर सरर्कार नक्कीच पडले असते . मम सिंग अन थुरुर वगैरे आहेत पण गांधी घराण्याची पायचाटु माणसे कधीच राजकारणात वर येवु शक्णार नाहीत , हा भाजपाचा लै लै मोठ्ठा अ‍ॅडव्हान्टेज आहे !)
हि स्थिती केवळ २०१४ पासूनची नसून २००६ पासूनची आकडेवारी पाहिलीत तर हा आलेख वाढतच आहे
हे असे असेल तर एक हिंदुत्वावादी विचारसरणीचे सरकार म्हणुन ह्याबाबत सक्त कारवाई करणे भाजपाचे नैतिक कर्तव्य होते असे मी म्हणेन . त्याबाबत भाजपा कमी पडाला हे मान्य करायला हवे , इट्स नॉट अ गूड डिफेन्स टू से की २००६ पासुन हे चालु आहे ! अ गूड डिफेन्स वुड बी - २००६ पासुन हे चालु होते , आमच्या राज्यात आम्ही हे अत्याचारांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी करण्यात यशस्वी झालो आहोत ! खरेतर दलितांना आज बाबासाहेबांची गरज आहे पण त्यांना आज कोणतेच सक्षम नेतृत्व नाही , जे आहेत ते आपसाआपसात भांडत बसलेत हे पाहुन फार वाईट वाटते . त्यातुन मेवानी सारखे अनार्कीस्ट नेतृत्व उदयाला येत आहे हे अत्यंत धोकादायक आहे , भाजपा आणि हिंदुत्ववाव्यांसाठी नव्हे तर देशासाठी! ममतादीं ह्या एक अत्यंत धुर्त बाई आहेत आणि त्यांना त्यांच्या न्युसन्स पावर ची चांगलीच जाण आहे ! त्यांनी बंगालात ज्या प्रकारे हरामखोर कम्युनिस्टांना गुंडाळले आहे ते पाहुन थोडासा आदरच आहे त्यांच्या विषयी . तस्मात मला त्यांची शक्यता जास्त वाटते. .

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 05/06/2018 - 21:09
@ मार्कस ऑरेलियस मै ग्राहक को ५०० रुपये देणे का वचन अदा करता हुं" असे म्हणुन खाली त्याची सही असते. काही मूळ गृहीतके चुकीची आहेत. ५०० रुप्याच्या नोटा बदलून दिल्या गेल्या आहेत. जुन्या नोटा ऐवजी नव्या नोटात किंवा पैसे खात्यात जमा झाले.याचा अर्थच असा आहे कि त्याला ५०० रुपये अदा झाले आहेत. तेंव्हा या सही आणि शिक्क्याचा अधिकार ओव्हरराईड कसा झाला हे सांगा कि. सेकंडली असंविधानिक होते ,"असंविधानिक" होते तर कोणत्याच माणसाने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान कसे दिले नाही? कारण निर्णय चूक आहे कि बरोबर आहे यावर न्यायालय निर्णय देत नाही पण घटनाबाह्य गोष्ट असेल तर न्यायालय त्यात स्वतःहून आक्षेप घेऊन(किंवा कोणीही जनहित याचिका दाखल केल्यास) असा निर्णय रद्दबातल करू शकते. न्यायाधीशांच्या नेमणुकीची घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने अशीच रद्द केली आहे. शिवाय जर बहुमत सरकारकडे असेल तर सरकार कसे पडेल ते आपण संगितले नाहीत. उगाच लांब काथ्याकूट कशाला? रगुराम राजन सरां सारखा एक जरी जाणता अभ्यासु विरोधक असता तर सरर्कार नक्कीच पडले असते ते कसं काय बुवा? त्यांनी एवढी नोटबंदी वर टीका केली तरी सरकारला काही ढीम झालं नाही. .सगळी अक्कल आणि शहाणपणा काही एकाच व्यक्तीची मक्तेदारी नाही हेही समजून घ्यावे. काँग्रेसमध्ये किंवा इतर विरोधी पक्षात केवळ भंम्पक माणसे आहेत असे नाही. अतिशय हुशार माणसेही आहेत. केवळ रघुराम राजनच हुशार आहेत असे नाही. इतका गोल आणि भोंगळ प्रतिसाद आपल्याकडून अपेक्षित नव्हता एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

ओके. माझ्याकडे आज जुनी ५०० / १००० रुपायाची नोट असेल तर बदलुन मिळणार का ? की त्याव्र केलेली आर.बी.आय गव्हर्नर्ची सही गायब होणार ? माझ्या माहीती प्रमाणे नोटाबंदी असंविधानिक होती म्हणुन त्या विरोधात सुप्रीमकोर्टात केसेस केल्या गेलेल्या आहेत अगदीच नाही असे नाही. ( तुर्तास माझ्या कडे डिटेस नाहीत म्हणुन ह्या विषयाव्र जास्त काही लिहु शकत नाही. ) सबळ नेतृत्वाने खंबीर पणे आणि योग्य मुद्देसुद मांडणी करुन नोटाबंदी नंतर अविश्वासदर्शक ठराव आणल असता तर एन.डी. ए च नव्हे तर खुद्द भाजपातील काही लोकांनीही कदाचित त्याल समर्थन दिले असते ! रघुरामराजन एकटेच हुशार आहेत असे मी म्हणात नाही , पण ते योग्य इकॉनॉमिक सेन्स देवुन हा निर्णय कसा चुकीचा होता हे सिध्द करु शकतात इतकेच मी म्हणात आहे ( ते ममसिंगही करु शकतात पण त्यांना मॅडमची आणि राहुलबाबा ओव्हरशॅडो व्हाय्चही काळजी वाटली असवी बहुतेक ) बाकी मी आधीच म्हणले की माझा पॉलिटिकल इकोनॉमीचा अभ्यास नाही आणि संविधानाचाही खोलवर अभ्यास नाही. नोटाबंदी चुकीची होती हे माझे अल्पशा इकोनॉमिक्स आणि संविधानाच्या अभ्यासावरुन अन बेसिक इन्ट्युशन वरुन बनलेले मत आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद गोलमटोल आणि भोंगळ असु शकतो , अगदीच नाही असे नाही . मान्य आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

पुंबा 05/06/2018 - 12:20
त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत !
नविन पटनायक हे नावसुद्धा ऐनवेळी चर्चेत येऊ शकते, अर्थात ओदीशात भाजपची मुसंडी अन स्वतःच्या पक्षातील प्रवासी पक्षी रोखू शकले तर. हा माणूस ममतापेक्षा बरा वाटतो.

In reply to by साहना

पुंबा 05/06/2018 - 12:14
इतर भाजप नेत्याप्रमाणे गुळमुळीत धोरण न पत्करता विरोधकांना सळो कि पळो करतील इत्यादी लोकांची अपेक्षा होती.
++१११११ सळो कि पळो म्हणजे कुठल्याही संबंधांचा, राजकिय अपरिहार्यतेचा मुलाहिजा न राखता भ्रश्ट नेत्यांना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, धेंडं, कृपाशंकर, हुडा, गेहलोत, वीरभद्रसिंग, मुलायम, मायावती, काण व्यवसायातील रेडी बंधू प्रभृती(स्वपक्षीय असतील तरी मोदी त्यांना दाद देणार नाहीत असे वाटत असे) वगैरे बड्या धेंडांच्या मागे हे सरकार लागेल, त्यांची कृष्णकृत्ये खणून काढेल असे प्रामाणीकपणे वाटत होते. दिल्लीत अनेक भ्रष्ट लॉब्या कित्येक दशकांपासून सत्तेच्या वर्तुळाभोवती वेटोळे घालून बसल्या आहेत त्यांना मोदी जेरबंद करतील असे वाटले होते. राज्यात तसेच केंद्रात भ्रष्ट अधिकार्‍यांची दलालीची संस्थाने निर्माण झाली होती ती खालसा होतील असा सामान्यांचा कयास होता. याची कारणे म्हणजे मोदींना मिळालेले भव्य मँडेट, २०१४ पुर्वीची भ्रष्टाचारविरोधी लढ्याची पार्श्वभुमी आणि सर्वात महत्वाचे मोदींचे प्रस्थापित वर्तुळाबाहेरचे ( ल्युटियन्स झोन) सामान्य माणसाला जवळचे वाटणारे नेतृत्व. भुजबळांना ज्याप्रकारे धडा मिळाला त्यावरून योग्य कारवाई सुरू असल्याचे चित्रही सुरुवातीच्या काळात दिसून आले होते. नंतर मात्र काय झाले माहिती नाही. अक्षरशः नाम्गी टाकल्याप्रमाणे सरकार सुस्त पडले आहे. वर उल्लेखलेल्या लोकांवर विरोधात असताना भाजपनेच आरोपांची राळ उठवली होती. सत्तेबरोबर येणारी मस्ती म्हणावी की मांडवलीची अपरिहार्यता लक्षात आली म्हणावी. पण अजून ही धेंडं कारवाईविना सन्मानाने राजकारणात वावरत आहेत. हा अपेक्षाभंग आहे. दुर्दैवाने या मुद्द्यावर चौथा स्तंभ चिडीचूप असलेला दिसतो( विशेषतः लोकसत्ता गोसी खुर्द वगैरे प्रकल्पातील अनियमेततेवर, सिंचन घोटाळ्यावर बराच पाठपुरावा करत असे २०१४ पुर्वी, अशात काहीच आवज नाही). 'कोल'गेट, २जी, कॉमनवेल्थ, रॉबर्ट वाध्रा, आदर्श घोटाळा, सुप्रीम कोर्टाने दिलेली स्विस बँकेत पैसा असणार्‍यांची यादी यातलं कुठलं प्रकरण लॉजिकल क्लोझ्यरला गेलेलं दिसतं आहे का? स्वतः भाजपच्या काळात असे घोटाळे होत नाहीत हे खरे असले तरी पुर्वीच्या प्रकरणांचं काय? माझ्या मते, आमचे वैर फक्त राजकिय स्वरूपाचे, वैयक्तिक जिवनात आम्ही मित्र, गुरू शिष्यआहोत, असला भोंगळ कारबहर करणार्‍या 'विलासराव- मुंंडे, शरद पवार- ठाकरे' टाईप राजकारण्यांना तोडपाणी करून आपापली घरे भरण्यात रस असतो केवळ. हा भोंदूपणा सोडून विरोधात असणार्‍यांशी खुलेपणाने वैर करणार्‍या आणि विरोधकाची भ्रष्ट प्रकरणे बाहेर काढून त्याला तुरूंगात पाठवणार्‍या पक्षांची आपल्या देशाला जास्त गरज आहे. काँग्रेसची सत्ता आली की त्यांनी भाजपच्या नेत्यांवर डूख धरून अपहारांच्या चौकश्या कराव्यात. भाजप आली की त्यांनी पण सेम करावे. हे 'मिल कर खावो' वाले सर्वपक्षीय साप देशाला गिळंकृत करतील.

In reply to by पुंबा

साहना 05/06/2018 - 12:56
४४ सीटच्या जोरावर काँग्रेसने मुख्य न्यायाधीशावर महाभियोगाची चर्चा केली. रात्री अपरात्री त्याच न्यायाधीशाला गाठून येड्डियुरप्पांच्या सरकारला सुरुंग लावला. हे काँग्रेसचे किलिंग स्पिरिट आहे. मोदी बरोबर काडीचीही मांडवली हा पक्ष करणार नाही, चुकून ह्यांना पूर्ण बहुमत मिळाले तर मोदींची उचलबांडगी सर्वप्रथम या ना त्या मार्गाने तिहार जेल मध्ये करतील. कसलीही दया माया दाखवणार नाहीत. वायपेयींनी उदार मनाने सोनिया गांधींना दया दाखवली पण नंतर ह्या बाईने प्रत्येक भाजप नेत्याच्या मागे CBI लावली. काँग्रेसची पाळे मुळे फारच खोल आहेत. उदाहरण घ्या तर शिबू सोरेन आणि भाजपला दोघांना मिळून बहुमत मिळाले होते पण काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता. राज्यपालांनी काँग्रेसला सरकार करण्यासाठी बोलावले. भाजप एक दोन दिवसांनी कोर्टांत गेला. त्यावेळी काँग्रेसी बाजूने अभिषेक मनू सिंघवी हे उतरले होते तर भाजपाच्या बाजूने मुकुल रोहतगी. कर्नाटक राज्याच्या बाबतीत पार्टी त्याच होत्या पण दोघांच्या अर्ग्युमेण्ट १८० उलट. दोन्ही वेळेला काँग्रेस ने बाजी तर मारलीच पण शिबू सोरेंच्या मागे हार प्रकारचा ससेमिरा लावला. काँग्रेसी मुळे खणण्यासाठी खरोखर कठोर नर-सिंह माणूस हवा होता आणि किमान भशानबाजीवरून तरी मोदी तसे माणूस वाटत होते पण सत्य परिस्तितीत मोदी सुद्धा वाघाचे कातडे पांघरलेले गाढव वाटते. त्यामुळे अपेक्षा कमी करून किमान काँग्रेसला सत्ते पासून ते दूर ठेवतील इतके जरी साध्य केले तरी देश आणि हिंदू जनतेचे भले होईल. गुळमुळीत धोरण म्हणजे काय ? उदाहरण म्हणजे राम माधव. हा संधीसाधू माणूस संघाचा प्रवक्ता होता. भाजप सत्तेत आल्यावर ह्याने सरकार मध्ये बदली करून घेतली. नंतर इंडिया फौंडेशन नावाचा तथाकथित विचारगट (थिंक टँक) काढला आणि स्वतःला मध्यस्त म्हणून काश्मीर, नागालॅन्ड इत्यादी भागांत नाक खुपसायला सुरवात केली. इंडिया फौंडेशनचे पैसे वापरून गोव्यांत वगैरे पार्टी ठेवायच्या शोभा डे पासून इतर सर्व हिंदू विरोधी लोकांबरोबर मैत्री ठेवायची त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन वगैरे करून स्वतःला जणू काही थोर विचारवंत असल्या प्रमाणे मिरवायचे असे प्रकार सुरु केले. अर्थांत सरकार ह्यांचे असल्याने इंडिया फौंडेशन ला बक्कळ पैसे मिळतो पण आउटपुट शून्य. उलट आपल्या फेस्टिवल मध्ये चिदंबरम, कुठला तरी बिशप , एक वॉन्टेड इस्लामिक प्रचार असल्या लोकांना बोलावून शोभा करून घ्यायची. श्री एलस्ट ह्या बेल्जियन इंडोलॉजिस्ट ला बोलावले. त्याची मुलाखत घ्यायला सदानंद धुमे ह्या विदेशी पत्रकाराला सांगितले. सदानंद धुमे दररोज भाजप वाल्यांची धुतो, त्याला इथे बोलावयाचे कामाचं नव्हते पण असो. तर धुमे ह्यांनी एलस्ट ला त्याचे इस्लाम विषयी मत विचारले. एलस्ट ह्यांनी भीड भाड ना ठेवता इस्लाम हा अतिशय मागासलेला धर्म असून मुस्लिम लॉग ह्या मागासलेल्या विचारांचे शिकार झाले आहेत आणि घरवापसी करून ह्या लोकांना पुन्हा आपल्या जुन्या धर्मात आणणे भारताच्या हिताचे आहे असे सांगितले. भाजपच्या फेस्टिवल मध्ये, गोव्यांत भाजपचे सरकार असताना हे विचार ऐकून राम माधव ह्यांची बोबडी वळाली. एलस्ट ह्यांना काढता पाय तर घ्यावा लागलाच पण त्याच वेळी पुढील कुठल्याही थिंक फेस्टिवल मध्ये त्यांना बोलावले गेले नाही. त्याच समारंभांत एका संघ वाल्याने बिशप ला विचारले "एखादा हिंदू माणूस चांगल्या पद्धतीने आयुष्य घालवत असेल तर ख्रिस्ती धर्माप्रमाणे त्याला स्वर्ग मिळेल का ? " तर त्या विदेशी बिशपने स्पष्ट शब्दांत "हिंदू लोक जो पर्यात जीजस ला आपला प्रेषित मानून त्याला शरण जात नाहीत तो पर्यांत ते नर्कांत जातील असे सांगितले" तरी सुद्धा दार वर्षी राम माधव कुणा बिशप ला असल्या थिंक फेस्टिवल मध्ये बोलावतात. काश्मीर मध्ये सत्तेच्या धुंदीत रॅम माधव ह्यांनी हिंदूंच्या हिताचा बाली दिला आहे. भाजप साठी वर्षोनु वर्षे काम केले कित्येक कार्यकर्ते आणि काश्मीर पंडित माधव च्या नावाने ट्विटर वर बोंबलत आहेत. जम्मू खोरे इस्लाम बहुसंख्य करण्यात माधव ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. रोहिंग्यांना काश्मीर मध्ये सेटल करण्याचा चाणक्य बुद्धी त्यांचीच. आता रमजान मध्ये शस्त्रसंधी सुद्धा राम माधव ह्यांचाच विचार आहे. थोडक्यांत फक्त सत्ता मिळवण्यासाठी राम माधव ह्यांनी मुफ्ती पुढे लोटांगण घातले. जम्मू खोऱ्यातील हिंदू लोकांच्या अगदी मामुली डिमांड्स सुद्धा मुफ्ती ह्यांनी मान्य केल्या नाहीत. बिप्लब देव ह्या मूर्ख माणसाला त्रिपुरांत मुख्यमंत्री करण्यात सुद्धा ह्यांचा मोठा सहभाग. मे ११ ला हा माणूस सांगतो "जिहादी लोकांनी आधी रमजान म्हणून शस्त्र संधी करावी. शत्रूचा बिमोड करणे हे सैन्याचे प्रथम कर्तव्य आहे. " https://t.co/5sKhXaEXxo मे २० उजाडताच PM has shown his respect for sentiments of the common people in Kashmir, thereby asking security forces to cease operations. आता अचानक सोन्याचे प्रथम कर्तव्य वगैरेला कसली तिलांजली लावली ? अश्या प्रकारे आपल्याच घराला आग लावून झाल्या नंतर आपण जणू काही हेन्री किसींगर असल्या प्रमाणे राम माधव FBI चीफ कोमी, हिलरी क्लिंटन, डॅनिअल बायमान, ट्रम्प आदी विषयांवर ट्विट करतो. माधव ह्यांचे अमेरिकेत भाषण होते. भाषणातील ठळक मुद्दे लिहिण्यासाठी मी पेन पेपर घेऊन बसले होते. हा माणूस अक्षरशः तास भर बरळला पण त्या एक तासांत मी एक सुद्धा मुद्दा लिहू शकले नाही कारण मुलांत नोंद घेण्यासारखा मुद्दाच नव्हता. इकडच्या तिकडच्या श्री श्री किंवा जग्गी वासूदेणाच्या प्रवचनाप्रमाणे निरर्थक analogy आणि आपणच किती हुशार आहोत ह्याच्या वल्गना. मोदी सारख्या तळागाळांतून आलेल्या माणसाला असल्या गुळमुळीत लोकांची संगत का बरे आवडावी आणि राम माधव सारख्या माणसाला नारळ का देण्यात येत नाही हे आश्चर्य आहे. टीप : राम माधव ह्यांनी ह्या काळांत बरीच माया जमवली आहे असे ऐकू आले. त्यांच्या इंडिया फौंडेशन च्या देणग्या सुमारे ३० पटीने वाढल्या आहेत.

टवाळ कार्टा 05/06/2018 - 10:06
कोणी काही म्हणो....पाकड्यांच्या बाबतीत जशास तसे उत्तर खुलेआम देणे आणि जगात भारताची पत वाढवणे हे काम भरभरून झालेले आहे....यासाठी काही गोष्टींकडे नक्की कानाडोळा करू शकतो

हा 'बाहेर' असलेला पैसा सुटकेस/ट्रंकांमध्ये भरून स्वीस बँकांमध्ये ठेवलेला असतो हा (गैर)समज आता दूर झाला असावा असे वाटले होते. तो पैसा आणणार म्हणजे कसा आणणार? राजकारणी/उद्योगपतींच्या लोकांच्या नावावर स्वीस खाते नसणार. ते वेगळ्या लोकंच्या नावावर असते. मग त्यांच्या खात्यातला पैश्यावर भारत सरकार हक्क सांगणार, तो पैसा येथे आणणार आणी लोकांना देणार?

गामा पैलवान 05/06/2018 - 17:26
पुंबा,
सळो कि पळो म्हणजे कुठल्याही संबंधांचा, राजकिय अपरिहार्यतेचा मुलाहिजा न राखता भ्रश्ट नेत्यांना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, धेंडं, कृपाशंकर, हुडा, गेहलोत, वीरभद्रसिंग, मुलायम, मायावती, काण व्यवसायातील रेडी बंधू प्रभृती(स्वपक्षीय असतील तरी मोदी त्यांना दाद देणार नाहीत असे वाटत असे) वगैरे बड्या धेंडांच्या मागे हे सरकार लागेल, त्यांची कृष्णकृत्ये खणून काढेल असे प्रामाणीकपणे वाटत होते. दिल्लीत अनेक भ्रष्ट लॉब्या कित्येक दशकांपासून सत्तेच्या वर्तुळाभोवती वेटोळे घालून बसल्या आहेत त्यांना मोदी जेरबंद करतील असे वाटले होते. राज्यात तसेच केंद्रात भ्रष्ट अधिकार्‍यांची दलालीची संस्थाने निर्माण झाली होती ती खालसा होतील असा सामान्यांचा कयास होता
या स्तरावरचं कार्य करायला शिवाजीस ३३ वर्षं संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे दक्षिण दिग्विजय साकारला. थेट मदुराईपर्यंत स्वराज्य पोहोचलं. दिसायला भल्यामोठ्या कर्नाटकप्रांतीचा ३ वर्षांचा दिग्विजय दिसतो, पण त्यामागे पराकोटीचे कष्ट आहेत. यशाच्या समीकरणात ते पण बघायला हवेत ना? मोदींच्या बाबतीत थोडी घाई होतेयसं नाही वाटंत ? भव्य जनादेश (=मँडेट) कुचकामी आहे. तो फक्त पाच वर्षांनी कामास येतो. तोही टिकवून ठेवला तरंच. मोदी ही जादूची कांडी नव्हे. आज आयेयेस वगैरे उच्चाधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेत मूलभूत बदल होताहेत. आजवर उत्तीर्ण उमेदवाराचा केवळ गुणक्रमांक पाहून आयेयेस, आयपीएस, आयेफेस, आयारेस, वगैरे सेवा मिळंत असे. मात्र मोदींच्या सुधारणेनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम केल्यावर नंतरच यथोचित सेवा प्राप्त होणार आहे. मग जुना नियम बदलायचा कोणी? प्रशासनसेवा लोकाभिमुख करायच्या कोणी? मोदींनी? मग प्रशासकीय अधिकारी काय फक्त झोपाच काढीत बसणार का? मोदींनी भ्रष्टाचारी नेत्यांना सळो की पळो करून टाकायला पाहिजे. मग तुम्हीआम्ही काय करणार? असा तो प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

३३ वर्षे ठीक आहे... पण मोदींची ३३ वर्षे आपण २०१४ पासून मोजत आहात का ? शिवाजी महाराजांची १६७४ पासून मोजलीत का ?

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 05/06/2018 - 21:34
म.क., शिवाजी जन्मजात राजा नव्हता. इतकं तर तुम्हांस माहिती असेलंच. या माहितीच्या आधारे तुम्हीच ठरवा केव्हापासनं मोजायची ३३ वर्षं ते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी ही तेच म्हणतोय. जर शिवाजी राजांची कारकीर्द वयाच्या सोळाव्या वर्षी चाली झाली असं मानलं तर मोदीची कारकीर्द काही २०१४ ला चालू झालेली नाही ना ? मग मोदीला चार वर्षे मिळाली असे म्हणण्यात काय अर्थ आहे.

In reply to by गामा पैलवान

चिगो 08/06/2018 - 16:07
आजवर उत्तीर्ण उमेदवाराचा केवळ गुणक्रमांक पाहून आयेयेस, आयपीएस, आयेफेस, आयारेस, वगैरे सेवा मिळंत असे. मात्र मोदींच्या सुधारणेनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम केल्यावर नंतरच यथोचित सेवा प्राप्त होणार आहे.
जरा संदर्भ देता का ह्या माहितीचा? सवाल नोकरीचा आहे, म्हणुन विचारलं.

In reply to by गामा पैलवान

चिगो 20/06/2018 - 12:44
सरकारच्या नितींबद्दल अभिप्राय देतांना सरकारी नोकरावर जी बंधनं असतात, त्यांच्यामुळे फार काही बोलत नाही. पण जर खरोखरीच हा निर्णय अंमलात आला, तर पारदर्शी आणि Merit-based recruitment/ selection जो सद्यस्थितीतील नागरी सेवा परीक्षांचा पाया आहे, त्याचे प्रचंड खच्चीकरण करणारा असेल. ह्या विषयावर इंतरनेटवर भरपूर चर्चा-चर्वण उपलब्ध आहे. ह्या लिंकमधेपण बघू शकता. काही गोष्टी ज्या राजनितीपासून दूर असायला हव्यात, त्यात नागरी अधिकारी प्रकर्षाने असावेत, असे माझे मत आहे. मी जरी सरकारसाठी काम करत असलो तरी मी नेत्यांसाठी काम करत नाही. सरकार आणि पार्टी ह्यातील फरक सगळ्याच पार्ट्यांना, त्यांच्या पदाधिकार्‍यांना आणि समर्थकांना कळालाच पाहीजे, else we are moving towards the Spoils system, which is not the best thing to have in such such a diverse nation as India. बाकी चालू द्या..

चौकटराजा 05/06/2018 - 17:51
१. भारत देश हा सन्घराज्य ( संघाचे राज्य नव्हे ! नाहीतर..... ) प्रकारचा देश आहे. यात प्रधानमम्त्री हा आपण नागरिक समजतो तेवढा तो सामर्थ्यवान पदावर बसलेला मानव नव्हे . २.सबब सर्व यश वा अपयश याचा धनी ना प्रधान मंत्री , ना मुख्यमंत्री , ना राज्यपाल . ३. राजकीय पदाच्या या मर्यादा माहित असून , भारताची प्रसासनं व्यवस्था सडलेली आहे हे माहित असून मोदी यानी अतिरेकी आशावाद निर्माण करण्याचा गुन्हा केला आहे ... तरीही इतर प्रधान मन्त्र्यापेक्षा त्यांच्याकडे निर्णय क्षमता व भाषा चातुर्य व लोकांची भाषा बोलण्याचे कसब असल्याने त्याना २०१९ मध्ये पुरते निश्प्रभ करणे कठिण आहे .

सुबोध खरे 05/06/2018 - 18:40
अतिरेकी आशावाद निर्माण करण्याचा गुन्हा केला आहे लोक चमत्कारालाच नमस्कार करतात हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. हा आशावाद निर्माण केला नसता तर भाजपचे सरकार आलेच नसते हि पण वस्तुस्थिती.

लोकांना स्वतः काहीही करायचे नसते

( नोटबंदी नंतर किती लोक प्रामाणिकपणे कर भरू लागले आणि किती लोक कायद्याच्या बडग्यामुळे कर भरू लागले हा अभ्यास-कुणी केला तर-- सुरस आणि चमत्कृती पूर्ण असेल)

पण आपल्यासाठी बलिदान देणारा हुतात्मा मात्र हवा असतो.

असा हुतात्मा जो स्वतः साठी काहीच मागत नाही आणि ज्याला आगा पिच्छा काहीच नाही तो श्री मोदींच्या रूपाने मिळाला. तेंव्हा आता मी काहीच करणार नाही जे काही करायचे ते

"श्री मोदींनीच"

केले पाहिजे. अन्यथा मोदी काय करतात? फेकू आहेत. त्यांना पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत अशा क्षुद्र तर्हेच्या टीका लोक सहजा सहजी करताना आढळतात. तोंडाला येतील अशी वक्तव्ये याच धाग्यावर दिसत आहेत. कायद्याची किंवा प्रक्रियेची कोणतीही माहिती किंवा ज्ञान नसताना मुक्ताफळे उधळायचे फक्त येते आम्हाला.

पटापट लोकांना बेड्या ठोकायच्या? कशा ठोकायच्या हो?

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असलेल्या २ जी घोटाळ्यातील( जेथे सकृतदर्शनी स्पष्ट पुरावा आहे) आरोपी सुद्धा जामिनावर बाहेर आहेत तर जेथे सरकारला "फक्त माहिती" आहे अशा केसेस मध्ये कसे काय पटापट बेड्या ठोकणार हो. नट चुडामणी "श्री संजय दत्त" यांच्या कडे "१९९३" मध्ये ए के ५६ हि रायफल सापडली इतका स्पष्ट आणि सबळ पुरावा असूनही आणि टाडा कायदा लावूनही त्यांना शेवटी २१ वर्षांनी २०१४ मध्ये तुरुंगवास झाला. ते बाहेर २०१६ मध्ये आले आणि आता त्यांच्या सत चरित्रावर सिनेमा हि निघाला. तो भरपूर चालेलही. अशी आमची सदगुणी जनता. आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ मोदींसारखा निस्वार्थी नेता असावा अशी आमची लायकीच नाही हेच खरं. काय बोलायचं?

In reply to by सुबोध खरे

विशुमित 05/06/2018 - 19:20
बाकी सगळे ठीक आहे पण निस्वार्थी वगैरे जरा जास्तच वाटले. लोकांची लायकी काढणं हे तर आणखी अतीच. सं.मं. कृपया खरे ना थोडी समज द्या.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 05/06/2018 - 20:18
समज कशाला कारवाईच करायला सांगा. असे कसे मोदींच्या बाजूने बोलतात? मोदी कसे निस्वार्थी असतील? एवढे सतत परदेशात मजा मारायला जातात, एकटे एवढ्या मोठ्या आलिशान निवासात राहतात, आलिशान गाड्यांमधून हिंडतात, मग कसले निस्वार्थी? साधी निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासनं पण पाळत नाहीत. प्रत्येकी १५ लाख देण्याचं वचन दिलं होतं, आमच्या घरात ६ लोक असल्याने ९० लाख मिळणार म्हणून मी एक घर घेऊन टाकलं. पैसे तर नाहीच मिळाले वर नोटबंदी आणि रेरा सारखा कायदा करून घराच्या किमती कमी करून टाकल्या. किती नुकसान झालं माझं म्हणून सांगू. अजून कुठल्यातरी अडाणी माणसाला माझ्याच घरातला आहे असं सांगून जास्तीचे १५ लाख मिळवून कोट्याधीश व्हायचं स्वप्न होतं माझं, तर यांनी आधार सक्तीची घोषणा करून टाकली. अश्या कितीतरी स्वप्नांचा चुराडा करून टाकला या माणसाने आणि म्हणे निस्वार्थी! स्वस्ताई आणू म्हणून म्हणाले होते, पण पेट्रोलचे भाव बघा. इथे आठवड्यातून एकदा चांगल्या हॉटेलमध्ये सहकुटुंब जाणं, दोन आठवड्यातून एकदा मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा आणि विकांताला मित्रांबरोबर पार्टी या सगळ्याला गाडी घेऊन जाणं परवडेनासे झाले आहे. पेट्रोलवर एवढा कर लावून सगळे पैसे स्वतःच्या खिश्यात भरत आहेत. जागतिक बाजारात पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून काय झालं? सबसिडी का देत नाहीत? दुसरीकडे म्हणे भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. आमच्या दारावर भाजी घेऊन येणारा भाजीवाला अजूनही चढ्या भावानेच भाजी विकतोय. त्याला का नाही हे सरकार नियंत्रणात आणत? वर "अशी आमची लायकीच नाही हेच खरं" असं लोकांना उद्देशून म्हणतात? कसं बरं सहन करावं आम्ही?

In reply to by manguu@mail.com

ट्रेड मार्क 05/06/2018 - 21:57
बरं, तुम्ही म्हणताय तर घरांच्या किमती कमी नाही झाल्या. मग अगदी वृत्तपत्रांनी अशी बातमी दिली असेल तरीही. बातमीत सांगितलेल्या उर्वरित दोन गोष्टी मुद्दाम लिहिल्या नव्हत्या कारण मग चर्चेची दिशा बदलून जाते. उगाच तुमच्या भावना दुखवायला नको, नाहीतर कारवाई व्हायची. आणि हो तुम्हाला वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील तर माफ करा बरंका.

In reply to by ट्रेड मार्क

manguu@mail.com 05/06/2018 - 22:10
विविध वेबसाईटॉवर घरांच्या किमतीचे ग्राफ असतात, ते कुठेही फार मोठा फॉल दाखवत नाहीत. अमुक एक फ्लॅट पूर्वी 10 लाखाला होता , आता 9 लाख आहे , असे कुठे असेल तर सांगा दिल्लीतील किमती 6 वर्ष ढासळत आहेत , असे त्या बातमीतच आहे.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 05/06/2018 - 20:50
लोकांची लायकी काढणं कुठे हो आणि कुणाची लायकी काढली? समज द्या कि पण व्यवस्थित, चूक काय आहे ते दाखवून. हे उगाच "त्याने मला मारलं" म्हणून रडारड करून काय फायदा? माझी चूक असेल तर मी क्षमा मागायला अजिबात लाजत नाही किंवा "इगो" सुद्धा होत नाही. जाता जाता-- ते तुम्हाला काय काय "सगळं ठीक" वाटतंय ते पण सांगा.

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 05/06/2018 - 20:06
हुतात्मे , त्यागी समाजाचे कल्याणच करतात आणि भोगी लोक समाजाला बर्बाद करत असतात , या टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला.

In reply to by manguu@mail.com

ट्रेड मार्क 05/06/2018 - 22:05
स्वस्त्री कशाला सोडायची? थरूर, दिग्विजय सिंग ईई चा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. बादवे, जमलं तर मोदींनी घेतलेले कुठले निर्णय देशविरोधी होते/ आहेत याची यादी कारणमीमांसेसहीत द्या. ही अगदी सरळ साधी मागणी आहे, उगाच झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसू नये.

In reply to by ट्रेड मार्क

बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो , आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयी ! ;) #पिकल्या_पानाचा_देठ_कि_हो_हिरवा अवांतरः वरील प्रतिसाद उपरोधिक नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

ट्रेड मार्क 05/06/2018 - 22:32
आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयी मला वाटतं यात व्यक्तीपेक्षा पैसा आणि पॉवर याचा संबंध जास्त असावा. अर्थात व्यक्तीही स्त्रीलंपट असावी लागतेच. पण आजकालच्या जगात हे भूषणावह मानलं जातं, हेही खरं आहे. अजून मुसळी पॉवर, वायग्रा किंवा तत्सम कंपन्या या लोकांना ब्रँड ऍम्बॅसॅडर म्हणून कसे नेमत नाहीत? गमतीची गोष्ट अशी की अगदी फोटोसहीत बातम्या आल्या तरी भोळ्याभाबड्या जनमानसावर वाईट परिणाम होईल किंवा आपले राजकारणी कुठला आदर्श ठेवत आहेत यावर पुरोगामी जनता चकार शब्द काढत नाही. अतिअवांतरः वर राजकारणी असा शब्द आला असला तरी हा प्रतिसाद राजकारणाशी संबंधित नाही.

In reply to by ट्रेड मार्क

manguu@mail.com 06/06/2018 - 12:38
स्वस्त्री सोडली , परस्त्री भोगली , 1 की 2 , ह्याचा अन कर्तृत्वाचा शून्य संबंध असतो. उदा . महान भारतरत्न गायक , ह्यांचे 2 विवाह झाले होते , ते व्यसनही करायचे म्हणे , पण गायकीत त्यांची जागा कुणालाही घेता आली नाही त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 06/06/2018 - 12:44
हायला स्वस्त्रीबद्दल उल्लेख पहिल्यांदा कुणी केला आणि तेच आता उलट बोलत आहेत. आपण xx खायचं आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायचं बढिया है

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 06/06/2018 - 13:05
हुतात्मा , आगापिछा नसलेला इ उल्लेख तुम्हीच आधी केलेत ना ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 06/06/2018 - 13:19
हो पण मी एकदा एक बोलायचं आणि मग थोड्यावेळाने "ह्याच्या चरचा करू नयेत" असे घुमजाव करत नाही

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 06/06/2018 - 13:28
हुतात्मे , त्यागी समाजाचे कल्याणच करतात आणि भोगी लोक समाजाला बर्बाद करत असतात , या टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला. मुळात माझा प्रतिसाद तुम्हाला नव्हताच तो होता चौरा साहेबांस तुम्ही उगाच

"मध्ये तोंड"

घातलंय. त्यात

टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद

अशा तर्हेची अनावश्यक टिप्पणी यानंतर "मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले" हे बोलणे तुम्हीच काढले आणि यानंतर त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत हा तुमचाच प्रतिसाद आहे. मागे पण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला लिहिले होते कि या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली तरी ती आपल्याच बोटावर राहते पण तुम्ही काही सुधारायचे नाव घेत नाही. असो. जाता जाता --

यालाच

मी पिचक्या टाकणे म्हणतो. त्यावर लोकांना ऑब्जेक्शन आहे बढिया है

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 06/06/2018 - 00:38
आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ संजय दत्तला निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आणि सलमान खानने मोदीजींबरोबर पतंग उडवल्यानंतर त्याच्या केसाचेही निकाल बाइज्जत बरी आले ! तुमचे काँग्रेस पुराण चालू द्या !

सुबोध खरे 05/06/2018 - 20:45
मोदी हा विषय बाजूला ठेवून मी काय प्रतिसाद दिलाय तो पहा. कायद्याची प्रक्रिया कशी असते हे किती लोकांना माहिती आहे. "पटापट बेड्या ठोकायच्या" तर हुकूमशाहीच आणावी लागेल. सध्या कोणालाही अटक केली तर त्याला मूलभूत कायद्या अंतर्गत २४ तासात न्यायालयात उभे करावे लागते. (आणीबाणी किंवा युद्ध घोषित केले असेल तरच हा मूलभूत कायदा लागू होत नाही.) त्यात सकृतदर्शनी सबळ पुरावा असेल आणि गुन्हा अजामीनपात्र असेल तरच न्यायालयीन कोठडी मिळते. दुर्दैवाने आर्थिक गुन्हे या सदरात मोडत नाहीत. त्यातून समजा एखादा आरोपी विदेशात पळून जाणार असेल तर त्याचा पासपोर्ट जमा करायला सांगतात. जामीन मिळाल्यानंतर विवक्षित कालावधीत आरोपपत्र दाखल करावे लागते अन्यथा टाइम बार झाल्याने खटला मोडीत निघतो. केवळ अमली पदार्थ आणि दहशतवाद यासारखे गुन्हे असतील तर जामीन मिळत नाही. हि कायद्याची प्रक्रिया माहिती नसल्याने बहुसंख्य सामान्य लोक चुकीचे आरोप करतात आणि काही लोकांना आपलेच म्हणणे खरे करायचे असल्याने प्रक्रिया माहिती असली तरी त्याबद्दल न बोलता केवळ टीका करायची म्हणून आरोप करत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपली कायदा अंमल बजावणी यंत्रणा अनुत्पादक कामात लावण्यात काय अर्थ आहे? केवळ विरोधकांना त्रास देण्यापेक्षा हीच प्रणालि सबळ पुरावा असलेल्या केसेस चा पाठपुरावा करण्यासाठी वापरली तर त्याचा राष्ट्राला फायदा होईल. याला व्यवस्थापकीय भाषेत optimization of resources म्हणतात. मूळ सरकारी यंत्रणा स्वतःच इतकी भ्रष्टाचाराने पोखरली आहे कि तिला कामाला लावून काम करून घेणे हेच किती कठीण आहे. श्री मल्ल्या याना अटक होणार आहे हि "आतील बातमी" त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी याचे उत्तर तुम्हाला सापडले तर समजून येईल. अर्थात हे समजून घ्यायची इच्छा असेल तरच. अन्यथा आमच्या काळ्या गाईला पांढरे वासरू झाले आहे तर मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे इ इ शिमगा चालू द्या.

डँबिस००७ 05/06/2018 - 20:59
आता ४८ महीन्यात केलेल्या कामाचा लेखा जोखा हे सरकार द्यायला लागलय ! अश्याने पुढे येऊ घातलेल्या खिचडी सरकारवर संकट ओढावलय ! दहा वर्षे राज्य करुन जनतेला काही सांगण्यासाठी नसलेल्या त्या पक्षाला जनतेपुढे तोंड ऊघडता येणार नाही !! मा श्री मोदीजींचा जनाधार दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे येणार्या १० वर्षांत इतर कोणाचाही पर्याय जनतेला नकोय !! आता येणार्या काळात कॉंग्रेस च्या भ्रष्टतम नेत्यांची रवानगी जेल मध्येच करावी व जनतेला मुक्त करायवे !

In reply to by डँबिस००७

सुबोध खरे 05/06/2018 - 21:14
आता येणार्या काळात कॉंग्रेस च्या भ्रष्टतम नेत्यांची रवानगी जेल मध्येच करावी व जनतेला मुक्त करायवे ! साहेब, इतकं सोपं असतं तर लालूप्रसाद २३ वर्षानि आणि संजय दत्त २१ वर्षांनी तुरुंगात का गेले असते? सरकारला प्रथम त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात खटला दाखल करावा लागेल मग क्रमाक्रमाने खटले उभे राहतील आणि त्याचा निकाल लागेल. यात सुद्धा खालचे कोर्ट वरचे कोर्ट उच्च आणि मग सर्वोच्च न्यायालय असे होऊन शेवटी निकाल लागेल. या गोष्टी दोन चार वर्षात होत नाहीत हि न्यायालयाची शोकांतिका आहे. अंती सत्याचा विजय होतो पण तेवढ्या कालावधीत सत्याचा अंत होऊ नये असेच वाटते इतका न्यायालयीन विलंब आहे सध्या.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ 05/06/2018 - 21:41
खरे सा. , २३ वर्षांनी जेल मध्ये जाणार्या लालु प्रसाद यांना हा कोर्टाचा निर्णय सुद्धा त्यांच्या विरुद्ध सरकारची साजिश अस वाटतय अस त्यांनी जाहीर रित्या सांगितलय !

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 05/06/2018 - 21:41
वाजपेयींच्या काळात संसदेत स्फोट झाला. शिक्षा 10-12 वर्षानी काँग्रेस काळात झाली. दरवेळी लालूचेच उदाहरण का हो ? तुमचे उदाहरण द्या की

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 05/06/2018 - 22:24
मोगा खान आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही हे आपण परत परत सिद्ध का करून देताय? वर म्हटल्याप्रमाणे दहशतवाद आणि अमली पदार्थ याचे कायदे वेगळे आहेत त्यांची न्यायालये वेगळी आहेत. हे गुन्हे जामीन पात्र नाहीत. आर्थिक गुन्हे असे नाहीत. केवळ विरोधासाठी पचकायची सवय सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 05/06/2018 - 22:26
देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा सर्वात गहन आणि गंभीर असा गुन्हा मानला जातो म्हणू न त्याची श8कशा ही जन्मठेप किंवा मरेपर्यंत फाशी अशी आहे. आर्थिक गुन्हा हा तसा नाही हेही समजून घ्या.

डँबिस००७ 05/06/2018 - 21:29
### मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला. ------ मा. श्री मोदीजींचे सर्व निर्णय व देश हिताचेच होते व आहेत !! --- टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. ## हिंदु लोक, हिन्दु विचारपद्धतीतुनच प्रतिसाद देतात ! हिंदु असुन सुद्धा मोगलाई विचार बाळगणारे तुमच्यासारखे कमीच !!

In reply to by manguu@mail.com

डँबिस००७ 06/06/2018 - 01:00
अय्या खर की काय ?? मग त्या मोगलांनी वेगळ्या देशाची पक्षी पाकिस्तानची मागणी का म्हणुन केली म्हणे ? ते स्वतःला हिंदु सोडाच तर अरबी मीर कासिमचे वंसजच समजतात !!

In reply to by डँबिस००७

manguu@mail.com 06/06/2018 - 01:04
पाकिस्तान मागणारे मोघल होते का ? शेवटचा मोघल बादशहा बहाद्दूरशहा , त्याचे 1857 च्या देशभक्त यादीत नाव आहे. जिनांचे आजोबा हिंदू की पारशी काहीतरी होते ना ? उगाच पाकिस्तानासाठीही मोघलांना मध्ये का आणताय ?

In reply to by manguu@mail.com

ट्रेड मार्क 06/06/2018 - 01:00
विषय "हिंदू" लोक, विचारपद्धतीचा चाललाय आणि तुम्ही प्रतिसाद देताना हिंदुस्तानी करून टाकलं. बादवे, तुमच्या बाबराच्या वंशजांना "आम्ही हिंदुस्थानी आहोत" असं जाहीरपणे म्हणायला सांगा, बघू किती जण तयार होतात.

चर्चेचा विषय होता- ते पंधरा लाख" आणी ती चर्चा फ्लॅटच्या किंमती , संजय दत्त-जीना असा प्रवास करीत मोघलांपर्यंत आली.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाखु 06/06/2018 - 11:47
प्रतिसाद पायरी-पायरीने आणि विषय जिना -जिन्याने (दरमजली) उतरत जातात हेच या धाग्यांच मर्मफलित आहे. अखिल मिपा "झोपलात काय,जागे व्हा"या नियमित वाचक संघाचे रोचक निरीक्षण .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चर्चेचा विषय पुन्हा मूळपदावर आणल्या बद्दल धन्यवाद . पण मजा आली . लालू ,ममता ,मायावती व गतिमंद पप्पू , केजरीवाल च्या विचाराने प्रेरीत झालेले लोक या प्रगतशील भारतात भरपूर आहेत हे पाहून आश्चर्य वाटले . बापजादे चें आयुष्य काबाडकष्ट करण्यात , दारिद्रीपणात गेले व आपण स्वतः स्ट्रुगल करून पायावर उभे राहण्यात हयात घालवली तरी यांचे काँग्रेस प्रेम काही कमी होत नाही आणि मोदींच्या गेल्या चार वर्षातील कामगिरी ला गवताच्या ढिगाऱ्यातून सुई सारखे शोधत बसणाऱ्या माणसांना माझा दंडवत .

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क 06/06/2018 - 21:44
संपादक मंडळाच्या नोटिशीनंतर गुरुजी आणि अरुण जोशींसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी मिपासन्यास घेतल्याने ताज्या घडामोडी एकदम शिळ्या झाल्या आहेत. महत्वाच्या निवडणूका पुढच्या १०-११ महिन्यात लाईन लावून आहेत आणि गॅरी ट्रुमन, अरुण जोशी, गुरुजी यासारखे सदस्य गायबलेत. निवडणुकात काही मजा येणार नाही असं दिसतंय.

डँबिस००७ 06/06/2018 - 22:49
ते १५ लाख सोडाच आता ५ कोटी कमवायची संधी ह्या सरकारने आम जनतेला उपल ब्ध करुन दिलेली आहे. २०१४ नंतर देशात खास करुन मिपावर सुद्धा रु १५ लाख सरकार कधी देणार म्हणुन वाटेवर डोळे लावुन बसलेल्या काही फुकट्या लोकांनासाठी तर ही सुवर्ण संधीच चालुन आलेली आहे. १५ लाख नाही तर तब्बल ५ कोटी मिळणार !! पण एक आहे की हे ५ कोटी मिळवण्यासाठी , त्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध पुरावे सरकारला द्यायला लागणार !! बुड हलवल्याशिवाय घबाड मिळणार नाही !! I-T Dept's new scheme: Inform govt about tax evasion, get rewards up to Rs 5 crore !! त्या निमित्याने मोदी सरकारचा हा आणखी एक "मास्टर स्ट्रोक" अस म्हणायला हरकत नाही !! काँग्रेसच्या नेत्यांचे धाबे दणाणुन जाणार, त्यांचेच चेले चपेटे आता धनदांडग्या विरुद्ध पुरावे सरकारला देणार, सरकारचा खजिना आता परत भरणार !! सरकार जनतेच्या कल्याणासाठी त्यापुढे अंबरनाथ, कर्जत , कसार्यापर्यंत जायला तयार आहे फक्त जनतेची साथ हवी आहे.

एकाच व्यक्तीविरुध्द अनेक जणांनी पुरावे दिल्यास पैशाचे वाटप कसे करणार? काही म्हणा पण कल्पना मस्त आहे, आता काय खबऱ्यांच पीकच येणार देशात. ज्या यंत्रणेचे हे काम आहे ते मस्त टेबलावर पाय ठेवून झोपा काढणार.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 07/06/2018 - 00:35
इतका महत्वाचा प्रश्न कसा काय कोणाच्याच लक्षात आला नाही? बघा हे लोक नुसताच ढोल बडवत बसलेत, काही कामाचे नाहीत. यंत्रणेचं ठीक आहे हो त्यांच्या कामात काही बदल नाही, पण मोदींचं काय? त्यांनी नको का अश्या प्रश्नांचा विचार करायला?

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 07/06/2018 - 09:26
मोगा अनुदान, शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय? अर्थात मोदीविरोध हा आणि हाच एककलमी कार्यक्रम असेल तर काहीच विधायक दिसणार नाही शिक्कामोर्तब झालेला नाखु बिनसुपारीवाला

In reply to by नाखु

शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय? मागील सरकारने असे प्रकार टाळण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता,परंतू सुप्रीम कोर्टाने त्याविरोधी निकाल दिला होता. आता तर आधार शिवाय पानही हलत नाही.

In reply to by नाखु

पुंबा 07/06/2018 - 12:24
शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय?
तुम्ही चूक आहात नाखु. ही स्किम २०१३ पासूनच सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व शिष्यवृत्ती डिबीटी मध्ये आणल्या जात होत्या. २०१४ पासून ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली हे मात्र खरे.
Central Sector Scheme of Scholarship for College and University Students The Scheme is in operational since 2008. The objective of the scheme is to provide financial assistance to the meritorious students having family income of less than Rs.6 lakh per annum, to meet a part of their day-to-day expenses while pursuing higher studies. Annual target is 82000 scholarships per year (41000 for boys and 41000 for girls) which has been divided amongst the State Education Boards based on the State’s population in the age group of 18-25 years. Students who are above 80th percentile of successful candidates in the relevant stream from a particular Board of Examination in class XII and pursuing regular course and not availing benefit of any other scholarships, are eligible to apply under this Scheme. The rate of scholarship is Rs. 10,000/- per annum for the first three years and Rs. 20,000/- per annum for the fourth and fifth year. The Central Sector Scheme of Scholarship for College and University Students is covered under the Direct Benefit Transfer (DBT) w.e.f. 1.1.2013 wherein the scholarship is being disbursed directly into the bank account of the beneficiaries.
वरील माहिती विद्यापिठस्तरावरील शिष्यवृत्तीसंदर्भातील.

उत्तम योजना आहे आय.कर खात्याची. एकाच व्यक्तीविरुध्द अनेक जणांनी पुरावे दिल्यास पैशाचे वाटप कसे करणार? हे ईतके सोपे नसणार रे मार्मिका. नुसती वॉट्स-अ‍ॅपी /फेसबूकी कुजबुज चालणार नाही.
giving actionable information on evasion of tax on assets in India.
घोडे येथे अडणार आहे असे ह्यांचे मत. उदाहरण द्यायचे तर दाउद ईब्राहिम- त्याची मोठ्या प्रमाणावर मुंबईत संपत्ती आहे. ती कोठे आहे हे संबधित सरकारला, अधिकार्याना,स्थानिकांना ठाऊक असते. दाउदने किंवा त्याच्या लोकांनी कधी जास्त आवाज केला किंवा हप्ता दिला नाही तर मग धाड टाकली जाते व नंतर प्रकरण मिटवले जाते. संबंधित अधिकार्यानी तशी माहिती देऊन सरकारला मदत करावी हा उद्देश आहे त्या योजनेमागचा. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/give-i-t-tip-off-on-black-money-get-up-to-rs-5-crore-reward/articleshow/64421729.cms

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

संबंधित अधिकार्यानी तशी माहिती देऊन सरकारला मदत करावी हा उद्देश आहे त्या योजनेमागचा. अच्छा! म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असे पुरावे देऊ शकत नसल्याने तीला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंच ना? एका अर्थी यंत्रणा हलविण्यासाठी सरकारमान्य लाच देण्याचा प्रकार म्हणता येईल.

In reply to by मार्मिक गोडसे

मार्मिका, अरे पण मूळ उद्देश सफल होण्याची शक्यता नाही का? शिवाय मिळालेल्या रकमेवर कर असणारच ना? बेनामी काळ्या व्यवहारांना अशा प्रकारे आळा बसण्यास मदत झाली तर स्वागतच आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 07/06/2018 - 12:40
त्याला प्रोत्साहन भत्ता/ वेतन म्हटले जाते / जात असे. हि गोष्ट आजची नसून किमान ३० वर्षे तरी चालू आहे. तटरक्षक दलास(त्यावेळेस ते गृह खात्या अंतर्गत होते) पकडल्या गेलेल्या सोने चांदी इ मालाच्या किमतीच्या १० % किंमत प्रोत्साहन धन (INCENTIVE MONEY) दिला जात असे. १९९० च्या आसपास सोनेचांदी तस्करीतील माल (CONSIGNMENT) मोठ्या प्रमाणावर पकडला जात असे. कारण तस्करांशी साटेलोटे करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांना पकडून दिल्याने मिळणारे पैसे कमी असले तरीही अधिकृत होते म्हणून तटरक्षक दलातील अधिकारी मोठ्या उत्साहाने अशा मोहिमेत भाग घेत असत. हे मी स्वतः नौदलात असल्याने पाहिलेले आहे.(दुर्दैवाने नौदल अधिकाऱ्यांनी असा माल पकडला तरी त्यांना त्यातील एक दमडी मिळत नसे.) रेल्वेच्या निवृत्त तिकीट तपासनीसांना असेच १० % देऊन फुकट्या लोकांना पकडण्यासाठी अधिकृत रित्या नियुक्त केले जात असे. आता आहे कि नाही ते माहित नाही. याला तुम्ही लाच म्हणा किंवा काही म्हणा.

डँबिस००७ 07/06/2018 - 12:30
एका अर्थी यंत्रणा हलविण्यासाठी सरकारमान्य लाच देण्याचा प्रकार म्हणता येईल. होय बरोबर आहे तुमच, भाजपाच सरकार म्हणजे सरकारमान्य लाच अन्यथा कॉ़ग्रेस सरकारने केली असती तर त्याच वर्णन "सरकारी यंत्रणेला आपल्या कामाला उद्युक्त करण्यासाठी केलेली एक उत्तम योजना " असेच ना ?

In reply to by डँबिस००७

भाजपाच सरकार म्हणजे सरकारमान्य लाच अन्यथा कॉ़ग्रेस सरकारने केली असती तर त्याच वर्णन "सरकारी यंत्रणेला आपल्या कामाला उद्युक्त करण्यासाठी केलेली एक उत्तम योजना " असेच ना ? असं मी कुठल्याच पक्षाच्या सरकार बद्दल म्हटलं नाही. पैसे दिल्याशिवाय यंत्रणा हलत नाही हे सरकारने मान्य केलं आहे , मागील सरकारनेही हेच केलं होते आणि हे सरकारही त्याच मार्गाने जात आहे. नवीन काहीही केलं नाही, काहीतरी नवीन केल्याचं फक्त ढोल बडवतय हे सरकार आणि त्याचे भक्त.

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित 07/06/2018 - 13:03
काहीतरी नवीन घडवण्यासाठी भविष्याबद्दलची दूरदृष्टी लागते. इकडे उलटच घडतंय. ६० ते हजारो वर्षे मागे मागेच चालले आहेत. इग्नोर..

In reply to by मार्मिक गोडसे

डँबिस००७ 07/06/2018 - 14:27
अय्या खर की काय ? मागील सरकारनेही हेच केलं होते तरीच राजा आणी कन्नीमोळ्ळी भक्कम पुराव्या आभावी सुटले !! पुरावे नीट गोळा केले असते तर, कोर्टात केस भक्कम रीत्या उभी करता आली असती !! आता चिदंबरंम कुटुंबा विरुद्ध कसे पुरावे गोळा केलेले आहेत !!

In reply to by मार्मिक गोडसे

डँबिस००७ 07/06/2018 - 14:29
अय्या खर की काय ? मागील सरकारनेही हेच केलं होते तरीच राजा आणी कन्नीमोळ्ळी भक्कम पुराव्या आभावी सुटले !! पुरावे नीट गोळा केले असते तर, कोर्टात केस भक्कम रीत्या उभी करता आली असती !! आता चिदंबरंम कुटुंबा विरुद्ध कसे पुरावे गोळा केलेले आहेत !!

अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती आणि तंत्रज्ञान ई. प्रगती फक्त २०१४ नंतरच झाले. ह्यापूर्वी दळणवळण मागासलेले होते. कबुतरे पत्र पोचवायचे, बैलगाडी हे प्रवासाचे एकमेव साधन होते.मारुती गाडी रामाने भक्तांवर खूष होऊन आकाशातून टाकली वगैरे वगैरे. अगोदरचे सरकार आंधळे होते. आताच्या सरकारची दृष्टी तर खोबणीतून बाहेर लटकत आहे. चालू द्या आरती ओवळणे.

In reply to by डँबिस००७

सुबोध खरे 07/06/2018 - 18:22
पण ते तर स्वतः ला तुर्क (तुर्कमेनिस्तानातील) म्हणवत. आईने अकबरीत आणि आलमगीरनाम्यात तसाच उल्लेख आहे. अकबर आणि आलमगीर यांचा आत्मा ( कि देह) थडग्यात तोबा तोबा म्हणून विव्हळत असेल मोगा खानचा शोध पाहून.

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 07/06/2018 - 18:33
जन्माने ते हिंदुस्थानी ना ? त्यामुळे ते हिंदुस्थानीच . मी उद्यापासून स्वतःला मंगळावरचा समजेन , होणार आहे का लगेच तसे ?

डँबिस००७ 07/06/2018 - 15:11
अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती आणि तंत्रज्ञान ई. प्रगती LOL !! ऐक स्पेसेक्स नावाची खासगी कंपनी गेल्या काही वर्षात पुढे आली व तीने ईज्रोला मागे टाकलेल आहे !! त्यामुळे ईज्रोला हव तस स्वातंत्र्य पाठबळ नव्हत हेच सिद्ध होत ! पुर्वीच्या सरकारचा ईज्रोला भक्कम पाठींबा असता तर ईज्रो आताच्या स्थानापेक्षा फार पुढे गेली असती !! देशातल्या प्रत्येक खात्याचा विभागाचा वैज्ञानिक संस्थांचा गैरवापर पुर्वीच्या सरकारांनी केलेला आहे !! भारत त्याचीच दुष्परीणाम आज भोगत आहे !!

In reply to by डँबिस००७

ऐक स्पेसेक्स नावाची खासगी कंपनी गेल्या काही वर्षात पुढे आली व तीने ईज्रोला मागे टाकलेल आहे !! कशाच्या बाबतीत मागे टाकलंय? माहित नाही म्हणून विचारतोय. तसंही मागील सरकारने अवकाश संशोधन हे आर्यभट ते insat सारखे गणपती तयार करण्याकरिता वापरले हे मान्यच करावे लागेल. आता बहुतेक तेथे राममंदिराच्या वीटा बनवत असतील, सरकारने स्वातंत्र्य आणि पाठींबा दिला असेलच.

२०१४ ला बहुमत मिळाले काय आणि चार वर्ष नुसताच फळा पुसायचे काम केले, तेही पूर्ण पुसायची हिम्मत झाली नाही. पुसट शब्द पुन्हा गिरवून ठळक करायचे ,असे एखादे वाक्य ठळक गिरवून झाले की नवनिर्मितीचा ढोल पिटायचा. बाकी फेकुगीरी मध्ये नाविन्य आणले हे मान्यच करावे लागेल. त्याचे श्रेय ह्या सरकारला द्यावेच लागेल.

पुर्विच्या सरकारांनी काहीच केलं नाही, ती अगदीच टाकावू होती आणि आताचे सरकार खूप जास्त कार्यक्षम आहे. जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. अखेर एक मतदार म्हणून मला जे दिसते त्यानुसारच मी माझे मत ठरवणार... मी शहरात राहतो, माझ्याकडे पुर्वीपासून गॅस आहे तर मी उज्वला योजनेकरिता भाजपचा गौरव करत त्याला २०१९ मध्ये मतदान करणार नाही. मी जे पेट्रोल/ डिजेल विकत घेतो त्याच्या किमतीचा विचार करेन. मी क्वचित ट्रेनने फिरलो तर त्या अनुभवाचा (पुरेशा ट्रेन असणे, आरक्षण मिळणे, गाडी वेळेवर धावणे) विचार करेन (कारण रेल्वे केंद्राच्या अखत्यारीत आहे), आयकर कमी झाला का याचा विचार करेन, GST मुळे मी ज्या वस्तू सहसा विकत घेतो त्या स्वस्त झाल्यात की महाग याचाही विचार करेन. कामगार कायदे वा तत्सम कोणत्या कायद्यांमुळे माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित झाली का त्याचा विचार करेन. किंवा केंद्राच्या कोणत्या धोरणामुळे मला अधिक संधी प्राप्त झाल्या का त्याचा विचार करेन. राष्ट्रीय महामर्ग अधिक चांगले, सुरक्षित व स्वस्त (कमी टोल) झालेत का याचा विचार करेन. मोदी १५-१६ तास काम करतात म्हणे.. करत असतील कदाचित .. तो त्यांचा प्रश्न आहे. त्याकरिता केवळ मी त्यांना /भाजपाला मत देवू शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

डँबिस००७ 07/06/2018 - 15:56
माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित जो करेल त्यालाच द्या तुमच मत !! तुमची नोकरीची शाश्वती फक्त सरकारवर आहे ? तुमचा परफॉर्मंस वाईट असला तर ? कंपनीकडे पुरेश्या अॉर्डर्स नसतील तर ? सरकास कोणाचही असो अश्या वेळेला नोकरी जाणारच !

In reply to by डँबिस००७

माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित जो करेल त्यालाच द्या तुमच मत
असं मी म्हंटलेल तुम्हाला का दिसलं ? कोणतेच सरकार माझ्या नोकरीची १००% हमी देणार नाही हे मान्यच. पण योग्य कायदे करुन कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वेसण नक्कीच घालू शकते.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 07/06/2018 - 18:43
@मराठी कथालेखक मला जे दिसते त्यानुसारच मी माझे मत ठरवणार... मी शहरात राहतो, माझ्याकडे पुर्वीपासून गॅस आहे तर मी उज्वला योजनेकरिता भाजपचा गौरव करत त्याला २०१९ मध्ये मतदान करणार नाही.

PM Modi’s signature Ujjwala Yojana praised in WHO report: All you need to know

http://indianexpress.com/article/what-is/what-is-the-ujjwala-scheme-pradhan-mantri-ujjwala-yojana-5159570-5159570/ https://www.economist.com/international/2018/04/05/household-smoke-may-be-the-worlds-deadliest-environmental-hazard http://www.thehindu.com/sci-tech/health/when-kitchen-smoke-can-kill/article19897927.ece https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-india असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता. तोही पाहून घ्या जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. आपण सुशिक्षित आहात. स्वयंपाकाच्या धुराचे दुष्परिणाम याबद्दल आपली माहिती किती आहे हे मला माहित नाही परंतु वरील दोन दुवे जे भाजप चे मुखपत्र नसलेल्या वृत्तपत्रांचे आहेत शिवाय जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते आहे हेही दिलेले आहे. जाहिरात अशासाठी द्यायला लागते कि ज्या घरात उज्ज्वल योजना पोचवायची आहे तेथे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीत या स्त्रिया नसून पुरुष आहेत. आपल्या बायकोचे आरोग्य धोक्यात आहे हे त्यांच्या गळी उतरवता आले तरच ते या योजनेला मान्यता देतील. निम्न स्तरातील किती पुरुष घरात बायको गरोदर आहे हे माहित असूनही घराच्या आत सिगरेट आणि विड्या ओढताना दिसतात ते लक्षात घेतले तर जन जागृती का करावी लागते हे दिसून येईल. अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे. पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले का ? मोदींनी नक्की काय केले?

In reply to by सुबोध खरे

उज्वला योजनाअ अपयशी झाली वगैरे असं काही मी म्हणत नाही. ती यशस्वी असेलही...त्या योजनेचा ज्यांना लाभ झाला असेल ते भाजपला मतदान करतील. मी मला ज्या गोष्टींचा लाभ झाला (असल्यास) त्या गोष्टींकरिता मतदान करेन.
असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता
सुबोध खरे , आपल्या व्यासंगाबद्दल मला आपल्याबद्दल आदर आहे. पण तुम्ही इतरांना 'किडलेली जनता' म्हणू शकत नाही.
अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे.
उज्वला योजना सरकारने राबवू नये असे माझे म्हणणे नाही. इतरांचा फायदा होवू नये असेही मला म्हणायचे नाही. पण त्याच वेळी माझा काहीच फायदा होत नसेल, माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाही इतकेच फक्त मी स्पष्ट केले.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 07/06/2018 - 19:30
हायला युयुत्सु नि खालील धाग्यात म्हटले आहे कि

अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...

https://www.misalpav.com/node/42260 यावर मी जोरदार प्रतिवाद केला आहे आणि तुम्ही मला उलटे बोलताय? एकदा हा धागा पूर्ण वाचून घ्या. त्यात मी चुलीच्या धुराने काय होते याचा हि दुवा दिला आहे तो हि एकदा वाचून घ्या https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollut... अधिक काय लिहिणे

In reply to by सुबोध खरे

युयुत्सुच्या धाग्याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाहि.. चुलीच्या धुराची लिंक उघडत नाही... पण चुलीच्या धूराने आरोग्यास त्रास होतो हे मान्य.. उज्वला योजनेची निकड आणि योजनेचे यश हे ही मान्य करतो. माझा मुद्दा इतकाच आहे की ज्याला ज्या योजनेचा फायदा झाला तो त्या योजनेचे गुणगान करणार. इथे मी मला कोणत्या योजनेचा /निर्णयाचा फायदा झाला का ह्याचा शोध घेतो आहे. नाही म्हणता नोटाबंदीचा सुरवातीला काहीसा त्रास झाला तरी नंतर काही फाय्दा झाला आणि होतो आहे (केशबॅक योजना, डिजिटल पेमेंट वाढल्याने अप्रत्यक्ष अर्थिक लाभ ई )...

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक , तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक केल्यानंतर एखाद्या चौकात सकाळी 6 वाजल्यापासून सिलेंडर वाल्या गाडी ची वाट पाहणारी जनता कधी बघितली का हो ? आता का बरं गॅस एजन्सी व चौकात ती दृश्य दिसत नाहीत ? सिलेंडर चा काळाबाजार बंद करण्यात यश आल्या मूळेच गोरगरिबांच्या आवाक्यात गॅस आता आला आहे . त्या गरिबांचा विचार करा ,कायम स्वकेंद्रित विचार नका करू .

In reply to by सोमनाथ खांदवे

तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक केल्यानंतर एखाद्या चौकात सकाळी 6 वाजल्यापासून सिलेंडर वाल्या गाडी ची वाट पाहणारी जनता कधी बघितली का हो ?
नाही बघितली... तुम्ही म्हणता तशी कधी कुठे परिस्थिती नसेलच असं मी म्हणत नाही. पण माझ्या घरी अनेक वर्षापासून घरपोच सिलिंडर येतो आहे
त्या गरिबांचा विचार करा ,कायम स्वकेंद्रित विचार नका करू .
पुन्हा तेच.. मी त्यांचा विचार करायचा ? आणि माझा विचार नाही करायाचा ? मग माझा विचार कुणी करायचा ? मी या देशाचा हिस्सा नाही का ? स्वतःचा विचार करणं म्हणजे पाप आहे का ? मी काही दुसर्‍या कुणाचं ओरबाडून मला द्या असं तर म्हणत नाहीये.. दुसर्‍या एका प्रतिसादात मी म्हंटलय की अर्थिक फायदा मिळण्यातच मला रस आहे असे नाही. मी चांगली नोकरी करुन पैसा कमावतो आहेच. पण माझ्या इतर काही साध्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण होताना किंवा त्या बाबतीत विशेष सुधारणा होताना दिसत नाहीये.

डँबिस००७ 07/06/2018 - 15:50
मराठी लेखक : माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित झाली का त्याचा विचार करेन ?? ईतका स्वकेंद्री विचार ? तुमच्या घरात असेल हो गॅस सिलिंडर !! पण त्याच शहरात लाखो गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत होता !! कोण घ्यायचे असा गॅस सिलिंडर ? हॉटेलवाले , गाडीला LPG Cylinder लावुन लोक खुशाल चालवायचे !! मग त्या वर आळा नको बसवायला ? का मला गॅस सिलिंडर मिळतो मग माझा प्रश्न सुटलाय ? आता आधार कार्ड लिंक झाल्यावर गेले ना असे सबसिडीवर घेणारे गॅस सिलिंडरचे ग्राहक !! देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!

In reply to by डँबिस००७

?? ईतका स्वकेंद्री विचार ?
का नाही ? स्वतःचा विचार करुन मतदान करण्यात गैर ते काय ?
देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
मान्य.. पण पुर्ण देश सुखी झालाय का , सगळ्या देशाचं भलं झालंय का याचा हिशेब मी कसा मांडत बसणार ? प्रत्येकजण स्वतःचा विचार करेल आणि मत देईल. ज्यांचं भलं झालंय , जे सरकारवर खूष आहेत असे लोक जास्त असतील तर येईल हेच सरकार पुन्हा सत्तेवर नाहीतर नाही येणार.. जर खरंच अनेक लोकांच जीवनमान उंचावलं असेल तर जाहिरात करायची गरज नाही आणि जर तसं ते झालं नसेल तर जाहिराती करुन फायदा नाही.. साधा-सरळ तर्क..

In reply to by मराठी कथालेखक

डँबिस००७ 07/06/2018 - 16:31
पण पुर्ण देश सुखी झालाय का , सगळ्या देशाचं भलं झालंय का याचा हिशेब मी कसा मांडत बसणार ? हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !! जाहीरात का करावी लागते ? कारण ईतक्या मोठ्या देशातल्या नागरीकांना काही तरी आशा असेल की देशातल्या एका भागात समाजाच्या ऐका घटकाच जिवनमान उंचावलय !! उद्या माझ सुद्धा होईल !! आशेवरच जिवन आहे !! उगाच नाही सरकारवर पिंक टाकणारे १५ लाखच्या आशेला सोडायला तयार नाहीत !!

In reply to by डँबिस००७

हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !!
नका दाखवू.. राहिलं. .पण मग उगाच 'आपण कसे त्यांच्यापेक्षा भारी' ह्याचा डंका नका ना पिटू.. त्यांनी विशेष काही केलं नाही.. आणि आम्हीही केलं नाही म्हणत गप्प रहावं..

In reply to by डँबिस००७

हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !! आयत्या पिठावर एकही रेघोटी न मारता कोणती कामे ह्या सरकारनी केली ?

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 07/06/2018 - 20:12
आयत्या पिठावर एकही रेघोटी न मारता कोणती कामे ह्या सरकारनी केली ? गोडसे बुवा जर कोणताही पूर्वग्रह न ठेवता खालील दुवे वाचून पाहिलेत तर पुढे जाता येईल . अन्यथा तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहेत आणि मी माझ्या जागी असे म्हणून मी पूर्ण विराम देतो आहे. दिलेले दुवे हे डावीकडे झुकणाऱ्या वृत्तपत्रांचे आहेत. भाजप/ रास्व संघाची मुखपत्रे नाहीत हेही लक्षात घ्या. https://timesofindia.indiatimes.com/india/centre-passes-bills-to-repeal-245-obsolete-laws/articleshow/62285343.cms http://www.thehindu.com/news/national/ujjwala-yojana-to-benefit-eight-crore-women-now/article22682181.ece https://www.thehindubusinessline.com/economy/policy/modi-govts-ujjwala-scheme-leaves-women-healthier-happier/article9685035.ece https://www.financialexpress.com/money/good-news-jan-dhan-account-holders-can-enjoy-this-major-benefit-at-sbi-other-banks-here-are-details/945257/

In reply to by डँबिस००७

देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
short & sweet - देश मोठा असला तरी मी माझं (छोटंस म्हणू हवं तर) मत मशिनवर नोंदवणार .. पुर्ण देशाचं मत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 07/06/2018 - 18:22
म.क., तुमचा आगम (अॅप्रोच) अगदी योग्य आहे. कुणाला मत द्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग मोदींनी जाहिरात केली तर तो देखील (वा भाजपचा) वैयक्तिक निर्णय झाला ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मग मोदींनी जाहिरात केली तर तो देखील (वा भाजपचा) वैयक्तिक निर्णय झाला ना?
अगदी अगदी...मी कुठे लगेच न्यायालयात धाव घेतलीय.. फक्त आश्चर्य व्यक्त केलंय हो..चालेल ना ? बाकी जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच होत असेल , सरकारी खजिन्यातून नाही अशी आशा करतो.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 07/06/2018 - 18:46
जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच होत असेल वर मी दिलेले दुवे वाचले तर हा खर्च भाजप ने करायचा का सरकारने हे लक्षात येईल.

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 08/06/2018 - 01:55
म.क., जरूर आश्चर्य व्यक्त करा. वैयक्तिक निर्णय घ्यायचं तुम्हाला जसं स्वातंत्र्य आहे अगदी तस्संच वैयक्तिक स्वातंत्र्य मोदींनाही आहे. इतकी सरळ गोष्ट तुमच्या ध्यानी कशी नाही आली? त्यामुळे तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही मोदीद्वेष्टे आहात यावर शिक्कामोर्तब होतं. म्हणजे, मी जरी असं विधान केलं नाही तरी लोकं तसाच तिरपागडा अर्थ काढतात. अशाने मोदींचे मतदार वाढतात. तेव्हा हा मुद्दा लक्षात घेऊन मग खुशाल आश्चर्य व्यक्त करा, ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अशाने मोदींचे मतदार वाढतात
काही दिवसांपूर्वी ते कुमार केतकर(राज्यसभा कॉन्ग्रेस खासदार) टी.व्हीवर बोलत होते. सरकारी धोरणांवर टिका करण्यापेक्षा अर्धा वेळ त्यानी मोदींवर व्यक्तिगत टिका करण्यात घालवला. एकेकाळचे ते लोकसत्ता/म.टा.चे संपादक पण बोलणे अगदीच प्रचारकी थाटतले. खरे तर सुरेश प्रभू,नितिन गडकरी,धर्मेण्द्र प्रधान असे खूप काम करणारे मंत्री आहेत..ज्यानी आपापल्या खात्यांमध्ये बदल घडवूनही आणला आहे. मराठी कथालेखका, अरे , मोदी सरकारची धोरणे,योजना ह्या मुख्यत्वे गरीब वर्गासाठी बनवल्या आहेत, राबवल्या जात आहेत. तेव्हा प्रत्येक योजनेचा फायदा हा प्रत्येक नागरिकास मिळेलच असे नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाखु 08/06/2018 - 12:50
माझ्या कोथींबीर च्या चार काड्यांची किंमत कमी झाली तरच मी महागाई कमी झाली असं समजत असेल तर!!! चांगल्या कामाची प्रशंसा करण्याची नसते एखाद्या ला सवय, किंवा चांगलं बघायचं नसेल तर उपयोग काय? उघडा डोळे बघा (आनंदाने) निट नाखु हो तोच शिक्का बसलेला

In reply to by नाखु

manguu@mail.com 08/06/2018 - 13:03
जो तो स्वतः:चेच पहात असतो. काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले , पण मंदिर बांधले नाही ना ? मग काँग्रेस ब्लॅक लिस्टमध्ये सगळे असेच करत असतात . त्यात काय चुकीचेही नाही.

In reply to by manguu@mail.com

डँबिस००७ 08/06/2018 - 18:38
काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले LOL पहील AIMS साल १९५६ दिल्लीला त्पानंतर ५ AIMS ऐकाच २०१२ सालात लोकांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी !! पण भाजप सरकारने २०१६ सालात दोन AIMS निर्माण केले !! ईंग्रजांनी १९४७ पर्यंत ९४००० किमीची रेल्वे लाईन टाकली त्यांच्या स्वतःच्या ब्रिटीश सरकारच्या पैश्यावर !! पण कॉंग्रेसने १९४७ नंतर ६५ वर्षांत फक्त ११००० किमी रेल्वे लाईन टाकली ? २०१४ पुर्वी महामार्ग बनवण्याचा वेग होता २ ते ३ किमी/दिवस आणी आता २० किमी/दिवस .

In reply to by डँबिस००७

manguu@mail.com 08/06/2018 - 19:02
इंग्रजानी आधीच रेल्वे निर्माण केली होती , ती मोडून पुन्हा नव्याने सुरू करायला हवी होती ? एम्स म्हणजे दिल्लीचे एम्स वाजपेयींनी कुठल्या एम्स काढल्या म्हणे ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 08/06/2018 - 19:40
अगोदरच्या काळात म्हणजे ७० वर्षात १५००० किमी रेल्वे मार्ग बांधले गेले. २०१४ पासून त्याला जास्त वेग आला हि वस्तुस्थिती आहे. परंतू सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेल्वे बजेटच काढून टाकले आणि ते मुख्य अर्थ संकल्पात जोडून घेतले. यामुळे आता रेल्वे मंत्री पद हे फारसे प्रतिष्ठेचे राहिलेले नाही. यामुळे स्वतःच्या मतदार संघाचंच काम करायचे आणि बाकी रेल्वेला उन्हात उभे करायचे हे वर्षानुवर्षे लहान पक्षांनी चालवलेले धोरण आता रद्दबातल झाले आहे. लालू प्रसाद यांनी आपल्या मतदार संघ मधेपुरा येथे रेल्वे इंजिनांचा कारखाना आणला मग त्याचा मुख्य रेळे मार्गाशी संपर्क नसला तरी चालेल. ए बी एघनी खान चौधरी यांनी दिल्ली कलकत्त्यापासून पासून आपल्या मालदा मतदारसंघापर्यंत नव्या गाड्या चालू केल्या मग त्यात प्रवासी असोत कि नसोत. ममता बॅनर्जी यांनी असाच सवता सुभा राबवला. या प्रकरणात रेल्वेची भाडेवाढ १५ वर्षात झालीच नाही. भारतीय रेल्वे जगात सर्वात स्वस्त आहे फक्त ३६ पैसे एका किमीला. रिक्षा एक किमी ला १० रुपये घेते. एस टी बस रुपये साडे सहा घेते तर शिवनेरी १५ रुपये किमी ला. यामुळे रेल्वे सतत तोट्यात चालत आहे. मग हा तोटा भरून काढायला मालवाहतुकीवर भाडे वाढवले. त्यामुळे माल रस्त्यावरून जायला लागला आणि रेल्वे परत तोट्यातच राहिली. २०१६ मध्ये श्री सुरेश प्रभू यांनी राजधानी शताब्दी सारख्या आरामदायी गाडयांची भाडेवाढ केली त्यावर विरोधी पक्षानी केवढा गदारोळ केला होता याची आठवण झाली.https://www.firstpost.com/politics/railway-passenger-fare-hike-why-the-public-outcry-against-suresh-prabhu-is-overreaction-2997112.html त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले यानंतर परत रेल्वे भाडेवाढ करून राजकीय हाराकिरी करण्याची तसदी पुढच्या मंत्र्यांनी घेतली नाही आणि श्री जेटलींनी ते मंत्रिमंडळ शक्तिहीन करून टाकले यामुळे आता रेलवे ला हळू हळू भाडेवाढ करून तोट्यात चालणारी रेल्वे फायद्यात आणण्याचं मार्ग चालू तर केला आहे. परंतु पुढच्या निवडणूक वर्षात हि भाडेवाढ करणे भाजपाला परवडणार नाही असेच दृश्य आहे.

In reply to by सुबोध खरे

विशुमित 08/06/2018 - 19:48
त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले>>> ==>> अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! === पण प्रभूंनी लोकांच्या लक्ष्यात राहील असे काम चालू केले होते, पण जनता आपली कमनशिबी आहे ना ! काय करणार.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 08/06/2018 - 20:26
अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! जालावर खोदकाम केले असता फक्त "श्री राज ठाकरे" तसं म्हणताना आढळले आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे. http://www.dnaindia.com/mumbai/report-live-updates-raj-thackeray-mns-mumbai-elphinstone-stampede-railways-protest-march-metro-cinema-to-churchgate-police-permission-2550640 परंतु बाकीचे बरेचसे दुवे श्री सुरेश प्रभू बुलेट ट्रेनचे समर्थनच करताना दिसतात. मुळात जर ते बुलेट ट्रेनला विरोध करत असते तर या शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या या गुणी नेत्याला शोधून त्याला इतके महत्त्वाचे खाते देण्याचे वर त्याला आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवायचे मोदी याना काहि कारण असावे असे वाटत नाही. त्यांना वाणिज्य आणि उद्योग हे दुसरे महत्त्वाचे खाते दिले गेले आहे कारण रेल्वे मंत्रालयाचे महत्त्व कमी करायचा बेत ठरला असावा. https://www.ndtv.com/india-news/is-there-deliberate-misinformation-on-bullet-trains-asks-suresh-prabhu-1400064

In reply to by नाखु

ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित आहे त्या मी बघणार.. सामान्य नैसर्गिक तत्व आहे हे.. मोदींनी कोणत्या खेड्यात कुठे वीज आणली असेल. पण त्या खेडेगावात ना मी राहतो ना माझा कुणी नाते वाईक तर त्याबद्दल मी कशाला कौतूक करु. थोडक्यात काय तर प्रत्येकच वर्गासाठी काहीतरी करायला पाहिजे ना.. सब का साथ सब का विकास असं बोलले होते ना मोदी. शहरी मध्यम/उच्च मध्यम वर्गाकरिता काही केलेलं दिसत नाहीये.. आयकर कमी केला असता तरी काहीतरी केलं असं म्हंटलं असतं. असो. अजून एक वर्ष आहे. या वर्गाकरिता काही करता येतं का ते बघावं मोदी सरकारने..

In reply to by मराठी कथालेखक

गब्रिएल 08/06/2018 - 20:30
भले शाबास ! मंग गावाकड्च्या लोकांन्नी त्येंच्यापुरत बगून मतदान क्येलं (त्येंची संक्या जास्त है बर्का ;) ) आनि तुमच्यासारक्या शहरात्ल्या लोकांला बांदावर बशिवलं तर मंग बोंबा मारू नका बर्का. :) आशी शिकलीसवर्ली मान्सं त्येला काय म्हंतात त्ये "वैयक्तिक स्वार्थ" समोर ठ्येवून त्ये आपलं "कॉमन गुड" इसराया लागली की देश्याचे चांगभलं व्हनारंच बगा... कारन याच गोष्टीचा राजकारनी फाय्दा घेत्यात नव्हं. ह्ये आपलं आपलं अडानी मत. तुमी म्होटी लोकं ज्यास्त शानी असताल. आता म्हारास्ट्रात बी मतं जमवाय्ला तामीलनाडू वानी शेरातल्या परत्येकाला येक येक कलर टीवी, मिस्कर, साडी, धोतर... नव्हं, नव्हं... जीनची पँट देयाला पायज्ये, नाय्का ?!

In reply to by मराठी कथालेखक

खरे आहे ! म्हणूनच म्हणतात की लोकशाहीत, "यथा प्रजा तथा राजा" असे असते. स्वार्थी लोक स्थार्थी नेता निवडून देतात... किंबहुना स्वार्थी लोकांची नाडी ओळखून नेता स्वार्थी निवडून येतो व "आवळा देऊन कोहळा काढणे" ही म्हण सार्थ करतो. अश्या परिस्थितीत, "आम्ही निवडून दिलेल्या नेत्यानं आमचं भलं करण्या ऐवजी स्वतःचंच भलं केलं" ही बोंब मारायचा हक्क लोकांना कसा असेल ? !

In reply to by उगा काहितरीच

( जनतेचा )अ‍ॅप्रोच तर २०१९ मध्ये दिसेलच पण नोटबंदी आणि जी एस टी ने दुकानदार किरकोळवाले यांचे मोडलेले कंबरडे आणि रेरा मुळे बिल्डर लॉबीची लागलेली वाट सरळ दिसत असताना असे लेख म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखे वाटतात. माझ्यासारख्या पगारदार (पक्षी व्हाईटवाले) आणि क्रेडिट / डेबिट कार्ड आणि पेटीएम वाल्यांनी तरी परिस्थितीशी लवकरच जुळवुन घेतले आणि वेळच पडली तर निमुटपणे बँकांबाहेर रांगाही लावल्या. पण वर उल्लेख केलेल्या वर्गाचे काय हाल झाले ते त्यांनाच माहित. ईंधन दरवाढीचे चटके तर सर्वजण रोजच सोसत आहेत मग ते थेट असो किंवा वाहतुकीचे दर वाढल्याने होणारी भाव वाढ असो. आता प्लॅस्टीकबंदीचे वारे वाहु लागलेत. थोडक्यात काय योजना कितीही चांगल्या असल्या तरी अंमलबजावणी कशी करावी याचा काही विचार कराल की नाहि?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

जिएस्टी मुळे फक्त करबुडव्यांना त्रास होतोय. बाकी काही नाही. मार्केट आणि व्यापारी केव्हांच पुढे निघून गेलेत. रेरा हा सुद्धा कायदा आपल्यासाठी हितकारक आहे. सामान्य माणसाला लुबाडणाऱ्या बिल्डर लॉबीला नियंत्रणात आणता यावे म्हणून हा कायदा आणण्यात आलेला आहे. प्लास्टिक बंदी सुद्धा खूप गरजेची आहे. त्याने धंद्याच कसलंही नुकसान होत नाही. सरतेशेवटी इंधन भाव वाढ. जी काही कारण दिली जात आहेत ती तर मलाही पटत नाहीये. कारण आजूबाजूच्या राज्यात, महाराष्ट्रापेक्षा कमी भाव आहेत. महाराष्ट्रातच इतकी भाव वाढ झालेली आहे. धन्यवाद बाबा योगीराज.

manguu@mail.com 04/06/2018 - 17:12
त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, मागणारे , देणारे , घेणारे तुम्हाला सांगुन देवाण्घेवाण करणार आहेत का ? आम लोकाना नोटाबन्दीचा बडगा दाखवुन ऐन नोटाबन्दीत अचानक वॉलन्टरी डिस्क्लोजरची सन्धी देणारे लोक हे ३३ हजार कोटी तुम्हाला सांगुन देह्घे करणार आहेत की काय ? अरे देवा , हा आकडाही ३३ कोटीच का ?

सुबोध खरे 04/06/2018 - 19:01
मुळात

"आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू"

असे मोदी म्हणाल्याचे कधीही पाहिले किंवा वाचले नाही. मी पाहिलेल्या व्हिडीओ मध्ये श्री मोदी असे म्हणतात कि

"जर काँग्रेसच्या काळात देशाबाहेर गेलेला पैसा परत आला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील".

या दोन वाक्यात असलेला स्पष्ट फरक लक्षात घेतला तर विरोधी ही पक्षांनी याचे केलेले राजकीय भांडवल सहज लक्षात येईल. अर्थात त्यांचा याला आक्षेप असाच असणार आहे कि मग परदेशात असलेले पैसे आणा कि भारतात तुम्हाला कोणी थांबविले आहे. श्री मल्ल्या किंवा स्पष्ट पणे पुरावे असणाऱ्या अबू सालेम सारख्या लोकांना येथे आणण्यात किती कायद्याच्या भानगडी कराव्या लागत आहेत हे जर आपण पहिले तर हे काम किती कठीण आहे हे समजून येईल. अर्थात मोदी द्वेष्ट्या लोकांना समजूनच घ्यायचे नाही त्यामुळे मी अजून काही लिहिणारच नाही. जर श्री मोदी "आम्ही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू" हे म्हणाल्याचं व्हिडीओ कुणाकडे असेल तर मी माझे म्हणणे मागे घेईन. अन्यथा आरोपांचे गुऱ्हाळ चालू द्या. आम्ही बसतो पोपकोर्न घेऊन.

In reply to by सुबोध खरे

राही 04/06/2018 - 21:03
माफ करा पण आपला आदर राखून विचारावेसे वाटते की आपण अनेकदा पिचक्या, पिंका असे शब्द का वापरता? आपल्या प्रतिसादांत हे शब्द अगदी खड्यासारखे खुपतात.

In reply to by सुबोध खरे

सर टोबी 04/06/2018 - 22:38
काही तरी म्हटल्याचे आठवते. म्हणजे १५ लाख आपल्या खात्यात जमा होतील हि जनतेची अपेक्षा अगदीच अस्थानी होती असे नाही. जनताच मूर्ख आहे अशा अर्थाचे आता बरेच ऐकावयास येते. पर्वा गडकरी म्हणाले कि टोल रद्द होईल असे ते कधी म्हणालेच नाही. मग 'जो खेल मैने शुरू किया उसे मैंही खतम् करुंगा' हे त्यांच्या स्टॅन्ड अप कॉमेडीमधील वाक्य असे समजायचे काय?

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 04/06/2018 - 23:49
सगळा काळा पैसा चार वर्षात परत येईल अशी आपली अपेक्षा असेल तर ती फारच बाळबोध आहे असेच म्हणावे लागेल. चिदंबरम यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या इतक्या न्यायालयीन डावपेचातुन सबळ पुरावा असूनही गोष्टी बाहेर काढायला इतका वेळ लागतो आहे मग जिथे पैसा झिरपला आहे त्याचा मग शोधून काढायला किती वेळ लागेल. जनतेला आपले बूड न हलवता 15 लाख पाहिजेत नाही तर मोदी कुचकामी फेकू आशा शिव्या द्यायला लोक मोकळे. 1995 सालची केस आता निकाल लगीन लालू प्रसाद तुरुंगात जातात 23 वर्षांनी आणि लोकांना 23 दिवसात पैसे पाहिजेत.

70 % टक्के गरीब जनता असलेल्या देशा ची प्रगती करण्यास मोदींनां 5 काय 15 वर्ष सुध्दा कमी पडतील . 60 वर्ष्यात देशाचा खूळखुळा करून ठेवला होता काँग्रेस व त्यांच्या बगलबच्यानीं . मी म्हणत नाही की सेना व भाजप चे नेते भ्रष्ट्राचार करत नाही पण स्वतः मोदी वर आता पर्यंत एक ही रुपया चा आरोप झालेला नाही . सत्तेत नसताना सुद्धा सरकारी बंगले बळकावून बसणाऱ्या काँग्रेस , भाजप ,बीएसपी व इतर पक्ष्यातील निर्लल्ज जनसेवकांना शेवटी बंगले सोडावे लागलेच . राहिला प्रश्न 15 लाखाचा , ' गरिबी हटाव ' घोषणा देऊन काँग्रेस ने कित्तेक निवडणुका जिंकल्या , पण त्यांनी फक्त काँग्रेस चे नेते व कार्यकर्त्याचीं गरिबी हटवली . काहीही केले तरी 130 करोड लोकसंख्या असलेल्या देशाची प्रगती हळूहळू च होणार . पायाभूत सुविधा , शिक्षण , नोकऱ्या आरोग्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न चुटकीसरशी मोदींनीं आपण दिलेल्या 5 वर्षात सोडवले पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे . 60 वर्षात देशातील बहूसंख्य जनता ही गरीब राहीली हा त्या जनते चा दोष नाही तर त्यांना गरीब ठेवून आपल्या उरावर राज्य करणाऱ्या निर्लल्ज काँग्रेस चा आहे . मी मोदी भक्त बिलकुल नाही पण ' अजून 10 वर्ष भाजप ला देऊन मगच भाजप ने देशा चा काय विकास केला याचा हिशोब मागावा ' या मताचा आहे .

भारतात्/भारताबाहेर एवढा काळा पैसा आहे की तो जर पूर्ण पांढरा असेल तर तेवढे पैसे जमा होऊ शकतात... अशा प्रकारचे ते विधान होते रे मंगू. बाकी निश्चलनीकरणाचा निर्णय योग्यच होता असे आमचे मत. अनेकाना त्रास झाला हे मान्य व सरकारने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती.
ईंधन दरवाढीचे चटके तर सर्वजण रोजच सोसत आहेत मग ते थेट असो किंवा वाहतुकीचे दर वाढल्याने होणारी भाव वाढ असो. आता प्लॅस्टीकबंदीचे वारे वाहु लागलेत.
आधीच्या सरकारच्या तुलनेत ह्या सरकारच्या अनेक योजना चांगल्या आहेत..कौशल विकास, सुकन्या सम्रुद्धी वगैरे.. कदाचित त्या योजनांसाठी हा जास्तीचा पैसा वापरला जात असावा. वाजपेयी सरकारची धोरणे मुख्य्त्वे मध्यमवर्गासाठी असायची. मोदी सरकारची धोरणे कनिष्ठ्/गरीब वर्गासाठी आहेत असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

manguu@mail.com 04/06/2018 - 21:49
मोदी असे बोललेच नव्हते, मग शहा चुनावी जुमला नेमक्या कशाला बोलले होते ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 04/06/2018 - 23:42
मोगा खान स्पष्ट पुरावा असेल तर द्या. मूळ व्हिडीओ काय आहे तो तुम्ही पण पाहिला असेलच पण निवडक विस्मरण होण्याची तुमची सवय आहे शाह साहेब यांचा व्हिडीओ मी पाहीलाआहे.

नाखु 04/06/2018 - 21:19
हा आरोप पंधरा लाख प्रतिसाद मिळेपर्यंत तेवत ठेवण्याची जबाबदारी संपूर्णपणे या स्वयंघोषित लोकांनी घेतली आहे तुम्ही सफरीवर लक्ष केंद्रित करावे हीच विनंती शिक्कामोर्तब झालेला य:किंश्चित नाखु

In reply to by नाखु

नाखुंनी पुढील पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणुन पिंपरी चिंचवड (नदी पल्याडचे) मतदार संघातुन निवडाणुकीला उतरावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे हो ! - ह घ्या

Ram ram 04/06/2018 - 21:26
साधारण नव्वद टक्के भारतीय फुकटे आहेत, कोणाची तरी इस्टेट मिळावी फुकट काही तरी पदरात पडावं अशी अपेक्षा ठेवून असतात. यांच्या बापाने ठेवलेत पंधरा लाख रुपये.कसाब व त्याच्या साथीदारांचं मी आभार मानले असते जर त्यांनी सर्व आमदार मारून टाकले असते. या हरामखोरांची संपत्ती एवढी कशी वाढली हे आधी विचारा.

साहना 05/06/2018 - 01:03
कशाला उगाच कष्ट घेताय ? "मोदी साहेबांचा जयजयकार" "मोदी साहेब की जय" इतके लिहिले तरी भावना पोचतात. १५ लाख वगैरे मिळण्याची अपेक्षा ठेवून कुणी जगतोय असे वाटायला लोक मूर्ख आहेत काय ? थापच मारायची आहे तर काँग्रेस ५० लाख द्यायची थाप मारू शकते म्हणून लोक काय राहुल गांधीला वोट मारण्याइतके ठोंबे आहेत काय ? मोदी साहेब नेहमीच्या साच्यातले राजकारणी वाटत नव्हते. दिल्लीत जाऊन ते नेहमीच्या ल्युटेन वाल्यांचे तक्थ फोडतील, कोंग्रेस च्या पॉलिसी १८० डिग्री दिशेने फिरवतील. इतर भाजप नेत्याप्रमाणे गुळमुळीत धोरण न पत्करता विरोधकांना सळो कि पळो करतील इत्यादी लोकांची अपेक्षा होती. ती अपेक्षा बहुतांशी फोल ठरली आहे हे भाजपचेच कार्यकर्ते मान्य करतात. हि ५ वर्षे गेली आता पुढील ५ वर्षांत तर किमान काही मोठे निर्णय मोदी साहेब घेतील अशी अपेक्षा बाळगून दिवस काढायचे. नाही तर आपले नेहमीचे बाबू छाप राममाधव, प्रकाश जावडेकर इत्यादी लोक खुर्च्या गरम करत राहतील.

In reply to by साहना

+१ एकदम मनतील बोललात ! ममसिंगांना दहा वर्षे पाहिल्यानंतर मोदींकडुन जितक्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण झाल्या नाहीत हे कोंणीही मान्य करेल ! शिवाय नोटाबंदी , जी. एस.टी.ची घाई गडाबडीत केलेली अंमलबजावणी वगैरे चुकाही झाल्याच आहेत फक्त एका विरोधकाला धड अक्कल नसल्याने ह्या गोष्टींचे भांडवल करुन सरकार पाडाता आले नाही ! बाकी ही आजादी गँग कितीही अव्वाच्या सव्वा करुन गोष्टी फुगवत असली तरीही ते तुर्तास बाजुला ठेवुन विचार केल्यास दलितांवर अत्याचार वाढले हे नाकरता येत नाही . . शहरी सुसंस्कृत हिंदु "हे आम्ही केले नाही" म्हणुन झटकुन टाकत असला तरीही भाजपाला ते तसे झडाकता येणार नाही . विशेषकरुन उत्तरभारतातील निर्बुध्द स्वमतांध दांभिक हिंदुंचा माज पाहुन फार फार कीव वाटते ! इथे काही भाजपा समर्थक लोकं लगेच " आधीच्या सरकार मध्ये अत्याचार होत नव्हते का ?" असला मुर्खागमनी व्हॉटअबाऊटिझम करणारा प्रश्न करुन ह्या विषयत भाजपाला अजुनच कमकुवत बनवतात. भाजपाला सगळ्यात जास्त घाईला कोणी आणले असेल तर ह्या असल्या निर्बुध्द समर्थकांनी ! बाकी तुर्तास कितीही झाले तरी मोदी साहेबांना विरोधी पक्षात सबळ पर्याय दिसत नाही . यदाकदाचित सर्वच्या सर्व विरोधी पक्षांनी युती करुन मोदी सरकात पाडले तरी पंप्र कोण होणार हा फार गहन प्रश आहे ! त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत ! ह्या मॅडम पंप्र झाल्यास ५ वर्षे मजा येणार =)))) आसो. आपण आपले मजा पहात राहु , कारण कोणीही निवडौन येवो देत , ना इनकम टॅक्स कमी होणार आहे ना जी. एस.टी ना डवल टॅक्सेशन ! तस्मात - तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

साहना 05/06/2018 - 03:19
> बाकी तुर्तास कितीही झाले तरी मोदी साहेबांना विरोधी पक्षात सबळ पर्याय दिसत नाही . सध्या बाराचा ठोका वाजला आहे आणि अश्या वेळेला सिंड्रेलाची हालत काय होते हे सर्वांना ठाऊक आहे . पुढील विलेक्शन जवळ असताना चुकून जरी काँग्रेस ममता वगैरे आली तर देशाचे बारा आणखीन वेगाने वाजणार आहेत. त्यामुळे मन मारून का होईना पण कमळावर शिक्का मारणे आवश्यक आहे अर्थांत कमळावर शिक्का मारायचा म्हणजे बुद्धी गहाण टाकून मोदी साहेबांचा जयजयकार करायचा असे नाही.

In reply to by manguu@mail.com

आस कस ? , आहेत ना पर्याय --- 1 ) रागा उर्फ चौकट राजा -मीडिया समोर बावळट सारखी बडबड करणारा व मोलकरणी सारख अचानक 1 महिना सुट्टीवर जाणे , त्या बदनाम चार राजकीय सल्लागार च्या तालावर नाचणे . 2) बॉंगली दीदी - रक्तरंजीत हिंसाचार करवून निवडणूक जिंकणाऱ्या व हिंदू च्या हत्ये कडे दुर्लक्ष करून मुल्ला ची दाढी कुरवाळनाऱ्या . 3) मायावती - दलितांची उद्धारकर्ती चा आव आणून काळी माया जमा करने , सरकारी बंगला खाली करण्या ऎवजी बंगल्यास कांशीराम भवन नाव देणारी बाई . 4) अखिलेश व मुलायम - हे म्हणजे बॉंगली दीदी ला लाजवेल असे काम करतात . हे वरील सर्व व चंद्राबाबू , लालू , तेलंगणा मुख्यमंत्री राव , नितीशकुमार या पैकी कुणीही राजकीय दृष्ट्या परिपक्व नाही , एकमुखी नेतृत्व करू शकत नाही . भाजप व वि ही प च्या काही कार्यकर्त्यांनी गेल्या चार वर्षात माज करून मोदी साहेबांची डोकेदुखी वाढवली हे नक्की . गोरक्षक बनून त्यांनी दलितांना व मुस्लिमांना मारहाण करून त्याचे व्हिडीओ व्हायरल केले ,त्या मुळे जागतिक स्तरांवर भारताची व हिंदुत्वाची प्रतिमा मलिन झाली .

In reply to by मराठी कथालेखक

विशुमित 05/06/2018 - 16:44
हायला हा ऑप्शन डोक्यात आला नव्हता. तिहेरी फायदा १) प्रथमदर्शनी माहिती प्रमाणे स्वच्छ प्रतिमा आणि उच्च विद्याविभूषित २) महाराष्ट्राचा पंतप्रधान ही मराठी मनात राहिलेली खंत ३) भाषणे ऐकवण्यात वेळ न दवडता मान खाली घालून मस्त काम करतील हा विश्वास. (मॅडमचे लाडले तर ते आहेतच)

In reply to by विशुमित

पुंबा 05/06/2018 - 17:23
++१११ फालतूचे हीतसंबंध महाराष्ट्रात नाहीत(शिक्षणसंस्था, सा. कारखाने वगैरे). भ्रष्टाचाराचा आरोप नाही. उलट 'हाताला लकवा मारला' गेल्याची ख्यातीच आहे. पृथ्वीराजबाबा उमेदवार असतील तर काँग्रेसला फुल्ल सपोर्ट.

In reply to by विशुमित

अर्धवटराव 05/06/2018 - 21:41
बारामतीकरांशी कारण नसताना वाकडं आहे या साहेबांचं. रा.काँ. काँग्रेसमधे विलीन व्हावी, शरद पवार पं.प्र. व्हावे, आणि त्यांनी काँग्रेसला गांधी फॅमिलीमुक्त करावे हि आमची इच्छा... पण ति पूर्ण होण्याचे शान्सेस शुण्य :(

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 05/06/2018 - 09:18
मुर्खपणा, प्रच्छन्न मुजोरी आणि बेताल वक्तव्ये करणार्या मंत्री संत्री नेत्यांचा धिक्कार केला च पाहीजे मूक राहून या गणंगाच समर्थन केले जात असेल तर फार घातक आहे भाजपालाही आणि राजकारणालाही!!! त्यांनी शेण @@@म्हणून आम्ही शेण @@@ हा युक्तिवाद बोगस आणि निर्लज्ज आहे सरधोपट नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 05/06/2018 - 09:37
@ मार्कस ऑरेलियस फक्त एका विरोधकाला धड अक्कल नसल्याने ह्या गोष्टींचे भांडवल करुन सरकार पाडाता आले नाही ! याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं बहुमत असताना सरकार कसं काय पडणार होतं? दलितांवर अत्याचार वाढले हे नाकरता येत नाही हि स्थिती केवळ २०१४ पासूनची नसून २००६ पासूनची आकडेवारी पाहिलीत तर हा आलेख वाढतच आहे https://www.firstpost.com/india/crime-rate-against-dalits-increased-by-25-from-2006-to-2016-cases-pending-investigation-up-by-99-4419369.html हा मुर्खागमनी व्हॉटअबाऊटिझम आहे असे आपल्याला वाटते का? त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत हि शक्यता सर्वात कमी आहे कारण या बाई अत्यंत एककल्ली लहरी आणि हेकेखोर आहेत तेंव्हा त्यांच्या नावाचे एकमत होणे हे केवळ अशक्य आहे. सर्वात उत्तमी व्यक्ती म्हणजे नितीश कुमार होती पण मोदी शाह जोडीने त्यानं धूर्तपणे आपल्याकडे वळवल्याने बादशाह वारल्यावर जनानखान्याची जशी केविलवाणी स्थिती होती तशी विरोधकांची झाली आहे. त्यातल्या त्यात बरी म्हणता येईल अशी व्यक्ती म्हणजे "अखिलेश यादव" आहे. कारण मायावती, अजित सिंह, लालू पुत्र किंवा चंद्राबाबू नायडू याना जनाधार फारसा नाही. खरं तर सर्वव्यापी असा जनाधार कुणालाच नाही. राहुल गांधी नावाचे बुजगावणे उभे केले आहे त्याला काँग्रेसने टेकू देऊन उभा केलेला जनाधार आहे परंतु जर यदाकदाचित राहुल गांधी पंतप्रधान झालेच तर कपिल सिब्बल सारख्या धूर्त माणसांना रान मोकळे मिळेल.

In reply to by सुबोध खरे

याचा नक्की अर्थ काय? आणि एवढं बहुमत असताना सरकार कसं काय पडणार होतं?
नोटाबंदीचा निर्णय नक्कीच चुकीचा होता , हेतु शुध्द होता असे म्हणता येईल पण निर्णय मात्र धाधांत चुकीचा होता , तेव्हा योग्य नेतृत्वाने ह्या निर्णयचे सामाजिक आर्थिक परिणाम कसे चुकीचे आहेत हे मुद्देसुद दाखवुन दिले असते अन ५० दिवसांच्या मुदतीनंतर निर्णय कसा गंडला हे दाखवले असते तर सरकार नक्कीच पडले असते, भाजपातील कित्येकांचा ह्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध होता म्हणे. नोटाबंदीच्या निर्णायानंतर पहिल्यांदा मला मोदींच्यात इंदिरागांधी स्टाईल हुकुमशाही मनोवृत्तीची झलक दिसुन आली होती ! ( माझा पॉलिटिकल इकोनॉमिक्स चा अभ्यास नाही पण ऐकीव माहीती नुसार देशाच्या करन्सी चे निर्णय हे सर्वस्वी आ.बी. आय च्या चेअरमन च्या हातात असले पाहिजेत , " मै ग्राहक को ५०० रुपये देणे का वचन अदा करता हुं" असे म्हणुन खाली त्याची सही असते. त्याचा तो अधिकार ओव्हर राईड करुन स्वतःच तडकाफडकी निर्णय घोषित करणे हा सर्वप्रथम स्टंट होता , सेकंडली असंविधानिक होते , आणि सर्वात महत्वाचे म्हणाजे मी म्हणीन तेच खरे ह्या वृत्तीचे प्रतीक होते . रगुराम राजन सरां सारखा एक जरी जाणता अभ्यासु विरोधक असता तर सरर्कार नक्कीच पडले असते . मम सिंग अन थुरुर वगैरे आहेत पण गांधी घराण्याची पायचाटु माणसे कधीच राजकारणात वर येवु शक्णार नाहीत , हा भाजपाचा लै लै मोठ्ठा अ‍ॅडव्हान्टेज आहे !)
हि स्थिती केवळ २०१४ पासूनची नसून २००६ पासूनची आकडेवारी पाहिलीत तर हा आलेख वाढतच आहे
हे असे असेल तर एक हिंदुत्वावादी विचारसरणीचे सरकार म्हणुन ह्याबाबत सक्त कारवाई करणे भाजपाचे नैतिक कर्तव्य होते असे मी म्हणेन . त्याबाबत भाजपा कमी पडाला हे मान्य करायला हवे , इट्स नॉट अ गूड डिफेन्स टू से की २००६ पासुन हे चालु आहे ! अ गूड डिफेन्स वुड बी - २००६ पासुन हे चालु होते , आमच्या राज्यात आम्ही हे अत्याचारांचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी करण्यात यशस्वी झालो आहोत ! खरेतर दलितांना आज बाबासाहेबांची गरज आहे पण त्यांना आज कोणतेच सक्षम नेतृत्व नाही , जे आहेत ते आपसाआपसात भांडत बसलेत हे पाहुन फार वाईट वाटते . त्यातुन मेवानी सारखे अनार्कीस्ट नेतृत्व उदयाला येत आहे हे अत्यंत धोकादायक आहे , भाजपा आणि हिंदुत्ववाव्यांसाठी नव्हे तर देशासाठी! ममतादीं ह्या एक अत्यंत धुर्त बाई आहेत आणि त्यांना त्यांच्या न्युसन्स पावर ची चांगलीच जाण आहे ! त्यांनी बंगालात ज्या प्रकारे हरामखोर कम्युनिस्टांना गुंडाळले आहे ते पाहुन थोडासा आदरच आहे त्यांच्या विषयी . तस्मात मला त्यांची शक्यता जास्त वाटते. .

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 05/06/2018 - 21:09
@ मार्कस ऑरेलियस मै ग्राहक को ५०० रुपये देणे का वचन अदा करता हुं" असे म्हणुन खाली त्याची सही असते. काही मूळ गृहीतके चुकीची आहेत. ५०० रुप्याच्या नोटा बदलून दिल्या गेल्या आहेत. जुन्या नोटा ऐवजी नव्या नोटात किंवा पैसे खात्यात जमा झाले.याचा अर्थच असा आहे कि त्याला ५०० रुपये अदा झाले आहेत. तेंव्हा या सही आणि शिक्क्याचा अधिकार ओव्हरराईड कसा झाला हे सांगा कि. सेकंडली असंविधानिक होते ,"असंविधानिक" होते तर कोणत्याच माणसाने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान कसे दिले नाही? कारण निर्णय चूक आहे कि बरोबर आहे यावर न्यायालय निर्णय देत नाही पण घटनाबाह्य गोष्ट असेल तर न्यायालय त्यात स्वतःहून आक्षेप घेऊन(किंवा कोणीही जनहित याचिका दाखल केल्यास) असा निर्णय रद्दबातल करू शकते. न्यायाधीशांच्या नेमणुकीची घटनादुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने अशीच रद्द केली आहे. शिवाय जर बहुमत सरकारकडे असेल तर सरकार कसे पडेल ते आपण संगितले नाहीत. उगाच लांब काथ्याकूट कशाला? रगुराम राजन सरां सारखा एक जरी जाणता अभ्यासु विरोधक असता तर सरर्कार नक्कीच पडले असते ते कसं काय बुवा? त्यांनी एवढी नोटबंदी वर टीका केली तरी सरकारला काही ढीम झालं नाही. .सगळी अक्कल आणि शहाणपणा काही एकाच व्यक्तीची मक्तेदारी नाही हेही समजून घ्यावे. काँग्रेसमध्ये किंवा इतर विरोधी पक्षात केवळ भंम्पक माणसे आहेत असे नाही. अतिशय हुशार माणसेही आहेत. केवळ रघुराम राजनच हुशार आहेत असे नाही. इतका गोल आणि भोंगळ प्रतिसाद आपल्याकडून अपेक्षित नव्हता एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

ओके. माझ्याकडे आज जुनी ५०० / १००० रुपायाची नोट असेल तर बदलुन मिळणार का ? की त्याव्र केलेली आर.बी.आय गव्हर्नर्ची सही गायब होणार ? माझ्या माहीती प्रमाणे नोटाबंदी असंविधानिक होती म्हणुन त्या विरोधात सुप्रीमकोर्टात केसेस केल्या गेलेल्या आहेत अगदीच नाही असे नाही. ( तुर्तास माझ्या कडे डिटेस नाहीत म्हणुन ह्या विषयाव्र जास्त काही लिहु शकत नाही. ) सबळ नेतृत्वाने खंबीर पणे आणि योग्य मुद्देसुद मांडणी करुन नोटाबंदी नंतर अविश्वासदर्शक ठराव आणल असता तर एन.डी. ए च नव्हे तर खुद्द भाजपातील काही लोकांनीही कदाचित त्याल समर्थन दिले असते ! रघुरामराजन एकटेच हुशार आहेत असे मी म्हणात नाही , पण ते योग्य इकॉनॉमिक सेन्स देवुन हा निर्णय कसा चुकीचा होता हे सिध्द करु शकतात इतकेच मी म्हणात आहे ( ते ममसिंगही करु शकतात पण त्यांना मॅडमची आणि राहुलबाबा ओव्हरशॅडो व्हाय्चही काळजी वाटली असवी बहुतेक ) बाकी मी आधीच म्हणले की माझा पॉलिटिकल इकोनॉमीचा अभ्यास नाही आणि संविधानाचाही खोलवर अभ्यास नाही. नोटाबंदी चुकीची होती हे माझे अल्पशा इकोनॉमिक्स आणि संविधानाच्या अभ्यासावरुन अन बेसिक इन्ट्युशन वरुन बनलेले मत आहे. त्यामुळे माझा प्रतिसाद गोलमटोल आणि भोंगळ असु शकतो , अगदीच नाही असे नाही . मान्य आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

पुंबा 05/06/2018 - 12:20
त्यातल्या त्यात ममतादींचेच चांसेस सर्वात जास्त आहेत !
नविन पटनायक हे नावसुद्धा ऐनवेळी चर्चेत येऊ शकते, अर्थात ओदीशात भाजपची मुसंडी अन स्वतःच्या पक्षातील प्रवासी पक्षी रोखू शकले तर. हा माणूस ममतापेक्षा बरा वाटतो.

In reply to by साहना

पुंबा 05/06/2018 - 12:14
इतर भाजप नेत्याप्रमाणे गुळमुळीत धोरण न पत्करता विरोधकांना सळो कि पळो करतील इत्यादी लोकांची अपेक्षा होती.
++१११११ सळो कि पळो म्हणजे कुठल्याही संबंधांचा, राजकिय अपरिहार्यतेचा मुलाहिजा न राखता भ्रश्ट नेत्यांना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, धेंडं, कृपाशंकर, हुडा, गेहलोत, वीरभद्रसिंग, मुलायम, मायावती, काण व्यवसायातील रेडी बंधू प्रभृती(स्वपक्षीय असतील तरी मोदी त्यांना दाद देणार नाहीत असे वाटत असे) वगैरे बड्या धेंडांच्या मागे हे सरकार लागेल, त्यांची कृष्णकृत्ये खणून काढेल असे प्रामाणीकपणे वाटत होते. दिल्लीत अनेक भ्रष्ट लॉब्या कित्येक दशकांपासून सत्तेच्या वर्तुळाभोवती वेटोळे घालून बसल्या आहेत त्यांना मोदी जेरबंद करतील असे वाटले होते. राज्यात तसेच केंद्रात भ्रष्ट अधिकार्‍यांची दलालीची संस्थाने निर्माण झाली होती ती खालसा होतील असा सामान्यांचा कयास होता. याची कारणे म्हणजे मोदींना मिळालेले भव्य मँडेट, २०१४ पुर्वीची भ्रष्टाचारविरोधी लढ्याची पार्श्वभुमी आणि सर्वात महत्वाचे मोदींचे प्रस्थापित वर्तुळाबाहेरचे ( ल्युटियन्स झोन) सामान्य माणसाला जवळचे वाटणारे नेतृत्व. भुजबळांना ज्याप्रकारे धडा मिळाला त्यावरून योग्य कारवाई सुरू असल्याचे चित्रही सुरुवातीच्या काळात दिसून आले होते. नंतर मात्र काय झाले माहिती नाही. अक्षरशः नाम्गी टाकल्याप्रमाणे सरकार सुस्त पडले आहे. वर उल्लेखलेल्या लोकांवर विरोधात असताना भाजपनेच आरोपांची राळ उठवली होती. सत्तेबरोबर येणारी मस्ती म्हणावी की मांडवलीची अपरिहार्यता लक्षात आली म्हणावी. पण अजून ही धेंडं कारवाईविना सन्मानाने राजकारणात वावरत आहेत. हा अपेक्षाभंग आहे. दुर्दैवाने या मुद्द्यावर चौथा स्तंभ चिडीचूप असलेला दिसतो( विशेषतः लोकसत्ता गोसी खुर्द वगैरे प्रकल्पातील अनियमेततेवर, सिंचन घोटाळ्यावर बराच पाठपुरावा करत असे २०१४ पुर्वी, अशात काहीच आवज नाही). 'कोल'गेट, २जी, कॉमनवेल्थ, रॉबर्ट वाध्रा, आदर्श घोटाळा, सुप्रीम कोर्टाने दिलेली स्विस बँकेत पैसा असणार्‍यांची यादी यातलं कुठलं प्रकरण लॉजिकल क्लोझ्यरला गेलेलं दिसतं आहे का? स्वतः भाजपच्या काळात असे घोटाळे होत नाहीत हे खरे असले तरी पुर्वीच्या प्रकरणांचं काय? माझ्या मते, आमचे वैर फक्त राजकिय स्वरूपाचे, वैयक्तिक जिवनात आम्ही मित्र, गुरू शिष्यआहोत, असला भोंगळ कारबहर करणार्‍या 'विलासराव- मुंंडे, शरद पवार- ठाकरे' टाईप राजकारण्यांना तोडपाणी करून आपापली घरे भरण्यात रस असतो केवळ. हा भोंदूपणा सोडून विरोधात असणार्‍यांशी खुलेपणाने वैर करणार्‍या आणि विरोधकाची भ्रष्ट प्रकरणे बाहेर काढून त्याला तुरूंगात पाठवणार्‍या पक्षांची आपल्या देशाला जास्त गरज आहे. काँग्रेसची सत्ता आली की त्यांनी भाजपच्या नेत्यांवर डूख धरून अपहारांच्या चौकश्या कराव्यात. भाजप आली की त्यांनी पण सेम करावे. हे 'मिल कर खावो' वाले सर्वपक्षीय साप देशाला गिळंकृत करतील.

In reply to by पुंबा

साहना 05/06/2018 - 12:56
४४ सीटच्या जोरावर काँग्रेसने मुख्य न्यायाधीशावर महाभियोगाची चर्चा केली. रात्री अपरात्री त्याच न्यायाधीशाला गाठून येड्डियुरप्पांच्या सरकारला सुरुंग लावला. हे काँग्रेसचे किलिंग स्पिरिट आहे. मोदी बरोबर काडीचीही मांडवली हा पक्ष करणार नाही, चुकून ह्यांना पूर्ण बहुमत मिळाले तर मोदींची उचलबांडगी सर्वप्रथम या ना त्या मार्गाने तिहार जेल मध्ये करतील. कसलीही दया माया दाखवणार नाहीत. वायपेयींनी उदार मनाने सोनिया गांधींना दया दाखवली पण नंतर ह्या बाईने प्रत्येक भाजप नेत्याच्या मागे CBI लावली. काँग्रेसची पाळे मुळे फारच खोल आहेत. उदाहरण घ्या तर शिबू सोरेन आणि भाजपला दोघांना मिळून बहुमत मिळाले होते पण काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष होता. राज्यपालांनी काँग्रेसला सरकार करण्यासाठी बोलावले. भाजप एक दोन दिवसांनी कोर्टांत गेला. त्यावेळी काँग्रेसी बाजूने अभिषेक मनू सिंघवी हे उतरले होते तर भाजपाच्या बाजूने मुकुल रोहतगी. कर्नाटक राज्याच्या बाबतीत पार्टी त्याच होत्या पण दोघांच्या अर्ग्युमेण्ट १८० उलट. दोन्ही वेळेला काँग्रेस ने बाजी तर मारलीच पण शिबू सोरेंच्या मागे हार प्रकारचा ससेमिरा लावला. काँग्रेसी मुळे खणण्यासाठी खरोखर कठोर नर-सिंह माणूस हवा होता आणि किमान भशानबाजीवरून तरी मोदी तसे माणूस वाटत होते पण सत्य परिस्तितीत मोदी सुद्धा वाघाचे कातडे पांघरलेले गाढव वाटते. त्यामुळे अपेक्षा कमी करून किमान काँग्रेसला सत्ते पासून ते दूर ठेवतील इतके जरी साध्य केले तरी देश आणि हिंदू जनतेचे भले होईल. गुळमुळीत धोरण म्हणजे काय ? उदाहरण म्हणजे राम माधव. हा संधीसाधू माणूस संघाचा प्रवक्ता होता. भाजप सत्तेत आल्यावर ह्याने सरकार मध्ये बदली करून घेतली. नंतर इंडिया फौंडेशन नावाचा तथाकथित विचारगट (थिंक टँक) काढला आणि स्वतःला मध्यस्त म्हणून काश्मीर, नागालॅन्ड इत्यादी भागांत नाक खुपसायला सुरवात केली. इंडिया फौंडेशनचे पैसे वापरून गोव्यांत वगैरे पार्टी ठेवायच्या शोभा डे पासून इतर सर्व हिंदू विरोधी लोकांबरोबर मैत्री ठेवायची त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन वगैरे करून स्वतःला जणू काही थोर विचारवंत असल्या प्रमाणे मिरवायचे असे प्रकार सुरु केले. अर्थांत सरकार ह्यांचे असल्याने इंडिया फौंडेशन ला बक्कळ पैसे मिळतो पण आउटपुट शून्य. उलट आपल्या फेस्टिवल मध्ये चिदंबरम, कुठला तरी बिशप , एक वॉन्टेड इस्लामिक प्रचार असल्या लोकांना बोलावून शोभा करून घ्यायची. श्री एलस्ट ह्या बेल्जियन इंडोलॉजिस्ट ला बोलावले. त्याची मुलाखत घ्यायला सदानंद धुमे ह्या विदेशी पत्रकाराला सांगितले. सदानंद धुमे दररोज भाजप वाल्यांची धुतो, त्याला इथे बोलावयाचे कामाचं नव्हते पण असो. तर धुमे ह्यांनी एलस्ट ला त्याचे इस्लाम विषयी मत विचारले. एलस्ट ह्यांनी भीड भाड ना ठेवता इस्लाम हा अतिशय मागासलेला धर्म असून मुस्लिम लॉग ह्या मागासलेल्या विचारांचे शिकार झाले आहेत आणि घरवापसी करून ह्या लोकांना पुन्हा आपल्या जुन्या धर्मात आणणे भारताच्या हिताचे आहे असे सांगितले. भाजपच्या फेस्टिवल मध्ये, गोव्यांत भाजपचे सरकार असताना हे विचार ऐकून राम माधव ह्यांची बोबडी वळाली. एलस्ट ह्यांना काढता पाय तर घ्यावा लागलाच पण त्याच वेळी पुढील कुठल्याही थिंक फेस्टिवल मध्ये त्यांना बोलावले गेले नाही. त्याच समारंभांत एका संघ वाल्याने बिशप ला विचारले "एखादा हिंदू माणूस चांगल्या पद्धतीने आयुष्य घालवत असेल तर ख्रिस्ती धर्माप्रमाणे त्याला स्वर्ग मिळेल का ? " तर त्या विदेशी बिशपने स्पष्ट शब्दांत "हिंदू लोक जो पर्यात जीजस ला आपला प्रेषित मानून त्याला शरण जात नाहीत तो पर्यांत ते नर्कांत जातील असे सांगितले" तरी सुद्धा दार वर्षी राम माधव कुणा बिशप ला असल्या थिंक फेस्टिवल मध्ये बोलावतात. काश्मीर मध्ये सत्तेच्या धुंदीत रॅम माधव ह्यांनी हिंदूंच्या हिताचा बाली दिला आहे. भाजप साठी वर्षोनु वर्षे काम केले कित्येक कार्यकर्ते आणि काश्मीर पंडित माधव च्या नावाने ट्विटर वर बोंबलत आहेत. जम्मू खोरे इस्लाम बहुसंख्य करण्यात माधव ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. रोहिंग्यांना काश्मीर मध्ये सेटल करण्याचा चाणक्य बुद्धी त्यांचीच. आता रमजान मध्ये शस्त्रसंधी सुद्धा राम माधव ह्यांचाच विचार आहे. थोडक्यांत फक्त सत्ता मिळवण्यासाठी राम माधव ह्यांनी मुफ्ती पुढे लोटांगण घातले. जम्मू खोऱ्यातील हिंदू लोकांच्या अगदी मामुली डिमांड्स सुद्धा मुफ्ती ह्यांनी मान्य केल्या नाहीत. बिप्लब देव ह्या मूर्ख माणसाला त्रिपुरांत मुख्यमंत्री करण्यात सुद्धा ह्यांचा मोठा सहभाग. मे ११ ला हा माणूस सांगतो "जिहादी लोकांनी आधी रमजान म्हणून शस्त्र संधी करावी. शत्रूचा बिमोड करणे हे सैन्याचे प्रथम कर्तव्य आहे. " https://t.co/5sKhXaEXxo मे २० उजाडताच PM has shown his respect for sentiments of the common people in Kashmir, thereby asking security forces to cease operations. आता अचानक सोन्याचे प्रथम कर्तव्य वगैरेला कसली तिलांजली लावली ? अश्या प्रकारे आपल्याच घराला आग लावून झाल्या नंतर आपण जणू काही हेन्री किसींगर असल्या प्रमाणे राम माधव FBI चीफ कोमी, हिलरी क्लिंटन, डॅनिअल बायमान, ट्रम्प आदी विषयांवर ट्विट करतो. माधव ह्यांचे अमेरिकेत भाषण होते. भाषणातील ठळक मुद्दे लिहिण्यासाठी मी पेन पेपर घेऊन बसले होते. हा माणूस अक्षरशः तास भर बरळला पण त्या एक तासांत मी एक सुद्धा मुद्दा लिहू शकले नाही कारण मुलांत नोंद घेण्यासारखा मुद्दाच नव्हता. इकडच्या तिकडच्या श्री श्री किंवा जग्गी वासूदेणाच्या प्रवचनाप्रमाणे निरर्थक analogy आणि आपणच किती हुशार आहोत ह्याच्या वल्गना. मोदी सारख्या तळागाळांतून आलेल्या माणसाला असल्या गुळमुळीत लोकांची संगत का बरे आवडावी आणि राम माधव सारख्या माणसाला नारळ का देण्यात येत नाही हे आश्चर्य आहे. टीप : राम माधव ह्यांनी ह्या काळांत बरीच माया जमवली आहे असे ऐकू आले. त्यांच्या इंडिया फौंडेशन च्या देणग्या सुमारे ३० पटीने वाढल्या आहेत.

टवाळ कार्टा 05/06/2018 - 10:06
कोणी काही म्हणो....पाकड्यांच्या बाबतीत जशास तसे उत्तर खुलेआम देणे आणि जगात भारताची पत वाढवणे हे काम भरभरून झालेले आहे....यासाठी काही गोष्टींकडे नक्की कानाडोळा करू शकतो

हा 'बाहेर' असलेला पैसा सुटकेस/ट्रंकांमध्ये भरून स्वीस बँकांमध्ये ठेवलेला असतो हा (गैर)समज आता दूर झाला असावा असे वाटले होते. तो पैसा आणणार म्हणजे कसा आणणार? राजकारणी/उद्योगपतींच्या लोकांच्या नावावर स्वीस खाते नसणार. ते वेगळ्या लोकंच्या नावावर असते. मग त्यांच्या खात्यातला पैश्यावर भारत सरकार हक्क सांगणार, तो पैसा येथे आणणार आणी लोकांना देणार?

गामा पैलवान 05/06/2018 - 17:26
पुंबा,
सळो कि पळो म्हणजे कुठल्याही संबंधांचा, राजकिय अपरिहार्यतेचा मुलाहिजा न राखता भ्रश्ट नेत्यांना बेड्या ठोकतील अशी अपेक्षा होती. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, धेंडं, कृपाशंकर, हुडा, गेहलोत, वीरभद्रसिंग, मुलायम, मायावती, काण व्यवसायातील रेडी बंधू प्रभृती(स्वपक्षीय असतील तरी मोदी त्यांना दाद देणार नाहीत असे वाटत असे) वगैरे बड्या धेंडांच्या मागे हे सरकार लागेल, त्यांची कृष्णकृत्ये खणून काढेल असे प्रामाणीकपणे वाटत होते. दिल्लीत अनेक भ्रष्ट लॉब्या कित्येक दशकांपासून सत्तेच्या वर्तुळाभोवती वेटोळे घालून बसल्या आहेत त्यांना मोदी जेरबंद करतील असे वाटले होते. राज्यात तसेच केंद्रात भ्रष्ट अधिकार्‍यांची दलालीची संस्थाने निर्माण झाली होती ती खालसा होतील असा सामान्यांचा कयास होता
या स्तरावरचं कार्य करायला शिवाजीस ३३ वर्षं संघर्ष करावा लागला. तेव्हा कुठे दक्षिण दिग्विजय साकारला. थेट मदुराईपर्यंत स्वराज्य पोहोचलं. दिसायला भल्यामोठ्या कर्नाटकप्रांतीचा ३ वर्षांचा दिग्विजय दिसतो, पण त्यामागे पराकोटीचे कष्ट आहेत. यशाच्या समीकरणात ते पण बघायला हवेत ना? मोदींच्या बाबतीत थोडी घाई होतेयसं नाही वाटंत ? भव्य जनादेश (=मँडेट) कुचकामी आहे. तो फक्त पाच वर्षांनी कामास येतो. तोही टिकवून ठेवला तरंच. मोदी ही जादूची कांडी नव्हे. आज आयेयेस वगैरे उच्चाधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेत मूलभूत बदल होताहेत. आजवर उत्तीर्ण उमेदवाराचा केवळ गुणक्रमांक पाहून आयेयेस, आयपीएस, आयेफेस, आयारेस, वगैरे सेवा मिळंत असे. मात्र मोदींच्या सुधारणेनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम केल्यावर नंतरच यथोचित सेवा प्राप्त होणार आहे. मग जुना नियम बदलायचा कोणी? प्रशासनसेवा लोकाभिमुख करायच्या कोणी? मोदींनी? मग प्रशासकीय अधिकारी काय फक्त झोपाच काढीत बसणार का? मोदींनी भ्रष्टाचारी नेत्यांना सळो की पळो करून टाकायला पाहिजे. मग तुम्हीआम्ही काय करणार? असा तो प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

३३ वर्षे ठीक आहे... पण मोदींची ३३ वर्षे आपण २०१४ पासून मोजत आहात का ? शिवाजी महाराजांची १६७४ पासून मोजलीत का ?

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 05/06/2018 - 21:34
म.क., शिवाजी जन्मजात राजा नव्हता. इतकं तर तुम्हांस माहिती असेलंच. या माहितीच्या आधारे तुम्हीच ठरवा केव्हापासनं मोजायची ३३ वर्षं ते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी ही तेच म्हणतोय. जर शिवाजी राजांची कारकीर्द वयाच्या सोळाव्या वर्षी चाली झाली असं मानलं तर मोदीची कारकीर्द काही २०१४ ला चालू झालेली नाही ना ? मग मोदीला चार वर्षे मिळाली असे म्हणण्यात काय अर्थ आहे.

In reply to by गामा पैलवान

चिगो 08/06/2018 - 16:07
आजवर उत्तीर्ण उमेदवाराचा केवळ गुणक्रमांक पाहून आयेयेस, आयपीएस, आयेफेस, आयारेस, वगैरे सेवा मिळंत असे. मात्र मोदींच्या सुधारणेनंतर या उमेदवारांना प्रत्यक्ष लोकांत जाऊन काम केल्यावर नंतरच यथोचित सेवा प्राप्त होणार आहे.
जरा संदर्भ देता का ह्या माहितीचा? सवाल नोकरीचा आहे, म्हणुन विचारलं.

In reply to by गामा पैलवान

चिगो 20/06/2018 - 12:44
सरकारच्या नितींबद्दल अभिप्राय देतांना सरकारी नोकरावर जी बंधनं असतात, त्यांच्यामुळे फार काही बोलत नाही. पण जर खरोखरीच हा निर्णय अंमलात आला, तर पारदर्शी आणि Merit-based recruitment/ selection जो सद्यस्थितीतील नागरी सेवा परीक्षांचा पाया आहे, त्याचे प्रचंड खच्चीकरण करणारा असेल. ह्या विषयावर इंतरनेटवर भरपूर चर्चा-चर्वण उपलब्ध आहे. ह्या लिंकमधेपण बघू शकता. काही गोष्टी ज्या राजनितीपासून दूर असायला हव्यात, त्यात नागरी अधिकारी प्रकर्षाने असावेत, असे माझे मत आहे. मी जरी सरकारसाठी काम करत असलो तरी मी नेत्यांसाठी काम करत नाही. सरकार आणि पार्टी ह्यातील फरक सगळ्याच पार्ट्यांना, त्यांच्या पदाधिकार्‍यांना आणि समर्थकांना कळालाच पाहीजे, else we are moving towards the Spoils system, which is not the best thing to have in such such a diverse nation as India. बाकी चालू द्या..

चौकटराजा 05/06/2018 - 17:51
१. भारत देश हा सन्घराज्य ( संघाचे राज्य नव्हे ! नाहीतर..... ) प्रकारचा देश आहे. यात प्रधानमम्त्री हा आपण नागरिक समजतो तेवढा तो सामर्थ्यवान पदावर बसलेला मानव नव्हे . २.सबब सर्व यश वा अपयश याचा धनी ना प्रधान मंत्री , ना मुख्यमंत्री , ना राज्यपाल . ३. राजकीय पदाच्या या मर्यादा माहित असून , भारताची प्रसासनं व्यवस्था सडलेली आहे हे माहित असून मोदी यानी अतिरेकी आशावाद निर्माण करण्याचा गुन्हा केला आहे ... तरीही इतर प्रधान मन्त्र्यापेक्षा त्यांच्याकडे निर्णय क्षमता व भाषा चातुर्य व लोकांची भाषा बोलण्याचे कसब असल्याने त्याना २०१९ मध्ये पुरते निश्प्रभ करणे कठिण आहे .

सुबोध खरे 05/06/2018 - 18:40
अतिरेकी आशावाद निर्माण करण्याचा गुन्हा केला आहे लोक चमत्कारालाच नमस्कार करतात हे त्रिकाल अबाधित सत्य आहे. हा आशावाद निर्माण केला नसता तर भाजपचे सरकार आलेच नसते हि पण वस्तुस्थिती.

लोकांना स्वतः काहीही करायचे नसते

( नोटबंदी नंतर किती लोक प्रामाणिकपणे कर भरू लागले आणि किती लोक कायद्याच्या बडग्यामुळे कर भरू लागले हा अभ्यास-कुणी केला तर-- सुरस आणि चमत्कृती पूर्ण असेल)

पण आपल्यासाठी बलिदान देणारा हुतात्मा मात्र हवा असतो.

असा हुतात्मा जो स्वतः साठी काहीच मागत नाही आणि ज्याला आगा पिच्छा काहीच नाही तो श्री मोदींच्या रूपाने मिळाला. तेंव्हा आता मी काहीच करणार नाही जे काही करायचे ते

"श्री मोदींनीच"

केले पाहिजे. अन्यथा मोदी काय करतात? फेकू आहेत. त्यांना पोकळ बांबूचे फटके मारायला पाहिजेत अशा क्षुद्र तर्हेच्या टीका लोक सहजा सहजी करताना आढळतात. तोंडाला येतील अशी वक्तव्ये याच धाग्यावर दिसत आहेत. कायद्याची किंवा प्रक्रियेची कोणतीही माहिती किंवा ज्ञान नसताना मुक्ताफळे उधळायचे फक्त येते आम्हाला.

पटापट लोकांना बेड्या ठोकायच्या? कशा ठोकायच्या हो?

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असलेल्या २ जी घोटाळ्यातील( जेथे सकृतदर्शनी स्पष्ट पुरावा आहे) आरोपी सुद्धा जामिनावर बाहेर आहेत तर जेथे सरकारला "फक्त माहिती" आहे अशा केसेस मध्ये कसे काय पटापट बेड्या ठोकणार हो. नट चुडामणी "श्री संजय दत्त" यांच्या कडे "१९९३" मध्ये ए के ५६ हि रायफल सापडली इतका स्पष्ट आणि सबळ पुरावा असूनही आणि टाडा कायदा लावूनही त्यांना शेवटी २१ वर्षांनी २०१४ मध्ये तुरुंगवास झाला. ते बाहेर २०१६ मध्ये आले आणि आता त्यांच्या सत चरित्रावर सिनेमा हि निघाला. तो भरपूर चालेलही. अशी आमची सदगुणी जनता. आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ मोदींसारखा निस्वार्थी नेता असावा अशी आमची लायकीच नाही हेच खरं. काय बोलायचं?

In reply to by सुबोध खरे

विशुमित 05/06/2018 - 19:20
बाकी सगळे ठीक आहे पण निस्वार्थी वगैरे जरा जास्तच वाटले. लोकांची लायकी काढणं हे तर आणखी अतीच. सं.मं. कृपया खरे ना थोडी समज द्या.

In reply to by विशुमित

ट्रेड मार्क 05/06/2018 - 20:18
समज कशाला कारवाईच करायला सांगा. असे कसे मोदींच्या बाजूने बोलतात? मोदी कसे निस्वार्थी असतील? एवढे सतत परदेशात मजा मारायला जातात, एकटे एवढ्या मोठ्या आलिशान निवासात राहतात, आलिशान गाड्यांमधून हिंडतात, मग कसले निस्वार्थी? साधी निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासनं पण पाळत नाहीत. प्रत्येकी १५ लाख देण्याचं वचन दिलं होतं, आमच्या घरात ६ लोक असल्याने ९० लाख मिळणार म्हणून मी एक घर घेऊन टाकलं. पैसे तर नाहीच मिळाले वर नोटबंदी आणि रेरा सारखा कायदा करून घराच्या किमती कमी करून टाकल्या. किती नुकसान झालं माझं म्हणून सांगू. अजून कुठल्यातरी अडाणी माणसाला माझ्याच घरातला आहे असं सांगून जास्तीचे १५ लाख मिळवून कोट्याधीश व्हायचं स्वप्न होतं माझं, तर यांनी आधार सक्तीची घोषणा करून टाकली. अश्या कितीतरी स्वप्नांचा चुराडा करून टाकला या माणसाने आणि म्हणे निस्वार्थी! स्वस्ताई आणू म्हणून म्हणाले होते, पण पेट्रोलचे भाव बघा. इथे आठवड्यातून एकदा चांगल्या हॉटेलमध्ये सहकुटुंब जाणं, दोन आठवड्यातून एकदा मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा आणि विकांताला मित्रांबरोबर पार्टी या सगळ्याला गाडी घेऊन जाणं परवडेनासे झाले आहे. पेट्रोलवर एवढा कर लावून सगळे पैसे स्वतःच्या खिश्यात भरत आहेत. जागतिक बाजारात पेट्रोलच्या किमती वाढल्या म्हणून काय झालं? सबसिडी का देत नाहीत? दुसरीकडे म्हणे भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. आमच्या दारावर भाजी घेऊन येणारा भाजीवाला अजूनही चढ्या भावानेच भाजी विकतोय. त्याला का नाही हे सरकार नियंत्रणात आणत? वर "अशी आमची लायकीच नाही हेच खरं" असं लोकांना उद्देशून म्हणतात? कसं बरं सहन करावं आम्ही?

In reply to by manguu@mail.com

ट्रेड मार्क 05/06/2018 - 21:57
बरं, तुम्ही म्हणताय तर घरांच्या किमती कमी नाही झाल्या. मग अगदी वृत्तपत्रांनी अशी बातमी दिली असेल तरीही. बातमीत सांगितलेल्या उर्वरित दोन गोष्टी मुद्दाम लिहिल्या नव्हत्या कारण मग चर्चेची दिशा बदलून जाते. उगाच तुमच्या भावना दुखवायला नको, नाहीतर कारवाई व्हायची. आणि हो तुम्हाला वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या असतील तर माफ करा बरंका.

In reply to by ट्रेड मार्क

manguu@mail.com 05/06/2018 - 22:10
विविध वेबसाईटॉवर घरांच्या किमतीचे ग्राफ असतात, ते कुठेही फार मोठा फॉल दाखवत नाहीत. अमुक एक फ्लॅट पूर्वी 10 लाखाला होता , आता 9 लाख आहे , असे कुठे असेल तर सांगा दिल्लीतील किमती 6 वर्ष ढासळत आहेत , असे त्या बातमीतच आहे.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 05/06/2018 - 20:50
लोकांची लायकी काढणं कुठे हो आणि कुणाची लायकी काढली? समज द्या कि पण व्यवस्थित, चूक काय आहे ते दाखवून. हे उगाच "त्याने मला मारलं" म्हणून रडारड करून काय फायदा? माझी चूक असेल तर मी क्षमा मागायला अजिबात लाजत नाही किंवा "इगो" सुद्धा होत नाही. जाता जाता-- ते तुम्हाला काय काय "सगळं ठीक" वाटतंय ते पण सांगा.

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 05/06/2018 - 20:06
हुतात्मे , त्यागी समाजाचे कल्याणच करतात आणि भोगी लोक समाजाला बर्बाद करत असतात , या टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला.

In reply to by manguu@mail.com

ट्रेड मार्क 05/06/2018 - 22:05
स्वस्त्री कशाला सोडायची? थरूर, दिग्विजय सिंग ईई चा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होता. बादवे, जमलं तर मोदींनी घेतलेले कुठले निर्णय देशविरोधी होते/ आहेत याची यादी कारणमीमांसेसहीत द्या. ही अगदी सरळ साधी मागणी आहे, उगाच झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसू नये.

In reply to by ट्रेड मार्क

बाकी ते राजकारण सोडुन सोडा हो , आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयी ! ;) #पिकल्या_पानाचा_देठ_कि_हो_हिरवा अवांतरः वरील प्रतिसाद उपरोधिक नाही .

In reply to by प्रसाद गोडबोले

ट्रेड मार्क 05/06/2018 - 22:32
आपल्याला दिग्विजय सिंगांविषयी ह्या बाबतीत आदर आहे , अन त्यां पेक्षा जास्त एन. डी. तिवारीं विषयी मला वाटतं यात व्यक्तीपेक्षा पैसा आणि पॉवर याचा संबंध जास्त असावा. अर्थात व्यक्तीही स्त्रीलंपट असावी लागतेच. पण आजकालच्या जगात हे भूषणावह मानलं जातं, हेही खरं आहे. अजून मुसळी पॉवर, वायग्रा किंवा तत्सम कंपन्या या लोकांना ब्रँड ऍम्बॅसॅडर म्हणून कसे नेमत नाहीत? गमतीची गोष्ट अशी की अगदी फोटोसहीत बातम्या आल्या तरी भोळ्याभाबड्या जनमानसावर वाईट परिणाम होईल किंवा आपले राजकारणी कुठला आदर्श ठेवत आहेत यावर पुरोगामी जनता चकार शब्द काढत नाही. अतिअवांतरः वर राजकारणी असा शब्द आला असला तरी हा प्रतिसाद राजकारणाशी संबंधित नाही.

In reply to by ट्रेड मार्क

manguu@mail.com 06/06/2018 - 12:38
स्वस्त्री सोडली , परस्त्री भोगली , 1 की 2 , ह्याचा अन कर्तृत्वाचा शून्य संबंध असतो. उदा . महान भारतरत्न गायक , ह्यांचे 2 विवाह झाले होते , ते व्यसनही करायचे म्हणे , पण गायकीत त्यांची जागा कुणालाही घेता आली नाही त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 06/06/2018 - 12:44
हायला स्वस्त्रीबद्दल उल्लेख पहिल्यांदा कुणी केला आणि तेच आता उलट बोलत आहेत. आपण xx खायचं आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायचं बढिया है

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 06/06/2018 - 13:05
हुतात्मा , आगापिछा नसलेला इ उल्लेख तुम्हीच आधी केलेत ना ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 06/06/2018 - 13:19
हो पण मी एकदा एक बोलायचं आणि मग थोड्यावेळाने "ह्याच्या चरचा करू नयेत" असे घुमजाव करत नाही

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 06/06/2018 - 13:28
हुतात्मे , त्यागी समाजाचे कल्याणच करतात आणि भोगी लोक समाजाला बर्बाद करत असतात , या टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला. मुळात माझा प्रतिसाद तुम्हाला नव्हताच तो होता चौरा साहेबांस तुम्ही उगाच

"मध्ये तोंड"

घातलंय. त्यात

टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद

अशा तर्हेची अनावश्यक टिप्पणी यानंतर "मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले" हे बोलणे तुम्हीच काढले आणि यानंतर त्यामुळे उठसुठ मोदींनी बायको सोडली व काँग्रेसवाळ्यानी 2 केल्या , परदेशी लफडे होते , ह्याच्या चरचा करू नयेत हा तुमचाच प्रतिसाद आहे. मागे पण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला लिहिले होते कि या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली तरी ती आपल्याच बोटावर राहते पण तुम्ही काही सुधारायचे नाव घेत नाही. असो. जाता जाता --

यालाच

मी पिचक्या टाकणे म्हणतो. त्यावर लोकांना ऑब्जेक्शन आहे बढिया है

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 06/06/2018 - 00:38
आपले नेता कोण तर सलमान खान संजय दत्त इ संजय दत्तला निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आणि सलमान खानने मोदीजींबरोबर पतंग उडवल्यानंतर त्याच्या केसाचेही निकाल बाइज्जत बरी आले ! तुमचे काँग्रेस पुराण चालू द्या !

सुबोध खरे 05/06/2018 - 20:45
मोदी हा विषय बाजूला ठेवून मी काय प्रतिसाद दिलाय तो पहा. कायद्याची प्रक्रिया कशी असते हे किती लोकांना माहिती आहे. "पटापट बेड्या ठोकायच्या" तर हुकूमशाहीच आणावी लागेल. सध्या कोणालाही अटक केली तर त्याला मूलभूत कायद्या अंतर्गत २४ तासात न्यायालयात उभे करावे लागते. (आणीबाणी किंवा युद्ध घोषित केले असेल तरच हा मूलभूत कायदा लागू होत नाही.) त्यात सकृतदर्शनी सबळ पुरावा असेल आणि गुन्हा अजामीनपात्र असेल तरच न्यायालयीन कोठडी मिळते. दुर्दैवाने आर्थिक गुन्हे या सदरात मोडत नाहीत. त्यातून समजा एखादा आरोपी विदेशात पळून जाणार असेल तर त्याचा पासपोर्ट जमा करायला सांगतात. जामीन मिळाल्यानंतर विवक्षित कालावधीत आरोपपत्र दाखल करावे लागते अन्यथा टाइम बार झाल्याने खटला मोडीत निघतो. केवळ अमली पदार्थ आणि दहशतवाद यासारखे गुन्हे असतील तर जामीन मिळत नाही. हि कायद्याची प्रक्रिया माहिती नसल्याने बहुसंख्य सामान्य लोक चुकीचे आरोप करतात आणि काही लोकांना आपलेच म्हणणे खरे करायचे असल्याने प्रक्रिया माहिती असली तरी त्याबद्दल न बोलता केवळ टीका करायची म्हणून आरोप करत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपली कायदा अंमल बजावणी यंत्रणा अनुत्पादक कामात लावण्यात काय अर्थ आहे? केवळ विरोधकांना त्रास देण्यापेक्षा हीच प्रणालि सबळ पुरावा असलेल्या केसेस चा पाठपुरावा करण्यासाठी वापरली तर त्याचा राष्ट्राला फायदा होईल. याला व्यवस्थापकीय भाषेत optimization of resources म्हणतात. मूळ सरकारी यंत्रणा स्वतःच इतकी भ्रष्टाचाराने पोखरली आहे कि तिला कामाला लावून काम करून घेणे हेच किती कठीण आहे. श्री मल्ल्या याना अटक होणार आहे हि "आतील बातमी" त्यांच्यापर्यंत पोहोचली कशी याचे उत्तर तुम्हाला सापडले तर समजून येईल. अर्थात हे समजून घ्यायची इच्छा असेल तरच. अन्यथा आमच्या काळ्या गाईला पांढरे वासरू झाले आहे तर मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे इ इ शिमगा चालू द्या.

डँबिस००७ 05/06/2018 - 20:59
आता ४८ महीन्यात केलेल्या कामाचा लेखा जोखा हे सरकार द्यायला लागलय ! अश्याने पुढे येऊ घातलेल्या खिचडी सरकारवर संकट ओढावलय ! दहा वर्षे राज्य करुन जनतेला काही सांगण्यासाठी नसलेल्या त्या पक्षाला जनतेपुढे तोंड ऊघडता येणार नाही !! मा श्री मोदीजींचा जनाधार दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे येणार्या १० वर्षांत इतर कोणाचाही पर्याय जनतेला नकोय !! आता येणार्या काळात कॉंग्रेस च्या भ्रष्टतम नेत्यांची रवानगी जेल मध्येच करावी व जनतेला मुक्त करायवे !

In reply to by डँबिस००७

सुबोध खरे 05/06/2018 - 21:14
आता येणार्या काळात कॉंग्रेस च्या भ्रष्टतम नेत्यांची रवानगी जेल मध्येच करावी व जनतेला मुक्त करायवे ! साहेब, इतकं सोपं असतं तर लालूप्रसाद २३ वर्षानि आणि संजय दत्त २१ वर्षांनी तुरुंगात का गेले असते? सरकारला प्रथम त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात खटला दाखल करावा लागेल मग क्रमाक्रमाने खटले उभे राहतील आणि त्याचा निकाल लागेल. यात सुद्धा खालचे कोर्ट वरचे कोर्ट उच्च आणि मग सर्वोच्च न्यायालय असे होऊन शेवटी निकाल लागेल. या गोष्टी दोन चार वर्षात होत नाहीत हि न्यायालयाची शोकांतिका आहे. अंती सत्याचा विजय होतो पण तेवढ्या कालावधीत सत्याचा अंत होऊ नये असेच वाटते इतका न्यायालयीन विलंब आहे सध्या.

In reply to by सुबोध खरे

डँबिस००७ 05/06/2018 - 21:41
खरे सा. , २३ वर्षांनी जेल मध्ये जाणार्या लालु प्रसाद यांना हा कोर्टाचा निर्णय सुद्धा त्यांच्या विरुद्ध सरकारची साजिश अस वाटतय अस त्यांनी जाहीर रित्या सांगितलय !

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 05/06/2018 - 21:41
वाजपेयींच्या काळात संसदेत स्फोट झाला. शिक्षा 10-12 वर्षानी काँग्रेस काळात झाली. दरवेळी लालूचेच उदाहरण का हो ? तुमचे उदाहरण द्या की

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 05/06/2018 - 22:24
मोगा खान आपल्याला कायद्याचं ज्ञान नाही हे आपण परत परत सिद्ध का करून देताय? वर म्हटल्याप्रमाणे दहशतवाद आणि अमली पदार्थ याचे कायदे वेगळे आहेत त्यांची न्यायालये वेगळी आहेत. हे गुन्हे जामीन पात्र नाहीत. आर्थिक गुन्हे असे नाहीत. केवळ विरोधासाठी पचकायची सवय सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 05/06/2018 - 22:26
देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा सर्वात गहन आणि गंभीर असा गुन्हा मानला जातो म्हणू न त्याची श8कशा ही जन्मठेप किंवा मरेपर्यंत फाशी अशी आहे. आर्थिक गुन्हा हा तसा नाही हेही समजून घ्या.

डँबिस००७ 05/06/2018 - 21:29
### मोदीनी स्वस्त्री सोडली. घर सोडले, हुतात्मा झाले वगैरे आता बाजूला ठेवा. त्यान्चे निर्णय व देशाचे हित फक्त यावरच बोला. ------ मा. श्री मोदीजींचे सर्व निर्णय व देश हिताचेच होते व आहेत !! --- टिपिकल हिन्दु विचारपद्धतीतुन जन्मलेला प्रतिसाद. ## हिंदु लोक, हिन्दु विचारपद्धतीतुनच प्रतिसाद देतात ! हिंदु असुन सुद्धा मोगलाई विचार बाळगणारे तुमच्यासारखे कमीच !!

In reply to by manguu@mail.com

डँबिस००७ 06/06/2018 - 01:00
अय्या खर की काय ?? मग त्या मोगलांनी वेगळ्या देशाची पक्षी पाकिस्तानची मागणी का म्हणुन केली म्हणे ? ते स्वतःला हिंदु सोडाच तर अरबी मीर कासिमचे वंसजच समजतात !!

In reply to by डँबिस००७

manguu@mail.com 06/06/2018 - 01:04
पाकिस्तान मागणारे मोघल होते का ? शेवटचा मोघल बादशहा बहाद्दूरशहा , त्याचे 1857 च्या देशभक्त यादीत नाव आहे. जिनांचे आजोबा हिंदू की पारशी काहीतरी होते ना ? उगाच पाकिस्तानासाठीही मोघलांना मध्ये का आणताय ?

In reply to by manguu@mail.com

ट्रेड मार्क 06/06/2018 - 01:00
विषय "हिंदू" लोक, विचारपद्धतीचा चाललाय आणि तुम्ही प्रतिसाद देताना हिंदुस्तानी करून टाकलं. बादवे, तुमच्या बाबराच्या वंशजांना "आम्ही हिंदुस्थानी आहोत" असं जाहीरपणे म्हणायला सांगा, बघू किती जण तयार होतात.

चर्चेचा विषय होता- ते पंधरा लाख" आणी ती चर्चा फ्लॅटच्या किंमती , संजय दत्त-जीना असा प्रवास करीत मोघलांपर्यंत आली.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाखु 06/06/2018 - 11:47
प्रतिसाद पायरी-पायरीने आणि विषय जिना -जिन्याने (दरमजली) उतरत जातात हेच या धाग्यांच मर्मफलित आहे. अखिल मिपा "झोपलात काय,जागे व्हा"या नियमित वाचक संघाचे रोचक निरीक्षण .

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चर्चेचा विषय पुन्हा मूळपदावर आणल्या बद्दल धन्यवाद . पण मजा आली . लालू ,ममता ,मायावती व गतिमंद पप्पू , केजरीवाल च्या विचाराने प्रेरीत झालेले लोक या प्रगतशील भारतात भरपूर आहेत हे पाहून आश्चर्य वाटले . बापजादे चें आयुष्य काबाडकष्ट करण्यात , दारिद्रीपणात गेले व आपण स्वतः स्ट्रुगल करून पायावर उभे राहण्यात हयात घालवली तरी यांचे काँग्रेस प्रेम काही कमी होत नाही आणि मोदींच्या गेल्या चार वर्षातील कामगिरी ला गवताच्या ढिगाऱ्यातून सुई सारखे शोधत बसणाऱ्या माणसांना माझा दंडवत .

In reply to by पिलीयन रायडर

ट्रेड मार्क 06/06/2018 - 21:44
संपादक मंडळाच्या नोटिशीनंतर गुरुजी आणि अरुण जोशींसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी मिपासन्यास घेतल्याने ताज्या घडामोडी एकदम शिळ्या झाल्या आहेत. महत्वाच्या निवडणूका पुढच्या १०-११ महिन्यात लाईन लावून आहेत आणि गॅरी ट्रुमन, अरुण जोशी, गुरुजी यासारखे सदस्य गायबलेत. निवडणुकात काही मजा येणार नाही असं दिसतंय.

डँबिस००७ 06/06/2018 - 22:49
ते १५ लाख सोडाच आता ५ कोटी कमवायची संधी ह्या सरकारने आम जनतेला उपल ब्ध करुन दिलेली आहे. २०१४ नंतर देशात खास करुन मिपावर सुद्धा रु १५ लाख सरकार कधी देणार म्हणुन वाटेवर डोळे लावुन बसलेल्या काही फुकट्या लोकांनासाठी तर ही सुवर्ण संधीच चालुन आलेली आहे. १५ लाख नाही तर तब्बल ५ कोटी मिळणार !! पण एक आहे की हे ५ कोटी मिळवण्यासाठी , त्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध पुरावे सरकारला द्यायला लागणार !! बुड हलवल्याशिवाय घबाड मिळणार नाही !! I-T Dept's new scheme: Inform govt about tax evasion, get rewards up to Rs 5 crore !! त्या निमित्याने मोदी सरकारचा हा आणखी एक "मास्टर स्ट्रोक" अस म्हणायला हरकत नाही !! काँग्रेसच्या नेत्यांचे धाबे दणाणुन जाणार, त्यांचेच चेले चपेटे आता धनदांडग्या विरुद्ध पुरावे सरकारला देणार, सरकारचा खजिना आता परत भरणार !! सरकार जनतेच्या कल्याणासाठी त्यापुढे अंबरनाथ, कर्जत , कसार्यापर्यंत जायला तयार आहे फक्त जनतेची साथ हवी आहे.

एकाच व्यक्तीविरुध्द अनेक जणांनी पुरावे दिल्यास पैशाचे वाटप कसे करणार? काही म्हणा पण कल्पना मस्त आहे, आता काय खबऱ्यांच पीकच येणार देशात. ज्या यंत्रणेचे हे काम आहे ते मस्त टेबलावर पाय ठेवून झोपा काढणार.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क 07/06/2018 - 00:35
इतका महत्वाचा प्रश्न कसा काय कोणाच्याच लक्षात आला नाही? बघा हे लोक नुसताच ढोल बडवत बसलेत, काही कामाचे नाहीत. यंत्रणेचं ठीक आहे हो त्यांच्या कामात काही बदल नाही, पण मोदींचं काय? त्यांनी नको का अश्या प्रश्नांचा विचार करायला?

In reply to by मार्मिक गोडसे

नाखु 07/06/2018 - 09:26
मोगा अनुदान, शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय? अर्थात मोदीविरोध हा आणि हाच एककलमी कार्यक्रम असेल तर काहीच विधायक दिसणार नाही शिक्कामोर्तब झालेला नाखु बिनसुपारीवाला

In reply to by नाखु

शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय? मागील सरकारने असे प्रकार टाळण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता,परंतू सुप्रीम कोर्टाने त्याविरोधी निकाल दिला होता. आता तर आधार शिवाय पानही हलत नाही.

In reply to by नाखु

पुंबा 07/06/2018 - 12:24
शिष्यवृत्ती आधीच्या सरकारात होती फक्त ती ज्याच्यी त्याला खरोखरच मिळेलच याची शाश्वती नव्हती थेट बँक खात्यात जमा करून काही खाबुगिरीला अटकाव केला आहे हे तुम्ही मान्य कराल काय?
तुम्ही चूक आहात नाखु. ही स्किम २०१३ पासूनच सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व शिष्यवृत्ती डिबीटी मध्ये आणल्या जात होत्या. २०१४ पासून ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली हे मात्र खरे.
Central Sector Scheme of Scholarship for College and University Students The Scheme is in operational since 2008. The objective of the scheme is to provide financial assistance to the meritorious students having family income of less than Rs.6 lakh per annum, to meet a part of their day-to-day expenses while pursuing higher studies. Annual target is 82000 scholarships per year (41000 for boys and 41000 for girls) which has been divided amongst the State Education Boards based on the State’s population in the age group of 18-25 years. Students who are above 80th percentile of successful candidates in the relevant stream from a particular Board of Examination in class XII and pursuing regular course and not availing benefit of any other scholarships, are eligible to apply under this Scheme. The rate of scholarship is Rs. 10,000/- per annum for the first three years and Rs. 20,000/- per annum for the fourth and fifth year. The Central Sector Scheme of Scholarship for College and University Students is covered under the Direct Benefit Transfer (DBT) w.e.f. 1.1.2013 wherein the scholarship is being disbursed directly into the bank account of the beneficiaries.
वरील माहिती विद्यापिठस्तरावरील शिष्यवृत्तीसंदर्भातील.

उत्तम योजना आहे आय.कर खात्याची. एकाच व्यक्तीविरुध्द अनेक जणांनी पुरावे दिल्यास पैशाचे वाटप कसे करणार? हे ईतके सोपे नसणार रे मार्मिका. नुसती वॉट्स-अ‍ॅपी /फेसबूकी कुजबुज चालणार नाही.
giving actionable information on evasion of tax on assets in India.
घोडे येथे अडणार आहे असे ह्यांचे मत. उदाहरण द्यायचे तर दाउद ईब्राहिम- त्याची मोठ्या प्रमाणावर मुंबईत संपत्ती आहे. ती कोठे आहे हे संबधित सरकारला, अधिकार्याना,स्थानिकांना ठाऊक असते. दाउदने किंवा त्याच्या लोकांनी कधी जास्त आवाज केला किंवा हप्ता दिला नाही तर मग धाड टाकली जाते व नंतर प्रकरण मिटवले जाते. संबंधित अधिकार्यानी तशी माहिती देऊन सरकारला मदत करावी हा उद्देश आहे त्या योजनेमागचा. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/give-i-t-tip-off-on-black-money-get-up-to-rs-5-crore-reward/articleshow/64421729.cms

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

संबंधित अधिकार्यानी तशी माहिती देऊन सरकारला मदत करावी हा उद्देश आहे त्या योजनेमागचा. अच्छा! म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असे पुरावे देऊ शकत नसल्याने तीला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असंच ना? एका अर्थी यंत्रणा हलविण्यासाठी सरकारमान्य लाच देण्याचा प्रकार म्हणता येईल.

In reply to by मार्मिक गोडसे

मार्मिका, अरे पण मूळ उद्देश सफल होण्याची शक्यता नाही का? शिवाय मिळालेल्या रकमेवर कर असणारच ना? बेनामी काळ्या व्यवहारांना अशा प्रकारे आळा बसण्यास मदत झाली तर स्वागतच आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 07/06/2018 - 12:40
त्याला प्रोत्साहन भत्ता/ वेतन म्हटले जाते / जात असे. हि गोष्ट आजची नसून किमान ३० वर्षे तरी चालू आहे. तटरक्षक दलास(त्यावेळेस ते गृह खात्या अंतर्गत होते) पकडल्या गेलेल्या सोने चांदी इ मालाच्या किमतीच्या १० % किंमत प्रोत्साहन धन (INCENTIVE MONEY) दिला जात असे. १९९० च्या आसपास सोनेचांदी तस्करीतील माल (CONSIGNMENT) मोठ्या प्रमाणावर पकडला जात असे. कारण तस्करांशी साटेलोटे करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांना पकडून दिल्याने मिळणारे पैसे कमी असले तरीही अधिकृत होते म्हणून तटरक्षक दलातील अधिकारी मोठ्या उत्साहाने अशा मोहिमेत भाग घेत असत. हे मी स्वतः नौदलात असल्याने पाहिलेले आहे.(दुर्दैवाने नौदल अधिकाऱ्यांनी असा माल पकडला तरी त्यांना त्यातील एक दमडी मिळत नसे.) रेल्वेच्या निवृत्त तिकीट तपासनीसांना असेच १० % देऊन फुकट्या लोकांना पकडण्यासाठी अधिकृत रित्या नियुक्त केले जात असे. आता आहे कि नाही ते माहित नाही. याला तुम्ही लाच म्हणा किंवा काही म्हणा.

डँबिस००७ 07/06/2018 - 12:30
एका अर्थी यंत्रणा हलविण्यासाठी सरकारमान्य लाच देण्याचा प्रकार म्हणता येईल. होय बरोबर आहे तुमच, भाजपाच सरकार म्हणजे सरकारमान्य लाच अन्यथा कॉ़ग्रेस सरकारने केली असती तर त्याच वर्णन "सरकारी यंत्रणेला आपल्या कामाला उद्युक्त करण्यासाठी केलेली एक उत्तम योजना " असेच ना ?

In reply to by डँबिस००७

भाजपाच सरकार म्हणजे सरकारमान्य लाच अन्यथा कॉ़ग्रेस सरकारने केली असती तर त्याच वर्णन "सरकारी यंत्रणेला आपल्या कामाला उद्युक्त करण्यासाठी केलेली एक उत्तम योजना " असेच ना ? असं मी कुठल्याच पक्षाच्या सरकार बद्दल म्हटलं नाही. पैसे दिल्याशिवाय यंत्रणा हलत नाही हे सरकारने मान्य केलं आहे , मागील सरकारनेही हेच केलं होते आणि हे सरकारही त्याच मार्गाने जात आहे. नवीन काहीही केलं नाही, काहीतरी नवीन केल्याचं फक्त ढोल बडवतय हे सरकार आणि त्याचे भक्त.

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित 07/06/2018 - 13:03
काहीतरी नवीन घडवण्यासाठी भविष्याबद्दलची दूरदृष्टी लागते. इकडे उलटच घडतंय. ६० ते हजारो वर्षे मागे मागेच चालले आहेत. इग्नोर..

In reply to by मार्मिक गोडसे

डँबिस००७ 07/06/2018 - 14:27
अय्या खर की काय ? मागील सरकारनेही हेच केलं होते तरीच राजा आणी कन्नीमोळ्ळी भक्कम पुराव्या आभावी सुटले !! पुरावे नीट गोळा केले असते तर, कोर्टात केस भक्कम रीत्या उभी करता आली असती !! आता चिदंबरंम कुटुंबा विरुद्ध कसे पुरावे गोळा केलेले आहेत !!

In reply to by मार्मिक गोडसे

डँबिस००७ 07/06/2018 - 14:29
अय्या खर की काय ? मागील सरकारनेही हेच केलं होते तरीच राजा आणी कन्नीमोळ्ळी भक्कम पुराव्या आभावी सुटले !! पुरावे नीट गोळा केले असते तर, कोर्टात केस भक्कम रीत्या उभी करता आली असती !! आता चिदंबरंम कुटुंबा विरुद्ध कसे पुरावे गोळा केलेले आहेत !!

अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती आणि तंत्रज्ञान ई. प्रगती फक्त २०१४ नंतरच झाले. ह्यापूर्वी दळणवळण मागासलेले होते. कबुतरे पत्र पोचवायचे, बैलगाडी हे प्रवासाचे एकमेव साधन होते.मारुती गाडी रामाने भक्तांवर खूष होऊन आकाशातून टाकली वगैरे वगैरे. अगोदरचे सरकार आंधळे होते. आताच्या सरकारची दृष्टी तर खोबणीतून बाहेर लटकत आहे. चालू द्या आरती ओवळणे.

In reply to by डँबिस००७

सुबोध खरे 07/06/2018 - 18:22
पण ते तर स्वतः ला तुर्क (तुर्कमेनिस्तानातील) म्हणवत. आईने अकबरीत आणि आलमगीरनाम्यात तसाच उल्लेख आहे. अकबर आणि आलमगीर यांचा आत्मा ( कि देह) थडग्यात तोबा तोबा म्हणून विव्हळत असेल मोगा खानचा शोध पाहून.

In reply to by सुबोध खरे

manguu@mail.com 07/06/2018 - 18:33
जन्माने ते हिंदुस्थानी ना ? त्यामुळे ते हिंदुस्थानीच . मी उद्यापासून स्वतःला मंगळावरचा समजेन , होणार आहे का लगेच तसे ?

डँबिस००७ 07/06/2018 - 15:11
अवकाश संशोधन, उपग्रह, माहिती आणि तंत्रज्ञान ई. प्रगती LOL !! ऐक स्पेसेक्स नावाची खासगी कंपनी गेल्या काही वर्षात पुढे आली व तीने ईज्रोला मागे टाकलेल आहे !! त्यामुळे ईज्रोला हव तस स्वातंत्र्य पाठबळ नव्हत हेच सिद्ध होत ! पुर्वीच्या सरकारचा ईज्रोला भक्कम पाठींबा असता तर ईज्रो आताच्या स्थानापेक्षा फार पुढे गेली असती !! देशातल्या प्रत्येक खात्याचा विभागाचा वैज्ञानिक संस्थांचा गैरवापर पुर्वीच्या सरकारांनी केलेला आहे !! भारत त्याचीच दुष्परीणाम आज भोगत आहे !!

In reply to by डँबिस००७

ऐक स्पेसेक्स नावाची खासगी कंपनी गेल्या काही वर्षात पुढे आली व तीने ईज्रोला मागे टाकलेल आहे !! कशाच्या बाबतीत मागे टाकलंय? माहित नाही म्हणून विचारतोय. तसंही मागील सरकारने अवकाश संशोधन हे आर्यभट ते insat सारखे गणपती तयार करण्याकरिता वापरले हे मान्यच करावे लागेल. आता बहुतेक तेथे राममंदिराच्या वीटा बनवत असतील, सरकारने स्वातंत्र्य आणि पाठींबा दिला असेलच.

२०१४ ला बहुमत मिळाले काय आणि चार वर्ष नुसताच फळा पुसायचे काम केले, तेही पूर्ण पुसायची हिम्मत झाली नाही. पुसट शब्द पुन्हा गिरवून ठळक करायचे ,असे एखादे वाक्य ठळक गिरवून झाले की नवनिर्मितीचा ढोल पिटायचा. बाकी फेकुगीरी मध्ये नाविन्य आणले हे मान्यच करावे लागेल. त्याचे श्रेय ह्या सरकारला द्यावेच लागेल.

पुर्विच्या सरकारांनी काहीच केलं नाही, ती अगदीच टाकावू होती आणि आताचे सरकार खूप जास्त कार्यक्षम आहे. जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. अखेर एक मतदार म्हणून मला जे दिसते त्यानुसारच मी माझे मत ठरवणार... मी शहरात राहतो, माझ्याकडे पुर्वीपासून गॅस आहे तर मी उज्वला योजनेकरिता भाजपचा गौरव करत त्याला २०१९ मध्ये मतदान करणार नाही. मी जे पेट्रोल/ डिजेल विकत घेतो त्याच्या किमतीचा विचार करेन. मी क्वचित ट्रेनने फिरलो तर त्या अनुभवाचा (पुरेशा ट्रेन असणे, आरक्षण मिळणे, गाडी वेळेवर धावणे) विचार करेन (कारण रेल्वे केंद्राच्या अखत्यारीत आहे), आयकर कमी झाला का याचा विचार करेन, GST मुळे मी ज्या वस्तू सहसा विकत घेतो त्या स्वस्त झाल्यात की महाग याचाही विचार करेन. कामगार कायदे वा तत्सम कोणत्या कायद्यांमुळे माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित झाली का त्याचा विचार करेन. किंवा केंद्राच्या कोणत्या धोरणामुळे मला अधिक संधी प्राप्त झाल्या का त्याचा विचार करेन. राष्ट्रीय महामर्ग अधिक चांगले, सुरक्षित व स्वस्त (कमी टोल) झालेत का याचा विचार करेन. मोदी १५-१६ तास काम करतात म्हणे.. करत असतील कदाचित .. तो त्यांचा प्रश्न आहे. त्याकरिता केवळ मी त्यांना /भाजपाला मत देवू शकत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

डँबिस००७ 07/06/2018 - 15:56
माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित जो करेल त्यालाच द्या तुमच मत !! तुमची नोकरीची शाश्वती फक्त सरकारवर आहे ? तुमचा परफॉर्मंस वाईट असला तर ? कंपनीकडे पुरेश्या अॉर्डर्स नसतील तर ? सरकास कोणाचही असो अश्या वेळेला नोकरी जाणारच !

In reply to by डँबिस००७

माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित जो करेल त्यालाच द्या तुमच मत
असं मी म्हंटलेल तुम्हाला का दिसलं ? कोणतेच सरकार माझ्या नोकरीची १००% हमी देणार नाही हे मान्यच. पण योग्य कायदे करुन कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वेसण नक्कीच घालू शकते.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 07/06/2018 - 18:43
@मराठी कथालेखक मला जे दिसते त्यानुसारच मी माझे मत ठरवणार... मी शहरात राहतो, माझ्याकडे पुर्वीपासून गॅस आहे तर मी उज्वला योजनेकरिता भाजपचा गौरव करत त्याला २०१९ मध्ये मतदान करणार नाही.

PM Modi’s signature Ujjwala Yojana praised in WHO report: All you need to know

http://indianexpress.com/article/what-is/what-is-the-ujjwala-scheme-pradhan-mantri-ujjwala-yojana-5159570-5159570/ https://www.economist.com/international/2018/04/05/household-smoke-may-be-the-worlds-deadliest-environmental-hazard http://www.thehindu.com/sci-tech/health/when-kitchen-smoke-can-kill/article19897927.ece https://sites.ndtv.com/breathe-clean/smoke-from-chulahs-biggest-killer-in-rural-india असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता. तोही पाहून घ्या जर फरक इतका जास्त आहे तर मग तो आपसूकच दिसायला हवा. टीव्ही , रेडिओवरुन इतकी जास्त जाहिरात का करावी लागते. आपण सुशिक्षित आहात. स्वयंपाकाच्या धुराचे दुष्परिणाम याबद्दल आपली माहिती किती आहे हे मला माहित नाही परंतु वरील दोन दुवे जे भाजप चे मुखपत्र नसलेल्या वृत्तपत्रांचे आहेत शिवाय जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते आहे हेही दिलेले आहे. जाहिरात अशासाठी द्यायला लागते कि ज्या घरात उज्ज्वल योजना पोचवायची आहे तेथे निर्णय घेणाऱ्या व्यक्तीत या स्त्रिया नसून पुरुष आहेत. आपल्या बायकोचे आरोग्य धोक्यात आहे हे त्यांच्या गळी उतरवता आले तरच ते या योजनेला मान्यता देतील. निम्न स्तरातील किती पुरुष घरात बायको गरोदर आहे हे माहित असूनही घराच्या आत सिगरेट आणि विड्या ओढताना दिसतात ते लक्षात घेतले तर जन जागृती का करावी लागते हे दिसून येईल. अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे. पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले का ? मोदींनी नक्की काय केले?

In reply to by सुबोध खरे

उज्वला योजनाअ अपयशी झाली वगैरे असं काही मी म्हणत नाही. ती यशस्वी असेलही...त्या योजनेचा ज्यांना लाभ झाला असेल ते भाजपला मतदान करतील. मी मला ज्या गोष्टींचा लाभ झाला (असल्यास) त्या गोष्टींकरिता मतदान करेन.
असाच एक दुवा "शहरातील किडलेली जनता" (यात आपण पण येताय) या युयुत्सूनच्या धाग्यावर मी दिला होता
सुबोध खरे , आपल्या व्यासंगाबद्दल मला आपल्याबद्दल आदर आहे. पण तुम्ही इतरांना 'किडलेली जनता' म्हणू शकत नाही.
अर्थात उज्ज्वल योजनेत "माझा काय फायदा" असे विचारणारे लोक आहेतच. राष्ट्र गेले खड्यात तर जाऊ दे.
उज्वला योजना सरकारने राबवू नये असे माझे म्हणणे नाही. इतरांचा फायदा होवू नये असेही मला म्हणायचे नाही. पण त्याच वेळी माझा काहीच फायदा होत नसेल, माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाही इतकेच फक्त मी स्पष्ट केले.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 07/06/2018 - 19:30
हायला युयुत्सु नि खालील धाग्यात म्हटले आहे कि

अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर महानगरे "किडकी प्रजा" निर्माण करत आहेत...

https://www.misalpav.com/node/42260 यावर मी जोरदार प्रतिवाद केला आहे आणि तुम्ही मला उलटे बोलताय? एकदा हा धागा पूर्ण वाचून घ्या. त्यात मी चुलीच्या धुराने काय होते याचा हि दुवा दिला आहे तो हि एकदा वाचून घ्या https://timesofindia.indiatimes.com/india/chulhas-linked-to-25-of-pollut... अधिक काय लिहिणे

In reply to by सुबोध खरे

युयुत्सुच्या धाग्याचे इथे काय प्रयोजन ते कळले नाहि.. चुलीच्या धुराची लिंक उघडत नाही... पण चुलीच्या धूराने आरोग्यास त्रास होतो हे मान्य.. उज्वला योजनेची निकड आणि योजनेचे यश हे ही मान्य करतो. माझा मुद्दा इतकाच आहे की ज्याला ज्या योजनेचा फायदा झाला तो त्या योजनेचे गुणगान करणार. इथे मी मला कोणत्या योजनेचा /निर्णयाचा फायदा झाला का ह्याचा शोध घेतो आहे. नाही म्हणता नोटाबंदीचा सुरवातीला काहीसा त्रास झाला तरी नंतर काही फाय्दा झाला आणि होतो आहे (केशबॅक योजना, डिजिटल पेमेंट वाढल्याने अप्रत्यक्ष अर्थिक लाभ ई )...

In reply to by मराठी कथालेखक

मराठी कथालेखक , तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक केल्यानंतर एखाद्या चौकात सकाळी 6 वाजल्यापासून सिलेंडर वाल्या गाडी ची वाट पाहणारी जनता कधी बघितली का हो ? आता का बरं गॅस एजन्सी व चौकात ती दृश्य दिसत नाहीत ? सिलेंडर चा काळाबाजार बंद करण्यात यश आल्या मूळेच गोरगरिबांच्या आवाक्यात गॅस आता आला आहे . त्या गरिबांचा विचार करा ,कायम स्वकेंद्रित विचार नका करू .

In reply to by सोमनाथ खांदवे

तीन वर्षांपूर्वी सिलेंडर बुक केल्यानंतर एखाद्या चौकात सकाळी 6 वाजल्यापासून सिलेंडर वाल्या गाडी ची वाट पाहणारी जनता कधी बघितली का हो ?
नाही बघितली... तुम्ही म्हणता तशी कधी कुठे परिस्थिती नसेलच असं मी म्हणत नाही. पण माझ्या घरी अनेक वर्षापासून घरपोच सिलिंडर येतो आहे
त्या गरिबांचा विचार करा ,कायम स्वकेंद्रित विचार नका करू .
पुन्हा तेच.. मी त्यांचा विचार करायचा ? आणि माझा विचार नाही करायाचा ? मग माझा विचार कुणी करायचा ? मी या देशाचा हिस्सा नाही का ? स्वतःचा विचार करणं म्हणजे पाप आहे का ? मी काही दुसर्‍या कुणाचं ओरबाडून मला द्या असं तर म्हणत नाहीये.. दुसर्‍या एका प्रतिसादात मी म्हंटलय की अर्थिक फायदा मिळण्यातच मला रस आहे असे नाही. मी चांगली नोकरी करुन पैसा कमावतो आहेच. पण माझ्या इतर काही साध्या अपेक्षा आहेत त्या पुर्ण होताना किंवा त्या बाबतीत विशेष सुधारणा होताना दिसत नाहीये.

डँबिस००७ 07/06/2018 - 15:50
मराठी लेखक : माझी आय टीतली नोकरी अधिक सुरक्षित झाली का त्याचा विचार करेन ?? ईतका स्वकेंद्री विचार ? तुमच्या घरात असेल हो गॅस सिलिंडर !! पण त्याच शहरात लाखो गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत होता !! कोण घ्यायचे असा गॅस सिलिंडर ? हॉटेलवाले , गाडीला LPG Cylinder लावुन लोक खुशाल चालवायचे !! मग त्या वर आळा नको बसवायला ? का मला गॅस सिलिंडर मिळतो मग माझा प्रश्न सुटलाय ? आता आधार कार्ड लिंक झाल्यावर गेले ना असे सबसिडीवर घेणारे गॅस सिलिंडरचे ग्राहक !! देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!

In reply to by डँबिस००७

?? ईतका स्वकेंद्री विचार ?
का नाही ? स्वतःचा विचार करुन मतदान करण्यात गैर ते काय ?
देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
मान्य.. पण पुर्ण देश सुखी झालाय का , सगळ्या देशाचं भलं झालंय का याचा हिशेब मी कसा मांडत बसणार ? प्रत्येकजण स्वतःचा विचार करेल आणि मत देईल. ज्यांचं भलं झालंय , जे सरकारवर खूष आहेत असे लोक जास्त असतील तर येईल हेच सरकार पुन्हा सत्तेवर नाहीतर नाही येणार.. जर खरंच अनेक लोकांच जीवनमान उंचावलं असेल तर जाहिरात करायची गरज नाही आणि जर तसं ते झालं नसेल तर जाहिराती करुन फायदा नाही.. साधा-सरळ तर्क..

In reply to by मराठी कथालेखक

डँबिस००७ 07/06/2018 - 16:31
पण पुर्ण देश सुखी झालाय का , सगळ्या देशाचं भलं झालंय का याचा हिशेब मी कसा मांडत बसणार ? हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !! जाहीरात का करावी लागते ? कारण ईतक्या मोठ्या देशातल्या नागरीकांना काही तरी आशा असेल की देशातल्या एका भागात समाजाच्या ऐका घटकाच जिवनमान उंचावलय !! उद्या माझ सुद्धा होईल !! आशेवरच जिवन आहे !! उगाच नाही सरकारवर पिंक टाकणारे १५ लाखच्या आशेला सोडायला तयार नाहीत !!

In reply to by डँबिस००७

हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !!
नका दाखवू.. राहिलं. .पण मग उगाच 'आपण कसे त्यांच्यापेक्षा भारी' ह्याचा डंका नका ना पिटू.. त्यांनी विशेष काही केलं नाही.. आणि आम्हीही केलं नाही म्हणत गप्प रहावं..

In reply to by डँबिस००७

हे गेल्या 70 वर्षात झाल नाही पण श्री मोदीजींनी मात्र ५ वर्षांत करुन दाखवाव ?? व्वा !! आयत्या पिठावर एकही रेघोटी न मारता कोणती कामे ह्या सरकारनी केली ?

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे 07/06/2018 - 20:12
आयत्या पिठावर एकही रेघोटी न मारता कोणती कामे ह्या सरकारनी केली ? गोडसे बुवा जर कोणताही पूर्वग्रह न ठेवता खालील दुवे वाचून पाहिलेत तर पुढे जाता येईल . अन्यथा तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहेत आणि मी माझ्या जागी असे म्हणून मी पूर्ण विराम देतो आहे. दिलेले दुवे हे डावीकडे झुकणाऱ्या वृत्तपत्रांचे आहेत. भाजप/ रास्व संघाची मुखपत्रे नाहीत हेही लक्षात घ्या. https://timesofindia.indiatimes.com/india/centre-passes-bills-to-repeal-245-obsolete-laws/articleshow/62285343.cms http://www.thehindu.com/news/national/ujjwala-yojana-to-benefit-eight-crore-women-now/article22682181.ece https://www.thehindubusinessline.com/economy/policy/modi-govts-ujjwala-scheme-leaves-women-healthier-happier/article9685035.ece https://www.financialexpress.com/money/good-news-jan-dhan-account-holders-can-enjoy-this-major-benefit-at-sbi-other-banks-here-are-details/945257/

In reply to by डँबिस००७

देश स्वत:पेक्षा फार फार मोठा आहे !!
short & sweet - देश मोठा असला तरी मी माझं (छोटंस म्हणू हवं तर) मत मशिनवर नोंदवणार .. पुर्ण देशाचं मत नाही.

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 07/06/2018 - 18:22
म.क., तुमचा आगम (अॅप्रोच) अगदी योग्य आहे. कुणाला मत द्यायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग मोदींनी जाहिरात केली तर तो देखील (वा भाजपचा) वैयक्तिक निर्णय झाला ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मग मोदींनी जाहिरात केली तर तो देखील (वा भाजपचा) वैयक्तिक निर्णय झाला ना?
अगदी अगदी...मी कुठे लगेच न्यायालयात धाव घेतलीय.. फक्त आश्चर्य व्यक्त केलंय हो..चालेल ना ? बाकी जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच होत असेल , सरकारी खजिन्यातून नाही अशी आशा करतो.

In reply to by मराठी कथालेखक

सुबोध खरे 07/06/2018 - 18:46
जाहिरातचा खर्च पक्ष निधीतूनच होत असेल वर मी दिलेले दुवे वाचले तर हा खर्च भाजप ने करायचा का सरकारने हे लक्षात येईल.

In reply to by मराठी कथालेखक

गामा पैलवान 08/06/2018 - 01:55
म.क., जरूर आश्चर्य व्यक्त करा. वैयक्तिक निर्णय घ्यायचं तुम्हाला जसं स्वातंत्र्य आहे अगदी तस्संच वैयक्तिक स्वातंत्र्य मोदींनाही आहे. इतकी सरळ गोष्ट तुमच्या ध्यानी कशी नाही आली? त्यामुळे तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही मोदीद्वेष्टे आहात यावर शिक्कामोर्तब होतं. म्हणजे, मी जरी असं विधान केलं नाही तरी लोकं तसाच तिरपागडा अर्थ काढतात. अशाने मोदींचे मतदार वाढतात. तेव्हा हा मुद्दा लक्षात घेऊन मग खुशाल आश्चर्य व्यक्त करा, ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अशाने मोदींचे मतदार वाढतात
काही दिवसांपूर्वी ते कुमार केतकर(राज्यसभा कॉन्ग्रेस खासदार) टी.व्हीवर बोलत होते. सरकारी धोरणांवर टिका करण्यापेक्षा अर्धा वेळ त्यानी मोदींवर व्यक्तिगत टिका करण्यात घालवला. एकेकाळचे ते लोकसत्ता/म.टा.चे संपादक पण बोलणे अगदीच प्रचारकी थाटतले. खरे तर सुरेश प्रभू,नितिन गडकरी,धर्मेण्द्र प्रधान असे खूप काम करणारे मंत्री आहेत..ज्यानी आपापल्या खात्यांमध्ये बदल घडवूनही आणला आहे. मराठी कथालेखका, अरे , मोदी सरकारची धोरणे,योजना ह्या मुख्यत्वे गरीब वर्गासाठी बनवल्या आहेत, राबवल्या जात आहेत. तेव्हा प्रत्येक योजनेचा फायदा हा प्रत्येक नागरिकास मिळेलच असे नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नाखु 08/06/2018 - 12:50
माझ्या कोथींबीर च्या चार काड्यांची किंमत कमी झाली तरच मी महागाई कमी झाली असं समजत असेल तर!!! चांगल्या कामाची प्रशंसा करण्याची नसते एखाद्या ला सवय, किंवा चांगलं बघायचं नसेल तर उपयोग काय? उघडा डोळे बघा (आनंदाने) निट नाखु हो तोच शिक्का बसलेला

In reply to by नाखु

manguu@mail.com 08/06/2018 - 13:03
जो तो स्वतः:चेच पहात असतो. काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले , पण मंदिर बांधले नाही ना ? मग काँग्रेस ब्लॅक लिस्टमध्ये सगळे असेच करत असतात . त्यात काय चुकीचेही नाही.

In reply to by manguu@mail.com

डँबिस००७ 08/06/2018 - 18:38
काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले LOL पहील AIMS साल १९५६ दिल्लीला त्पानंतर ५ AIMS ऐकाच २०१२ सालात लोकांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी !! पण भाजप सरकारने २०१६ सालात दोन AIMS निर्माण केले !! ईंग्रजांनी १९४७ पर्यंत ९४००० किमीची रेल्वे लाईन टाकली त्यांच्या स्वतःच्या ब्रिटीश सरकारच्या पैश्यावर !! पण कॉंग्रेसने १९४७ नंतर ६५ वर्षांत फक्त ११००० किमी रेल्वे लाईन टाकली ? २०१४ पुर्वी महामार्ग बनवण्याचा वेग होता २ ते ३ किमी/दिवस आणी आता २० किमी/दिवस .

In reply to by डँबिस००७

manguu@mail.com 08/06/2018 - 19:02
इंग्रजानी आधीच रेल्वे निर्माण केली होती , ती मोडून पुन्हा नव्याने सुरू करायला हवी होती ? एम्स म्हणजे दिल्लीचे एम्स वाजपेयींनी कुठल्या एम्स काढल्या म्हणे ?

In reply to by manguu@mail.com

सुबोध खरे 08/06/2018 - 19:40
अगोदरच्या काळात म्हणजे ७० वर्षात १५००० किमी रेल्वे मार्ग बांधले गेले. २०१४ पासून त्याला जास्त वेग आला हि वस्तुस्थिती आहे. परंतू सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेल्वे बजेटच काढून टाकले आणि ते मुख्य अर्थ संकल्पात जोडून घेतले. यामुळे आता रेल्वे मंत्री पद हे फारसे प्रतिष्ठेचे राहिलेले नाही. यामुळे स्वतःच्या मतदार संघाचंच काम करायचे आणि बाकी रेल्वेला उन्हात उभे करायचे हे वर्षानुवर्षे लहान पक्षांनी चालवलेले धोरण आता रद्दबातल झाले आहे. लालू प्रसाद यांनी आपल्या मतदार संघ मधेपुरा येथे रेल्वे इंजिनांचा कारखाना आणला मग त्याचा मुख्य रेळे मार्गाशी संपर्क नसला तरी चालेल. ए बी एघनी खान चौधरी यांनी दिल्ली कलकत्त्यापासून पासून आपल्या मालदा मतदारसंघापर्यंत नव्या गाड्या चालू केल्या मग त्यात प्रवासी असोत कि नसोत. ममता बॅनर्जी यांनी असाच सवता सुभा राबवला. या प्रकरणात रेल्वेची भाडेवाढ १५ वर्षात झालीच नाही. भारतीय रेल्वे जगात सर्वात स्वस्त आहे फक्त ३६ पैसे एका किमीला. रिक्षा एक किमी ला १० रुपये घेते. एस टी बस रुपये साडे सहा घेते तर शिवनेरी १५ रुपये किमी ला. यामुळे रेल्वे सतत तोट्यात चालत आहे. मग हा तोटा भरून काढायला मालवाहतुकीवर भाडे वाढवले. त्यामुळे माल रस्त्यावरून जायला लागला आणि रेल्वे परत तोट्यातच राहिली. २०१६ मध्ये श्री सुरेश प्रभू यांनी राजधानी शताब्दी सारख्या आरामदायी गाडयांची भाडेवाढ केली त्यावर विरोधी पक्षानी केवढा गदारोळ केला होता याची आठवण झाली.https://www.firstpost.com/politics/railway-passenger-fare-hike-why-the-public-outcry-against-suresh-prabhu-is-overreaction-2997112.html त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले यानंतर परत रेल्वे भाडेवाढ करून राजकीय हाराकिरी करण्याची तसदी पुढच्या मंत्र्यांनी घेतली नाही आणि श्री जेटलींनी ते मंत्रिमंडळ शक्तिहीन करून टाकले यामुळे आता रेलवे ला हळू हळू भाडेवाढ करून तोट्यात चालणारी रेल्वे फायद्यात आणण्याचं मार्ग चालू तर केला आहे. परंतु पुढच्या निवडणूक वर्षात हि भाडेवाढ करणे भाजपाला परवडणार नाही असेच दृश्य आहे.

In reply to by सुबोध खरे

विशुमित 08/06/2018 - 19:48
त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले>>> ==>> अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! === पण प्रभूंनी लोकांच्या लक्ष्यात राहील असे काम चालू केले होते, पण जनता आपली कमनशिबी आहे ना ! काय करणार.

In reply to by विशुमित

सुबोध खरे 08/06/2018 - 20:26
अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! जालावर खोदकाम केले असता फक्त "श्री राज ठाकरे" तसं म्हणताना आढळले आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे. http://www.dnaindia.com/mumbai/report-live-updates-raj-thackeray-mns-mumbai-elphinstone-stampede-railways-protest-march-metro-cinema-to-churchgate-police-permission-2550640 परंतु बाकीचे बरेचसे दुवे श्री सुरेश प्रभू बुलेट ट्रेनचे समर्थनच करताना दिसतात. मुळात जर ते बुलेट ट्रेनला विरोध करत असते तर या शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या या गुणी नेत्याला शोधून त्याला इतके महत्त्वाचे खाते देण्याचे वर त्याला आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवायचे मोदी याना काहि कारण असावे असे वाटत नाही. त्यांना वाणिज्य आणि उद्योग हे दुसरे महत्त्वाचे खाते दिले गेले आहे कारण रेल्वे मंत्रालयाचे महत्त्व कमी करायचा बेत ठरला असावा. https://www.ndtv.com/india-news/is-there-deliberate-misinformation-on-bullet-trains-asks-suresh-prabhu-1400064

In reply to by नाखु

ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित आहे त्या मी बघणार.. सामान्य नैसर्गिक तत्व आहे हे.. मोदींनी कोणत्या खेड्यात कुठे वीज आणली असेल. पण त्या खेडेगावात ना मी राहतो ना माझा कुणी नाते वाईक तर त्याबद्दल मी कशाला कौतूक करु. थोडक्यात काय तर प्रत्येकच वर्गासाठी काहीतरी करायला पाहिजे ना.. सब का साथ सब का विकास असं बोलले होते ना मोदी. शहरी मध्यम/उच्च मध्यम वर्गाकरिता काही केलेलं दिसत नाहीये.. आयकर कमी केला असता तरी काहीतरी केलं असं म्हंटलं असतं. असो. अजून एक वर्ष आहे. या वर्गाकरिता काही करता येतं का ते बघावं मोदी सरकारने..

In reply to by मराठी कथालेखक

गब्रिएल 08/06/2018 - 20:30
भले शाबास ! मंग गावाकड्च्या लोकांन्नी त्येंच्यापुरत बगून मतदान क्येलं (त्येंची संक्या जास्त है बर्का ;) ) आनि तुमच्यासारक्या शहरात्ल्या लोकांला बांदावर बशिवलं तर मंग बोंबा मारू नका बर्का. :) आशी शिकलीसवर्ली मान्सं त्येला काय म्हंतात त्ये "वैयक्तिक स्वार्थ" समोर ठ्येवून त्ये आपलं "कॉमन गुड" इसराया लागली की देश्याचे चांगभलं व्हनारंच बगा... कारन याच गोष्टीचा राजकारनी फाय्दा घेत्यात नव्हं. ह्ये आपलं आपलं अडानी मत. तुमी म्होटी लोकं ज्यास्त शानी असताल. आता म्हारास्ट्रात बी मतं जमवाय्ला तामीलनाडू वानी शेरातल्या परत्येकाला येक येक कलर टीवी, मिस्कर, साडी, धोतर... नव्हं, नव्हं... जीनची पँट देयाला पायज्ये, नाय्का ?!

In reply to by मराठी कथालेखक

खरे आहे ! म्हणूनच म्हणतात की लोकशाहीत, "यथा प्रजा तथा राजा" असे असते. स्वार्थी लोक स्थार्थी नेता निवडून देतात... किंबहुना स्वार्थी लोकांची नाडी ओळखून नेता स्वार्थी निवडून येतो व "आवळा देऊन कोहळा काढणे" ही म्हण सार्थ करतो. अश्या परिस्थितीत, "आम्ही निवडून दिलेल्या नेत्यानं आमचं भलं करण्या ऐवजी स्वतःचंच भलं केलं" ही बोंब मारायचा हक्क लोकांना कसा असेल ? !
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे.

"कॅश-लेस" आणि "लेस-कॅश" मधिल संभ्रम : खरोखरचा की बनवलेला ???

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित 08/12/2016 - 15:19
या जगात, सर्वच लोकांना सर्वकाळ समाधानी ठेवणे, कोणालाच शक्य नसते. म्हणजे काही लोकांनाच काही काळ समाधानी ठेवता येऊ शकतं. आणि त्यांच्या समाधानातच समस्त लोकांचे समाधान अवलंबून असते.

In reply to by नितिन थत्ते

हे भारीच ! असा कोणताही संभ्रम कोणाच्याही मनात नाही. हे तर त्याहून भारी!

वरुण मोहिते 08/12/2016 - 14:38
कॅशलेस करणार तर २००० च्या नोटा का आणल्या??? कमीत कमी किमतीच्या नोटा ठेवा . आधीच कॅशलेस च्या जाहिराती द्या . असे कित्येक उपाय . सगळ्या नोटा परत येत आहेत १००० २० ५०० ५० च्या . २००० च्या तर आलेल्या आहेत . मग कॅशलेस कस आहे ???

In reply to by वरुण मोहिते

१. रु२००० च्या नोटा तात्कालीक उपाय (महामार्ग बनवताना वापरलेले डायव्हर्शन) आहे याची मिपावर बरीच चर्चा झाली आहे, ती इतक्यात विसरलात ?! का या चर्चेत ते एक डायव्हर्शन परत वापरत आहात ?? :) २. "कॅश-लेस" आणि "लेस-कॅश"चे लेखातले विष्लेशण परत वाचलेत तर "नोटा अजून का आहेत?" याचे उत्तर मिळेल. सगळा लेखच त्यासाठी लिहिलेला आहे !!! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 14:53
लेस कॅशमध्ये मोठे व्यवहार कॅशलेस आणि लहान व्यवहार कॅशने असे असायला हवे. पण २००० च्या नोटा छापून त्यावर पाणी ओतले आहे. २००० च्या खालोखालची नोट १०० ची आहे वीसपट लहान. (पाचशेची नोट एक महिन्यानंतरसुद्धा मला अजून मिळालेली नाही).

In reply to by नितिन थत्ते

पण २००० च्या नोटा छापून त्यावर पाणी ओतले आहे. हे पाणी कसे ओतले गेले नाही यामागे प्रकल्पाचे विशेष व प्रकल्पांतील कन्स्ट्रेन्स कसे कारणीभूत आहेत हे समजावून घायचे असेल तर मिपावरचीच त्यासंबंधी झालेली चर्चा वाचून ते समजेल. इथे त्यांची पुनरुक्ती अस्थानी होईल. जुनेच चावून चोथा झालेले मुद्दे इथे उकरून चर्चा भरकवटली नाही तर बरे होईल. सहकार्यासाठी आगावू धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 16:23
त्या चर्चेचा बेस जी अर्थवांती होती त्या वांतीच्या उद्गात्यांनीसुद्धा हात वर केलेत म्हणे.

In reply to by नितिन थत्ते

lakhu risbud 09/01/2017 - 20:59
ओ थीतीन नत्ते चच्या तुमी म्हणताय म्हंजे अर्थवांती च शब्द योग्य असेल. भक्तमंडळी अर्थक्रांती वगैरे चुकीचे शब्दप्रयोग करत असावेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल या लेखात नोटाबंदी कारवाईचे "देशपातळीवरचा अतीगुप्ततेची जरूर असलेला प्रकल्प" या दृष्टीने विश्लेषण केले आहे. त्याच्यावरच्या चर्चेतही काही अधिक मुद्दे आले आहेत. बघा काही बोध होतो का ते. मात्र, ती धुणी, इथे नाही तिथेच धुतल्यास बरे होईल. काय म्हणता ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 16:53
त्या वेळी जे उद्देश सांगितले होते ते आता व्हॅलिड राहिलेले नाहीत. त्या ऐवजी त्यावेळी न संगितलेल्या उद्देशाचा नवा फंडा आला म्हणून नवी चर्चा.

In reply to by नितिन थत्ते

तुम्ही पहिल्यांदा "रु२००० ची नोट का काढली ?" हे विचारले होते, त्याचे उत्तर वरच्या दुव्यात आहे, तेव्हा तो दुवा नुसता बरोबर नाही तर एकदम चपखल आहे ! :) बाजू अंगावर आल्यावर आता तुम्ही दिशाबदल (उर्फ चेंज ऑफ गोलपोस्ट) करून बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहात, हे जाहीर करण्यास मला आनंद होत आहे =)) =)) =)) अंगावर येणारी चर्चा टाळण्यासाठी विरोधी पक्ष सद्या हेच (चेंज ऑफ गोलपोस्ट, हो) लोकसभेत करत आहे. मोठ्या लोकांचे अनुकरण करणे ही एक उत्तम गोष्ट असते यात वाद नाही. पण तसे करताना चुकीची उदाहरणे निवडू नयेत असे माझे मत आहे. अर्थात, इतरांना यापेक्षा वेगळे मत राखण्याचा हक्क भारतीय लोकशाहीत आहे यात वाद नाहीच ! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 11/01/2017 - 13:37
मी जर आर बी आय गव्हर्नर वा प्रधानमंत्री असतो तर ५०० ची नोट दाबून मीही २००० ची नोटच प्रथम काढली असती. त्यात माझे तर्कट असे-- ज्याला अजून प्रापतीकर खाते १९९९ सालच्या पातळीलाच काम करते आहे असे वाटते त्याला २००० च्या नोटेचे आनंद होणे साहजिकच आहे. तो प्रेफरेबली पैसा दोन हजार च्या रूपात साठवायला सुरूवात करेल. त्याला आशा हे की मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री होतील व पुन्हा पॉलिसी पॅरलिसीसचे राज्य येईल. व दोन हजाराची नोट चालू राहील. पण प्रधानमंत्री हा मुळातच अचानक हल्ला करणारा राजकारणी पण आहे व शास्ता ही. हे त्याला जर कळले असेल तर तो मुळातच २००० ची नोट बदली म्हणून स्वीकरणार नाही त्याचे १००० व ५०० कवडीमोल ठरतील. २००० ची नोट ही इकडे आड तिकडे विहिर निर्माण करणारी एक धूर्त चाल आहे असे मला तरी वाटते. ती अचानक कधीही एका संध्याकाळी रद्द होउ शकते. ती येत्या दोन वर्षात होणे व ना होणे हे प्राप्तीकर खात्याचे सॉफ्टवेअर किती "पोचलेले" आहे त्यावर अवलंबून असेल.

नितिन थत्ते 08/12/2016 - 14:49
येथे या कॅशलेस-लेसकॅश प्रकरणावर टीका करणारे पुष्कळसे लोक स्वतः वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक पेमेंट करतच आहेत. मी स्वतः १९९४ सालापासून क्रेडिट कार्ड वापरत आहे. सर्व युटिलिटी बिल पेमेंट्स ऑन लाइनच करत आहे. हे सर्व "सोय" म्हणून करत आहे. "सोय म्हणून" १ टक्का/२ टक्के भार सहन करणे या सोयीचा वापर करणार्‍याला मान्य असू शकेल. टीका चालू आहे ती १. सध्याच्या टंचाईवर उपाय करण्याऐवजी (आणि "प्रॉब्लेम आहे तो लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा" असे न म्हणता) बहुतांश छोट्या व्यवहारात कॅशमध्ये व्यवहार करण्याची इच्छा ठेवणे म्हणजेच भ्रष्टाचाराची इच्छा ठेवणे असे सांगितले जात आहे. संदर्भ : या धाग्यातील पिवळ्या हायलाइटमधील विधान २. असेही सूचित केले जात आहे की आता कॅश कमीच दिली जाणार आहे. संदर्भ: जेटलींचे सिक्स्टी इअर ओल्ड 'नॉर्मल' इज ब्रोकन अ‍ॅण्ड धिस इज न्यू नॉर्मल हे विधान. या दोन कारणांमुळे. पॉइंट इज : कॅश कमी वापरणे हे चांगले हे कुणीच अमान्य करीत नाही. पण ते सोय या स्वरूपात, फायदा या स्वरूपात प्रमोट करायला पाहिजे. "जाट-खुंट-बैल" या मार्गाने नव्हे.

In reply to by नितिन थत्ते

मी पण अनेक व्यहवार ऑनलाईन, नेट बँकिंग, कार्ड पेमेंट यांद्वारे करतो. पण म्हणून प्रत्येकाने ते तसेच केले पाहिजेत प्रत्येकाला ते करता आले पाहिजेत असा अट्टहास नाही धरत.

In reply to by नितिन थत्ते

असेही सूचित केले जात आहे की आता कॅश कमीच दिली जाणार आहे. सहमत. लेस-कॅश अर्थव्यवस्थेत तसेच असते, कारण तिला खूप कॅशची गरजच नसते. लेस-कॅशची सवय होईपर्यंत जनतेला थोडी तोशिश पडत आहे असे वाटेल. पण, ज्या पद्धतीने सामान्य जनता (विरोधी नेते आणि तथाकथित अर्थतज्ज्ञ नव्हे) ही तोशिश स्विकारत आहे, ती अभिनंदनिय आणि आशादायक आहे. ====== आता, एखाद्या चांगल्या व्यवस्थेला व्यवहारात आणण्यासाठी सरकारने थोडीफार जबरदस्ती करावी काय ? या प्रश्नाची खालील दोन उत्तरे असून शकतात. १. नाही : हे उत्तर राजकारणी लोकांच्या फार सोईचे असते. त्यात लोकांचा अंतिमतः तोटा असला तरी मतपेट्या शाबूत ठेवून राजकीय व वैयक्तीक स्वार्थ साधणे सोपे असते. त्यामुळे भारतात आजपर्यंत आपण हेच बघत आलो आहोत... आणि त्याच बरोबर सिस्टीमला आणि नशिबाला दोष देत सिंगापूरचा किंवा नॉर्वेचा (जे साधारणपणे आपल्याबरोबर स्वतंत्र झाले आहेत) असूयेने उल्लेख करत आलो आहोत. २. हो : हे उत्तर भारताच्या राजकारणी इतिहासात नवे आहे. परंतू भारतिय नागरिकांचा सर्वसाधारण स्वभाव पाहिला तर त्याला चांगल्या गोष्टी करायलाही जबरदस्तीने भाग पाडावे लागते असा इतिहास आहे. या वेळेस, जबरदस्ती नाही पण लोकांचा काहीसा नाईलाज करत, लोकांच्या भल्याची गोष्ट, सरकार लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसत आहे. असे करताना काही प्रमाणात जनतेला आणि विशेषत: सरकारच्या स्वतःच्या हितसंबंधियांनाही तोशिश द्यावी लागत आहे. हा धोका पत्करायचे धैर्य स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच दाखवले जात आहे, हे विशेष. साधी वाहतूक व्यवस्था पाहिली तर, भारतात केवळ "रुंद रस्त्यांवर उत्तम प्रकारे काढलेल्या मध्यरेषा विरुद्ध दिशेने गाडी नेण्यास रोखू शकत नाहीत, तेथे विरुद्ध दिशेन वाहतूक करणार्‍या लेन्समध्ये तीन फूट उंचीचे दुभाजक बांधावे लागतात. अश्या दुभाजकांवरून गाड्या नेणे शक्य नसल्यानेच केवळ गाड्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जात नाहीत. पण इतके करूनही पादचारी त्या दुभाजकांच्या वरून उड्या मारून पलिकडे जातातच ! तसे पाहिले तर, भारतात "हो" हा पर्याय नवीन असला तरी, आपण आसूयेने ज्याचे नाव घेतो त्या सिंगापूरमध्ये ली क्वान यु ने तो जरबेने वापरून, सिंगापूरला त्याच्या स्वातंत्र्यापासूनच्या दोन दशकांत "मासेमारांचे खेडे" या अवस्थेपासून "आधुनिक विकसित राष्ट्र" या अवस्थेपर्यंत आणून सोडले होते. भारतीय लोकशाहीत सरकारला ली क्वान यू सारखे हुकुमशाही अधिकार नाहीत, तेव्हा भारताला ली क्वान यू च्या स्तरावर जाणे शक्य होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजित - १ 08/12/2016 - 17:27
लोकांची मारायची असेल तर हे सरकार जाम जोरात पुढे असते. जसे वर तुम्ही म्हणतय २ नंबर मध्ये. पण करप्ट लोकांना शिक्षा करायची वेळ आली कि मग मात्र यांचे हात बांधलेलं . आता रेल्वे मध्ये पण सबसिडी सोडा म्हणून सुरेश प्रभू पुढे आलेत . आजची ताजी बातमी. पण रेल्वे कर्मचारी फक्त ५०% efficiency ने काम करतात ते सुधारायला याना जमत नाही. लोकांवर दादागिरी करायला जमते. सरकारी बाबू ऐकत नाहीत म्हणून देवेंद्र तक्रार करतात . परत वर त्यांना बॅंकॉंक ला जायला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रु पण पुरवतात. लोकांना मात्र - आता सबसिडी कल्चर चालणार नाही वगैरे ऐकवतात .. अरे नको तुमची सबसिडी. पण एका अटीवर - या सगळ्या लोकांना सरळ करा, निदान सुरुवात तरी करा . ते काही जमत नाही सरकारला . मुंबई पुणे एक्सप्रेस वे टोल वसुली पूर्ण झाली आहे . पण IRB चे नुकसान होऊ नये या उदात्त हेतूने देवेंद्र गप्प .. ९०० कोटी चा घपला BMC मध्ये आणि याना लाथ घालायला सापडलं कोण तर एक फालतू जुनिअर engineer . बाकी वरचे सगळे सुटले जुजबी शिक्षेवर . मग काँग्रेस परवडली यांच्या पेक्षा . निदान डाळी तरी स्वस्त होत्या .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काका, जस्ट इन्कवायरिंग, are u supporting or hailing the Iron Fist in your above comment?? मला तसे भासले, ते चूक असावे हीच इच्छा म्हणूनच हा कॉमेंटप्रपंच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भारतीय लोकशाहीत सरकारला ली क्वान यू सारखे हुकुमशाही अधिकार नाहीत, तेव्हा भारताला ली क्वान यू च्या स्तरावर जाणे शक्य होणार नाही. असे कोणाला वाटेल असे वाटले होते. म्हणून, त्या प्रतिसादात हे वाक्य लिहून ते स्पष्ट केले आहे :) परंतू, जे कायदे आहेत (उदा: वाहतूक, पार्किंग, भ्रष्टाचार, व्ही आय पी कल्चर विरोध, इ) ते योग्यपणे व विनाखाबूगिरी अंमलात आणून, लोकांची बेशिस्ती आणि 'चलता है' प्रवृत्ती कमी करणे जरूरीचे आहे, यात संशय नाही. सद्या कायदा मोडणे, भ्र्ष्टाचार करून गब्बर होणे, वशिलेबाजी करणे, इत्यादी अभिमानाच्या गोष्टी असल्यासारखे लोक बर्‍याचदा वागतात, ते निश्चितच चीड आणणारे आहे. सर्वसामान्य लोकांनाही ते मान्य नाही, पण नाईलाजाने/हतबलतेने ते सोसावे लागते आहे. म्हणूनच, भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप लावण्याचा प्रयत्न करतोय हीच गोष्ट लोकांना सुखावून गेली आहे व म्हणूनच ते नोटाबंदीमुळे होणारा थोडाबहुत त्रास सहन करायला तयार आहेत. हे अगदी तळागाळातल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर दिसत आहे. याच कारणासाठी नोटाबंदीविरुद्धचा मोर्चा, बंद इत्यादींना सर्वसामान्य जनतेचा फारसा पाठींबा दिसला नाही. जबरदस्ती नसावी हे योग्य आहे. पण सत्य, शिस्त आणि चांगला व्यवहार यांचा आग्रह म्हणजे जबरदस्ती नाही, हे सांगायला नकोच. किंबहुना तसा आग्रह नसलेल्या परिस्थितीतच सामान्य लोकांवर जुलुम-जबरदस्ती होते, हे आजूबाजूला पाहिले तरी सहज दिसेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सार्वजनिक जीवनात, भारताला "सत्य, शिस्त आणि चांगला व्यवहार" या विषयांत खूप प्रगती करायची गरज आहे याबाबत वाद नसावा, नाही का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाही त्या बद्दल काहीच वाद असू नये, अजून काही बोलायचे होते, पण एकंदरीत आजकाल मिपावर बोलण्यात अर्थ राहिलेला नाही परत एकदा अधोरेखित झाले अमच्यापुरते. असो, तुम्ही मोठे भूलचूक माफी द्यावी, ह्यापुढे काहीच विचारणार नाही प्रश्न.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असे काय झाले ? मी माझ्या तर्‍हेने जास्तीत जास्त संशय निराकरण करण्याचा प्रयत्न नेहमी करतो, तसाच इथेही केला ?! माझ्याशी नेहमी मोकळेपणाने बोला. मला हातचे न राखता बोलण्याची (वाईट) सवय आहे ! कारण, राजकारण करत किंवा अतीपार्लमेंटरी बोलण्याने सत्य बाहेर यायला जरा कठीणच पडते. माझ्या व्यावसायीक गटांमध्ये, जेथे माझ्या अधिकारात असते तेव्हा, मी सगळ्यांनी "ब्रूटली ऑनेस्ट" असावे असा आग्रह धरतो. सुरुवातीला लोकांना अवघडल्यासारखे होते. पण, नंतर ते सगळ्यांनाच सर्व तर्‍हेने मोठ्या फायद्याचे ठरते असा दीर्घ काळचा अनुभव आहे. राजकारण्यांबद्दल म्हणाल तर, स्वार्थी हितसंबध साधण्याकरीता वर वर गोड बोलणार्‍यांपेक्षा, खरमरीत सत्य बोलून जनतेला सरळ मार्गावर आणण्याला मागेपुढे न बघणारे जास्त आवडतात. असे दोन (पुन्हा, भारतात शक्य नसलेले) "बेनेव्हॅलंट सर्वाधिकारी" आणि त्यांनी स्वतःला निर्मोही ठेवून आपापल्या देशांना दीड-दोन दशकांत अमुलाग्र बदललेले याच आयुष्यात पाहिले आहे, एकाच्या देशात काम केल्याने त्या स्थितीचा याची देही याची डोळा स्वानुभव घेतलेला आहे. मात्र, "कोणीतरी माझ्यासाठी हात मागे बांधून लढावे, मला जराही तोशीश लागू देऊ नये आणि तरीही माझ्यासाठी चंद्र जमिनीवर खेचून आणावा", हे मागणे या जगात सत्यात उतरणे जवळपास अशक्य आहे, यात वाद नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजित - १ 11/12/2016 - 18:14
भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप लावण्याचा प्रयत्न करतोय हीच गोष्ट लोकांना सुखावून गेली आहे ???? >> कॅशलेस करून भ्रष्टाचाराला चाप ?? लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. एक कण फरक पडणार नाहीए खाबुगिरीत ..

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 11/12/2016 - 20:32
नंतर "आठ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितले ते कोणतेच उद्देश नव्हते; खरा उद्देश टॅक्स बेस वाढवण्याचा होता किंवा कॅशलेस करण्याचा होता" असं त्यांनी सांगितलं तरी त्याचंही कौतुक "शोल्लेट गुप्तता राखून इम्प्लिमेंट केलेला निर्णय" असं होईल !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 10/01/2017 - 20:59
इथे दुभाजकाचे उदाहरण बरोबर दिलेले आहे . भारतीय माणूस अप्रामणिक आहे असे माझे मत ६३ वर्ष आयुष्य जगल्यानंतर ठाम झाले आहे. मग त्याला " सरळ" करायचे असेल तर कायदा करण्यापेक्षा प्रोसीजरच अशी करायची की त्याला तीन फुटाचा दुभाजक ओलांडता येणारच नाही. व्यावहारिक पणाची जाण नसलेले प्रधानमंत्री आपण सत्तर वर्षे पाहिलेले आहेतच. ( आठवड्यातून एक दिवस उपवास करा ... असे सांगणारे शास्त्रीजी वगळता ). त्यामानाने मोदी बरेच व्यवहार वादी आहेत. पण जाती ,धर्म, रूढी परंपरा , अति इतिहास प्रेम, व्यक्तिपूजा यात भारत इतका बरबटून निघाला आहे की मन विषण्ण होते. पण राजीव गांधीच्या संगणक युगाला ही विरोध केला होताच हे विसरून कसे चालेल...?

In reply to by चौकटराजा

ट्रेड मार्क 10/01/2017 - 21:21
बहुतांशी भारतीय लोक नियमांना कशी बगल देता येईल हा विचार करतात. त्यामुळे कितीही नियम बनवा, ते कसे अयशस्वी करता येतील याचे विविध मार्ग शोधले जातात. विचार बदला देश बदलेल हे खरंय.

वरुण मोहिते 08/12/2016 - 14:54
१०० डॉलर मॅक्सिमम नोट आहे . त्यामुळे तिथे भ्रष्टाचार होत नाही का??? . असं असेल तर निश्चित वाचायला आवडेल . तिकडे भ्रष्टाचार होत नाही म्हणून इथेही १०० रुपये कायम मॅक्सिमम का ठेवले नाहीत हे पण वाचायला आवडेल . मला काही फरक पडला नाही पण जनतेच्या प्रश्नावर वाचायला आवडेल

In reply to by वरुण मोहिते

पुढच्या पायर्‍यांत; १ ते ३ वर्षांत रु२००० ची नोट आणि ५ वर्षांत रु५०० ची नोट व्यवहारातून जाईल असा मझा व्यक्तीगत अंदाज आहे. १०० डॉलर मॅक्सिमम नोट आहे . त्यामुळे तिथे भ्रष्टाचार होत नाही का??? हे परत, "कॅश-लेस" आणि "लेस-कॅश"मध्ये गफलत करण्यासारखे झाले. सर्वात मोठी नोट $१०० ची असण्याने देश "भ्रष्टाचारमुक्त (करप्शन-लेस)" होत नाही तर देशातला "भ्रष्टाचार कमी (लेस-करप्शन)" करायला मदत करते. $१ कोटीच्या भ्रष्टाचाराचा व्यवहार, (अ) $१०० च्या नोटांत आणि (आ) $१००० च्या नोटांत केला, तर त्या नोटांचे हस्तांतर, वाहतूक व साठवण करताना येणार्‍या "वास्तविक" समस्यांतल्या फरकांचा विचार केला, तर वरचा मुद्दा ध्यानात येईल. जसजशी ही रक्काम मोठी होईल तसतश्या या समस्या सामान्य पटींत नाही तर 'भौमितीक परिणामाने' वाढत जातात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसेच भ्रष्टाचार कमीत कमी स्तरावर ठेवायला (खर्‍या जीवनात तो ०% कधीच, कोठेच नसतो) लहान किंमतीच्या नोटा हा अनेक उपायांपैकी केवळ एक (पण व्यवहारात खूप उपयोगी सिद्ध झालेला) उपाय आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 16:22
>>$१ कोटीच्या भ्रष्टाचाराचा व्यवहार, (अ) $१०० च्या नोटांत आणि (आ) $१००० च्या नोटांत केला, तर त्या नोटांचे हस्तांतर, वाहतूक व साठवण करताना येणार्‍या "वास्तविक" समस्यांतल्या फरकांचा विचार केला, तर वरचा मुद्दा ध्यानात येईल. जसजशी ही रक्काम मोठी होईल तसतश्या या समस्या सामान्य पटींत नाही तर 'भौमितीक परिणामाने' वाढत जातात. =)) शंभराच्या वरची नोट नसल्याने एक कोटीचा भ्रष्टाचार करणे काहीसे/खूपच कठीण होईल या कल्पनेने करमणूक झाली.

In reply to by नितिन थत्ते

हा जागतीक मान्यतेचा समज आणि व्यावहारीक सत्य आहे. त्याला हास्यास्पद ठरवू शकणारा तज्ज्ञ मिपावर सापडला तर सार्थ अभिमान वाटेल ;) :) चला करा १ कोटी, ५ कोटी, १० कोटी, १०० कोटी,..... इत्यादींच्या १००च्या नोटांच्या... अ) प्रत्येकी १०० नोटांच्या बंंडलाची संख्या, आ) ते ठेवायला लागणार्‍या आकारमानाची गोळाबेरीज (घन मीटर अथवा संशय येणार नाही अश्या आकाराच्या किती बॅगा / खोके, इ), इ) सर्व नोतांच्या एकूण त्यांच्या वजनाचे आकडे, ई) वजन व आकारमान जास्त असण्याने त्यांच्या वाहतूकीसाठी आणि साठवणीसाठी येणार्‍या समस्या, इ इ इ यांचे मोजमाप आणि वरचेच $१०००, $५००० व $१०००० च्या नोटांमध्ये केले तर होणार्‍या सुविधा यांची तुलना... ...आणि मग तुम्हाला प्रामाणिकपणे लोल करणे जमते का ते पहा. =)) =)) =)) काळा पैसा रियल इस्टेट, जमीन, दागीने, सोने, इत्यादीत असतो असे सांगण्याअगोदर... काळा पैसा निर्माण होताना (एखादा विरळ अपवाद वगळता) नकदेतच असतो (कारण त्याची किंमत निर्विवादपणे ठरवता येते आणि त्याचे हस्तांतर कोणताही लेखी पुरावा मागे न सोडता करता येते). त्यानंतर तो इतर उपाय वापरून इतर प्रकारच्या धनात परावर्तीत केला जातो. याशिवाय, तो इतर धनांत परावर्तीत करताना दिलेली काळी नकद हस्तांतरीत झाली की हाताळताना नवीन भ्रष्टाचार्‍याला त्याच (वर दिलेल्या) लॉजिस्टिक समस्या येतात. सिंपल, मि. थत्ते ! ;) ======= याशिवाय इतर काही काळा पैसा हाताळण्याची क्लृप्ती तुमच्याकडे असली तर ती जगावेगळी आयडिया जाणून घ्यायला आवडेल... सांगाच ती इथे. तोपर्यंत आम्ही लोल करून घेतो ;) :) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 20:39
>>याशिवाय इतर काही काळा पैसा हाताळण्याची क्लृप्ती तुमच्याकडे असली तर ती जगावेगळी आयडिया जाणून घ्यायला आवडेल... सांगाच ती इथे. तोपर्यंत आम्ही लोल करून घेतो ;) :) =)) तेच तर सांगतोय. काळा पैसा हाताळायला लागतोच असे नाही. राम लिंग राजू नावाचा एक इसम होता. म्हणजे आता जेल मध्ये आहे. त्याच्या सत्यम नावाच्या कंपनीत पन्नास एक हजार फेक एम्प्लॉयी होते. त्यांना बँक खात्यातून पगार दिला जात होता. दुसरे तुम्हाला ठाउक असलेलेच उदाहरण. कोणी एक बै पी आर कन्सल्टंट म्हणून काम करायच्या. त्यांना प्रोफेशनल फीज म्हणून मोठाल्या रकमा कॉर्पोरेट्स देत असत. पुढचं समजून घ्याल असे वाटते. या जुन्याच युक्त्या आहेत. नव्या - मला सुचलेल्या वगैरे नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

हे उदाहरण अपेक्षेच्या उलटे आहे =)) अहो, राम लिंग राजू नसलेला पैसा आहे असे दाखवत कंपनीला फायदा झाला आहे असे दाखवत होता. नसलेले पण आहेत असे दाखवलेल पैसे रियल इस्टेट्मध्ये (मायतास करवी) मिळतील व हिशेब बरोबर होईल असे त्याला वाटत होते. त्याच्या कमनशिबाने रियल इस्टेट मार्केट कोसळले आणि ते नसलेले पैसे गळ्याशी येऊन त्याचे बिंग फुटले. हे सगळे त्याने खोटे हिशेब लिहून दाबून टाकायचा प्रयत्न केला. याला बुक फजिंग म्हणतात. =)) थोडे उत्खनन केले तर काळ्या पैशाची अनेक चपखल उदाहरणे सापडतील, पण ज्यांच्यात कॅश हस्तांतरीत झाली नाही अशी उदाहरणे सापडदणे कठीण आहे. भ्रष्टाचाराची अचूक किंमत ठरवणे आणि ती वसूल करण्याला कॅशच सोईची असते. उदा: तुझे काम करतो, त्यासाठी "मला दोन तोळे सोने दे" यापेक्षा "मला रु६०००० कॅश दे" हे व्यवहारात भ्रष्टाचार्‍यासाठी अचूक किमती वसूल करायला जास्त उपयोगी आणि फसवणूक टाळायला खात्रीचे असते. नाहीतर कॅशचा इतका महिमा नसता, नोटाबंदीची कारवाई करण्याची गरज नव्हती आणि त्या कारवाईविरोधी इतका गदारोळ का झाला असता ???!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा वरचा प्रयत्नही गोल पोस्ट बदलण्याचे (पक्षी : दिशाभूल करण्याचे) उत्तम उदाहरण आहे. पण तरिही सत्यमची केस फार रोचक असल्याने अवांतराही जरासे महत्व द्यावेसे वाटले :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 22:53
हे उदाहरण मी रामलिंग राजूने पैसे कसे उडवले ते सांगण्यासाठी दिले नव्हते. तर कंपनीतून कॅश न काढता परस्पर बँकेतून (व्हाइटमध्ये) लाच कशी दिली जाऊ शकते याचे उदाहरण म्हणून दिले होते. बाकी गोलपोस्ट तर सरकारने बदलला आहे. ८ तारखेच्या मोदींच्या भाषणात कॅशलेसचा क पण नव्हता. जसजसे नोटा पुरवण्याचे प्लॅनिंग गंडलेले आहे हे उघडकीला यायला लागलं तेव्हा भक्तांना एंगेज ठेवण्यासाठी कॅशलेसचा पॉइंट बाजारात सोडण्यात आला. ते आधीच लक्षात येऊ लागल्यावर काळा पैसा बँकेत न आल्यामुळे रिझर्व बँकेचा आणि पर्यायाने सरकारचा कसा फायदा होईल वगैरे पतंगांच्या भरार्‍या खोट्या ठरू लागल्या होत्या. (बहुतेक अर्थतज्ञांनी हे आधीपासूनच सांगितले होते). बाकी आता ऑलमोस्ट सगळ्या नोटा बँकेत डिपॉझिट होतील असे अर्थसचीवांनीच म्हटले आहे. ते तोंडावर आपटणे दिसू नये म्हणून आम्ही यंव करू त्यंव करू म्हणून सांगितले जात आहे. टेरर फायनान्सिंगचे कदाचित खरे असेल पण त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. --------------------------------- अवांतर: माझ्या मामेभावाची दीड वर्षाची मुलगी आहे. ती आईच्या कडेवर बसून मेणबत्तीच्या/निरांजनाच्या पेटत्या ज्योतीमध्ये बोट घालण्याचा प्रयत्न करते. पण आम्ही "काय धाडसी आहे!!!" म्हणून तिचे कौतुक करत नाही. असे बोट घालण्याचे परिणाम तिला ठाऊक नसल्याने ती हे धाडस करते असे आम्ही समजतो.

In reply to by नितिन थत्ते

"तुमच्या मामेभावाची दीड वर्षाची मुलगी" आणि "सरकारातील नेते, ब्युरोक्रॅट्स व इतर तज्ज्ञ" यांच्यात तुम्हाला काही फरक दिसत नाही, यातच सर्व आले !!! =)) =)) =)) धन्यवाद, अगोदर म्हटल्याप्रमाणे, वाट पाहू या आणि ९ ते १२ महिन्यांत प्रत्यक्षात आलेले परिणाम दिसतीलच ! तेव्हा दिसेलच कोणाचे अंदाज / विश्वास बरोबर ठरले की चुकीचे ते !

In reply to by नितिन थत्ते

फाटे फोडण्याचे तुमचे कसब वाखाणण्याजोगे आहे हे तुमच्या शत्रूलाही मान्य करावेच लागेल! मी तर तुमचा मिपाकर मित्र आहे ! :) ;) शुभरात्री !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इतक्या प्रगाढ चलाखीची ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरली गेली तर त्याचा तुम्हाला व इइतरांना किती फायदा झाला असता असा विचार मनात तरळून गेला! आता खरोखर शुभरात्री! :)

In reply to by वरुण मोहिते

ट्रेड मार्क 10/01/2017 - 21:35
अमेरिकेत सर्वसाधारण माणूस बराच प्रामाणिक आहे. भारतात ज्या लेव्हलचा भ्रष्टाचार चालतो तसा अमेरिकेत नसतो. पोलिसाने पकडले तर सरळ तिकीट देतो, $५० घे आणि सोडून दे ही भानगड नसते. कुठल्याही दुकानात कॅश द्या किंवा कार्ड द्या, रिसीट मिळतेच. तिथे तुम्हाला हा पर्याय नसतो की कॅश दिलीत तर टॅक्सचे पैसे देऊ नका. अमेरिकेत बऱ्याच दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत हे स्पष्टपणे लिहिलं असतं. अगदी $१ ची वस्तू पण कार्ड देऊन घेता येते आणि त्याची पण टॅक्ससहितची रिसीट मिळते. अमेरिकेत भ्रष्टाचार नाही असं नाही, वरच्या पातळीवर आहेच. पण आपल्यासारखी बजबजपुरी नाही.

In reply to by वरुण मोहिते

चौकटराजा 11/01/2017 - 13:23
भ्रष्टाचार व करबुडवे गिरी या दोन्ही गोष्टी भिन्न्न आहेत. भ्रष्टाचार हा मानसशास्त्रातला भाग असून करबुडवे गिरी हा अर्थशास्त्राचा भाग आहे. अर्थात अर्थ्शास्त्र हे देखील काहीसे मानसशास्त्राला जोडलेले आहे ते " वर्तणुक शास्त्र " मानले जाते. या प्रमाणात दोन्ही एकमेकाशी सम्बंधित आहेतच. ज्यावेळी नोटांचे प्रमाण कमी करून थेट प्लास्टिक मनी वर भर दिला तर भ्रष्टाचार नोटेद्वारा होणार नाही पण काईंड मधे होउ शकतो. आमच्या लहानपणी एक शेतकार्‍याचा मुलगा आपल्या शेतातील वांगी बाईना आणून देत असे व मार्क जास्त द्यावे असा दबाब आणत असे बाईनी मार्क जास्त दिले की नाही याला पुरावा नाही पण बाई सापडल्या फेरतपासणीत तर नोटेविना भ्रष्टाचार झालाच की. प्लास्टिक मनी व्यवहार जास्त झाले तर करबुडवे गिरी कमी होईल हे पाचवीतले पोर ही सांगू शकेल. देवस्थाने व दहशतवादी याना मिळणारा सर्वच पैसा करबुडवेगिरीचे पोर आहे असे म्हणता येत नाही.

In reply to by चौकटराजा

भ्रष्टाचार व करबुडवे गिरी या दोन्ही गोष्टी भिन्न्न आहेत. "अवैध साधने/उपाय/कृती/मार्ग वापरून पैसा आणि/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा मिळविणे" याला सर्वसाधारणपणे भ्रष्टाचार म्हणता येईल १. करबुडवेगिरी ही अवैध कृती असल्याने भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. २. भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेल्या पैश्याचे करविभागाला "खरे" विवरण देऊन त्यावरचा कर भरणे सर्वसाधारणपणे शक्य/सोईचे नसल्याने त्या पैश्यावरचा कर बुडविण्याकडेच भ्रष्टाचार्‍यांचा कल असतो. त्यामागे वाचलेल्या कराच्या पैशाचाही मोह असतोच. असे करताना, पहिली भ्रष्टाचारी कृती दुसर्‍या भ्रष्टाचारी कृतीने लपवली जाते. ३. करपात्र उत्पन्न, खोटेपणाने, करमाफ उत्पन्नाच्या स्त्रोतापासून (उदाहरणार्थ, शेतीचे उत्पन्न) मिळाले आहे, असे दाखवण्याची अवैध कृती करून कर बुडवणे हा पण भ्रष्टचाराच एक प्रकार आहे. थोडक्यात, भ्रष्टाचाराची व्याख्या कोणत्या एका शास्त्राच्या शाखेशी संबंधीत नसून ती "अवैध" मानवी कृतीशी संबंधीत आहे.

वरुण मोहिते 08/12/2016 - 15:04
नोट कमी म्हणून अमेरिकेत भ्रष्टाचार होत नाही का?? हे विचारायचं. पैशाचा फरक सगळ्यांना माहित आहे .

वरुण मोहिते 08/12/2016 - 15:50
नोटबंदी किंवा काही चलनबंदी केली १९६० अँड १९७० .. त्यानंतर अमर्याद ड्रग ट्रॅफिकिंग चालू होतं. जसा आता म्हणतात कि पाकिस्तान चे अटॅक बंद झाले नोटबंदी मुळे तसाच प्रकार . परत एक प्रश्न भ्रष्टाचार हि वृत्ती आहे . त्यामुळे बंद होणार नाही आहे .

In reply to by वरुण मोहिते

"नोटाबंदी हा भ्रष्टाचारविरुद्धचा एकुलता एक रामबाण उपाय नसून त्यासाठी केल्या जाणर्‍या अनेक उपायांच्या साखळितली एक कडी आहे" इतके समजावून घेतले की मग बाकीचे प्रश्नही सोडवायला मदत होईल. याशिवाय, ७० वर्षांची घाण एका उपायाने आणि एका रात्रीत (किंवा एक महिन्यांतही) साफ करण्यासाठी सरकारकडे काही जादू आहे, ही कल्पनाही ठीक नाही. त्यापेक्षा, अनेक प्रकारचे उपाय, अनेक महिने चालू ठेवून, भ्रष्टाचार "अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणार नाही" व "सर्वसामान्य माणसाचे जीवन कठीण करणार नाही" इतपत ताब्यात आणणे, हे व्यावहारीक उद्यिष्ट्य होईल. विकसित देशांमध्येही "हेच साधणे आणि ते वर्षानुवर्षे तसेच कायम राखणे" यावर शक्ती खर्च केली जाते.

In reply to by नितिन थत्ते

विशुमित 08/12/2016 - 17:08
खरी गोम या ७० वर्षात झालेल्या घाणीत आहे, त्यामुळे नोटबंदी वाल्यानी किती ही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणे महा कठीण आहे. मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे.

In reply to by विशुमित

मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे. तुमचे गुपीत इतके उघडपणे सांगू नका हो, हे म्हणजे अगदी हे झाले ! ;)

याशिवाय, ७० वर्षांची घाण एका उपायाने आणि एका रात्रीत (किंवा एक महिन्यांतही) साफ करण्यासाठी सरकारकडे काही जादू आहे, ही कल्पनाही ठीक नाही.
मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते. आज हे सरकार ह्याच घाणेरड्या कार्डचा उपयोग काळा पैसा शोधण्यासाठी का करतेय मग? एका रात्रीत भ्रष्टाचार, काळा पैसा साफ करायची ह्या सरकारलाच घाई आहे असे दिसते.

In reply to by मार्मिक गोडसे

मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते. जनतेच्या फायद्याचे साधन नुसते हाती असून फायदा नसतो, त्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही फायदा नसतो, ते शस्त्र योग्य प्रकारे उपयोग करायची नियत व धमक असली आणि त्या प्रत्यक्षात उपयोग केला तरच त्याचे फायदे जनतेला मिळतात, हा व्यवस्थापनाचा मूलभूत नियम आहे. त्याविरुद्ध, स्वतःला हवी असलेली साधने तयार करून ती जनतेच्या नकळत कशी वापरली गेली याचे एक खास उदाहरण मिपावरच इतर कोठेतरी दिले होते, पण शोधाशोध न करता त्वरीत पाहता यावे यासाठी, इथे परत देत आहे. रोचक माहिती आहे त्यात... आतापर्यंत, अनेक स्कॅम्स जगजाहीर झाल्या आहेतच, त्यात ही एक भर, अजून आतापर्यंत पुढे न आलेल्या किती बाहेर पडतील ते भविष्यच सांगेल :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते. त्याचा चांगला परिणाम झाला होता. कमोडीटी मार्केटमध्ये अजुनही घोटाळे चालुच आहेत.

In reply to by मार्मिक गोडसे

युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते. खरंच ???!!! =)) अहो वर दिलेली क्लिपमध्ये तर सेबी व वित्तमंत्रालयाला १०० वर उदाहरणे नावासकट दिली असताना काही कारवाई केली गेली नाही असे नावासकट सांगितले आहे. तुम्ही तुमची माहिती परत तपासून पहायची गरज आहे. यासंबधात जालावर पोत्यानी विश्वासू दुवे आहेत. P-Notes ची व्याख्याच याबाबतीत काय ते सगळे उघड करते आहे... Participatory Notes commonly known as P-Notes or PNs are instruments issued by registered foreign institutional investors (FII) to overseas investors, who wish to invest in the Indian stock markets without registering themselves with the market regulator, the Securities and Exchange Board of India - SEBI. पी नोट्स बेनामी असू शकतील व त्यातले खरे गुंतवणूकदार कोण आहेत हे सेबीला कळू नये आणि विचारण्याचाही हक्क असू नये असे ते कायदे व नियम होते. सद्य सरकारने रिनिगोशिएशन करून आता त्या कायदे-नियमा अंतर्गत अनेक देशांशी केलेल्या करारांत योग्य ते बदल केले आहेत. कोणतेही कायदे करून हेतुपुर्रसर केलेले घोटाळे सुधारणे व ते कायदे वापरून परदेशांशी केलेले करार एकतर्फी बाद करता येत नाहीत. त्याला वेळकाढू कायदेशीर मार्ग वापरून, संबंधीत परदेशांशी चर्चा करून व त्या सरकारांना काही काळाची (बर्‍याचदा एक-दोन आर्थिक वर्षाची तरी) मुदत देवूनच नंतरच दोन्ही बाजूंना मान्य बदल व्यवहारात आणता येतात.

अमर विश्वास 08/12/2016 - 19:29
दोन महत्वाच्या घोषणा ,,, कॅशलेस होण्यासाठी २०० रुपयांपर्यंतची खरेदी कार्ड वापरून केली तर सर्विस टॅक्स नाही पेट्रोल व डिझेल खरेदी कार्ड वापरून स्वस्त ....

In reply to by अमर विश्वास

आनंदी गोपाळ 08/12/2016 - 21:10
२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर घसघशीत दीड रुपया सूट? (०.७५%ने) अन ३% ट्रँजॅक्शन कॉस्टप्रमाणे एक्स्ट्राचे ६ रुपये जाणार ते कुणाच्या तीर्थरूपांनी द्यायचे? अन सर्विस टॅक्स कुणाला नाही? सर्विस घेणारा टॅक्स भरतो का तो? की सर्विस देणारा? कस्ली भयंकर येडी घालतंय हे सरकार. अन तरीही भजनगायकी थांबतच नाहिये. कठीणे!

In reply to by आनंदी गोपाळ

२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर घसघशीत दीड रुपया सूट? (०.७५%ने)
तो दिड रुपया महत्वाचा आहे की नाही हे ज्याचं त्याला ठरवू देणं जास्त योग्य ठरणार नाही का? ज्याला महत्वाचे नाहीत त्याने २०० रु. रोख द्यावेत.
अन ३% ट्रँजॅक्शन कॉस्टप्रमाणे एक्स्ट्राचे ६ रुपये जाणार ते कुणाच्या तीर्थरूपांनी द्यायचे?
यासाठी कोणाच्याच तिर्थरूपांकडे जाण्याची गरज नाही. डोळे बंद करून ३% चार्जवालं कार्ड घेणाऱ्यांनी स्वतःच भरणं जास्त योग्य ठरेल. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जरूर टीका करावी पण टिकाच करायची म्हटली तर मग ती सरकारने कुठलाही निर्णय नाही घेतला तरी करता येते.

In reply to by आनंदी गोपाळ

अमर विश्वास 08/12/2016 - 23:10
आनंदी गोपाळ मी फक्त नवीन निर्णय काय आहे ते लिहिले आहे .. हा निर्णय योग्य / अयोग्य असे कुठलेही मत दिलेले नही यात भजन गायकीचा संबंध येतोच कुठे ? उगाच स्वतः चे फस्ट्रेशन आमच्यावर लादु नका दुसरी गोष्ट : योग्य कार्ड वापरले तर पेट्रोल भरल्यावर कुठलाही चार्ज लागत नाही ... एवढी साधी गोष्ट नसमजणाऱ्या / दुर्लक्ष करणाऱ्या माणसांना तिर्थरुप आठवणे साहजिकच आहे ... उगाच कोणावर टीका करण्यापेक्षा (स्पष्ट सांगायचे तर बाप काढण्या पेक्षा) आपला अभ्यास वाढावा ...

वरुण मोहिते 08/12/2016 - 20:01
असं जगात कुठे आहे का हो ???? हेच पैसे आपल्याकडून वसूल केले जाणार टॅक्स किंवा अनेक माध्यमांतून . या कंपन्या डिस्काउंट देतात बाकी ऑनलाईन व्यवहारांवर त्यांना पॉईंट्स असतात ,जाहिराती असतात त्यामुळे देतात . पेट्रोल वैग्रे वर स्वस्त लोल

वरुण मोहिते 08/12/2016 - 21:22
असेल तर भाजप चा इतिहास पण पहा . एक निर्णय झाला तर ७-८ धागे आले . बाकी गोष्टींवर आले नव्हते कधी . वन्स अगेन लोल

चिगो 08/12/2016 - 22:23
आजच 'डिजीटल ट्रान्झॅक्शन्स'वर सेमिनार घेतला आम्ही, बँकाच्या मदतीने.. मी बोलतांना हेच बोललो बँकवाल्यांना कि बाबारे, जे काही मार्ग आहेत कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सचे आहेत ते सगळे सांगा, मग ते युपीआय असो, वा युएसएसडी, मोबाईल वॉलेट्स, कार्ड पेमेंट असो किंवा आणखी काही असो.. त्यातले 'डूज अँड डोन्ट्स' सांगा.. लोकांना जे पटेल, जे जमेल ते तो घेतील. आता बघूयात, काय होतंय ते.. बाकी आता जरा 'देशभक्ती'चा ज्वर जरा कमी झाला असेल, तर राज्यशकट हाकणारे जरा अर्थकारणावर बोलतील अशी अपेक्षा आहे.. महीनाभरापासून गुर्मीनी भरलेल्या गुरकावण्याच ऐकायला मिळताहेत. आतातरी जे लोक मोबाईल फक्त कॉल घेण्यापुरता वापरतात (आणि ज्यांना मोबाईल सायलेंटवर लागलाच तर 'साऊंड मोड'वर कसा आणायचा हे कळत नाही) त्यांना, ज्यांना मोबाईल वॉलेट्स वापरायचे नसतील त्यांना, ज्यांच्या गावापासून बँका किमान २५-३० किमी दुर आहेत त्यांना, ज्यांच्या गावात नेटवर्क योग्यप्रकारे मिळत नाही त्यांना,ज्यांना सगळं करता येत असूनही स्वतःचा कायदेशीर पैसा कॅशमध्ये वापरायचा आहे त्यांना, जेवढा हवा असेल तेवढा पैसा कधी मार्केटमधे येणार, हेपण सरकारनी सांगायला हवं..

In reply to by चिगो

याॅर्कर 08/12/2016 - 22:57
ग्रामीण लोक्स,गरीब,निरक्षर इ.ची संख्या पण अव्वा च्या सव्वा आहे.अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे! डिजीटल ट्रान्झॅक्शन,ऑनलाईन पे,प्लास्टिक मनी इ. कंसेप्ट्स कशा त्यांना समजवणार ते सरकारलाच माहित. आणि ग्रामीण आणि निम्नशहरीय लोकं आता हळूहळू सरकाच्या नावानं बोटं मोडत आहेत.बँकेच्या रांगेत अनेक खमंग शिव्या ऐकायला येत आहेत,लग्न ठरलेल्या याद्या आणि पत्रिका दाखवूनही मर्यादित रक्कमच दिली जात आहे.

In reply to by याॅर्कर

आनंदी गोपाळ 08/12/2016 - 23:03
ह्यॅ! कैतरीच कै? हे #$#^%चे फुकटे, टॅक्स न भरणारे एकजात फुकटखाऊ, काँग्रेसने मातवून ठेवलेले अंगठेभाद्दर! त्यांची पत्रास कशाला बाळगायला हवी? मरतील तर बरं होईल. तेवढंच काँग्रेसमुक्तीच्या दिशेने अजून एक पाऊल. बाई म्हटल्या होत्या, 'गरीबी हटाओ' आम्ही गरीबांनाच हटवणार आहोत!

सुज्ञ 09/12/2016 - 00:07
.. पन वीज वापरण्यापेक्षा मेणबत्ती वापरणे सोपे .. विज निर्माण करण्यासाठी धरण बांधणे , अणू प्रकल्प चालवणे , सौर्यप्रकल्प चालवणे त्यात पैसे खर्च करणे वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात . शिवाय विजेचे बिल देखील खूप असते . सर्वसामान्यांना ते परवडणार नाही .. त्याशिवाय मेणबत्ती लगेच उपलब्ध देखील होते . भसकन काडी ओढली कि लगेच लगेच मेणबत्ती पेटलीच . त्याशिवाय भारतात काही ठिकाणी वीज पोचवण्यात अडचणी खूप .. मेणबत्ती लगेच मिळते .. त्यामुळे मी म्हणतो .. वीज का वापरा ? मेणबत्तीच वापरू . अंतिम उद्देश प्रकाश पाडणे हाच आहे ना ? अरे पण जगातील प्रगत देश तर वीज वापरतात .. अरे का काय घंटा फरक पडलाय का त्यांना ? आम्ही १० मेणबत्य्या लावल्यावर तेवढाच उजेड पडला . त्यावर मी प्रश्न विचारतो . जगात वीज वापरली म्हणून मेणबत्त्या वापरायचे थांबले का ? किंवा जगात वीज वापरल्याने खूप जास्त प्रकाश पडला का ? पण सरकार म्हणते वीज वापरा. पण आता आमचे "नकोसे" सरकार आहे .. सरकार वीज वापर असे सांगत आहे म्हणजे सक्ती करत आहे ( ???? ).. मग तर सरकार काहीही म्हणूदे . निर्बुद्ध युक्तिवाद करणे हे आपले परम कर्तव्य आहे . हो हो .. आमच्या लक्षातच नाही आले . :) चला मी चालू होतो .. मेणबत्ती वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक नाही असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते लिंका अ ब क .

विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत वीज सरकारकडून मिळणार असेल तर काहीही हरकत नाही. पण समजा वीज खंडीत झाली, किवा कमीजास्त भार वाढून आमचे नुकसान झाले तर सरकारनी जबाबदारी घ्यावी.

In reply to by मार्मिक गोडसे

निओ१ 09/12/2016 - 00:37
मग आधीच्या सरकारने जे केले तेच करत रहावे व आपण फक्त बघत रहावे असेच वाटत आहे का? तुम्हाला अडचण ही तर नाही की आधीच्यानी केले नाही व ह्यांनी केले ?

In reply to by निओ१

तुम्हाला अडचण ही तर नाही की आधीच्यानी केले नाही व ह्यांनी केले ?
त्यांनी असा मुर्खपणा केला असता तर तेव्हाही हेच वाटले असते.

सुज्ञ 09/12/2016 - 00:38
आणि मी डी क्लास शहरात राहतो (यड्राव फाटा - इचलकरंजी) पण दारू सकट सर्वठिकाणी मी कार्ड देतो . एखाद दोन वेळेस रांगेत उभारून पैसे काढावे लागले याव्यतिरिक्त मला कसलाही त्रास जहाल नाही . वडापाव चहा कोफी वगैरे देखील सुरळीत चालू आहे ..थट्टा चाचा तुम्ही राहता कोठे ? बाकी गरीब दारू का पितो वगैरे फालतू प्रश्न विचारू नका.. बाकी. जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले .. बाकी जाता जाता अर्थात नगरपलिका निवडनुकांचे निकाल याची साक्ष देतातच .. पण तरीही .. लोकांना भडकवण्याचा व त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा कसला जळफळाट म्हणायचा हा .

In reply to by सुज्ञ

निओ१ 09/12/2016 - 00:43
नका, उत्तर देत बसू. मी उत्तर देणे बंद केले आहे व शक्यतो धागालेखक देखील बंद करेल. विरोध करायचा झाला तर विरोध करणारच मग अगदी वरण आधी की भात आधी की आधी भात की वरण? यावर देखील हे दंगा घालतीलच.

In reply to by सुज्ञ

याॅर्कर 09/12/2016 - 07:09
जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले ..
ही शुद्ध लोणकढी थाप आहे. ग्रामीण भागातील लोकांना त्रास होतोय,फक्त काहीजण प्रियसीने दिलेला त्रास गोड मानून घेतात त्यातला प्रकार हाय ह्यो:-)

In reply to by याॅर्कर

दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद इथे टाकतो. समजा वाटलंच आणि वेळ मिळालाच तर पाहून घ्या. उगाच बँकांच्या रांगेतल्या लोकांची मतं नाहीयेत ती, म्हणून इथे टाकली. तुम्हाला खरंच लोकांच्या मनात काय खदखदतंय हे पहायची इच्छा असेल तर खालील विडिओ पहा. उगाच तथ्यहीन चर्चा करण्यापेक्षा हे प्रत्यक्ष लोकांचं मत पाहणं जास्त माहितिकारक नाहीये का? https://youtu.be/-XtYRZ_Bn4g https://youtu.be/0bpVIl1P9y8

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

याॅर्कर 09/12/2016 - 10:31
नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे हो:-) त्यावेळचा त्रास गोडच वाटतो,नंतर तिटकारा येईल लोकांना.आणि हनिमून पिरीयड काळातील जनतेच्या प्रतिक्रिया खाजगी चॅनेलनी घेतल्या आहेत त्यांच्या सोयीने.ग्रामीण अर्थकारण आणि सहकार याची री पण मुंबईत मुख्यालय असलेल्या चॅनेलन्सना कळणार नाही.बँक मॅनेजरला टक्केवारीवर मॅनेज करणारे भरपूर काळे लोक आहेत,असे लोक आलिशान बंगल्यात एसीची हवा खात,बिअरचा घोट घेत,सिगरेटचा धूर सोडत निवांत असतात ते कधीही बँकेच्या लाईनीत थांबत नसतात.कोलकात्या भाजप नेत्याचे तेहतीस लाख पकडले होते सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या.इतर पक्षाचेही असे बरेच गुंठामंत्रीछाप लोक आहेत. बँकेच्या लाईनीत थांबणारे कोण आहेत याचा सर्वेच करावा.सगळे सामान्य,मध्यमवर्गीय लोकं आहेत. शिवाय लोकांचा युपीए सरकारविषयीचा राग अजून मावळला नाही,म्हणून सद्य सरकारशिवाय त्यांना तरणोपाय नाही.

In reply to by याॅर्कर

कठीण आहे! _/\_. नोटबंदीच्या २७ व्या दिवशी कुठल्याही रांगेत न जाता बाजारात जाऊन घेतलेल्या प्रतिक्रिया आहेत(एबीपी माझा भाजपधार्जिणी वाहिनी आहे असे आपल्याला वाटत असल्यास विषयच खुंटतो). असो! त्रास होतो आहे हे कुणीही नाकारलेलं नाहीच आहे पण सरसकट सगळ्यांना दररोज दिवस-दिवस बँकेच्या रांगेत उभं राहावं लागतंय मृगजळ ते तयार करणार्यांनाच लखलाभ होवो! १. जनभावनेची जमिनी सत्यता पडताळावी २. सरकारचे वाभाडे ३१ नंतर काढावेत एवढंच काय ते सांगणे आहे!

सुज्ञ 09/12/2016 - 01:13
आधीच्या सरकारने १० कानाखाली मारल्या व कधीतरी पाठीत गोंजारले १० कानाखाली खाल्लेले लोक प्रचंड आहेत .गोंजारून घेऊन आणि तितकाच विचार करू शकणारे लोक .. गोंजारून घेऊन मग शांत बसलेले लोक हो आत्ताचे सरकार कानाखाली वाजवून सांगत आहे की लोकहो ..जागे व्हा . किमान जागे करण्याचा प्रयत्न तरी करत आहे.. पण ज्यांना फालतू गोंजारून घ्यायची सवय झाली आहे . आणि त्यामुळे येथे काहीच घडू शकत नाही असे युक्तिवाद करतात त्यांना काय करावे

In reply to by आजानुकर्ण

सुज्ञ 09/12/2016 - 02:00
आजानुकर्ण .. आपले प्रतिसादात अत्यन्त हास्यास्पद असतात .. त्यामुळे आपण ते टंकण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल .आपल्या प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही . आपला एका धाग्यावरील प्रतिसाद .. "कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते" हा आपला प्रतिसाद म्हणजे "पाणी संपल्यास दगड नेहेमीच कामी येतो आणि तो कुठेही मिळतो . पाणी दुर्मिळ आहे त्यामुळे लोकांनी दगडच वापरा" छाप आहे . तस्मात आपले लेखनश्रम कमी करा

In reply to by सुज्ञ

आजानुकर्ण 09/12/2016 - 09:24
प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही
किमान इतकं समजून घेण्याची तुमची बुद्धी आहे हे समजल्याने गहिवरुन आले. बाकी माझे प्रतिसाद वाचण्याचे कष्ट कमी करा. तुम्हाला ते झेपत नाहीत हे दिसतंय. बुद्धीला जास्त ताण देऊ नका. काळजी घ्या. बाकी पाणी संपल्यावर दगड वापरण्याचा तुम्हाला बराच अनुभव दिसतोय! दगड वापरण्यावर आक्षेप असल्यास पाणी संपल्यावर दगड वापरला नाही तरी चालेल. फक्त बाकीच्यांपासून लांब राहा. आणखी काय सांगणार. तुम्ही सूज्ञ सुज्ञ आहातच.

म्हात्रे साहेब, भारतातील एकंदरीत काळ्या पैशापैकी फक्त ६ टक्के पैसा हा नोटांच्या स्वरूपात होता. तसेच ५०० व १००० च्या एकूण नोटांपैकी ८० टक्के नोटा बँकेत जमा झालेल्या आहेत. उरलेल्या ३१डिसेम्बर पर्यंत होतीलच. त्यामुळे जमा झालेल्या नोटांचा माग काढून त्यातल्या ज्या काळ्या पैशाशी संबंधित होत्या त्यावर सरकार कशी कारवाई करते हे पाहून सध्याच्या निर्णयाचे मोजमाप करता येईल. तसेच आर्थिक भ्रष्टाचार करणारे लोक नोटांऐवजी कुठेतरी भूखंड, फ्लॅट, गाळा ह्या स्वरूपात देखील मलिदा घेतात. त्यामुळे छोटी नोट म्हणजे देशातील भ्रष्टाचार कमी करायला मदत हे अजिबात मान्य नाही. बाकी गेल्या ७० वर्षाची घाण साफ करून, अजून १०० वर्ष साफ करायला पुरणार नाहीत एवढी घाण ५ वर्षात (अजून अडीच उरलीत म्हणा फक्त) निर्माण होऊ नये ही अपेक्षा.

मदनबाण 09/12/2016 - 10:39

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... १. Digital payments soar by up to 300% after demonetisation Upasana Taku, co-founder of another wallet company MobiKwik, said digital payment options are rapidly coming up across many essential services, which will give a fillip for setting up a cashless economy. "Wallets are being installed at highways, gas stations, essential service points, and at a large number of retail stations. २. Demonetisation effect: How the common man is going digital amid cash crunch

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमर विश्वास 10/12/2016 - 15:25
डॉक्टरसाहेब आपला प्रतिसाद दिसत नाही . परत पोस्ट कराल का? या योजनांबद्दल वाचले आहे . नक्की चांगला परिणाम होईल

मारवा 10/12/2016 - 22:22
भारतातली आय सी ए आय ही अतिशय उच्चत्तम दर्जाची संस्था आहे. सी.ए. कोर्स हा अत्यंत प्रतिष्ठीत आहे. याच्या मेंबरांना तुम्ही डिमॉनेटायझेशन विरोधात निगेटीव्ह मते देऊ नका असा मागास बिन्डोक तालिबानी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणारा फतवा कसा काय काढला जाऊ शकतो. मी स्वतः नोटबंदीच्या पुर्ण १०० % समर्थनात सध्या तरी आहे. मात्र असे फतवे बघुन अस्वस्थता वाढत आहे. इतक्या विद्वान तज्ञ मेंबरांना लोकशाही देशात आपले व्यक्तीगत मत मांडण्याचेही स्वातंत्र्य नसावे हा निव्वळ अतिरेक आहे. विरोध अजिबात दाबला दडपला जाऊ नये. हा प्रकारच चुक आहे. “The members are strictly advised not to indulge in any nefarious act to subvert the intentions of the government in any remote possible way,” it said. . “Members are also advised not to share/write any negative personal views by way of an article or interview on any platform regarding demonetisation,” it said. हे म्हणजे कमाल आहे. म्हणजे एखादा व्यक्ती सीए आहे आणि त्याचे मत डिमॉनेटायझेशन विरोधात असेल तर त्याचे अभ्यासपुर्ण मत ही त्याने नोटबंदी विरोधात मांडायचे नाही ? मिसळपाववरील सीए आदुबाळ , संक्षी इं चे यावर काय मत आहे ?

In reply to by मारवा

याचे नक्कीच आश्चर्य वाटले. त्या ऐवजी, आयसीएआय ने यासंबंधी खालील किंवा तत्सम विषय/उद्येश समोर ठेवून चर्चा/सेमिनार आयोजित करून आपल्या बिरादरीचे आणि जनतेचे शंकानिरसन व ज्ञानवर्धन करणे अपेक्षित होते... अ) कारवाईचा अर्थशास्त्रीयदृष्ट्या असलेला उद्येश व त्यातील बरेवाईटपणा, आ) कारवाईचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर व सर्वसामान्य जनतेवर झालेले, आता होणारे आणि भविष्यात होऊ शकणारे परिणाम, आणि इ) कारवाईच्या परिणामांमुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी काही वास्तविक उपाय शोधणे, इ.

In reply to by मारवा

यामागे कोणाचा दबाव होता हे बाहेर येणे/आणणे खरेच गरजेचे आहे. अशा गोष्टींनी सरकारच्या योग्य कृतींना खीळ बसतो आणि असहिष्णुतेचा रंग मिळतो असे माझे वैयक्तिक मत आहे. अवांतर : हि ऍडवायजरी होती की रिस्ट्रीक्शन होते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. वर लिहिलेल्या दोन पैकी पहिला मुद्दा तरी योग्य वाटतोय - not to indulge in any kind of nefarious act. काल रात्री दिल्लीच्या एका लॉ फर्मवर टाकलेल्या धाडीत मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बातम्यात सांगण्यात आले की हे लोक सीएन्च्या मदतीने काळ्याचा पांढरा आणि हवालाचे काम करत होते.

मारवा 10/12/2016 - 22:32
विरोध बघुन निर्णय मागे घेण्यात आला. पण जो काय दडपशाहीचा प्रकार होतो आहे तो फार निषेधात्मक असा आहे. या पुर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी कोणी हा दबाव मुळात आणला होता. ज्या अनिल गलगलींनी संस्थेच्या या निर्णयावर टीका केली त्यांना ब्लॉक करण्याचाही निर्लज्ज प्रकार आयसीएआय ने केला. http://galgalianil.blogspot.in/2016/12/blog-post_81.html http://galgalianil.blogspot.in/2016/12/to-stop-criticism-of-note-ban-icai.html http://www.firstpost.com/india/icai-withdraws-advisory-asking-members-to-not-criticise-demonetisation-3150142.html

गामा पैलवान 11/12/2016 - 21:39
लोकहो, क्याशलेस की लेस क्याश हे असले प्रश्न या साहेबांना पडलेले दिसंत नाहीत. नोटाबंदीचा असाही एक परिणाम : https://www.majhapaper.com/2016/12/09/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6/ आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अश्या भ्रष्ट लोकांना त्याचा पक्ष किंवा स्तर न बघता शिक्षा व्हायलाच पाहिजे. किंबहुना जेवढा राजकिय स्तर वरचा तेवढी जास्त शिक्षा व्हावी असा कायदा केला तरी त्याला माझा पाठींबाच राहील, कारण अश्या लोकांकडे सामान्य लोक आणि विशेषतः नवीन पिढी आदर्श/मार्गदर्शक म्हणून पहात असते. त्यमुळे त्यांना सहजी माफ करणे म्हणजे चुकीचे संकेत लोकांच्या मनावर बिंबविल्यासारखेच आहे.

काही मंडळी फक्त विरोध...करायचा म्हणुन विरोध करतात ..केजरी टाईप नोट बंदी ने बराच काळा पैसा बाहेर येतोय ..अजुन १७ दिवस आहेत .कर संशोधन विधेयक २०१६ हे वित्त विधेयक लागु होइल दोन एक दिवसात तेव्हा तिही योजना कशी बेकार आहे ह्याचे पाढे चालु होतिल...आयकर खात्याच्या धाडी मध्ये नवीन नोटा सापडत असल्याने देशाचे नागरीकच असलेले बँक कर्मचारी हे गद्दारी करीत असल्याचे दिसते,त्यांचीही योग्य चौकशी होईल,बरेच घरी जातील काहींना जबर दंड बसेल. प्रत्येक संशयास्पद खात्याची चौकशी होइल आणी अजुन बराच काळा पैसा जो बँकेत जमा झाला आहे तो सरकार जमा होइल. आम्हालाही नोटबंदी चा त्रास होतोय उधार्या मिळत नाही पण हरामाचा पैसा सरकार जमा होतोय ते बघुन आंनद होतो.

Tax collection higher in April-November 2016 despite demonetisation, says finance minister Arun Jaitley प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे. १. सेंट्रल एक्साईज कर : ३१.६% वाढ : हा उत्पादन (manufacturing) वाढल्यामुळेच शक्य होते. २. सर्विस टॅक्स : १२.४% वाढ : हा सर्विस (सेवा) उद्योगात वाढ झाल्याशिवाय शक्य नाही. ३. VAT भरणाही वाढला आहे. यातला लक्षणिय भाग जुन्या नोटांत असावा असा अंदाज आहे, म्हणजे तो बहुदा ०९ नोव्हेंबरनंतर भरला गेला असावा : ही वाढ विक्रीत वाढ झाल्यावर होऊ शकते. ४. याशिवाय, खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर (अ) उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे आणि (आ) शेतकरी प्रचंड अडचणीत येऊन शेतीची पेरणी धोक्यात आली आहे; या दोन गोष्टी खर्‍या धरल्या तर वरचे वाढीचे आकडे कसे शक्य आहेत. उद्योगधंद्यांनी उत्पादन कमी झाले असतानाही जास्त कर भरला आहे की शेतकर्‍याने सर्व पेरणी उधारीवर केली / त्याला बियाणे, खत इत्यादी फुकट मिळाले ???!!! बेजबाबदार विरोधी राजकीय विधाने करायला पुरावे लागत नाहीत. तसेच, नसलेल्या पैशाचे सोंग आणता येत नाही. यावरून खरे-खोटे काय ते सुजाण लोक जाणतीलच !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 09/01/2017 - 21:11
>>खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. खरीपातील पेरणी पावसाळ्यात करतात असं ऐकून आहे. बाकी टॅक्सचा भरणा जास्त झाला हे पहिल्या काही दिवसांतच दिसले होते. Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे. ही काही उत्पादनवाढ किंवा तत्सम कारणांनी झालेली वाढ नव्हे.

In reply to by नितिन थत्ते

वरचे आकडे माझ्या कल्पनाशक्तीचा अविष्कार नाही, अर्थखात्याने दिलेले आकडे आहेत. Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे. १. हे म्युनिसिपल कर, वीज कंपन्या व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या करांबद्दल, ते कर दिमॉनेटाईज्ड नोटांच्या रुपात भरणा केल्याने, झाले होते अशी बातमी होती, असे वाटते. मूळ दुवा दिल्यास किंवा तो तुम्ही स्वतः वाचून सांगितल्यास जरा स्पष्ट होईल. :) २. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे, हे वाचायला विसरलात का ? पण तरीही, तुम्ही बोलताय म्हणजे मग त्यापुढे भारतिय अर्थमंत्र्यांची आणि भारतीत अर्थखात्याची काय पत्रास म्हणा, अर्थमंत्रीच चूक असणार, नाही का ?! =)) =)) =)) ("चष्मा काढून वाचले असते तर ते सर्व दिसले असते का ?", हा प्रश्न मनात उभा राहीला, पण तो विचारायचा विचार सोडून दिला आहे ;) :) ) तेव्हा, चिल !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 09/01/2017 - 21:54
सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी होणार.... http://www.businesstoday.in/current/economy-politics/gdp-growth-to-decline-at-71-predicts-government/story/243671.html Most private economists have pared India's growth forecast to 6.3-6.4 per cent for the 2016-17 fiscal year, citing the impact of the government's scrapping of high-value bank notes last November, which they reckon would linger for one more year. अर्थात प्रायव्हेट इकॉनॉमिस्ट कोण ठाऊक नाही पण बहुधा परदेशातील असावेत. http://www.hindustantimes.com/business-news/govt-forecasts-economy-losing-momentum-gdp-could-be-lowest-in-3-years/story-cKkCZpjJuWzSZyXWPQ0cRJ.html यातील एक महत्त्वाचे वाक्य... Releasing the data compiled by the Central Statistics Office (CSO), Chief Statistician T C A Anant said the figures for November were available and examined but “it was felt in view of the policy of denotification of notes there is a high degree of volatility in these figures and conscious decision was taken not make projection using the November figure”

In reply to by नितिन थत्ते

मुळ मुद्दे विसरलात काय ? बाजू उघडी पडली की विषय बदलणे अपेक्षितच होते म्हणा =)) =)) =)) पण चला, त्याबाबतचाही गैरसमज थोडासा कमी करूया :) (यानंतरही दिशाबदल केला गेला तर आश्चर्य वाटणार नाही, पण तरीही एक "शेवटचा" प्रयत्न :) ) जीडीपी वेगळा विषय आहे. त्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो... उदा. काळ्या पैश्यांनी खरेदी केल्या जाणार्‍या लक्झरी गाड्या, कोटींमध्ये किंमती असलेल्या सदनिका, जमिनी, सोने, इत्यादींचा खप कमी झाल्यानेही जीडीपी कमी होईल. त्यामुळे होणारी जीडीपी च्या वाढीला "वाढ उर्फ ग्रोथ" पेक्षा अर्थशास्त्रात "सूज उर्फ स्वेलिंग" हा शब्द जास्त योग्य आहे, कारण त्याने काळ्या पैश्याची वाढ होण्याची शक्यता जास्त असूनभाववाढ कमी होणे, नोकर्‍या निर्माण होणे, इत्यादी सामान्य जनतेला उपयोगी परिणाम होण्याची शक्यता नसते. काळ्या पैश्याचे चलन नगण्य झाल्याने कमी होणारी भाववाढ, कमी व्याजदरामुळे वाढलेला घरांचा खप, कमी व्याजदरामुळे उद्योगधंद्यामध्ये झालेली वाढ, इत्यादींमुळे "सूज" गेल्याने झालेली जीडीपी घट पुढच्या "खर्‍या वाढीने" २ ते ३ तिमाह्यांत भरून निघून निघेल; त्याचबरोबर ही वाढ खरी वाढ असल्याने ती नोकर्‍याही निर्माण करेल, जो जनतेच्या फायद्याचा मुख्य मुद्दा आहे. (अ) जमा झालेली/होणार्‍या वाढलेली आयकराची रक्कम व (आ) घरात नकदेच्या स्वरूपात असलेली पण आता बँकात जमा झालेली रक्कम, पाहिल्या तर, सरकारला आणि खाजगी व्यवसायांना सुलभ दराने कर्ज उपलब्ध होणार आहे हे सांगायची गरज नाही, कारण ते आधीच झाले आहे आणि भविष्यात त्यात अजून सुधारणा होत राहील. याचा परिणाम जीडीपी च्या वाढीत तर होईलच पण त्या प्रकारची वाध नवीन नोकर्‍याही निर्माण करेल. १९९१ ते २००३ या कालखंडात जीडीपी वाढ कमी ते मध्यम होती पण नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण मोठे होते. त्याविरुद्ध २००४ ते २०१२ मध्ये जीडीपी वाढ बहुतेक वर्षी उच्च स्तरावर होती पण नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण तुलनेने कीव करण्याजोगे (पॅथेटिक) होते. हे का ? ते समजण्यासाठी खाली एक युपीए च्या हाय जीडीपी ग्रोथ पिरियड मधील एका शोधनिबंधाचा संदर्भ देऊन सुरुवात करू देत आहे.... ECONOMIC GROWTH AND EMPLOYMENT LINKAGES : The Indian Experience बाकीचे असेच संबंधीत सबळ संदर्भ तुम्ही शोधाल आणि त्यांचा अभ्यास करून मगच "जीडीपी व त्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम" अश्या गंभीर मुद्द्यावर प्रतिसाद लिहाल असा आशावाद व्यक्त करतो ! :) यावर तुमच्याकडून काही सबळ पुराव्यांसह काही वाचले की मग आपल्याला जीडीपीसंबंधी दुसर्‍या मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा करता येईल. अन्यथा बेजबाबदार राजकीय वितंडवादामध्ये मला रस नाही. काय म्हणता ?

संदीप डांगे 10/01/2017 - 03:15
डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध प्रश्न आहेत, आशा करतो उत्तरं मिळतील. सदर बातमीत प्रत्येक आकडेवारी देतांना एप्रील-ते-नोव्हेंबर असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ काय? नोटाबंदी ८ नोव्हेंबरला झाली. नोटाबंदीचा दुष्परिणाम-सुपरिणाम-नोपरिणाम बघायचा असेल तर १० नोव्हेंबर ते १० जानेवारी ह्या दोन महिन्यांतली आकडेवारी बघायला हवी असे मला वाटते. जेटलींचे कदाचित वेगळे मत असू शकेल ते माझ्या पेक्षा कैक पटीने हुशार आहेत. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे हे आकडे एप्रिल ते नोव्हेंबर ह्या आठ महिन्यांचे एकत्रित आहेत का? प्रत्येक महिन्याचे आकडे असतात की तिमाही-सहामाही असे एकत्रित आकडे असतात? कर भरणारे दर महिन्याला कर भरतात की तिमाही-सहामाही असे भरतात? असे प्रत्येक महिन्यात किती कर भरला याचे आकडे मिळतील काय? १. सेंट्रल एक्साईज कर : ३१.६% वाढ : हा उत्पादन (manufacturing) वाढल्यामुळेच शक्य होते. २. सर्विस टॅक्स : १२.४% वाढ : हा सर्विस (सेवा) उद्योगात वाढ झाल्याशिवाय शक्य नाही. हा फक्त नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचा आकडा आहे की एप्रिल ते नोव्हेंबरचा ह्या आठ महिन्यांचा? सर्विस टॅक्स व सीईटी भरण्याची नियमित मुदत काय असते? विक्री झाल्यावर पुढच्या महिन्यात भरायची असते की कधी? म्हणजे ऑक्टोबरच्या झालेल्या विक्रीवरचा कर नंतर नोव्हेंबरमधे भरतात की आधीच सप्टेंबरमधे? ३. VAT भरणाही वाढला आहे. यातला लक्षणिय भाग जुन्या नोटांत असावा असा अंदाज आहे, म्हणजे तो बहुदा ०९ नोव्हेंबरनंतर भरला गेला असावा : ही वाढ विक्रीत वाढ झाल्यावर होऊ शकते. ही विक्रीत वाढ 'नोटाबंदीनंतर' झाल्याचे कसे काय सिद्ध होत आहे? वॅट कधी भरतात? माझ्या माहितीप्रमाणे एका महिन्याचा वॅट दुसर्‍या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत भरायचा असतो. कदाचित काळा पैसा खपवण्यासाठी वॅट चा वापर झालेला असू शकतो. पण ह्याचा अर्थ नोव्हेंबर-डिसेंबरात विक्रीत वाढ झाली असा तर होत नाही. अ‍ॅडव्हान्स वॅट म्हणजे विक्री होण्याआधीच कोणी वॅट भरत असेल तर माहित नाही बॉ. नोव्हेंबर-डिसेंबर तसाही धंद्याच्या दृष्टीने उताराचा काळ असतो, दिवाळी झाल्यानंतर तसाही बाजार आळसावतो. (विशेष म्हणजे काही नोटाबंदीसमर्थक धंदा मंदावण्याच्या मुद्द्यावर ह्याचाच वापर करत होते) तेव्हा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कोणत्या लोकांनी खरेदी केली असावी? (पण लोक तर म्हणत होते की कॅश नसल्याने अनावश्यक खर्च टाळले, बचत झाली, गरजेपुरता खर्च केलाय. ) ४. याशिवाय, खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. माझ्या माहितीप्रमाणे खरीप लागवड जुलै-ऑगस्टच्या सुमारास होते. ह्यावर्षी खरीपाचा हंगाम डिसेंबरात होता काय? शिवाय मागच्या वर्षी पावसाच्या अभावामुळे पेरण्यांवर परिणाम झाला होता ह्यावर्षी चांगला पाऊस झाला. जुलै-ऑगस्टच्या खरिपाच्या अवघ्या ६ % वाढीचे श्रेय चांगल्या पावसाला न देता नोव्हेंबरात झालेल्या नोटाबंदीला द्यायचे काय संदर्भ असू शकतात? विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर (अ) उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे आणि >> १. ऑल इन्डिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन (एआयएमो) ही ३ लाख पेक्षा जास्त लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांशी संबंधीत व १३००० प्रत्यक्ष सदस्य असलेली देशातली एक संस्था आहे. ह्यांनी नुकताच एक सर्वे रिपोर्ट जाहिर केलाय . त्यांच्या मते स्पेसिफिकली ह्या दोन महिन्यात ३५% रोजगार कपात व ५० टक्के महसूलात घट झाली आहे. कारणे : कॅशफ्लो नसणे, कॅश काढण्यासाठीचे जाचक नियम, स्टाफ ची गैरहजेरी, भांडवल उभारण्यात आलेला अडथळा, कर्जप्रस्तावांवर काम करण्यात बॅन्कांची असमर्थतता, थांबलेलं रिअल इस्टेट, रुपयाच्या विनिमय दरातली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांमधे भीतीचे वातावरण, निकृष्ट तयारी व जीएसटीबाबत चा संभ्रम. रोजगार व महसूल, दोन्हींमधे येत्या मार्च २०१७ पर्यंत ६० व ५५% कपात अपेक्षित आहे असे नमूद केले आहे. २. ह्युंदाय मोटर्सचे वीपी राकेश श्रिवास्तव यांच्यामते नोटाबंदीनंतर लगेच शोरुममधली ग्राहकांची वर्दळ ४०% टक्क्यांनी कमी झाली तर एकूण विक्रीत २४-२५% घट आली. पण डिसेंबरमधे मात्र मागच्या वर्षीच्या डिसेंबरपेक्षा ५% वाढ दिसली. तरी स्थिती सामान्य होण्यास किमान एक तिमाही जाईल असे ते म्हणाले. महिन्द्रा चे विक्रीचे आकडे मागच्या वर्षीच्या पेक्षा १.५ % घटलेत. अशोक लेलॅन्ड ने १२% घट झाल्याचे जाहीर केले आहे. मागच्या वर्षीच्या १२१५४ युनिट्स च्या जागी यावर्षीच्या डिसेंबरमधे १०७३१ युनिट्स विकलेत. मारुती उद्योग ४.४% घट. बजाज ऑटो २२% घट. बजाज बाईक्स ११% घट. ह्या सर्वांत फोर्ड इन्डिया ने मात्र मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीच्या विक्रीत ६.०४% वाढ नोंदवली. फोक्सवॅगन ने ६८.७२%, निसान इन्डिया ने २१% यमाहा २८% रॉयल इन्फिल्ड ४१% वाढ मागच्या डिसेंबरपेक्षा जास्त नोंदवली आहे. ह्या कंपन्यांना पार्ट्स सप्लाय करणार्‍या कारखान्यांच्या उत्पादनांत मात्र खंड पडला आहे. सर्व ब्रॅण्डच्या बाईक्सच्या विक्रीत मागच्या डिसेंबरच्या तुलनेत ४०% घट आहे. अनेक कारखान्यांना उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. अनेकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. ३. निक्केइ इन्डिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर्स इन्डेक्स) पहिल्यांदाच ५० च्या खाली गेलाय. नोव्हेंबरमधे ५२.३ असणारा हा निर्देशांक ४९.६ पर्यंत खाली आलाय. ५० च्या खाली येणे म्हणजे घट व ५० च्या वर असणे म्हणजे वाढ. निक्केइ च्या मते हे सरळ सरळ उत्पादन घटल्याचे निदर्शक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत हा निर्देशांक सुस्थितीत होता. वरील बातम्या ह्या विरोधी पक्षांनी बनवलेल्या नसून पैशाचे सोंग अजिबात आणता न येणार्‍या बाजारातल्या आहेत. शिवाय त्या "नोटाबंदीनंतर" काय झालं याबद्दल बोलतात. (आ) शेतकरी प्रचंड अडचणीत येऊन शेतीची पेरणी धोक्यात आली आहे; >> वर सांगितल्याप्रमाणे खरीप पेरणी ही नोव्हेंबरात होत नाही. रबीच्या पेरणीवर परिणाम होईल असे सांगितले जात होते. ते आकडे मागच्या वर्षीच्या आकड्यांच्या तुलनेत जास्त आहेत असा सरकारतर्फे दावा केला गेला आहे. मागच्या वर्षी पावसामुळे कमी पेरणी झाली. त्यात ह्यावर्षी चांगला पाऊस. हे दोन मुद्दे रबीपेरणीत गृहित धरणे आवश्यक आहे. नोटाबंदीचा परिणाम चांगला वाईट हे त्यानंतर बघावे लागेल. या दोन गोष्टी खर्‍या धरल्या तर वरचे वाढीचे आकडे कसे शक्य आहेत. शक्य आहेत. नोव्हेंबरात झालेल्या नोटबंदीचा परिणाम एप्रिल ते नोव्हेंबर मधे झालेल्या व्यवहारांवर होणार नाही असे मला वाटते. पण आता माझ्यापेक्षा अर्थमंत्री नक्कीच जास्त हुशार आहेत त्यामुळे कदाचित होतही असावा बुवा! तसेच सातत्याने वाढत गेलेले इंधनाचे दर, त्यावरचा वाढता कर, वाढलेले इतर करांचे दर (सर्विसटॅक्स, वॅट इत्यादी) उद्योगधंद्यांनी उत्पादन कमी झाले असतानाही जास्त कर भरला आहे की शेतकर्‍याने सर्व पेरणी उधारीवर केली / त्याला बियाणे, खत इत्यादी फुकट मिळाले ???!!! एप्रिल-ते-नोव्हेंबरचे आकडे जानेवारीत "नोटाबंदीनंतर झालेली वाढ" असे मांडले की काहीही शक्य असू शकते!!!! नाही का??? चूकभूल देणेघेणे. (सूचना: मी दिलेल्या आकडेवारीच्या लिंका गुगलून लगेच मिळतील.)

In reply to by संदीप डांगे

बातमीचे शीर्षक न वाचता तिच्यातला मजकूरही वाचला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मेगॅबायटी प्रतिसादाला अजिबात हरकत नाही... पण किमान तो दिलेला दुवा वाचून त्यावरचा प्रतिसाद लिहिला तरच काही अर्थ आहे ! ते करा मग पुढे चर्चेला अर्थ असेल :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 10/01/2017 - 11:38
माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत! फार साधे प्रश्न आहेत, उत्तर नसेल तर राहुद्या पण केवळ शीर्षक वाचले असा आरोप करू नका! धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!

त्याच (माझ्या दुव्यात दिलेल्या) बातमीतले संबंधीत परिच्छेद, तुमच्या सोयीसाठी खाली कॉपी केलेले आहेत. त्यातील संबंधित मजकूराचे मराठी भाषांतरही माझ्या मूळ प्रतिसादात दिले होते... खालच्या इंग्लिश मजकूरातील December हा शब्द मूळ बातमीतलाच आहे याची कृपया नोंद घ्यावी...

According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. आता तुमच्या वरच्या दाव्यावर मी अजून काही लिहायला हवेच का ???!!! :O: असं बघा डांगेसाहेब, तुमच्या पद्धतीने वाचन, विचार, तर्क आणि चर्चा मला करता येत नाही असे समजून, तुम्ही माझ्याकडे आणि मी तुमच्याकडे दुर्लक्ष करूया. कसे ? निदान मी तरी यापुढे तसे करणार आहे, तेव्हा गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाकी, नजिकच्या भविष्यात (दोन-तीन तिमाह्यांमध्ये) तुम्ही फार पूर्वी म्हटल्याप्रमाणे तुमच्या ओळखीच्या जाणकारांशी म्हटल्याप्रमाणे "या कारवाईत मारून ठेवलेल्या पाचरींचे" परिणाम स्पष्ट होऊ लागतील व एक एक शंका दूर होऊ लागतीलच ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 10/01/2017 - 18:48
खरोखर माझा मेगाबायटी वाचला असता संपूर्ण तर असा प्रतिसाद खरंच दिला नसता. तेवढा तुमच्या वाचन, विचार, तर्क यावर माझातरी विश्वास होता. तर विषय आहे उद्योगधंदे व बाजारावर नोटाबंदीचा परिणाम. त्या अनुषंगाने उद्योगधंद्यांवर परिणाम झाला नाही अशा अर्थाचा आपण वरिल आकडेवारीवाला प्रतिसाद दिला होता. करसंकलन चे आकडे वाढले म्हणजे उद्योगधंदे वाढले असे सरसकट नसते. इथे फक्त डिसेंबर महिन्याचा उल्लेख झाला म्हणजे सर्व सोपं नाही झालं डॉक्टरसाहेब. त्या डिसेंबरात कोणते कर भरल्या गेले, कधी भरल्या गेले, कोणत्या महिन्याचे भरल्या गेले हेही बघायला लागतं. त्यासंबंधी मी वर काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर्षीच्या पेट्रोलपासून (वाढलेल्या दरांपासून) सर्व बाबतीत लागू झालेल्या नवीन करांमुळे, वाढीव करांमुळे, आधी टॅक्सेबल नसलेल्या क्षेत्रांमधे कर लागू केल्याने, सेवाकराचे १२.५% चे १५% केल्यामुळे, वॅट ५ पासून ५.५% केल्यामुळे. हॉटेल्सवर ५ चा ८% वॅट केल्याने, जुन्या नोटांमधे करांची थकबाकी भरल्याने मागच्या डिसेंबर पेक्षा ह्या डिसेंबर मधे फरक दिसेलच. नो डाऊट. त्याचे कारण मी दुसर्‍या एका प्रतिसादात वेगवेगळ्या बातम्या दिल्यात त्यात आहे. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान झालेल्या रुपयाची घसरण आणि शेअरबाजारातल्या दोन्ही निर्देशांकाकडेही बघायचे आहेच. तसेच दोनवेळा झालेली इंधनदरवाढीनेही नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरच्या करात किती वाढ केली हेही बघायला लागेल. फक्त सरकारला कर मिळाला म्हणजे सर्व आलबेल आहे असं नसतं. सरकारची आकडेवारी असली तरीही नीट तपासून टॅली करुन पाहावी लागतेच. बाकी सर्वांना माहित आहेच स्टॅटिस्टीक्स कसे वापरले जातात ते. आता कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असे कोणीतरी मागे कधीतरी बोलत होते. इथे तर देशाच्या पर्यायाने आपल्या सर्वांच्या हक्काच्या पैशाचा प्रश्न आहे. विश्लेषण झाले पाहिजेच. बाकी, अगदी खरीपाच्या प्रश्नालाही आपण बगल दिली आहे, तुमच्यामते खरीपाची पेरणी नोटाबंदीनंतर झाली असेल तर खरेच तुमच्या माझ्या वाचन, विचार, तर्क आणि चर्चा करण्याच्या पद्धतीतली ही तफावत मिपाकरांना संशयास्पद वाटू नये म्हणजे मिळवली. फार सरळ-साधे प्रश्न मी विचारले होते वर. आता दुर्लक्ष करण्याबद्दल का बोलत आहात तेही इथल्या सूज्ञ, सुजाण मिपाकरांना कळत असेलच. कॄपया गैरसमज नकोत, कोणत्याही प्रकारे 'उत्तरे द्याच नाहीतर अमूक मान्य करा' असा पवित्रा मी घेणार नाही. तुम्हाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे. धन्यवाद! ------------------------------------------------------------------------------------------------- सूज्ञ, सुजाण मिपाकरांनो, कृपया तुम्हीतरी माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल काय? करसंकलन इत्यादींबद्दल जाणकारांना माझी विनंती आहे जेटलीसाहेबांनी दिलेले आकडे समजून घेण्यात माझ्यासारख्या अजाण मिपाकरांना मदत करा.

In reply to by संदीप डांगे

(?चष्मा लावल्याने) मी दिलेल्या दुव्यातला "डिसेंबर" दोनदा सांगूनही दिसला नाही... व ते परिच्छेद कॉपी करून दाखविल्यावरही तिकडे दुर्लक्ष केले गेले आहे असेही दिसून आल्याने, पुढच्या चर्चेत अर्थ नाही... असे मला वाटते. सोईचे दिसणे/ न दिसणे, मुद्दा भरकटवणे, इत्यादी सतत होत असल्याने व असे वितंडवाद करण्यात मला अजिबात रस नसल्याने, मी अश्या प्रतिसादांना फाट्यावर मारण्याचा माझा हक्क राखून ठेवलेला आहे... थोडक्यात, राम राम... असाही त्याचा अर्थ होतो. यापेक्षा जास्त इस्काटून सांगणे मला शक्य नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 10/01/2017 - 23:24
म्हात्रेसाहेब, "चष्मा लावल्याचे आरोप करणे, मुद्देसूद व आकडेवारीसकट प्रतिवाद करुनही हे वाचलं नाही ते दिसलं नाही अशी बतावणी करणे, मुद्दे भरकटवल्याचे, वितंडवाद, सोयिस्कर दिसते" वगैरे सोयिस्कर पवित्रे आता सवयीचे झाले आहेत.हे तेव्हाच होतं जेव्हा प्रतिपक्षाकडे मुद्दे नसतात. त्यात नवीन काहीही नाही. आधी आपण 'सबळ पुरावे हवेत, तर्कावर आधारित मांडणी हवी' वगैरे भव्यदिव्य शब्द वापरुन प्रतिसाद देत होतात. आता तेच सर्व दिल्यावर 'मेगाबायटी प्रतिसाद, वितंडवाद 'वगैरे हिणवण्याचा प्रयत्न करत आहात. 'हे वाचलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं' असे बेलाशक ठोकून देत आहात. तुम्हाला चर्चा करायची नसेल तर ठिक आहे पण प्रतिपक्षावर असे बिनबुडाचे मनगढंत आरोप करुन स्वत:ची पलायनवादी भूमिका मुत्सद्दीपणा असल्याचे दाखवणे आपल्यासारखे तत्त्वनिष्ठ व्यक्तीने करणे याचे मला आश्चर्य वाटले आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः ह्या उक्तीप्रमाणे एकवेळ 'आकडेवारी जमवणे व त्यातले सत्य पडताळून पाहणे हे वेळखाऊ व मोठे काम आहे, मी यातला तितकासा जाणकार नाही, ह्यात वेळ लागेल व इतर जाणकारांचीही मदत घेऊन यावर चर्चा करुया' असे सांगून आपण माघार घेतली असती, किंवा महिनाभरानंतर ह्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली असती तर खरंच तुमच्याबद्दल आदर वाढला असता व तुम्ही जी नेहमी स्वतःच्या तत्त्वांची भलामण करता त्यातला खरेपणाही दिसला असता. मुद्दे नाहीत म्हणून प्रतिपक्षावर प्रच्छन्न आरोप करुन, हिणवून आपली पडती बाजू झाकणे हे अजिबात पटलेले नाही. तुम्ही राम राम नंतर ठोका, तुमच्या तर्कबुद्धीने मला खाली प्रश्नांची उत्तरे एकदाची द्याच. कारण तुम्हीच ती विधानं आरोप म्हणून केली आहेत. त्याचे उत्तर मिलणे आवश्यक आहे, नाहीतर सुजाण मिसळपावकरांना कसे समजेल? (?चष्मा लावल्याने) मी दिलेल्या दुव्यातला "डिसेंबर" दोनदा सांगूनही दिसला नाही... व ते परिच्छेद कॉपी करून दाखविल्यावरही तिकडे दुर्लक्ष केले गेले आहे असेही दिसून आल्याने माझ्या ह्या दोन-तीन प्रतिसादांमधे नेमके कुठे तुम्हाला ^^ हे दिसून आले/जाणवले ते अधोरेखित/स्पष्ट करण्याची कृपा करा. दुसर्‍या प्रतिसादात तर डिसेंबरला धरूनच पूर्ण प्रतिसाद आहे. अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. माझ्या पूर्ण प्रतिसादात डिसेंबर कितीवेळा आलाय मोजा बरं! पाचवेळा आहे. वाचलंय आपण, तरीही...? सोईचे दिसणे/ न दिसणे, मुद्दा भरकटवणे, इत्यादी सतत होत असल्याने व असे वितंडवाद वरील तिन्ही गोष्टी माझ्या तीन्ही प्रतिसादात नेमक्या कुठे झाल्या याबद्दल स्पष्टिकरण द्याल? बाकी कोणता चष्मा लावल्याने खरिपाची पेरणी नोव्हेंबरानंतर झाल्याचे दिसली असावी याचा विचार करतोय. निष्पक्ष असणार्‍यांना इतकी धादांत चूक पुढे येऊन मान्य करायला इतके का जड जात आहे हे मिपाकरांना समजले असेलच! हा प्रतिसाद आठवतोय.

In reply to by संदीप डांगे

माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत! दोन तीनदा दुव्याकडे लक्ष वेधले असतानाही हे कोणी लिहिलेले आहे ???!!! अश्या चष्मेबहाद्दूर खोदकामाच्या संशोधनाच्या पायावर उभे असलेले प्रतिसाद वाचायची आणि परत परत त्यांचे खंडन करायची तसदी घेण्यासाठी मला वेळ नाही. तेव्हा अगोदर म्हटल्याप्रमाणेच, तुम्ही तुमच्या संशोधनाची पद्धत चालू ठेवून कितिही-बायटी लेख-प्रतिसाद लिहायला मोकळे आहात... मात्र, मी दर वेळेस त्यांच्यावर उत्तर देऊन वितंडवाद चालू ठेवायला कळत-नकळत मदत करेन, अशी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. कृपया, हे सुद्धा वारंवार सांगायला भाग पाडू नका. राम राम !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 11/01/2017 - 14:58
बोअरींग असला तरी हा प्रतिसाद वाचावा अशी मी सर्व वाचकांना विनंती करतो. मी जे काही प्रतिसाद लिहिलेत ते आपण सपशेल नाकारत आहात त्यामुळे खरंच तुम्ही माझे प्रतिसाद वाचले असूनही उत्तर नाही म्हणून टाळत आहात असे दिसते. तरी इथे मिपावर होणार्‍या चर्चा ह्या कायमस्वरुपी राहत असल्यामुळे व भविष्यात वाचक हे वाचणार असल्यामुळे मी आपण करत असलेले आरोप खोडून काढणे माझी जबाबदारी समजतो. सुजाण मिपाकरांसाठी ते करणे आवश्यक आहे. वितंडवाद म्हणून प्रतिपक्षावर गैर आरोप करणे बंद होईल तो सुदिन! म्हात्रेसाहेबांनी दिलेली बातमी संपूर्ण इथे देत आहे व त्यास माझे खंडनही लिहित आहे. किमान ह्यावरुन तरी म्हात्रेसाहेबांकडे उत्तर नसल्याने माझ्या मूळ तीन प्रतिसादाकडे मेगाबायटी म्हणून हिणवल्याचे दिसेल. १. the collection of both direct and indirect taxes is up in April-November 2016, from the comparable year-ago period, finance minister Arun Jaitley said today while releasing advance estimates. साधारण इंग्रजी ज्याला समजतं त्याला वर हे आकडे एप्रिल-नोव्हेंबरचे आहेत हे दिसेल. २. "Those reports and figures (saying tax collection would go down) were all panic numbers, the numbers I'm giving you are real. Even economic affairs secretary kept saying there was no need to panic," Jaitley said. जेटली इथे म्हणतात करसंकलन ढेपाळेल असे रिपोर्ट्स आले ते सगळे पॅनिक नंबर होते, मी देत असलेले आकडे खरे आहेत. गंमत म्हणजे पॅनिक नंबर्स हे नोटाबंदीनंतर होणार्‍या परिणामांची उहापोह करणारे तर जेटलींचे नंबर नोटाबंदीआधीच्या काळातले आहेत. जेटलींचे कॅलेंण्डर उलटे चालत असावे. ३. For April-November 2016, overall direct tax collection is 12.01 percent higher than in the same period in 2015. Overall collection of indirect taxes is up as much as 25% in April-November 2016, from the comparable year-ago period. इथे ही ते एप्रिल-नोव्हेंबरचाच आकडा देत आहेत. ४. Of the total tax collected in April-November 2016, central excise tax collection is up 43 percent, service tax collection is up 23.9 percent and customs duty tax collection is up 4.1 percent. All these increases are from taxes collected in the year-ago period. इथे ही ते एप्रिल-नोव्हेंबरचाच आकडा देत आहेत. ५. According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. हां, इथे हा तो जगप्रसिद्ध डिसेंबर महिन्यातल्या करसंकलनाचा आकडा. ज्याकडे दुर्लक्ष केल्याचा म्हात्रेंचा दावा आहे. पण ह्यासंबंधी तर मी एक पूर्ण प्रतिसाद स्पेष्यलमधे लिहलाय. वर वाचून घ्यावा. डिसेंबर १६ पेक्षा डिसेंबर १६ चे करसंकलन जास्त असेल हे साधार वर मांडले आहे. त्यात उद्योगधंद्यावर नोटाबंदीचा झालेला विपरित परिणाम दिसणार नाही. म्हात्रेसाहेबांची बातमी देण्यामागची भूमिका "नोटाबंदीचा उद्योगधंद्यावर कोणताही परिणाम झाला नाही" अशी होती हे विशेष लक्षात घ्यावे. ६. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. इथे ह्याच मुद्द्यावर मी प्रश्न विचारलेला की सीईटी भरण्याची मुदत व पद्धत काय असते. काय तो रोज भरतात, आठवडा, पंधरवड्याला भरतात, महिना, तिमाही, सहामाहीला भरतात? ह्याचे उत्तर मिळालेले नाही. इथेही या डिसेंबरची तुलना मागच्या डिसेंबरमधे केली जिथे इंधनाचे दर, करआकारणी ह्यात खूप तफावत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सर्विसटॅक्स वाढवलेला आहे अडिच टक्क्यांनी हेही लक्षात घ्यायचे आहे. ७.In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. म्हात्रेसाहेबांच्या माझ्यावरच्या "दुर्लक्ष करत आहात, सोयीचे बघता" ह्या आरोपाचे व उत्तर न देण्याच्या भूमिकेचे मूळ इथे दडलेलं आहे. इथे म्हटलंय की अप्रत्यक्ष करसंकलनाचे प्रमाण मागच्या महिन्यापेक्षा १२.८ टक्क्यांनी वाढले आहे. सरकारकडे अप्रत्यक्ष कर ज्या महिन्याचे त्याच महिन्यात भरले जतात का? ह्यात इंधनावरचे वाढलेले कर व दर धरलेत काय? पेट्रोलपंपांवर जुन्या नोटा चालत होत्या म्हणून गरज नसतांना हजार-पाचशेचं पेट्रोल टाकायला भाग पडल्याने, काळापैसा पेट्रोलच्या माध्यमातून वळवून घेतलेला असल्याने, अप्रत्यक्ष करांची वाढ दिसण्याची शक्यता आहे. तसेच कॅश नसल्याने कॅशलेस ट्रॅझॅक्शन्स ३००% पर्यंत वाढली हे ही बघायला हवे. त्यातून झालेले करसंकलन मोजावे लागेल. ह्या आकड्यामागे अनेक संदर्भ असल्याने ह्याचे विश्लेषण आवश्यक आहे असे माझे मत आहे. रुपयातली घसरण, निर्देशांकांची घसरण, बाजारातले अहवाल, उद्योगक्षेत्रातल्या अनेकांच्या प्रतिकूल मुलाखती, 'धंद्यावर तात्पुरता परीणाम आहे पण पुढे नीट होइल' असे म्हणणारे दिग्गज उद्योगपती, कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढीत घट, रोख नसल्याने अनावश्यक खर्चांना आवर घातला सांगणारे सामान्य लोक, बंद पडलेल्या कारखान्यांच्या बातम्या, आपाअपल्या गावी परतलेल्या मजुरांच्या बातम्या, मनरेगाच्या मजुरांमधे अचानक झालेली ३००% वाढ, बॅन्कांमधे कॅश नसल्याने रोख व्यवहार करायला आलेल्या अडचणी, इत्यादी सर्व सत्य पुढ्यात असतांना हा करसंकलनाच्या वाढीचा आकडा विसंगत वाटत आहे. ८. "In November, it was being suggested that the demonetisation impact+ would be more in December, but even indirect tax collection rose," the minister said. जेटली साहेब फक्त करसंकलनाचेच आकडे धरुन बसलेत, त्यामागच्या करामती बघायला तयार नाहीत. शेवटी ते देशातल्या अग्रगण्य वकिलांपैकी एक आहेत. ९. From preliminary data available for November, the minister said that VAT collection from states also increased in November 2016, compared to the year-ago period. ह्या आकड्यातही गडबड आहे. ह्यावर सविस्तर विश्लेषण गरजेचं आहे. अनेक राज्यांनी आपले वॅट स्ट्रक्चर बदलले आहे व वॅटच्या आकारणीतही वाढ झाली आहे. १०. "Another thing to remember, the collection estimate for November 2016 - when taxes could be paid in old currency - indicates that VAT must have been paid in old currency. So VAT collection is also up post demonetisation," Jaitley said. जेटली साहेबांनी इथेही मस्त धूळफेक केलीत. काळापैसा खपवायला लोकांनी जुन्या नोटांमधे वॅट भरला असे म्हटले आहे. हे नक्की कसे घडले असेल हे इथे तज्ञांच्या मते. वॅट भरायला लागतो तो ऑक्टोबरमधे झालेल्या विक्रीचा नोव्हेंबरच्या २१ ला, नोव्हेंबरचा २१ डिसेंबरला. म्हणजे विक्री झाल्याचे ऑक्टोबर नोव्हेंबरमधे दाखवायला लागेल खोट्याबिलांसह. तसेच अनेक स्थानिककर ही जुन्या नोटांमधे भरले गेलेत. ह्या माहितीत तथ्य जरी असले तरी करसंकलन झाले ते काळ्यापैशाने, उद्योगधंदे-व्यापार वाढल्याने नाही हे स्पष्ट आहे. अजुनही म्हात्रेसाहेबांना मी दुर्लक्ष करुन सोयीचे वाचले असे म्हणायचे असेल तर ते निश्चित म्हणू शकतात. म्हात्रेसाहेबांनी जेटलींच्या आकड्याच्या आधारे उद्योगधंद्यावर परिणाम झाला ही विरोधकांची खोटी बोंबाबोंब आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला, तो दावा खोडून काढण्याचा मी यथाशक्ती, यथाबुद्धी प्रयत्न केला. आकडेवारी, विश्लेषण व खोदकाम असल्याने हे सर्व कंटाळवाणे असू शकते पण दुसर्‍यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा हे केलेलं केव्हाही चांगले. बाकी पब्लिक सब जानती है!

In reply to by संदीप डांगे

मलाही जेटलींचे आकडे खोटे नसले तरी संयुक्तिक वाटत नाहीयेत. याला कुठला दुसरा अँगल असला तर जाणकारांनी इथे मांडल्यास मदत होईल.

In reply to by संदीप डांगे

(मूळ प्रतिसादातील मुख्य मुद्द्याचा "डिसेंबर" हा शब्द तीनदा नजरेस आणूनही तो बघायचे टाळल्यामुळे) जो बुंदसे गयी वो (मेगॅबायटी प्रतिसादांच्या) हौदसे नही आती !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 13/01/2017 - 09:27
फॅक्ट आणी फिगर्स असलेल्या मेगाबायटीला सतत हिणवण्यापेक्षा हौदा हौदाने गेलेली कशी परत आणायची ह्याचा विचार केल्यास बरा दिसेल! आकडेवारी, सबळ पुराव्यांमुळे उघडे पडल्याने दुसर्‍यांना कसंनुसं हिणवण्याशिवाय काही न करता येण्यामागचे कारण हे इथल्या मिपाकरांना आता चांगलेच समजले असेल.

संदीप डांगे 10/01/2017 - 04:12
काही खास आकडेवारी: १. दिनांक १० डिसेंबर २०१६ ची बातमी आहे ही. म्हणजे नोव्हेंबरातल्या विक्री-उत्पादनांचा तसा काही संबंध नसावा. The central government’s direct tax collections increased 15.1 per cent in April-November 2016 compared with the same period a year earlier, while indirect tax collections rose 26.2 per cent in the same eight-month period. However, total indirect tax receipts during November 2016 were 13.9 per cent lower than the collections seen in October 2016. Within direct taxes, net corporate income tax collections grew 8.75 per cent during April-November 2016 while net personal income tax collections grew 23.9 per cent over the same period of the previous year. Within indirect taxes, net central excise collections stood at Rs.2.43 lakh crore in the period between April and November 2016 as compared with Rs.1.69 lakh crore during the corresponding period in the previous financial year, a growth of 43.5 per cent. “If demonetisation happens on November 9, people cannot stop production from November 9 and 10,” M.S. Mani, Senior Director at Deloitte India, said in a telephone interview. “Whatever is there in the cycle, all the raw materials have to get consumed. Goods will get produced and will get dispatched,” he said. “If there is excess stock on account of demonetisation, that will lead to a reduction in production with a two-month delay,” Mr. Mani added. “So the November effect, to my mind, will be felt in January.” http://www.thehindu.com/business/Direct-tax-collections-rise-15-indirect-tax-collections-up-26/article16787015.ece २. दिनांक ९ जुलै २०१६: नोटाबंदीचा 'न' कोणाला माहित नसतांनाची बातमी. एप्रिल ते जून २०१६ या तिमाहीचे एप्रिल ते जून २०१५ च्या तुलनेत वाढलेले आकडे. “The main reason for this increase is the change in the requirement for advance tax payment in respect of individuals made in last Budget. Earlier, there were three installments to be paid by individuals in the month of September, December and March. Now individuals are supposed to pay four instalments of advance tax in June, September, December and March. June installment is 15 per cent,” Adhia said. http://indianexpress.com/article/business/economy/direct-tax-collection-up-25-in-q1-2017-indirect-up-31-2902380/ ३. नेहमीच दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा सर्व प्रकारच्या करांच्या कलेक्शनमधे कशी वाढ-घट होते हे दर्शवणारा तक्ता. १९८१ ते २०१२ पर्यंतचे आकडेवारी. http://portal.indiainfoline.com/datamonitor/Public-Finance-Annually/Central-State-Govt-Finance-Combined/Direct-and-Indirect-Tax-Revenues-of-Central-and-State-Governments.aspx ४. काही जुन्या बातम्या: १८ फेब्रुवारी २०१४. आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या बजेटनंतर. करसंकलनध्येय ७७,००० करोड ने हुकलं, कॉन्ग्रेसच्या राज्यात. पी चिदंबरम अर्थमंत्री. The interim Budget documents laid in Parliament by Finance Minister P Chidambaram today showed that the finance ministry has failed to achieve the targets in direct and indirect taxes as laid out in BE. The government had set a Budget target of a 19-per cent jump in the tax mop-up this year too, but the collections as on March 31, 2014 are projected to show only a 11.6-per cent growth as per RE with GDP growth slowing down. Asked whether the next year target of 19 per cent growth was too ambitious, the finance minister said that the targets are always set high at the beginning of the year to encourage higher tax collections. ५. त्यानंतरच्या २०१४-१५ च्या भाजपच्या राज्यात. करसंकलन ध्येय ६९ हजार करोड ने हुकलं. तरी २०१३-१४ च्या तुलनेत करसंकलन १९% टक्क्यांनी वाढले. http://www.thehindubusinessline.com/economy/direct-tax-collection-falls-short-by-14-in-201415/article7167232.ece ६. आर्थिक वर्ष २०१५-१६: भाजपच्या राज्यात करसंकलनाचे ध्येय पूर्ण तर केलेच त्यावर ५००० करोड अतिरिक्त मिळवले. अभिनंदन. The indirect tax revenue exceeded budget estimates (BE) for 2015-16 by Rs 65,618 crore and the RE by Rs 9,885 crore. The collection represents a growth of 31.1 per cent over 2014-15. The direct tax collection, however, is lower than the RE of Rs 7.52 lakh crore. The realisation was 7.61 per cent higher than 2014-15 receipts. http://www.financialexpress.com/economy/at-rs-14-60-lakh-crore-tax-collection-in-2015-16-exceeds-target-by-rs-5000-crore/233410/

संदीप डांगे 10/01/2017 - 04:31
पेट्रोलच्या किंमतीत मूळ किंमतीपेक्षा टॅक्स जास्त. ६० रुपयाच्या पेट्रोलमधे ३१ रुपयांचा निव्वळ कर. http://www.financialexpress.com/economy/taxes-exceed-actual-cost-of-petrol/163469/ 1 http://www.mycarhelpline.com/index.php?option=com_latestnews&view=detail&n_id=417&Itemid=10 इंधनांच्या सदर दरवाढीचा, करवाढीचा एकूण करसंकलनावर किती परिणाम झालाय याचाही विचार व्हावा. तसेच पेट्रोलपंप वर इंधनासाठी जुन्या नोटा चालत होत्या हेही लक्षात घेतलं पाहिजे.

http://timesofindia.indiatimes.com/india/13-cooprative-banks-deposited-rs-1600-crore-in-banned-notes/articleshow/56464717.cms?utm_source=toiandroidapp&utm_medium=Email&utm_campaign=list १. नोव्हेंबर १६ ते २१ या कालखंडात १३ कोऑपरेटिव्ह बँकांनी तब्बल १५९६ कोटी रुपये रद्द झालेल्या रु५०० आणि रु १००० च्या नोटांत मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा केले आहेत. २. अजून एका को-ऑप बँकेने रिझर्व बँकेकडे असे रु१४०० कोटी जमा केले आहेत. ३. सुरतेतल्या एका को-ऑप बँकेने असेच रु२० कोटी बँक ऑफ बरोडामध्ये जमा केले आहे. या बँकांना ९ नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्विकारायला बंदी होती. तर मग इतके रद्द चलन ०९ ते २१ नोव्हेंबर या कालखंडात त्यांच्याकडे कसे आले याची अर्थातच चौकशी होईलच. ते चलन ०८ नोव्हेंबरपूर्वी जमा झालेले असेल तर ०८ नोव्हेंबरच्या पंतप्रधानांच्या भाषणानंतर इतकी मोठी रक्कम इतके जास्त दिवस त्यांनी स्वतःजवळ का बाळगली या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, जे कठीण आहे हे कोणीही सांगू शकेल. भविष्यात अजून असे प्रकार पुढे येतील यात वाद नाही कारण अश्या सुमारे ३०० बँका ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, या घटना "को-ऑप बँकांना जुने चलन स्विकारायला परवानगी नाकारली" म्हणून विरोधाचा आवाज उठवण्यार्‍या मनमोहन सिंगसाहेबांसकट सगळे जण उघडे पडले आहेत यात वाद नाही. "माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ञ व माजी आरबीआय गव्हर्नर" असलेल्या मनमोहनसिंग इतका प्राथमिक स्तराचा अंदाज नव्हता यावर विश्वास बसत नाही असे मी अगोदर लिहिले होते. त्यांचे राज्यसभेतले भाषण चलाख राजकारण्यांनी लिहून त्यांना वाचायला भाग पाडले असे आजही माझे मत आहे. चुकीच्या राजकारण पाय गुंतले की भल्या भल्यांचे कसे पतन होते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शहाण्याने त्या फंदात पडू नये आणि चूक झाली असेल तर संधी आहे तोवर सुधारून घ्यावे हेच अंतीम भल्याचे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 11/01/2017 - 14:45
चिल माडी....... सहकारी बँकांना नोटा स्वीकारायला बहुधा बंदी नव्हती. नोटा बदलून द्यायला बंदी होती. आणि मेनली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बंदी होती. आमच्या सोसायटीने चार हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात डिसेंबर महिन्यात ठाणे जनता सहकारी बँकेत भरले आहेत (पे स्लिप हवी असल्यास दाखवीन). तेव्हा सहकारी बँकांनी जे पैसे जमा केले आहेत ते लेजिटिमेट असू शकतील. उशीरा भरले म्हणजे ते काळे असणार वगैरे निष्कर्ष काढण्यासारखी परिस्थिती नाही. तीन ते पाच लाख कोटी रुपये काळे असल्याने बँकांत जमा होणारच नाहीत असे समजणारे उघडे पडले. सुरुवातीच्या काळात "केवढाच्या केवढा ट्याक्स महापालिकांकडे जमा झाला" म्हणून टाळ्या पिटल्या. त्यात किती प्रमाणात काळा पैसा आला असेल याचा अंदाज करणे शक्य नाही. मनमोहनसिंग काही उघडे वगैरे पडले नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द नोटा कोऑप बँकांमध्ये ०९ नोव्हेंबरनंतर कश्या आल्या असाव्यात ? हा प्रश्न तुमच्या मनात आला नसेल, त्यामुळे तुम्ही केलेला विनोद तुमच्याच ध्यानात आला नाही बहुतेक. थोडे थांबले की चौकशीत बाकी सगळे मुद्दे बाहेर येतील तेव्हा नक्की काय झाले ते कळेलच, तेव्हा बघू. आता तरी ते संशयास्पद आहे याबद्दल संशय नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 11/01/2017 - 22:31
तुम्ही मुळात सहकारी बँकांना बंदी होती असे म्हणालात. ते गृहीत धरून त्यांनी पैसे नोव्हेंबरात जमा केले म्हणजे ते बॅक डेटेड जमा केले असे पुढचे तर्क चालवलेत. तुमच्या मूळ गृहीतकालाच सुरुंग लागून सुद्धा तुम्ही गडाबडा लोळलात म्हणून आश्चर्य वाटले. >>तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द नोटा कोऑप बँकांमध्ये ०९ नोव्हेंबरनंतर कश्या आल्या असाव्यात ? हा प्रश्न तुमच्या मनात आला नसेल, त्यामुळे तुम्ही केलेला विनोद तुमच्याच ध्यानात आला नाही बहुतेक. १५०० कोटी रुपये काही फार नाहीत. अनेक सहकारी बँका खूप मोठ्या आहेत.

In reply to by नितिन थत्ते

सहकारी बँकांना नोटा स्वीकारायला बहुधा बंदी नव्हती. नोटा बदलून द्यायला बंदी होती. आणि मेनली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बंदी होती. बरोबर आहे. फक्त जि.म. स.बँकांना केवायसी पुर्ण नसल्यामुळे बंदी होती. सहकारी बँकांवर आरोप करणारे २००० च्या नवीन नोटांना खासगी बँका व सरकारी बँकांतून पाय फुटले होते हे सोइस्करपणे विसरत आहेत.

In reply to by मार्मिक गोडसे

एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणे चूक असते. माझ्या मते दोन्ही गोष्टी चूक आहेत आणि दोघांचीही कसून चौकशी करून दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित 08/12/2016 - 15:19
या जगात, सर्वच लोकांना सर्वकाळ समाधानी ठेवणे, कोणालाच शक्य नसते. म्हणजे काही लोकांनाच काही काळ समाधानी ठेवता येऊ शकतं. आणि त्यांच्या समाधानातच समस्त लोकांचे समाधान अवलंबून असते.

In reply to by नितिन थत्ते

हे भारीच ! असा कोणताही संभ्रम कोणाच्याही मनात नाही. हे तर त्याहून भारी!

वरुण मोहिते 08/12/2016 - 14:38
कॅशलेस करणार तर २००० च्या नोटा का आणल्या??? कमीत कमी किमतीच्या नोटा ठेवा . आधीच कॅशलेस च्या जाहिराती द्या . असे कित्येक उपाय . सगळ्या नोटा परत येत आहेत १००० २० ५०० ५० च्या . २००० च्या तर आलेल्या आहेत . मग कॅशलेस कस आहे ???

In reply to by वरुण मोहिते

१. रु२००० च्या नोटा तात्कालीक उपाय (महामार्ग बनवताना वापरलेले डायव्हर्शन) आहे याची मिपावर बरीच चर्चा झाली आहे, ती इतक्यात विसरलात ?! का या चर्चेत ते एक डायव्हर्शन परत वापरत आहात ?? :) २. "कॅश-लेस" आणि "लेस-कॅश"चे लेखातले विष्लेशण परत वाचलेत तर "नोटा अजून का आहेत?" याचे उत्तर मिळेल. सगळा लेखच त्यासाठी लिहिलेला आहे !!! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 14:53
लेस कॅशमध्ये मोठे व्यवहार कॅशलेस आणि लहान व्यवहार कॅशने असे असायला हवे. पण २००० च्या नोटा छापून त्यावर पाणी ओतले आहे. २००० च्या खालोखालची नोट १०० ची आहे वीसपट लहान. (पाचशेची नोट एक महिन्यानंतरसुद्धा मला अजून मिळालेली नाही).

In reply to by नितिन थत्ते

पण २००० च्या नोटा छापून त्यावर पाणी ओतले आहे. हे पाणी कसे ओतले गेले नाही यामागे प्रकल्पाचे विशेष व प्रकल्पांतील कन्स्ट्रेन्स कसे कारणीभूत आहेत हे समजावून घायचे असेल तर मिपावरचीच त्यासंबंधी झालेली चर्चा वाचून ते समजेल. इथे त्यांची पुनरुक्ती अस्थानी होईल. जुनेच चावून चोथा झालेले मुद्दे इथे उकरून चर्चा भरकवटली नाही तर बरे होईल. सहकार्यासाठी आगावू धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 16:23
त्या चर्चेचा बेस जी अर्थवांती होती त्या वांतीच्या उद्गात्यांनीसुद्धा हात वर केलेत म्हणे.

In reply to by नितिन थत्ते

lakhu risbud 09/01/2017 - 20:59
ओ थीतीन नत्ते चच्या तुमी म्हणताय म्हंजे अर्थवांती च शब्द योग्य असेल. भक्तमंडळी अर्थक्रांती वगैरे चुकीचे शब्दप्रयोग करत असावेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल या लेखात नोटाबंदी कारवाईचे "देशपातळीवरचा अतीगुप्ततेची जरूर असलेला प्रकल्प" या दृष्टीने विश्लेषण केले आहे. त्याच्यावरच्या चर्चेतही काही अधिक मुद्दे आले आहेत. बघा काही बोध होतो का ते. मात्र, ती धुणी, इथे नाही तिथेच धुतल्यास बरे होईल. काय म्हणता ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 16:53
त्या वेळी जे उद्देश सांगितले होते ते आता व्हॅलिड राहिलेले नाहीत. त्या ऐवजी त्यावेळी न संगितलेल्या उद्देशाचा नवा फंडा आला म्हणून नवी चर्चा.

In reply to by नितिन थत्ते

तुम्ही पहिल्यांदा "रु२००० ची नोट का काढली ?" हे विचारले होते, त्याचे उत्तर वरच्या दुव्यात आहे, तेव्हा तो दुवा नुसता बरोबर नाही तर एकदम चपखल आहे ! :) बाजू अंगावर आल्यावर आता तुम्ही दिशाबदल (उर्फ चेंज ऑफ गोलपोस्ट) करून बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहात, हे जाहीर करण्यास मला आनंद होत आहे =)) =)) =)) अंगावर येणारी चर्चा टाळण्यासाठी विरोधी पक्ष सद्या हेच (चेंज ऑफ गोलपोस्ट, हो) लोकसभेत करत आहे. मोठ्या लोकांचे अनुकरण करणे ही एक उत्तम गोष्ट असते यात वाद नाही. पण तसे करताना चुकीची उदाहरणे निवडू नयेत असे माझे मत आहे. अर्थात, इतरांना यापेक्षा वेगळे मत राखण्याचा हक्क भारतीय लोकशाहीत आहे यात वाद नाहीच ! ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 11/01/2017 - 13:37
मी जर आर बी आय गव्हर्नर वा प्रधानमंत्री असतो तर ५०० ची नोट दाबून मीही २००० ची नोटच प्रथम काढली असती. त्यात माझे तर्कट असे-- ज्याला अजून प्रापतीकर खाते १९९९ सालच्या पातळीलाच काम करते आहे असे वाटते त्याला २००० च्या नोटेचे आनंद होणे साहजिकच आहे. तो प्रेफरेबली पैसा दोन हजार च्या रूपात साठवायला सुरूवात करेल. त्याला आशा हे की मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री होतील व पुन्हा पॉलिसी पॅरलिसीसचे राज्य येईल. व दोन हजाराची नोट चालू राहील. पण प्रधानमंत्री हा मुळातच अचानक हल्ला करणारा राजकारणी पण आहे व शास्ता ही. हे त्याला जर कळले असेल तर तो मुळातच २००० ची नोट बदली म्हणून स्वीकरणार नाही त्याचे १००० व ५०० कवडीमोल ठरतील. २००० ची नोट ही इकडे आड तिकडे विहिर निर्माण करणारी एक धूर्त चाल आहे असे मला तरी वाटते. ती अचानक कधीही एका संध्याकाळी रद्द होउ शकते. ती येत्या दोन वर्षात होणे व ना होणे हे प्राप्तीकर खात्याचे सॉफ्टवेअर किती "पोचलेले" आहे त्यावर अवलंबून असेल.

नितिन थत्ते 08/12/2016 - 14:49
येथे या कॅशलेस-लेसकॅश प्रकरणावर टीका करणारे पुष्कळसे लोक स्वतः वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक पेमेंट करतच आहेत. मी स्वतः १९९४ सालापासून क्रेडिट कार्ड वापरत आहे. सर्व युटिलिटी बिल पेमेंट्स ऑन लाइनच करत आहे. हे सर्व "सोय" म्हणून करत आहे. "सोय म्हणून" १ टक्का/२ टक्के भार सहन करणे या सोयीचा वापर करणार्‍याला मान्य असू शकेल. टीका चालू आहे ती १. सध्याच्या टंचाईवर उपाय करण्याऐवजी (आणि "प्रॉब्लेम आहे तो लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा" असे न म्हणता) बहुतांश छोट्या व्यवहारात कॅशमध्ये व्यवहार करण्याची इच्छा ठेवणे म्हणजेच भ्रष्टाचाराची इच्छा ठेवणे असे सांगितले जात आहे. संदर्भ : या धाग्यातील पिवळ्या हायलाइटमधील विधान २. असेही सूचित केले जात आहे की आता कॅश कमीच दिली जाणार आहे. संदर्भ: जेटलींचे सिक्स्टी इअर ओल्ड 'नॉर्मल' इज ब्रोकन अ‍ॅण्ड धिस इज न्यू नॉर्मल हे विधान. या दोन कारणांमुळे. पॉइंट इज : कॅश कमी वापरणे हे चांगले हे कुणीच अमान्य करीत नाही. पण ते सोय या स्वरूपात, फायदा या स्वरूपात प्रमोट करायला पाहिजे. "जाट-खुंट-बैल" या मार्गाने नव्हे.

In reply to by नितिन थत्ते

मी पण अनेक व्यहवार ऑनलाईन, नेट बँकिंग, कार्ड पेमेंट यांद्वारे करतो. पण म्हणून प्रत्येकाने ते तसेच केले पाहिजेत प्रत्येकाला ते करता आले पाहिजेत असा अट्टहास नाही धरत.

In reply to by नितिन थत्ते

असेही सूचित केले जात आहे की आता कॅश कमीच दिली जाणार आहे. सहमत. लेस-कॅश अर्थव्यवस्थेत तसेच असते, कारण तिला खूप कॅशची गरजच नसते. लेस-कॅशची सवय होईपर्यंत जनतेला थोडी तोशिश पडत आहे असे वाटेल. पण, ज्या पद्धतीने सामान्य जनता (विरोधी नेते आणि तथाकथित अर्थतज्ज्ञ नव्हे) ही तोशिश स्विकारत आहे, ती अभिनंदनिय आणि आशादायक आहे. ====== आता, एखाद्या चांगल्या व्यवस्थेला व्यवहारात आणण्यासाठी सरकारने थोडीफार जबरदस्ती करावी काय ? या प्रश्नाची खालील दोन उत्तरे असून शकतात. १. नाही : हे उत्तर राजकारणी लोकांच्या फार सोईचे असते. त्यात लोकांचा अंतिमतः तोटा असला तरी मतपेट्या शाबूत ठेवून राजकीय व वैयक्तीक स्वार्थ साधणे सोपे असते. त्यामुळे भारतात आजपर्यंत आपण हेच बघत आलो आहोत... आणि त्याच बरोबर सिस्टीमला आणि नशिबाला दोष देत सिंगापूरचा किंवा नॉर्वेचा (जे साधारणपणे आपल्याबरोबर स्वतंत्र झाले आहेत) असूयेने उल्लेख करत आलो आहोत. २. हो : हे उत्तर भारताच्या राजकारणी इतिहासात नवे आहे. परंतू भारतिय नागरिकांचा सर्वसाधारण स्वभाव पाहिला तर त्याला चांगल्या गोष्टी करायलाही जबरदस्तीने भाग पाडावे लागते असा इतिहास आहे. या वेळेस, जबरदस्ती नाही पण लोकांचा काहीसा नाईलाज करत, लोकांच्या भल्याची गोष्ट, सरकार लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसत आहे. असे करताना काही प्रमाणात जनतेला आणि विशेषत: सरकारच्या स्वतःच्या हितसंबंधियांनाही तोशिश द्यावी लागत आहे. हा धोका पत्करायचे धैर्य स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच दाखवले जात आहे, हे विशेष. साधी वाहतूक व्यवस्था पाहिली तर, भारतात केवळ "रुंद रस्त्यांवर उत्तम प्रकारे काढलेल्या मध्यरेषा विरुद्ध दिशेने गाडी नेण्यास रोखू शकत नाहीत, तेथे विरुद्ध दिशेन वाहतूक करणार्‍या लेन्समध्ये तीन फूट उंचीचे दुभाजक बांधावे लागतात. अश्या दुभाजकांवरून गाड्या नेणे शक्य नसल्यानेच केवळ गाड्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जात नाहीत. पण इतके करूनही पादचारी त्या दुभाजकांच्या वरून उड्या मारून पलिकडे जातातच ! तसे पाहिले तर, भारतात "हो" हा पर्याय नवीन असला तरी, आपण आसूयेने ज्याचे नाव घेतो त्या सिंगापूरमध्ये ली क्वान यु ने तो जरबेने वापरून, सिंगापूरला त्याच्या स्वातंत्र्यापासूनच्या दोन दशकांत "मासेमारांचे खेडे" या अवस्थेपासून "आधुनिक विकसित राष्ट्र" या अवस्थेपर्यंत आणून सोडले होते. भारतीय लोकशाहीत सरकारला ली क्वान यू सारखे हुकुमशाही अधिकार नाहीत, तेव्हा भारताला ली क्वान यू च्या स्तरावर जाणे शक्य होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजित - १ 08/12/2016 - 17:27
लोकांची मारायची असेल तर हे सरकार जाम जोरात पुढे असते. जसे वर तुम्ही म्हणतय २ नंबर मध्ये. पण करप्ट लोकांना शिक्षा करायची वेळ आली कि मग मात्र यांचे हात बांधलेलं . आता रेल्वे मध्ये पण सबसिडी सोडा म्हणून सुरेश प्रभू पुढे आलेत . आजची ताजी बातमी. पण रेल्वे कर्मचारी फक्त ५०% efficiency ने काम करतात ते सुधारायला याना जमत नाही. लोकांवर दादागिरी करायला जमते. सरकारी बाबू ऐकत नाहीत म्हणून देवेंद्र तक्रार करतात . परत वर त्यांना बॅंकॉंक ला जायला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रु पण पुरवतात. लोकांना मात्र - आता सबसिडी कल्चर चालणार नाही वगैरे ऐकवतात .. अरे नको तुमची सबसिडी. पण एका अटीवर - या सगळ्या लोकांना सरळ करा, निदान सुरुवात तरी करा . ते काही जमत नाही सरकारला . मुंबई पुणे एक्सप्रेस वे टोल वसुली पूर्ण झाली आहे . पण IRB चे नुकसान होऊ नये या उदात्त हेतूने देवेंद्र गप्प .. ९०० कोटी चा घपला BMC मध्ये आणि याना लाथ घालायला सापडलं कोण तर एक फालतू जुनिअर engineer . बाकी वरचे सगळे सुटले जुजबी शिक्षेवर . मग काँग्रेस परवडली यांच्या पेक्षा . निदान डाळी तरी स्वस्त होत्या .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काका, जस्ट इन्कवायरिंग, are u supporting or hailing the Iron Fist in your above comment?? मला तसे भासले, ते चूक असावे हीच इच्छा म्हणूनच हा कॉमेंटप्रपंच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भारतीय लोकशाहीत सरकारला ली क्वान यू सारखे हुकुमशाही अधिकार नाहीत, तेव्हा भारताला ली क्वान यू च्या स्तरावर जाणे शक्य होणार नाही. असे कोणाला वाटेल असे वाटले होते. म्हणून, त्या प्रतिसादात हे वाक्य लिहून ते स्पष्ट केले आहे :) परंतू, जे कायदे आहेत (उदा: वाहतूक, पार्किंग, भ्रष्टाचार, व्ही आय पी कल्चर विरोध, इ) ते योग्यपणे व विनाखाबूगिरी अंमलात आणून, लोकांची बेशिस्ती आणि 'चलता है' प्रवृत्ती कमी करणे जरूरीचे आहे, यात संशय नाही. सद्या कायदा मोडणे, भ्र्ष्टाचार करून गब्बर होणे, वशिलेबाजी करणे, इत्यादी अभिमानाच्या गोष्टी असल्यासारखे लोक बर्‍याचदा वागतात, ते निश्चितच चीड आणणारे आहे. सर्वसामान्य लोकांनाही ते मान्य नाही, पण नाईलाजाने/हतबलतेने ते सोसावे लागते आहे. म्हणूनच, भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप लावण्याचा प्रयत्न करतोय हीच गोष्ट लोकांना सुखावून गेली आहे व म्हणूनच ते नोटाबंदीमुळे होणारा थोडाबहुत त्रास सहन करायला तयार आहेत. हे अगदी तळागाळातल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर दिसत आहे. याच कारणासाठी नोटाबंदीविरुद्धचा मोर्चा, बंद इत्यादींना सर्वसामान्य जनतेचा फारसा पाठींबा दिसला नाही. जबरदस्ती नसावी हे योग्य आहे. पण सत्य, शिस्त आणि चांगला व्यवहार यांचा आग्रह म्हणजे जबरदस्ती नाही, हे सांगायला नकोच. किंबहुना तसा आग्रह नसलेल्या परिस्थितीतच सामान्य लोकांवर जुलुम-जबरदस्ती होते, हे आजूबाजूला पाहिले तरी सहज दिसेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सार्वजनिक जीवनात, भारताला "सत्य, शिस्त आणि चांगला व्यवहार" या विषयांत खूप प्रगती करायची गरज आहे याबाबत वाद नसावा, नाही का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नाही त्या बद्दल काहीच वाद असू नये, अजून काही बोलायचे होते, पण एकंदरीत आजकाल मिपावर बोलण्यात अर्थ राहिलेला नाही परत एकदा अधोरेखित झाले अमच्यापुरते. असो, तुम्ही मोठे भूलचूक माफी द्यावी, ह्यापुढे काहीच विचारणार नाही प्रश्न.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असे काय झाले ? मी माझ्या तर्‍हेने जास्तीत जास्त संशय निराकरण करण्याचा प्रयत्न नेहमी करतो, तसाच इथेही केला ?! माझ्याशी नेहमी मोकळेपणाने बोला. मला हातचे न राखता बोलण्याची (वाईट) सवय आहे ! कारण, राजकारण करत किंवा अतीपार्लमेंटरी बोलण्याने सत्य बाहेर यायला जरा कठीणच पडते. माझ्या व्यावसायीक गटांमध्ये, जेथे माझ्या अधिकारात असते तेव्हा, मी सगळ्यांनी "ब्रूटली ऑनेस्ट" असावे असा आग्रह धरतो. सुरुवातीला लोकांना अवघडल्यासारखे होते. पण, नंतर ते सगळ्यांनाच सर्व तर्‍हेने मोठ्या फायद्याचे ठरते असा दीर्घ काळचा अनुभव आहे. राजकारण्यांबद्दल म्हणाल तर, स्वार्थी हितसंबध साधण्याकरीता वर वर गोड बोलणार्‍यांपेक्षा, खरमरीत सत्य बोलून जनतेला सरळ मार्गावर आणण्याला मागेपुढे न बघणारे जास्त आवडतात. असे दोन (पुन्हा, भारतात शक्य नसलेले) "बेनेव्हॅलंट सर्वाधिकारी" आणि त्यांनी स्वतःला निर्मोही ठेवून आपापल्या देशांना दीड-दोन दशकांत अमुलाग्र बदललेले याच आयुष्यात पाहिले आहे, एकाच्या देशात काम केल्याने त्या स्थितीचा याची देही याची डोळा स्वानुभव घेतलेला आहे. मात्र, "कोणीतरी माझ्यासाठी हात मागे बांधून लढावे, मला जराही तोशीश लागू देऊ नये आणि तरीही माझ्यासाठी चंद्र जमिनीवर खेचून आणावा", हे मागणे या जगात सत्यात उतरणे जवळपास अशक्य आहे, यात वाद नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभिजित - १ 11/12/2016 - 18:14
भ्रष्टाचाराला कोणीतरी चाप लावण्याचा प्रयत्न करतोय हीच गोष्ट लोकांना सुखावून गेली आहे ???? >> कॅशलेस करून भ्रष्टाचाराला चाप ?? लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. एक कण फरक पडणार नाहीए खाबुगिरीत ..

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते 11/12/2016 - 20:32
नंतर "आठ नोव्हेंबरच्या भाषणात सांगितले ते कोणतेच उद्देश नव्हते; खरा उद्देश टॅक्स बेस वाढवण्याचा होता किंवा कॅशलेस करण्याचा होता" असं त्यांनी सांगितलं तरी त्याचंही कौतुक "शोल्लेट गुप्तता राखून इम्प्लिमेंट केलेला निर्णय" असं होईल !!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 10/01/2017 - 20:59
इथे दुभाजकाचे उदाहरण बरोबर दिलेले आहे . भारतीय माणूस अप्रामणिक आहे असे माझे मत ६३ वर्ष आयुष्य जगल्यानंतर ठाम झाले आहे. मग त्याला " सरळ" करायचे असेल तर कायदा करण्यापेक्षा प्रोसीजरच अशी करायची की त्याला तीन फुटाचा दुभाजक ओलांडता येणारच नाही. व्यावहारिक पणाची जाण नसलेले प्रधानमंत्री आपण सत्तर वर्षे पाहिलेले आहेतच. ( आठवड्यातून एक दिवस उपवास करा ... असे सांगणारे शास्त्रीजी वगळता ). त्यामानाने मोदी बरेच व्यवहार वादी आहेत. पण जाती ,धर्म, रूढी परंपरा , अति इतिहास प्रेम, व्यक्तिपूजा यात भारत इतका बरबटून निघाला आहे की मन विषण्ण होते. पण राजीव गांधीच्या संगणक युगाला ही विरोध केला होताच हे विसरून कसे चालेल...?

In reply to by चौकटराजा

ट्रेड मार्क 10/01/2017 - 21:21
बहुतांशी भारतीय लोक नियमांना कशी बगल देता येईल हा विचार करतात. त्यामुळे कितीही नियम बनवा, ते कसे अयशस्वी करता येतील याचे विविध मार्ग शोधले जातात. विचार बदला देश बदलेल हे खरंय.

वरुण मोहिते 08/12/2016 - 14:54
१०० डॉलर मॅक्सिमम नोट आहे . त्यामुळे तिथे भ्रष्टाचार होत नाही का??? . असं असेल तर निश्चित वाचायला आवडेल . तिकडे भ्रष्टाचार होत नाही म्हणून इथेही १०० रुपये कायम मॅक्सिमम का ठेवले नाहीत हे पण वाचायला आवडेल . मला काही फरक पडला नाही पण जनतेच्या प्रश्नावर वाचायला आवडेल

In reply to by वरुण मोहिते

पुढच्या पायर्‍यांत; १ ते ३ वर्षांत रु२००० ची नोट आणि ५ वर्षांत रु५०० ची नोट व्यवहारातून जाईल असा मझा व्यक्तीगत अंदाज आहे. १०० डॉलर मॅक्सिमम नोट आहे . त्यामुळे तिथे भ्रष्टाचार होत नाही का??? हे परत, "कॅश-लेस" आणि "लेस-कॅश"मध्ये गफलत करण्यासारखे झाले. सर्वात मोठी नोट $१०० ची असण्याने देश "भ्रष्टाचारमुक्त (करप्शन-लेस)" होत नाही तर देशातला "भ्रष्टाचार कमी (लेस-करप्शन)" करायला मदत करते. $१ कोटीच्या भ्रष्टाचाराचा व्यवहार, (अ) $१०० च्या नोटांत आणि (आ) $१००० च्या नोटांत केला, तर त्या नोटांचे हस्तांतर, वाहतूक व साठवण करताना येणार्‍या "वास्तविक" समस्यांतल्या फरकांचा विचार केला, तर वरचा मुद्दा ध्यानात येईल. जसजशी ही रक्काम मोठी होईल तसतश्या या समस्या सामान्य पटींत नाही तर 'भौमितीक परिणामाने' वाढत जातात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तसेच भ्रष्टाचार कमीत कमी स्तरावर ठेवायला (खर्‍या जीवनात तो ०% कधीच, कोठेच नसतो) लहान किंमतीच्या नोटा हा अनेक उपायांपैकी केवळ एक (पण व्यवहारात खूप उपयोगी सिद्ध झालेला) उपाय आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 16:22
>>$१ कोटीच्या भ्रष्टाचाराचा व्यवहार, (अ) $१०० च्या नोटांत आणि (आ) $१००० च्या नोटांत केला, तर त्या नोटांचे हस्तांतर, वाहतूक व साठवण करताना येणार्‍या "वास्तविक" समस्यांतल्या फरकांचा विचार केला, तर वरचा मुद्दा ध्यानात येईल. जसजशी ही रक्काम मोठी होईल तसतश्या या समस्या सामान्य पटींत नाही तर 'भौमितीक परिणामाने' वाढत जातात. =)) शंभराच्या वरची नोट नसल्याने एक कोटीचा भ्रष्टाचार करणे काहीसे/खूपच कठीण होईल या कल्पनेने करमणूक झाली.

In reply to by नितिन थत्ते

हा जागतीक मान्यतेचा समज आणि व्यावहारीक सत्य आहे. त्याला हास्यास्पद ठरवू शकणारा तज्ज्ञ मिपावर सापडला तर सार्थ अभिमान वाटेल ;) :) चला करा १ कोटी, ५ कोटी, १० कोटी, १०० कोटी,..... इत्यादींच्या १००च्या नोटांच्या... अ) प्रत्येकी १०० नोटांच्या बंंडलाची संख्या, आ) ते ठेवायला लागणार्‍या आकारमानाची गोळाबेरीज (घन मीटर अथवा संशय येणार नाही अश्या आकाराच्या किती बॅगा / खोके, इ), इ) सर्व नोतांच्या एकूण त्यांच्या वजनाचे आकडे, ई) वजन व आकारमान जास्त असण्याने त्यांच्या वाहतूकीसाठी आणि साठवणीसाठी येणार्‍या समस्या, इ इ इ यांचे मोजमाप आणि वरचेच $१०००, $५००० व $१०००० च्या नोटांमध्ये केले तर होणार्‍या सुविधा यांची तुलना... ...आणि मग तुम्हाला प्रामाणिकपणे लोल करणे जमते का ते पहा. =)) =)) =)) काळा पैसा रियल इस्टेट, जमीन, दागीने, सोने, इत्यादीत असतो असे सांगण्याअगोदर... काळा पैसा निर्माण होताना (एखादा विरळ अपवाद वगळता) नकदेतच असतो (कारण त्याची किंमत निर्विवादपणे ठरवता येते आणि त्याचे हस्तांतर कोणताही लेखी पुरावा मागे न सोडता करता येते). त्यानंतर तो इतर उपाय वापरून इतर प्रकारच्या धनात परावर्तीत केला जातो. याशिवाय, तो इतर धनांत परावर्तीत करताना दिलेली काळी नकद हस्तांतरीत झाली की हाताळताना नवीन भ्रष्टाचार्‍याला त्याच (वर दिलेल्या) लॉजिस्टिक समस्या येतात. सिंपल, मि. थत्ते ! ;) ======= याशिवाय इतर काही काळा पैसा हाताळण्याची क्लृप्ती तुमच्याकडे असली तर ती जगावेगळी आयडिया जाणून घ्यायला आवडेल... सांगाच ती इथे. तोपर्यंत आम्ही लोल करून घेतो ;) :) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 20:39
>>याशिवाय इतर काही काळा पैसा हाताळण्याची क्लृप्ती तुमच्याकडे असली तर ती जगावेगळी आयडिया जाणून घ्यायला आवडेल... सांगाच ती इथे. तोपर्यंत आम्ही लोल करून घेतो ;) :) =)) तेच तर सांगतोय. काळा पैसा हाताळायला लागतोच असे नाही. राम लिंग राजू नावाचा एक इसम होता. म्हणजे आता जेल मध्ये आहे. त्याच्या सत्यम नावाच्या कंपनीत पन्नास एक हजार फेक एम्प्लॉयी होते. त्यांना बँक खात्यातून पगार दिला जात होता. दुसरे तुम्हाला ठाउक असलेलेच उदाहरण. कोणी एक बै पी आर कन्सल्टंट म्हणून काम करायच्या. त्यांना प्रोफेशनल फीज म्हणून मोठाल्या रकमा कॉर्पोरेट्स देत असत. पुढचं समजून घ्याल असे वाटते. या जुन्याच युक्त्या आहेत. नव्या - मला सुचलेल्या वगैरे नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

हे उदाहरण अपेक्षेच्या उलटे आहे =)) अहो, राम लिंग राजू नसलेला पैसा आहे असे दाखवत कंपनीला फायदा झाला आहे असे दाखवत होता. नसलेले पण आहेत असे दाखवलेल पैसे रियल इस्टेट्मध्ये (मायतास करवी) मिळतील व हिशेब बरोबर होईल असे त्याला वाटत होते. त्याच्या कमनशिबाने रियल इस्टेट मार्केट कोसळले आणि ते नसलेले पैसे गळ्याशी येऊन त्याचे बिंग फुटले. हे सगळे त्याने खोटे हिशेब लिहून दाबून टाकायचा प्रयत्न केला. याला बुक फजिंग म्हणतात. =)) थोडे उत्खनन केले तर काळ्या पैशाची अनेक चपखल उदाहरणे सापडतील, पण ज्यांच्यात कॅश हस्तांतरीत झाली नाही अशी उदाहरणे सापडदणे कठीण आहे. भ्रष्टाचाराची अचूक किंमत ठरवणे आणि ती वसूल करण्याला कॅशच सोईची असते. उदा: तुझे काम करतो, त्यासाठी "मला दोन तोळे सोने दे" यापेक्षा "मला रु६०००० कॅश दे" हे व्यवहारात भ्रष्टाचार्‍यासाठी अचूक किमती वसूल करायला जास्त उपयोगी आणि फसवणूक टाळायला खात्रीचे असते. नाहीतर कॅशचा इतका महिमा नसता, नोटाबंदीची कारवाई करण्याची गरज नव्हती आणि त्या कारवाईविरोधी इतका गदारोळ का झाला असता ???!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हा वरचा प्रयत्नही गोल पोस्ट बदलण्याचे (पक्षी : दिशाभूल करण्याचे) उत्तम उदाहरण आहे. पण तरिही सत्यमची केस फार रोचक असल्याने अवांतराही जरासे महत्व द्यावेसे वाटले :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 08/12/2016 - 22:53
हे उदाहरण मी रामलिंग राजूने पैसे कसे उडवले ते सांगण्यासाठी दिले नव्हते. तर कंपनीतून कॅश न काढता परस्पर बँकेतून (व्हाइटमध्ये) लाच कशी दिली जाऊ शकते याचे उदाहरण म्हणून दिले होते. बाकी गोलपोस्ट तर सरकारने बदलला आहे. ८ तारखेच्या मोदींच्या भाषणात कॅशलेसचा क पण नव्हता. जसजसे नोटा पुरवण्याचे प्लॅनिंग गंडलेले आहे हे उघडकीला यायला लागलं तेव्हा भक्तांना एंगेज ठेवण्यासाठी कॅशलेसचा पॉइंट बाजारात सोडण्यात आला. ते आधीच लक्षात येऊ लागल्यावर काळा पैसा बँकेत न आल्यामुळे रिझर्व बँकेचा आणि पर्यायाने सरकारचा कसा फायदा होईल वगैरे पतंगांच्या भरार्‍या खोट्या ठरू लागल्या होत्या. (बहुतेक अर्थतज्ञांनी हे आधीपासूनच सांगितले होते). बाकी आता ऑलमोस्ट सगळ्या नोटा बँकेत डिपॉझिट होतील असे अर्थसचीवांनीच म्हटले आहे. ते तोंडावर आपटणे दिसू नये म्हणून आम्ही यंव करू त्यंव करू म्हणून सांगितले जात आहे. टेरर फायनान्सिंगचे कदाचित खरे असेल पण त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही. --------------------------------- अवांतर: माझ्या मामेभावाची दीड वर्षाची मुलगी आहे. ती आईच्या कडेवर बसून मेणबत्तीच्या/निरांजनाच्या पेटत्या ज्योतीमध्ये बोट घालण्याचा प्रयत्न करते. पण आम्ही "काय धाडसी आहे!!!" म्हणून तिचे कौतुक करत नाही. असे बोट घालण्याचे परिणाम तिला ठाऊक नसल्याने ती हे धाडस करते असे आम्ही समजतो.

In reply to by नितिन थत्ते

"तुमच्या मामेभावाची दीड वर्षाची मुलगी" आणि "सरकारातील नेते, ब्युरोक्रॅट्स व इतर तज्ज्ञ" यांच्यात तुम्हाला काही फरक दिसत नाही, यातच सर्व आले !!! =)) =)) =)) धन्यवाद, अगोदर म्हटल्याप्रमाणे, वाट पाहू या आणि ९ ते १२ महिन्यांत प्रत्यक्षात आलेले परिणाम दिसतीलच ! तेव्हा दिसेलच कोणाचे अंदाज / विश्वास बरोबर ठरले की चुकीचे ते !

In reply to by नितिन थत्ते

फाटे फोडण्याचे तुमचे कसब वाखाणण्याजोगे आहे हे तुमच्या शत्रूलाही मान्य करावेच लागेल! मी तर तुमचा मिपाकर मित्र आहे ! :) ;) शुभरात्री !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

इतक्या प्रगाढ चलाखीची ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरली गेली तर त्याचा तुम्हाला व इइतरांना किती फायदा झाला असता असा विचार मनात तरळून गेला! आता खरोखर शुभरात्री! :)

In reply to by वरुण मोहिते

ट्रेड मार्क 10/01/2017 - 21:35
अमेरिकेत सर्वसाधारण माणूस बराच प्रामाणिक आहे. भारतात ज्या लेव्हलचा भ्रष्टाचार चालतो तसा अमेरिकेत नसतो. पोलिसाने पकडले तर सरळ तिकीट देतो, $५० घे आणि सोडून दे ही भानगड नसते. कुठल्याही दुकानात कॅश द्या किंवा कार्ड द्या, रिसीट मिळतेच. तिथे तुम्हाला हा पर्याय नसतो की कॅश दिलीत तर टॅक्सचे पैसे देऊ नका. अमेरिकेत बऱ्याच दुकानांमध्ये $२० च्या वरील नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत हे स्पष्टपणे लिहिलं असतं. अगदी $१ ची वस्तू पण कार्ड देऊन घेता येते आणि त्याची पण टॅक्ससहितची रिसीट मिळते. अमेरिकेत भ्रष्टाचार नाही असं नाही, वरच्या पातळीवर आहेच. पण आपल्यासारखी बजबजपुरी नाही.

In reply to by वरुण मोहिते

चौकटराजा 11/01/2017 - 13:23
भ्रष्टाचार व करबुडवे गिरी या दोन्ही गोष्टी भिन्न्न आहेत. भ्रष्टाचार हा मानसशास्त्रातला भाग असून करबुडवे गिरी हा अर्थशास्त्राचा भाग आहे. अर्थात अर्थ्शास्त्र हे देखील काहीसे मानसशास्त्राला जोडलेले आहे ते " वर्तणुक शास्त्र " मानले जाते. या प्रमाणात दोन्ही एकमेकाशी सम्बंधित आहेतच. ज्यावेळी नोटांचे प्रमाण कमी करून थेट प्लास्टिक मनी वर भर दिला तर भ्रष्टाचार नोटेद्वारा होणार नाही पण काईंड मधे होउ शकतो. आमच्या लहानपणी एक शेतकार्‍याचा मुलगा आपल्या शेतातील वांगी बाईना आणून देत असे व मार्क जास्त द्यावे असा दबाब आणत असे बाईनी मार्क जास्त दिले की नाही याला पुरावा नाही पण बाई सापडल्या फेरतपासणीत तर नोटेविना भ्रष्टाचार झालाच की. प्लास्टिक मनी व्यवहार जास्त झाले तर करबुडवे गिरी कमी होईल हे पाचवीतले पोर ही सांगू शकेल. देवस्थाने व दहशतवादी याना मिळणारा सर्वच पैसा करबुडवेगिरीचे पोर आहे असे म्हणता येत नाही.

In reply to by चौकटराजा

भ्रष्टाचार व करबुडवे गिरी या दोन्ही गोष्टी भिन्न्न आहेत. "अवैध साधने/उपाय/कृती/मार्ग वापरून पैसा आणि/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा मिळविणे" याला सर्वसाधारणपणे भ्रष्टाचार म्हणता येईल १. करबुडवेगिरी ही अवैध कृती असल्याने भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. २. भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेल्या पैश्याचे करविभागाला "खरे" विवरण देऊन त्यावरचा कर भरणे सर्वसाधारणपणे शक्य/सोईचे नसल्याने त्या पैश्यावरचा कर बुडविण्याकडेच भ्रष्टाचार्‍यांचा कल असतो. त्यामागे वाचलेल्या कराच्या पैशाचाही मोह असतोच. असे करताना, पहिली भ्रष्टाचारी कृती दुसर्‍या भ्रष्टाचारी कृतीने लपवली जाते. ३. करपात्र उत्पन्न, खोटेपणाने, करमाफ उत्पन्नाच्या स्त्रोतापासून (उदाहरणार्थ, शेतीचे उत्पन्न) मिळाले आहे, असे दाखवण्याची अवैध कृती करून कर बुडवणे हा पण भ्रष्टचाराच एक प्रकार आहे. थोडक्यात, भ्रष्टाचाराची व्याख्या कोणत्या एका शास्त्राच्या शाखेशी संबंधीत नसून ती "अवैध" मानवी कृतीशी संबंधीत आहे.

वरुण मोहिते 08/12/2016 - 15:04
नोट कमी म्हणून अमेरिकेत भ्रष्टाचार होत नाही का?? हे विचारायचं. पैशाचा फरक सगळ्यांना माहित आहे .

वरुण मोहिते 08/12/2016 - 15:50
नोटबंदी किंवा काही चलनबंदी केली १९६० अँड १९७० .. त्यानंतर अमर्याद ड्रग ट्रॅफिकिंग चालू होतं. जसा आता म्हणतात कि पाकिस्तान चे अटॅक बंद झाले नोटबंदी मुळे तसाच प्रकार . परत एक प्रश्न भ्रष्टाचार हि वृत्ती आहे . त्यामुळे बंद होणार नाही आहे .

In reply to by वरुण मोहिते

"नोटाबंदी हा भ्रष्टाचारविरुद्धचा एकुलता एक रामबाण उपाय नसून त्यासाठी केल्या जाणर्‍या अनेक उपायांच्या साखळितली एक कडी आहे" इतके समजावून घेतले की मग बाकीचे प्रश्नही सोडवायला मदत होईल. याशिवाय, ७० वर्षांची घाण एका उपायाने आणि एका रात्रीत (किंवा एक महिन्यांतही) साफ करण्यासाठी सरकारकडे काही जादू आहे, ही कल्पनाही ठीक नाही. त्यापेक्षा, अनेक प्रकारचे उपाय, अनेक महिने चालू ठेवून, भ्रष्टाचार "अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणार नाही" व "सर्वसामान्य माणसाचे जीवन कठीण करणार नाही" इतपत ताब्यात आणणे, हे व्यावहारीक उद्यिष्ट्य होईल. विकसित देशांमध्येही "हेच साधणे आणि ते वर्षानुवर्षे तसेच कायम राखणे" यावर शक्ती खर्च केली जाते.

In reply to by नितिन थत्ते

विशुमित 08/12/2016 - 17:08
खरी गोम या ७० वर्षात झालेल्या घाणीत आहे, त्यामुळे नोटबंदी वाल्यानी किती ही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणे महा कठीण आहे. मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे.

In reply to by विशुमित

मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे. तुमचे गुपीत इतके उघडपणे सांगू नका हो, हे म्हणजे अगदी हे झाले ! ;)

याशिवाय, ७० वर्षांची घाण एका उपायाने आणि एका रात्रीत (किंवा एक महिन्यांतही) साफ करण्यासाठी सरकारकडे काही जादू आहे, ही कल्पनाही ठीक नाही.
मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते. आज हे सरकार ह्याच घाणेरड्या कार्डचा उपयोग काळा पैसा शोधण्यासाठी का करतेय मग? एका रात्रीत भ्रष्टाचार, काळा पैसा साफ करायची ह्या सरकारलाच घाई आहे असे दिसते.

In reply to by मार्मिक गोडसे

मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते. जनतेच्या फायद्याचे साधन नुसते हाती असून फायदा नसतो, त्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही फायदा नसतो, ते शस्त्र योग्य प्रकारे उपयोग करायची नियत व धमक असली आणि त्या प्रत्यक्षात उपयोग केला तरच त्याचे फायदे जनतेला मिळतात, हा व्यवस्थापनाचा मूलभूत नियम आहे. त्याविरुद्ध, स्वतःला हवी असलेली साधने तयार करून ती जनतेच्या नकळत कशी वापरली गेली याचे एक खास उदाहरण मिपावरच इतर कोठेतरी दिले होते, पण शोधाशोध न करता त्वरीत पाहता यावे यासाठी, इथे परत देत आहे. रोचक माहिती आहे त्यात... आतापर्यंत, अनेक स्कॅम्स जगजाहीर झाल्या आहेतच, त्यात ही एक भर, अजून आतापर्यंत पुढे न आलेल्या किती बाहेर पडतील ते भविष्यच सांगेल :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते. त्याचा चांगला परिणाम झाला होता. कमोडीटी मार्केटमध्ये अजुनही घोटाळे चालुच आहेत.

In reply to by मार्मिक गोडसे

युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते. खरंच ???!!! =)) अहो वर दिलेली क्लिपमध्ये तर सेबी व वित्तमंत्रालयाला १०० वर उदाहरणे नावासकट दिली असताना काही कारवाई केली गेली नाही असे नावासकट सांगितले आहे. तुम्ही तुमची माहिती परत तपासून पहायची गरज आहे. यासंबधात जालावर पोत्यानी विश्वासू दुवे आहेत. P-Notes ची व्याख्याच याबाबतीत काय ते सगळे उघड करते आहे... Participatory Notes commonly known as P-Notes or PNs are instruments issued by registered foreign institutional investors (FII) to overseas investors, who wish to invest in the Indian stock markets without registering themselves with the market regulator, the Securities and Exchange Board of India - SEBI. पी नोट्स बेनामी असू शकतील व त्यातले खरे गुंतवणूकदार कोण आहेत हे सेबीला कळू नये आणि विचारण्याचाही हक्क असू नये असे ते कायदे व नियम होते. सद्य सरकारने रिनिगोशिएशन करून आता त्या कायदे-नियमा अंतर्गत अनेक देशांशी केलेल्या करारांत योग्य ते बदल केले आहेत. कोणतेही कायदे करून हेतुपुर्रसर केलेले घोटाळे सुधारणे व ते कायदे वापरून परदेशांशी केलेले करार एकतर्फी बाद करता येत नाहीत. त्याला वेळकाढू कायदेशीर मार्ग वापरून, संबंधीत परदेशांशी चर्चा करून व त्या सरकारांना काही काळाची (बर्‍याचदा एक-दोन आर्थिक वर्षाची तरी) मुदत देवूनच नंतरच दोन्ही बाजूंना मान्य बदल व्यवहारात आणता येतात.

अमर विश्वास 08/12/2016 - 19:29
दोन महत्वाच्या घोषणा ,,, कॅशलेस होण्यासाठी २०० रुपयांपर्यंतची खरेदी कार्ड वापरून केली तर सर्विस टॅक्स नाही पेट्रोल व डिझेल खरेदी कार्ड वापरून स्वस्त ....

In reply to by अमर विश्वास

आनंदी गोपाळ 08/12/2016 - 21:10
२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर घसघशीत दीड रुपया सूट? (०.७५%ने) अन ३% ट्रँजॅक्शन कॉस्टप्रमाणे एक्स्ट्राचे ६ रुपये जाणार ते कुणाच्या तीर्थरूपांनी द्यायचे? अन सर्विस टॅक्स कुणाला नाही? सर्विस घेणारा टॅक्स भरतो का तो? की सर्विस देणारा? कस्ली भयंकर येडी घालतंय हे सरकार. अन तरीही भजनगायकी थांबतच नाहिये. कठीणे!

In reply to by आनंदी गोपाळ

२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर घसघशीत दीड रुपया सूट? (०.७५%ने)
तो दिड रुपया महत्वाचा आहे की नाही हे ज्याचं त्याला ठरवू देणं जास्त योग्य ठरणार नाही का? ज्याला महत्वाचे नाहीत त्याने २०० रु. रोख द्यावेत.
अन ३% ट्रँजॅक्शन कॉस्टप्रमाणे एक्स्ट्राचे ६ रुपये जाणार ते कुणाच्या तीर्थरूपांनी द्यायचे?
यासाठी कोणाच्याच तिर्थरूपांकडे जाण्याची गरज नाही. डोळे बंद करून ३% चार्जवालं कार्ड घेणाऱ्यांनी स्वतःच भरणं जास्त योग्य ठरेल. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जरूर टीका करावी पण टिकाच करायची म्हटली तर मग ती सरकारने कुठलाही निर्णय नाही घेतला तरी करता येते.

In reply to by आनंदी गोपाळ

अमर विश्वास 08/12/2016 - 23:10
आनंदी गोपाळ मी फक्त नवीन निर्णय काय आहे ते लिहिले आहे .. हा निर्णय योग्य / अयोग्य असे कुठलेही मत दिलेले नही यात भजन गायकीचा संबंध येतोच कुठे ? उगाच स्वतः चे फस्ट्रेशन आमच्यावर लादु नका दुसरी गोष्ट : योग्य कार्ड वापरले तर पेट्रोल भरल्यावर कुठलाही चार्ज लागत नाही ... एवढी साधी गोष्ट नसमजणाऱ्या / दुर्लक्ष करणाऱ्या माणसांना तिर्थरुप आठवणे साहजिकच आहे ... उगाच कोणावर टीका करण्यापेक्षा (स्पष्ट सांगायचे तर बाप काढण्या पेक्षा) आपला अभ्यास वाढावा ...

वरुण मोहिते 08/12/2016 - 20:01
असं जगात कुठे आहे का हो ???? हेच पैसे आपल्याकडून वसूल केले जाणार टॅक्स किंवा अनेक माध्यमांतून . या कंपन्या डिस्काउंट देतात बाकी ऑनलाईन व्यवहारांवर त्यांना पॉईंट्स असतात ,जाहिराती असतात त्यामुळे देतात . पेट्रोल वैग्रे वर स्वस्त लोल

वरुण मोहिते 08/12/2016 - 21:22
असेल तर भाजप चा इतिहास पण पहा . एक निर्णय झाला तर ७-८ धागे आले . बाकी गोष्टींवर आले नव्हते कधी . वन्स अगेन लोल

चिगो 08/12/2016 - 22:23
आजच 'डिजीटल ट्रान्झॅक्शन्स'वर सेमिनार घेतला आम्ही, बँकाच्या मदतीने.. मी बोलतांना हेच बोललो बँकवाल्यांना कि बाबारे, जे काही मार्ग आहेत कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सचे आहेत ते सगळे सांगा, मग ते युपीआय असो, वा युएसएसडी, मोबाईल वॉलेट्स, कार्ड पेमेंट असो किंवा आणखी काही असो.. त्यातले 'डूज अँड डोन्ट्स' सांगा.. लोकांना जे पटेल, जे जमेल ते तो घेतील. आता बघूयात, काय होतंय ते.. बाकी आता जरा 'देशभक्ती'चा ज्वर जरा कमी झाला असेल, तर राज्यशकट हाकणारे जरा अर्थकारणावर बोलतील अशी अपेक्षा आहे.. महीनाभरापासून गुर्मीनी भरलेल्या गुरकावण्याच ऐकायला मिळताहेत. आतातरी जे लोक मोबाईल फक्त कॉल घेण्यापुरता वापरतात (आणि ज्यांना मोबाईल सायलेंटवर लागलाच तर 'साऊंड मोड'वर कसा आणायचा हे कळत नाही) त्यांना, ज्यांना मोबाईल वॉलेट्स वापरायचे नसतील त्यांना, ज्यांच्या गावापासून बँका किमान २५-३० किमी दुर आहेत त्यांना, ज्यांच्या गावात नेटवर्क योग्यप्रकारे मिळत नाही त्यांना,ज्यांना सगळं करता येत असूनही स्वतःचा कायदेशीर पैसा कॅशमध्ये वापरायचा आहे त्यांना, जेवढा हवा असेल तेवढा पैसा कधी मार्केटमधे येणार, हेपण सरकारनी सांगायला हवं..

In reply to by चिगो

याॅर्कर 08/12/2016 - 22:57
ग्रामीण लोक्स,गरीब,निरक्षर इ.ची संख्या पण अव्वा च्या सव्वा आहे.अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे! डिजीटल ट्रान्झॅक्शन,ऑनलाईन पे,प्लास्टिक मनी इ. कंसेप्ट्स कशा त्यांना समजवणार ते सरकारलाच माहित. आणि ग्रामीण आणि निम्नशहरीय लोकं आता हळूहळू सरकाच्या नावानं बोटं मोडत आहेत.बँकेच्या रांगेत अनेक खमंग शिव्या ऐकायला येत आहेत,लग्न ठरलेल्या याद्या आणि पत्रिका दाखवूनही मर्यादित रक्कमच दिली जात आहे.

In reply to by याॅर्कर

आनंदी गोपाळ 08/12/2016 - 23:03
ह्यॅ! कैतरीच कै? हे #$#^%चे फुकटे, टॅक्स न भरणारे एकजात फुकटखाऊ, काँग्रेसने मातवून ठेवलेले अंगठेभाद्दर! त्यांची पत्रास कशाला बाळगायला हवी? मरतील तर बरं होईल. तेवढंच काँग्रेसमुक्तीच्या दिशेने अजून एक पाऊल. बाई म्हटल्या होत्या, 'गरीबी हटाओ' आम्ही गरीबांनाच हटवणार आहोत!

सुज्ञ 09/12/2016 - 00:07
.. पन वीज वापरण्यापेक्षा मेणबत्ती वापरणे सोपे .. विज निर्माण करण्यासाठी धरण बांधणे , अणू प्रकल्प चालवणे , सौर्यप्रकल्प चालवणे त्यात पैसे खर्च करणे वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात . शिवाय विजेचे बिल देखील खूप असते . सर्वसामान्यांना ते परवडणार नाही .. त्याशिवाय मेणबत्ती लगेच उपलब्ध देखील होते . भसकन काडी ओढली कि लगेच लगेच मेणबत्ती पेटलीच . त्याशिवाय भारतात काही ठिकाणी वीज पोचवण्यात अडचणी खूप .. मेणबत्ती लगेच मिळते .. त्यामुळे मी म्हणतो .. वीज का वापरा ? मेणबत्तीच वापरू . अंतिम उद्देश प्रकाश पाडणे हाच आहे ना ? अरे पण जगातील प्रगत देश तर वीज वापरतात .. अरे का काय घंटा फरक पडलाय का त्यांना ? आम्ही १० मेणबत्य्या लावल्यावर तेवढाच उजेड पडला . त्यावर मी प्रश्न विचारतो . जगात वीज वापरली म्हणून मेणबत्त्या वापरायचे थांबले का ? किंवा जगात वीज वापरल्याने खूप जास्त प्रकाश पडला का ? पण सरकार म्हणते वीज वापरा. पण आता आमचे "नकोसे" सरकार आहे .. सरकार वीज वापर असे सांगत आहे म्हणजे सक्ती करत आहे ( ???? ).. मग तर सरकार काहीही म्हणूदे . निर्बुद्ध युक्तिवाद करणे हे आपले परम कर्तव्य आहे . हो हो .. आमच्या लक्षातच नाही आले . :) चला मी चालू होतो .. मेणबत्ती वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक नाही असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते लिंका अ ब क .

विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत वीज सरकारकडून मिळणार असेल तर काहीही हरकत नाही. पण समजा वीज खंडीत झाली, किवा कमीजास्त भार वाढून आमचे नुकसान झाले तर सरकारनी जबाबदारी घ्यावी.

In reply to by मार्मिक गोडसे

निओ१ 09/12/2016 - 00:37
मग आधीच्या सरकारने जे केले तेच करत रहावे व आपण फक्त बघत रहावे असेच वाटत आहे का? तुम्हाला अडचण ही तर नाही की आधीच्यानी केले नाही व ह्यांनी केले ?

In reply to by निओ१

तुम्हाला अडचण ही तर नाही की आधीच्यानी केले नाही व ह्यांनी केले ?
त्यांनी असा मुर्खपणा केला असता तर तेव्हाही हेच वाटले असते.

सुज्ञ 09/12/2016 - 00:38
आणि मी डी क्लास शहरात राहतो (यड्राव फाटा - इचलकरंजी) पण दारू सकट सर्वठिकाणी मी कार्ड देतो . एखाद दोन वेळेस रांगेत उभारून पैसे काढावे लागले याव्यतिरिक्त मला कसलाही त्रास जहाल नाही . वडापाव चहा कोफी वगैरे देखील सुरळीत चालू आहे ..थट्टा चाचा तुम्ही राहता कोठे ? बाकी गरीब दारू का पितो वगैरे फालतू प्रश्न विचारू नका.. बाकी. जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले .. बाकी जाता जाता अर्थात नगरपलिका निवडनुकांचे निकाल याची साक्ष देतातच .. पण तरीही .. लोकांना भडकवण्याचा व त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा कसला जळफळाट म्हणायचा हा .

In reply to by सुज्ञ

निओ१ 09/12/2016 - 00:43
नका, उत्तर देत बसू. मी उत्तर देणे बंद केले आहे व शक्यतो धागालेखक देखील बंद करेल. विरोध करायचा झाला तर विरोध करणारच मग अगदी वरण आधी की भात आधी की आधी भात की वरण? यावर देखील हे दंगा घालतीलच.

In reply to by सुज्ञ

याॅर्कर 09/12/2016 - 07:09
जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले ..
ही शुद्ध लोणकढी थाप आहे. ग्रामीण भागातील लोकांना त्रास होतोय,फक्त काहीजण प्रियसीने दिलेला त्रास गोड मानून घेतात त्यातला प्रकार हाय ह्यो:-)

In reply to by याॅर्कर

दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद इथे टाकतो. समजा वाटलंच आणि वेळ मिळालाच तर पाहून घ्या. उगाच बँकांच्या रांगेतल्या लोकांची मतं नाहीयेत ती, म्हणून इथे टाकली. तुम्हाला खरंच लोकांच्या मनात काय खदखदतंय हे पहायची इच्छा असेल तर खालील विडिओ पहा. उगाच तथ्यहीन चर्चा करण्यापेक्षा हे प्रत्यक्ष लोकांचं मत पाहणं जास्त माहितिकारक नाहीये का? https://youtu.be/-XtYRZ_Bn4g https://youtu.be/0bpVIl1P9y8

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

याॅर्कर 09/12/2016 - 10:31
नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे हो:-) त्यावेळचा त्रास गोडच वाटतो,नंतर तिटकारा येईल लोकांना.आणि हनिमून पिरीयड काळातील जनतेच्या प्रतिक्रिया खाजगी चॅनेलनी घेतल्या आहेत त्यांच्या सोयीने.ग्रामीण अर्थकारण आणि सहकार याची री पण मुंबईत मुख्यालय असलेल्या चॅनेलन्सना कळणार नाही.बँक मॅनेजरला टक्केवारीवर मॅनेज करणारे भरपूर काळे लोक आहेत,असे लोक आलिशान बंगल्यात एसीची हवा खात,बिअरचा घोट घेत,सिगरेटचा धूर सोडत निवांत असतात ते कधीही बँकेच्या लाईनीत थांबत नसतात.कोलकात्या भाजप नेत्याचे तेहतीस लाख पकडले होते सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या.इतर पक्षाचेही असे बरेच गुंठामंत्रीछाप लोक आहेत. बँकेच्या लाईनीत थांबणारे कोण आहेत याचा सर्वेच करावा.सगळे सामान्य,मध्यमवर्गीय लोकं आहेत. शिवाय लोकांचा युपीए सरकारविषयीचा राग अजून मावळला नाही,म्हणून सद्य सरकारशिवाय त्यांना तरणोपाय नाही.

In reply to by याॅर्कर

कठीण आहे! _/\_. नोटबंदीच्या २७ व्या दिवशी कुठल्याही रांगेत न जाता बाजारात जाऊन घेतलेल्या प्रतिक्रिया आहेत(एबीपी माझा भाजपधार्जिणी वाहिनी आहे असे आपल्याला वाटत असल्यास विषयच खुंटतो). असो! त्रास होतो आहे हे कुणीही नाकारलेलं नाहीच आहे पण सरसकट सगळ्यांना दररोज दिवस-दिवस बँकेच्या रांगेत उभं राहावं लागतंय मृगजळ ते तयार करणार्यांनाच लखलाभ होवो! १. जनभावनेची जमिनी सत्यता पडताळावी २. सरकारचे वाभाडे ३१ नंतर काढावेत एवढंच काय ते सांगणे आहे!

सुज्ञ 09/12/2016 - 01:13
आधीच्या सरकारने १० कानाखाली मारल्या व कधीतरी पाठीत गोंजारले १० कानाखाली खाल्लेले लोक प्रचंड आहेत .गोंजारून घेऊन आणि तितकाच विचार करू शकणारे लोक .. गोंजारून घेऊन मग शांत बसलेले लोक हो आत्ताचे सरकार कानाखाली वाजवून सांगत आहे की लोकहो ..जागे व्हा . किमान जागे करण्याचा प्रयत्न तरी करत आहे.. पण ज्यांना फालतू गोंजारून घ्यायची सवय झाली आहे . आणि त्यामुळे येथे काहीच घडू शकत नाही असे युक्तिवाद करतात त्यांना काय करावे

In reply to by आजानुकर्ण

सुज्ञ 09/12/2016 - 02:00
आजानुकर्ण .. आपले प्रतिसादात अत्यन्त हास्यास्पद असतात .. त्यामुळे आपण ते टंकण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल .आपल्या प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही . आपला एका धाग्यावरील प्रतिसाद .. "कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते" हा आपला प्रतिसाद म्हणजे "पाणी संपल्यास दगड नेहेमीच कामी येतो आणि तो कुठेही मिळतो . पाणी दुर्मिळ आहे त्यामुळे लोकांनी दगडच वापरा" छाप आहे . तस्मात आपले लेखनश्रम कमी करा

In reply to by सुज्ञ

आजानुकर्ण 09/12/2016 - 09:24
प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही
किमान इतकं समजून घेण्याची तुमची बुद्धी आहे हे समजल्याने गहिवरुन आले. बाकी माझे प्रतिसाद वाचण्याचे कष्ट कमी करा. तुम्हाला ते झेपत नाहीत हे दिसतंय. बुद्धीला जास्त ताण देऊ नका. काळजी घ्या. बाकी पाणी संपल्यावर दगड वापरण्याचा तुम्हाला बराच अनुभव दिसतोय! दगड वापरण्यावर आक्षेप असल्यास पाणी संपल्यावर दगड वापरला नाही तरी चालेल. फक्त बाकीच्यांपासून लांब राहा. आणखी काय सांगणार. तुम्ही सूज्ञ सुज्ञ आहातच.

म्हात्रे साहेब, भारतातील एकंदरीत काळ्या पैशापैकी फक्त ६ टक्के पैसा हा नोटांच्या स्वरूपात होता. तसेच ५०० व १००० च्या एकूण नोटांपैकी ८० टक्के नोटा बँकेत जमा झालेल्या आहेत. उरलेल्या ३१डिसेम्बर पर्यंत होतीलच. त्यामुळे जमा झालेल्या नोटांचा माग काढून त्यातल्या ज्या काळ्या पैशाशी संबंधित होत्या त्यावर सरकार कशी कारवाई करते हे पाहून सध्याच्या निर्णयाचे मोजमाप करता येईल. तसेच आर्थिक भ्रष्टाचार करणारे लोक नोटांऐवजी कुठेतरी भूखंड, फ्लॅट, गाळा ह्या स्वरूपात देखील मलिदा घेतात. त्यामुळे छोटी नोट म्हणजे देशातील भ्रष्टाचार कमी करायला मदत हे अजिबात मान्य नाही. बाकी गेल्या ७० वर्षाची घाण साफ करून, अजून १०० वर्ष साफ करायला पुरणार नाहीत एवढी घाण ५ वर्षात (अजून अडीच उरलीत म्हणा फक्त) निर्माण होऊ नये ही अपेक्षा.

मदनबाण 09/12/2016 - 10:39

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... १. Digital payments soar by up to 300% after demonetisation Upasana Taku, co-founder of another wallet company MobiKwik, said digital payment options are rapidly coming up across many essential services, which will give a fillip for setting up a cashless economy. "Wallets are being installed at highways, gas stations, essential service points, and at a large number of retail stations. २. Demonetisation effect: How the common man is going digital amid cash crunch

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमर विश्वास 10/12/2016 - 15:25
डॉक्टरसाहेब आपला प्रतिसाद दिसत नाही . परत पोस्ट कराल का? या योजनांबद्दल वाचले आहे . नक्की चांगला परिणाम होईल

मारवा 10/12/2016 - 22:22
भारतातली आय सी ए आय ही अतिशय उच्चत्तम दर्जाची संस्था आहे. सी.ए. कोर्स हा अत्यंत प्रतिष्ठीत आहे. याच्या मेंबरांना तुम्ही डिमॉनेटायझेशन विरोधात निगेटीव्ह मते देऊ नका असा मागास बिन्डोक तालिबानी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणारा फतवा कसा काय काढला जाऊ शकतो. मी स्वतः नोटबंदीच्या पुर्ण १०० % समर्थनात सध्या तरी आहे. मात्र असे फतवे बघुन अस्वस्थता वाढत आहे. इतक्या विद्वान तज्ञ मेंबरांना लोकशाही देशात आपले व्यक्तीगत मत मांडण्याचेही स्वातंत्र्य नसावे हा निव्वळ अतिरेक आहे. विरोध अजिबात दाबला दडपला जाऊ नये. हा प्रकारच चुक आहे. “The members are strictly advised not to indulge in any nefarious act to subvert the intentions of the government in any remote possible way,” it said. . “Members are also advised not to share/write any negative personal views by way of an article or interview on any platform regarding demonetisation,” it said. हे म्हणजे कमाल आहे. म्हणजे एखादा व्यक्ती सीए आहे आणि त्याचे मत डिमॉनेटायझेशन विरोधात असेल तर त्याचे अभ्यासपुर्ण मत ही त्याने नोटबंदी विरोधात मांडायचे नाही ? मिसळपाववरील सीए आदुबाळ , संक्षी इं चे यावर काय मत आहे ?

In reply to by मारवा

याचे नक्कीच आश्चर्य वाटले. त्या ऐवजी, आयसीएआय ने यासंबंधी खालील किंवा तत्सम विषय/उद्येश समोर ठेवून चर्चा/सेमिनार आयोजित करून आपल्या बिरादरीचे आणि जनतेचे शंकानिरसन व ज्ञानवर्धन करणे अपेक्षित होते... अ) कारवाईचा अर्थशास्त्रीयदृष्ट्या असलेला उद्येश व त्यातील बरेवाईटपणा, आ) कारवाईचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर व सर्वसामान्य जनतेवर झालेले, आता होणारे आणि भविष्यात होऊ शकणारे परिणाम, आणि इ) कारवाईच्या परिणामांमुळे जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी काही वास्तविक उपाय शोधणे, इ.

In reply to by मारवा

यामागे कोणाचा दबाव होता हे बाहेर येणे/आणणे खरेच गरजेचे आहे. अशा गोष्टींनी सरकारच्या योग्य कृतींना खीळ बसतो आणि असहिष्णुतेचा रंग मिळतो असे माझे वैयक्तिक मत आहे. अवांतर : हि ऍडवायजरी होती की रिस्ट्रीक्शन होते यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. वर लिहिलेल्या दोन पैकी पहिला मुद्दा तरी योग्य वाटतोय - not to indulge in any kind of nefarious act. काल रात्री दिल्लीच्या एका लॉ फर्मवर टाकलेल्या धाडीत मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बातम्यात सांगण्यात आले की हे लोक सीएन्च्या मदतीने काळ्याचा पांढरा आणि हवालाचे काम करत होते.

मारवा 10/12/2016 - 22:32
विरोध बघुन निर्णय मागे घेण्यात आला. पण जो काय दडपशाहीचा प्रकार होतो आहे तो फार निषेधात्मक असा आहे. या पुर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी कोणी हा दबाव मुळात आणला होता. ज्या अनिल गलगलींनी संस्थेच्या या निर्णयावर टीका केली त्यांना ब्लॉक करण्याचाही निर्लज्ज प्रकार आयसीएआय ने केला. http://galgalianil.blogspot.in/2016/12/blog-post_81.html http://galgalianil.blogspot.in/2016/12/to-stop-criticism-of-note-ban-icai.html http://www.firstpost.com/india/icai-withdraws-advisory-asking-members-to-not-criticise-demonetisation-3150142.html

गामा पैलवान 11/12/2016 - 21:39
लोकहो, क्याशलेस की लेस क्याश हे असले प्रश्न या साहेबांना पडलेले दिसंत नाहीत. नोटाबंदीचा असाही एक परिणाम : https://www.majhapaper.com/2016/12/09/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%a5%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6/ आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अश्या भ्रष्ट लोकांना त्याचा पक्ष किंवा स्तर न बघता शिक्षा व्हायलाच पाहिजे. किंबहुना जेवढा राजकिय स्तर वरचा तेवढी जास्त शिक्षा व्हावी असा कायदा केला तरी त्याला माझा पाठींबाच राहील, कारण अश्या लोकांकडे सामान्य लोक आणि विशेषतः नवीन पिढी आदर्श/मार्गदर्शक म्हणून पहात असते. त्यमुळे त्यांना सहजी माफ करणे म्हणजे चुकीचे संकेत लोकांच्या मनावर बिंबविल्यासारखेच आहे.

काही मंडळी फक्त विरोध...करायचा म्हणुन विरोध करतात ..केजरी टाईप नोट बंदी ने बराच काळा पैसा बाहेर येतोय ..अजुन १७ दिवस आहेत .कर संशोधन विधेयक २०१६ हे वित्त विधेयक लागु होइल दोन एक दिवसात तेव्हा तिही योजना कशी बेकार आहे ह्याचे पाढे चालु होतिल...आयकर खात्याच्या धाडी मध्ये नवीन नोटा सापडत असल्याने देशाचे नागरीकच असलेले बँक कर्मचारी हे गद्दारी करीत असल्याचे दिसते,त्यांचीही योग्य चौकशी होईल,बरेच घरी जातील काहींना जबर दंड बसेल. प्रत्येक संशयास्पद खात्याची चौकशी होइल आणी अजुन बराच काळा पैसा जो बँकेत जमा झाला आहे तो सरकार जमा होइल. आम्हालाही नोटबंदी चा त्रास होतोय उधार्या मिळत नाही पण हरामाचा पैसा सरकार जमा होतोय ते बघुन आंनद होतो.

Tax collection higher in April-November 2016 despite demonetisation, says finance minister Arun Jaitley प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे. १. सेंट्रल एक्साईज कर : ३१.६% वाढ : हा उत्पादन (manufacturing) वाढल्यामुळेच शक्य होते. २. सर्विस टॅक्स : १२.४% वाढ : हा सर्विस (सेवा) उद्योगात वाढ झाल्याशिवाय शक्य नाही. ३. VAT भरणाही वाढला आहे. यातला लक्षणिय भाग जुन्या नोटांत असावा असा अंदाज आहे, म्हणजे तो बहुदा ०९ नोव्हेंबरनंतर भरला गेला असावा : ही वाढ विक्रीत वाढ झाल्यावर होऊ शकते. ४. याशिवाय, खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर (अ) उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे आणि (आ) शेतकरी प्रचंड अडचणीत येऊन शेतीची पेरणी धोक्यात आली आहे; या दोन गोष्टी खर्‍या धरल्या तर वरचे वाढीचे आकडे कसे शक्य आहेत. उद्योगधंद्यांनी उत्पादन कमी झाले असतानाही जास्त कर भरला आहे की शेतकर्‍याने सर्व पेरणी उधारीवर केली / त्याला बियाणे, खत इत्यादी फुकट मिळाले ???!!! बेजबाबदार विरोधी राजकीय विधाने करायला पुरावे लागत नाहीत. तसेच, नसलेल्या पैशाचे सोंग आणता येत नाही. यावरून खरे-खोटे काय ते सुजाण लोक जाणतीलच !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 09/01/2017 - 21:11
>>खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. खरीपातील पेरणी पावसाळ्यात करतात असं ऐकून आहे. बाकी टॅक्सचा भरणा जास्त झाला हे पहिल्या काही दिवसांतच दिसले होते. Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे. ही काही उत्पादनवाढ किंवा तत्सम कारणांनी झालेली वाढ नव्हे.

In reply to by नितिन थत्ते

वरचे आकडे माझ्या कल्पनाशक्तीचा अविष्कार नाही, अर्थखात्याने दिलेले आकडे आहेत. Demonetisation windfall: Civic agencies record 268% increase in tax collection ही २३ नोव्हेंबरची बातमी आहे. १. हे म्युनिसिपल कर, वीज कंपन्या व इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या करांबद्दल, ते कर दिमॉनेटाईज्ड नोटांच्या रुपात भरणा केल्याने, झाले होते अशी बातमी होती, असे वाटते. मूळ दुवा दिल्यास किंवा तो तुम्ही स्वतः वाचून सांगितल्यास जरा स्पष्ट होईल. :) २. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे, हे वाचायला विसरलात का ? पण तरीही, तुम्ही बोलताय म्हणजे मग त्यापुढे भारतिय अर्थमंत्र्यांची आणि भारतीत अर्थखात्याची काय पत्रास म्हणा, अर्थमंत्रीच चूक असणार, नाही का ?! =)) =)) =)) ("चष्मा काढून वाचले असते तर ते सर्व दिसले असते का ?", हा प्रश्न मनात उभा राहीला, पण तो विचारायचा विचार सोडून दिला आहे ;) :) ) तेव्हा, चिल !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 09/01/2017 - 21:54
सरकारच म्हणतंय की ग्रोथ कमी होणार.... http://www.businesstoday.in/current/economy-politics/gdp-growth-to-decline-at-71-predicts-government/story/243671.html Most private economists have pared India's growth forecast to 6.3-6.4 per cent for the 2016-17 fiscal year, citing the impact of the government's scrapping of high-value bank notes last November, which they reckon would linger for one more year. अर्थात प्रायव्हेट इकॉनॉमिस्ट कोण ठाऊक नाही पण बहुधा परदेशातील असावेत. http://www.hindustantimes.com/business-news/govt-forecasts-economy-losing-momentum-gdp-could-be-lowest-in-3-years/story-cKkCZpjJuWzSZyXWPQ0cRJ.html यातील एक महत्त्वाचे वाक्य... Releasing the data compiled by the Central Statistics Office (CSO), Chief Statistician T C A Anant said the figures for November were available and examined but “it was felt in view of the policy of denotification of notes there is a high degree of volatility in these figures and conscious decision was taken not make projection using the November figure”

In reply to by नितिन थत्ते

मुळ मुद्दे विसरलात काय ? बाजू उघडी पडली की विषय बदलणे अपेक्षितच होते म्हणा =)) =)) =)) पण चला, त्याबाबतचाही गैरसमज थोडासा कमी करूया :) (यानंतरही दिशाबदल केला गेला तर आश्चर्य वाटणार नाही, पण तरीही एक "शेवटचा" प्रयत्न :) ) जीडीपी वेगळा विषय आहे. त्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो... उदा. काळ्या पैश्यांनी खरेदी केल्या जाणार्‍या लक्झरी गाड्या, कोटींमध्ये किंमती असलेल्या सदनिका, जमिनी, सोने, इत्यादींचा खप कमी झाल्यानेही जीडीपी कमी होईल. त्यामुळे होणारी जीडीपी च्या वाढीला "वाढ उर्फ ग्रोथ" पेक्षा अर्थशास्त्रात "सूज उर्फ स्वेलिंग" हा शब्द जास्त योग्य आहे, कारण त्याने काळ्या पैश्याची वाढ होण्याची शक्यता जास्त असूनभाववाढ कमी होणे, नोकर्‍या निर्माण होणे, इत्यादी सामान्य जनतेला उपयोगी परिणाम होण्याची शक्यता नसते. काळ्या पैश्याचे चलन नगण्य झाल्याने कमी होणारी भाववाढ, कमी व्याजदरामुळे वाढलेला घरांचा खप, कमी व्याजदरामुळे उद्योगधंद्यामध्ये झालेली वाढ, इत्यादींमुळे "सूज" गेल्याने झालेली जीडीपी घट पुढच्या "खर्‍या वाढीने" २ ते ३ तिमाह्यांत भरून निघून निघेल; त्याचबरोबर ही वाढ खरी वाढ असल्याने ती नोकर्‍याही निर्माण करेल, जो जनतेच्या फायद्याचा मुख्य मुद्दा आहे. (अ) जमा झालेली/होणार्‍या वाढलेली आयकराची रक्कम व (आ) घरात नकदेच्या स्वरूपात असलेली पण आता बँकात जमा झालेली रक्कम, पाहिल्या तर, सरकारला आणि खाजगी व्यवसायांना सुलभ दराने कर्ज उपलब्ध होणार आहे हे सांगायची गरज नाही, कारण ते आधीच झाले आहे आणि भविष्यात त्यात अजून सुधारणा होत राहील. याचा परिणाम जीडीपी च्या वाढीत तर होईलच पण त्या प्रकारची वाध नवीन नोकर्‍याही निर्माण करेल. १९९१ ते २००३ या कालखंडात जीडीपी वाढ कमी ते मध्यम होती पण नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण मोठे होते. त्याविरुद्ध २००४ ते २०१२ मध्ये जीडीपी वाढ बहुतेक वर्षी उच्च स्तरावर होती पण नवीन नोकर्‍या निर्माण होण्याचे प्रमाण तुलनेने कीव करण्याजोगे (पॅथेटिक) होते. हे का ? ते समजण्यासाठी खाली एक युपीए च्या हाय जीडीपी ग्रोथ पिरियड मधील एका शोधनिबंधाचा संदर्भ देऊन सुरुवात करू देत आहे.... ECONOMIC GROWTH AND EMPLOYMENT LINKAGES : The Indian Experience बाकीचे असेच संबंधीत सबळ संदर्भ तुम्ही शोधाल आणि त्यांचा अभ्यास करून मगच "जीडीपी व त्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम" अश्या गंभीर मुद्द्यावर प्रतिसाद लिहाल असा आशावाद व्यक्त करतो ! :) यावर तुमच्याकडून काही सबळ पुराव्यांसह काही वाचले की मग आपल्याला जीडीपीसंबंधी दुसर्‍या मुद्द्यांवरही सकारात्मक चर्चा करता येईल. अन्यथा बेजबाबदार राजकीय वितंडवादामध्ये मला रस नाही. काय म्हणता ?

संदीप डांगे 10/01/2017 - 03:15
डॉक्टरसाहेब, माझे काही बाळबोध प्रश्न आहेत, आशा करतो उत्तरं मिळतील. सदर बातमीत प्रत्येक आकडेवारी देतांना एप्रील-ते-नोव्हेंबर असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ काय? नोटाबंदी ८ नोव्हेंबरला झाली. नोटाबंदीचा दुष्परिणाम-सुपरिणाम-नोपरिणाम बघायचा असेल तर १० नोव्हेंबर ते १० जानेवारी ह्या दोन महिन्यांतली आकडेवारी बघायला हवी असे मला वाटते. जेटलींचे कदाचित वेगळे मत असू शकेल ते माझ्या पेक्षा कैक पटीने हुशार आहेत. प्राथमिक डेटाप्रमाणे २०१५ च्या डिसेंबरपेक्षा २०१६ च्या डिसेंबरमध्ये अप्रत्यक्ष १४.२% करांमध्ये वाढ झाली आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे हे आकडे एप्रिल ते नोव्हेंबर ह्या आठ महिन्यांचे एकत्रित आहेत का? प्रत्येक महिन्याचे आकडे असतात की तिमाही-सहामाही असे एकत्रित आकडे असतात? कर भरणारे दर महिन्याला कर भरतात की तिमाही-सहामाही असे भरतात? असे प्रत्येक महिन्यात किती कर भरला याचे आकडे मिळतील काय? १. सेंट्रल एक्साईज कर : ३१.६% वाढ : हा उत्पादन (manufacturing) वाढल्यामुळेच शक्य होते. २. सर्विस टॅक्स : १२.४% वाढ : हा सर्विस (सेवा) उद्योगात वाढ झाल्याशिवाय शक्य नाही. हा फक्त नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचा आकडा आहे की एप्रिल ते नोव्हेंबरचा ह्या आठ महिन्यांचा? सर्विस टॅक्स व सीईटी भरण्याची नियमित मुदत काय असते? विक्री झाल्यावर पुढच्या महिन्यात भरायची असते की कधी? म्हणजे ऑक्टोबरच्या झालेल्या विक्रीवरचा कर नंतर नोव्हेंबरमधे भरतात की आधीच सप्टेंबरमधे? ३. VAT भरणाही वाढला आहे. यातला लक्षणिय भाग जुन्या नोटांत असावा असा अंदाज आहे, म्हणजे तो बहुदा ०९ नोव्हेंबरनंतर भरला गेला असावा : ही वाढ विक्रीत वाढ झाल्यावर होऊ शकते. ही विक्रीत वाढ 'नोटाबंदीनंतर' झाल्याचे कसे काय सिद्ध होत आहे? वॅट कधी भरतात? माझ्या माहितीप्रमाणे एका महिन्याचा वॅट दुसर्‍या महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत भरायचा असतो. कदाचित काळा पैसा खपवण्यासाठी वॅट चा वापर झालेला असू शकतो. पण ह्याचा अर्थ नोव्हेंबर-डिसेंबरात विक्रीत वाढ झाली असा तर होत नाही. अ‍ॅडव्हान्स वॅट म्हणजे विक्री होण्याआधीच कोणी वॅट भरत असेल तर माहित नाही बॉ. नोव्हेंबर-डिसेंबर तसाही धंद्याच्या दृष्टीने उताराचा काळ असतो, दिवाळी झाल्यानंतर तसाही बाजार आळसावतो. (विशेष म्हणजे काही नोटाबंदीसमर्थक धंदा मंदावण्याच्या मुद्द्यावर ह्याचाच वापर करत होते) तेव्हा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कोणत्या लोकांनी खरेदी केली असावी? (पण लोक तर म्हणत होते की कॅश नसल्याने अनावश्यक खर्च टाळले, बचत झाली, गरजेपुरता खर्च केलाय. ) ४. याशिवाय, खरीपातली पेरणी ६ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे अगोदरपासून माहित झाले आहेच. माझ्या माहितीप्रमाणे खरीप लागवड जुलै-ऑगस्टच्या सुमारास होते. ह्यावर्षी खरीपाचा हंगाम डिसेंबरात होता काय? शिवाय मागच्या वर्षी पावसाच्या अभावामुळे पेरण्यांवर परिणाम झाला होता ह्यावर्षी चांगला पाऊस झाला. जुलै-ऑगस्टच्या खरिपाच्या अवघ्या ६ % वाढीचे श्रेय चांगल्या पावसाला न देता नोव्हेंबरात झालेल्या नोटाबंदीला द्यायचे काय संदर्भ असू शकतात? विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जर (अ) उद्योगधंद्यांना जबर फटका बसला आहे आणि >> १. ऑल इन्डिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन (एआयएमो) ही ३ लाख पेक्षा जास्त लघु, मध्यम व मोठ्या उद्योजकांशी संबंधीत व १३००० प्रत्यक्ष सदस्य असलेली देशातली एक संस्था आहे. ह्यांनी नुकताच एक सर्वे रिपोर्ट जाहिर केलाय . त्यांच्या मते स्पेसिफिकली ह्या दोन महिन्यात ३५% रोजगार कपात व ५० टक्के महसूलात घट झाली आहे. कारणे : कॅशफ्लो नसणे, कॅश काढण्यासाठीचे जाचक नियम, स्टाफ ची गैरहजेरी, भांडवल उभारण्यात आलेला अडथळा, कर्जप्रस्तावांवर काम करण्यात बॅन्कांची असमर्थतता, थांबलेलं रिअल इस्टेट, रुपयाच्या विनिमय दरातली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांमधे भीतीचे वातावरण, निकृष्ट तयारी व जीएसटीबाबत चा संभ्रम. रोजगार व महसूल, दोन्हींमधे येत्या मार्च २०१७ पर्यंत ६० व ५५% कपात अपेक्षित आहे असे नमूद केले आहे. २. ह्युंदाय मोटर्सचे वीपी राकेश श्रिवास्तव यांच्यामते नोटाबंदीनंतर लगेच शोरुममधली ग्राहकांची वर्दळ ४०% टक्क्यांनी कमी झाली तर एकूण विक्रीत २४-२५% घट आली. पण डिसेंबरमधे मात्र मागच्या वर्षीच्या डिसेंबरपेक्षा ५% वाढ दिसली. तरी स्थिती सामान्य होण्यास किमान एक तिमाही जाईल असे ते म्हणाले. महिन्द्रा चे विक्रीचे आकडे मागच्या वर्षीच्या पेक्षा १.५ % घटलेत. अशोक लेलॅन्ड ने १२% घट झाल्याचे जाहीर केले आहे. मागच्या वर्षीच्या १२१५४ युनिट्स च्या जागी यावर्षीच्या डिसेंबरमधे १०७३१ युनिट्स विकलेत. मारुती उद्योग ४.४% घट. बजाज ऑटो २२% घट. बजाज बाईक्स ११% घट. ह्या सर्वांत फोर्ड इन्डिया ने मात्र मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीच्या विक्रीत ६.०४% वाढ नोंदवली. फोक्सवॅगन ने ६८.७२%, निसान इन्डिया ने २१% यमाहा २८% रॉयल इन्फिल्ड ४१% वाढ मागच्या डिसेंबरपेक्षा जास्त नोंदवली आहे. ह्या कंपन्यांना पार्ट्स सप्लाय करणार्‍या कारखान्यांच्या उत्पादनांत मात्र खंड पडला आहे. सर्व ब्रॅण्डच्या बाईक्सच्या विक्रीत मागच्या डिसेंबरच्या तुलनेत ४०% घट आहे. अनेक कारखान्यांना उत्पादन बंद ठेवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. अनेकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. ३. निक्केइ इन्डिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर्स इन्डेक्स) पहिल्यांदाच ५० च्या खाली गेलाय. नोव्हेंबरमधे ५२.३ असणारा हा निर्देशांक ४९.६ पर्यंत खाली आलाय. ५० च्या खाली येणे म्हणजे घट व ५० च्या वर असणे म्हणजे वाढ. निक्केइ च्या मते हे सरळ सरळ उत्पादन घटल्याचे निदर्शक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत हा निर्देशांक सुस्थितीत होता. वरील बातम्या ह्या विरोधी पक्षांनी बनवलेल्या नसून पैशाचे सोंग अजिबात आणता न येणार्‍या बाजारातल्या आहेत. शिवाय त्या "नोटाबंदीनंतर" काय झालं याबद्दल बोलतात. (आ) शेतकरी प्रचंड अडचणीत येऊन शेतीची पेरणी धोक्यात आली आहे; >> वर सांगितल्याप्रमाणे खरीप पेरणी ही नोव्हेंबरात होत नाही. रबीच्या पेरणीवर परिणाम होईल असे सांगितले जात होते. ते आकडे मागच्या वर्षीच्या आकड्यांच्या तुलनेत जास्त आहेत असा सरकारतर्फे दावा केला गेला आहे. मागच्या वर्षी पावसामुळे कमी पेरणी झाली. त्यात ह्यावर्षी चांगला पाऊस. हे दोन मुद्दे रबीपेरणीत गृहित धरणे आवश्यक आहे. नोटाबंदीचा परिणाम चांगला वाईट हे त्यानंतर बघावे लागेल. या दोन गोष्टी खर्‍या धरल्या तर वरचे वाढीचे आकडे कसे शक्य आहेत. शक्य आहेत. नोव्हेंबरात झालेल्या नोटबंदीचा परिणाम एप्रिल ते नोव्हेंबर मधे झालेल्या व्यवहारांवर होणार नाही असे मला वाटते. पण आता माझ्यापेक्षा अर्थमंत्री नक्कीच जास्त हुशार आहेत त्यामुळे कदाचित होतही असावा बुवा! तसेच सातत्याने वाढत गेलेले इंधनाचे दर, त्यावरचा वाढता कर, वाढलेले इतर करांचे दर (सर्विसटॅक्स, वॅट इत्यादी) उद्योगधंद्यांनी उत्पादन कमी झाले असतानाही जास्त कर भरला आहे की शेतकर्‍याने सर्व पेरणी उधारीवर केली / त्याला बियाणे, खत इत्यादी फुकट मिळाले ???!!! एप्रिल-ते-नोव्हेंबरचे आकडे जानेवारीत "नोटाबंदीनंतर झालेली वाढ" असे मांडले की काहीही शक्य असू शकते!!!! नाही का??? चूकभूल देणेघेणे. (सूचना: मी दिलेल्या आकडेवारीच्या लिंका गुगलून लगेच मिळतील.)

In reply to by संदीप डांगे

बातमीचे शीर्षक न वाचता तिच्यातला मजकूरही वाचला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मेगॅबायटी प्रतिसादाला अजिबात हरकत नाही... पण किमान तो दिलेला दुवा वाचून त्यावरचा प्रतिसाद लिहिला तरच काही अर्थ आहे ! ते करा मग पुढे चर्चेला अर्थ असेल :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 10/01/2017 - 11:38
माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत! फार साधे प्रश्न आहेत, उत्तर नसेल तर राहुद्या पण केवळ शीर्षक वाचले असा आरोप करू नका! धन्यवाद!

In reply to by संदीप डांगे

बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत!

त्याच (माझ्या दुव्यात दिलेल्या) बातमीतले संबंधीत परिच्छेद, तुमच्या सोयीसाठी खाली कॉपी केलेले आहेत. त्यातील संबंधित मजकूराचे मराठी भाषांतरही माझ्या मूळ प्रतिसादात दिले होते... खालच्या इंग्लिश मजकूरातील December हा शब्द मूळ बातमीतलाच आहे याची कृपया नोंद घ्यावी...

According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. आता तुमच्या वरच्या दाव्यावर मी अजून काही लिहायला हवेच का ???!!! :O: असं बघा डांगेसाहेब, तुमच्या पद्धतीने वाचन, विचार, तर्क आणि चर्चा मला करता येत नाही असे समजून, तुम्ही माझ्याकडे आणि मी तुमच्याकडे दुर्लक्ष करूया. कसे ? निदान मी तरी यापुढे तसे करणार आहे, तेव्हा गैरसमज नसावा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बाकी, नजिकच्या भविष्यात (दोन-तीन तिमाह्यांमध्ये) तुम्ही फार पूर्वी म्हटल्याप्रमाणे तुमच्या ओळखीच्या जाणकारांशी म्हटल्याप्रमाणे "या कारवाईत मारून ठेवलेल्या पाचरींचे" परिणाम स्पष्ट होऊ लागतील व एक एक शंका दूर होऊ लागतीलच ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 10/01/2017 - 18:48
खरोखर माझा मेगाबायटी वाचला असता संपूर्ण तर असा प्रतिसाद खरंच दिला नसता. तेवढा तुमच्या वाचन, विचार, तर्क यावर माझातरी विश्वास होता. तर विषय आहे उद्योगधंदे व बाजारावर नोटाबंदीचा परिणाम. त्या अनुषंगाने उद्योगधंद्यांवर परिणाम झाला नाही अशा अर्थाचा आपण वरिल आकडेवारीवाला प्रतिसाद दिला होता. करसंकलन चे आकडे वाढले म्हणजे उद्योगधंदे वाढले असे सरसकट नसते. इथे फक्त डिसेंबर महिन्याचा उल्लेख झाला म्हणजे सर्व सोपं नाही झालं डॉक्टरसाहेब. त्या डिसेंबरात कोणते कर भरल्या गेले, कधी भरल्या गेले, कोणत्या महिन्याचे भरल्या गेले हेही बघायला लागतं. त्यासंबंधी मी वर काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर्षीच्या पेट्रोलपासून (वाढलेल्या दरांपासून) सर्व बाबतीत लागू झालेल्या नवीन करांमुळे, वाढीव करांमुळे, आधी टॅक्सेबल नसलेल्या क्षेत्रांमधे कर लागू केल्याने, सेवाकराचे १२.५% चे १५% केल्यामुळे, वॅट ५ पासून ५.५% केल्यामुळे. हॉटेल्सवर ५ चा ८% वॅट केल्याने, जुन्या नोटांमधे करांची थकबाकी भरल्याने मागच्या डिसेंबर पेक्षा ह्या डिसेंबर मधे फरक दिसेलच. नो डाऊट. त्याचे कारण मी दुसर्‍या एका प्रतिसादात वेगवेगळ्या बातम्या दिल्यात त्यात आहे. ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान झालेल्या रुपयाची घसरण आणि शेअरबाजारातल्या दोन्ही निर्देशांकाकडेही बघायचे आहेच. तसेच दोनवेळा झालेली इंधनदरवाढीनेही नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरच्या करात किती वाढ केली हेही बघायला लागेल. फक्त सरकारला कर मिळाला म्हणजे सर्व आलबेल आहे असं नसतं. सरकारची आकडेवारी असली तरीही नीट तपासून टॅली करुन पाहावी लागतेच. बाकी सर्वांना माहित आहेच स्टॅटिस्टीक्स कसे वापरले जातात ते. आता कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असे कोणीतरी मागे कधीतरी बोलत होते. इथे तर देशाच्या पर्यायाने आपल्या सर्वांच्या हक्काच्या पैशाचा प्रश्न आहे. विश्लेषण झाले पाहिजेच. बाकी, अगदी खरीपाच्या प्रश्नालाही आपण बगल दिली आहे, तुमच्यामते खरीपाची पेरणी नोटाबंदीनंतर झाली असेल तर खरेच तुमच्या माझ्या वाचन, विचार, तर्क आणि चर्चा करण्याच्या पद्धतीतली ही तफावत मिपाकरांना संशयास्पद वाटू नये म्हणजे मिळवली. फार सरळ-साधे प्रश्न मी विचारले होते वर. आता दुर्लक्ष करण्याबद्दल का बोलत आहात तेही इथल्या सूज्ञ, सुजाण मिपाकरांना कळत असेलच. कॄपया गैरसमज नकोत, कोणत्याही प्रकारे 'उत्तरे द्याच नाहीतर अमूक मान्य करा' असा पवित्रा मी घेणार नाही. तुम्हाला प्रतिसाद द्यायचा नसेल तर तुमच्या इच्छेचा आदर आहे. धन्यवाद! ------------------------------------------------------------------------------------------------- सूज्ञ, सुजाण मिपाकरांनो, कृपया तुम्हीतरी माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल काय? करसंकलन इत्यादींबद्दल जाणकारांना माझी विनंती आहे जेटलीसाहेबांनी दिलेले आकडे समजून घेण्यात माझ्यासारख्या अजाण मिपाकरांना मदत करा.

In reply to by संदीप डांगे

(?चष्मा लावल्याने) मी दिलेल्या दुव्यातला "डिसेंबर" दोनदा सांगूनही दिसला नाही... व ते परिच्छेद कॉपी करून दाखविल्यावरही तिकडे दुर्लक्ष केले गेले आहे असेही दिसून आल्याने, पुढच्या चर्चेत अर्थ नाही... असे मला वाटते. सोईचे दिसणे/ न दिसणे, मुद्दा भरकटवणे, इत्यादी सतत होत असल्याने व असे वितंडवाद करण्यात मला अजिबात रस नसल्याने, मी अश्या प्रतिसादांना फाट्यावर मारण्याचा माझा हक्क राखून ठेवलेला आहे... थोडक्यात, राम राम... असाही त्याचा अर्थ होतो. यापेक्षा जास्त इस्काटून सांगणे मला शक्य नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 10/01/2017 - 23:24
म्हात्रेसाहेब, "चष्मा लावल्याचे आरोप करणे, मुद्देसूद व आकडेवारीसकट प्रतिवाद करुनही हे वाचलं नाही ते दिसलं नाही अशी बतावणी करणे, मुद्दे भरकटवल्याचे, वितंडवाद, सोयिस्कर दिसते" वगैरे सोयिस्कर पवित्रे आता सवयीचे झाले आहेत.हे तेव्हाच होतं जेव्हा प्रतिपक्षाकडे मुद्दे नसतात. त्यात नवीन काहीही नाही. आधी आपण 'सबळ पुरावे हवेत, तर्कावर आधारित मांडणी हवी' वगैरे भव्यदिव्य शब्द वापरुन प्रतिसाद देत होतात. आता तेच सर्व दिल्यावर 'मेगाबायटी प्रतिसाद, वितंडवाद 'वगैरे हिणवण्याचा प्रयत्न करत आहात. 'हे वाचलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं' असे बेलाशक ठोकून देत आहात. तुम्हाला चर्चा करायची नसेल तर ठिक आहे पण प्रतिपक्षावर असे बिनबुडाचे मनगढंत आरोप करुन स्वत:ची पलायनवादी भूमिका मुत्सद्दीपणा असल्याचे दाखवणे आपल्यासारखे तत्त्वनिष्ठ व्यक्तीने करणे याचे मला आश्चर्य वाटले आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः ह्या उक्तीप्रमाणे एकवेळ 'आकडेवारी जमवणे व त्यातले सत्य पडताळून पाहणे हे वेळखाऊ व मोठे काम आहे, मी यातला तितकासा जाणकार नाही, ह्यात वेळ लागेल व इतर जाणकारांचीही मदत घेऊन यावर चर्चा करुया' असे सांगून आपण माघार घेतली असती, किंवा महिनाभरानंतर ह्यावर चर्चा करण्याची तयारी दाखवली असती तर खरंच तुमच्याबद्दल आदर वाढला असता व तुम्ही जी नेहमी स्वतःच्या तत्त्वांची भलामण करता त्यातला खरेपणाही दिसला असता. मुद्दे नाहीत म्हणून प्रतिपक्षावर प्रच्छन्न आरोप करुन, हिणवून आपली पडती बाजू झाकणे हे अजिबात पटलेले नाही. तुम्ही राम राम नंतर ठोका, तुमच्या तर्कबुद्धीने मला खाली प्रश्नांची उत्तरे एकदाची द्याच. कारण तुम्हीच ती विधानं आरोप म्हणून केली आहेत. त्याचे उत्तर मिलणे आवश्यक आहे, नाहीतर सुजाण मिसळपावकरांना कसे समजेल? (?चष्मा लावल्याने) मी दिलेल्या दुव्यातला "डिसेंबर" दोनदा सांगूनही दिसला नाही... व ते परिच्छेद कॉपी करून दाखविल्यावरही तिकडे दुर्लक्ष केले गेले आहे असेही दिसून आल्याने माझ्या ह्या दोन-तीन प्रतिसादांमधे नेमके कुठे तुम्हाला ^^ हे दिसून आले/जाणवले ते अधोरेखित/स्पष्ट करण्याची कृपा करा. दुसर्‍या प्रतिसादात तर डिसेंबरला धरूनच पूर्ण प्रतिसाद आहे. अजिबात दुर्लक्ष केलेले नाही. माझ्या पूर्ण प्रतिसादात डिसेंबर कितीवेळा आलाय मोजा बरं! पाचवेळा आहे. वाचलंय आपण, तरीही...? सोईचे दिसणे/ न दिसणे, मुद्दा भरकटवणे, इत्यादी सतत होत असल्याने व असे वितंडवाद वरील तिन्ही गोष्टी माझ्या तीन्ही प्रतिसादात नेमक्या कुठे झाल्या याबद्दल स्पष्टिकरण द्याल? बाकी कोणता चष्मा लावल्याने खरिपाची पेरणी नोव्हेंबरानंतर झाल्याचे दिसली असावी याचा विचार करतोय. निष्पक्ष असणार्‍यांना इतकी धादांत चूक पुढे येऊन मान्य करायला इतके का जड जात आहे हे मिपाकरांना समजले असेलच! हा प्रतिसाद आठवतोय.

In reply to by संदीप डांगे

माझा आकडेवारीसह असलेला मेगाबायटी वाचला नाही असे दिसते! अन्यथा मी फक्त शीर्षक वाचले असा अंदाज आपण केला नसता! बरंच खोदकाम केलंय साहेब! बातमी दुव्यातच नाही तर अख्खी प्रेस कॉन्फरन्स वाचून पाहिले जिथेकुठे बातमी आली आहे ती! सगळीकडे एप्रिल ते नोव्हेम्बरचे आकडे दिलेत! दोन तीनदा दुव्याकडे लक्ष वेधले असतानाही हे कोणी लिहिलेले आहे ???!!! अश्या चष्मेबहाद्दूर खोदकामाच्या संशोधनाच्या पायावर उभे असलेले प्रतिसाद वाचायची आणि परत परत त्यांचे खंडन करायची तसदी घेण्यासाठी मला वेळ नाही. तेव्हा अगोदर म्हटल्याप्रमाणेच, तुम्ही तुमच्या संशोधनाची पद्धत चालू ठेवून कितिही-बायटी लेख-प्रतिसाद लिहायला मोकळे आहात... मात्र, मी दर वेळेस त्यांच्यावर उत्तर देऊन वितंडवाद चालू ठेवायला कळत-नकळत मदत करेन, अशी अवास्तव अपेक्षा ठेवू नये. कृपया, हे सुद्धा वारंवार सांगायला भाग पाडू नका. राम राम !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 11/01/2017 - 14:58
बोअरींग असला तरी हा प्रतिसाद वाचावा अशी मी सर्व वाचकांना विनंती करतो. मी जे काही प्रतिसाद लिहिलेत ते आपण सपशेल नाकारत आहात त्यामुळे खरंच तुम्ही माझे प्रतिसाद वाचले असूनही उत्तर नाही म्हणून टाळत आहात असे दिसते. तरी इथे मिपावर होणार्‍या चर्चा ह्या कायमस्वरुपी राहत असल्यामुळे व भविष्यात वाचक हे वाचणार असल्यामुळे मी आपण करत असलेले आरोप खोडून काढणे माझी जबाबदारी समजतो. सुजाण मिपाकरांसाठी ते करणे आवश्यक आहे. वितंडवाद म्हणून प्रतिपक्षावर गैर आरोप करणे बंद होईल तो सुदिन! म्हात्रेसाहेबांनी दिलेली बातमी संपूर्ण इथे देत आहे व त्यास माझे खंडनही लिहित आहे. किमान ह्यावरुन तरी म्हात्रेसाहेबांकडे उत्तर नसल्याने माझ्या मूळ तीन प्रतिसादाकडे मेगाबायटी म्हणून हिणवल्याचे दिसेल. १. the collection of both direct and indirect taxes is up in April-November 2016, from the comparable year-ago period, finance minister Arun Jaitley said today while releasing advance estimates. साधारण इंग्रजी ज्याला समजतं त्याला वर हे आकडे एप्रिल-नोव्हेंबरचे आहेत हे दिसेल. २. "Those reports and figures (saying tax collection would go down) were all panic numbers, the numbers I'm giving you are real. Even economic affairs secretary kept saying there was no need to panic," Jaitley said. जेटली इथे म्हणतात करसंकलन ढेपाळेल असे रिपोर्ट्स आले ते सगळे पॅनिक नंबर होते, मी देत असलेले आकडे खरे आहेत. गंमत म्हणजे पॅनिक नंबर्स हे नोटाबंदीनंतर होणार्‍या परिणामांची उहापोह करणारे तर जेटलींचे नंबर नोटाबंदीआधीच्या काळातले आहेत. जेटलींचे कॅलेंण्डर उलटे चालत असावे. ३. For April-November 2016, overall direct tax collection is 12.01 percent higher than in the same period in 2015. Overall collection of indirect taxes is up as much as 25% in April-November 2016, from the comparable year-ago period. इथे ही ते एप्रिल-नोव्हेंबरचाच आकडा देत आहेत. ४. Of the total tax collected in April-November 2016, central excise tax collection is up 43 percent, service tax collection is up 23.9 percent and customs duty tax collection is up 4.1 percent. All these increases are from taxes collected in the year-ago period. इथे ही ते एप्रिल-नोव्हेंबरचाच आकडा देत आहेत. ५. According to preliminary data for December 2016 - a month after the high-value note ban and through the cash shortage period - total indirect tax collection rose 14.2 percent in December 2016 from the comparable year-ago period. हां, इथे हा तो जगप्रसिद्ध डिसेंबर महिन्यातल्या करसंकलनाचा आकडा. ज्याकडे दुर्लक्ष केल्याचा म्हात्रेंचा दावा आहे. पण ह्यासंबंधी तर मी एक पूर्ण प्रतिसाद स्पेष्यलमधे लिहलाय. वर वाचून घ्यावा. डिसेंबर १६ पेक्षा डिसेंबर १६ चे करसंकलन जास्त असेल हे साधार वर मांडले आहे. त्यात उद्योगधंद्यावर नोटाबंदीचा झालेला विपरित परिणाम दिसणार नाही. म्हात्रेसाहेबांची बातमी देण्यामागची भूमिका "नोटाबंदीचा उद्योगधंद्यावर कोणताही परिणाम झाला नाही" अशी होती हे विशेष लक्षात घ्यावे. ६. Customs duty tax collected has declined to -6.3 percent compared to December 2015. This is primarily because gold imports fell, Jaitley said. For December 2016 central excise tax collection though rose 31.6 percent from December 2016, the growth is related to manufacturing. As for service tax collected in December 2016, that rose 12.4 percent compared with December 2015. इथे ह्याच मुद्द्यावर मी प्रश्न विचारलेला की सीईटी भरण्याची मुदत व पद्धत काय असते. काय तो रोज भरतात, आठवडा, पंधरवड्याला भरतात, महिना, तिमाही, सहामाहीला भरतात? ह्याचे उत्तर मिळालेले नाही. इथेही या डिसेंबरची तुलना मागच्या डिसेंबरमधे केली जिथे इंधनाचे दर, करआकारणी ह्यात खूप तफावत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत सर्विसटॅक्स वाढवलेला आहे अडिच टक्क्यांनी हेही लक्षात घ्यायचे आहे. ७.In addition, in December 2016, indirect tax collection rose 12.8 percent compared with a month earlier. म्हात्रेसाहेबांच्या माझ्यावरच्या "दुर्लक्ष करत आहात, सोयीचे बघता" ह्या आरोपाचे व उत्तर न देण्याच्या भूमिकेचे मूळ इथे दडलेलं आहे. इथे म्हटलंय की अप्रत्यक्ष करसंकलनाचे प्रमाण मागच्या महिन्यापेक्षा १२.८ टक्क्यांनी वाढले आहे. सरकारकडे अप्रत्यक्ष कर ज्या महिन्याचे त्याच महिन्यात भरले जतात का? ह्यात इंधनावरचे वाढलेले कर व दर धरलेत काय? पेट्रोलपंपांवर जुन्या नोटा चालत होत्या म्हणून गरज नसतांना हजार-पाचशेचं पेट्रोल टाकायला भाग पडल्याने, काळापैसा पेट्रोलच्या माध्यमातून वळवून घेतलेला असल्याने, अप्रत्यक्ष करांची वाढ दिसण्याची शक्यता आहे. तसेच कॅश नसल्याने कॅशलेस ट्रॅझॅक्शन्स ३००% पर्यंत वाढली हे ही बघायला हवे. त्यातून झालेले करसंकलन मोजावे लागेल. ह्या आकड्यामागे अनेक संदर्भ असल्याने ह्याचे विश्लेषण आवश्यक आहे असे माझे मत आहे. रुपयातली घसरण, निर्देशांकांची घसरण, बाजारातले अहवाल, उद्योगक्षेत्रातल्या अनेकांच्या प्रतिकूल मुलाखती, 'धंद्यावर तात्पुरता परीणाम आहे पण पुढे नीट होइल' असे म्हणणारे दिग्गज उद्योगपती, कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढीत घट, रोख नसल्याने अनावश्यक खर्चांना आवर घातला सांगणारे सामान्य लोक, बंद पडलेल्या कारखान्यांच्या बातम्या, आपाअपल्या गावी परतलेल्या मजुरांच्या बातम्या, मनरेगाच्या मजुरांमधे अचानक झालेली ३००% वाढ, बॅन्कांमधे कॅश नसल्याने रोख व्यवहार करायला आलेल्या अडचणी, इत्यादी सर्व सत्य पुढ्यात असतांना हा करसंकलनाच्या वाढीचा आकडा विसंगत वाटत आहे. ८. "In November, it was being suggested that the demonetisation impact+ would be more in December, but even indirect tax collection rose," the minister said. जेटली साहेब फक्त करसंकलनाचेच आकडे धरुन बसलेत, त्यामागच्या करामती बघायला तयार नाहीत. शेवटी ते देशातल्या अग्रगण्य वकिलांपैकी एक आहेत. ९. From preliminary data available for November, the minister said that VAT collection from states also increased in November 2016, compared to the year-ago period. ह्या आकड्यातही गडबड आहे. ह्यावर सविस्तर विश्लेषण गरजेचं आहे. अनेक राज्यांनी आपले वॅट स्ट्रक्चर बदलले आहे व वॅटच्या आकारणीतही वाढ झाली आहे. १०. "Another thing to remember, the collection estimate for November 2016 - when taxes could be paid in old currency - indicates that VAT must have been paid in old currency. So VAT collection is also up post demonetisation," Jaitley said. जेटली साहेबांनी इथेही मस्त धूळफेक केलीत. काळापैसा खपवायला लोकांनी जुन्या नोटांमधे वॅट भरला असे म्हटले आहे. हे नक्की कसे घडले असेल हे इथे तज्ञांच्या मते. वॅट भरायला लागतो तो ऑक्टोबरमधे झालेल्या विक्रीचा नोव्हेंबरच्या २१ ला, नोव्हेंबरचा २१ डिसेंबरला. म्हणजे विक्री झाल्याचे ऑक्टोबर नोव्हेंबरमधे दाखवायला लागेल खोट्याबिलांसह. तसेच अनेक स्थानिककर ही जुन्या नोटांमधे भरले गेलेत. ह्या माहितीत तथ्य जरी असले तरी करसंकलन झाले ते काळ्यापैशाने, उद्योगधंदे-व्यापार वाढल्याने नाही हे स्पष्ट आहे. अजुनही म्हात्रेसाहेबांना मी दुर्लक्ष करुन सोयीचे वाचले असे म्हणायचे असेल तर ते निश्चित म्हणू शकतात. म्हात्रेसाहेबांनी जेटलींच्या आकड्याच्या आधारे उद्योगधंद्यावर परिणाम झाला ही विरोधकांची खोटी बोंबाबोंब आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला, तो दावा खोडून काढण्याचा मी यथाशक्ती, यथाबुद्धी प्रयत्न केला. आकडेवारी, विश्लेषण व खोदकाम असल्याने हे सर्व कंटाळवाणे असू शकते पण दुसर्‍यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा हे केलेलं केव्हाही चांगले. बाकी पब्लिक सब जानती है!

In reply to by संदीप डांगे

मलाही जेटलींचे आकडे खोटे नसले तरी संयुक्तिक वाटत नाहीयेत. याला कुठला दुसरा अँगल असला तर जाणकारांनी इथे मांडल्यास मदत होईल.

In reply to by संदीप डांगे

(मूळ प्रतिसादातील मुख्य मुद्द्याचा "डिसेंबर" हा शब्द तीनदा नजरेस आणूनही तो बघायचे टाळल्यामुळे) जो बुंदसे गयी वो (मेगॅबायटी प्रतिसादांच्या) हौदसे नही आती !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संदीप डांगे 13/01/2017 - 09:27
फॅक्ट आणी फिगर्स असलेल्या मेगाबायटीला सतत हिणवण्यापेक्षा हौदा हौदाने गेलेली कशी परत आणायची ह्याचा विचार केल्यास बरा दिसेल! आकडेवारी, सबळ पुराव्यांमुळे उघडे पडल्याने दुसर्‍यांना कसंनुसं हिणवण्याशिवाय काही न करता येण्यामागचे कारण हे इथल्या मिपाकरांना आता चांगलेच समजले असेल.

संदीप डांगे 10/01/2017 - 04:12
काही खास आकडेवारी: १. दिनांक १० डिसेंबर २०१६ ची बातमी आहे ही. म्हणजे नोव्हेंबरातल्या विक्री-उत्पादनांचा तसा काही संबंध नसावा. The central government’s direct tax collections increased 15.1 per cent in April-November 2016 compared with the same period a year earlier, while indirect tax collections rose 26.2 per cent in the same eight-month period. However, total indirect tax receipts during November 2016 were 13.9 per cent lower than the collections seen in October 2016. Within direct taxes, net corporate income tax collections grew 8.75 per cent during April-November 2016 while net personal income tax collections grew 23.9 per cent over the same period of the previous year. Within indirect taxes, net central excise collections stood at Rs.2.43 lakh crore in the period between April and November 2016 as compared with Rs.1.69 lakh crore during the corresponding period in the previous financial year, a growth of 43.5 per cent. “If demonetisation happens on November 9, people cannot stop production from November 9 and 10,” M.S. Mani, Senior Director at Deloitte India, said in a telephone interview. “Whatever is there in the cycle, all the raw materials have to get consumed. Goods will get produced and will get dispatched,” he said. “If there is excess stock on account of demonetisation, that will lead to a reduction in production with a two-month delay,” Mr. Mani added. “So the November effect, to my mind, will be felt in January.” http://www.thehindu.com/business/Direct-tax-collections-rise-15-indirect-tax-collections-up-26/article16787015.ece २. दिनांक ९ जुलै २०१६: नोटाबंदीचा 'न' कोणाला माहित नसतांनाची बातमी. एप्रिल ते जून २०१६ या तिमाहीचे एप्रिल ते जून २०१५ च्या तुलनेत वाढलेले आकडे. “The main reason for this increase is the change in the requirement for advance tax payment in respect of individuals made in last Budget. Earlier, there were three installments to be paid by individuals in the month of September, December and March. Now individuals are supposed to pay four instalments of advance tax in June, September, December and March. June installment is 15 per cent,” Adhia said. http://indianexpress.com/article/business/economy/direct-tax-collection-up-25-in-q1-2017-indirect-up-31-2902380/ ३. नेहमीच दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा सर्व प्रकारच्या करांच्या कलेक्शनमधे कशी वाढ-घट होते हे दर्शवणारा तक्ता. १९८१ ते २०१२ पर्यंतचे आकडेवारी. http://portal.indiainfoline.com/datamonitor/Public-Finance-Annually/Central-State-Govt-Finance-Combined/Direct-and-Indirect-Tax-Revenues-of-Central-and-State-Governments.aspx ४. काही जुन्या बातम्या: १८ फेब्रुवारी २०१४. आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या बजेटनंतर. करसंकलनध्येय ७७,००० करोड ने हुकलं, कॉन्ग्रेसच्या राज्यात. पी चिदंबरम अर्थमंत्री. The interim Budget documents laid in Parliament by Finance Minister P Chidambaram today showed that the finance ministry has failed to achieve the targets in direct and indirect taxes as laid out in BE. The government had set a Budget target of a 19-per cent jump in the tax mop-up this year too, but the collections as on March 31, 2014 are projected to show only a 11.6-per cent growth as per RE with GDP growth slowing down. Asked whether the next year target of 19 per cent growth was too ambitious, the finance minister said that the targets are always set high at the beginning of the year to encourage higher tax collections. ५. त्यानंतरच्या २०१४-१५ च्या भाजपच्या राज्यात. करसंकलन ध्येय ६९ हजार करोड ने हुकलं. तरी २०१३-१४ च्या तुलनेत करसंकलन १९% टक्क्यांनी वाढले. http://www.thehindubusinessline.com/economy/direct-tax-collection-falls-short-by-14-in-201415/article7167232.ece ६. आर्थिक वर्ष २०१५-१६: भाजपच्या राज्यात करसंकलनाचे ध्येय पूर्ण तर केलेच त्यावर ५००० करोड अतिरिक्त मिळवले. अभिनंदन. The indirect tax revenue exceeded budget estimates (BE) for 2015-16 by Rs 65,618 crore and the RE by Rs 9,885 crore. The collection represents a growth of 31.1 per cent over 2014-15. The direct tax collection, however, is lower than the RE of Rs 7.52 lakh crore. The realisation was 7.61 per cent higher than 2014-15 receipts. http://www.financialexpress.com/economy/at-rs-14-60-lakh-crore-tax-collection-in-2015-16-exceeds-target-by-rs-5000-crore/233410/

संदीप डांगे 10/01/2017 - 04:31
पेट्रोलच्या किंमतीत मूळ किंमतीपेक्षा टॅक्स जास्त. ६० रुपयाच्या पेट्रोलमधे ३१ रुपयांचा निव्वळ कर. http://www.financialexpress.com/economy/taxes-exceed-actual-cost-of-petrol/163469/ 1 http://www.mycarhelpline.com/index.php?option=com_latestnews&view=detail&n_id=417&Itemid=10 इंधनांच्या सदर दरवाढीचा, करवाढीचा एकूण करसंकलनावर किती परिणाम झालाय याचाही विचार व्हावा. तसेच पेट्रोलपंप वर इंधनासाठी जुन्या नोटा चालत होत्या हेही लक्षात घेतलं पाहिजे.

http://timesofindia.indiatimes.com/india/13-cooprative-banks-deposited-rs-1600-crore-in-banned-notes/articleshow/56464717.cms?utm_source=toiandroidapp&utm_medium=Email&utm_campaign=list १. नोव्हेंबर १६ ते २१ या कालखंडात १३ कोऑपरेटिव्ह बँकांनी तब्बल १५९६ कोटी रुपये रद्द झालेल्या रु५०० आणि रु १००० च्या नोटांत मुंबईतील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा केले आहेत. २. अजून एका को-ऑप बँकेने रिझर्व बँकेकडे असे रु१४०० कोटी जमा केले आहेत. ३. सुरतेतल्या एका को-ऑप बँकेने असेच रु२० कोटी बँक ऑफ बरोडामध्ये जमा केले आहे. या बँकांना ९ नोव्हेंबरपासून जुन्या नोटा स्विकारायला बंदी होती. तर मग इतके रद्द चलन ०९ ते २१ नोव्हेंबर या कालखंडात त्यांच्याकडे कसे आले याची अर्थातच चौकशी होईलच. ते चलन ०८ नोव्हेंबरपूर्वी जमा झालेले असेल तर ०८ नोव्हेंबरच्या पंतप्रधानांच्या भाषणानंतर इतकी मोठी रक्कम इतके जास्त दिवस त्यांनी स्वतःजवळ का बाळगली या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, जे कठीण आहे हे कोणीही सांगू शकेल. भविष्यात अजून असे प्रकार पुढे येतील यात वाद नाही कारण अश्या सुमारे ३०० बँका ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, या घटना "को-ऑप बँकांना जुने चलन स्विकारायला परवानगी नाकारली" म्हणून विरोधाचा आवाज उठवण्यार्‍या मनमोहन सिंगसाहेबांसकट सगळे जण उघडे पडले आहेत यात वाद नाही. "माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ञ व माजी आरबीआय गव्हर्नर" असलेल्या मनमोहनसिंग इतका प्राथमिक स्तराचा अंदाज नव्हता यावर विश्वास बसत नाही असे मी अगोदर लिहिले होते. त्यांचे राज्यसभेतले भाषण चलाख राजकारण्यांनी लिहून त्यांना वाचायला भाग पाडले असे आजही माझे मत आहे. चुकीच्या राजकारण पाय गुंतले की भल्या भल्यांचे कसे पतन होते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. शहाण्याने त्या फंदात पडू नये आणि चूक झाली असेल तर संधी आहे तोवर सुधारून घ्यावे हेच अंतीम भल्याचे असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 11/01/2017 - 14:45
चिल माडी....... सहकारी बँकांना नोटा स्वीकारायला बहुधा बंदी नव्हती. नोटा बदलून द्यायला बंदी होती. आणि मेनली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बंदी होती. आमच्या सोसायटीने चार हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात डिसेंबर महिन्यात ठाणे जनता सहकारी बँकेत भरले आहेत (पे स्लिप हवी असल्यास दाखवीन). तेव्हा सहकारी बँकांनी जे पैसे जमा केले आहेत ते लेजिटिमेट असू शकतील. उशीरा भरले म्हणजे ते काळे असणार वगैरे निष्कर्ष काढण्यासारखी परिस्थिती नाही. तीन ते पाच लाख कोटी रुपये काळे असल्याने बँकांत जमा होणारच नाहीत असे समजणारे उघडे पडले. सुरुवातीच्या काळात "केवढाच्या केवढा ट्याक्स महापालिकांकडे जमा झाला" म्हणून टाळ्या पिटल्या. त्यात किती प्रमाणात काळा पैसा आला असेल याचा अंदाज करणे शक्य नाही. मनमोहनसिंग काही उघडे वगैरे पडले नाहीत.

In reply to by नितिन थत्ते

तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द नोटा कोऑप बँकांमध्ये ०९ नोव्हेंबरनंतर कश्या आल्या असाव्यात ? हा प्रश्न तुमच्या मनात आला नसेल, त्यामुळे तुम्ही केलेला विनोद तुमच्याच ध्यानात आला नाही बहुतेक. थोडे थांबले की चौकशीत बाकी सगळे मुद्दे बाहेर येतील तेव्हा नक्की काय झाले ते कळेलच, तेव्हा बघू. आता तरी ते संशयास्पद आहे याबद्दल संशय नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नितिन थत्ते 11/01/2017 - 22:31
तुम्ही मुळात सहकारी बँकांना बंदी होती असे म्हणालात. ते गृहीत धरून त्यांनी पैसे नोव्हेंबरात जमा केले म्हणजे ते बॅक डेटेड जमा केले असे पुढचे तर्क चालवलेत. तुमच्या मूळ गृहीतकालाच सुरुंग लागून सुद्धा तुम्ही गडाबडा लोळलात म्हणून आश्चर्य वाटले. >>तेवढ्या मोठ्या रकमेच्या रद्द नोटा कोऑप बँकांमध्ये ०९ नोव्हेंबरनंतर कश्या आल्या असाव्यात ? हा प्रश्न तुमच्या मनात आला नसेल, त्यामुळे तुम्ही केलेला विनोद तुमच्याच ध्यानात आला नाही बहुतेक. १५०० कोटी रुपये काही फार नाहीत. अनेक सहकारी बँका खूप मोठ्या आहेत.

In reply to by नितिन थत्ते

सहकारी बँकांना नोटा स्वीकारायला बहुधा बंदी नव्हती. नोटा बदलून द्यायला बंदी होती. आणि मेनली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना बंदी होती. बरोबर आहे. फक्त जि.म. स.बँकांना केवायसी पुर्ण नसल्यामुळे बंदी होती. सहकारी बँकांवर आरोप करणारे २००० च्या नवीन नोटांना खासगी बँका व सरकारी बँकांतून पाय फुटले होते हे सोइस्करपणे विसरत आहेत.

In reply to by मार्मिक गोडसे

एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन करणे चूक असते. माझ्या मते दोन्ही गोष्टी चूक आहेत आणि दोघांचीही कसून चौकशी करून दोषी लोकांना शिक्षा व्हायला हवी.
सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे. नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते.